Friday, October 11, 2024

रतन टाटा .. हृयशल्य

हृदयशल्य!
तो केवळ दहा वर्षांचा असताना त्याला प्रेमाचा नव्याने शोध घेणं क्रमप्राप्त ठरलं! वडील नवल आणि आई सुनी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तो एकटा उरला. डोक्यावर केवळ छप्पर असून चालत नाही....मायेची सावली लागते माणसाला.
आई-बाप हयात असतानाही त्याच्या वाट्याला हा असा पोरकेपणा आलेला होता. सोबत एक धाकटा भाऊ होता पण धाकटा. मग तो स्वत:च स्वत:चा वाटाड्या झाला. निवृती,ज्ञानदेव,सोपान यांना आईची जागा घेणारी मुक्ताई होती..याला मात्र आपल्या मनालाच मुक्ता बनवून ‘साही अपराध जनाचा’ असं स्वत:ला म्हणावं लागलं.
आईने आपला स्वतंत्र संसार नव्याने मांडला. तिच्या आईच्या आईने मग या दोघा भावांना आपल्या पदराखाली घेतलं. दत्तक घेतले गेले त्याला.
नियतीने त्यांच्या आयुष्याची तुटलेली दोरी एक गाठ मारून पुन्हा सांधण्याचा हा प्रयत्न होता.
पैशांची कमतरता म्हणजे काय हे ठाऊक नसलेल्या घरांत बालपण गेल्याने सुदैवाने या माणसाला जगण्यासाठी संघर्ष नाही करावा लागला. पण त्याच्या भावनिक आयुष्यात फक्त एकच स्त्री होती ती म्हणजे त्याची आजी. तिच्या सावलीतून जरासे बाहेर निघून तो परदेशी गेला..स्वत:च्या पायांवर उभं राहायला. देखणा,राजबिंडा तरुण. सालस,सभ्य आणि आपल्या आजोबांकडून नर्मविनोदी स्वभावाची देणगी लाभलेला. त्याच्या प्रेमात कुणी न पडेल तेच नवल. परदेशात शिकत असताना एक अमेरिकन तरुणी त्याच्या आयुष्यात आली. प्रेमाचे रंग दाही दिशांना पसरले. भारतीय प्रेम आणि पाश्चिमात्य प्रेम यात फरक असतो हे त्याच्या तोवर ध्यानी आलं नव्हतं. पश्चिमेकडे व्यवहार सर्वाधिक वरची जागा पटकावून असतो त्यांच्या जगात. हा मात्र अस्सल भारतीय माणूस. ज्याला आपलं मानलं त्यासाठी आपलं सर्वस्व अगदी हक्कसोड पत्र करून देऊन मोकळा होणारा. त्याला परदेशी जाऊन सहा-सात वर्षे झाली होती. आणि याच दरम्यान त्याच्या मायेचा पदर इथं विरत चालला होता. आज्जी खूप आजारी पडू लागली. तिने सांगावा धाडला. आणि त्याच दरम्यान भारतावर युद्धाच्या ढगांनी गर्दी केली. त्याने प्रेयसीला लग्नाचे वाचन दिले होतेच. आणि ती सुद्धा तयार होती. पण परिस्थिती बदलली आणि तिचे व्यावहारिक संस्कार तिला बदलायला पाडू लागले. भारतात कायमचे राहायला जायचे,शिवाय तिथे तर युद्धाची स्थिती आहे. जीवनाचा भरवसा नाही,सुखाची शाश्वती नाही. तिच्या पालकांनी तिला पायाजवळ पहायाला उद्युक्त केलं आणि तिने मग दूरवर पाहण्याचं बंद केलं......त्याची प्रेमकहाणी विवाहात परावर्तीत होण्याआधी समाप्त झाली. तिच्यासाठी हा निर्णय अगदी नैसर्गिक होता. पण याने मात्र आपल्या काळजातील एक मोठा कप्पा कायमचा दुखावून घेतला होता.
तो आला तसा इथलाच झाला. आजी,धाकटा भाऊ यांच्या सहवासात त्याने आपले एकाकीपण कमी केले..पण ही त्याची त्याने काढलेली समजूत होती.
कौटुंबिक व्यवसायात त्याने स्वत:ला इतके बुडवून घेतले की काळजाला वैय्यक्तिक आयुष्याचा विचार करण्याची सवडच गावेना. स्वत:चं घर वसवण्याचं जणू तो विसरत चालला होता. उद्यमशील स्वभाव शांत बसू देईना.....लक्ष्मी प्रसन्न होतीच आता ती त्याच्याकडेच कायम वस्तीला आली होती.
