Showing posts with label मराठी कविता २. Show all posts
Showing posts with label मराठी कविता २. Show all posts

Tuesday, May 2, 2017

ही दरी धुक्याचे तळे जणू अनिवार


ही दरी
धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ
उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे
उमटले कळीवर
पाय दवाचे... ओले...


मी ओंजळ माझी
रितीच घेऊन आलो
जाताना...
ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्या गेल्या श्रेयांवरती
पण... पुसट... कोवळे
नाव कोरूनी गेलो....


न सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
'कळण्याचा' चाले
'कळण्याशी' संवाद...


मी तुझ्या घराशी
खरेच होतो आलो
थबकलो... जरासा....
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडूनी धागे
क्षण वळून पहिले....
.... तुझा उंबरा मागे!



वठलेल्या फांद्या होत्या
परवा... परवा...
आभाळ कोरडे होते
परवा... परवा...
नादला एकदा आषाढाचा 'झाला'
झाडांतून हिरवा
पाऊस दाटून आला


शेवटी भेटलो होतो
आपण येथे
ह्या इथेच वळले
दुरावणारे रस्ते
तेव्हा मी फिरलो इथेच येता येता
पण आज थबकलो येथे...
जाता.... जाता...


तू वेध घेतला
आणि साधला नेम
ह्या क्षणापूर्वी तर
होते सारे क्षेम
झाले ते झाले.... एक कळेना फक्त
का तुझ्याही कालाजातुनी झिरपते रक्त?


आकाश तरंगे
उंचावरती दूर
मातीच्या हृदयी
झुरणीचे काहूर
जाणून घेउनी अतृप्तांचे हेतू
कोसळता पाऊस
झाला मिलनसेतू

सुधीर मोघ्याच्या 'लय' ह्या काव्यसंग्रहातून

Monday, April 3, 2017

किती पायी लागू तुझ्या

मर्ढेकरांची कविता

किती पायी लागू तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.

काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें
टिनपाट वा चोमडी.

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला!

- बा. सी. मर्ढेकर

http://kavitaapaanopaanii.blogspot.in/?m=1

Wednesday, March 29, 2017

बालपण

कुठे गेले ते बालपण ?

ते अंगणात धुडूधुडू धावणे |
देवघरासाठी फूले गोळा करणे |

शाळेत न जाण्यासाठी नको ती नाटके |
आणि गेल्यावर बाईँच्या छडीचा मार खाणे |

शाळेतल्या मित्रांबरोबर खेळायला जाणे |
लवकर आलो नाही म्हणून आईचे रागावणे |

बाबांचा खांद्यावरून फेरफटका मारणे |
रस्त्यावरील खेळण्यासाठी नुसता हट्ट धरणे |

रात्रीत रंग भरणाऱ्या त्या आजीचा गोष्टी ऐकणे |
गोष्टींतल्या शंका न राहून विचारणे |

सायंकाळी ताईबरोबर अभ्यासाला बसणे |
नाही केला म्हणून तीचे ते ओरडणे |

दमल्यावर आईच्या मांडीवरच झोपणे |
नाही येत म्हणून तीचे ते बोबडे गुणगुणने |

खरचं कुठे गेले ना ते बालपण ?
***

Tuesday, December 20, 2016

मित्रा


मित्रा, 
एका जागी नाही असे फार थांबायचे 
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे 

दूरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आणभाक 
तुझ्या काळजात एक आर्त छळणारी हाक 
रक्त इमानी तयाने असे नाही भुलायाचे 
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे 

घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल 
जन्मगाठ जिवघेणी तुला तोडावी लागेल 
निरोपाचे खारे पाणी कुणा दिसू न द्यायचे 
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे 

होय, कबूल; तुलाही हवा कधीचा निवारा 
गर्द झाडाची सावली आणि चंदनाचा वारा 
पण पोरक्या उन्हात, सांग कोणी पोळायचे? 
नाही गुंतून जायचे, नाही गुंतून जायचे
~ सुधीर  मोघे

Thursday, December 4, 2014

सुर्योदय

सुर्योदय

रात्र संपली !
सूर्य उगवला ,पहाट झाली!


पक्ष्यांची किलबिल

अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !

अन क्षणात गारवा पसरला !
ते ओले दवबिंदू पानावरी बसले,

वातावरण कसे ताजे तवाने झाले !
सूर्य किरणे झाडाच्या आडोश्याने पसरु लागली ,
सूर्योदय झाला!अन नवा दिवस उगवला !!

~ विद्या 

Sunday, May 5, 2013

सारे काही तेच आहे

सारे काही तेच आहे…

सारे काही तेच आहे…

तेच घर …
तेच दार...

तिच माणसं …
तिच आपुलकी...

तोच मायेने फिरवणारा हात ….
तीच सावली ….
तेच जिवलग…

तोच जिव्हाळा …
तिच नाती ….

तोच आपलेपणा …
तोच नात्यामधला ओलावा …

सारे काही तेच आहे…
फक्त बदलली आहे ती वेळ …

आज ह्या घरची मुलगी …
उद्या त्या घरची सून होणार आहे …

---विद्या
4-5-2013

Friday, March 22, 2013

तू सावली




तू सावली माझ्या जीवनाची ..
तू श्वास माझ्या अंतरीचे ..

