Sunday, May 24, 2026
Thursday, May 21, 2026
गूढ कथा
पावसाळ्याची रात्र होती. कोकण मधल्या “भोरवाडी” गावावर काळे ढग दाटून आले होते. गावात वीज नव्हती. फक्त अधूनमधून चमकणारी वीज आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज.
गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता — “देशमुखांचा वाडा”. त्या वाड्याबद्दल गावात अनेक कथा सांगितल्या जायच्या. म्हणे, तिथे रात्री दिवा दिसतो… पण वाड्यात कोणी राहत नाही.
त्या गावात गणू नावाचा एक तरुण राहत होता. शहरातून शिक्षण करून तो नुकताच गावात परतला होता. गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेवर त्याचा विश्वास नव्हता.
एके रात्री चहाच्या टपरीवर चर्चा रंगली होती.
“गण्या, रात्री बारा नंतर त्या वाड्याकडं जाऊ नकोस,” म्हातारा तात्या कुजबुजला.
“का? भूत आहे का तिथं?” गणू हसत म्हणाला.
तात्याच्या डोळ्यांत अचानक भीती उतरली.
“भूत नाही रे… पण काहीतरी आहे.”
त्या रात्री गणूने ठरवलं — सत्य शोधायचंच.
हातात कंदील घेऊन तो वाड्याकडे निघाला. पाऊस रिमझिम कोसळत होता. वाड्याचं मोठं लाकडी दार अर्धवट उघडं होतं. आत काळोख.
गणूने पाऊल टाकलं.
कर्कश्श आवाज करत दार मागून बंद झालं.
क्षणभर त्याचा श्वास अडकला.
वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत असल्याचा आवाज येत होता… टक… टक… टक…
गणूने कंदील वर केला.
भिंतीवर जुन्या चित्रांवर धूळ साचली होती. अचानक एका चित्रातील स्त्रीचे डोळे चमकले असे त्याला वाटले.
तो घाबरला. पण पुढे गेला.
वरच्या खोलीत मंद दिवा पेटलेला होता.
आत एक जुनी झुलती खुर्ची हळूहळू हालत होती…
पण तिथे कोणीच नव्हतं.
अचानक मागून आवाज आला —
“इतक्या वर्षांनी कोणी आलं…”
गणूने मागे वळून पाहिलं.
पांढऱ्या साडीत एक वृद्ध स्त्री उभी होती. चेहरा फिकट. डोळ्यांत विचित्र शांतता.
“तुम्ही… कोण?” गणूचा आवाज थरथरला.
ती हसली.
“मी या वाड्याची शेवटची मालकीण.”
गणू काही बोलणार इतक्यात वीज चमकली…
आणि त्या क्षणी त्याला दिसलं —
ती स्त्री जमिनीवर उभीच नव्हती.
ती हवेत तरंगत होती.
गणूच्या हातातून कंदील खाली पडला.
संपूर्ण खोली अंधारात बुडाली.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी…
गावकऱ्यांना गणू वाड्याबाहेर बेशुद्ध अवस्थेत सापडला.
तो जिवंत होता.
पण त्या दिवसानंतर त्याने कधीच “देशमुखांच्या वाड्या”बद्दल एक शब्दही काढला नाही.
फक्त कधी कधी रात्री तो झोपेत घाबरून ओरडायचा —
“ती अजून तिथंच आहे…”
@ eaksharman
समिक्षा लेखन
ही कविता केवळ निसर्गचित्र रंगवत नाही, तर मानवी मनाच्या अतिशय सूक्ष्म आणि आध्यात्मिक प्रवासाला शब्दरूप देते. Ramdas Khare यांच्या “प्रकाश पाझरत जावा” या कवितेत वैराग्य, वेदना, करुणा आणि अमूर्ततेकडे जाणारी अंतर्मनाची ओढ अत्यंत चित्रमय पद्धतीने व्यक्त झाली आहे.
कवितेच्या सुरुवातीलाच “वैराग्याचे पलिते” आणि “क्षितिजावर पेटलेले” या प्रतिमा मनाला गूढ शांततेच्या प्रदेशात घेऊन जातात. येथे क्षितिज हे केवळ निसर्गाचे दृश्य राहत नाही, तर जीवनाच्या शेवटच्या टप्प्याचे, आत्मशोधाचे प्रतीक बनते. लाटांवर उमटणारे नभाचे रंग जीवनातील बदलत्या भावनांचे प्रतीक वाटतात.
“ही निःशब्द शांतता कॅनव्हासमधून पाझरणारी” ही ओळ विशेष प्रभावी आहे. कवीने येथे चित्रकलेचा संदर्भ वापरून भावविश्व उभे केले आहे. शांतता ही फक्त ऐकू येत नसलेली गोष्ट नाही, तर ती रंग, रेषा आणि वेदनांमधून वाहणारी अनुभूती आहे. “रेषांशी डोळे भिडवणारी” या प्रतिमेत कलाकाराच्या आत्मसंवादाची झलक दिसते.
कवितेच्या पुढील भागात करुणेचा गडद अंधारही भयावह न वाटता आश्रयदायी भासतो. “निष्पर्ण झाडाच्या कडेला” शांत निजण्याची इच्छा ही जीवनातील थकव्याची आणि अंतिम शांततेची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. निष्पर्ण झाड म्हणजे विरक्ती, एकाकीपणा आणि काळाच्या प्रवाहात उरलेली निर्विकार अवस्था.
शेवटच्या ओळींमध्ये कवितेचा गाभा सामावलेला आहे —
“अपूर्णतेकडून अमूर्तकडे प्रकाश असा पाझरत जावा”.
येथे “अपूर्णता” म्हणजे मानवी जीवनातील मर्यादा, वेदना आणि अपुरेपणा; तर “अमूर्त” म्हणजे भौतिकतेपलीकडील आध्यात्मिक उंची. कवीला या प्रवासातून प्रकाश जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. हा प्रकाश बाह्य नसून अंतर्मनाच्या जाणिवेचा आहे.
भाषेच्या दृष्टीने कविता अत्यंत चित्रमय, प्रतीकप्रधान आणि संवेदनशील आहे. प्रत्येक प्रतिमा वाचकाला विचारात बुडवते. कवितेचा लयबद्ध प्रवाह आणि गूढ शांतता तिच्या आशयाला अधिक प्रभावी बनवतात.
एकूणच, “प्रकाश पाझरत जावा” ही कविता मानवी वेदना, वैराग्य आणि आत्मशोध यांच्या संगमातून निर्माण झालेली एक चिंतनशील कलाकृती आहे. ती वाचकाला केवळ शब्दांचा अनुभव देत नाही, तर अंतर्मुख होण्यास भाग पाडते.
@ eaksharman
Saturday, May 16, 2026
डॉ आनंद नाडकर्णी
Friday, May 15, 2026
मनामनात आनंदाच्या बिया पेरणारा शेतकरी!
'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत...
डॉ आनंद नाडकर्णी
डॉ. आनंद नाडकर्णी गेल्याची बातमी सकाळीच येऊन थडकली आणि मन सैरभैर झालं. त्यांच्याशी काही नियमित बोलणं किंवा भेटणं होत नसे, पण जेव्हा केव्हा बोलणं-भेट व्हायची तेव्हा ते आत्मीयतेने बोलत. नवं काय चाललंय विचारत, स्वत:च्या कामाबद्दल, उपक्रमांबद्दल, लिखाणाबद्दल भरभरून सांगत.
डॉ. नाडकर्णींचा आमच्या युनिक फीचर्स परिवाराशी जुना संबंध. १९९०पासूनचा. त्यांनी युनिक फीचर्ससाठी लिहिलं, ‘अनुभव’साठी लिहिलं, दिवाळी अंकांसाठी लिहिलं. ‘शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट’ हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारं पुस्तकही ‘समकालीन’तर्फे प्रकाशित झालं.