लाखो लोकांच्या संसाराशी आता तो नकळत बांधला गेला. मालक कामगारांचा पगार कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. हा मात्र पगार किमान चांगला असलाच पाहिजे या भूमिकेत असताना प्रत्यक्ष आपल्याच व्यावसायिक सहका-यांशी वाद घालणारा निघाला आणि आपले म्हणणे पटवू शकणाराही निघाला.
काळीज करपलेलं असलं की ते आपल्या मनाविरुद्धही कुठेतरी ओलावा शोधत असतं. त्याच्याही मनाच्या कोरड्या रानात काही श्रावणसरी बरसल्या...पण नशिबाचं ऊन नेमकं त्याच वेळी ऐन भरात होतं. संसार उभारायच्या अगदी जवळ असताना नियतीने त्याचा पाय अनेकदा मागे खेचला....त्याला प्रचंड मोठ्या संसाराला हातभार लावायचा होता बहुदा. आणि वैय्यक्तिक एकल संसारासाठी त्याला वेळ द्यावा लागला असता...ते नियतीने टाळले. मोठ्या हितासाठी नशीब छोट्या स्वप्नांचा असा बळी घेते!
अगदी तसंच झालं.....देश-विदेशात त्याने व्यवसायाचं जाळं उभारलं.
नवं जंगल उगवू लागलं की हळू हळू रोपे मोठी होतात,त्यांची झाडं होतात,त्यांना बहर येतो,कळ्या उमलू लागतात आणि मग फुलपाखरे आली की जंगल संपूर्ण होतं.....अनेकांचं आश्रयस्थान बनतं.
हा आता स्वतःच एक मोठा वृक्ष बनला होता. त्याला स्वत: आणखी उंच व्हावं लागलं. पण म्हणून सूर्य सर्वाधिक झेलला तो यानेच. त्याच्या छायेखाली मात्र गडद थंड सावली होती. आणि या सावलीत जो आला तो कधीच माघारी फिरला नाही. आज असे लाखो संसार त्याच्या आधारावर उभे आहेत. लाखो रुग्ण त्याच्या देणग्यांच्या आधारे जगले. अर्थाअर्थी थेट संबंध नसतानाही त्याने अगणित माणसांना जगवले आणि त्यांच्यात आपले प्रेम शोधले...नव्हे प्राप्त केले. माणसासोबत त्याने प्राणीमात्रही मित्र मानले.  
आपल्या मनातील प्रेमाच्या,त्यागाच्या,समर्पणाच्या भावनेला त्याने एक अलौकिक आभाळ दिलं....त्यात त्याने जमिनीवर राहून मनानेच विहार केला. आपल्या शब्दांतून एकाकीपणा सहसा जाणवू दिला नाही. तो प्रत्येकाला आपला वाटला आणि तरीही त्याचं स्वत:चं रक्ताचं होण्याचं भाग्य कुणाला लाभलं नाही....! हे प्राक्तन! पण यामुळे त्याचा अंश आता मागे उरला नाही.
तो जणू कर्ण कलियुगातला. त्याने श्रीमंतीची कवच कुंडले कुणी न मागताही समाजाला दिली...एका हाताचं दान दुस-या हातालाही समजू नये याची नेहमी काळजी घेतली. स्वत:चं म्हणावं असं कुणीही मागे न ठेवता या जगाचा निरोप घेणारा मात्र सा-या देशाला स्वत:चं करून गेला....हा त्याला नियतीने दिलेला न्याय म्हणावा लागेल.
रतनजी टाटा....नावाला साजेसं कर्तृत्व करून दाखवण्याचे भाग्य तुम्ही मिळवलेत....विश्व जाले वन्ही....संते आपण व्हावे पाणी....हे मुक्ताईचे शब्द त्यांनी जगून दाखवले....भारतमातेच्या कंठातील एक अनमोल रत्न निमाले!
(संभाजी बबन गायके. 9881298260.)
माहिती समाज माध्यमांतून साभार.
या लेखाचे भाववाचन सौ.सुवर्णा बोडस (आकाशवाणी निवेदिका) यांनी खूप छान केले आहे. त्याची link हवी असल्यास पाठवेन.





