Sunday, August 2, 2026
Friday, May 15, 2026
बातमी
Tuesday, May 5, 2026
Saturday, February 26, 2022
बातमी
Wednesday, May 27, 2020
बातमी
Tuesday, May 5, 2020
Friday, May 1, 2020
गोष्ट कोकणातली
Saturday, January 25, 2020
Monday, June 24, 2019
बातमी
राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याबाबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही ही बाब समोर आली आहे. यासाठी कायद्यात बदल करून अतिशय कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘मराठीच्या भल्यासाठी’या मंचाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक मराठी भाषेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची सक्ती तामिळनाडूच्या धर्तीवर झाले पाहिजे यासाठी विकास प्राधिकरण कायदा पावसाळी अधिवेशनात मंजूर करणे, मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी, शाळा बंद पडू नये यासाठी मराठी शाळांच्या गुणवत्तेबाब सक्षमीकरण करणे, मुंबईत मराठी भाषा भवन उभारणे, शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी परिपत्रक काढणे अशा मागण्या मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठाने केल्या आहेत. दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी सक्तीचे करण्यात यावे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/20/marathi-language-is-compulsory-in-all-education-boards.html
Tuesday, December 11, 2018
बालसाहित्य पुरस्कार
मित्रांनो आनंदाची गोष्ट.....
मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, काव्यकोडी लिहिणं आणि लिहिलेलं मुलांपुढे सादर करणं , हाच माझा प्रांत. मुलांना त्यातून झालेला आनंदच माझ्या पुढील लेखनासाठी ऊर्जेचा स्त्रोत बनत गेला .खरंतर, याच प्रक्रियेतून माझ्या लेखनाची वाटचाल गेली २६ वर्षे सुरु आहे. आजमितिस २५ पुस्तके लिहिली. पुस्तकांच्या ब्रेल लीपी आवृत्या निघाल्या. हिंदी, इंग्रजीत अनुवाद झाले. पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील बालदोस्तांनी माझ्या पुस्तकांवर भरभरुन प्रेम केलं.
आज याच टप्प्यावर माझ्या एकूणच प्रयोगशील लेखनासाठी मातोश्री स्नेहप्रभा तौर बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालाय. बुलडाणा येथे संपन्न होणाऱ्या बालसाहित्य परिषदेत हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
तौर परिवाराचे यासाठी मनापासून आभार.
https://www.facebook.com/eknath.avhad.3

