Sunday, April 19, 2026

पुस्तक परिचय

नमस्कार,
आजच्या महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणीत राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या #जगणं_होईल_हिरवंगार या माझ्या कवितासंग्रहावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी लिहिलेले परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. सावंत सरांचे आणि म.टा. संपादकांचे मनःपूर्वक आभार. 🙏🌿

जगणं सुंदर करणारी कविता 
...........................................

एखाद्या साहित्यिकाचे एखाद्या वाङ्मयप्रकारांतील कार्य अधोरेखित झाले, की इतर वाङ्मयप्रकारांतील त्याचे लेखनकर्तृत्व झाकोळले जाते किंवा नजरेआड केले जाते. बालसाहित्यकारांच्या बाबतीत तर हे हमखास घडते. एकदा का तुमच्यावर 'बालसाहित्यकार' असा शिक्का बसला, की मग तुमच्या उर्वरित वाङ्मयप्रकारांतील लेखनाकडे दुर्लक्ष होऊ शकते. एकनाथ आव्हाड यांच्या बाबतीत हे विधान अगदी खरे आहे. खरं तर सोपं लिहिणं ही अवघड गोष्ट आहे, पण एकनाथ आव्हाड यांना ती साध्य झाली आहे. एकनाथ आव्हाड हे अव्वल दर्जाचे बालसाहित्यकार आहेत. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या बालसाहित्याच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. परिणामी त्यांनी मोठ्यांसाठी लिहिलेल्या कवितेकडे म्हणावे तसे लक्ष वेधले गेले नाही. एकनाथ आव्हाड यांच्या सहज सुंदर कवितेकडे साहित्यविश्वाचे लक्ष वेधण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

एकनाथ आव्हाड हे गेली ३०-३५ वर्षे साहित्यसाधना करत आहेत, म्हणजे ते केवळ बालसाहित्यच लिहीत आहेत, असे नव्हे. त्यांनी इतर वाङ्मयप्रकारांतही लक्षणीय लेखन केले आहे. त्यांनी मोठ्यांसाठी लिहिलेली कविता आता 'जगणं होईल हिरवंगार' ह्या संग्रहरूपात येत असली, तरी ते काही नवोदित कवी नाहीत. त्यांचा कवितेचा व्यासंग जुनाच आहे. त्यांना चांगली 'कविता' लिहिता येते, म्हणूनच त्यांची 'बालकविता' साहित्य अकादमीकडून सन्मानित झाली आहे. कवीला शब्दांचे सामर्थ्य समजलेले आहे. म्हणूनच कवीने
'कसं सांगू शब्दांनी
मला काय दिलं?
सच्चेपणा, निर्मळ मैत्री
माझं मन जागं केलं'.
ह्या शब्दांत शब्दांचे ऋण व्यक्त केले आहे.
हा कवी शब्दांचा ऋणाईत आहे. ही कविता अभिव्यक्तीच्या स्तरावर फारच प्रांजळ आहे. 'जगणं होईल हिरवंगार' ह्या शीर्षकातही एक अटळ विश्वास आणि दुर्दम्य आशावाद व्यक्त झाला आहे. 

ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गचक्र बिघडले आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेकांच्या घागरी उताण्या पडल्या आहेत. घोटभर पाण्यासाठी सर्वत्र वणवण चालली आहे. दुष्काळाच्या झळा ठाण मांडून बसल्या आहेत. गावाला आणि आयुष्याला विळखा घालून. राज्यकर्त्यांची संवेदनशून्यता ह्या दु:खात आणखी भर घालते आहे. त्यामुळे अस्वस्थता, अस्थिरता आणि अशांतता व्यापून उरली आहे, घरात आणि मनातही! प्रत्येकाचे
'दोन्ही हात अडकलेत
वांझोट्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी
निराशेचा काळोख
अधिकच गडद झालाय'.
असं भोवतालाचं गडद चित्र ही कविता उभे करते.

संगणकयुगात मोबाईलमुळे माणूस माणसापासून दुरावत चालल्याची खंत ही कविता व्यक्त करते.
'इथे काहींच्या पायाला
भिंगरीसारखी चाकं
आणि काही फुटलीत अहंकाराची टोकं.'
अशा शब्दांत ही कविता समकाळावर अचूक भाष्य करते. आभासी दुनियेतली कुचंबणा ही कविता शब्दांत बांधते.
'ऑनलाईन' ह्या कवितेत कवीने आभासी जगाची मनोवस्था नेमकेपणाने पकडली आहे.
'फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली म्हणजे नातं सुरू
आणि अनफॉलो केलं म्हणजे शेवट
इतका सहज आणि भावनाशून्य झालाय
नात्यांचा व्यापार.
आजच्या डिजिटल जगात चमकणारी नाती
फॉलोअर्स वाढले की आनंद देतात
प्रतिसाद कमी होताच अस्वस्थता वाढवतात.
इथे अट एकच
ही आभासी नाती टिकवण्यासाठी
मनात ओलावा नसला तरी चालेल,
पण सतत ऑनलाईन मात्र असलं पाहिजे'.
ह्या कवितेत उपहास आहे आणि उपरोधही आहे. वास्तवाला भिडणारी ह्या कवितेची ताकद वाखाणण्यासारखी आहे.

कवीच्या भावविश्वात आईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. डोक्यावरील पाटीतून भाजीपाला विकून मुलाला घडविणाऱ्या मातेबद्दल कवीला नितांत आदर आणि कृतज्ञता वाटणे स्वाभाविकच आहे. प्रस्तुत संग्रहातील आईविषयक १३ कविता म्हणजे कवीची आणि आईची नाळबंधाची कहाणीच आहे. यांतील काही कविता आईचे स्वभावचित्र रेखाटतात. 
'तिचे घरात पाऊल पडताच
सूर्यप्रकाशाची तिरीप आली घरात
आणि काळवंडलेला घराचा 
हळूहळू प्रकाशमान व्हायला लागला'
हा कवीचा अनुभव आहे. असे वळण घेत ही कविता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. 
कुठल्याही विद्यापीठात न गेलेली कवीची आई कवीला सोप्या सोप्या गोष्टींतून जगणं सोपं करून सांगत असते. आईने साध्यासुध्या गोष्टींतून कवीच्या मनावर कृतज्ञता हे मूल्य जाणीवपूर्वक बिंबवले आहे. त्यामुळे कवी कृतज्ञता हे जीवनमूल्य जपण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतो. 

वठलेल्या झाडालाही पालवी फुटते. आंतरिक धडपडीतून नदीला तिचा स्वतंत्र मार्ग सापडतो. प्रतिकूल परिस्थितीतही पक्षी आपले घरटे घडवतात. धरतीची व्याकूळता पाहून आभाळालाही पान्हा फुटतो. हे सगळे दाखले देऊन आई म्हणते
'आपल्यालाही असंच 
झाडासारखं रुजून येता आलं, 
नदीसारखं पुढे जाता आलं, 
आभाळासारखं विशाल होता आलं
अन् पाखरासारखं 
चिवटपणे जगण्याला तोंड देता आलं की
जगणंही आपल्याकडं हरखून पाहतं
अशा वेळी अंगावर धावणाऱ्या अंधारालाही
निक्षून परतवून लावता येतं' 
अशा प्रकारे जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारी आणि प्रकाशाची वाट दाखविणारी श्रममूर्ती आई हे कवीच्या आयुष्यातील प्रकाशाचे बेट आहे. ह्या कवितेतली मातृप्रतिमा ही अतिशय उच्च कोटीतली आहे. 

हल्ली माणसा-माणसांतला संवाद हरवला आहे. अशा परिस्थितीत कवीची अशिक्षित आई कवीला म्हणते
'जगाशी बोलायला धावताना 
आधी स्वतःशी बोल, थोडा वेळ काढून 
आतला आवाज ऐक, अधीर होऊन. 
मग संवाद फुलून येईल आपसूक फुलासारखा'. 
इतका छान, आत्मसंवाद साधण्याचा सल्ला देणा-या आईला अशिक्षित कसे म्हणता येईल? 
जेव्हा कवी आपला पहिला पगार आईच्या हाती सोपवतो, तेव्हा हीच आई म्हणते, 
'कष्टाला अहंपणा चिकटू देऊ नकोस 
यश तेव्हाच शोभून दिसेल'. 
अहंपणाचा आणि कर्मफळाचा त्याग करायला शिकवणारी आई स्थितप्रज्ञ खरी! 
लेकरांची झोपमोड होऊ नये, त्यांची पहाटस्वप्नं कोमेजू नयेत, म्हणून घरात हळुवार काम करणारी आई दिवसरात्र कुटुंबासाठी राबत असते. म्हणून कवीला आपल्या आईची सावली डेरेदार झाडासारखी वाटते. एकनाथ आव्हाड यांची कविता सोप्या शब्दांत जगण्याचे मर्म सांगून जाते. 

ही आई एकदा म्हणते, 
'आयुष्याची वाट तुडवताना 
माणसानं जर वाटेत सौख्याच्या बिया पेरल्या ना
तर जगण्याचं समाधान लाभतं त्याला'. 
इतरांच्या वाटेवर सौख्याच्या बिया पेरण्याची शिकवण देणारी आई आभाळासारखी थोर असणार यात शंकाच नाही. आईच्या शिकवणीची उजळणी करताना कवीने लिहिले आहे :
'माझ्या प्रकृतीत तिची संस्कृती रुजवून
माझ्या बेढब मनाला ती आकार देत असते'. 
ह्या श्रमवंत आईची कथाच निराळी आहे. ती कष्टाचं रान तुडवत आशेची फुलं वेचायची. अंगात हत्तीचं बळ घेऊन पडेल त्या कामाला जुंपून घ्यायची. तिने चांदणं बरसणारा चंद्र दूर लोटून प्रकृतीला साद घालणारा सूर्य जाणीवपूर्वक पदरात बांधून घेतला होता. एकनाथ आव्हाड यांची कविता त्यांच्या स्वभावासारखीच शांत आणि संयत आहे. ती कधीही आक्रमक आणि आक्रस्ताळी होत नाही, तर वाचकमनाशी सहजसंवादी अशी ही कविता आहे. 