https://www.facebook.com/100044740260050/posts/pfbid033jaKxCe2fRnVM4VANtHXyxvxiAZiyDsmk1EqQVXcKivD3bkWbgxDgWJJCr5PMRdZl/

रतन टाटा ....

"रतन टाटा" यांची अंत्ययात्रा कव्हर करतांना जाणवलेल्या ठळक बाबी- लेखक - मनश्री पाठक।

१) रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता काढलेल्या अंत्ययात्रेत कुठलाही मोठा तामझाम नव्हता... साधी फुलांनी सजवलेली लहानशीच गाडी ज्यातून टाटांचं पार्थिव स्मशानभूमीत अवघ्या १५ ते २० मिनीटांत पोहोचलं... एवढा मोठा इतिहास घडवणारा उद्योगपती पण, त्याची अंत्ययात्रा सामान्य मुंबईकराची कोंडी करणारी , त्यांची नेहमीची गती कमी करणारी नव्हती...

२) स्मशानभूमीत सुरुवातीला मोजके १५० लोकच उपस्थित होते... सुरुवातीला सामुहिक शांती प्रार्थना झाली... `कोणताही धार्मिक विधी न करता´ शांतपणे पार्थिव विद्युतदाहिनीत नेलं गेलं...

३) टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हिआयपी स्मशानभूमीबाहेर आले... आणि बाहेर इतका वेळ रोखुन धरलेला जवळपास तीन-चारशेचा जमाव एकदम स्मशानभूमीत आला... काहींनी आम्हांलाही अंत्यदर्शन हवं म्हणून पोलिसांसोबत थोडीशी हुज्जतही घातली...  तेवढ्यात एक किरकोळ शरिरयष्टीचा मुलगा जमावाच्या नजरेस पडला... `शांतनु सर, शांतनु सर´ अश्या हाका गेल्या...चेहरा उतरलेला तो बावीशी-पंचवीशीचा तरुण- शांतनु नायडू अतिशय शांतपणे जमावाला हात जोडून म्हणाला `everything is over´... केवळ या तीन शब्दांत जमाव शांत झाला.. आणि त्यातले काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले

४) शांतनु मान खाली घालुन, मिडीयाला काहीच उत्तर न देता बाहेर आला... एकाही कॅमेराकडे शांतनुनं साधी नजरही फिरवली नाही...बाहेर येताच त्यानं आपली बाईक शोधायला सुरुवात केली... अमित शहा आणि इतर व्हिआयपी येत असल्यानं रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या हटवल्या होत्या... त्यात शांतनुची बाईकही कुठेतरी गेली... शांतनु हळु आवाजात आपल्या सहका-याला म्हणाला-
`टॅक्सीसे जाते है, बाईक बाद में देखते है´ ... बाईक हरवलेल्या शांतनुला घेऊन जाण्यासाठी अनेक बड्या गाड्या तिथे दरवाजा उघडून तयार होत्या मात्र, तरीही शांतनुच्या तोंडुन निघालं -
`टॅक्सी´से जाते है... स्मशानभूमीसमोरचा रस्ता बंद केल्यानं तिथे टॅक्सी येणार नव्हतीच... शेवटी कोणाच्यातरी खाजगी गाडीत मागच्या सीटवर तीन जणांमध्ये बसून शांतनु तिथुन गेला

