Friday, May 8, 2026
Thursday, May 7, 2026
भावमेघ पुस्तक प्रकाशन
नमस्कार, 10 जानेवारी 2026 रोजी माझ्या भावमेघ ह्या पहिल्या काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन झाले. माझ्यासाठी हा सोहळा एखाद्या अपत्यजन्मा सारखा खूप महत्वाचा होता..नवीन ओळख मिळवून देणारा आहे. खरंतर पोस्ट ला थोडा दोन तीन दिवस उशीरच झाला आहे, पण ही phase माझ्यासाठी खूपच नवीन आहे..नव्याने स्वतःशी ओळख झाल्यासारखे वाटते आहे..माझा आनंद, माझे भारलेपण तुमच्या समोर मांडायचे आहे म्हणून ही पोस्ट..
सारस्वतांच्या सोबतीने
सोहळा कवितांचा रंगला
रंगवूनी रसिक मनांना
अंतर्नाद जणू निनादला
कापरापरी उडून वेळ
कसा अचानक संपला
पण स्मृतींच्या रूपाने
मनावर कायम ठसला
असेच काहीसे वाटते आहे...
देव कधीकधी अशा क्षणांचे दान पदरात देतो, वाटतं खरंच आपण पात्र आहोत का ह्या सगळ्याला... शनिवार पासून सगळीकडून कौतुकाची, प्रेमळ शब्दांची पखरण माझ्यावर होत आहे...मन इतक भरून आलं आहे.
त्याच भरल्या मनाने आईला फोन केला, तिला विचारलं, " मला खूप दडपण आलं आहे... कारण माहित नाही , ह्या सगळ्यासाठी खरंच मी योग्य आहे का.. " तेव्हा तिचे उत्तर फार महत्वाचे होते, "आपण चांगले माणूस असल्याची ही पावती असते, ती स्वीकारून पुढच्या प्रत्येक पावलावर त्याची जाणीव ठेवून जबाबदारी वाढवणारी असते ही कौतुकाची प्रेमाची थाप..आज तुला ह्या प्रसंगात तुझ्या ज्या चुका , उणिवा किंवा कमतरता दिसत आहेत त्या पुढच्या वेळी तू दूर करण्याचा प्रयत्न कर. पण हा क्षण अभिमानाने जग, तो तुझा स्वतःचा आहे."
मी लहानपणा पासून आईबाबांना कोणतही काम करताना सचोटी आणि प्रामाणिकपणे करताना पाहिलं आहे..ते अंगीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे. तुमच्या सगळ्यांच्या शब्दांनी खूप भारावून गेले आहे. ... धन्यवाद सर्वांचे.. देवाचे सर्वात जास्त आभार कारण मी ह्या सर्व सोहळ्याचा भाग असण्याची सुतराम शक्यता नव्हती.
मी साधारण कॉलेज मध्ये असल्यापासून माझ्या भावना कवितेत मांडते आहे, फक्त माझ्या आणि माझ्या जवळच्या मैत्रिणींमध्ये माहित असलेली ही गोष्ट, मी साधारण 2013 पासून फेसबुक, ब्लॉग आणि विविध social media platform वर हळूहळू मांडायला लागले. मी छंदोबद्ध कविता लिहिलेल्या नाहीत..बऱ्याचश्या कविता मुक्तछंदात आहेत.. माझ्या मनातील विचार मांडायचा केलेला प्रयत्न आहे..माझ्या नवऱ्याने दिपक सावंत Deepak Sawant ह्याने फार आग्रहाने आणि कौतुकाने हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे.. माझा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह..ह्याआधी माझ्या कविता 3 वेगवेगळ्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून छापून आल्या आहेत, एक दोनदा कथाही छापून आल्या आहेत..