आई ही आपला पहिला गुरू असते, म्हणून कवीला आपल्या आईची शिकवण ही शिकवणीसारखी वाटत नाही, तर ते तिच्या अनुभवाचं संचित आहे, असे कवीला वाटते. ह्या अनुभवसंपन्न आईच्या मुखातून जीवनाचं तत्त्वज्ञानच झिरपते आहे. अशा १३ कवितांमधून कवीने आपल्या आईच्या आयुष्याची परवड, तिचे दु:ख, तिचे थोरपण, तिचे समर्पण, तिचा त्याग, तिची हिंमत आणि तिची जीवनाभिमुख शिकवण सांगितली आहे. ह्या कविता वाचत असताना कवी महन्मंगल मातृस्तोत्र गुणगुणतो आहे, असेच वाटत राहते. एकनाथ आव्हाड यांची कविता ही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी कविता आहे. कविसंमेलनांतून टाळ्या मिळवणारी ही कविता नाही, तर अतिशय चिंतनशील अशी ही कविता आहे. 

आईच्या शिकवणीतून जसे जगण्याचे तत्त्वज्ञान प्रगटले आहे, तसेच अन्य काही कवितांमधूनही ते वाचकांपर्यंत पोहोचले आहे. हल्ली 'समजूतदारपणाची गैरहजेरी' वाढली आहे. माणूस दिवसेंदिवस असमंजस आणि हिंस्र बनत चालला आहे. अशा परिस्थितीत कवीने लिहिले आहे :
'भांडणाचे रूपांतर मग वैरात
दुर्विचारांची विषवल्ली
फोफावते आयुष्यात
आणि मग
मनाचे कवाड
कुलूपबंद होऊन जाते
खरंच...
समजूतदारपणाची गैरहजेरी लागली की
सगळंच कसं भयंकर होऊन जातं'.
आणि हे भयंकर परिणाम टाळायचे असतील, तर समजूतदारपणाला पर्याय नाही, हेच कवीने यातून सूचित केले आहे.

मानवी जीवनात दु:ख सर्वव्यापी आहे, हे खरेच
पण दु:खालाही आपलंसं केलं,
दु:खातच सुख शोधलं, की
दुखावलेली, दुरावलेली,
दुभंगलेली मनं,
आयुष्याशी जुळवून घ्यायला
शिकतात हळूहळू.
तेव्हा सोपं होऊन जातं जगणं
आपण आपल्या लोभापायी, हट्टापायी
ते उगीचच अवघड करून टाकतो'.
ह्या कवितेत कवीने जणू जगणं सोपं करण्याचाच मूलमंत्र दिला आहे. ही कविता निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी मुक्तीचे मार्गही सुचविते. कवीची ही सकारात्मक जीवनदृष्टी मला फार महत्त्वाची वाटते. 

मानवी हव्यासाने हल्ली परमावधी गाठली आहे. सतत यशस्वी होण्यासाठी चाललेल्या धडपडीमुळे, फसव्या सुखाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावाधाव केल्यामुळे अंतःकरणातील अंधार वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत कवी म्हणतो :
'हे दुष्टचक्र भेदण्यासाठी
आता एकच पर्याय उरलाय
प्रत्येकाने दीप व्हावे
आपल्या मनात उजेड भरून घ्यावा
अंधकारावर प्रकाशाचा विजय मिळविण्यासाठी'.
ही कविता म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या 'अत्त दीप भव' ह्या संदेशाचा विस्तार आहे, असे मला वाटते. ही कविता मनाच्या संकुचितपणाला हादरे देते आणि सद्विचारांना सामावून घेण्यासाठी मनाचा पैस निर्माण करते. 

माणूस निसर्गापासून दुरावत गेल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून कवीने त्यावर एक उपाय सुचवला आहे :
'माणसं झाडासारखी वागल्याशिवाय
खरं नाही त्यांचं काही आता
आणि पाखरंही तेव्हाच परत येतील
जेव्हा माणसात एक झाड उगवून येईल'.
माणसात झाड उगवून येण्याची कल्पना काव्यमय वाटत असली, तरी ती काळाची गरज आहे, यात काही शंकाच नाही.
कधीकधी 
'बाहू पसरून झाडे
घेती कवेत आभाळ
आभाळाच्या गळ्यात
सावळ्या मेघांची माळ'
अशा तरल शब्दांत ही कविता निसर्गचित्र रेखाटते.

घर म्हणजे केवळ दगड-विटांनी बांधलेला चार भिंतींचा आडोसा नसतो, तर ऊब, शांतता आणि मोकळा श्वास असतो. घर म्हणजे उत्साह, चैतन्य आणि ओढ असते. घर म्हणजे अस्तित्व, स्वभाव आणि त्याला सहवासाची जोड असते. घर म्हणजे टापटीप, लख्ख नि स्वच्छ झगमग असते. घर म्हणजे आतुरता, आठवणी आणि थोडीशी तगमग असते. घर म्हणजे विश्वास, जिव्हाळा आणि निवांतपणाची जागा असते. घर म्हणजे ऋणानुबंधाचा हळवा, सचेतन धागा असते. घर म्हणजे थकलेल्या जीवांना आपुलकीचा आधार असते. घर म्हणजे आपल्या माणसांसाठी मनाचे सदैव उघडे द्वार असते. एकनाथ आव्हाड यांची ही कविता घराविषयीच्या सगळ्या हळव्या भावना उजागर करते आणि घराला घरपण बहाल करते. ह्या संपूर्ण कवितेत कवीच्या संवेदनशील मनोवृत्तीचे दर्शन घडते. 

एकनाथ आव्हाड यांची कविता म्हणजे कवीचा आत्मस्वर आहे. शिक्षकी पेशा हा केवळ कवीच्या उपजीविकेचे साधन नाही, तर तो कवीच्या पेशींचा अविभाज्य भाग बनला आहे. कवीचा श्वास बनला आहे. म्हणून त्यांच्या शाळा आणि शिक्षणविषयक कविता अतिशय प्रत्ययकारी उतरल्या आहेत.
'आता खूप वर्षांनंतर, 
ती शाळा पाहतो मी येता जाता
तेव्हा बाई तुमची आठवण येते
अन् क्षणात त्या शाळेचं देऊळ होऊन जातं'.
शाळेचं देऊळ होऊन जातं, ही केवळ कविकल्पना नाही तर कवीच्या श्रद्धेचा भाग आहे. 'सविता पटेकर.... सतत गैरहजर' हे कथाकाव्यही त्या श्रद्धेतूनच उत्कट उतरले आहे. शाळेच्या चिरेबंदी वातावरणात बालकांचा जीव गुदमरतो, याचे सजीव चित्र 'स्वागतशील' ह्या कवितेत उमटले आहे.

एकनाथ आव्हाड यांची कविता ही अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. ह्या कवितेला प्रतिमा- प्रतीकांचा अजिबात सोस नाही. अलंकारांच्या मोहात न पडणारी ही अनलंकृत कविता आहे. भावगर्भता हाच ह्या कवितेचा अनमोल अलंकार आहे. ह्या कवितेच्या साधेपणातही एक अम्लान सौंदर्य आहे. काही कवितांमधून कालिया, मिजासखोर कंस, शिशुपाल, जरासंध, नरकासुर, द्रौपदी यांसारखे पौराणिक संदर्भ येतात. इतकेच. ही कविता शेती आणि शेतकरी, मित्र आणि मैत्री, शब्दांचे सामर्थ्य, मौन पाळण्याचे महत्त्व, पंढरी आणि पांडुरंगाचे भक्त, पुस्तकांचे श्रेष्ठत्व या विषयांवर जीवीच्या जिव्हाळ्याने बोलते. काळोखाला धीर द्यायला एक पणतीसुद्धा पुरते, असा विश्वास ही कविता व्यक्त करते. एकनाथ आव्हाड यांची कविता ही विचार देणारी आणि विचारप्रवृत्त करणारी कविता आहे. जगणं सोपं आणि सुंदर करणारी ही कविता म्हणूनच मला महत्त्वाची वाटते.

पुस्तकाचे नाव : जगणं होईल हिरवंगार ( कवितासंग्रह )
कवी : एकनाथ आव्हाड 
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी 
प्रकाशक : राजहंस प्रकाशन 
पृष्ठे : १०० ,  किंमत : १६० रुपये 

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
( सुप्रसिद्ध साहित्यिक)
sureshsawant2011@yahoo.com

अक्षय्य तृतीया शुभेच्छापत्रे

अक्षय्य तृतीया


या शुभदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धीने संपूर्ण वर्ष जावो !

सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !

Saturday, April 18, 2026

मी माझा ६


मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा
वाळकं पान सुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारा... ही कविता खरं तर मी माझा च्या कृष्ण धवल मुखपृष्टावर असणार होती, म्हणजे तसच ठरलं होतं 
यातून मी माझाची भूमिका स्पष्ट होते असं माझ्या एका मित्राचं म्हणणं होतं 
मित्र म्हणायचं  , नाहीतर आम्ही पार्ल्यातले एका शाळेतले म्हणून एकमेकाला माहीत होतो पण तेंडुलकर परीवार या पुस्तकात रस घेतोय म्हंटल्यावर तो कसा येऊन चिकटला मला समजलच नाही 
पण असं होतं कधी कधी , आपल्या लक्षात येत असतं पण आपण झटकू शकत नाही, एकतर कुणाचा उगाच अपमान करायचा आपला  स्वभाव नसतो
आणि आपण मान्य करत राहतो
मग अगदी पुस्तक छपाईला गेलं,  माईच्या मते फक्त चार ओळींची  एक कविता एका पानावर म्हणजे पान रिकामं दिसण्याचा धोका होता म्हणून माई म्हणाली प्रत्येक कवितेला एक चित्र काढ पण मग प्रिंटींगचा खर्च वाढत होता म्हणून सगळ्या कविताना एकच चित्र काढायचं ठरलं जे सगळ्या मूडना सूट होईल असं , म्हणून समुद्राकाठी खडकावर एकटी बसलेली व्यक्ती मी रेखाटली आणि ती प्रचंड जमून आली 
म्हणजे प्रिया दिदि म्हणाली की अरे हे चित्र नाही ही सुद्धा एक कविताच आहे 
असं सगळं जमून आलेलं असताना रात्री साधारण अकरा वाजता सुषमा तेंडुलकरचा माईला फोन गेला कारण  गोखल्यांचा फोन बंद होता 
माई घाबरली , इतक्या रात्री कुणाचा फोन 
सुषमा म्हणाली महत्वाचं सुचवायचं होतं म्हणून फोन केला 
ती म्हणाली मुखपृष्ठावरची कविता बदलुया 
का? माई चकीत होत म्हणाली 
सुषमा म्हणाली एक मास्टरपीस कविता आहे ज्या कडे आपलं लक्षच गेलं नाही 
कव्हर वर अशी कविता हवी जी सर्वाना अपील होईल, 
माई म्हणाली कुठली कविता ? सगळ्याच कविता छानच आहेत
सुषमा म्हणाली माई लगेच अगदी शेखरची बहीण होऊन बोलू नकोस, मी काय सांगते ऐक, मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा ही शेखरची भूमिका झाली 
पण त्या आधी पुस्तक हातात पडल्या पडल्या वाचकाची एक भूमिका तयार होणं गरजेचं आहे 
आणि मला वाटतं पुसणारं कोणी असेल
                        तर डोळे भरून यायला अर्थ आहे
ही कविता अल्टिमेट आहे, शेवटी साहित्यिकाची मुलगी होती ती, आणि माझ्या बद्दल किती आस्था होती बघा की तिच्या डोक्यात नाही मनात ते घोळत राहिलं  होतं , माईलाही ते पटलं 
तेंव्हा माई विजया बँकेत नोकरी करत होती सकाळी सात साडेसातला ती घर सोडायची , ती घरून निघाली ती सकाळी घरीच आली 
डोळे उघडल्या उघडल्या समोर माई आणि कानावर आलेलं पहिलं वाक्य शक्या आपण मुखपृष्टावरची  कविता बदलूया 
हादारायला होणं म्हणतात तसं झालं 
ती म्हणाली आवर लवकर आपण अत्ताच जाऊन सांगुया नाहीतर नेमकं तो कव्हरचं काम अत्ताच करायला घेईल
दात घासत अंघोळ केली आणि केस पुसत अंगावर कपडे चढवले 
आई दादा तसे उदासीन होते म्हणून त्यानी फार प्रश्न विचारले नाहीत
टेंशन ते नव्हतच , प्रींटर आमचा जरा तिरकस होता तो काय बोलेल ते ऐकावं लागणार होतं आम्ही प्रिंटरलाच प्रकाशक समजत होतो इतकं आमचं अगाध द्न्यान होतं 
आम्ही अगदी नऊ सव्वा नऊलाच त्याच्या प्रेसवर पोहोचलो
आणि कविता बदलायची सांगितलं  आणि गम्मत म्हणजे पुसणारं कोणी असेल तर ... ही कविता त्याने ऐकली आणि आपला तिरकस पणा बाजुला ठेवत त्याने मनापासून मान्य केलं  वा वा आता पुस्तकाला वजन येईल असं तो म्हणाला, त्या दिवशी लंचटाईम नंतर तो कव्हर करायला घेणारच होता 
मग तिथून बाहेर पडे पर्यंत माईच्या बँकेची वेळ टळून गेली 
मग आम्ही तिथेच सन्मान मधे काहीतरी पोटात ढकलायला गेलो तिथे नेमका माईचा चुलत दीर आला 
माईचा नोकरीला जाण्याचा एकूण उत्साह सगळ्याना माहीत होता
तो अगदी उलट तपासणी घ्यायच्या थाटात म्हणाला तू अत्ता इथे कशी ?
माई अगदी सहज म्हणाली लंच टाईम आहे
तो  घड्याळात बघत म्हणाला इतक्या लवकर?
माईकडे उत्तर तयार होतं ती म्हणाली मी आज रिक्वेस्ट करून मागून घेतला
त्यावर त्याने जे तोंड केलं ते मी काय माई काय तो दीर पण विसरला नसेल
लंच टाईम मागून घेतला हे काय उत्तर झालं ? तो गेल्यावर आम्ही खूप हसलो
पण एकूण त्या दिवशी केलेल्या धावपळीचं सार्थक झालं 
                   पुसणारं कोणी असेल तर 
                   डोळे भरून यायला अर्थ आहे
                   कुणाचे डोळे भरणार नसतील तर
                   मरण सुद्धा व्यर्थ आहे
ही कविता मुखपृष्ठावर आली आणि तिने इतिहास घडवला, कित्येकांच्या पत्रामधे हा उल्लेख  आवर्जून असायचा की मुखपृष्ठा वरची कविता वाचली आणि पुस्तक घेऊनच टाकलं , किंवा वाचतच राहिलो...
अगदी ट्रकच्या मागे सुद्धा या ओळी उमटल्या , कित्येक स्मशान भुमींच्या भिंतीवर त्या लिहिल्या गेल्या , किती रंगावली प्रदर्शनात मी माझाचं कव्हर चित्तरलं गेलं तिथे रसीक मोठ्याने या ओळी वाचत असल्याचं मी ऐकलय
आता बाबा नाहीत , सुषमालाही जाऊन आठ वर्ष झाली 
आई , प्रिया दिदि, राजू त्या आधीच गेले
पण मी माझा चा वाढदिवस जवळ आला की हे सगळे आपापली जागा घेऊन परत उभे राहतात आणि मी आठव्णींच्या पसार्‍यात बसून राहतो.

#चंगो

मी माझा ३

आधी दिवस महिने मोजायचो
मग वर्ष मोजायला सुरुवात झाली 
आता मी म्हणतो जाऊ दे!
ती घडून गेलेली बात झाली...खरच या ओळी माझ्याच आहेत आणि माझ्या वयाचं झालं की घडून गेलेल्या भल्या बुऱ्या गोष्टींबाबत आपण असेच उदासीन नाही, निर्विकार होत जातो. गुंतण्याची क्षमता क्षीण होत असावी किंवा आंतरीक वाटचाल मंदावत असावी पण मी माझा चा प्रकाशन सोहळा याला अपवाद आहे .मी माझा हे पहिलं पुस्तक असेल जे छापायचं ठरायच्या आधी त्याची प्रकाशन तारीख नक्की ठरली होती 
अठरा एप्रिल एकोणीस शे नव्वद गुरूवारी मी माझा चं प्रकाशन माई च्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर विजय तेंडुलकरांच्या हस्ते अनिरुद्ध च्या गच्चीवर, साधेपणाने पार पडलं.ओळखीत पाच पन्नास कॉपीज संपतील, कशाला उगाच प्रकाशन सोहळा वगैरे म्हणणारे भोवती होते माझे वडील तर समारंभासाठी गच्चीत ही यायला तयार नव्हते.गच्चीत समारंभ करायचा तर सेक्रेटरी ला रीतसर पत्र द्यावं लागायचं वडील त्या करीता ही तयार नव्हते शेवटी संध्याकाळी मीच वेणू गोपाळ कडे गेलो आणि तोंडी निवेदन दिलं माझे वडील अशा समारंभासाठी तयार नाहीत हे ही सांगितलं पण वेणू गोपाळांनी पुस्तकाचं प्रकाशन म्हंटल्यावर उत्साहात परवानगी देऊन प्रोत्साहन च दिलं आणि पांडू ला गच्ची झाडायची सुचना दिली 
नीला ताई नी पुढाकार घेत सगळी सुत्र हातात घेतली आणि दृष्ट लागेल असा कार्यक्रम झाला.
झाली पस्तीस वर्ष,मी माझा ने इतिहास घडवला पण त्या प्रसिध्दीची झलक मला फेसबुकवर आल्यावर जाणवली तो पर्यंत मला एवढी कल्पना नव्हती.ती होऊन गेलेली बात दिपस्तंभा सारखी ठाम ठळक होत गेली आवळकाठी चघळत रहावी तशी त्याची गोडी वाढतेच आहे.आणि ती गोडी रसीक हो तुम्ही वाढवताय गेली दोन तीन वर्ष अठरा एप्रिल च्या आधी मी माझा, पून्हा मी माझा,माझे शब्द चा खप अचानक वाढतो या वर्षी तर शंभर च्या घरात मी माझा ची मागणी गेली आणि गहिवरून यावं अशी पेहेल संभाजी नगर च्या जयंत चतूर, दीपक भालेकर,वामन मेस्त्री, आणि पुष्कर गडकरी या मुलांनी घेतली.आज फोन करून त्यांनी आमची तारीख घेऊन टाकली.कधीची??
दोन हजार चाळीस बुधवारची.का?तर चाळीस साली 'मी माझा' ला पन्नास वर्ष पूर्ण होतायत.सहा प्रकाशकांनी नाकारलेल्या पुस्तकाचा लेखाजोखा रसीक असा उराशी जपून आहेत मग मी कसा काय या दिवसापासून या घटनेपासून त्या आठवणी पासून अलीप्त राहू शकेन?
चंगो 
(मी माझा १८ एप्रिल १९९०)