५) या प्रसंगानंतर  मात्र माझं लक्ष गर्दीतल्या काही चेह-यांनी वेधलं... माझ्यासकट अनेकजण तिथे असे होते की ज्यांना तिथला माहौल मोबाईलमध्ये टिपायचा होता... काही जण मात्र कमालीचे स्तब्ध आणि शून्यात नजर लावलेले होते... समोरुन टाटांचं पार्थिव गेलं , पोलिसांनी रायफलचे तीन राऊंड झाडत मानवंदना दिली पण यांचे कॅमेरे वर आलेच नाहीत- त्यांचे हात मोबाईलवर नव्हते तर दोन्ही हात जोडलेले होते...डोळ्यांच्या कडा भिजलेल्या होत्या...

६) त्यांपैकीच एकजण पटन्याहून १५ दिवसांपूर्वीच टाटांना भेटायला आलेला- साधारण तीशीचा हा तरुण सॅनिटरी पॅडच्या स्टार्टअपसाठी टाटांची मदत मागायला मुंबईत आला होता... ईमेलवरुन अपॉईंटमेंट ठरत असतांना टाटा आजारी पडले... तरुणाला काही दिवस वाट बघ सांगितलं आणि वाट बघता बघताच टाटा गेले... भेट झालीच नाही

७) एक जण इमर्जन्सी फ्लाईट पकडून हैदराबादहून मुंबईत पोहोचला... हा पण तिथला लहानसा उद्योजकच... मी माझ्या घरात टाटांचा फोटो लावतो म्हणाला

८) एकजण ठाण्यात मिस्त्री काम करणारा, एकजण पुण्यातला रिक्षावाला आणि एकजण टाटांच्याच कंपनीत बड्या हुद्द्यावर काम करुन रिटायर्ड झालेला... एकमेकांचं कधीच तोंड न पाहिलेली ही माणसं अक्षरश: एकमेकांच्या गळ्यात पडून रडली... यांना जोडणारा समान दुवा होता तो टाटांचा हात...या  प्रत्येकाच्या आयुष्याला टाटा या नावानं कलाटणी दिली होती... रिक्षावाल्याला प्रशिक्षण मिळाल्यानं चांगला जॉब मिळणार होता, मिस्त्री कामगाराला कॅन्सरमधून जिवनदान मिळालं होतं, आणि हायप्रोफाईल रिटायर्ड व्यक्तीला जगण्यातलं समाधान मिळालं होतं

९) अनेकांना रतन टाटांचं शेवटचं दर्शन तर झालं नाहीच...पण रतन टाटांच्या शरीराचा अखेरचा स्पर्श ज्याला झालाय-  त्या अंत्ययात्रेसाठी वापरलेल्या गाडीला हात लावून अनेकांनी नमस्कार केला... त्या गाडीला सजवलेली फुलं, त्यांची पाकळी घेऊन या लोकांनी आपल्या पाकीटात ठेवली...

१०) टाटांच्या ताज हॉटेलचा संपूर्ण स्टाफ अंत्यविधीवेळी उपस्थित होता... आणि तिथेही हा हॉटेलचा स्टाफ स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांना टाटा मिनरल वॉटरच्या बाटल्या देऊन
`टाटांचंच पाणी´ पुरवत होता...

