Friday, September 12, 2025

लेख

हल्ली उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात बेवारस वासरं पाळायचा दौर आलाय, अर्थात त्यांची घरं मोठी आहेत, त्यांच्या घराला मागे पुढे आवार आहेत. पण तरी हा विचार च किती सुंदर आहे. पण याचा प्राॅपगंडा कोणी करणार नाही.दोन वर्षांपूर्वी मी याच आशयाची एक कथा लिहीली होती, चांगला प्रतिसाद मिळाला होता किती जण चाँद सुरज ला पहायला सफाळ्याला जायला तयार होते. म्हणजे आपण ही असा विचार करू शकतो. दाक्षिणात्य अभिनेते तर गायींची सेवा आणि पूजा करतानाचे रील्स व्हायरल करतायत, जयपूर उदयपुर, कोटा, बुंदी अशा शहरात तर कधीपासून वासरं घरात पाळायला सुरुवात झाली. त्यांचा अनुभव असा वासरं लवकर शिस्त शिकतात त्यांच वेळापत्रक फार वक्तशीर असतं लाडात येऊन पिझ्झा बर्गर, गोड पदार्थ त्याना खायला द्यायचे नाहीत, चांगली शेकलेली भाकरी पोळी जरूर द्यावी पण चारा, भुईमूगाची टरफलं, शेंगा,कडबा हाच त्यांचा मुख्य आहार .वासरं ठराविक वयात दंगा करतात तेवढे चार पाच महिने जपावं लागतं मग एकदम शांत होतात 
या अशा घरात रमलेल्या गायींचे किस्से खूप ऐकण्या सारखे असतात. जयपूर जवळ एका गर्भश्रीमंत घरात असाच गायींचा कळप पाळला होता.काही कामा निमित्त घरचे कर्ते पुरुष बाहेर गावी कामा साठी गेले असताना त्यांच्या गाडीला जिवघेणा अपघात झाला बरोबर त्याच वेळी कळपातील काही गायी इतक्या अस्वस्थ झाल्या की घरचे त्यांचे विचित्र वर्तन बघून घाबरले.एक गाय तर देवघराच्या बंद दरवाजाला धडका देत होती.इतक्यात अपघाताची वार्ता समजली.पुढे ते दोघे बंधू शुध्दीवर येई पर्यंत या गायी व्रतस्थ राहिल्या. धोका टळल्याचं कळल्यावर एकच जल्लोष झाला तेव्हा या गायींना ताक मिश्रीत पाणी देण्यात आलं.पुढे त्यांची मानाची मिरवणूक ही निघाली कारण ज्या पध्दतीचा अपघात होता त्यात हे बंधू बचावणं असंभव होतं.
माझे मित्र म्हणाले कुत्रे मांजरं पाळण्या इतकच गायींना घरात स्थान देणं सोपं आहे.

© चंद्रशेखर गोखले

Tuesday, September 9, 2025

कथा १

आर आर आबांचे निधन झाल्यावर त्यांच्या आईने पार्थिवावर हंबरडा फोडला. खालच्या चार ओळी जरूर वाचा. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
.
एकदा आबांचा शर्ट खूप फाटला होता, एकच होता. आबा सकाळी सुईदोरा घेऊन आईकडे गेले व म्हणाले, ''हा कसातरी शिवून दे.''
.
वैतागलेली आई म्हटली, ''आता कुठं शिवायचं..?''
#कथाविश्व 
...म्हटलं घालायचं काय? सहज वर नजर गेली. वडिलांच्या मुत्युनंतर त्यांचे जुने झालेले कपडे एका गाठोड्यात बांधून वर ठेवलेले होते. आईची नजर चुकवून ते सगळे जुने कपडे काढले. वडील जे मृत झाले होते, आणि मृत व्यक्तीचे कपडे वापरत नाहीत. पण, वडिलांचे जुने कपडे घेऊन मी टेलरकडे गेलो. कपडे शिवतानां टेलरने ओळखले की, हे माझ्या वडिलांचे कपडे आहेत... त्रयस्थ, लिंगायत समाजाचा टेलर; पण माझ्या अंगावरचा शर्ट आणि वडिलांचे कपडे बघून त्यांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं...
त्यावेळी अल्टर करुन, ती कापडं घालून मी घरात गेलो... त्यावेळी वडिलांच्या मृत्युनंतरसुध्दा न रडलेली माझी आई त्या दिवशी मला छातीशी धरुन इतकी रडली.. नि मीही भरभरुन रडलो. आयुष्यातील तो दिवस सगळ्यात वाईट दिवस होता. पण, तशाही परिस्थितीत आम्ही शिकलं पाहीजे, ही तिची जिद्द कायमची होती... मी रोजगार हमी योजनेवर शिकत राहिलो... अन आज महाराष्ट्र राज्याचा ग्रहमंञी म्हणून तुमच्या समोर खंबीरपणे उभा आहे...
''कोशिश करनेवालों की कभी हार नही होती''...
.
'मी कसा घडलो'
(या आर. आर. पाटील यांच्या जीवनचरित्रातून संपादित, साभार)
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
Fb group post 

