Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Friday, February 14, 2025

प्रेम

प्रेम हा विषय खरंतर ऊहापोह करण्याचा नव्हेच. शब्दांची, चर्चांची गरजच नसते या भावनेला. ‘शब्दांवाचून कळले सारे’ अशीच ही अनुभूती.  प्रेमाकडं वेगळ्या नजरेनं पाहणारा हा विशेष लेख खास आजच्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त...

सुरवातीपासून आपल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीचा पगडा आहे. अगदी ‘पडोसन’ चित्रपट गाजला आणि त्यात सायरा बानू मैत्रिणींचा मेळा सोबत घेऊन ‘मै चली मै चली’ करत सायकलवरून हुंदडली. लगेच मुलींचे गट तेव्हा ठिकठिकाणी सायकलवरून हुंदडताना दिसायला लागले होते. ‘बंदीश’मध्ये हेमा मालिनीनं पायातलं पैंजण हातात अडकवलं होतं, त्याचंही अनुकरण काही दिवस चाललं.

‘व्हॅलेंटाइन्स डे’चंही असंच. हा ‘प्रेमदिवस’ साधारणतः १९९३-९४ च्या काळात आपल्याकडं साजरा केला जाऊ लागला. मला वाटतं ‘कुछ कुछ होता है’नं हे फॅड आणलं आणि तरुणाईपेक्षा व्यापारीवर्गानं आणि मीडियानं ते टिकवलं. आपल्यावर तर काय चित्रपटांचा पगडा सुरवातीपासून होताच. ‘दिल चाहता है’मध्ये नायिका नायकाला सारखी मारत असते. त्याचंही अनुकरण बरेच दिवस इथं-तिथं भर रस्त्यात पाहायला मिळत होतं; मग व्हॅलेंटाइन्स डे हा तर खास प्रेमीजनांनी, प्रेमीजनांना वाहिलेला... मग त्याचं गारुड दिवसेंदिवस वाढेल नाहीतर काय? त्यात संस्कृती, परंपरा यांचा विचार येतच नाही. विचार करायचाच तर त्या आदिम, अलौकिक भावनेचा करू या.. जिला चित्रपटसृष्टीमुळेच काहीसं सवंग रूप आलं आहे. ही भावना म्हणजे अर्थातच प्रेम!
तुझ्यासाठी श्वास घेऊ शकत नाही
हीसुद्धा माझ्यासाठी उणीव आहे
तुझ्यावरचं प्रेम हीच फक्त
माझ्या जगण्याची जाणीव आहे...
तुला वजा केल्यावर
बाकी काही उरत नाही
तुझ्याशिवाय आयुष्य
मी आयुष्यच धरत नाही.. 