Manshree Pathak।।।।

आपल्या देशाचा खरा मान, सन्मान, अभिमान आता हरपला आहे!.. देशावर देशातील लहान थोर जनतेवर निस्वार्थी आणि निस्सीम प्रेम करणारे मौल्यवान रत्न आपल्यातून दूर निघून गेले. आपल्या औद्योगिक कौशल्याने आपल्या देशाचं नाव साता-समूद्रा पलीकडे नेणारे देशातील लाखो जनतेचा आधार, खरे देशभक्त आपल्यापासून दूर निघून गेले. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणणारी अत्यंत दुःखद घटना. 😢
अशा प्रेमळ, थोर, पद्मविभूषण "श्री. रतनजी टाटा साहेब" यांना हृदयाच्या खोल अंतःकरणातून भावपूर्ण श्रद्धांजली..!!  🇮🇳 🌹🙏

https://www.facebook.com/100001771475620/posts/pfbid02aELsKqE3yCF8WNkQWwJ9sFCAYwropFoaFgz4e8H3LRdvpxsHwU45LpxDibCRKPW2l/

रतन टाटा ...

रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि 'टाटा' ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. 
बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं. 

रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि 'लायसन्स राज'शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले, आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग बघा की 'लायसन्स राज' संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. 

भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिंपिक्स स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती. 

पण रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं.  त्यामुळे कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान आयटी कंपनी टीसीएस बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी साध्य केली. 

स्वतःच छोटेखानी घर असावं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न, हे हेरून टाटा हाऊसिंगची सुरुवात करणारे रतन टाटाच आणि प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी 'नॅनो' गाडीच्या निर्मितीचं स्वप्न वास्तवात उतरवणारे टाटाच. टेटली, कोरस स्टील, जॅग्वार यासारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड ताब्यात घेणाऱ्या रतन टाटांना, सामान्य भारतीय माणसाची नस पण अचूक माहित होती. सगळं उभारायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता, निर्विकार रहायचं हे कोणाकडून शिकायचं असेल तर रतन टाटांकडूनच. 

माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधीच झालं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या 'बोटॅनिकल उद्याना'साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला. 

बोटॅनिकल उद्यानाच्या उभारणीच्या वेळेला, सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडला, पण कामाचा आवाका लक्षात घेऊन, आणि जीव ओतून आम्ही जे काम करत होतो ते पाहून त्यांनी कधीच निधीच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. इतकंच नाही ते उद्यान पूर्ण झाल्यावर, त्यांनी ते बघायला यावं अशी विनंती मी केली होती, ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते. 

रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वान प्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की 'बॉंबे हाऊस' हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला कारण त्यांच्याकडच्या 'टॅंगो' आणि 'टिटो' या दोन श्वानांपैकी एक, खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे या उदाहरणातून जाणवतं. 

आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख.  

छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना 'श्रीमंत योगी' म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, 'श्रीमंत योगी' ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. 

रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. 

राज ठाकरे ।

Ratan Tata passes sway. Under his leadership, a 150 year old business group truly marked its way in to the 21st century and ‘Tata’ -the brand’ resonated its legacy to the world. The Tata Group foundation lies firm on neutrality and an all-inclusive culture that being the hallmark of Ratan Tata.

The genius of JRD Tata and his mantle was passed onto Ratan Tata. Just after independence, JRD had to fight a lot of battles against the ‘Licence Raj’ malpractices and government decision to nationalise Air India. He achieved all this by maintaining high ethical standards. Fortunately, the entry of Ratan Tata happened when  these malpractices were on the mend and the ‘Licence raj’ was getting obliterated with a rising of the spirit of liberalisation. 

The shackles of these evils were slowly dissipating however, the Indian industries were still reeling under the aftermath and were in a transitional phase. 

Ratan Tata, an astute observer of the ‘world happenings’ and with a global perspective knew how the globalisation would affect our Indian minds and he was aware of the Indian sharp acumen and how capable they were in coping with the global market. Keeping this in mind, right from products like coffee, watches, the world reknowned IT company TCS, and the British pride Jaguar and Land Rover were gracefully taken over by his expertise. 

Being an unparalleled visionary, he extended his arms to achieve every man’s dream of having a home by his housing schemes and by making an affordable car- Nano that was within the reach of every Indian. Amidst all this, one never saw him getting stuck with petty happenings. Rising above all hurdles and achieving was his trademark. 