मी माझा ५

आज अठरा एप्रिल गुरूवार 
मी माझा प्रकाशित झालं तेव्हा ही अठरा एप्रिल ला गुरुवारच आला होता.
माईच्या वाढदिवसाला मी माझा प्रकाशित करायचं म्हणून खूप मोठी जंग लढावी लागली असं आता वाटतंय.
३४ वर्ष झाली, म्हणून मी माझा ची गोष्ट ३४वर्षांपूर्वी सुरू झाली असं नाही त्या आधी दोन वर्ष जेव्हा मी माई कडे रहात असून तेंडुलकरांकडे जास्त असायचो तिथून आहे.योग असतात तशा गोष्टी घडतात.तेव्हा प्रिया तेंडूलकर रजनी म्हणून फेमस होती.आणि मी तिच्या परिवारातला होतो म्हणून मला जरा वाव होता.तेव्हा दीदी खरच मला हर तर्हेने मदत करायला धडपडायची.तेंव्हा मॉडेल कोआर्डीनेशन हे माझं तग धरून रहायचं मुख्य साधन होतं, खूप पायपीट करावी लागायची हेलपाटे घालावे लागायचे तर वरळी नाका हा माझा तेव्हा चा पाया खालचा एरीया होता कारण बऱ्याचश्या ऍड एजन्सी त्या एरीयात होत्या.मग दिदी चं शुटींग जवळपास असलं तर दिदी मला शुटींग ला जाताना गाडीने तिथे सोडायची, यातायात वाचवायची तर मला भल्या सकाळी दीदी निघायच्या वेळी बद्रीधाम मधे दीदी समोर हजर व्हावं लागायचं आता जाणवतं किती चिडली रागावली तरी दीदी अर्धा पाऊण तास माझी वाट बघत थांबली आहे.तर तेव्हा एकदा माझ्या आयुष्यातील ती अमृत घटीका आली.मी वेळेवर बद्रीधाम मधे पोहोचलो पण दीदीचा मेकअप मन उशीरा आला होता म्हणून दीदीचा मेकअप सुरू होता.सगळं सगळ्याला जोडलेलं असतं फक्त आपल्याला त्याची कल्पना नसते तसं झालं अचानक दीदी ने माझी समोर ठेवलेली बॅग स्वतः कडे खेचून घेतली. तशी ती अधे मधे माझी बॅग चेक करायचीच आई म्हणायची सिगरेट लायटर एखादी पूडी तर बॅगेत नाही ना?हे ती चेक करते कारण राजू फार लवकर स्मोक करायला लागला होता.तिला त्या झडतीत तसं काहीच मिळालं नाही पण अशक्यातली गोष्ट माझी कवितांची बंद वही मिळाली जी मी कधीच कधीच घरा बाहेर काढत नव्हतो.कवितेची वही इतर ठिकाणी थट्टेचा विषय ठरू शकतो पण तेंडुलकरांच्या घरचं वातावरण च वेगळं होतं दूनियाभर चे होतकरू तरुण बाबांना नाहीतर दीदीला त्यांच बाढ दाखवायला घेऊन यायचे आणि दोघांकडे पेशंस दांडगा होता दोघं मन लावून ऐकायचे चर्चा करायचे आई मुळे माझ्या दोन चार कथा बाबां पर्यंत पोहोचल्या होत्या पण माझं स्वतः चं धाडस कधी झालं नाही.त्या दिवशी सुध्दा ती बंद वही कशी बॅगेत बसून तिथपर्यंत आली आश्चर्य आहे 
पण तो योग होता ती घटीका ठरली होती त्या नुसार दीदी ने माझी झोळी उपडी केली आणि माझी बंद वही तिच्या समोर उघडी पडली.आणि माझं नशिब च उघडलं अनेक मार्ग उघडले 
भर दुपारी 
सावली 
वडा खाली 
धावली,

मी बुडताना गाव माझा
ओझरता पाहिला होता 
मला पहायला गाव माझा 
काठावर उभा राहिला होता 

उमलणं आणि फुलणं 
दोघात खूप अंतर आहे 
उमलणं अगदी स्वाभाविक आहे 
फुलणं त्या नंतर आहे 
दीदी एका मागे एक कविता झर झर वाचत गेली.एक इशारा करून तिने मेकअप कधीच थांबवला होता.तिने एक कटाक्ष माझ्या कडे टाकला तो कटाक्ष म्हणजे नव्या पर्वाची नांदी होती 
माझ्याशी बोलायच्या आधी तिने फोन जवळ ओढला आणि माझ्या आठवणी प्रमाणे आठ दहा फोन करून माझ्या कविता ऐकवल्या.लोकप्रभेच्या कार्यालयात ही मी दीदी ने पाठवलेला युवक म्हणून पोहोचलो.नाहीतर अशा साप्ताहिकाच्या कार्यालयात नवोदित कवीला कोण उभं करतंय 
पण मग लोकप्रभेने मला खऱ्या अर्थाने लोकांसमोर आणला 
सातत्याने माझ्या कविता ना लोकप्रभेच्या अंकात दोन दोन तीन तीन पानं दिली.लोकप्रभा मधे कविता वाचून च सीमाताई देव गोखल्यांच घर शोधत विलेपार्ल्याला मला भेटायला आल्या ही माझ्या आयुष्यातील  दखल घ्यायला लावणारी पहिली घटना होती.मग दीदी ने माझी झोळी समोर उपडी केली ही माझा च्या गोष्टी ची सुरुवात धरायची का?
ती सुरुवात धरली तर त्या आधीची ही एक सुरूवात खुणावते आहे.तारीख साल वार काही आठवत नाही पण 
पाण्याचं वागणं 
किती विसंगत 
पोहोणाऱ्याला बुडवून 
प्रेताला ठेवतं तरंगत या ओळी सुचल्या त्या वेळी माझ्या कडे कवितेसाठी वही देखील नव्हती.ओळी चमकून गेल्या आणि मी त्या कशावर तरी उतरवून ठेवल्या 
पण त्याला नजाकत प्राप्त झाली ती माईच्या उस्फुर्त हरखून जाण्याने,तिने कसं आणि किती कौतुक केलं हे तपशीलवार आठवलं तरी मी शब्दात मांडू शकत नाही.मला आधी ही सुचत होतं आणि मी लिहीत ही होतो पण पाण्याचं वागणं मी अधोरेखीत केल्याने चार ओळींची कविता हा साचा तयार झाला
अडकलेला पतंग 
आधी काढायला बघतात 
आणि निघत नाही म्हंटल्यावर 
फाडायला निघतात 

देवळात जाऊन माणसं 
दुकानात गेल्यासारखी वागतात 
चार आठ आणे टाकून 
काही ना काही मागतात 

मरण दाराशी आल्यावर 
मी म्हटलं तुला शंभर वर्षं आयुष्य आहे
मरण ही चाट पडलं म्हणालं
काय हा मनुष्य आहे 
अशा कविता सुचत होत्या आणि माई ने वही आणून दिल्यामुळे त्या एका सोबत एक जमत होत्या.मग ही सुरुवात धरायची तर मला अजून एक सुरूवात ठळकपणे आठवते 
तेंव्हा तर मी साडेतीन चार वर्षांचा होता.ढ मुलगा अशी माझी ओळख अजून ठरायची होती.चित्तरंजन रोड वरच्या जून्या घराच्या रम्य परीसरात मी निर्धास्त बागडत होतो 
आणि अकल्पित एक घटना बघून मी हबकून गेलो.
अंगणात आपली गोजिरवाणी चार पाच पिल्लं घेऊन एक कोंबडी पायाने माती हलवत दाणे टिपण्यात मग्न होती आणि ते मनोहरी दृश्य बघण्यात मी रमलो असताना अचानक एक अघटीत घडलं 
घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिल्लांपाशी असं आपण म्हणतो पण या घारीचं लक्ष या कोंबडीच्या पिल्लांकडे होतं 
ती आली आणि झडप घालून एक पिल्लू तिने आकाशात नेलं 
माझा थरकाप उडाला माझ्या आयुष्यातील पहिला थरार.पण त्याची दखल माझ्या आईनेही घेतली क्षणात मला कडेवर घेत पोटाशी धरत ती म्हणाली हे असच असतं राजूल्या.यालाच जगरहाटी म्हणतात 
त्या क्षणी आईने मला उचलून घेतलं नसतं तर?माझी समजूत काढली नसती तर?माझा कोवळेपणा करपून गेला असता.जिवनातली विसंगती वेचण्याची कला दडपून गेली असती तर मला वाटतं ती खरी सुरुवात आहे 
नव्वद साली माई च्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर ती सुरुवात व्यापक बनली
आता त्या प्रवासातले बरेच जण गहाळ झाले कोणी हयात नाहीत कोणी जवळ नाहीत तर कोणी माझे राहिले नाहीत 
पण अठरा एप्रिल म्हंटलं की हे सगळं आठवतं आठवत राहणार.

#चंगो 
मी माझा चा वाढदिवस

मी माझा ४

मी माझा लोकंप्रिय होत असल्याची पावती तेंव्हा मला किती प्रकाराने मिळत होती, त्याची एक आठवण सांगतो. तेंव्हा आम्ही नुकते गोरेगावला गोकुळधामच्या वसाहतीत डेरेदाखल झालो होतो
भोवती कामगार वस्ती अधीक त्यामुळे हिरवळीत सदाफुलीचं रोप उठून दिसतं तसे आम्ही दोघे दिसत होतो त्यात आम्ही दोघे कायम एकत्र...साधी साखर संपली तरी साखर आणायला जोडीने बाहेर पडायचो.. कोणी आपणहून बोलायला यायचं नाही..पण एकदा वडाळकर नावाच्या इसमाने हिम्मत केली ..तेंव्हा मी एका वर्तमान पत्राच्या पुरवणीत दर रविवारी एक गोष्ट द्यायचो सोबत घरचा नंबर...गोष्ट वाचून खूप फोन यायचे त्यात याने फोन केला नंबरवरून याने ओळखलं याच एरियातला नंबर आहे.. मग त्याने फोनवर बोलून आमची ओळख करून घेतली एका हाँटेल वर तो ड्रायव्हर होता तुकाराम वडाळकर.. शिक्षण नाही अजिबात.. पण मिळेल ते वाचायचा, खूप वाचायचा... पहिल्या भेटीत मी त्याला ’मी माझा’ दिलं
त्याने ते चाळल्या सारखं करून खिषात ठेवलं...चार चार ओळी बघून त्याची थोडी निराषाच झाली असावी..
आणि दोन दिवसानी सकाळी तो आला आणि सांगितलं तर खोटं वाटेल पण असा रांगडा गडी उंबरठ्यात बसून ढसा ढसा रडायला लागला.. आम्ही नवे होतो त्या परिसरात पण तो तिथलाच रहिवासी होता त्यात आमचं घर तळमजल्यावर होतं... आम्ही गोंधळलो..कोणी बघितलं तर काय म्हणेल?.. बरं ! तो ढोंगही करत नव्हता.. त्याचा टाहो अगदी प्रामाणीक होता...
जरा शांत झाल्यावर तो म्हणाला माहीत नाही साहेब पण हे पुस्तक नेल्या पासनं धा दा हे पुस्तक वाचलं आणि असच उमाळा येऊन रडायला येतय बघा....आवरतच नाही.. पुस्तक खिशात नसल तर चुकल्या चुकल्या सारखं होतय बघा... मग आमची ओळख वाढली ,भेटी वाढल्या.एकदा त्याच्या आग्रहाखातर आम्ही त्याच्या अंधार्‍या घरी गेलो, त्यानी एकजात सगळ्याना आमच्या पाया पडायला लावलं...
खरी कमाल त्याने नंतर केली.. त्याला दिलेली प्रत त्याने आळंदीला माऊलींच्या चरणाशी ठेवली.. हे मलाही सुचलं नाही.आणि हे आपणहून तो सांगायलाही आला नाही त्याच्या लेकीने सांगितलं म्हणून कळलं.
आणि खरी कमाल तर पुढेच आहे
एकदा तो हाँटेलची माणसं घेऊन खोपोलीला गेला होता तिथे एका ढाब्यावर त्याने पाहिलं एका ट्रकच्या मागे पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे... ही कविता लिहिलेली होती.. तो हरखून गेला. नक्की त्याला त्यात काय अलौकीक वाटलं कोणजाणे पण तो जाम खुष झाला....खरं तर तिथे तो फक्त त्या लोकांसोबत जेवणापुरता थांबला होता पण तेव्हढ्या वेळात त्याने सगळं जमवून आणलं...
तेंव्हा फोटो काढणं अत्ता सारखं इतकं सोपं नव्हतं जिकरीचंच होतं ...पण तरी त्या ट्रक वाल्याला थांबवून त्याने गावातून फोटोग्राफर आणला आणि त्याचा फोटो काढून घेतला... त्याची प्रत मिळवण्याची तजवीज केली.....कशासाठी हा खटाटोप? ही तळमळ मला खरच उमगत नाही... कधी कधी वाटतं आपण या निर्व्याज प्रेमाला लायकच नाही...
अत्ता अत्ता पर्यंत तो फोटॊ डोळ्यासमोर होता...असेलही नीट ठेवलेला पण सध्या जरा दिसेनासा झालाय....
 तुकाराम वडाळकर सुद्धा दोन वर्षापुर्वी कर्क रोगाने निधन पावला...कित्येक वर्षात आमची गाठ भेट नव्हती तो आजारी असल्याचं कळल्यावर आम्ही भेटायला गेलो होतो पण त्याने भेट नाकारली.. त्याचा मुलगा म्हणाला पप्पानी इथूनच नमस्कार सांगितलाय...संपला संवाद !....... पण  काही माणसं हरवत नाहीत त्यातला तुकाराम वडाळकर होता....आहे...
#चंगो

मी माझा २

अठरा तारखेला मी माझा या माझ्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण होतायत त्या प्रित्यर्थ मी माझाचे काही किस्से

मी माझाचे किस्से सांगतो
त्या दिवसात म्हणजे मी माझा नवा असताना निशिगंधा वाडचा पण एक काव्यसंग्रह येऊ घातला होता त्यासाठी तिने शांताबाई शेळक्यांवर प्रस्तावनेची जबाबदारी टाकली होती.. ठरल्याप्रमाणे शांताबाईनी प्रस्तावना लिहून दिली
निशिगंधाने ती प्रस्तावना वाचली तर तिची पंचायीत झाली.. कारण निशिगंधाच्या काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिताना शांताबाईनी पूर्ण मी माझाचंच कौतूक केलं होतं ... निशिगंधाने नम्रपणे ही गफलत बाईंच्या लक्षात आणून दिल्यावर बाई मनमोकळं हासत म्हणाल्या अगं काय करू, या पुस्तकानी मला झपाटूनच टाकलय.(शांताबाईंकडून मी माझा साठी हे उद्गार म्हणजे मी माझा बहुमानच समजतो)
.हा किस्सा मला स्वत: निशिगंधानेच सांगितला
विजय केंकरे जेंव्हा पु लंचा असा मी असा मी नाट्यस्वरूपात बसवत होता तेंव्हाकाही नव्या कलाकरांच्या निवडीसाठी त्याने मुलाखती ठेवल्या होत्या तेंव्हा एकदोघे महाभाग असे होते की असा मी असा मी ला ते मी माझा समजले.. एकज्ण तर विजयला म्हणाला असा मी असा मी तर माझं तोंडपाठ आहे विजयला आष्चर्य वाटलं असा मी असा मी तोंडपाठ आहे?काही म्हणून दाखव.. तो घडा घडा मी माझा मधल्या कविता म्हणायला लागला...
एक किस्सा तर भारीच आहे. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी पर्यंत मुलगी बघण्याचे कार्यक्रम साग्रसंगीत व्हायचे कांदेपोहे विणकाम भरतकाम या बरोबरीनेच मुली गाणं येतं का विचारणारे कोणीतरी असायचेच तर शैलजा कान्हेरे नावाची मुलगी होती तिने पत्राद्वारे हा किस्सा कळवला
तिला दाखवण्याचा कार्यक्रम झाला तेंव्हा तिला गाण्यासाठी विचारलं गेलं ती उत्साहात म्हणाली मला गाता येत नाही पण मी तुम्हाला काही कविता म्हणून दाखवते..
आणि तिने मी माझाचं पारायण सुरू केलं सगळ्यानी एंजाय केलं...
दोनच दिवसा नंतर तो मुलगा एका पुस्तक प्रदर्शनाला गेला तिथे त्याला मी माझा सापडलं ... त्याने होकार कळवताना मी माझाची मदत घेतली.."हो"'असं मोठ्या अक्षरात मी माझाच्या पहिल्या पानावर लिहून प्रत तिच्या घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था केली...किती छान नाsss..
गेल्या पंचवीस वर्षात असे कितीतरी किस्से जमा होत गेलेत...

#चंगो

मी माझा

#मीमाझा
सहा प्रकाशकानी नाकारलेलं माझं कवितांच बाड
या दिवशी पुस्तक रूपाने प्रकाशित झालं 
आजी सोनियाचा दिनू म्हणावा तसाच तो दिवस होता अठरा अेप्रील अेकोणीसशे नव्वद, गुरूवार होता 
बाबांच्या शुभहस्ते प्रकाशन झालं होतं
बाबा पुस्तकाला प्रस्तावनाही द्यायला तयार होते 
मिच अगाअूपणा केला प्रस्तावना नको म्हणालो 
कुणाचा राग कुणावर काढला 
तेंव्हा बाबानी कलती मान करत अुंचावलेल्या भुवया अजून आठवतात ,बाबा म्हणजे 'विजय तेंडुलकर '
आठवताना काही 
वगळून चालत नाही 
आणि सांगताना  सगळं
अुगाळून चालत नाही 
असं मिच म्हणालो असलो तरी अठरा अेप्रील म्हंटलं की माझा सगळा दिवस अुगाळण्यातच जातो 
३० वर्षां पूर्वीचा हा दिवस मी पून्हा अुद्या चोवीस तास जगेन
डोळ्या समोर सगळं लख्ख आहे 
आणि जवळ तेंव्हाचं कोणी नाही 
असा विरोधाभास आहे 
'विरोधाभास 'हा गोखल्यांच्या कवितेचा स्थायीभाव  आहे असं समिक्षक तेंव्हा म्हणायचे
जे त्याना तेंव्हा जाणवलं ते मला अत्ता जाणवतय 
तसही सगळं मला अुशीराच समजतं 
काही काही गोष्टी तर समजतच नाहीत 
म्हणूनच असेल...
माझ्याकडे प्रश्नाचं अुत्तर नसतं 
तेंव्हा मी फक्त हसतो 
पण त्या मुळे कायम 
मी हसतानाच दिसतो 
ही माझी व्यथा नाही 'मी माझ्या'ची कथा आहे.
#चंगो

Thursday, April 16, 2026

पीडित पुरुषांसाठी संघटना हवी

पीडित पुरुषां साठी  महाराष्ट्रात संघटना हवी!

आज काल लग्न झाल्यावर बायका नवऱ्या सोबत संसार करायचा नसेल तर त्याच्या वर त्याच्या कुटूंबावर केस करतात काही बायका तर खोट्या केस करून आई वडिलां सोबत न राहता नवीन जोडीदार शोधतात लग्न न करता living relationship मध्ये राहतात आणि स्वतः आई असल्यामुळे मुलां ना सुद्धा जोडीदारा पासून लांब करतात!

#मनमुक्ता

Wednesday, April 15, 2026

श्रावणबाळ

शर आला तो, धावुनी आला काळ
विव्हळला श्रावणबाळ
'हा ! आई गे !' , दीर्घ फोडूनी हांक
तो पडला जाऊन झोंक
ये राजाच्या श्रवणी करुणावाणी
हृदयाचे झाले पाणी.
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवें आणुनी नयनी
तो वदला, 'हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा' !

मग कळवळूनी, नृपास बोले बाळ.
'कशी तुम्ही साधीली वेळ'
मम म्हातारे मायबाप तान्हेले
तरुखाली असती बसले.
कावड त्यांची, घेउन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला.
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे, तो तुमचा शर आला
या उरांत रुतुनी बसला.

मी एकुलता, पुत्र, कसा हा घाला
मजवरती अवचित आला !
त्यां वृद्धपणी, मीच एक आधार
सेवेस अतां मुकणार
जा, बघतील ते, वाट पांखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही,
दुर्वार्ता फोडुं नका ही,
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी, करा तुम्ही सांभाळ
होउनियां श्रावणबाळ.

परि झांकुनी हे, सत्य कसे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
ते येतील माझ्यामागे,
"घ्या झारी... मी जातो..." त्याचा बोल
लागला जावया खोल.
सोडीला श्वास शेवटला,
तो जीव विहग फडफडला,
तनु-पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा, रडला धायीं धायीं
अडखळला ठायीं ठायीं.


— ग. ह. पाटील

Monday, April 13, 2026

आशा ..

दिल है छोटा सा
छोटी सी 'आशा'
​सात सुरों के आंगन में, 
यही नाम तो था 
प्यारा सा।

कभी चंचलता
कभी सादगी 
वो चेहरा मानो 
नाज़ुक फूलों का
पाला था

वो नन्हीं जान 
बड़ा हौसला 
लेकर चली थी 
हथेली पर 
बालिवुड के इस 
महाकुंभ ने
उसको झट 
पहचाना था

​वो "झुमका गिरा रे 
बरेली के बाज़ार में"
की खनक निराली,
उस "दम मारो दम" की 
मस्ती दुनियाभर ने
खूब सराही थी

कैबरे डिस्को 
ठुमरी दादरा 
हर रंग में खुद को 
ढाला था
"पिया तू अब तो आजा" 
कह कर, 
हर महफ़िल को 
खूब संभाला था

​कभी "इन आँखों की 
मस्ती के" मस्ताने 
हज़ारों देखे थे 
तो कभी "दिल 
चीज़ क्या है" में, 
वफ़ाओं के क्या खूब 
नज़ारे बोए थे 

जब "चुरा लिया है 
तुमने जो दिल को" 
गुनगुनाया था,
हर जवां दिल को
धड़कना जैसे, 
उस गीत ने ही 
तो सिखाया था।

​वो "परदे में रहने दो"
का अंदाज़ अब 
कहीं खो गया,
"रात अकेली है" 
गाते-गाते, जैसे 
सूरज सो गया।

"दो लफ्जों की है
दिल की कहानी" 
कह कर वो 
चुप हो गईं,
न जाने कितनी 
अनकही बातें,
वक्त के गर्त में 
खो गई।

बर्मन दा की 
धुनों पर जब जब 
इस आवाज़ ने 
सुर की चादर 
तानी थी
बन गई हर प्रेमी के 
दिल की, वो अमर 
प्रेम कहानी थी

"मेरा कुछ सामान" 
मांगती वो आवाज़, 
न जाने क्यों अचानक 
खामोश हो गई,
संगीत की दुनिया की 
छोटी सी 'आशा'
शायद मां की गोद में 
जाकर सो गई....
स्त्रीrang - सुजाता #RIPLegend #PadamShree #guinessbookofworldrecords 
#ashabhosle #merakuchsaman #emotions #April2026 #sahityatak #azeebdastanhaiyeh Akb #Song #dolfzonkihaidilkikahani #hindipoet

आठवण

बेवारस, बापाचं नाव माहीत नाही अशा लक्ष्यासाठी लहानपणी आई मधु कांबीकर अंगाई म्हणते. ती चित्रपटाच्या शेवटी दुःखाच्या क्षणी पुन्हा दोन कडव्यांनी मी बांधली. एकूण तेरा दिवस बॉम्बे स्टुडिओमध्ये आम्ही रेकॉर्डिंग केलं. आशाताईंचं दररोज येणं. दहा ते पाच. माझी सगळ्यात अधिक गाणी आशाताईंनी आणि रवींद्र साठेंनी गायलेली आहेत.

तिकडे दूर काचेच्या स्टुडिओत आशाताई गाताहेत. आम्ही सांगता येत नाही इतके आनंदी. रेकॉर्डिंगच्या घरात शेवटच्या दोन ओळी थांबल्या. आता रिटेक नाही, असे म्हणतानाच हे काय ? आम्ही ताईंकडे गेलो. डोळ्यांत अश्रू. म्हणाल्या, 'कवी इतकं इतकं छान दुःखाचं गाणं लिहायचं नसतं.'
**************************
मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला

मी दुःखाच्या बांधून पदरी गाठी
जपले तुज ओटीपोटी

आयुष्याला नको काजळी काळी
ईश्वरा तूच सांभाळी

झुलता झोका जावो आकाशाला
धरतीच्या टिळा भाळाला.

**************************

Fb page : ना.धों.महानोर 

आठवण

आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकूणच मंगेशकर कुटुंबाशी दुर्गमहर्षी गो.नी.दाण्डेकरांचे अतिशय स्नेहाचे नाते होते. गोनीदांनी आशाताईंविषयी आणि आशाताईंनी त्यांच्याविषयी फार सुंदर लेखन केलेलं आहे. 'आप्पांनी मला जाणलं होतं' या वडीलकीच्या भावनेनं आशाताई गोनीदांविषयी भारावून, कृतज्ञतेने सांगत राहतात. त्यांच्या पहिल्या भेटीविषयी त्या 'निरपेक्ष स्नेही' या गोनीदांवरील लेखात लिहितात, 

आमच्या मीनाताईच्या लग्नात आप्पांची-माझी पहिली भेट झाली. तसे आप्पा बाळ- म्हणजे हृदयनाथकडं यायचे. पण त्यांना लांबूनच बघायची मी. त्यांच्याशी बोलले नव्हते कधी. मग एक दिवस मी हृदयनाथला विचारलं,
 "बाळ, कोण रे ते?"
त्यावर तो म्हणाला,
 "आप्पा दांडेकर..."
 "ज्यांची कादंबरी मी वाचते आहे, तेच का हे?"
तर त्यानं 'हो' असं सांगितलं.

तर मीनाताईचा रुखवत बघण्यासाठी मी जयप्रभा स्टुडिओच्या ऑफिसात गेले होते. तिथे आप्पा बसले होते. मग माझी ओळख मीच करून दिली. त्यांना म्हटलं,
 "माझं नाव आशा भोसले. मला तुमचं लिखाण फार आवडतं."
त्यांनी नमस्कार केला आणि ते हसले.
 त्यांच्या हसण्याची एक विशिष्ट पद्धत होती. उंच हसायचे. प्रसन्न वाटायचं. मी त्यांना म्हणाले,
 "तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मला सांगा, 'कुणा एकाची भ्रमणगाथा'मधली यशोदा खरी, की खोटी? ती आहे का अजून?"
आप्पा पुन्हा एकदा त्यांच्या पद्धतीनं जोरात हसले. 
ही आमची पहिली ओळख.
 - आशा भोसले.

गोनीदा आशाताईंबद्दल लिहितात - 
"ती ज्वालामुखीसारखी आहे. वर हिरवळ बहरलेली. आंत असह आग. दिसतं, ऐकूं येतं, तें काही तिचं खरं रूप नव्हे. तिच्या हलक्या फुलक्या गीतांवरून कुणी तिची परीक्षा करू नये. 

...ही अशी मनस्वी उदार, अतिशय सरळ स्वभावाची, मनीं उभं राहिलं, तें कुणाच्याही विरोधाला न जुमानता करून टाकणारी, बहुधा नेहमीच कशात तरी हरवलेली. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी, सुखानं सुखी--
   परवा मला म्हणाली,
   "आप्पा, हें काही खरं नाही. पत्रांत धडपणी सगळं लिहितां येत नाहीं. लिहायला बसावं, तर मनांत असलेलं मागंच रेंगाळतं."
   "आता त्याला उपाय काय?"
   "दोन टेपरेकॉर्डर ठेवायचे. एक तळेगांवी. जें मनांत आलं, ते सगळं इथं बोलायचं. टेप तळेगांवी धाडायचा. मग तुम्ही तिथं बोलायचं. ती इथं आणून वाजवायची."
   या वेड्या मुलीचं कांहीं सांगता येत नाही.
   एखादे दिवशी गाडी घेऊन तळेगांवी यायची. म्हणायची,
  "टेपरेकॉर्डर आणलाय्, आप्पा!"
   म्हणजे मधुकऱ्याला भेट दिलेला हत्ती!

 - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर. ('मर्मबन्धांतली ठेव')

गीत आणि प्रतिक्रिया

गीत @ https://youtu.be/615uBOyQ7lE?si=pEdjHcIQ3eBnQ-uF



आपली ओळख नाही. फेसबुक मैत्रीही नाही. पण हे भावगीत एवढे आवडले की प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवले नाही.
हे भावगीत वाचताना मनाला एक विलक्षण शांतता आणि तृप्तीचा अनुभव येतो. मंजिरी जोशी यांच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द केवळ कविता नसून एका समाधानी मनाचा आरसा आहेत.
या गीतावर आधारित माझी काही मते आणि प्रतिक्रिया:
१. शब्दांतील मौन आणि भावपूर्णता
कवितेची सुरुवातच खूप प्रभावी आहे. "तुझी भेट होता मुके शब्द झाले" या ओळीतून भेटीचा तो क्षण शब्दांच्या पलीकडचा असल्याचे जाणवते. जेव्हा मन पूर्णपणे भरून येते, तेव्हा शब्द अपुरे पडतात, हे सत्य लेखिकेने अतिशय हळुवारपणे मांडले आहे.
२. निसर्ग आणि भावनांचा सुरेख संगम
नभाची ओढ, सांजवेळ आणि धरणीची 'अबोली भाषा' या प्रतिमांचा वापर करून मानवी भावनांना निसर्गाशी जोडले आहे. "मुकी वेळ ती तार छेडून गेली" ही ओळ मनातील सुप्त तारा कशा छेडल्या गेल्या, याचे सुंदर चित्रण करते.
३. कृतार्थतेचा परमोच्च बिंदू
शेवटच्या कडव्यातील ओळी मनाला स्पर्श करून जातात:
मिळाले मला सर्व जे जे हवे ते
सौख्यातुनी चांदणे मोहरले
आयुष्यात जे हवे होते ते सर्व मिळाल्याचा जो कृतार्थ भाव (Sense of Fulfillment) आहे, तो या ओळींतून स्पष्टपणे जाणवतो. सुखाची तुलना 'मोहरलेल्या चांदण्याशी' करणे हे अत्यंत कल्पक आणि सकारात्मक आहे.
थोडक्यात सांगायचे तर...
हे गीत म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून, आयुष्यातील एका तृप्त वळणाचे सादरीकरण आहे. मंजिरी जोशी, तुमच्या शब्दांतील ही प्रसन्नता आणि गांभीर्य वाचकाला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते.
तुमच्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा!
#अभिप्राय #मराठीसाहित्य #भावगीत #तृप्ती

https://www.facebook.com/suresh.kulkarni.1426

Saturday, April 11, 2026

Friday, April 10, 2026

आई

आई

पहाटेचा पारिजात तशी माझी आई, 
घरदार आनंदाने दरवळत राही !

ज्ञानेशाची गोड ओवी तशी माझी आई, 
गोडी आईच्या पान्ह्याची अमृताला नाही !

चंदनाचा देह डोळा तेवते समई, 
कष्ट करिते अपार कधी कष्टी नाही !

पाहताच आई बालपण जागे होई, 
वेदमंत्राहून थोर भाबडी अंगाई !

कोटी कोटी देवाहून थोर एक आई, 
म्हणून का विठ्ठलाला म्हणती विठाई !

जयचंद्र ल. गुरव

बालभारतीच्या कविता १

बाप

शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप

लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पायी
त्यानं काय केलं पाप ?

माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा

कष्ट सारे त्याच्या हाती
दुसऱ्याच्या हाती माप

बाप फोडतो लाकडं
माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची
काय चव सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो
जग करी हापाहाप !

कवी : इंद्रजीत भालेराव


गीत ७

ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे

आहटों से दिल की बेचैनी मेरे बढ़ने लगी
ऐक आभास मला थोडा तरी अंदाज दे

येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे
ये खुदा मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे

गंध दे मजला फुलांचा, हसने निर्व्याज दे
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे

लज्जत-ए-गम के सिवा,
तूने मुझे सब कुछ दिया
वेदनेने बहरलेली एक सुंदर सांज दे

येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे
ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे

इलाही जामदार

जीवन त्यांना कळले हो गीत ६

जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे हो‍उनि जीवन
स्‍नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन्‌ दीनांवर
घन हो‍ऊनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित हो‍ऊन जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन्‌ परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो
आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव
ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
उरींच ज्यां आढळले हो
जीवन त्यांना कळले हो
बा. भ. बोरकर

गीत ५

कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा

@eaksharman

परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव,
जणू की पुंडलिकाचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा

ग. दि. माडगूळकर (गदिमा)

गीत ४

कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा

@eaksharman

परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव,
जणू की पुंडलिकाचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा

ग. दि. माडगूळकर (गदिमा)

गीत ३

आळविते मी तुला, विठ्ठला
 देहमनाला व्यापुनि उरला तव चरणांचा लळा

रोज पहाटे नयनांपुढती 
तुझी प्रगटते श्यामल मूर्ती 
मनभावांच्या निर्मळ ज्योती घेते आरतीला

उपासनेची उटी लाविते 
शुभनामांची माळ गुंफिते
निर्मोहाचा रेखुन घेते तिलक तुझ्या भाळा

प्रेमघना रे, कधि तू येशिल? 
मम जीवन-वन फुलवुन जाशिल 
रात्रंदिन मी हा मधुमंगल ध्यास मनी धरिला

संजीवनी मराठे 

गीत २

सांज ये गोकुळी, सावळी सावळी

सांज ये गोकुळी, सावळी सावळी सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणू सावली सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणू सावली

सांज ये गोकुळी, सावळी सावळी

धूळ उडवित गाई निघाल्या धूळ उडवित गाई निघाल्या शाम रंगात वाटा बुडाल्या शाम रंगात वाटा बुडाल्या परतती त्यासवे, पाखरांचे थवे परतती त्यासवे, पाखरांचे थवे पैल घंटा घूमे राऊळी

सांज ये गोकुळी, सावळी सावळी

पर्वतांची दिसे दूर रांग पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची जणू दाट रेघ काजळाची जणू दाट रेघ होई डोहातले चांदणे सावळे होई डोहातले चांदणे सावळे भोवती सावळ्या चाहूली

सांज ये गोकुळी, सावळी सावळी

सांज ये गोकुळी, सावळी सावळी

माऊली सांज, अंधार पान्हा विश्व सारे जणू होय कान्हा माऊली सांज, अंधार पान्हा विश्व सारे जणू होय कान्हा मंद वाऱ्यावरी वाहते बासरी मंद वाऱ्यावरी वाहते बासरी अमृताच्या जणू ओंजळी सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणू सावली

सांज ये गोकुळी, सावळी सावळी

गीत : सांज ये गोकुळी गीतकारः सुधीर मोघे

गीत १

असे दूर जाणे ,
तुझे सोसवेना 
मला एकट्याला ,
जिणे कंठवेना ...

जिथे जाय दृष्टी 
तिथे तू दिसावे 
तुझ्यापास मी अन् 
मला मी दिसेना ......
जरी दृष्टीने मी
 पितो पावसाळा 
तरी आत सारा
 उन्हाळा उन्हाळा 
थिजे सर्व संवेदनांचा हिवाळा
ऋतूंचे असे वागणे साहवेना !!१!!

असे एवढे दूर जाताही येते ?
असे एवढे शुष्क होताही येते ?
असे पार सारे 
विसरताही येते ?
तुला जे जमे ते
 मला का जमेना ? !!२!!

कवी - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी 
गायक - शुभंकर कुलकर्णी

hindi post 10

मुमकिन है सफ़र हो आसाँ 
अब साथ भी चल कर देखें
 कुछ तुम भी बदल कर देखो
 कुछ हम भी बदल कर देखें

निदा फ़ाज़ली

काव्यधारा

@eaksharman

hindi post 9

संत दूसरों को दुःख से बचाने के लिए
कष्ट सहते रहते हैं, 
दुष्ट लोग दूसरों को दुःख में डालने के लिए।

महर्षि वाल्मीकि

#eaksharman

hindi post 7

लोग क्या कहेंगे

पहले दिन हसेंगे, दूसरे दिन मजाक उड़ाएंगे, और तीसरे दिन भूल जाएंगे, इसलिए लोगो की परवाह मत करो, करो वो जो उचित हो, जो तुम चाहते हो, जिसमें तुम खुश हो, याद रखना जिंदगी तुम्हारी है, लोगो की नहीं...

अनामिक

#eaksharman

हिंदी काव्य २

पिता

कभी अभिमान तो कभी स्वाभिमान हैं पिता
कभी धरती तो कभी आसमान हैं पिता

जन्म दिया हैं अगर माँ ने
जानेगा जिससे जग वो पहचान हैं पिता

कभी कंधे पे बिठा के मेला दिखाता हैं पिता
कभी बनके घोड़ा घूमाता हैं पिता

माँ अगर पैरों पर चलना सिखाती हैं 
पैरों पर खड़ा होना सिखाता हैं पिता...