Thursday, August 28, 2025

विचार पु ल देशपांडे १


माणसं, 'माणसं' केव्हा होतात? त्यांना एकमेकांना सांगावसं वाटतं, त्या वेळी ! "मनुष्य संपला"- असं आपण कधी म्हणतो? कोणाशी काही बोलावसं वाटत नाही - असं ज्या दिवशी वाटतं, त्या दिवशी मनुष्य संपला असं समजावं. मग त्याचं साठावं वर्ष असो वा पंचविसावं असो - त्यात काही फरक नाही.


पु. ल. देशपांडे

उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडला की ती तापलेली माती जी गंध घेऊन उठते त्याला तोड नाही. एका खोलीत बसून तो घ्यायचा नसतो. तो अनपेक्षित रीतीने यावा लागतो आणि तो वास घेताना उघड्यावर जाऊन तृप्त धरतीची तृप्तीही डोळे भरून पहावी लागते.

पु. ल. देशपांडे

"मी हसतो, मलाच हसतो. माझे वाचकप्रेक्षकही मग मला हसतात आणि एकाएकी त्यांच्या लक्षात येतं की, आपण स्वतःलाच हसत आहोत. समाजाच्या एकूण तब्येतीस ते बरं असतं. माझ्या लेखनातून एवढंच हाती लागावं, ही अपेक्षा. नेपोलियननी जोसेफाइनला म्हटलं, "मी तुझ्यावर प्रेम करतो, परंतु मला तुझ्यावर याहून शतपटीने प्रेम करायचं आहे"- मलाही म्हणावंसं वाटतं, "मी साहित्यावर प्रेम करतो, परंतु मला साहित्यावर अजून शतपटीनं प्रेम करायचं आहे!"
पु. ल. देशपांडे

पुस्तकांचा संग जडलेल्या माणसाला कधी एकटं राहावं लागत नाही. खूप थोर माणसं त्याच्याशी संवाद साधायला त्याच्या पुस्तकांच्या कपाटात पाठीला पाठ लावून उभी असतात.


पु. ल. देशपांडे

हसून खेळून आयुष्यातली दुःखे कमी करीत जगण्याची संधी असताना आपणच आपली आयुष्ये रागाने मलीन करीत असतो. राग येणे आपल्या हाती नसेल पण तो वाढीला न लागू देणे आपल्याच हाती असते. आपल्या अडचणी किंवा दुःखे व्यक्त करायच्या जागा माणसाला फार थोड्या लाभतात. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे याच त्या जागा.

पु. ल. देशपांडे

आंघोळ ही देखील भुकेसारखी लागावी लागते. उठल्याबरोबर आंघोळ उरकायची ही नुसतीच सवय झाली. त्यात जाणीवयुक्त सौख्य नाही. साऱ्या शरीराचा जेव्हा 'आम्हाला आंघोळ घाला' असा रंध्रा रंध्रातून मुक आक्रोश सुरु होतो त्यावेळी घडते ते स्नान. एरवीचे अंग विसळणे झाले.


पु. ल. देशपांडे

नव्या वर्षाचं नवंपण ह्या जुन्या गळून गेलेल्या पानांच्या जागी नवी पालवी फुटणाऱ्या दृढ विश्वासात आहे. मनाच्या काचेवर गेल्या वर्षातल्या निराशांची धरलेली काजळी नव्या वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी पुसून टाकली पाहिजे. दिवस दिवसांसारखेच असतात, पण एकाच स्त्रीनं आज हे नेसावं, उद्या ते नेसावं, आज ही फुलं माळावीत, उद्या ती फुलं माळावीत आणि कालच्यापेक्षा आज आपलं आपल्यालाच निराळं वाटून घ्यावं; तसंच दिवसांनाही आज पाडवा म्हणून नटवावं, उद्या दसरा म्हणून, परवा दिवाळी म्हणून. आपण आपल्या त्याच खोलीतली खाट एकदा इकडे आणि एकदा तिकडे ठेवून खोली निराळी करतो, तसं तेचतेच दिवस निराळे करणं आपल्या हातात आहे. फक्त झाडांना फुटते, तशी नवी पालवी मनाला फुटली पाहिजे.

पु. ल. देशपांडे


एखादी गोष्ट काव्यमय आहे असं आपण म्हणतो, त्या वेळी त्याचं यमक-प्रास-वृत्त काहीही आपण पाहत नसतो. एखाद्याचं वागणं काव्यमय आहे, असं आपण म्हणतो - एखाद्याचं दिसणं किंवा एखादीचं दिसणं काव्यमय आहे असं आपण म्हणतो. काव्याशिवाय आपण राहू शकत नाही याचं कारणच असं आहे, की अन्न आपल्याला जगवतं आणि काव्य आपल्याला जगायला कारण देतं. कशासाठी जगायचं? जगायचं याच्यासाठीच, की जिथे माणसामाणसांतला प्रास जुळला आहे, माणसामाणसांतलं वृत्त जुळलं आहे - ह्याच्यासाठीच तर जगायचं! म्हणूनच 'आधी वंदू कवीश्वर। जे शब्दसृष्टीचे ईश्वर' असं म्हटलं आहे.

पु. ल. देशपांडे

पुस्तक वाचणारा माणूस हा जीवनात आनंदाच्या,
ज्ञानाच्या किंवा गेला बाजार इतरांना कसलाही उपद्रव
नसलेल्या विरंगुळ्याच्या शोधात असतो. पाचपन्नास
पानं वाचल्याशिवाय दिवस न घालवण्याची सवय
मला अगदी लहानपणापासूनंच जडली ती आजही
सुटली नाही. काहीतरी वाचल्याशिवाय दिवस गेला
तर, अंघोळ न करता गेलेल्या दिवसासारखं मला
वाटतं आणि अंघोळ करताना जसं आपण आपलं
आरोग्य चांगलं राहावं हा विचार मनात बाळगून अंघोळ
करतो असं नाही, अंघोळ या गोष्टीचाचं आनंद असतो
तसंच वाचनाचं आहे. कुठलं पुस्तक कुठल्या प्रकारचा
आनंद देऊन जाईल ते सांगता येत नाही.



पु. ल. देशपांडे


मला पाह्यला आवडतात माणसे ! सकाळी उठून पर्वतीला फिरायला जाणारी माणसे - विशेषतः पेन्शनर मंडळी, त्यांच्यामागून जावे. रोज सकाळी न कंटाळता उठणारी, न कंटाळता स्वतःला लोकरीत गुंडाळून घेणारी आणि न कंटाळता आपली विटयाहून अष्टट्याला बदली झाली, तेव्हा काय गंमत झाली ते सांगणारी ! ह्या म्हाताऱ्या माणसांसारखीच प्राथमिक शाळेतली पोरे शाळा सुटल्यावर गटागटांनी जातात तेव्हा त्यांच्याहीमागून त्यांच्या नकळत जाण्यात विलक्षण आनंद असतो ! ज्याला विशेष काही बोलायचे असते तो मुलगा त्या गटाच्या पुढे येऊन रस्त्यात उलटा उलटा जात असतो. दहा मिनिटे त्यांच्यामागून चालावे; विषयाचा पत्ता लागत नाही, पण सगळी तोंडे हलत असतात. त्यातून मग त्या गटाच्या चार पावले मागे राहून चालणाऱ्या चिमण्या सखूबाई-साळूबाईंचे काही विशेष हितगूज चालू असते. चालताचालता थांबून उगीचच एकमेकींच्या कानांत काही तरी गुप्त गोष्टी सांगितल्या जातात. 'अगदी कंठाशप्पत' म्हणून गळ्याला चिमटा काढला जातो - आणि पुन्हा वाटचाल सुरू होते !



पु. ल. देशपांडे

I do not like being called a humorist. I don't sit down to manufacture humour. I write the way I love to write, and I am grateful to my readers when they notice the hidden tear. For me humour is a wonderful armour. I have used it occasionally as a weapon, but I have taken care to see that it does not hit anyone below the belt. Unfortunately, some people wear their belt a little too high! The humour that hurts is ugly, and art abhors ugliness.



