Showing posts with label News Articles. Show all posts
Showing posts with label News Articles. Show all posts

Thursday, September 19, 2024

एका घराचं विसर्जन


एका घराचं विसर्जन

ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात 'शोधपत्रकार' म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि 'गर्द' हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.

- डॉ. आनंद नाडकर्णी

सकाळ वृत्तसेवा

Updated on: 08 September 2024, 12:23 am IST

गेली बेचाळीस वर्षे, पुणे शहरातला माझा पत्ता म्हणजे 'कृष्णा बिल्डिंग, पत्रकारनगर, ऑफ सेनापती बापट रोड.' हे घर अनिल आणि सुनंदा अवचटांचं. मी ह्या पत्त्यावर दाखल झालो तो सुनंदाचा 'व्यवसाय-मित्र' म्हणजेच सायकिअॅट्रिस्ट म्हणून. त्या वेळी माझं आणि अनिलचे समीकरण जुळलं नव्हतं. ते यथावकाश जुळून आले.

ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात 'शोधपत्रकार' म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि 'गर्द' हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.

आमची मैत्री घट्ट होत गेली आणि त्या घरातली माझी झोपायची जागाही पक्की झाली ती पुढच्या चार दशकांसाठी. माझे वडील एकोणीसशे नव्वद सालच्या जानेवारी महिन्यामध्ये गेले आणि त्या टप्प्यावर अनिल हा मित्राच्या रूपातून माझ्यासाठी सुद्धा 'बाबा' झाला.

हळूहळू बाब्या, बाबडू आणि 'Babs by The Bay' अशी अनेक नामकरणे झाली त्याची. सुनंदा पुढे निघून गेल्यावर, बाबाची आई इंदुताई त्या घरात आली. बाबाच्या एकटेपणावर तिनं वीस वर्षे मायेची गोधडी घातली.

ह्या घरातल्या माझ्या पहिल्या दहा-पंधरा वर्षांच्या मैत्रीवर मी लेख लिहिला होता. तो 'लेखकाचे घर' ह्या पुस्तकात मॅजेस्टिकच्या अशोक कोठावळेंनी प्रसिद्ध केला आहे. तर ह्या घरातल्या मजेदार मायेच्या क्षणांची मला सवय होत गेली. मी पहाटेच्या साखरझोपेत असताना बाबाची जाग सुरू व्हायची.

तो डेस्कटॉप कॉम्प्युटरवर जाऊन बसायचा. सकाळी उठवायची जी वेळ मी सांगितली असेल त्या वेळी बासरी वाजवून, गाणे म्हणून मला उठवायचा. मग चहासोबत गप्पा. बाबासाठी ब्रेकफास्ट म्हणजे दिवसातली महत्त्वाची इव्हेंट.

आजीने ट्रेनिंग दिलेली ज्योती ही मुलगी आजीनंतरची आठ वर्षे त्याच निगुतीने बाबाची काळजी घ्यायची. मस्त नाश्ता करून तयार झालो आणि घरातून बाहेर पडणार तर नैसर्गिक सूर्यप्रकाशामध्ये बाबाला फोटो काढायची हुक्की यायची. अनेक व्यक्ती आणि घरांचा एकमेव, अधिकृत फोटोग्राफर होता तो.

संध्याकाळी कामे आटोपली की वेध लागायचे पुन्हा त्या घरी यायचे. रात्रीचे चारीठाव जेवण; साधे पण रुचकर. त्यानंतर ताजे ताक, मौसमी फळे आणि त्यानंतर चॉकलेट किंवा आइस्क्रीम किंवा केळी, पेरू अशा फळांचे मजेदार फ्रूट सॅलड. आम्हाला गप्पांना कोणतेही विषय पुरायचे. तत्त्वज्ञान ते गॉसिप, इतिहास ते राजकारणातील सद्य:स्थिती, साहित्य ते संगीत...

