Wednesday, August 12, 2026

ज्ञान भारतम website

ज्ञानाचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी 'ज्ञानभारतम्' अभियान! 

भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे 'ज्ञानभारतम्' राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान देशभर सुरू करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत देशभरातील हस्तलिखितांचा शोध, नोंदणी, दस्तऐवजीकरण आणि डिजिटल स्वरूपात संवर्धन करण्यात येणार आहे. अध्यात्म, धर्म, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, गणित, ज्योतिष, नाट्यशास्त्र, रसायनशास्त्र आदी विविध विषयांवरील कागद, ताडपत्र, भूर्जपत्र, कापड किंवा इतर माध्यमांवरील हस्तलिखितांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हस्तलिखितांची मालकी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडेच कायम राहणार असून शासनाकडून त्यांचे जतन व डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.

आपल्या घरात, मठ, मंदिरे, आश्रम, ग्रंथालये, संशोधन संस्था किंवा खाजगी संग्रहात प्राचीन हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्यांची माहिती 'Gyan Bharatam' मोबाईल ॲपवर नोंदवून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हा.

आपल्या अमूल्य ज्ञानवारशाचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी या राष्ट्रीय अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करते.

अधिक माहितीसाठी : gyanbharatam.com ला भेट द्या.

Fb post @ Sunetra Ajit Pawar

0 comments: