Showing posts with label गोष्ट. Show all posts
Showing posts with label गोष्ट. Show all posts

Saturday, July 4, 2026

मृदुंग मसाला भजी..

मृदुंग मसाला भजी....❤️
हे काय प्रकरण ऐकून काहीतरी वेगळे वाटलेच असणार. माझेही तसेच झाले. तसा मी काही खवय्या नव्हे. साईटवर असताना बहुतांशी वेळेला आपल्याला काहीतरी खायचे असते हे विसरून जाणारा. असा मी काहीतरी खाण्याच्या पदार्थावर पहिल्यांदाच लिहित आहे. 
जरा वेळ मिळाला की थोडे आडवाटेवर फिरणे हे नित्याचेच. आणि कोणी त्याच आवडीने फिरणारी मंडळी सोबत मिळाली की मग मजाच. यावेळी अजिंक्य प्रभुदेसाई, सुप्रिया गोडबोले आणि तिची मुलगी रिया यांचे सोबत राजापूर परिसरात फिरायला गेलो. भ्रमंती करून नाही म्हटले तरी पोटात कावळे ओरडायला लागले होते. पण जेवण करायच्या ऐवजी काहीतरी अडमतडम खाऊया या रियाच्या आग्रहाखातर राजापूर शहरातील कृष्णा उर्फ पांडू करंबेळकरांच्या गणेश टी स्टॉल कडे वळलो. इथला वडापाव आणि बटाट्याची भजी फेमस.
राजापूर शहराच्या दिशेने गेलो की शिवाजी चौकातील गणेश टी स्टॉल वर चहा घेणे असा जणू आमचा नियमच. अर्थात त्यामुळे एकमेकांशी उत्तम आणि जवळचा परिचय. सोबत्यांना भूक लागली आहे. काय देतो आहेस म्हणत गणेश टी स्टॉल वर आलो. 
भाई आज तुम्हाला नवीन स्पेशल डिश देतो. ' मृदुंग मसाला भजी '. पावसाचे आणि भजीचे नाते एकदम जवळकीचे. पण मृदुंग मसाला भजी हा काय प्रकार? नाव ऐकूनच उत्सुकता वाढली. 
दोन एक मिनिटात मृदुंग मसाला भजीची प्लेट समोर आली. 
गरमागरम बटाटा भजी त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव वरून लिंबू, लसणीचे तिखट आणि सोबत स्पेशल मेड दोन प्रकारच्या चटण्या अशी छान सजवलेली डिश. डिश बघूनच ती खावीशी वाटली. करंबेळकरांची बटाटा भजी ही उत्तम चवीचीच त्यात आता सोबत असलेले पदार्थ. एकदम वेगळी चव. अहाहा... माझ्या सारख्या खाण्याच्या बाबतीत अरसिक माणसाला सुद्धा ही मृदुंग मसाला भजी खाताना खूप मजा आली. ही भजी खाता खाता थोड्या वेगळ्या पद्धतीने आस्वाद घेतला आणि अधिक मजा आली. सोबत असलेले खवय्ये देखील खुश झाले. 
प्रत्येक गोष्टीला एक स्थान महात्म्य असते. करंबेळकरांचा गणेश टी स्टॉल हे मृदुंग मसाला भजीचे स्थान. ती तिथेच जाऊन खावी. 
राजापूर शहरात कधी गेलात तर या टी स्टॉल ला अवश्य भेट द्या आणि मृदुंग मसाला भजी आवर्जून खा. 
आणि हो ह्या मृदुंग भजीचा वेगळ्या पद्धतीने आस्वाद घ्यायचा असेल तर आमच्या सोबत या. पण एक अट आहे तुम्हाला आमच्या सोबत फिरायला लागेल. 

