Saturday, September 2, 2017

क़ुर्बतें होते हुए भी फ़ासलों में क़ैद है

#hindi

क़ुर्बतें होते हुए भी फ़ासलों में क़ैद हैं

#सलीम_कौसर

क़ुर्बतें होते हुए भी फ़ासलों में क़ैद हैं
कितनी आज़ादी से हम अपनी हदों में क़ैद हैं
कौन सी आँखों में मेरे ख़्वाब रौशन हैं अभी
किस की नींदें हैं जो मेरे रतजगों में क़ैद हैं
शहर आबादी से ख़ाली हो गए ख़ुश्बू से फूल
और कितनी ख़्वाहिशें हैं जो दिलों में क़ैद हैं
पाँव में रिश्तों की ज़ंजीरें हैं दिल में ख़ौफ़ की
ऐसा लगता है कि हम अपने घरों में क़ैद हैं
ये ज़मीं यूँही सिकुड़ती जाएगी और एक दिन
फैल जाएँगे जो तूफ़ाँ साहिलों में क़ैद हैं
इस जज़ीरे पर अज़ल से ख़ाक उड़ती है हवा
मंज़िलों के भेद फिर भी रास्तों में क़ैद हैं
कौन ये पाताल से उभरा किनारे पर 'सलीम'
सर-फिरी मौजें अभी तक दाएरों में क़ैद हैं

Friday, September 1, 2017

माणुसकीचा मोठेपणा ~ शंकर कवळे


सातारा जिल्ह्यातील मरळी गावच्या शंकर कवळे या लेखकाचा धडा सातवीच्या सुगमभारती या पुस्तकात आलाय.कवळे उदरनिर्वाहासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम करतात. शेतातही मजुरीला जातात.
संपत लक्ष्मण मोरे 
fb share @Sandip R Chavan

एक लेखक मोलमजुरी करणारा

एक लेखक मोलमजुरी करणारा...

संपत मोरे 

पावला-पावलावर धक्के बसत असतात. संभ्रम निर्माण होत असतात. भ्रम दूर होत असतात. हा ही एक मोठा धक्काच की, पाठ्यपुस्तकात ज्या लेखकाचा धडा असावा, तो लेखक एका झोपडीत राहावा, पोटापाण्यासाठी त्याने गुरं राखावी, गवंड्याच्या हाताखाली मजुरी करावी...
सातारा जिल्ह्यातील मरळी येथील शंकर कवळे यांचा एक धडा सातवीच्या ‘सुगम भारती’ पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. उर्दू, कन्नड, गुजराती कन्नड, सिंधी, तेलगू या माध्यमातील पुस्तकातही त्यांच्या धड्याचा समावेश झाला आहे. म्हटली तर ही नित्याची बातमी परंतु या माहितीसोबत कवळे हे उदरनिर्वाहासाठी गवंड्याच्या हाताखाली मजुरी करतात, ही माहिती नित्याची नव्हे तर खऱ्या अर्थाने धक्का देणारी आहे. आज आता बातम्या वाचून लोक त्यांना आवर्जून भेटायला येताहेत. मात्र, कालपरवापर्यंत हा अस्सल मातीतला लेखक उपेक्षेचं जीणं जगत होता हे वास्तव अस्वस्थ करणारं आहे.

शंकर कवळेंच्या घराकडं जाणारा रस्ता छोटाच. एक गल्ली पार केल्यावर आपण लेखकाच्या दारात पोहोचतो. घर एकदम साधं. दगडमातीचं. आत लहान मूल रडत होतं. बाहेरून आवाज दिल्यावर साधारण तीस-एक वर्षाच्या बाई बाहेर आल्या.
"लेखक आहेत?’
"आवं ते जळण आणायला डोंगरावर गेल्याती. या की आत...’
मग त्यांनी हाक मारून एका पोराला बोलावून घेतलं.
"डोंगरात जाऊन ह्यास्नि घेऊन ये. पावनं आल्याती म्हणावं’

मी घरात गेलो, तिथं अाणखी एक बाई होत्या. या लेखकाच्या बहीण. त्यांचं सासर चाफळ. भावाला भेटायला आल्या होत्या. त्या सांगू लागल्या, "भावाला पैल्यापासून वाचायचा नाद हाय. घरात माणसासंग कवा बोलत नसायचा. सारखं पुस्तकात डोकं घालून बसायचा.’ त्या भावाबद्दल सांगत असतानाच, दारात डोक्यावर मोळी घेऊन एक जण आला. हेच लेखक शंकर कवळे! कवळेंनी डोक्यावरची मोळी खाली ठेवली. उन्हातून आल्यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. घाम पुसत कवळे आत आले. माझ्यासमोर बसले. एकदम साधा माणूस. त्यांना पाहून हे लेखक अाहेत, असं सांगितलं तर कोणाला पटणार नाही. ते बोलायला लागले. बोलणं एकदम शांत. शब्दात ओलावा.
ते सांगू लागले, ‘आमची घरची परिस्थिती गरिबीची. आई-वडील शेतमजुरी करायचे. त्यांनी खूप काबाडकष्ट करून आमचा सांभाळ केला. हालाखीच्या परिस्थितीत मला बारावीपर्यंत शिकवले. बारावी पास झालो. पुढच्या शिक्षणासाठी मला कराड किंवा सातारला जाणं गरजेचं होतं, पण पुढं शिकण्याइतकी आमची परिस्थिती नव्हती. मग मी शाळा सोडली आणि गावातील लोकांची गुरं राखायला जायला लागलो. सकाळी गुरं सोडायची, संध्याकाळी परत यायचं. दिवसभर गुरांमागं डोंगरावर असायचो. सुरुवातीला दिवसभर नुसताच बसून असायचो. पण एक दिवस माझ्या थोरल्या भावाने मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ कादंबरी वाचायला दिली. ती कादंबरी देहभान विसरून एका दिवसात वाचली. कादंबरी वाचताना सगळं चित्र डोळ्यासमोर उभा राहत होतं. या पुस्तकाने मला खूप आनंद दिला, मग भावाकडून दुसरं पुस्तक घेतलं. मग तिसरं. या काळात इतका झपाटून गेलो होतो की, जे मिळालं ते पुस्तक वाचत होतो. गुरांमागे रोज एक पुस्तक वाचत होतो. पुस्तक नसलं की त्या दिवशी मला करमत नसे, एवढा वाचनाचा नाद मला लागला. घरात वीज नव्हती. एकच रॉकेलचा दिवा होता. त्यामुळं रात्रीचं वाचायला जमायचं नाही. कधी उजाडतंय आणि कधी वाचत बसतोय, असं वाटायचं. पुढे दिवस उजाडला की, पुस्तकाच्याच नादात असायचो.
चार पाच वर्षे असं वाचल्यावर मला वाटायला लागलं, पुस्तकात जशा गोष्टी आहेत, तशा आपल्याही भागात, गावात घडतात, मग आपणही त्या लिहाव्यात. मग लिहायला येतंय का म्हणून बसलो, तर एका महिन्यात हुंडाप्रथेवर आधारित ‘आरती’ ही कादंबरी लिहून झाली. ती कादंबरी अनेक दिवस घरात होती. एक दिवस पेपरात नवीन लेखकाचे लिखाण प्रसिद्ध करण्याबाबतची जाहिरात वाचली. पुण्याला जाऊन प्रकाशकांना भेटलो. कादंबरी प्रकाशित करण्यासाठी त्यांनी पैसे मागितले. माझ्याकडे पैसे नव्हते. मी आईला सांगितले. तिने आणि बहिणीने शेतमजुरी करून साठवलेले साडेसात हजार पैसे दिले. पुस्तक छापल्यावर पैसे मिळतील, अशी आशा होती. पुस्तक छापून पाच सहा महिने उलटले. आई पैशाचं विचारायला लागली. मग प्रकाशकांना भेटायला गेलो.त्यांनी दहा हजाराचा चेक दिला. तो घेऊन आलो. बँकेत गेलो, तिथं म्हणाले ‘खाते काढायला हवे' त्यासाठी पैसे नव्हते.मग घरी गेलो. दुसऱ्या दिवशी एकाकडून उसने पैसे घेऊन आलो. खाते काढले. चेक भरला. पंधरा दिवसांनी बँकेत गेलो, तर कळलं. प्रकाशकाने दिलेला चेक वठलेलाच नाही. प्रकाशकांना फोन केला, तर ते म्हणाले ‘थोडे दिवस थांब रोख पैसे देतो' त्यांनतर वर्षभर त्यांना फोन करत होतो, पत्र लिहीत होतो. शेवटी, एक वर्षांनी त्यांनी मला दीड हजार दिले. माझे साडेसात हजार गेलेले आणि मला मिळाले दीड हजार, तेही एका वर्षानी. मी खूप निराश झालो.’ लेखक कवळे त्याच्या लिखाणाची सुरुवात आणि पहिल्या कादंबरीनंतरचा निराशाजनक अनुभव मला सांगत होते.
अर्थात, पहिलाच अनुभव वाईट आला म्हणून लेखक खचले नाहीत. त्यांनी ‘बिजली’, ‘अनुराग’ या कादंबऱ्या, ‘खरा माणूस’, ‘माणुसकीचा मोठेपणा’, ‘बुद्धिमान बिरबल’ हे कथासंग्रह आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं चरित्र अशी सहा पुस्तकं लिहिली. या पुस्तकांतूनही त्यांना फारशी आर्थिक प्राप्ती झाली नाही. ‘आपल्याजवळ जे सांगण्यासारखं आहे, ते सांगायचं'याच निष्ठेने कवळे लिहीत राहिले. गावच्या पश्चिमेला असणारा डोंगर, गावातील जोतीबाचं मंदिर हीच त्यांच्या लिखाणासाठी निवांत ठिकाणं बनली. लिखाण करता-करताच ते गुरे राखण्याचे काम करत होते. त्यातही फारसे पैसे मिळायचे नाहीत. अशा वेळी लिखाणासाठी लागणारे कागद, पेन हे साहित्य आई घेऊन देत होती. आईच्या पाठबळावर ते लिहीत होते. लग्न होईपर्यंत त्यांचं लिखाण सुरू राहिलं. लग्नानंतर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. कामासाठी बाहेर पडणं गरजेचं बनलं. त्या ओढाताणीत लिखाण बंद झालं. घर चालवण्यासाठी हा लेखक शेतात भांगलण करायला गेला. गवंड्याच्या हाताखाली मजुरीला गेला. एका टप्प्यावर त्यांचं लिखाण पूर्णपणे थांबलं. ते फाटका संसार सावरण्याचा चक्रात अडकले.
गेल्या वर्षी पुण्यातील विलास वाघ यांच्या ‘सुगावा' मासिकात त्यांनी ‘लोकशाही’ या विषयावर एक लेख लिहिला. जयसिंगपूर येथील एका वाचकाने तो लेख वाचून त्यांनी कवळेंना त्यांचे साहित्य पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पाठवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कवळेंनी त्यांचे साहित्य पाठवले. काही दिवसांनी कवळे यांना बोलावून त्यांचा धडा ‘सुगम भारती’च्या सातवीच्या अभ्यासक्रमात येणार असल्याची माहिती दिली गेली. तरीही ‘आपला धडा पुस्तकात येणार’ यावर त्यांचा विश्वास बसला नाही. एक दिवस त्यांना पाठ्यपुस्तक महामंडळाचे पुस्तक मिळाले. त्यातील स्वतः लिहिलेला‘माणुसकी आणि मोठेपणा' हा धडा पाहून लेखक गहिवरून गेला. आपल्या आजवरच्या कष्टाचं चीज झालं ही भावना मनात दाटून आली. तो धडा पाहून सहज तोंडून उद्गार निघाले, "हे बघायला माझी आई पायजे हुती...’ ते ऐकून घरातील इतर भावंडंही रडायला लागली. म्हातारीच्या आठवणीनं सगळ्यांचे डोळे भरून आले...
पुस्तकात धडा आल्यावर कवळे यांना वाटलं, ही बातमी पेपरला देऊया. पण बातमी द्यायला सातारला जायला हवं. त्यांच्याकडे एसटी भाड्यालाही पैसे नव्हते. एक दोघांकडे मागितले, पण मिळाले नाहीत. मग त्यानं पोराच्या गळ्यातील सोन्याचा बदाम विकला. त्यातून जे पैसे मिळाले त्यातून ते सातारला गेले आणि बातमी देऊन आले. या बातमीनंतर ‘शंकर कवळे यांचं लेखन, त्यांचं जगणं, त्यांचा आजवरचा संघर्ष' या गोष्टी समाजासमोर आल्या.