गीतकाव्य ह्या पुस्तकाच्या निर्मिती दरम्यान सतीश दादा आणि परेश दादा ह्यांनी सुद्धा माझ्या पुस्तक निर्मितीसाठी आग्रह धरला होता. त्यांचेही आभार. Sateesh Ranade Paresh Koli
माझ्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ माझ्या धाकट्या लेकीने प्राची दिपक सावंत( वय वर्ष 13) हिने काढले आहे..thank you Prachi.. Love you प्राची आणि पूर्वा..
पुस्तकाची उत्तम प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक Satish Solankurkar सोळांकुरकर सरांनी लिहिली आहे त्यांचेही आभार... आणि पुस्तकाच्या पाठी लिहिलेली मा प्रा कविवर्य अशोक बागवे सरांची पाठराखण म्हणजे साक्षात देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहे.. Ashok Bagwe सर धन्यवाद...
गीतकाव्य आणि भावनांची चंची ह्या दोन काव्यसंग्रहासोबत पुण्यात 10 जानेवारीला भावमेघ चे प्रकाशन झाले.. अंतर्नाद काव्यमंच ह्यांनी Velvet Kavisha Publications Varsha Vishal Thukrul सोबत फार सुंदर सोहळा आयोजित केला होता..दोन्ही संस्थांचे आभार..
आणि माझी आई Shilpa Samant , माझा दादा Harshad Samant आणि माझे सगळे जिवलग जे मनात इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत त्या सगळ्यांचे आभार.. माझ्या बाबांना मी सर्वात जास्त miss करते आहे..त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत..ते जाणवतात.🙏
आणि माझ्या सर्व जवळच्या मित्रमैत्रिणी, हितचिंतकाचेही आभार, सदिच्छा पाठीशी असल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही..
आणि भावमेघ बरोबर प्रकाशित झालेल्या भावनांची चंची या काव्यसंग्रहाच्या कवयित्री Saru Pawar ताई तुमचेही अभिनंदन..आणि गीतकाव्य ह्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात समाविष्ट 26 कवी कवयित्रींचेही अभिनंदन...
आणि माझे माहेरचे सर्व सामंत कुटुंबीय, आजोळचे नाईक कुटुंबीय आणि सासरचे सावंत कुटुंबीय ह्या सर्वांचे आभार
माझ्या काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे, ज्यांना वाचायची इच्छा असेल त्यांनी नक्की कळवा. वाचून आवर्जून अभिप्राय द्या..
इतक्या उघडपणे अभिमानाने माझ्या कविता मिरवताना फार छान वाटलं..धन्यवाद @Deepak Sawant.
मेघना
https://www.facebook.com/meghanadeepaksawant
Wednesday, May 6, 2026
S. N. Inamdar
S. N. Inamdar (6th May 1945 - 18th July 2024)
eminent tax consultant, advocate and designated senior counsel of the Bombay High Court
the Income Tax Appellate Tribunal carried a feature about him in their magazine. I am giving the link in the next tweet.
शब्दरंग
Tuesday, May 5, 2026
कविता
Monday, May 4, 2026
स्वामी विवेकानंद
Sunday, May 3, 2026
पालकत्व
कथा
सैराट बघितला? मग ही कथा जरूर वाचा:
.... आई-वडलांच्या विरोधाला न जुमानता, माझा सल्ला न मानता त्या मुलीने पळून जाऊन त्या रिक्षा ड्रायव्हरबरोबर लग्न केले. ती त्याच्याबरोबर एका छोट्या खोलीत जाऊन राहू लागली. थोडे दिवस मजेत गेले. पण नंतर त्या दोघांच्यात सारखी भांडणं होऊ लागली. भांडणाचं मुख्य कारणं होती तिच्या नव-याचं रहाणीमान आणि सवयी, पैशांचा अभाव. बंगल्यात राहिलेली, कारमधून हिंडणारी, महागड्या वस्तू वापरण्याची सवय असणारी ती मुलगी भानावर आली. एके दिवशी नव-याला सोडून घराबाहेर पडली. माहेरी आली, पण तिच्या वडिलांनी तिला घरात घेतलं नाही. मग कांही दिवस एका मैत्रिणीच्या घरी राहिली. कांही दिवसांनी ती परत नव-याकडे गेली.