अशी उत्कटता  ही ज्या भावनेचं सामर्थ्य आहे... ज्या भावनेत फक्त समर्पण आहे, तिला प्रदर्शनाची गरज पडावीच का? आमचे एक सर होते. आंबेकर सर. ही गोष्ट आहे साधारणतः ३५-४० पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीची. त्या काळी व्हॅलेंटाइनचं नावही फारसं कुणाला माहीत नव्हतं. त्या काळात आमचे हे सर असाच एक दिवस साजरा करायचे... ज्या दिवशी त्यांनी मुलगी बघण्याचा कार्यक्रम केला, ज्या दिवशी त्यांनी त्यांच्या ‘सौ’ला पहिल्यांदा बघितलं, तो दिवस त्यांच्यासाठी उत्सवाचा दिवस असे आणि त्या दोघांनी तो जन्मभर साजरा केला. दोघं खूप आनंदात असायचे. नवे कपडे, नवे दागिने, जे आहे त्यात ते दोघं तो दिवस आनंदात घालवायचे. सर खाऊन-पिऊन सुखी होते आणि आपल्या मनाजोगत्या जोडीदाराबरोबर आनंदीही होते...
प्रेम साजरं करता येत नाही, आनंद साजरा करता येतो आणि आनंद साजरा करायला ठराविक दिवसाचं बंधन कशाला?
तू फक्त समोर यायचा अवकाश
की माझ्यापुरता काळ सरतो
संथ, मुलायम आणि सावकाश...
असा हा क्षणाक्षणानं फुलणारा आनंद आहे. त्याचा नेमका दिवस ठरवून त्या आनंदालाही नियम घालून टाकण्यात आले आहेत! नियमानं परंपरा तयार होतात आणि पुन्हा परंपरा नियमानुसार पाळल्या जातात...परंपरा पाळल्या जातात...पद्धती पाळल्या जातात. पण खरंच, प्रेमाची अलौकिक जादू या सोपस्कारात जाणवत नाही.
तुझी सावलीसुद्धा ओळखेन
कधी तू हरवलास तर
अरे, पण मी मागे राहीनच कशी
तू माझ्यापास्नं दुरावलास तर? 
असे निरुत्तर करणारे प्रश्‍न फक्त या भावनेपोटीच पडू शकतात.
हात धरून रस्ता अडवत नाहीस
पण नजरेचा गुंताही सोडवत नाहीस
तुझं प्रत्येक स्वप्न साकार होताना पाहायचंय
अन्‌ तुझं साकार झालेलं स्वप्न बनून
कायम तुझ्या सोबत राहायचंय... 

अशी पूर्णतेकडे नेणारी भावना म्हणजे प्रेम आहे. ज्याला ही भावना उमगली, तो खरा रंगला!
आणि खरी रंगलेले गडीच मग वेडेपणा करतात.. प्रेमाचे दोन प्रकार आहेत ः वेड्यासारखं प्रेम करणं आणि प्रेमात वेडं होणं...! आणि व्हॅलेंटाइन्स डेला हे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात!

संजय दत्तनं ‘व्हॅलेंटाइन्स डे’चाच मुहूर्त साधून रिया पिल्लईशी लग्न केलं होतं. घरातून निघताना त्याला कल्पनाही नव्हती की आपण आज चतुर्भुज होऊ.. त्यानंतर तो वेगळ्या प्रकारे अनेकदा अनेक कारणांसाठी ‘चतुर्भुज’ झाला; पण त्याचं ते व्हॅलेंटाइन्स डेला चतुर्भुजं होणं हे अनोखं होतं! त्याच्याबाबतीत बहुतांश प्रतिक्रिया अशा होत्या की ‘काय हा मूर्खपणा आहे?’  

पण मी म्हणतो, ते म्हणतात ना ‘बुरा ना मानो होली है...’ तसंच या प्रेमाचंही असतं! त्या प्रेमात रंगलेले जे असतात, ते तो क्षण फार उत्कटतेनं जगत असतात. संजय-रियाचं लग्न टिकलं नाही हा भाग वेगळा; पण त्या क्षणाला त्यांनी ‘न्याय’ दिला होता! पण अशा क्षणांची अखंड मालिका म्हणजेच आयुष्य आहे...आणि ते भिरकावून देता येत नाही.. झुगारून चालत नाही. ते निभावावं लागतं आणि प्रेम बरेचदा तेच बळ देतं...

१९८० च्या दशकातली बी ग्रेडच्या चित्रपटांमधली एक नायिका होती; म्हणजे ती अजूनही आहे; पण आता ती वृद्धा आहे. तेव्हा ती नायिका होती. तिचा अशाच एका स्ट्रगल करणाऱ्या दिग्दर्शकावर जीव जडला, तेव्हा तो तिच्याकडं सोय म्हणून बघत होता आणि ती मात्र पुरती गुंतली होती. व्हायचं तेच झालं. ती गरोदर राहिली आणि हा दिग्दर्शक बिथरला.. एक से एक लव्हस्टोरी त्याच्या डोक्‍यात घोळत असताना त्याला त्याची स्वतःची लव्हस्टोरी लक्षातच येत नव्हती...!
मी तुझं व्हायचं तर
तुलाही माझं व्हायला हवं
हेही खरं की कुणाचं होऊन जाणं
मनापासून यायला हवं.. 