काहीही. बाबा जोक्स सांगायचा. किस्से आणि गाणी. एकमेकांचे लिहिलेले मजकूर एकमेकांना वाचायला देणे. रात्रीचे दहा-साडेदहा झाले की तो म्हणायचा, "चला, झोपण्याआधी आनंदला फोन करायची वेळ झाली." गेली पंचवीस-तीस वर्षे, दिवसातला शेवटचा फोन तो मला (किंवा मी त्याला) करायचो. प्रत्यक्ष समोर असलो की हा त्याचा आवडता डायलॉग,

आनंददायी क्षणांनी भरलेले दिवस. बाहेरचे तणाव, दुखे तिथेच ठेवून इथे विसाव्याला यायचे. माझी पत्नी सविता ह्या घराला म्हणायची, 'हे तुझे माहेर'. तर माहेरच्या सवयी सुटत नाहीत. फोटो, पेंटिंग, रेषाचित्र रसिकतेने नेमके कसे पाहायचे त्याची सवय इथे लागली.

सुरांना समजून कसे घ्यायचे ते समजले. स्वादाला निर्भयपणे उपभोगायला मिळाले आणि सवयीच्या बिछान्याचा स्पर्श... सकाळच्या सालंकृत पोहे-खिचडीचा सुवास. माझी ज्ञानेंद्रिये तेजतर्रार केली ह्या घरानं.

ह्या घरात बाबामुळे भेटलेल्या अनेक जणांमुळे माझी नात्यांची रेंज इतकी वाढली. बाबाचे काही मित्र पुढच्या काळात माझेही 'स्वतंत्रपणे' मित्र झाले. सदाशिव अमरापूरकर, आर्किटेक्ट शिरीष बेरी, कार्यकर्ता अरुण ठाकूर, सतारमय विदुर महाजन, लेखक उमाताई आणि निरुपाक्ष कुलकर्णी... किती नावे घेऊ.

ह्या घराने विचाराचा परीघ विस्तारायला केवढी मदत केली. सुमित्रा (भावे) मिळाली, सुनील (सुखटणकर) आला

आणि सिनेमामाध्यमाची द्वारे खुली झाली. ह्या सगळ्यामध्ये भर मुक्तांगण परिवारामधल्या आमच्या असंख्य पेशंट, कार्यकर्त्या मित्रांची.

सततचे जागते-खेळते घर. ऐतिहासिक दृष्टीने ह्या घराच्या दरवाजाला कधीही रात्रीची कडी लावली जात नसे. गेली अडीच वर्षे ह्या घरामध्ये महिन्याचे काही दिवस मी एकटाच असतो वसतीला. मीही घराची सवय मोडत नाही. ह्या घरातल्या बाबाच्या खोलीमध्ये मात्र मी आता जात नाही. मी त्या खोलीच्या दरवाजाबाहेरूनच कधी बाबाला साद घालतो.

अनेक घरांमध्ये असते तसे बाहेरच्या खोलीत एक कालनिर्णय टांगलेले असायचे. त्या कॅलेंडरवर माझ्या राहण्याचे दिवस 'मार्क' केलेले असत. ह्या काळात बाबा बाहेरचे कार्यक्रम घेत नसे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्हा दोघांची नवी नवी रेस्टॉरंट्स शोधायची सवय मागे पडली होती. घरगुती अन्नाशी असलेली बांधिलकी वाढलेली होती.

बाबाला हुक्की यायची पिझ्झा खायची. मग आम्ही ती ऑर्डर देण्याचाही उत्सव करायचो. खाणारी तोंडे वाढली की अशी ऑर्डर करायला मजा यायची. मुक्ता, यशो ह्या मुली आणि त्यांची कुटुंबे आली की जोरदार अंगतपंगत व्हायची.

माझ्या गळ्यात घालायची स्लिंग बॅग असते चामड्याची. त्याचे डिझाइन आणि ती ऑर्डर करून घेणे हे बाबाचे काम. अनेक वर्षे तो मला अनेक गोष्टी पुरवायचा. त्याची रुपयातली किंमत त्याला विचारणे हा गुन्हाच असायचा.

माझा मुलगा कबीर छोटा असताना दर भेटीमध्ये त्याच्यासाठी विशिष्ट चिवडा आणि श्रुजबेरी बिस्किटे ह्यांची भेटपाकिटे हजर असणारच. आजी होती तेव्हापर्यंत घरी केलेल्या खाऊचे डबे सवितासाठी म्हणून घेऊन यायचो. पुण्याला येण्यासाठी मी सकाळी सहाच्या सुमारास ठाण्याच्या घरातून निघतो. साडेसात ते पावणेआठ ह्या दरम्यान बाबाचा पहिला फोन... "कुठपर्यंत?"

आयुष्यभर इतके भटकलेला बाबा. पण त्याला घराचे वेड होते. त्याच्या त्या राज्यात तो सुखी असायचा. भिंतीवर लावलेले त्याचे फोटो, त्याची आणि इतरांची पेंटिंग्ज, सहजच नजर वेधून घेणारी त्याची काष्ठशिल्पे, दिवाळी ते दिवाळी बदलला जाणारा दिवाणखान्यातला कंदील (अर्थात नाइटलॅम्प) अशा वस्तू घराला जिवंत करायच्या.

आजी आणि ज्योतीच्या व्यवस्थितपणाला न जुमानता स्वतःची 'पसारा' हौस बाबा पूर्ण करायचा तो त्याच्या खोलीत. हा अगदी केंद्रशासित प्रदेश. आमच्या नजरेला न दिसणाऱ्या अनेक वस्तू त्या 'पिसाऱ्या'तून त्याच्या हाताला अलगद लागायच्या. त्याच्या कपड्याच्या कपाटातल्या एका फळीचा अर्धा हिस्सा त्याने माझ्यासाठी ठेवलेला. माझे कपडे,

टॉवेल मात्र अगदी घडी घालून ठेवलेले. बाहेर घालायच्या कपड्यांचा सेट ठेवला तर तोही कडक इस्त्री करून सज्ज.

कोरोना महासाथीच्या काळातही मी नियमितपणे पुण्याला यायचो. मुक्तांगणचे काम, पुण्याच्या आय.पी.एच. संस्थेतली रुग्णसेवा असे काम चालायचे. ह्या कालावधीमध्ये बाबाकडे राहायला येणारा मीच असायचो, त्या पत्रकारनगर वसाहतीमध्ये,

त्या काळात त्या सोसायटीच्या समिती सदस्यांनीही मला 'रहिवासी' असा दर्जा दिल्याने माझे येणे-जाणे सोपे झाले होते. ह्या काळात आम्हाला गप्पांसाठी वेळही खूप मिळायचा, घरात बसूनच मैफील जमवायची. जुने हिंदी-इंग्रजी

चित्रपट पुन्हा पुन्हा चवीने पाहायचे. गॉडफादर तर बाबाला 'फ्रेम बाय फ्रेम' पाठ होता.

हिंदी मथले जॉली एलएलबी, रुस्तुम, पिंक असे चित्रपटही तो तुकड्यातुकड्यात पाहायचा. जेम्स बॉण्ड आणि

हिचकॉक ही आमची अगदी कॉमन प्रेमप्रकरणे. ह्या शिवाय बाबा ज्या लेखन विषयाने पछाडला जायचा त्यावरच्या गप्पा. दर जूनमध्ये असायची ती दिवाळी अंकांमध्ये तो लिहिणार त्या लेखांची चर्चा. लेखाचा खर्डा लिहून झाला की वाचन.

कोणता लेख कोणत्या दिवशी अंकाला द्यायचा ह्यावर पुन्हा चर्चा. ह्या तीन महिन्यांत त्याचे लेखन अगदी 'पीक'ला असायचे. खरिपाचा हा हंगाम संपला की स्वारी स्वतःच्या मनमौजी अभ्यासाला तयार. एखाद्या विषयाची त्याला भूल पडली की तो पूर्ण नादावून जायचा. अशा प्रत्येक विषयाचे रूपांतर लेखनात व्हायचेच असे नाही.