अनामिक

हिंदी काव्य १

धूप में निकलो घटाओं में नहा कर देखो
ज़िंदगी क्या है किताबों को हटा कर देखो

सिर्फ़ आँखों से ही दुनिया नहीं देखी जाती
दिल की धड़कन को भी बीनाई बना कर देखो

पत्थरों में भी ज़बाँ होती है दिल होते हैं
अपने घर के दर-ओ-दीवार सजा कर देखो

वो सितारा है चमकने दो यूँही आँखों में
क्या ज़रूरी है उसे जिस्म बना कर देखो

फ़ासला नज़रों का धोका भी तो हो सकता है
वो मिले या न मिले हाथ बढ़ा कर देखो
               
                Nida Fazli
                

काव्य ९

येहेरीत दोन मोटा 
दोन्हीमधी पाणी एक 
आडोयाले कना, चाक 
दोन्ही मध्ये गती एक 

दोन्ही नाडा समदुर 
 दोन्हीमधी झीज एक
दोन्ही बैलांचं ओढणं 
दोन्हीमधी ओढ एक

उतरणी चढणीचे 
नाव दोन धाव एक 
मोट हाकलतो एक 
जीव पोसतो कितीक 

बहिणाई चौधरी

काव्य ८

मरगळलेले शब्द नसावे 
सळसळणारे गीत असो 
नफ़ा फ़ायदा सोडून देऊन 
कळवळणारी प्रीत असो

विलक्षणावर प्रेम असावे 
ऐरे गैरे साथ नसो 
जिवंत उत्साहात मरावे 
कोमेजून शंभरी नको

सदा सजन आकाश दिसावे 
पंखावर काजळी नको 
भुषण येवो दूषण येवो 
मार्गावर कुंपणे नको

जाईन आज किंवा मी उद्या 
उरेल ना काही माघारी 
पण जे जगलो क्षणभर 
त्याचा किंचित पश्चात्ताप नको

नाम

काव्य ७

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा

बा.सी.मर्ढेकर

काव्य ६

विझलो आज जरी मी
हा माझा अंत नाही
पेटेन उद्या नव्याने
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे
पुन्हा उडेन मी
अडवू शकेल मला
अजून अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे
केलेत कैक कावे
जळेल झोपडी अशी
आग ती ज्वलंत नाही

रोखण्यास वाट माझी
वादळे होती आतूर
डोळ्यांत जरी गेली धूळ
थांबण्यास उसंत नाही

येतील वादळे
खेटेल तुफान
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे
पावलांना पसंत नाही

सुरेश भट

काव्य ५

सुख वेचिन म्हणण्या आधी
 घन दुःखाचा गहिवरतो 
अन दुःख सावरु जाता 
कवडसा सुखाचा येतो 
या ऊन सावली संगे 
रमण्यात ही मौज म्हणूनी
मी हसून हल्ली माझ्या 
जगण्याला श्रावण म्हणतो 
"श्रावण"

गुरू ठाकूर 

काव्य ४ निळा


जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा 
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग 
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग

बा. भ. बोरकर

#eaksharman

काव्य २ वाट

दिवसेंदिवस..
जगण्याची वाट चिंचोळी होत चालली आहे
वाटतं मागनं कोणी येऊ नये
आणि आपल्या पुढे कोणी असू नये
सांभाळलेलं बोचकं भिरकावलं तर
ते वेचायलाही कोणी जाऊ नये
कोणाची चाहूल नको
कोणाची हाक नको
मला ओळखणारं कॊणी नको
मलाही माझी ओळख नको
जायची घाई नाही
थांबायची हौस नाही
आणि त्या वाटेवरून जाताना
चालायची गरज नाही
#चंगो

काव्य १ एका तळ्यात होती बदकें पिलें सुरेख

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ?
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

ग. दि. माडगूळकर

#eaksharman




काव्य १० केले कुणास्तव ते किती,हे कधी मोजू नये

केले कुणास्तव ते किती,
हे कधी मोजू नये;

होणार त्याची विस्मृती;
त्याला तयारी पाहिजे.

डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे.

सत्यास साक्षी ठेवुनी वागेल तो,
बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही !
त्याला तयारी पाहिजे.

@eaksharman

पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे

विंदा करंदीकर

काव्य १२ चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे



चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे ;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे .

मी चालतो अखंड चालायचे म्हणून ;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे .

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे ;
हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे .

मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा ;
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे .
@eaksharman
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे ,
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे .

आशा तशी निराशा , हे श्रेय सावधांचे ;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे..

विंदा करंदीकर

काव्य ११ देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे

देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

@eaksharman

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे !

विंदा करंदीकर

काव्य ७ माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्याकपारीमधुनी घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्याफणसांची रास
फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास

माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा

माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा
@eaksharman
माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीण फुले भोळाभाबडा शालीन भाव शब्दावीण बोले

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे
भात वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात

माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती, निळे पाणी
खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी

बा. भ. बोरकर

काव्य ८ एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा

निळा

एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा,
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा,
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा,
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा...

@eaksharman
असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे :
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा :
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग :
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग.

बा. भ. बोरकर

काव्य २ इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी 
लागली समाधी, ज्ञानेशाची


ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव 
नाचती वैष्णव, मागेपुढे


मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड 
अंगणात झाड कैवल्याचे


@eaksharman

उजेडी राहिले उजेड होऊन 
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई


ग. दि. माडगूळकर


काव्य ९ निळा पक्षी

काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.

प्रकाशाचे
पंख सान;
निळी चोच
निळी मान;
निळे डोळे
निळे गान;
निळी चाल
निळा ढंग;
त्याने चढे
आकाशाला
निळा रंग.
@eaksharman

असली ही
जात न्यारी
बसे माझ्या
निंबावरी;
पृथ्वीमध्ये
पाळे खोल;
तरीसुद्धा
जाई तोल;
...अनंताचा
खड्डा खोल.

तर्काच्या या
गोफणीने
फेकितसे
काही जड;
आणि पाने
आघाताने
करतात
तडफड;
टिकाळीला
निळा पक्षी
जसा धड
तसा धड;
...उंच जागा
अवघड.

याचे गान
याचे गान
अमृताची
जणू सुई;
पांघरूण
घेतो जाड,
तरी टोचे;
झोप नाही
जागविते
मेलेल्याला;
जागृतांना
करी घाई.

याचे गान
याचे गान
स्वरालाच
नुरे भान.
नाही तार
नाही मंद्र;
...चोचीमध्ये
धरी चंद्र.

काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.


विंदा करंदीकर

निळा पक्षी

काव्य ६ देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे ।

देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे ॥

तेच डोळे देखणे, जे कोंडीती साऱ्या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा ॥

देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे।
आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे ॥

देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे ॥
@eaksharman

देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा, स्वस्तिपद्म रेखिती ॥

देखणे ते स्कंध ज्या ये, सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां, निश्चये पाळावया ॥

देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके ।
चांदणे ज्यातुन वाहे, शुभ्र पाऱ्यासारखे ॥

देखणा देहान्त तो, जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो, रात्रगर्भी वारसा ॥

बा. भ. बोरकर

काव्य ५ अर्थेविण पाठांतर कासया करावें

अर्थेविण पाठांतर कासया करावें । 
व्यर्थचि मरावें घोकूनियां ।। 

घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । 
अर्थरूप राहे होऊनियां ।। 

@eaksharman

तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी । 
नाहीं तरी गोष्टी बोलों नका ।।

संत तुकाराम
#eaksharman

काव्य ४ छोटेसे बहीणभाऊ

छोटेसे बहीणभाऊ 
उद्याला मोठाले होऊ 
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला 
नवीन आकार देऊ

ओसाड उजाड जागा
होतील सुंदर बागा 
शेतांना, मळ्यांना, फुलांना, 
फळांना नवीन बहार देऊ

@eaksharman

मोकळ्या आभाळी जाऊ 
मोकळ्या गळ्याने गाऊ 
निर्मळ मनाने, आनंदभराने 
आनंद देऊ अन् घेऊ

प्रेमाने एकत्र राहू 
नवीन जीवन पाहू 
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे 
अनेक एकच होऊ

वसंत बापट
#eaksharman

 

Tuesday, April 7, 2026

गोष्ट १

इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञाना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली,
शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते
व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!
यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे.
त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो ! 
हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले.
जगाने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले पण भारतात आजही त्यांचा फोटो पाहील्यावर कित्येक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही शोकांतिका आहे.!!
#fbpost #share

Wednesday, April 1, 2026

काव्यरंग शाळा

आठवते मला ती शाळा,
आठवतो तो फळा,

आठवते शाळेत
जाण्यासाठी होणारी घाई,

उशिरा आल्यावर
ओरडणाऱ्या बाई,

आठवतात अपूर्ण अभ्यासामुळे
दिलेले ते रट्टे,

शाळेतले ते कट्टे .....

आठवते मधल्या सुट्टीची ती बेल,

खेळून कसा जायचा तो वेळ,

आठवतो तो मधल्या सुट्टी नंतरचा आळस,

अभ्यासाचा वाटणारा तो कळस,

आठवते ती घरी जाण्याची घाई,

आपली घरी वाट
पाहणारी ती आई...

अनामिक

काव्य ३ चारोळ्या


माझी गोष्ट नेहमीची...
तुम्हाला साधी सुद्धा वाटेल
कारण जे तुम्हाला ऐकायचय
सांगताना तेच माझ्या हातनं सुटेल

सुखी माणसाच्या मनात कायम
दू:ख गाठेल ही भीती
मग मला सांगा जगामध्ये
सुखी माणसं किती? 

आभाळभर पाखरं
आणि मुठभर दाणे
आता कुणाला अधिक
तर कुणाला उणे.....

@eaksharman
सरायला आलेल्या रात्रीचं 
वर्णन काय करू?
चंद्र तारे इतक्या जवळ
की कळेना कोणता तारा धरू?

सरायला आलेल्या रात्रीचं 
वर्णन काय करू?
चंद्र तारे इतक्या जवळ
की कळेना कोणता तारा धरू?

#चंगो