आता शंकर कवळे यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातून लोक येत आहेत. मात्र, त्यांचं राहतं घर पाहून येणारा प्रत्येक माणूस हळहळतोय. सरकारच्या गोरगरिबांसाठी अनेक योजना आहेत. पण या योजना अजून तरी शंकर कवळे यांना त्यांच्या चंद्रमौळ्या झोपडीतून बाहेर काढू शकलेल्या नाहीत. त्यांनी घर मिळावं म्हणून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत, पण शासकीय नियमाप्रमाणे घराला जेवढी जागा लागते तेवढी कवळे यांच्याकडे नाही, त्यामुळे त्यांना घर मिळत नाही. गेल्या वर्षीपर्यंत त्यांच्या घरी वीज नव्हती. त्यांचं तान्ह मूल अंधारात सारखं रडायचं, हे पाहून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना विजेच कनेक्शन घेऊन दिलं. वीज आलेली आहे, पण गॅस अजूनही नाही. पाठ्यपुस्तकात धडा असलेल्या या लेखकाच्या घरी आजही चुलीवर स्वयंपाक केला जातो आहे. त्यासाठी लागणारं जळण लेखक डोंगरावर जाऊन आणत आहेत...
एका आडवळणी गावच्या शंकर कवळे यांचा धडा पुस्तकात आला म्हटल्यावर लोक कौतुकाने हार आणि शाल घेऊन येत आहेत. पण या फुलांच्या हाराने कवळे यांच्या आयुष्यात सुगंध येणार नाही. किंवा सत्काराच्या शालीने त्यांचं दारिद्रही झाकलं जाणार नाही. पूर्वी गरिबी याचं कारणांमुळे कवळे, यांचं लिखाण थांबलं होतं. ते उपेक्षेच्या अंधारात गेले होते.पण ‘सुगम भारती’तील धड्यामुळे प्रसिद्धीचा सगळा झोत, कवळेच्या चंद्रमौळी झोपडीवर पडलाय. हा झोत काही दिवस राहीलही, पण या झोताच्या प्रकाशात दिसणारा त्यांचा फाटका संसार कसा सावरला जाणार? असा सवाल कवळेंच्या घराची खचलेली भिंत विचारत आहे...
sampatmore21@gmail. com
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sampat-more-writes-about-writer-shankar-kawle-5679516-NOR.html


Saturday, July 1, 2017

Friday, June 23, 2017

Thursday, June 22, 2017

लग्नपत्रिका इतिहास

पूर्वी आपल्याकड़े विवाहपत्रिकेत विवाह

पत्रिकेत शब्दांचा फाफटपसारा न मांडता थेट

"शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे."

असे लिहीत. (सीधी बात,नो बकवास!)

अशी होती लो.टिळकांचे पुत्र श्रीधरपंत यांची विवाहपत्रिका.