कोरोना मावळतीला लागला आणि जीवन गती घेऊ लागले तसे त्याचे प्लॅन सुरू झाले होते नव्या प्रवासाचे. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी असे झटकेही त्याला यायचे. वेगवेगळ्या क्षेत्रातील 'दुरुस्ती' करणाऱ्यांचा त्याचा गटच होता. पुढेपुढे

हे सारे फोनही ज्योतीच करायची. बाबाच्या सकाळच्या मित्रांच्या भेटीसाठीच्या दैनंदिन प्रभातफेऱ्या पुन्हा चालू झाल्या आणि बावीस सालच्या

जानेवारीमध्ये घरातच पडण्याचे निमित्त झाले. त्यानंतर महिनाभरामध्ये ते घर रिकामे झाले ते कायमचेच. माझे वडील मला प्रत्यक्ष सहवासातून मिळाले बत्तीस वर्षे. ते गेले आणि त्यांची जागा घेणारा बाबा मिळाला तोही पुढची बत्तीस वर्षे.

त्या काळातच माझ्या आयुष्यातले काही महत्त्वाचे डाव विस्कटले आणि फिस्कटले. नव्याने आयुष्याची मांडणी करण्याच्या प्रवासात ऊब होती ती ह्या घराची. अठ्ठावीस वर्षांपूर्वी मी आणि सविताने लग्न करायचे ठरवले, तेव्हा तिच्या आईवडिलांची अधिकृत कुटुंबभेट घडवून आणायची होती. तेव्हा माझ्या बाजूने पालक म्हणून बाबा होता आणि मानसमाता म्हणून ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शोभा थत्ते. माझ्या आयुष्यातल्या हळव्या क्षणी, हरलेल्या काळात आणि हरखून जाण्याच्या प्रसंगांत हे घर माझ्यासोबत होते.

आता काही काळात ही कॉलनी जाणार पुनर्विकासाच्या वाटेने. गेले काही महिने आवराआवर सुरू आहे. मुक्तांगणला न्यायचे सामान, मित्रपरिवारात वाटायचे सामान अशी विभागणी सुरू आहे. बाबाचे सर्व कलासाहित्य व्यवस्थितपणे ठेवायच्या प्रकल्पात मुली यशो मुक्ता, भाची प्राजक्ता अशा साऱ्या मग्न आहेत.

दर पंधरा दिवसांनी मी आलो की एक नवा कोपरा रिकामा दिसतो, एक नवी भिंत ओकीबोकी असते. ज्या साऱ्याचे सर्जन होते त्या साऱ्याचे विसर्जन होते हा नियमच की सृष्टीचा. घरे तरी त्याला कशी अपवाद असणार.

मनाचे दरवाजे उघडे ठेवायला शिकवणारे हे घर आपली कात टाकणार आहे. टाकुनिया जीर्णजर्जर वस्त्रे... इथे नवीन वास्तूची निर्मिती होणार आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्या वास्तव्याची शेवटची रात्र त्या घरात घालवली. सकाळी डोळे भरून सारे घर न्याहाळले. दाराला कुलूप लावले. एक किल्ली खांद्यावरच्या बॅगेत टाकली आणि किल्ल्यांचा एक संपूर्ण गुच्छ मनाच्या कोनाड्यात जपून ठेवला.

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

संग्रहित

Link  : https://www.esakal.com/saptarang/psychiatrist-investigator-brown-sugar-problem-gard-book-rjs00

Monday, June 24, 2019

बातमी

राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याबाबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही ही बाब समोर आली आहे. यासाठी कायद्यात बदल करून अतिशय कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘मराठीच्या भल्यासाठी’या मंचाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक मराठी भाषेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची सक्ती तामिळनाडूच्या धर्तीवर झाले पाहिजे यासाठी विकास प्राधिकरण कायदा पावसाळी अधिवेशनात मंजूर करणे, मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी, शाळा बंद पडू नये यासाठी मराठी शाळांच्या गुणवत्तेबाब सक्षमीकरण करणे, मुंबईत मराठी भाषा भवन उभारणे, शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी परिपत्रक काढणे अशा मागण्या मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठाने केल्या आहेत. दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी सक्तीचे करण्यात यावे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/20/marathi-language-is-compulsory-in-all-education-boards.html