पु. ल. देशपांडे

साहित्य, संगीत आणि नाटक मला ह्या तिन्ही कलांतून जो अनुभव मिळाला. जी जीवनदृष्टी मिळाली. मनावर चढणारी काजळी जी वेळोवेळी पुसली गेली, त्याचं कारण, माझा ह्या कलांशी जडलेला संग ! आणि जे मला लाभलं ते इतरांनाही लाभावं ह्या एका हेतूने मी ही निर्मिती करायला लागलो. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणतात तसं जे मला तिळ तिळ लाभत गेलं ते मी वाटलं! तिळापासून होतं ते तेल. तेलाला स्नेह म्हणतात. ह्या वाटपातून तुमचा-आमचा जो स्नेह जडला, तीच माझी कमाई!

पु. ल. देशपांडे

ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते.


पु. ल. देशपांडे


शरीरातून रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणा-या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तोय मन एव मनुष्यः अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.


पु. ल. देशपांडे

ज्या राज्यात अन्यायाचा निःपात होईल, पापी माणसाला शासन होईल, शीलाचा सन्मान होईल, चारी धामाच्या तीर्थयात्रा सुखरूप पार पडतील, ज्याचा जो देव असेल त्याची उपासना तो तो निर्वेधपणे पार पाडील, शेतातल्या धान्याला शत्रूचा धक्का लागणार नाही आणि माताभगिनींच्या हातची कंकणं अखंड किणकिणत राहतील, असल्या शांतितुष्टिपुष्टियुक्त राज्याचे स्वप्न शिवरायांनी पाहिले.


पु. ल. देशपांडे

'हो'काराला सामर्थ्य नाही; 'न'काराला आहे. आपली आवड व्यक्त करणे हा भाबडेपणा झाला. नावड सांगण्याने व्यक्तिमत्त्वाला झळाळी येते.

पु. ल. देशपांडे


महागाईवर चर्चा चालू असताना पु.ल. आपल्या मित्राला म्हणाले, “या महागाईत टिकून राहायचं असेल, तर 'आर्थिक जादू' आत्मसात करायला हवी. हे आधुनिक अर्थशास्त्राचं एक तत्त्व आहे. पत्नी जेवढं खर्च करते त्यापेक्षा अधिक कमावणे या किमयेला 'आर्थिक जादू' म्हणतात!

पु. ल. देशपांडे

मन नेहमी मागेच पाहण्यात रमते. आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची बिननात्याची. कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या व्हेवलेंग्थ पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहीनी कधीही न फेडता येणाऱ्या ऋणांचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीच एकटा नसतो. त्याने तसे असूही नये.

पु. ल. देशपांडे

Sunday, August 24, 2025

Saturday, August 23, 2025

Thursday, August 21, 2025

लेख वामकुक्षी ते शतपावली

वामकुक्षी ते शतपावली

डॉ. प्रणिता अशोक

वामकुक्षी

काहींना दुपारी वामकुक्षी घेण्याची सवय असते. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर डाव्या बाजूस, डाव्या कुशीवर विश्राम करणे ! त्याचे

फायदेदेखील आहेत :

१. वामकुक्षी घेणे हे पोटासाठी, पचनासाठी चांगले असते. डाव्या कुशीवर झोपल्याने जठरातील अन्न काही काळ जठरात राहते. ते तसे राहणे पथ्यकर असते. जठराच्या आकुंचन-प्रसरण पावण्याने अन्न घुसळून निघते व व्यवस्थित पचते.

२. दुपारी झोप घेतल्यास चिडचिडेपणा, मानसिक ताण कमी होतो. तसेच कामातील सतर्कता वाढते.

३. दुपारी थोडा वेळ झोप घेतल्यास स्मरणशक्ती चांगली राहते व मूड सुधारण्यास मदत मिळते.

४. अशा प्रकारची झोप घेतल्याने नैसर्गिक पद्धतीने मेंदू शांत होतो, थकवा दूर होतो. त्या वेळी चहा-कॉफीची गरज पडत नाही व त्याचे अतिसेवनही टाळले जाते.

हे लक्षात ठेवा

१. वामकुक्षी ही दुपारच्या जेवणानंतर १५ ते २० मिनिटे घ्यायची असते, रात्रीच्या जेवणानंतर नाही. त्यावेळी शतपावली (सावकाश चालणे) करावी.

२. ही झोप साधारण दुपारी १ ते ३ या वेळेत असावी व अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावी.

चीनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात काही ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक आरोग्याच्या आणि आकलनशक्ती-विषयक चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात दुपारी झोप घेतलेल्या व्यक्तीची आकलनशक्ती, एकाग्रता जास्त असल्याचे दिसून आले होते.