(Courtsey- "Shridhar Balwant Tilak" by Anant Deshmukh. A Biography)

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156108963164409&id=682939408

Saturday, June 17, 2017

Friday, June 16, 2017

निर्वाण षटकम्

॥ निर्वाण षटकम्॥
मनो बुद्ध्यहंकारचित्तानि नाहम् न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे
न च व्योम भूमिर् न तेजॊ न वायु: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
न च प्राण संज्ञो न वै पञ्चवायु: न वा सप्तधातुर् न वा पञ्चकोश:
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायू चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भाव:
न धर्मो न चार्थो न कामो ना मोक्ष: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खम् न मन्त्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा:
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
न मृत्युर् न शंका न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म
न बन्धुर् न मित्रं गुरुर्नैव शिष्य: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
अहं निर्विकल्पॊ निराकार रूपॊ विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्
न चासंगतं नैव मुक्तिर् न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
English Transliteration:
Mano Budhyahankaar Chitani Naaham, Na Cha Shrotra Jihve Na Cha Ghraana netre
Na Cha Vyoma Bhumir Na Tejo Na Vayuh, Chidananda Rupah Shivoham Shivoham
Na Cha Praana Sanjno Na Vai Pancha Vaayuhu, Na Vaa Sapta Dhaatur Na Va Pancha Koshah
Na Vaak Paani Paadau Na Chopasthapaayuh, Chidaananda Rupah Shivoham Shivoham
Na Me Dvesha Raagau Na Me Lobha Mohau, Mado Naiva Me Naiva Maatsarya Bhaavah
Na Dharmo Na Chaartho Na Kaamo Na Moksha, Chidaananda Rupah Shivoham Shivoham
Na Punyan Na Paapan Na Saukhyan Na Dukham, Na Mantro Na Tirthan Na Vedaah Na Yajnaah
Aham Bhojanan Naiv Bhojyan Na Bhoktaa, Chidaananda Rupah Shivoham Shivoham
Na Mrityur Na Shanka Na Me Jaati Bhedah, Pitaa Naiva Me Naiva Maataa Na Janma
Na Bandhur Na Mitram Guru Naiva Shishyah, Chidaananda Rupah Shivoham Shivoham
Aham Nirvikalpo Niraakaara Rupo, Vibhutvaaccha Sarvatra Sarvendriyaanaam
Na Chaa Sangatan Naiva Muktir Na meyah Chidananda Rupah Shivoham Shivoham
Meaning:
1) I am not mind, nor intellect, nor ego, nor the reflections of inner self. I am not the five senses. I am beyond that. I am not the ether, nor the earth, nor the fire, nor the wind (i.e. the five elements). I am indeed, That eternal knowing and bliss, Shiva, love and pure consciousness.
2) Neither can I be termed as energy (Praana), nor five types of breath (Vaayu), nor the seven material essences (dhaatu), nor the five coverings (panca-kosha). Neither am I the five instruments of elimination, procreation, motion, grasping, or speaking. I am indeed, That eternal knowing and bliss, Shiva, love and pure consciousness.
3) I have no hatred or dislike, nor affiliation or liking, nor greed, nor delusion, nor pride or haughtiness, nor feelings of envy or jealousy. I have no duty (dharma), nor any money, nor any desire (refer: kama), nor even liberation (refer: moksha). I am indeed, That eternal knowing and bliss, Shiva, love and pure consciousness.
4) I have neither virtue (punya), nor vice (paapa). I do not commit sins or good deeds, nor have happiness or sorrow, pain or pleasure. I do not need mantras, holy places, scriptures, rituals or sacrifices (yajna). I am none of the triad of the observer or one who experiences, the process of observing or experiencing, or any object being observed or experienced. I am indeed, That eternal knowing and bliss, Shiva, love and pure consciousness.
5) I do not have fear of death, as I do not have death. I have no separation from my true self, no doubt about my existence, nor have I discrimination on the basis of birth. I have no father or mother, nor did I have a birth. I am not the relative, nor the friend, nor the guru, nor the disciple. I am indeed, That eternal knowing and bliss, Shiva, love and pure consciousness.
6) I am all pervasive. I am without any attributes, and without any form. I have neither attachment to the world, nor to liberation. I have no wishes for anything because I am everything, everywhere, every time, always in equilibrium. I am indeed, That eternal knowing and bliss, Shiva, love and pure consciousness.

Monday, May 22, 2017

क़हर है मौत है क़ज़ा है इश्क़

क़हर है मौत है क़ज़ा है इश्क़
सच तो यूँ है बुरी बला है इश्क़
असर-ए-ग़म ज़रा बता देना
वो बहुत पूछते हैं क्या है इश्क़
आफ़त-ए-जाँ है कोई पर्दा-नशीं
कि मिरे दिल में आ छुपा है इश्क़
बुल-हवस और लाफ़-ए-जाँ-बाज़ी
खेल कैसा समझ लिया है इश्क़
वस्ल में एहतिमाल-ए-शादी-ए-मर्ग
चारागर दर्द-ए-बे-दवा है इश्क़
सूझे क्यूँकर फ़रेब-ए-दिलदारी
दुश्मन-आश्ना-नुमा है इश्क़
किस मलाहत-सिरिश्त को चाहा
तल्ख़-कामी पे बा-मज़ा है इश्क़
हम को तरजीह तुम पे है यानी
दिलरुबा हुस्न ओ जाँ-रुबा है इश्क़
देख हालत मिरी कहें काफ़िर
नाम दोज़ख़ का क्यूँ धरा है इश्क़
देखिए किस जगह डुबो देगा
मेरी कश्ती का नाख़ुदा है इश्क़
अब तो दिल इश्क़ का मज़ा चक्खा
हम न कहते थे क्यूँ बुरा है इश्क़
आप मुझ से निबाहेंगे सच है
बा-वफ़ा हुस्न ओ बेवफ़ा है इश्क़
मैं वो मजनून-ए-वहशत-आरा हूँ
नाम से मेरे भागता है इश्क़
क़ैस ओ फ़रहाद ओ वामिक़ ओ 'मोमिन'
मर गए सब ही क्या वबा है इश्क़

~ मोमिन ख़ाँ मोमिन

Wednesday, May 17, 2017

अतुल तापकीरने एक्झीट का घेतली ?

*अतुल तापकीरने एक्झीट का घेतली ?*
लग्न ही ज्यांच्यासाठी नजरकैद आहे, पारतंत्र्य आहे, त्यांनी त्यातून लवकरात लवकर बाहेर पडलेलं बरं. मध्यंतरी साम टीव्ही चे संपादक संजय आवटे Sunjay Awate सावित्री उत्सवात म्हणाले होते, लग्न जितकं सोपं आहे, तितका घटस्फोटही सोपा असला पाहिजे.
पटत नसतानाही जोरजबरदस्तीचा मामला का ? खरं तर, स्वातंत्र्य कोणाला नको असते ? स्रीयांनाही ते हवंच असतं की...पण इथे पारतंत्र्यापेक्षा गंभीर समस्या आहे, सामाजिक सुरक्षिततेची !!! परंपरेने लादलेल्या परावलंबित्वाची !!!
नसती झंझट नको म्हणून तथाकथित प्रतिष्ठा जपण्यापायी मुलीचं लग्न उरकणारा समाज आहे आपला. अशावेळी तिच्या आवडीनिवडींना फार स्थान नसतंच. मग तीही तडजोडीची मानसिकता जोपासत जगते.
आपुलकीच्या, परस्पर आदराच्या नात्याची भावना जावून मालकी हक्काची भावना आली की तिथून घर विस्कटायला सुरूवात होते. संवाद तुटतो. दुरावा निर्माण होतो. अंतर वाढतं. पण तरीही बळेने हजारों जोडपी एका छताखाली वावरत असतात.
आपल्याकडच्या समाजव्यवस्थेनुसार तिला माहेर आधीच तुटलेलं असतं. सासर तुटू नये, यासाठी ती जंग जंग पछाडते. आपलं पुढे काय होईल, या चिंतेने भयभीत होऊन ती सहकाऱ्याला सतत दबावाखाली ठेवू पाहते. कधी जीव द्यायच्या, कायदेशीर कारवाईच्या अधूनमधून धमक्या देते. त्याचाही पुरूषी अहंकार उफाळून येत असतो. त्याच्याकडे शिवीगाळीचा, मारझोडीचा पर्याय असतो. नात्यातून बाहेर पडायच्या मानसिकतेपर्यंत परिस्थिती दोघांना घेऊन जाते. पण तिच्या पुढे फक्त अंधार वाढून ठेवलेला असतो आणि त्याला फौजदारी कारवाईची, वयोवृध्द आईवडिलांच्या ससेहोलपटीची, सामाजिक प्रतिष्ठेची चिंता असते.
इथे मनं जुळवणारी किंवा परस्पर सहविचाराने विभक्त होण्याचा सल्ला देणारी कुटुंब कल्याण केंद्रे नाहीत, तर, परत जर तक्रार आली तर ' आत टाकू ' असं धमकावणारी ' महिला तक्रार निवारण समिती ' च्या रूपात एक अपरिपक्व एकांगी, अशा विषयांच्या नाजूक पदरांच्या अभ्यासाचा अभाव असलेली संवेदनशून्य सरकारी उपाययोजना आहे.
घराबाहेर जीणं महाग, खडतर, हराम करणाऱ्या शेकडो समस्या आ वासून उभ्या असलेल्या आणि घराकडे परतावं, तर नकळत चीडचीड निर्माण करणारं विसंवादी नातं डोळ्यासमोर येतं. इच्छा नसतानाही परतावं लागतंच. टोमणे स्वागताला असतात. प्रत्येक रात्र कूस बदलत, तळमळत जाते. उलटसुलट विचार, शक्यता झोपू देत नाहीत...
या वातावरणाचा दुष्परिणाम तब्येतीवर होतो. आवडनिवड, छंद हरवत जातात आणि मनाचा, मेंदूचा ताबा वैफल्यग्रस्ततेकडे कधी जातो, थांगपत्ताही लागत नाही. या परिस्थितीत तथाकथित मित्रमंडळी समजूत काढण्यापलिकडे, थातुरमातुर सांत्वन करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत. पण आतून एकच आवाज येतो....एक्झीट !!! जी अतुल तापकीरने घेतली ...
~ Rajesh Salvi

Tuesday, May 16, 2017

निमित्त 'कासव'

निमित्त 'कासव'