त्यांचे-माझे संबंध लेखक-संपादक, लेखक-प्रकाशक इतके व्यावहारिक नव्हते. प्रेमाचे होते. त्याचा एक घट्ट धागा अनिल अवचट यांच्याशी जुळलेला होता. डॉ. नाडकर्णी अवचटांचे जवळचे मित्र. मित्र शब्दही अपुरा पडेल इतके जवळचे. मुलासारखेच. अवचटांना ते बाब्या म्हणणार आणि अवचट त्यांना आनंदा म्हणणार. एकमेकांबद्दल बोलताना प्रेम, जिव्हाळा, आदर ओसंडून वाहणार. या दोघांचं हे प्रेमप्रकरण मी जवळून अनुभवलं.
नाडकर्णींच्या तब्येतीचे अनेक प्रश्न होते; पण माणूस सतत कामात गुंतलेला. प्रचंड. अवचटांना त्यांच्या या कामाची भीती वाटायची. मला म्हणायचे, ‘मला आनंदाच्या तब्येतीची फार काळजी वाटते, रे! कधीतरी फाटकन बल्ब उडावा तसा तो जाईल असं वाटतं राहतं. मी ते दु:ख सहन करू शकणार नाही’. मी काहीबाही बोलून त्यांची समजूत घालत असे. आज नाडकर्णी गेले तेव्हा अवचट हयात नाहीत हे एक बरंच म्हणायचं.
अवचट गेल्यानंतर नाडकर्णींसोबतचा दुवा निखळल्यासारखं झालं. बोलणं-भेटणं कमी झालं. पण त्यांचा मनाला आधार असे. स्वत:सह अन्य कुणालाही मानसिक सल्ल्याची गरज पडली तर या क्षेत्रातला एक्का माणूस मदतीला धावून येईल, याची खात्री असे. अशी मदत त्यांनी वेळोवेळी केलीही. आज त्यांच्या जाण्याने याबाबतीत निराधार झाल्यासारखं वाटतंय.
डॉ. आनंद नाडकर्णी हा एक आयुष्यभर अफाट काम केलेला माणूस होता. एक ना अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी घुसून घुसून काम केलं. मनोविकासतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेलं काम तर मोठं आहेच. ते काम करता करता त्यांनी आयुष्यभर भरपूर लिहिलं, मुलाखती घेतल्या, भाषणं दिली, उपक्रम राबवले, महाराष्ट्रभर लोकांशी जोडून घेतलं. त्यातून त्यांचा प्रचंड जनसंपर्क तयार झाला. त्यांनी मानसोपचाराने हजारो लोकांना जगण्याची उमेद दिली. शेकडो छोट्या-मोठ्या संस्थांशी ते जैवरीत्या जोडलेले होते. आयपीएच, मुक्तांगण या तर त्यांच्याच संस्था. त्यांच्यासह शेकडो संस्थांना जवळचा माणूस गमावल्याचं दु:ख होणं स्वाभाविक आहे.
सुहास कुलकर्णी
https://www.facebook.com/profile.php?id=100094061612024
“मनाचे ‘शहाणे सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी!
“मनाचे ‘शहाणे सायकॅट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी!
मानवी मन हे अथांग समुद्रासारखं आहे त्यात भावना आहेत, संघर्ष आहे, वेदना आहेत आणि आशेचे किरणही आहेत. या मनाच्या गूढ विश्वाला सहज, सोप्या आणि माणुसकीच्या भाषेत समजावून सांगणारा एक संवेदनशील आवाज आज कायमचा शांत झाला. ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, नाटककार आणि मानसिक आरोग्य चळवळीचे प्रणेते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला.
काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, शरीराने दूर गेले तरी त्यांनी विचारांच्या आणि शब्दांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या मनात पेटवलेली आशेची ज्योत कायम जिवंत राहणार आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते, तर ते मन समजून घेणारे ‘माणूस’ होते. मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. “मानसिक आजार हा काही वेगळा किंवा लाज वाटण्याचा विषय नाही; तोही इतर शारीरिक आजारांसारखाच आहे,” हा विचार त्यांनी सामान्य माणसांपर्यंत अत्यंत सोप्या भाषेत पोहोचवला.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना त्यांच्या मनात एक मोठी कल्पना आकार घेत होती. मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करणारी चळवळ उभारण्याची आणि त्या विचारातूनच २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात “आयपीएच” अर्थात Institute for Psychological Health या संस्थेची स्थापना झाली.
ही संस्था केवळ मानसिक रुग्णांपुरती मर्यादित राहिली नाही. आयुष्याच्या ताणतणावांनी थकलेल्या व्यक्तींपासून ते स्वतःचा स्व-विकास शोधणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकासाठी आयपीएचने आधाराचा हात दिला. उपचार, समुपदेशन यांसोबतच साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला आणि संवाद यांसारख्या सर्जनशील माध्यमांचा वापर करून मानसिक आरोग्य अधिक मानवी आणि आनंददायी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच वेगळा होता.
१९८० साली त्यांनी एमबीबीएस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रात एम.डी. पदवी प्राप्त केली. पण त्यांच्या नावामागील खरी ओळख पदव्यांमुळे नव्हे, तर त्यांच्या विचारांमुळे निर्माण झाली. त्यांनी मनोविज्ञानाला पुस्तकांच्या चौकटीत न ठेवता ते थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडून दिलं.
लेखनक्षेत्रातही त्यांचा ठसा तितकाच गडद होता. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा सन्मान लाभला. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’, ‘मयसभा’, ‘जन्मरहस्य’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी मानसिक आरोग्याचे विषय प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्यांच्या लेखनात वैद्यकीय ज्ञान होतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यात माणसाच्या भावविश्वाची खोल समज होती.
त्यांची काही गाजलेली पुस्तकं आणि नाटकं आजही वाचकांना विचार करायला भाग पाडतात —
‘एका सायकिॲट्रिस्टची डायरी’, ‘माझं प्रिस्क्रिप्शन’, ‘स्वभाव-विभाव’, ‘मनोगती’, ‘मनोविकास’, ‘हेही दिवस जातील!’, ‘देवराईच्या सावलीत’, ‘कर्मधर्मसंयोग’, ‘शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट’ अशी अनेक पुस्तकं आणि नाटकं त्यांच्या वैचारिक समृद्धीची साक्ष देतात.
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली. त्यांनी लोकांना फक्त उपचार दिले नाहीत, तर जगण्याची नवी उमेद दिली. मनातील वेदनांना शब्द दिले. तणावग्रस्त मनाला समजून घेतलं. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे “मन मोकळं करणं ही कमजोरी नाही,” हे त्यांनी हजारो लोकांना शिकवलं.
आज ते आपल्यात नाहीत… पण त्यांनी दिलेली मानसिक आरोग्याची जाणीव, माणुसकीची शिकवण आणि संवेदनशील विचारांची परंपरा कायम समाजाला दिशा देत राहील. त्यांच्या जाण्याने मानसशास्त्र, साहित्य आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#shrikantjoshi #shrikantjoshi_official #डॉआनंदनाडकर्णी #श्रद्धांजली #मानसिकआरोग्य #मानसोपचारतज्ज्ञ #मानसशास्त्र #आयपीएच #InstituteForPsychologicalHealth
डॉ आनंद नाडकर्णी
बातमी
डॉ आनंद नाडकर्णी
अथांग मनाचा समुद्र डॉ आनंद नाडकर्णी
वेध डॉ आनंद नाडकर्णी
डॉ आनंद नाडकर्णी आठवण
Wednesday, May 13, 2026
मराठी टक्का .. दोष केवळ मराठी शिक्षकांचा का ?
Saturday, May 9, 2026
समिक्षा लेखन ८
समिक्षा लेखन ७
समिक्षा लेखन ६
समिक्षा लेखन ५
समिक्षा लेखन ४
समिक्षा लेखन ३
समिक्षा लेखन २
समिक्षा लेखन १
Friday, May 8, 2026
Thursday, May 7, 2026
भावमेघ पुस्तक प्रकाशन
नमस्कार, 10 जानेवारी 2026 रोजी माझ्या भावमेघ ह्या पहिल्या काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन झाले. माझ्यासाठी हा सोहळा एखाद्या अपत्यजन्मा सारखा खूप महत्वाचा होता..नवीन ओळख मिळवून देणारा आहे. खरंतर पोस्ट ला थोडा दोन तीन दिवस उशीरच झाला आहे, पण ही phase माझ्यासाठी खूपच नवीन आहे..नव्याने स्वतःशी ओळख झाल्यासारखे वाटते आहे..माझा आनंद, माझे भारलेपण तुमच्या समोर मांडायचे आहे म्हणून ही पोस्ट..
सारस्वतांच्या सोबतीने
सोहळा कवितांचा रंगला
रंगवूनी रसिक मनांना
अंतर्नाद जणू निनादला
कापरापरी उडून वेळ
कसा अचानक संपला
पण स्मृतींच्या रूपाने
मनावर कायम ठसला
असेच काहीसे वाटते आहे...
देव कधीकधी अशा क्षणांचे दान पदरात देतो, वाटतं खरंच आपण पात्र आहोत का ह्या सगळ्याला... शनिवार पासून सगळीकडून कौतुकाची, प्रेमळ शब्दांची पखरण माझ्यावर होत आहे...मन इतक भरून आलं आहे.
त्याच भरल्या मनाने आईला फोन केला, तिला विचारलं, " मला खूप दडपण आलं आहे... कारण माहित नाही , ह्या सगळ्यासाठी खरंच मी योग्य आहे का.. " तेव्हा तिचे उत्तर फार महत्वाचे होते, "आपण चांगले माणूस असल्याची ही पावती असते, ती स्वीकारून पुढच्या प्रत्येक पावलावर त्याची जाणीव ठेवून जबाबदारी वाढवणारी असते ही कौतुकाची प्रेमाची थाप..आज तुला ह्या प्रसंगात तुझ्या ज्या चुका , उणिवा किंवा कमतरता दिसत आहेत त्या पुढच्या वेळी तू दूर करण्याचा प्रयत्न कर. पण हा क्षण अभिमानाने जग, तो तुझा स्वतःचा आहे."
मी लहानपणा पासून आईबाबांना कोणतही काम करताना सचोटी आणि प्रामाणिकपणे करताना पाहिलं आहे..ते अंगीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे. तुमच्या सगळ्यांच्या शब्दांनी खूप भारावून गेले आहे. ... धन्यवाद सर्वांचे.. देवाचे सर्वात जास्त आभार कारण मी ह्या सर्व सोहळ्याचा भाग असण्याची सुतराम शक्यता नव्हती.
मी साधारण कॉलेज मध्ये असल्यापासून माझ्या भावना कवितेत मांडते आहे, फक्त माझ्या आणि माझ्या जवळच्या मैत्रिणींमध्ये माहित असलेली ही गोष्ट, मी साधारण 2013 पासून फेसबुक, ब्लॉग आणि विविध social media platform वर हळूहळू मांडायला लागले. मी छंदोबद्ध कविता लिहिलेल्या नाहीत..बऱ्याचश्या कविता मुक्तछंदात आहेत.. माझ्या मनातील विचार मांडायचा केलेला प्रयत्न आहे..माझ्या नवऱ्याने दिपक सावंत Deepak Sawant ह्याने फार आग्रहाने आणि कौतुकाने हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे.. माझा पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह..ह्याआधी माझ्या कविता 3 वेगवेगळ्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून छापून आल्या आहेत, एक दोनदा कथाही छापून आल्या आहेत..