सुधीर( भाई) रिसबूड, 9422372020

Monday, March 14, 2022

post 1

माझ्या फार लहानपणी पन्हाळ्याच्या पायथ्याशी अेका मराठी चित्रपटाचं चित्रिकरण पाहिल्याचं आठवतय
तमासगिरांच्या चार पाच बैल गाड्या लागलेल्या होत्या
दादा साळवी चंद्रकांत मांढरे,सुलोचना बाअी गणपत पाटील वसंत शिंदे त्यांच्या बरोबर खाष्ट बाअीच्या भूमिकेत मला वाटतं गुलाब कोरगावकर होत्या
पण मुख्य आकर्षण होतं जयश्री बाअी
त्या खूप दूरून पाण्याच्या घागरी आणि खांद्यावर धुण्याचे पिळे घेअून येताना दाखवल्या होत्या 
त्या ठरलेल्या स्पाँटवर आल्या तशा दात ओठ खात त्यांच्या अंगावर जायला गुलाब बाअी तयार होत्या आणि आपली तारांबळ लपवत शिंदे काकाना त्याना अडवायला गुलाब बाअींच्या मागे भित भित धावायचं होतं असं अेकूण द्रुष्य होतं
अेक दोन रीटेक नंतर शाँट ओ के झाला आणि लंच ब्रेक साँरी जेवणाची वेळ झाली
सगळे बाप्ये लोक जागा मिळेल तिथे पण अेकमेकाजवळ बसले,पितळी चकचकीत थाळे सगळ्याना दिले गेले आणि अेक बाअी होत्या त्यानी थाळा भरून जाअील अशा गरम गरम भाकर्या मधे मोडून वाढायला सुरूवात केली त्या पाठोपाठ गुलाब बाअी वांग्याची तिखट जाळ भाजी घेअून आल्या आणि पंगतीत वाढावं तसं पदर खोचून सगळ्याना वाढायला लागल्या,त्या भाजीला ढकल वांग म्हणतात असं तेंव्हा मामा म्हणाला कारण ढकल वांग्यात प्रत्यक्ष वांग्याला हात घालायची वेळ फार अुशीरा येते त्या आधी दोन तीन भाकर्‍या ते मसालेदार वांग बाजूला ढकलत त्या तेल तिखटा बरोबरच संपवल्या जातात 
मग लक्षात राहीलं ते जयश्री बाअी झुणका वाढायला आल्या तेंव्हा शुटींग बघायला जमलेल्यानी त्यांच्या नावानी केलेला गलका
,जयश्री बाअींची लोकप्रियता होतीच तशी
त्यानी पण हसून त्या जमलेल्या माँंबकडे पाहीलं आणि कंपनीची माणसं जेवाया बसल्येत मग या शुटींग बघायला
असं हुकमी स्वरात तरी हासून सांगितलं
आणि आश्चर्य म्हणजे अर्ध्याहून अधिक माँब पांगला, मामाची त्या युनीट बरोबर चांगलीच दोस्ती होती त्यामुळे आम्ही शुटींग बघायला आलो असलो तरी नुसते बघे नव्हतो त्यांचे पाहुणे होतो

तेव्हढ्यात झुणक्यावर तेलाची फर्माअीश झाली आणि जयश्रीबाअीनी मुक्त हस्तानं झुणक्यावर धरलेली तेलाची धारही मला अजून आठवते
बापे लोकांच होअीपर्यंत सुलोचना बाअीनी त्या दुसर्‍या बाअीं बरोबर बायकांची ताटं घेतली सुलोचना बाअीनी डब्यातून  खास फक्त बायकांसाठी काहीतरी आणलं होतं पण शिंदे काकांच्या नजरेतून काही ते सुटलं नाही,मग काय हल्ला बोल झालं
खूप हसी मजाक झाली
नशीबाने मला अत्ताही काही तकलादू मराठी चित्रपटांचे स्टायलीश लंच ब्रेक पहायला मिळतात
मी त्याना पूर्णपणे दोश देत  नाही
ज्याच्याशी स्पर्धा त्याचं अनुकरण हा तर अलिखित नियम आहे
आणि मराठी चित्रपट सृष्टीची हिंदी चित्रपट सृष्टीशी हल्ली ट्क्कर असली तरी स्पर्धा सुद्धा आहे त्यामुळे स्ट्यालीश वागणं आणि वावरणं ही तर पहिली अट ठरली असेल.