पुढे व्हायचे तेच झाले. तिच्या नव-याला तिचा संशय येऊ लागला. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. तिला मारहाण करू लागला. ती पुन्हा तिथनं बाहेर पडली. कधी या मैत्रिणीच्या तर कधी त्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली. शिक्षण कमी, त्यामुळे कुठं चांगली नोकरीही मिळेना. पण असे किती दिवस चालणार? तिच्या एका मैत्रिणीनं तिला सल्ला दिला, तू आता दुसरं लग्न कर.
‘पण माझं लग्न झालेलं आहे. डायव्हर्स न घेता दुसरं लग्न कसं करणार? आणि माझा नवरा मला डायव्हर्स देणार नाही. कोर्टात गेलं तर त्यात अनेक वर्षे जातील’
‘मग तू असे किती दिवस काढणार?’
‘जमेल तेवढे... आयुष्यात एक मोठी चूक केलीच आहे. आता पुढचे दिवस मला ज्या दिशेने नेतील त्या दिशेने जावे लागेल’
पूर्ण कथा पुढील लिंकवर वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/07/blog-post.html
_भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा कशाला हव्यात
तामसी वृत्ती स्त्री वर अत्याचार
मन खंतावून गेलंय, भावना तीव्र आहेत. पण तोकड्या शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. प्रत्येक विचारी, सजग माणसाची आज हीच अवस्था आहे. भेदाभेदांना विचारी मनुष्य कंटाळला आहे. गुन्हा आणि शिक्षा हा सरळ न्याय असला पाहिजे. अर्थात प्रत्येक घटना घडताना सरकारलाच दोष देणं हेही योग्य होणार नाही.
मुळात मनुष्याची अशी अमानुष प्रवृत्ती होण्याच्या कारणांचाही शोध घेतला पाहिजे - म्हणजे रोगाच्या मुळाशी गेलं पाहिजे. ('अमानुष' किंवा 'पाशवी' असं संबोधन तरी का करायचं? कारण पशूही आपल्या धर्माप्रमाणे - म्हणजे सहजप्रेरणेने जगत असतो. पण सारासार विवेक करण्याची शक्ती मिळालेला मनुष्य मात्र अनिर्बंध होऊ शकतो हेच कालच्या घटनेवरून समजून येतं.) त्यामुळे 'अमानुष'ऐवजी 'नराधम' हेच संबोधन योग्य वाटतं.
नराधम, बेलगाम प्रवृत्ती होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेतुपुरस्सर रुजवली गेलेली, वासना बळावणारी भोगवादी जीवनशैली. अशा कालखंडात कोणती माध्यमं, विविध गोष्टी-दृश्यांमधून नको त्या गोष्टी मुद्दाम आपल्या माथी मारत आहेत हे ओळखून आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण अशा गोष्टी तामसी भोग मिळवण्यासाठी मनुष्याला प्रवृत्त करत असतात.
तामसी वृत्तीचा कळस (नव्हे तळ!) म्हणजे प्रचंड आसक्ती, अपरिमित वासना आणि अविवेकी स्पर्धावृत्ती वाढीला लागणं हा असतो! कितीही मिळालं तरी समाधान होत नाही. वासना संपत नाहीत किंवा मनाला तृप्ती मिळतच नाही. अधिकाधिक भोगवासना मिळवण्यासाठी बाह्य जगात दिवस-रात्र दिशाहीन, निर्बंधरहित धावत राहणं हेच जीवनाचं उद्दिष्ट झालं तर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजालाही भोगावे लागतात. (काहींना नाईलाजानं पोटासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो त्यांच्या संदर्भात हा विचार नाही.) रात्र ही विश्रांतीसाठी असते. अनेक प्राणी-पक्षी हा निसर्गनियम पाळतात; फक्त माणूस नाही. रात्रीचा अंधकार हा तामसी प्रवृत्तीला उत्तेजन देत असतो.