मुलाखत: सोनाली नवांगूळ
https://www.facebook.com/sonali.navangul
सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर हे दिग्दर्शकद्वय एकेक विषय घेऊन निराळ्या धाटणीनं विचार देऊ पाहतात. ‘कोड’, ‘स्किझोफ्रेनिया’, ‘अल्झायमर’ अन् अशा कितीतरी ‘जगां’ना पाहणं-समजून घेणं असा विस्तीर्ण उलगडा त्यांनी केला आहे. ‘दोघी’पासून ‘कासव’पर्यंत १४ पूर्ण लांबीचे सिनेमे, सुमारे ७० कथात्मक माहितीपट, सहा टेलिमालिका असा ऐवज गेल्या तीन दशकांहून अधिक काळ देत त्यांनी मराठी प्रेक्षकांना सजग बनवलं आहे. नुकतंच त्यांच्या ‘कासव’ला राष्ट्रीय सुवर्णकमळ मिळालं. त्यानिमित्त सिनेमा, दृश्य माध्यमं, त्यामुळे होणारे बदल यांसारख्या विषयांवर 
सुनील सुकथनकर यांच्याशी संवाद
सिनेमातून सामाजिक प्रश्न परिणामकारक मांडता येण्यानं काही बदलतं का? काय बदलतं?
काहीवेळा हा प्रश्न विचारला जातो तो ‘असं घडणं कसं शक्य आहे?’ या रोखानं. ‘समाज’ अशा कुठल्या कृतीनं बदलत नसतो असं मानायला समाजाला आवडतं. अशा एखाद्या पुस्तकानं, सिनेमानं, भाषणानं, आंदोलनानं समाज बदलतो असं असत नाही. ही प्रक्रिया खूप सावकाश चालणारी असते. मग या सगळ्या खटाटोपाचं कारण काय? मला वाटतं, समाजमन अनेक गोष्टींच्या प्रक्रियेतून बदलत असतं. एकेक व्यक्ती बदलत जाते नि हळूहळू समाज बदलतो. तर मग प्रत्येक व्यक्तीच्या मनावर परिणाम करण्याची ताकद या माध्यमात आहे की नाही? तर आहेच! दुसरा मुद्दा असा की, ‘लोकांच्या मनावर परिणाम करण्यासाठी बनवलेले सिनेमे’ अशी काहीतरी ‘कॅटेगरी’ आहे अशा प्रकारची आरोपात्मक दिशा असा प्रश्न विचारण्यामागे असते. मनोरंजनपर सिनेमा बनवणाऱ्यांमध्येही हा रोख असतो. ते म्हणतात, ‘संदेश देणारे सिनेमे का बनवायचे? आम्ही काय ठेका घेतलाय का समाज सुधारण्याचा?’ - मला वाटतं, प्रत्येक सिनेमा त्याची त्याची सामाजिकता, भावनिकता, मानसिकता या सगळ्यासहित त्याची मूल्यव्यवस्था घेऊन येत असतो. कुठल्याही मनोरंजक म्हणवल्या जाणाऱ्या सिनेमाचीही स्वत:ची अशी व्हॅल्यू सिस्टीम असते. व्यावसायिक सिनेमांशी आम्हा अनेकांचं जे भांडण आहे ते मूल्यव्यवस्थेशी आहे, मनोरंजनाशी नाहीये. उदा. शोले. कैद्यांमध्येसुद्धा अशी काहीतरी ताकद आहे की जे एका गावाच्या बाजूनं उभे राहतील व त्यांना छळणाऱ्या डाकूंशी सामना करण्यासाठी तयार होतील या प्रकारचं हृदयपरिवर्तन शक्य आहे हे आपण त्यात पाहिलं. हे सगळं मनोरंजनातून सांगितल्यामुळं ‘शोले’ला कुणी शैक्षणिक सिनेमा म्हणणार नाही. - पण त्यामध्ये ही मूल्यव्यवस्था गृहीत धरली आहे. ‘घरवाली बाहरवाली’सारखा सिनेमा नुसती करमणूक होते म्हणून पाहून सोडून देणं शक्य होत नाही. कारण त्यातली मूल्यव्यवस्था ज्यात एक पुरुष, त्याच्या दोन बायका, दोघींनी त्याला उपलब्ध असणं, त्याविषयीची गंमत तयार करणं यानं ती मूल्यव्यवस्था पोसली जाते. यात समाजव्यवस्था पुरुषप्रधान असेल, बाईला दुय्यम स्थान असेल, स्त्रीचं वस्तुकरण असेल, हिंसाचाराचं, गुन्हेगारीचं उदात्तीकरण असेल या सगळ्या गोष्टींतून या मूल्यव्यवस्था मनोरंजनपर सिनेमात घुसडल्या जातात म्हणून तो समाजावरती वाईट परिणाम करणारा ठरतो. यापेक्षा वेगळं सांगणारा सिनेमा निश्चितपणे उलटा परिणाम करणारा ठरेल.
 