हे अस्सल प्रेमातलं गमक त्या दिग्दर्शकाच्या लक्षातच आलं नाही. यथावकाश त्या नायिकेनं-प्रेमिकेनं एका मुलीला जन्म दिला आणि अभिनय सोडून ती डबिंग करायला लागली. त्यात तिनं खूप नाव-पैसा कमावला. मुलीला तिनं छान सांभाळलं. दिग्दर्शकही जरा नावारूपाला आला; मग दोघं परत आमनेसामने आले. तो इतकी वर्षे बघत होता... तिनं कधीही त्याच्याबद्दल अपशब्द उच्चारला नव्हता की त्याला शिव्या-शाप दिले नव्हते. मग आपल्या लहानग्या मुलीला बघून त्यालाही पाझर फुटला असेल. त्यानं लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्या नायिकेसमोर. वाटलं की ती आता लगेच होकार देईल; पण तसं झालं नाही. तिनं जगावेगळी मागणी केली. ती म्हणाली ः ‘‘आता अजून एक बाळ दे; मग लग्न करू. नाहीतर मोठीला उगाच कॉम्प्लेक्‍स येईल!’’ तेव्हासुद्धा अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या होत्या, ‘काय मूर्ख बाई आहे!’ ही मागणी ऐकून तो दिग्दर्शकही हैराण झाला होता... मात्र, प्रेमाची हीदेखील एक छटा आहे. असते. जोडीदाराच्या भरवशावर बेफिकीर होऊन जायचं. व्हॅलेंटाइन्स डेसारखा दिवस या अशा वेड्यांनाच शोभून दिसतो! त्या दिग्दर्शकानं त्या नायिकेची-प्रेमिकेची ती अट मान्य केली. मधल्या काळात त्याचं एक ठरलेलं लग्न मोडलं होतं... तो पुन्हा मनापासून या नायिकेत-प्रेमिकेत रमायचा प्रामाणिक प्रयत्न करायला लागला आणि त्याला जाणावलं, की तसा प्रयत्न करायची गरजच नाही. आपण मनपासून हिच्यातच रमलो होतो म्हणूनच आपले सूर दुसरीकडं कुठं जुळलेच नाहीत. मग त्यांना दुसरी मुलगी झाली. मग त्यांनी लग्न केलं. आता त्या दोघांची मोठी लेक जाहिरातींमध्ये आणि मालिकांमध्ये धमाल करतेय...
सगळं तुला देऊन पुन्हा
माझी ओंजळ भरलेली
पाहिलं तर तू तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली.. 
अशी कृतार्थ भावना त्या दोघांना नक्कीच जाणवत असेल.

प्रेमाची सार्थकता असं कृतार्थ वाटण्यातच आहे आणि कृतार्थ असं उगीचच वाटत नाही. त्यासाठी अथांग होण्याची क्षमता असावी लागते.. माफ करा; पण हल्ली बरेचदा अशी क्षमता युगुलांमध्ये दिसून येत नाही...त्यांचे व्हॅलेंटाइन्स डेचे बेत ऐकतानासुद्धा हेच जाणवतं. जी गोष्ट निर्मळपणे व्यक्त करण्याची आहे ती गोष्ट, ती भावना ते सिद्ध करायचा अट्टहास करत असतात! पण सरसकट असं विधान करून मी मोकळा होत नाहीये..नाहीतर माझीच कविता मलाच लागू पडायची. मी एका कवितेत म्हटलंय ः
आपण नदीकाठी बसायचो
तिथे अजूनही तो खडक आहे
पण हल्ली बसणाऱ्यांचं
वागणंच जरा भडक आहे...
मित्रांनो, हा ऊहापोह न संपणारा आहे.
मुळात प्रेम हा विषय ऊहापोह करायचा विषयच नाही; पण व्हॅलेंटाइन्स डेची जादूच अशी आहे, की न चाहते हुए भी सब उस की लपेट मे आ जाते है ।
पण तरी खऱ्या प्रेमाचं खरं गमक सांगू?
आधी कळायला वेळ लागतो
मग मान्य करायला वेळ लागतो
तुला माहीत आहे? 
इथे जिंकण्यापेक्षा हरायला वेळ लागतो...

चंद्रशेखर गोखले 

Sunday, February 17, 2013

बघ माझी आठवण येते का?

मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ माझी आठवण येते का ?

वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा पाऊस थांबेपर्यत,
तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत,
बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल,
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल,
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण,
तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे ,
तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर,
किशोरीच सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ,
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?
-सौमित्र

Tuesday, July 3, 2012

तुझ्या विना

तुझ्या विना ..............!!!!!!!!


भास का हा तुझा होत असे मला सांग ना .......
लागती ओढ का सारखी अशी सांग ना...........
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना ...
तुझ्या विना ..............!!!!!!!!
तुझ्या विना ..............!!!!!!!!

उमजुन सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांगना जीव हा गुंतला
झाले आता जरी...होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे सांग ना...
तुझ्या विना ...........!!!!!!!!
तुज्याविना ..............!!!!!!!!

वाटे जरी माझी तुझी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली
फिरुनी पुन्हा नवे... नाते मला हवे..
जीव तुटतो का हा असा रे सांग ना...
तुझ्या विना .............!!!!!!!!
तुझ्या विना ..............!!!!!!!!

तुझ्या विना...
गीतकार - अमोल पठारे
संगीतकार - नीलेश मोहरीर
गायक - वैशाली सामंत, मंगेश बोरगावकर

Wednesday, June 20, 2012

कुणाला आपलसं करणं......इतकं सोपं नसतं कधी

 कुणाला आपलसं करणं........



आत्मा देखील विकावा लागतो ...
या प्रेमाच्या बाजारात ...
कुणाला आपलसं करणं ...
इतकं सोपं नसतं कधी ...

श्वासदेखील ...
गहाण ठेवावे लागतात ...
कुणाच्यातरी हृदयात ...

त्या व्यक्तीला ...
त्या व्यक्तीच्या भावनांना ...
तितकचं हळुवार पणे ... जपावं लागतं ...

कुणाला जीवापेक्षाही ...
जास्त प्रेम करणं ...
इतकं सोपं नसतं कधी ...!!!
-अनामिक

Tuesday, June 5, 2012

पावसाच्या त्या सुंदर क्षणी


पावसाच्या त्या सुंदर क्षणी
तो अन मी असेच बसायचो
एकमेकांच्या गप्पांत
उगाच तासंतास रमून जायचो

आठवतात ते क्षण
सोबत एकमेकांच्या सहवासातले
दोघांनी समुद्र किनारी बसून
वाळूतही स्वप्नातले घर साकारलेले

ते बाईक वरून आमच फिरणं
रोज रोज नाही पण कधीतरी असायचं
दोघांच एकमेकांवर प्रेम करणं
जणू स्वप्न सुख भासायचं

त्यान माझी उगाच काळजी करणं
मला नेहमीच खटकायच
त्या काळजीतीलही त्याच प्रेम
मला नंतर जाणवायच

भर पावसातही दोघे
आम्ही स्वच्छंदी होऊन फिरायचो
सिहगड काय अन माथेरान काय
सर्वच पालथ घालायचो

पावसाचे ते टपोरे थेंब
अंगावर झेलायला त्याला खूप आवडायचे
त्याच्या ह्या आवडीवर
मी मात्र त्याच्यावर खूप चिडायचे

रुसवा फुगवा काढत
दिवस असेच उडून जायचे
जीवनाच्या वाटेवर आतातरी
आपण स्थिर व्हावे आसे मला वाटायचे

माझ्या वाटण्याचा आता त्याला नाही गंध
हे मला सारख जाणवायच
माझ्या पेक्षाही आता त्याला
कोणी दुसरेच जवळच भासायचं

दिशा बदलल्या , वाटा बदलल्या
पण तरीही मन त्याच्यासाठीच झुरायचं
कधीतरी तो परत येईल
असा वेडा विचार मन माझ करायचं

आजही पावसाचे ते क्षण
हवेहवेसे वाटतात
पण पाउस येताच
पाण्याबरोबर आठवणीही वाहून नेतात...!!! 
-अनामिक

Saturday, May 26, 2012

वा-यावर उडणारी बटं सावरताना



वा-यावर उडणारी बटं सावरताना
खुप छान दिसायचीस तु,

तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु.