मोठ्या शहरांमधून रात्रीचं जीवन हे भयकारी होत चाललं आहे. त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. पहाटे सात्त्विक वातावरण असतं, दुपारी राजसी तर रात्री तामसी वृत्तीचा जाेर असताे. जन्मदिवसही सूर्याच्या साक्षीनं साजरे केले तर ते खरे लाभदायक ठरू शकतात. आसुरी शक्ती रात्री कार्यरत हाेत असतात, असं महाभारतातही अनेक ठिकाणी म्हटलं आहे. दिवसापेक्षा रात्री जीवितहानी सुद्धा अधिक हाेते असं जगातले अनेक रिपाेर्ट्स् सांगतात. (Search on Google.) यामागे अनेक नकारात्मक लहरीही काम करीत असतात.
रात्रीचे तामसी संस्कार मनात रुजतात आणि दिवसाही ते मनुष्याच्या हातून कुकृत्यं घडवून आणतात. त्या बिचाऱ्या चिमुरडीचा अशाच वृत्तीतून बळी घेतला गेला - अनेक जीव आजपर्यंत अशाच वृत्तीतून बळी पडलेले आहेत. सरकार infrastructure देईल, नोकऱ्या निर्माण करेल, मदत देईल, सर्वप्रकारच्या व्यवस्था देईल; पण योग्य तर्हेने जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे हे ज्या-त्या मनुष्यालाच ठरवावं लागेल.
त्या आणि नराधमांच्या वासनांना बळी पडलेल्या अशाच पीडितांना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.
Rajendra Kher
Saturday, May 2, 2026
सुमी... २७ ०४ २४
'रविवारची रंगत'
'रविवारची रंगत'
'दृक काव्य' या अलीकडे प्रकाशित झालेल्या संग्रहातून.
व्हिज्युअल पोएट्री या विषयाचा अभ्यास करता करता 19 व्या शतकाच्या सुरुवातीला Guillaume Apollinaire या फ्रेंच कवी आणि नाट्य लेखकाने त्याच्या 'कॅलिग्राम' या कवितासंग्रहात केलेला एक प्रयोग पाहण्यात, वाचण्यात आला.
जो कदाचित पहिल्यांदा झालेला असावा.
त्या पूर्ण संग्रहात प्रत्येक कवितेची अक्षररचना अशी केली आहे की त्यातून दृक अनुभव सुद्धा घेता येतो. ( जो मी रविवारची रंगत या मालिकेत काही कवितांमधून सादर केला आहे)
ती कविताच अक्षर- दृक- काव्य झाली आहे.
असे कला प्रवाह अभ्यासता अभ्यासता मला त्यातलं भारतीयत्व जाणवलं ते रवींद्रनाथांच्या गिरगीट चित्रांमध्ये. असं म्हटलं जातं की कविता लिहिता लिहिता ते काही शब्द खोडत तर काही ओळीच्या ओळी सुद्धा गिरगिटवून खोडत.
त्या शब्द विरहित अवकाशाला गिरगीटण्यातून अमूर्त अशा विविध आकारांचे चित्ररूप मिळत गेले. त्यांची ही 'पूरबी' ह्या हस्तलिखितातील गिरगिट चित्र जागतिक कला प्रवाहात सन्माननीय झाली. लिहिता लिहिता गिरगीटण्यातून चित्र दिसू लागली.
अगदी या उलट मांडणी करत गेलो म्हणजे चित्रावर कविता उतरत असताना त्यातले शब्द त्या चित्राला त्याची स्पेस देत आहेत असं भासवू लागलो.
ह्या चित्रकाव्यात मांडण्याचा प्रयत्न.
Hemant Joshi
https://www.facebook.com/share/14dAXjJGj5o/