एक लक्षात घ्या की लहान पॉवर नॅप (साधारण ३० मिनिटे) सतर्कता वाढवू शकण्यास मदत करते. परंतु त्यापेक्षा अधिक काळ झोपल्यास लठ्ठपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगास कारणीभूत ठरू शकते. म्हणून खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनशक्ती
चांगली असेल, चयापचय क्रिया योग्य पद्धतीने होत असेल, तर अनेक आजार दूर राहतात तसेच वजनावर नियंत्रण ठेवणेही सोपे जाते.

शतपावली

रात्रीच्या जेवणानंतर (शक्य असल्यास दुपारीसुद्धा) शतपावली करणे शरीरासाठी महत्त्वाचे असते. आपले वाडवडीलही रात्रीच्या जेवणानंतर एकाच जागी न बसता थोडा वेळ चालण्याचा सल्ला देत असत. रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपण्याची सवय अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे थोडा वेळ चालायला हवे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात :

१. पचनक्रिया सुधारते, तसेच बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित इतर समस्या टाळता येतात.

२. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे अनेक प्रकारचे संक्रमण आणि आजार टाळणे शक्य होते.

३. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ चालणे हितकारक आहे. यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

४. वजन कमी करण्यासाठी चयापचय दर (मेटाबॉलिजम रेट) महत्त्वाचा असतो. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ शतपावली करावी. यामुळे मेटाबॉलिजम तर वाढतेच शिवाय मोठ्या प्रमाणात कॅलरीजही बर्न होतात.

५. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने चांगली झोप लागते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहता आणि चांगली झोप घेता येते. शांत झोप झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी ताजेतवाने आणि उत्साही वाटते.

लेखिका अनुभवी आहारतज्ज्ञ आहेत.
pranita76@gmail.com

साभार  :  कालनिर्णय २०२५   आरोग्य विषयक लेख  

Thursday, August 14, 2025

लोकमत सखी स्वप्न पहा शीतल महाजन

 स्वप्न पाहा, अडथळे येणारच. ते आले की विचारा स्वतःला, का?
आणि शोधा उत्तर.

भारतीय महिलांनी ठरवलं तर त्या काहीही करू शकतात. साधनांची आणि संधीची कमतरता असली तरीही.  जे ठरवलं आहे ते करता येऊच शकतं !   पण मग आपण कमी कुठे पडतो  आपल्याला काय हवं ते ठरवण्यात. 

आपलं ध्येय निश्चित करण्यात आणि  त्यांचा पाठलाग करण्यात आपण कमी पडतो.

का?

समाज काहीतरी सांगतो महणून आमच्या अनेक मुली स्वप्नं ही बघत नाहीत. अमुक एक आपल्यासाठी नाही असं आपलं आपणच ठरवून टाकतात. 

मग कथी स्वतःला, तर कधी परिस्थितीला दोष देत असतात.

 माझे एक्च सांगणं आहे  , की आपल्याला हवी ती स्वप्नं बघा आणि ती सारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी 

सर्वार्थाने प्रयत्न करा. अडथळे  येणारच. मात्र त्या अडथळ्यांना घाबरून जाऊ नका, अडथळ्यांचं स्वरूप वेगळं असू शकतं, मात्र अडथळे येणारच हे स्वीकारून पुढे जात राहिलं तर मार्ग सोपा होतो, तुमचे कसोशीचे प्रयत्न पाहिले की तुमच्या स्वप्नांना  होत असलेला इतरांचा विरोधही टप्प्याटप्प्यानं मावळत जाईल, मग बघा, यश आणि तुम्ही यात फार अंतर नसेल. 

का ? हा प्रश्न स्वतः लाच विचारायला शिका ! मला जेव्हा कळलं की कुठल्याही भारतीय स्त्रीने दोन्ही ध्रुवावर sky diving केलेले नाही .

तेव्हा मी स्वतः ला च विचारलं का ? आणि मग उत्तर मी शोधलं आणि ते स्वप्न पूर्ण ही केलं !


शीतल महाजन 

लोकमत सखी 

Tuesday, August 12, 2025

post 5 सुभाषित

ज्ञानेन पूंसां सकलार्थसिद्धिर्ज्ञानादृते काचन नार्थसिद्धिः|
ज्ञानस्य मत्वेति गुणान्कदाचिज्ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावाः||

ज्ञानाने माणसांना सर्व पुरुषार्थ साधता येतात. ज्ञानाशिवाय काहीच साध्य होत नाही; असे ज्ञानाचे गुण जाणून थोर लोक ज्ञान [मिळवण्याचा प्रयत्न] कधीही सोडत नाहीत.