एकेक रोग अथवा प्रश्न घेऊन तुम्ही सिनेमा बनवता असा एक आक्षेप घेतला गेलाय...
हं, इश्यूबेस्ड फिल्म. समाजामध्ये जे जे काही ना काही सोसणारे गट आहेत मग स्किझोफ्रेनिया, अल्झायमर्स, माहिती अधिकाराबद्दल धडपडणारे असे कुठल्याही प्रश्नांनी ग्रासलेले लोक. अशा माणसांचं कथानक मुख्य प्रवाहातल्या कथानकांमध्ये आणणार की नाही? या निर्मितीचा हेतूच हा आहे की जेव्हा तुम्ही मुख्य प्रवाहात असा एखादा विषय आणता तेव्हा त्या विषयाचं गांभीर्य मोठ्या समाजापर्यंत पोहचेल. दुसरा मुद्दा असा की इश्यूबेस्ड फिल्म्स कशा बनवायच्या? सध्या मराठीत अनेक सिनेमे मोठ्या प्रमाणात असे इश्यू घेऊन बनवलेले दिसतात. अनेकदा ते सिनेमे पाहताना लक्षात येतं की संबंधिताचा त्या विषयाचा अभ्यास नसतो, अत्यंत ढोबळ मांडणी असते, या विषयाच्या पलीकडे काही वेगळी चांगली मूल्यव्यवस्थाच त्यांच्या मनामध्ये नसते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये आमचा प्रयत्न हा केवळ इश्यू मांडण्याचा नसून त्याबरोबरीने त्याचं जास्त मोठ्या तत्त्वज्ञानात रूपांतर करणं शक्य आहे का हे करून बघणं हा आहे. तुम्ही जेव्हा अल्झायमर घेता तेव्हा लक्षात येतं की माणसाची स्मरणशक्ती जाते म्हणजे तुम्ही जुन्या सगळ्या आठवणींच्या साखळीत अडकून राहण्यातून मुक्त होता. एक वेगळं तत्त्वज्ञान त्यामध्ये सापडलं. हे मग प्रत्येक माणसाला लागू पडतं. ‘नितळ’ मध्ये माणसाच्या मनातलं सौंदर्य आणि वरकरणी असलेलं सौंदर्य याचं नेमकं काय नातं आहे? वैवाहिक संबंध त्यावर अवलंबून असतात का? - असा प्रश्न चाळवला जातो. स्किझोफ्रेनिया हा विषय घेतल्यावर लक्षात आलं की माणसाचं आणि निसर्गाचं जे नातं आहे त्या तुटकपणात एकप्रकारे स्किझोफ्रेनिया लपलेला आहे की काय? अशी मोठ्या तत्त्वज्ञानापर्यंत घेऊन जाण्याची आस असेल तर तो सिनेमा नुसता इश्यू ओरिएंटेड राहत नाही. ही टीका अनेकदा न पाहताच केलेली असते. आणि महत्त्वाचा मुद्दा हा की हे सगळे घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावले गेले असतील तर हळूहळू असे सिनेमे बनवण्याची गरजच पडणार नाही. अशी पात्रं मग मुख्य कथानकाच्या प्रवाहात सहजगत्या येतील. चेन्नईला अ‍ॅबिलिटी फेस्टिव्हलमध्ये आम्ही ‘देवराई’ दाखवला होता. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असण्यानसण्याच्या फिल्म्स होत्या. तिथे अनेकांनी म्हटलं होतं, की कुठल्याही प्रकारे शारीरिक क्षमतांमध्ये कमीअधिक असणं-नसणं असतं तेव्हा त्या पद्धतीची पात्रं सहज म्हणून का येत नाहीत? तुम्हाला अंध व्यक्तीचा प्रश्न मांडणारी स्टोरी करायची काय गरज असते? अमुक इतकी माणसं आहेत व त्यात एक पात्र अंध आहे असं करता येतं की! मला आवडलं नि वाटलं की त्यात या इश्यूजबद्दल ना क्रिटिसिझम आहे, ना ग्लोरिफिकेशन आहे, ना इश्यू बेस्ड पद्धतीनं त्यांना एक्सप्लॉईट केलेलं आहे. हे सगळं आजघडीला नसल्यामुळे गरज तयार होते.
 
दृश्यमाध्यमाचा परिणाम खूप होत असतो म्हणून सिनेमा मूलभूत शिक्षणाचा भाग झाला तर?
सिनेमा शिक्षणाचा भाग आहेच, फक्त त्याला अ‍ॅकनॉलेज करण्याची गरज आहे. मुलं पंचविशीची होईपर्यंत ती काय शिकताहेत याचा पालकांना पत्ताच नसतो. शाळा-कॉलेजात मुलांना घातल्यानंतर ते नेमून दिलेलं शिकताहेत असा पालकांचा समज असतो. पण मुलं अनेक गोष्टी तंत्रज्ञानाच्या मदतीनं शिकत चाललेली असतात. लहान मुलांना मुद्दाम ‘सो कॉल्ड’ लहान मुलांच्या फिल्म्स दाखवणं हा बाळबोधपणा आहे. शाहरुखचाच सिनेमा तो बघणारे तेव्हा त्या सिनेमातून काय दिसतंय यातले खाचखळगे आपण त्याला समजावून सांगू शकू. हे सांगण्यासाठी मुळात पालक किंवा शिक्षक प्रगल्भ हवेत. तेसुद्धा मनोरंजन म्हणून याकडे बघत असतात व त्यावेळी त्यांच्या लक्षात येत नाही की आपणसुद्धा बळी पडत असतो. मूर्ख ठरतो, फसवले जातो. माध्यमांच्या प्रतिमा कशा फसवतात हे मोठ्यांनाही कळत नाही. जाणीव विकसित होणं महत्त्वाचं! चुकीचे पूर्वग्रह माध्यमांनी किती जोपासले आहेत. उदाहरणार्थ वेडे लोक, त्यांचा वेडेपणा, सायकिअ‍ॅट्रिस्ट, तो विक्षिप्तच असणं! हे स्टिरिओटाइप्स इतकी वर्षे बघितले गेलेत की मला खरंच मानसिक त्रास होतोय असं वाटतं तेव्हा सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जाण्याची हिंमतच होत नाही. तेच पोलीस व पुढाऱ्यांचंही!
 