गीतकाव्य ह्या पुस्तकाच्या निर्मिती दरम्यान सतीश दादा आणि परेश दादा ह्यांनी सुद्धा माझ्या पुस्तक निर्मितीसाठी आग्रह धरला होता. त्यांचेही आभार. Sateesh Ranade Paresh Koli
माझ्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ माझ्या धाकट्या लेकीने प्राची दिपक सावंत( वय वर्ष 13) हिने काढले आहे..thank you Prachi.. Love you प्राची आणि पूर्वा..
पुस्तकाची उत्तम प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक Satish Solankurkar सोळांकुरकर सरांनी लिहिली आहे त्यांचेही आभार... आणि पुस्तकाच्या पाठी लिहिलेली मा प्रा कविवर्य अशोक बागवे सरांची पाठराखण म्हणजे साक्षात देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहे.. Ashok Bagwe सर धन्यवाद...
गीतकाव्य आणि भावनांची चंची ह्या दोन काव्यसंग्रहासोबत पुण्यात 10 जानेवारीला भावमेघ चे प्रकाशन झाले.. अंतर्नाद काव्यमंच ह्यांनी Velvet Kavisha Publications Varsha Vishal Thukrul सोबत फार सुंदर सोहळा आयोजित केला होता..दोन्ही संस्थांचे आभार..
आणि माझी आई Shilpa Samant , माझा दादा Harshad Samant आणि माझे सगळे जिवलग जे मनात इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत त्या सगळ्यांचे आभार.. माझ्या बाबांना मी सर्वात जास्त miss करते आहे..त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत..ते जाणवतात.🙏
आणि माझ्या सर्व जवळच्या मित्रमैत्रिणी, हितचिंतकाचेही आभार, सदिच्छा पाठीशी असल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही..
आणि भावमेघ बरोबर प्रकाशित झालेल्या भावनांची चंची या काव्यसंग्रहाच्या कवयित्री Saru Pawar ताई तुमचेही अभिनंदन..आणि गीतकाव्य ह्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात समाविष्ट 26 कवी कवयित्रींचेही अभिनंदन...
आणि माझे माहेरचे सर्व सामंत कुटुंबीय, आजोळचे नाईक कुटुंबीय आणि सासरचे सावंत कुटुंबीय ह्या सर्वांचे आभार
माझ्या काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे, ज्यांना वाचायची इच्छा असेल त्यांनी नक्की कळवा. वाचून आवर्जून अभिप्राय द्या..
इतक्या उघडपणे अभिमानाने माझ्या कविता मिरवताना फार छान वाटलं..धन्यवाद @Deepak Sawant.
मेघना
https://www.facebook.com/meghanadeepaksawant
Wednesday, May 6, 2026
S. N. Inamdar
S. N. Inamdar (6th May 1945 - 18th July 2024)
eminent tax consultant, advocate and designated senior counsel of the Bombay High Court
the Income Tax Appellate Tribunal carried a feature about him in their magazine. I am giving the link in the next tweet.
शब्दरंग
Tuesday, May 5, 2026
कविता
Monday, May 4, 2026
स्वामी विवेकानंद
Sunday, May 3, 2026
पालकत्व
कथा
सैराट बघितला? मग ही कथा जरूर वाचा:
.... आई-वडलांच्या विरोधाला न जुमानता, माझा सल्ला न मानता त्या मुलीने पळून जाऊन त्या रिक्षा ड्रायव्हरबरोबर लग्न केले. ती त्याच्याबरोबर एका छोट्या खोलीत जाऊन राहू लागली. थोडे दिवस मजेत गेले. पण नंतर त्या दोघांच्यात सारखी भांडणं होऊ लागली. भांडणाचं मुख्य कारणं होती तिच्या नव-याचं रहाणीमान आणि सवयी, पैशांचा अभाव. बंगल्यात राहिलेली, कारमधून हिंडणारी, महागड्या वस्तू वापरण्याची सवय असणारी ती मुलगी भानावर आली. एके दिवशी नव-याला सोडून घराबाहेर पडली. माहेरी आली, पण तिच्या वडिलांनी तिला घरात घेतलं नाही. मग कांही दिवस एका मैत्रिणीच्या घरी राहिली. कांही दिवसांनी ती परत नव-याकडे गेली.
पुढे व्हायचे तेच झाले. तिच्या नव-याला तिचा संशय येऊ लागला. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. तिला मारहाण करू लागला. ती पुन्हा तिथनं बाहेर पडली. कधी या मैत्रिणीच्या तर कधी त्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली. शिक्षण कमी, त्यामुळे कुठं चांगली नोकरीही मिळेना. पण असे किती दिवस चालणार? तिच्या एका मैत्रिणीनं तिला सल्ला दिला, तू आता दुसरं लग्न कर.
‘पण माझं लग्न झालेलं आहे. डायव्हर्स न घेता दुसरं लग्न कसं करणार? आणि माझा नवरा मला डायव्हर्स देणार नाही. कोर्टात गेलं तर त्यात अनेक वर्षे जातील’
‘मग तू असे किती दिवस काढणार?’
‘जमेल तेवढे... आयुष्यात एक मोठी चूक केलीच आहे. आता पुढचे दिवस मला ज्या दिशेने नेतील त्या दिशेने जावे लागेल’
पूर्ण कथा पुढील लिंकवर वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/07/blog-post.html
_भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा कशाला हव्यात
तामसी वृत्ती स्त्री वर अत्याचार
मन खंतावून गेलंय, भावना तीव्र आहेत. पण तोकड्या शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. प्रत्येक विचारी, सजग माणसाची आज हीच अवस्था आहे. भेदाभेदांना विचारी मनुष्य कंटाळला आहे. गुन्हा आणि शिक्षा हा सरळ न्याय असला पाहिजे. अर्थात प्रत्येक घटना घडताना सरकारलाच दोष देणं हेही योग्य होणार नाही.
मुळात मनुष्याची अशी अमानुष प्रवृत्ती होण्याच्या कारणांचाही शोध घेतला पाहिजे - म्हणजे रोगाच्या मुळाशी गेलं पाहिजे. ('अमानुष' किंवा 'पाशवी' असं संबोधन तरी का करायचं? कारण पशूही आपल्या धर्माप्रमाणे - म्हणजे सहजप्रेरणेने जगत असतो. पण सारासार विवेक करण्याची शक्ती मिळालेला मनुष्य मात्र अनिर्बंध होऊ शकतो हेच कालच्या घटनेवरून समजून येतं.) त्यामुळे 'अमानुष'ऐवजी 'नराधम' हेच संबोधन योग्य वाटतं.
नराधम, बेलगाम प्रवृत्ती होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेतुपुरस्सर रुजवली गेलेली, वासना बळावणारी भोगवादी जीवनशैली. अशा कालखंडात कोणती माध्यमं, विविध गोष्टी-दृश्यांमधून नको त्या गोष्टी मुद्दाम आपल्या माथी मारत आहेत हे ओळखून आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण अशा गोष्टी तामसी भोग मिळवण्यासाठी मनुष्याला प्रवृत्त करत असतात.
तामसी वृत्तीचा कळस (नव्हे तळ!) म्हणजे प्रचंड आसक्ती, अपरिमित वासना आणि अविवेकी स्पर्धावृत्ती वाढीला लागणं हा असतो! कितीही मिळालं तरी समाधान होत नाही. वासना संपत नाहीत किंवा मनाला तृप्ती मिळतच नाही. अधिकाधिक भोगवासना मिळवण्यासाठी बाह्य जगात दिवस-रात्र दिशाहीन, निर्बंधरहित धावत राहणं हेच जीवनाचं उद्दिष्ट झालं तर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजालाही भोगावे लागतात. (काहींना नाईलाजानं पोटासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो त्यांच्या संदर्भात हा विचार नाही.) रात्र ही विश्रांतीसाठी असते. अनेक प्राणी-पक्षी हा निसर्गनियम पाळतात; फक्त माणूस नाही. रात्रीचा अंधकार हा तामसी प्रवृत्तीला उत्तेजन देत असतो.