Saturday, August 9, 2025

Friday, August 1, 2025

Thursday, July 31, 2025

Monday, July 14, 2025

Thursday, July 10, 2025

चित्रकविता

थकलेल्या आईचा एकदा
बसल्या जागी डोळा लागला
तेंव्हा तिचा छकुला 
अगदी शहाण्या सारखा वागला
हळूच सारली त्याने
तिच्या मानेखाली उशी
अन शालही पांघरली
अगदी ती त्याच्यावर पांघरायची तशी
आईचे डोळे मिटले होते
तरी तिला दिसत होतं सगळं
तिला आपलं बाळ वाटलं
जगापेक्षा वेगळं
मायेनं ओथंबून तिचे
भरून आले डोळे
आणि आई रडते म्हणून तिचे बाळ
कासावीस झाले खुळे
आई आई म्हणत त्याने
गाठली तिची कुशी
कुशीत घेत आईने त्याला दिली
आपल्या हाताची उशी
मग काय ते वेडं बाळ
निवांत निजलं
अन आईच्या पदराचं टोक
ओल्या पापण्यांनी भिजलं.......
#चंगो

Wednesday, July 2, 2025

आहार विहार

▫️*आषाढ तळावा.. श्रावण भाजावा..*
  *भाद्रपद उकडावा..!* पण हे असंच का ??

पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग ! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सु-काळ होय. "तळणं, भाजणं आणि उकडणं.." या एकाच पावसाच्या तीन रुपांतरामागे लपलेलं आहे.. आयुर्वेदिय तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे ? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं ??

१) *आषाढ* म्हणजे पावसाचा श्रीगणेशा.‌ आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे- गुडघेदुखी, सर्दी- फडसे, थंडीताप, infections अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर *आषाढात "तळलेलं" खाणं हा अफलातून उपाय आहे !* 

विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी "औषध" बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते !

म्हणूनच; मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील. 

शिवाय; पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श.. कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी.. आणि कपातला उबदार चहा.. यासारखा _Instant Romantic_ अंतर्बाह्य "आषाढ डायट" जगात शोधूनही सापडणार नाही !

२) *श्रावण* म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीरावयावांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे, म्हणून *श्रावणात "भाजलेलं" खाणं सर्वोत्तम आहे.* 

आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचं सुगंधी भरीत, मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड,‌ तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इ. सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ऍसिडिटी, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारींचा जन्म होत नाही.

आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे _*"श्रावणमासी हर्ष मानसी..."*_ असं म्हंटलेलं आहे.

३) *भाद्रपद* म्हणजे ‌परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतो (ie पित्ताचा प्रकोप होतो). 

हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं, की हार्टअटॅक, पॅरालीसीस, तीव्र ताप, कोणताही शुल्लक आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात. 

अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत. जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव भेटणार नाही. याचसाठी *भाद्रपदात "उकडलेलं" खाणं अगदी योग्य आहे.* 

जसे की, उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इ. प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने October HEAT चे रूपांतर आपण October HIT मध्ये नक्की करू शकतो. 

कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच ! नाही का ?

अज्ञात


माझे पान fb page 

Monday, June 30, 2025

मराठी व्यवसायिक

Swayam Talk वर मुलाखती चे कार्यक्रम होत असतात आज काल मराठी उद्योजक तरुण पिढीचे त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. आता पर्यंत Ndtv मराठी किंवा swayam talk वर बघितलेल्या मुलाखती मधली सगळी मंडळी गावा कडची होती आणि शहरातल्या मराठी न बोलणारी गावची त्यांची त्यांची मराठी भाषा बोलणारी होती.
कष्ट , सातत्य आणि शिक्षण घेत घेत पुढे उद्योजक झालेली. इंग्रजी येत नाही म्हणून काही अडलं नाही कोणी मित्राची मदत घेतली गरज पडेल तेव्हा.
गावाकडची मंडळी शून्यातून उभी राहतात  down to earth होती .

कोणी कुकुटपालन व्यवसाय सुरू केला आणि organic अंडी विकण्याचा धंदा सुरू केला सोबत ३ ५०० च्या वर शेतकरी लोकांना एकत्र केलं कोंबडी पालन कसं करतात ते शिक्षण दिल आणि करोडो मध्ये कमाई होते. Marketing च ज्ञान आणि वडिलांनी सोबत दिली जे वडा पाव चा व्यवसाय करायचे. अपयश मध्ये आलं तरी त्याच्या वडलांनी सोबत मात्र दिली.

दुसरा व्यवसायिक फळ cold storage मध्ये ठेवायचा व्यवसाय सुरू केला आणि फळ विकायची.

