मित्रांनो आनंदाची गोष्ट.....
मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, काव्यकोडी लिहिणं आणि लिहिलेलं मुलांपुढे सादर करणं , हाच माझा प्रांत. मुलांना त्यातून झालेला आनंदच माझ्या पुढील लेखनासाठी ऊर्जेचा स्त्रोत बनत गेला .खरंतर, याच प्रक्रियेतून माझ्या लेखनाची वाटचाल गेली २६ वर्षे सुरु आहे. आजमितिस २५ पुस्तके लिहिली. पुस्तकांच्या ब्रेल लीपी आवृत्या निघाल्या. हिंदी, इंग्रजीत अनुवाद झाले. पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील बालदोस्तांनी माझ्या पुस्तकांवर भरभरुन प्रेम केलं.
आज याच टप्प्यावर माझ्या एकूणच प्रयोगशील लेखनासाठी मातोश्री स्नेहप्रभा तौर बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालाय. बुलडाणा येथे संपन्न होणाऱ्या बालसाहित्य परिषदेत हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
तौर परिवाराचे यासाठी मनापासून आभार.
https://www.facebook.com/eknath.avhad.3
Showing posts with label अक्षरांगण. Show all posts
Showing posts with label अक्षरांगण. Show all posts