सेन्सॉर बोर्ड?..
खूपच अनादर आहे मला या व्यवस्थेबद्दल. कुणी काय बघावं हे तिसऱ्या छोट्या गटानं ठरवावं हे लोकशाही व्यवस्थेत फार अन्यायकारक आहे. पण यावर विरोधातली माणसं अशी भूमिका घेतात की, आपला समाज प्रगल्भ नाहीये. आपण मुक्तपणे गोष्टी मांडायला लागलो तर तो वेड्यासारखा वागेल, चेकाळेल. यामध्ये मला दोन गोष्टी वाटतात. एक, प्रत्यक्षात कितीही बंदी घातली तरी या महास्फोटात लोकांपर्यंत गोष्टी पोहोचतच राहतात. 
‘स्मोकिंग किल्स, एन्जुरिअस टू हेल्थ’ वगैरे म्हटलं तरी अशी द्रव्यं पोहचायची राहिली नाहीत. थांबवणं शक्य नाही तर आव कशासाठी आणायचा? थांबण्यासाठी करायच्या गोष्टी वेगळ्याच नि मूलभूत स्वरूपाच्या आहेत. 
दुसरा मुद्दा असा, या मानसिकतेमुळे सेन्सॉरशिपचा वापर वाईट गोष्टी टाळण्यापेक्षा अनेकदा चांगल्या, पण बंडखोर गोष्टी दाबण्याकरता अधिक होतो. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सारखा सिनेमा उगीच वादंग करण्यासाठी बनवला गेलेला सिनेमा नव्हे हे पाहिल्यावर लक्षात आलं. वाईट सिनेमाशी सगळ्यांचं संगनमत असतं. चांगल्या सिनेमाची भीती का वाटते? वाटतेय तर परिणाम घडतो यावर शिक्कामोर्तब होतंय!

Sunday, May 7, 2017

मन हे चंचल

मन हे चंचल | मन हे चपळ | न राहे स्थिर | एकापरि || रजतम दोषांचे | सत्वसद्गुणांचे | षड्रिपूविकृतिंचे | अधिष्ठान ते || 
मन अवघे आकाश | तोडी सारे भवपाश | दृश्यादृश्याचा भास | दाखवि ते || 
मन हे दर्पण | व्यक्तित्वावलोकन | आत्म्यासह जीवन | पूर्णरूप || 
भौतिकतेचा मारा | व्यापक हा जगपसारा | अध्यात्माचाही गाभारा | पेलितसे ते ||
अध्यात्माची नीव | ईशाची जाणिव | प्रयासी हा जीव | त्याचसाठी|| 
मन स्थिर निर्मळ | होवो निश्चल विमल | भगवंताचे सकल त्यात | दर्शन होवो||
सज्जनांच्या संगती | मनाची निवृत्ति | आत्मचैतन्याची विर्गती | साध्य होवो || 
-इंद्रायणी सुनील श्रीगिरीवार

Tuesday, May 2, 2017

ही दरी धुक्याचे तळे जणू अनिवार


ही दरी
धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ
उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे
उमटले कळीवर
पाय दवाचे... ओले...


मी ओंजळ माझी
रितीच घेऊन आलो
जाताना...
ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्या गेल्या श्रेयांवरती
पण... पुसट... कोवळे
नाव कोरूनी गेलो....


न सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
'कळण्याचा' चाले
'कळण्याशी' संवाद...


मी तुझ्या घराशी
खरेच होतो आलो
थबकलो... जरासा....
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडूनी धागे
क्षण वळून पहिले....
.... तुझा उंबरा मागे!



वठलेल्या फांद्या होत्या
परवा... परवा...
आभाळ कोरडे होते
परवा... परवा...
नादला एकदा आषाढाचा 'झाला'
झाडांतून हिरवा
पाऊस दाटून आला


शेवटी भेटलो होतो
आपण येथे
ह्या इथेच वळले
दुरावणारे रस्ते
तेव्हा मी फिरलो इथेच येता येता
पण आज थबकलो येथे...
जाता.... जाता...


तू वेध घेतला
आणि साधला नेम
ह्या क्षणापूर्वी तर
होते सारे क्षेम
झाले ते झाले.... एक कळेना फक्त
का तुझ्याही कालाजातुनी झिरपते रक्त?


आकाश तरंगे
उंचावरती दूर
मातीच्या हृदयी
झुरणीचे काहूर
जाणून घेउनी अतृप्तांचे हेतू
कोसळता पाऊस
झाला मिलनसेतू

सुधीर मोघ्याच्या 'लय' ह्या काव्यसंग्रहातून