तिसरा व्यवसायिक शेतकरी चा मुलगा पुण्यात IT कंपनी मध्ये साफ सफाई करायचा सुरवातीला . डिप्लोमा शिक्षण घेतलेला.

नंतर त्याने computer शिक्षण कसं असतं माहिती काढली. Animation course केला. चित्रकला शाळेत असताना एका दुकानात आई वडील ठेवून द्यायचे painter च्या दुकान होतं. ती चित्रकला त्याला कामी आली . मित्राच्या ओळखी मुळे एक नोकरी मिळाली. नंतर चित्रकला येते म्हणून दुसरी .

पुढे tv channel template बाहेरच्या देशातून विकत घेतात म्हणून canva सारखा स्वतःचा brand सुरू केला.

Import export सगळं केलं यांनी.

परदेशात service देऊन सगळ्यांनी व्यवसाय मोठा केला.
ज्ञान ला प्राधान्य दिल की पैसे आपोआप येतात की !

एक जण shark tank मध्ये ही आला होता!

#vidyamsblog

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच का असावे?

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच का असावे?

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी भाषेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात मातृभाषेचे महत्त्व नाकारता येत नाही. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी मूलभूत शिक्षण मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे, कारण तेच बालकांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी उपयुक्त ठरते.

१. समजण्याची क्षमता वाढते

मुलांना सुरुवातीच्या वयात आपल्या मातृभाषेचा पूर्ण परिचय असतो. ते ज्या भाषेत घरी बोलतात, तीच भाषा शिकण्यासाठी आणि विचार करण्यासाठी सर्वात सुलभ असते. त्यामुळे मातृभाषेतून शिकवलेले विषय त्यांना पटकन समजतात व लक्षात राहतात.

२. बौद्धिक विकासास चालना

मातृभाषेतून शिकत असताना मुले मुक्तपणे विचार करतात. त्यांना संकोच वाटत नाही आणि त्यामुळे त्यांची सर्जनशीलता व तर्कशक्ती विकसित होते. अन्य भाषेत शिक्षण घेतल्यास मुले भाषेच्या अडचणीत अडकून विषय समजून घेण्यात अपयशी ठरू शकतात.

३. आत्मविश्वास वाढतो

मुलांना जर त्यांच्या ओळखीच्या भाषेत शिकवले गेले, तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना उत्तर देताना किंवा प्रश्न विचारताना संकोच वाटत नाही. हीच गोष्ट त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाला एक सकारात्मक दिशा देते.

४. संस्कृतीशी नाते टिकते

मातृभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने मुलांना आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि सामाजिक मूल्यांचे भान राहते, जे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त असते.

५. आंतरराष्ट्रीय संशोधनाचा आधार

युनेस्कोसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनीही मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व मान्य केले आहे. संशोधनानुसार, ज्या मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत मिळते, त्यांची शैक्षणिक प्रगती अधिक चांगली होते आणि गळती दरही कमी होतो.

मुलांचा सर्वांगीण विकास, आत्मविश्वास, आणि सशक्त शैक्षणिक पाया घालण्यासाठी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच होणे आवश्यक आहे. इतर भाषा शिकाव्यातच, पण त्या नंतरच्या टप्प्यांवर. शिक्षणाचे बीज हे जिथे मुळ घटक समजायला सोपे जाते, अशा मातृभाषेतच पेरले गेले पाहिजे.

© #eaksharman

Tuesday, June 17, 2025

लेख अनुभव

एका सैनिकाला लिफ्ट दिल्यानंतर तरुणीला आलेला अनुभव बघून तुम्हालाही लाज वाटेल या समाजाची