मोठ्या शहरांमधून रात्रीचं जीवन हे भयकारी होत चाललं आहे. त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. पहाटे सात्त्विक वातावरण असतं, दुपारी राजसी तर रात्री तामसी वृत्तीचा जाेर असताे. जन्मदिवसही सूर्याच्या साक्षीनं साजरे केले तर ते खरे लाभदायक ठरू शकतात. आसुरी शक्ती रात्री कार्यरत हाेत असतात, असं महाभारतातही अनेक ठिकाणी म्हटलं आहे. दिवसापेक्षा रात्री जीवितहानी सुद्धा अधिक हाेते असं जगातले अनेक रिपाेर्ट्स् सांगतात. (Search on Google.) यामागे अनेक नकारात्मक लहरीही काम करीत असतात.
रात्रीचे तामसी संस्कार मनात रुजतात आणि दिवसाही ते मनुष्याच्या हातून कुकृत्यं घडवून आणतात. त्या बिचाऱ्या चिमुरडीचा अशाच वृत्तीतून बळी घेतला गेला - अनेक जीव आजपर्यंत अशाच वृत्तीतून बळी पडलेले आहेत. सरकार infrastructure देईल, नोकऱ्या निर्माण करेल, मदत देईल, सर्वप्रकारच्या व्यवस्था देईल; पण योग्य तर्हेने जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे हे ज्या-त्या मनुष्यालाच ठरवावं लागेल.
त्या आणि नराधमांच्या वासनांना बळी पडलेल्या अशाच पीडितांना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.
Rajendra Kher
Saturday, May 2, 2026
सुमी... २७ ०४ २४
'रविवारची रंगत'
'रविवारची रंगत'
'दृक काव्य' या अलीकडे प्रकाशित झालेल्या संग्रहातून.
व्हिज्युअल पोएट्री या विषयाचा अभ्यास करता करता 19 व्या शतकाच्या सुरुवातीला Guillaume Apollinaire या फ्रेंच कवी आणि नाट्य लेखकाने त्याच्या 'कॅलिग्राम' या कवितासंग्रहात केलेला एक प्रयोग पाहण्यात, वाचण्यात आला.
जो कदाचित पहिल्यांदा झालेला असावा.
त्या पूर्ण संग्रहात प्रत्येक कवितेची अक्षररचना अशी केली आहे की त्यातून दृक अनुभव सुद्धा घेता येतो. ( जो मी रविवारची रंगत या मालिकेत काही कवितांमधून सादर केला आहे)
ती कविताच अक्षर- दृक- काव्य झाली आहे.
असे कला प्रवाह अभ्यासता अभ्यासता मला त्यातलं भारतीयत्व जाणवलं ते रवींद्रनाथांच्या गिरगीट चित्रांमध्ये. असं म्हटलं जातं की कविता लिहिता लिहिता ते काही शब्द खोडत तर काही ओळीच्या ओळी सुद्धा गिरगिटवून खोडत.
त्या शब्द विरहित अवकाशाला गिरगीटण्यातून अमूर्त अशा विविध आकारांचे चित्ररूप मिळत गेले. त्यांची ही 'पूरबी' ह्या हस्तलिखितातील गिरगिट चित्र जागतिक कला प्रवाहात सन्माननीय झाली. लिहिता लिहिता गिरगीटण्यातून चित्र दिसू लागली.
अगदी या उलट मांडणी करत गेलो म्हणजे चित्रावर कविता उतरत असताना त्यातले शब्द त्या चित्राला त्याची स्पेस देत आहेत असं भासवू लागलो.
ह्या चित्रकाव्यात मांडण्याचा प्रयत्न.
Hemant Joshi
https://www.facebook.com/share/14dAXjJGj5o/