#चंगो

Fb @ ChandrashekharGokhale.fans

Wednesday, August 10, 2016

लग्नाचा दिवस



प्रत्यक्षात  हा  अनुभव माझा असून फारच  सुखद  आहे प्रत्येक  मुलीला हा  अनुभव  येतो .इतर मुलींप्रमाणेच माझ्या लग्नाचा दिवस
माझ्या ही आयुष्यात एक  सोनेरी पहाट बनूनच आला .
  माझं लग्न  झालं आणि माहेरची माणसं सोडताना मनाला खूप  यातना झाल्या .अश्रू   गालांवरून ओघळत होते ,बोलायला शब्द उमटत नव्हते .
   सासरी  निघाले  खरी ,पण  आई , जिने आपल्याला उन्हाची झळ लागू दिली नाही ,सतत तिच्या पदराच्या सावलीत  ठेवलं ,शिक्षण  ,योग्य तिथे पाऊल उचलायला शिकवलं ,तीच आई आपल्याला परकी होते हे  आठवून मन दु:खी झाले .
    माहेरचे खेळीमेळीचं  वातावरण सोडून  सासरच्या वातावरणात यायचं म्हणजे प्रत्येक मुलीला कठीणच असतं .पण प्रत्येकाला  माहेर
सोडावंच  लागतं. सर्व बाजूला सारून कशी तरी जड अंत : करणाने मी  बस मध्ये बसले .अश्रूंना पुनः वाट मोकळी करून  दिली होती .
  बसमध्ये बसली तरी  मी रडतच होते .मनामध्ये असंख्य विचार घोळत होते . नव्या घरातील माणसं कशी असतील , ते  मला समजून  घेतील का , पण  हे  मात्र चक्क झोपले होते .बस वेगाने धावत होती .आज पासून मी नवीन आयुष्याला सुरवात करणार होते .गाडीमध्ये
भरपूर हसण्या - खिदळण्याचा आवाज कानावर पडत होता .पण माझं मन माहेरच्या माणसांत गुंतलेलं होतं.आज मी क्षणात त्यांना
परकी  झाले होते .  
   मनात वाटत होतं कि ,मी एवढी रडतेय ,पण यांना मात्र काहीच वाटतं नाही . किती शांतपणे झोपलेत हे ,अजिबात समजूतदार    दिसत नाहीत .त्यांचं  हे  वागणं  पाहून  मला जास्तच  रडायला यायला लागलं .
     थोड्या वेळाने गाडीतली सर्व मंडळी झोपी  गेली. कलकलाट थांबला .
    मी चोरट्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं , ते चक्क उठून बसले होते.
    त्यांनी माझ्याकडे प्रेमळ नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि  गुलाबी पत्र माझ्या हातात दिलं .मी अगदी भांबावून गेले. काय असेल या पत्रात ,काळीज धडधड करत होतं. मी  अलगदच पत्र उघडलं .बस मध्ये लाईट चालू असल्यामुळे  मी ते पत्र वाचू  लागले .


प्रिय भारती ,
   या  मधुर समयी मी तुला फक्त एवढंच सांगेन , तुझ्या मनाची अवस्था मी जाणतो . माहेरची माणसं सोडली आणि तू सासरच्या
गलक्यात आलीस , पण  घाबरू नकोस . मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे .
       आईच्या पदराखाली तुला आणलंय ना , पण  मी तुला माझ्या सदैव  हृदयात ठेवीन .  आपण दोघं आता नवीन आयुष्याला सुरवात करणार आहोत . अपार प्रेम मी तुझ्यावर करीन , तुझ्या चुकांवर पांघरूण घालीन . हा संसार दोघांचा असतो , तो दोघांनी मिळून करायचा असतो .मला तुझी साथ हवीय , तू साथ देशील  ना !
  तुझाच  संजय


मी  पत्र वाचलं , माझे अश्रू  पुसले .त्याच्याकडे  एकटक पाहत राहिले . मला हवा तसाच जोडीदार मिळाला होता . एका  पत्राने आमचा संसार फुलला होता . त्यांनी नजरेनेच मला जवळ येण्याचा इशारा केला . मी अगदी लाजून चूर  झाले  आणि  नकळत त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून निर्धास्त झाले .
 भारती  पोटे , बुधवार पेठ  पुणे


गृहशोभिका मे २००७