नेहमीच मला माझ्या अवतीभोवती
खरचं भासायची तु,

मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग
आल्यावर,कुठेच नसायची तु..

माझ्यावरच हसुन झाल्यावर” माझे”
पुन्हा मला दिसायची तु,

मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी असायची तु..

-अनामिक

Saturday, April 21, 2012

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे


कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

-अनामिक

Thursday, March 22, 2012

प्रत्येक जन्मी फ़क्त तुझ्यावारच प्रेम करत रहायचे आहे

 

दबक्या पावलाने गुपचुप येउन

कानात तुझ्या सांगायचे आहे...
गुलाबाचे लाल् फ़ुल
हळुच तुझ्या केसात लावायचे आहे...

... कानात तुझ्या सांगताना
गुदगुल्या तुला करायच्या आहे...
तुझे लक्श नसताना
एकटक तुझ्याकडे पहायचे आहे....

तुझ्याकडे पाहत, हळुच हसत
तुलाही हसताना पहायचे आहे...
हसतानाचे तुझे मधुर सौन्द्र्य
डोळ्यान्च्या कोपर्यात साठवायचे आहे..

तुझे बोलने, तुझे हसणे
मनात कैद करुन ठेवायचे आहे..
प्रत्येक जन्मी फ़क्त तुझ्यावारच
प्रेम करत रहायचे आहे...

तु पुढे चालताना मागे
तुझी सावली बनुन चालायचे आहे..
क्शणोक्शणी तुझी आठवन काढत
रोज किवता िलहायची आहे.. ♥
-अनामिक

Wednesday, March 21, 2012

तुझ्यावर जिवापार प्रेम करावस वाटत

तुला चोरून बघताना
मला खुप बर वाटत
तुझ्या मागुन फिरताना
तुझ्या सोबत फिरावस वाटत

तुझ ते निरागस हास्य
निहारून पहावस वाटत
हातात हात घालून
तुझ्या सोबत चालावस वाटत

तुझ्या त्या लाजन्या कड़े
एकटक पहावस वाटत
तुझ्या समोर उभा राहून
तुझा चेहरा मनात भरावसा वाटत

मला खुप खुप खुप
तुझ्या सोबत बोलावस वाटत
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत

खरच
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत..
-अनामिक

Monday, March 19, 2012

लग्न म्हणजे काय असतं?

लग्न लग्न म्हणजे काय असतं?


लग्न लग्न म्हणजे काय असतं?

त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
... लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!
-अनामिक

Wednesday, March 14, 2012

माझ तुझ्या वर प्रेम आहे तुला कधी ते कळेल का?

वारयाची येणारी प्रत्येक झुळूक
तुझ्या सुगंधाने दरवळते
मन माझे मग होई दिवाने
तुझ्य...ा भेटीसाठी आतुरते....
तुझ्या आठवणींच्या सोबतीनेच
माझा काव्य प्रवास सुरु होतो ..
माझ्याही नकळत फक्त तुझ्यासाठी
मी कवितांच्या गावी जातो ...
तू सोबत नसतानाच नेमक्या
तुझ्या आठवणी स्मरू लागतात
होठ मुके मुके होतात
आणि शब्द कविता करू लागतात ...
आयुष्याच्या या वळणावरती
मला तुझी साथ मिळेल का
माझ तुझ्या वर प्रेम आहे
तुला कधी ते कळेल का????
-अनामिक

Thursday, March 8, 2012

वाट जरी ओळखीची, वळणं वाकडी रस्त्याची


वाट जरी ओळखीची, वळणं वाकडी रस्त्याची..
ओळख आपली जुनी, शाळेतल्या एका वर्गातली..