I was fortunate to have a very personal and close equation with Ratan Tata. It’s never happened that I have put up a proposal and he refused. When we presented him with our blue print for Maharashtra development, he chalked down important suggestions, his spontaneous assistance with his CSR funds for the Maharashtra Navnirman Sena Nashik Botanical Garden and his affection towards me and my party will always be cherished. 

The Botanical garden that was made in Nashik was the result of painstaking effort and perseverance on our part. Ratan Tata was a witness to this and though the initial funds released were not adequate, he graciously sanctioned more keeping the sincerity of our efforts and the magnitude of the work happening. On completion, he made a personal visit to the botanical garden.

Another aspect of Ratan Tata that is very heartwarming and that resonates with me is his love for dogs. Stray dogs are looked after and welcomed in all his premises, be it the Taj Mahal hotel or his office head quarters. 
His love for dogs transcends his persona to a level beyond words. 
Ratan Tata was to be felicitated at the Buckingham Palace for his unmatched philanthropy. However, at the very last moment, his pet dog took ill. He immediately called Prince Charles and conveyed his regrets as he couldn’t leave his ailing dog alone. This highlights what a a remarkable human being he was. 

Today, I feel a sense of deep grief in having have lost a senior and dear friend but our country has lost a national icon. An irreparable loss. 

On behalf of Maharashtra Navnirman Sena and my cherished memories, a heartfelt homage to Ratan Tata 

Raj Thackeray

Thursday, October 10, 2024

रतन टाटा ४ शब्दांच्या पलीकडचे नाते..❤️❤️

शब्दांच्या पलीकडचे नाते..❤️❤️

आयुष्यात काही जणांकडे बघून सुद्धा छान वाटतं आणि त्यात अत्यंत शालीन आणि सुसंस्कृत व्यक्तींच्या अवतीभवती असणं सुद्धा म्हणजे नक्की पूर्वसंचित असेल असंच वाटून जातं आणि असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे शंतनू नायडू. पुण्यातील हा तरुण रतन टाटांच्या जवळ दिसताना अभिमान वाटायचा, आज वाटतं किती अनुभव आणि समृद्ध क्षण याला मिळाले असतील याची मोजदाद ही होणार नाही. याचं एक पुस्तक ‘ i came upon a light house's वाचनात आले आणि पुन्हा आज याची आठवण आली. या मुलाने रतन टाटा यांना जिंकले आणि पूर्णकालीन टाटामय होऊन गेला. आज याचा सारखा विचार येतोय रतन टाटांच्या उत्तरायणात हा सावलीसारखा त्यांच्या बरोबर होता. जिथे कुणी जाऊ शकत नव्हते तिथे याचा वावर सहज होता. ही आणि अशी सहजता आपल्या प्रत्येकाला जमायला हवी असे ही याला बघून वाटले. 

शंतनू नायडू यांच्याच पुस्तकातला हा प्रसंग, २०१६ मध्ये शंतनू नायडू एमबीएसाठी कॉर्नेल विद्यापीठात गेला.  पण त्याने टाटांना वचन दिले की एकदा त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर तो टाटा ट्रस्टसाठी पूर्ण समर्पित असेल आणि रतन टाटा यांनी आनंदाने त्यांची विनंती मान्य केली.

भारतात परतल्यानंतर, टाटांनी त्याला फोन केला आणि म्हणाले, “माझ्या ऑफिसमध्ये खूप काम करायचे आहे. तुला माझा सहाय्यक व्हायला आवडेल का?" यावर शंतनूने लगेच होकार दिला. रतन टाटा हे आधीपासूनच शंतनूच्या सुस्वभावी आणि सर्जनशील कल्पनांचे फॅन होते. रतन टाटा व्यवसाय आणि गुंतवणुकीबाबत शंतनूचा सल्ला घेतात असे ही वाचनात आहे. शंतनू नायडूने आपल्या कामाने रतन टाटा यांचे मन जिंकले आणि शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर होता. मला वाटतं जिद्द आणि चिकाटी याचं दुसरं नाव म्हणजे टाटा. जो त्यांच्याकडे आला तो त्यांचाच होवून गेला. 