लाज वाटती मला या समाजाची !
बरोबर साडेपाचला बायको घरामध्ये आली आणि अस्वस्थ होत समोर बसली. काय झालयं मला काही कळेना. मी लॅपटॉप बाजूला सारला आणि तिच्याकडं पाहत विचारलं, “काही बिनसलं का स्कुलमध्ये ?” त्यावर कोरड्या डोळ्यांनी गॅलरीकडं पाहत म्हणाली, “काही बिनसलं नाही रे, पण एका गोष्टीचं खुप वाईट वाटलं.”
हिच्या स्कुलमध्ये नक्की काहीतरी झालं असणार, असा विचार करत मी तिच्याकडं खुर्ची वळवली. तशी ती बोलू लागली, “अरे मी स्कुलमधून निघाले, तोच कॅम्पमध्ये एक सैनिक उभा दिसला. अंगावरच्या कपड्यांवरुन ते लक्षात येत होतं. त्याच्या पाठीवर एक आणि हातात दोन बॅगा होत्या. येणाऱ्या गाड्यांना तो हात करत होता. पण, त्याच्या हातातलं सामान पाहून कुणीच थांबत नव्हतं. नेमका तो अशा ठिकाणी उभा होता, की तिथं बस येण्याचा प्रश्‍न नव्हता. म्हणून मी त्याच्यासमोर जाऊन थांबले. तर शेजारच्या गाड्यांवरुन जाणारे पुरुष आणि बायाही माझ्याकडं तिरक्‍या नजरेनं पाहू लागल्या. मी थांबलेली पाहून
त्या सैनिकानं विचारलं, “दिदी कुठपर्यंत जाणार आहात तुम्ही ?”
मी म्हणाले, “तुम्हाला त्या कॅनॉलपर्यंत सोडू शकते. तिथून तुम्हाला बस मिळेल.”
स्मित करत तो गाडीवर बसण्यास तयार झाला. त्यानं दोन्ही बॅगा स्वत:च्या मांडीवर अशा पद्धतीने घेतल्या की मला त्याचा धक्काही लागणार नाही. तो गाडीवर बसला. पण, रेस वाढवूनही गाडी पुढं सरकत नव्हती. तर त्यानं एका पायानं जोर देत गाडी पुढं ढकलली.
“कुठून आलात” असं मी त्याला विचारलं, तर म्हणाला, “श्रीनगरवरुन आलोय. स्टेशनवरुन आमची गाडी होती. त्या ट्रकमध्ये कॅन्टोन्मेंटपर्यंत आलो. पण, इथून पुढं जायला बस, रिक्षा काहीच मिळत नव्हतं. म्हणून गाड्यांना हात करत होतो.”
माझी गाडी आता बऱ्यापैकी धावत होती. स्पीडब्रेकर आल्यावर मी ब्रेक दाबत होते. पण, तो थोडाही पुढं येत नव्हता. उलट त्यानं गाडीचं कॅरियर पकडून धरलं होतं. कॅनॉल येताच मी गाडी थांबवली. तसं मी त्याला स्वत:हून विचारलं की तुम्हाला नेमकं कुठं जायचंयं ?
तसा तो म्हणाला, “मी सासवडचा आहे. अडीच वर्षानंतर आलोय. मला हडपसरला जायचंय. तिथुन एसटी मिळेल मला.” त्यावर मी त्याला म्हणाले की चला मी तुम्हाला हडपसरला सोडते. त्याला मोठा आनंद झाला आणि तो पुन्हा त्याच आत्मियतेने गाडीवर बसला. तो बसत असताना मात्र आजुबाजूचे लोक मोठ्या कुतूहलाने माझ्याकडं पाहत होते. काहींना माझा अभिमान वाटत असावा. काहीजण मात्र, गालातल्या गालात कुत्सित हसत होते. एका तरण्याबांड जवानाला मी गाडीवर बसवतीये, अशी काहीतरी घाणेरडी भावना साऱ्या लोकांच्या डोळ्यात होती. तो बिचारा अडीच वर्षांनी त्याच्या घरी आलाय. त्याला लिफ्ट द्यायला एक माणूस थांबत नव्हता. तो तिकडं आपल्या देशाच्या सीमेवर बिनधास्त उभा राहतो, म्हणून आपण हितं निवांत झोपतो आणि मी त्याला लिफ्ट दिली तर हे हरामखोर लोक माझ्याकडं पाहून हसत होते.
काय चुक केली होती रे मी ?
असं म्हणत बायको रडायलाच लागली. तिला सावरणेही शक्‍य नव्हते. तशी रडक्‍या डोळ्यांनी पुढं बोलू लागली,
“मी त्याला हडपसरला सोडलं, तेव्हा तो काय म्हणाला माहितीये, दिदी आम्हाला चालायची सवय असते. पण, जेव्हा आम्ही चालून थकतो, तेव्हा इथल्या बायातर सोडा, पुरुषही आम्हाला लिफ्ट देत नाहीत. असो.”
असं म्हणत त्यानं नमस्कार केला आणि बसस्टॉपच्या दिशेने निघून गेला.
खरोखरच लाज वाटतीये मला या समाजाची !
असं म्हणत पुन्हा पंधरा मिनिट बायको फक्त मुसमुसत राहिली. अशा प्रसंगाच्या अनुभवानंतर समजूत तरी घालणार कशी ?
-नितीन थोरात