Friday, January 12, 2018

Interview ~ Sambhaji Bhide

‘If my words hurt sentiments of non-Hindus I cannot help it … my speeches meant to teach values of oneness’

January 12, 2018, 2:00 AM IST 




Blamed for sparking controversy which culminated in violence in Bhima Koregaon, founder of Shiv Pratishthan Hindusthan, octogenarian Sambhaji Bhide talks toSugandha Indulkar about the controversy and his worldview:


Were you in Bhima Koregaon on December 31 or January 1?
I have not stepped in that region since the past one-and-half to two years. On the said day I was attending NCP leader and former home minister, Jayant Patil’s mother’s last rites.
It has been alleged that your fiery speeches led to the attacks on January 1.
I do not agree. I have never made any controversial or fiery speeches. Wrong messages were doing the rounds on social media, which has led some segments of the society to believe that I gave some provocative speeches in Bhima Koregaon. This is totally wrong. In fact, my speeches are aimed to pacify disturbed minds and avoid disruption of peace and harmony in the society. My speeches are meant to teach values of oneness, compassion, and are filled with patriotic fervour.
Do your words provoke violence?
Misinterpretation of my words may provoke people to take wrong steps. But that does not mean I should stop directing my energies towards what I know are the highest ideals, by which all Indians should live. It is their lack of knowledge, which needs to be addressed.
How would you define Hindutva?
Lives of Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj epitomise Hindu religion completely. Their intelligence, values that they expressed throughout their lives and also in death are exemplary. Any life lived in sync with the principles laid down by this father-son duo is for me Hindutva or Hindu dharma.
Life of Sambhaji as brought to us through texts is quite controversial.
It is sad to see that many historians and littérateurs have misrepresented Chhatrapati Sambhaji. Even in the face of imminent death Sambhaji displayed immense courage and unmatched valour. He suffered extreme torture and brutality for 30 days, when he was imprisoned by Mughal emperor Aurangzeb. Therefore, I and many of my followers observe a 30 day period of grief, in memory of the great leader.
When you voice your views so vehemently do you hurt the sentiments of non-Hindus which results in widening the rift in Indian society at large?
If my words hurt the sentiments of non-Hindus, I cannot help it. I am stating the truth with the sole aim of unifying all Indians. India is the land of Hindus. Hinduism is not just a religion – it is a way of life. One which has taught us values of truth, peace, harmony, compassion towards all living beings. We have been taught lessons of ‘vasudhaiva kutumbakam’, the whole world is one family.
Hinduism is arguably the only religion in the world which treats all living beings at par with humans as well. We believe in the presence of a soul which exists in every living organism – right from plants to animals. Furthermore, we also believe that the soul is an integral part of the supreme soul or the highest one. At the same time, human beings have a mind of their own, which is subject to wrong influences, which may lead to certain wrong actions. My aim is clear – to instil patriotic fervour and inspire people to dedicate themselves to the cause of their people and their nation.
Do you believe in caste system?
I have never given any importance to caste, creed, gender, educational and economic background of any person. The sun, moon, trees and mountains do not have any caste – human values, a strong character and values of love for the nation and extraordinary dedication to upholding the values of truth, peace and harmony is all that matters for me. Anyone who possesses these qualities and expresses them through his life, irrespective of his caste is someone I would respect totally.
You are a gold medallist in nuclear physics. Yet you do not use any footwear and ride a bicycle. Why?
My parents have imbibed in me values of patriotism and dedication to the motherland. Nothing else matters, therefore my lifestyle is simple and I dedicate all my energies to uphold these principles. I do not wear footwear because our tradition says that a celibate should not wear any footwear.