From mentor to father figure,from boss to friend

सर्वेश

रतन टाटा ३

रतन टाटांची जीवनमूल्य…त्यांची १० अजरामर विधानं!
१. लोखंडाला त्याचा स्वत:चा गंज वगळता दुसरं कुणीही उद्ध्वस्त करू शकत नाही. त्याचप्रमाणे कुणाही व्यक्तीला त्याची स्वत:ची मानसिकताच उद्ध्वस्त करू शकते, इतर कुणीही नाही!

२. लोकांनी तुमच्या दिशेनं भिरकावलेले दगड घ्या आणि त्यातून भव्य स्मारकांची निर्मिती करा!

३. आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या आयुष्यातले चढ-उतार फार महत्त्वाचे असतात. कारण सरळ रेषा, मग ती ईसीजीमधली का असेना, तुम्ही जिवंत नसल्याचं दर्शवते!

४. जर तुम्हाला वेगाने चालायचं असेल, तर एकटे चाला. पण जर तुम्हाला दूरपर्यंत जायचं असेल, तर सोबत चाला!

५. नेतृत्व म्हणजे इतरांवर अधिकार गाजवणं नव्हे, नेतृत्व म्हणजे तुमच्या अधिकारात असणाऱ्यांची काळजी घेणं!

६. सहानुभूती आणि दयाळूपणा ही एखाद्या नेतृत्वाची सर्वोच्च ताकद असते!

७. यश हे तुम्ही कोणत्या पदावर आहात यावरून ठरत नसतं, तर इतरांवर तुमच्या असणाऱ्या प्रभावावरून ठरत असतं!

८. माझा गोष्टी नशीबावर सोडून देण्यावर विश्वास नाही. माझा कठोर मेहनत आणि तयारीवर विश्वास आहे!

९. माझा योग्य निर्णय घेण्यावर विश्वास नाही. मी आधी निर्णय घेतो आणि मग ते योग्य ठरण्यासाठी प्रयत्न करतो!

१०. ज्या दिवशी मी स्वत:हून काही करू शकणार नाही, त्या दिवशी मी माझं सामान आवरेन आणि निघून जाईन!

रतन टाटा यांच्या या गाजलेल्या विधानांचा अंदाज घेतल्यास त्यांचं आयुष्यच त्यातून प्रतिबिंबित होत असल्याचं दिसून येतं. ते स्वत: देखील याच तत्त्वांवर आयुष्य जगले आणि त्यांनी इतरांनाही हीच तत्व अंगीकारण्याचा सल्ला दिला!

रतन टाटा १

श्री रतन टाटा के जीवन की सबसे बड़ी खुशी

"मैं आपका चेहरा याद रखना चाहता हूं ताकि जब मैं आपसे स्वर्ग में मिलूं, तो मैं आपको पहचान सकूं और एक बार फिर आपका धन्यवाद कर सकूं।"

यह वाक्य रतन टाटा के जीवन का वह क्षण था, जिसने उन्हें सच्चे सुख का अर्थ समझाया। जब एक टेलीफोन साक्षात्कार में भारतीय अरबपति श्री रतन टाटा से रेडियो प्रस्तोता ने पूछा, "सर, आपको जीवन में सबसे अधिक खुशी कब मिली?" तब उन्होंने एक मार्मिक जवाब दिया।