शब्द जरी नाही मिळाले, भावना तुझ्या मांडयाचीस..

नयनांची भाषा ती, किती छान सांगायचीस..

मायना नसला तरी, शब्द रचना करायचीस..
भिजलेल्या नयनांनी भावना मात्र सांडायचीस..

लाटानविना सागर म्हणजे, भक्ती वाचून देव..
शब्द तुझे ओठातले, भावनांना आलेले पेव..

तर्कांनी वेढलेले जग, वसलेले मनी तुझ्या..
मूर्ती तुझी सोज्वळ, वसलेली मनी माझ्या..

विस्तावासारखे विचार, मनी आग, मग धग काय..?
किती करशील तर्क, मग पाहिलेल्या स्वप्नांना अर्थ काय..??

असतो गुंतत सोडवताना, किती मारल्यास गाठी..
साप आला आडवा, तरीही मोडते ती काठी..

कितीही आणि कशाही का असतात अपेक्षा..
मनची कुठलीही आशा तुझं वाचून होते निराशा..

म्हणाली असतीस चुकले, तरी असते माझे भागले..
मनात मावणार नाही इतके, इतके प्रेम मी असते दिले..

आहे न प्रीत मग, अहम पणा बाळगू नकोस..
माझं असलं मन, असे पटकन तोडू नकोस..

प्रत्येक वेळी नाही फिरत देहा भोवती दृष्टी..
कधी कधी असतो कुणी कुणासाठी कष्टी..

सख्या माझ्या, ऐकण्या शब्द आसुसलेले माझे कान..
प्रीतीचे अंगण दारी तुझ्या, ऐकण्या शब्द ओतलेले प्राण..

जिंकशील किंवा हरशील, आशा बाळगू नको..
कधी उदार होवून बघ, बचतीची तमा बाळगू नको..
-मयूर आपटे

Monday, March 5, 2012

श्वास माझे तुझ्यासाठी काही काळ थाबले होते


श्वास माझे तुझ्यासाठी काही काळ थाबले  होते
जीव माझा जात होता,पण प्राण
काही अडले होते
शेवटच्या क्षणी सुद्धा श्वास काही निघत नव्हता
तुला एकदा बघण्यासाठी जीवही काही ठरत नव्हता
शरीराची हि यात्रा आता संपत  आली होती
काही क्षणात याची होणार
माती याची तयारी झाली होती
-अनामिक

Saturday, March 3, 2012

माझे प्रेम असंच आहे


माझे प्रेम असंच आहे
सागरासाठी धावणाऱ्या सरीतेसम
एका थेंबासाठी आसक्त चातकासम
दुधावरल्या घट्ट मुलायम सायेसम...

माझे प्रेम असंच आहे
किनाऱ्यास भेटण्या आतुर लाटेसम
धरतीस आलिंगन देणाऱ्या धारेसम
श्रावणात नाचऱ्या मोर पिसाऱ्यासम...
माझे प्रेम असंच आहे
अक्षरांना शोभा देणाऱ्या ओळीसम
गीतास मधुर करणाऱ्या सुरांसम
पावसातल्या भिजरया आठवणीसम ..
देव पेडणेकर (०१/०३/२०१२-१3.५०)

Monday, February 27, 2012

कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की



"कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की
कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम …

कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की
कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम….

कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की
आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम …

कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम …

कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ….
कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम...

कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ….
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ….

कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की….
न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम ….

कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम की….
कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम ….

कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की …
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …

कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ….
आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम ….

कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजेप्रेम की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम….!!"
खरच..!! प्रेम नेमक काय असतं..!!!
प्रेम नेमकी काय असत..???..