जीवन के चार चरणों में खुशी की तलाश
रतन टाटा ने कहा, "मैंने जीवन में चार चरणों से गुजरा और अंततः मुझे सच्चे सुख का अर्थ समझ में आया।"
पहला चरण धन और साधन संचय करने का था। इस दौरान, मुझे वह खुशी नहीं मिली, जिसकी मुझे उम्मीद थी।
फिर दूसरा चरण आया, जब मैंने कीमती सामान और वस्त्रों को इकट्ठा करना शुरू किया। लेकिन मुझे जल्द ही यह एहसास हुआ कि इस सुख का प्रभाव भी अस्थायी है, क्योंकि इन वस्तुओं की चमक ज्यादा देर तक नहीं रहती।

तीसरा चरण तब आया जब मैंने बड़े-बड़े प्रोजेक्ट हासिल किए। उस समय मेरे पास भारत और अफ्रीका में डीजल की आपूर्ति का 95% हिस्सा था, और मैं भारत और एशिया में सबसे बड़े इस्पात कारखाने का मालिक था। फिर भी, मुझे वह खुशी नहीं मिली, जिसकी मैंने कल्पना की थी।

चौथा और निर्णायक चरण
फिर चौथा चरण आया, जिसने मेरे जीवन की दिशा बदल दी। मेरे एक मित्र ने मुझे विकलांग बच्चों के लिए व्हीलचेयर खरीदने के लिए कहा। करीब 200 बच्चे थे। मैंने अपने दोस्त के अनुरोध पर तुरन्त व्हीलचेयर खरीदीं। लेकिन मेरे मित्र ने आग्रह किया कि मैं उनके साथ जाकर खुद उन बच्चों को व्हीलचेयर भेंट करूं।

मैंने बच्चों को अपनी हाथों से व्हीलचेयर दीं और उनकी आंखों में जो खुशी की चमक देखी, वह मेरे जीवन में एक नया एहसास लेकर आई। उन बच्चों को व्हीलचेयर पर घूमते और मस्ती करते देखना ऐसा था, मानो वे किसी पिकनिक स्पॉट पर हों और किसी बड़े उपहार का आनंद ले रहे हों।

जीवन बदल देने वाला पल
जब मैं वापस जाने की तैयारी कर रहा था, तभी एक बच्चे ने मेरी टांग पकड़ ली। मैंने धीरे से पैर छुड़ाने की कोशिश की, लेकिन उसने और जोर से पकड़ लिया। तब मैं झुककर उससे पूछा, "क्या तुम्हें कुछ और चाहिए?"

उस बच्चे का जवाब जीवन बदलने वाला था। उसने कहा, "मैं आपका चेहरा याद रखना चाहता हूं ताकि जब मैं आपसे स्वर्ग में मिलूं, तो मैं आपको पहचान सकूं और एक बार फिर आपका धन्यवाद कर सकूं।"

सच्चे सुख का अर्थ
इस एक वाक्य ने न केवल रतन टाटा को झकझोर दिया, बल्कि उनके जीवन के प्रति दृष्टिकोण को पूरी तरह से बदल दिया। यह अनुभव उन्हें समझा गया कि सच्ची खुशी दूसरों की सेवा में है, न कि भौतिक संपत्तियों में।

जीवन का मर्म
इस कहानी का मर्म यह है कि हमें यह सोचने की आवश्यकता है कि जब हम इस संसार को छोड़ेंगे, तो हमें किस लिए याद किया जाएगा। क्या हमारा जीवन किसी के लिए इतना महत्वपूर्ण होगा कि वह हमें फिर से देखना चाहे? यही सबसे बड़ा सवाल है, जो हमें अपने जीवन के सच्चे उद्देश्य पर विचार करने के लिए प्रेरित करता है।

रतन टाटा: 25 वर्ष से 87 वर्ष तक का सफर
रतन टाटा ने अपने जीवन के इस सफर में, 25 वर्ष से 87 वर्ष तक, आखिरकार सच्चे सुख का अर्थ समझा, जो निस्वार्थ सेवा में निहित है।

विनम्र श्रद्धांजलि देश के सच्चे भारत रत्न स्वर्गीय श्री रतन टाटा जी को 🙏😥

#ratantata
The Poetic House