कवी : चैतन्य  मोहिले 

Saturday, February 25, 2012

प्रेम म्हणजे


प्रेम म्हणजे भावनांचं आभाळ
ज्याला कुठेच अंत नाही
प्रेमाखातर प्राणही गेला तरी
मनाला त्याची खंत नाही
प्रेम म्हणजे बंधन
... प्रेम म्हणजे स्पंदन
प्रेम म्हणजे स्वतः झिजून इतरांसाठी सुवासणारं चंदन
कधी कधी असंख्य भेटी घडूनही
प्रेमाची भावना जागत नाही
तसं प्रेमात पडायला
कधी कधी ती भेटचं घडावी लागत नाही
प्रेम म्हणजे दोन मनांना
आपुलकीनं जोडणारा सेतू असतो
प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड
हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो
प्रेम म्हणजे प्रियजणांच्या चेहऱ्यावर
उमटणारा हर्ष असतो
प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या
आत्म्याचा स्पर्श असतो
प्रेम म्हणजे भावनांची ठिणगी
जी हृदयात अवचित पेट घेते
जीवनाच्या एका नाजूक वळणावर
अविस्मरणीय स्वप्नांची भेट देते
-अनामिक

Thursday, February 16, 2012

वाटते मला मी पण वारा बनूनी फिरावे



वाटते मला मी पण वारा बनूनी फिरावे
तुझ्या नाजूक चेहऱ्यावरती स्मिथ हास्य फुलवावे.

करताच स्पर्श तुझ्या अंगी रोमांच उभा राहावा
तुझ्या गुलाबी ओठांचा हळूच स्पर्श व्हावा.

देण्यास आलिंगन हात तुझे पुढे यावेत
आनंदाचे क्षण मिठ्ठीत तुझ्या घालवावेत.

हळूहळू मिठ्ठी तुझी सैल होताना
अश्रू येतात डोळ्यात मी दूर जाताना.

घडेल का असे आवचित कधीतरी
बनूनी वारा मी फिरावे तुझ्या संगती...!!! ♥
- अनामिक

Friday, October 21, 2011

लळा जिव्हाळा शब्दच खोटे

लळा जिव्हाळा शब्दच खोटे


लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।
मासा मासा खाई॥
कुणी कुणाचे नाहि,
राजा कुणी कुणाचे नाहि ।

कुणी कुणाचे नाहि,
राजा कुणी कुणाचे नाहि ।

लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।
पिसे तणसडी, काड्या जमवी चिमणी बांधी खोपे ।
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे ।
बळावता बळ पंखामधले पिल्लू ऊडूनी जाई ॥१॥

रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया ।
कोण कुणाची बहिण भाऊ, पती पुत्र वा जाया ।
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही ॥२॥

कुणी कुणाचे नाहि, राजा कुणी कुणाचे नाहि ।
लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।

चित्रपट : जिव्हाळा
गायक : सुधीर फडके
गीतकार : ग. दि. माडगूळकर
संगीतकार : श्रीनिवास खळे

Friday, September 30, 2011

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा ?

आठवण
   

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा...???
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना....

नशिबाने एकदा पुन्हा कुठे भेटू...
आठवणींना एकदा एकत्र मिळून वेचू...

पण तेव्हा सारं काही बदललेलं असेल...
कुणीतरी बोलावतय म्हणून भेट लवकर सुटेल...

लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाहीत...
आठवणींचा हाच झरा त्या दिशेने वाहणार नाही...

आज सोबत आहोत मनासारखे जगून घेऊ ...
जीवनभर पुरतील  अश्या आठवणी साठवून घेऊ ....!!!!

-अनामिक

Friday, August 5, 2011

तीलाच द्याव मन हेच विचार होते...

प्रेम
तीलाच द्याव मन हेच विचार होते
तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

ती दोष देउन जरी नियतीस गेली
माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

तीला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
आले गळुन नयनात तुषार होते.

अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

काळोख तो सहज नशेत तोल गेला
झाली सकाळ तर तेच गटार होते.

आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.
-अनामिक