कधी अश्रू बनून ओघळणारी तू..
तरीही सदा जवळ वाटणारी तू ..

जीवनात रंग भरुनी जाणारी तू ..
नवी स्वप्ने दाखवणारी तू ..

काळाच्या आघातात हरवलेली तू ...
मात्र मनाच्या कुपीत सदा दडवलेली तू...
- विद्या 
*आईच्या स्मरणार्थ मी लिहिलेली कविता *

Sunday, February 17, 2013

बघ माझी आठवण येते का?

मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ माझी आठवण येते का ?

वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा पाऊस थांबेपर्यत,
तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत,
बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल,
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल,
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण,
तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे ,
तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर,
किशोरीच सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ,
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?
-सौमित्र

Friday, February 1, 2013

बालपण खरच छान असतं

बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं .....

आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक टोक असतं
माउलीच्या कुशी मध्ये
आपलं सारं ब्रम्हांड वसतं

बालपण खरच छान असतं .....

आईचा पदर हेच आपलं
आभाळ असतं
आभाळ गवसण्या आभाळ
देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं .....

-श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने !!

Monday, July 2, 2012

आई


आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥

कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥

कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥

दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥

असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥
-अनामिक

Sunday, July 1, 2012

शाळा


शाळा 
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे,कोणे एके काळी मी देखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.

इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .

पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .

पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.

मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .

शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .

काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली.

शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी
-अनामिक

Tuesday, June 5, 2012

पावसाच्या त्या सुंदर क्षणी


पावसाच्या त्या सुंदर क्षणी
तो अन मी असेच बसायचो
एकमेकांच्या गप्पांत
उगाच तासंतास रमून जायचो

आठवतात ते क्षण
सोबत एकमेकांच्या सहवासातले
दोघांनी समुद्र किनारी बसून
वाळूतही स्वप्नातले घर साकारलेले

ते बाईक वरून आमच फिरणं
रोज रोज नाही पण कधीतरी असायचं
दोघांच एकमेकांवर प्रेम करणं
जणू स्वप्न सुख भासायचं

त्यान माझी उगाच काळजी करणं
मला नेहमीच खटकायच
त्या काळजीतीलही त्याच प्रेम
मला नंतर जाणवायच

भर पावसातही दोघे
आम्ही स्वच्छंदी होऊन फिरायचो
सिहगड काय अन माथेरान काय
सर्वच पालथ घालायचो

पावसाचे ते टपोरे थेंब
अंगावर झेलायला त्याला खूप आवडायचे
त्याच्या ह्या आवडीवर
मी मात्र त्याच्यावर खूप चिडायचे

रुसवा फुगवा काढत
दिवस असेच उडून जायचे
जीवनाच्या वाटेवर आतातरी
आपण स्थिर व्हावे आसे मला वाटायचे

माझ्या वाटण्याचा आता त्याला नाही गंध
हे मला सारख जाणवायच
माझ्या पेक्षाही आता त्याला
कोणी दुसरेच जवळच भासायचं

दिशा बदलल्या , वाटा बदलल्या
पण तरीही मन त्याच्यासाठीच झुरायचं
कधीतरी तो परत येईल
असा वेडा विचार मन माझ करायचं

आजही पावसाचे ते क्षण
हवेहवेसे वाटतात
पण पाउस येताच
पाण्याबरोबर आठवणीही वाहून नेतात...!!! 
-अनामिक

Saturday, May 26, 2012

वा-यावर उडणारी बटं सावरताना



वा-यावर उडणारी बटं सावरताना
खुप छान दिसायचीस तु,

तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु.

नेहमीच मला माझ्या अवतीभोवती
खरचं भासायची तु,

मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग
आल्यावर,कुठेच नसायची तु..

माझ्यावरच हसुन झाल्यावर” माझे”
पुन्हा मला दिसायची तु,

मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी असायची तु..

-अनामिक

Saturday, April 21, 2012

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे


कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

-अनामिक

Sunday, April 8, 2012

आई


ती गेली तेव्हा रिमझिम, पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवीत होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
_____________

चित्रपट : निवडुंग
गीत : ग्रेस
संगीत : प. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : प. हृदयनाथ मंगेशकर

(माझ्या आयुष्याच्या कटू आठवणीना उजाळा देऊन हृदयाशी भिडुन गेलेली हि कविता ........विद्या )

Saturday, April 7, 2012

पाऊस

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा
-ग्रेस

Thursday, April 5, 2012

माझी शाळा

माझी शाळा.....


शाळेचे ते दिवस आठवले की ...
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं....
Highway जवळ
ची ती शाळा पाहून ,
पुन्हा शाळेत जावसं वाटतं....
... शाळा आमची छान होती ...
Last bench वर आमची team
होती ....
Cricket च्या वेळी ground वर
cheating व्हायची ...
आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन
मधल्या वडा-पाव साठी ....
साला नेहमीच line असायची ...
जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो ...
प्रतिज्ञेच्या वेळी हातालाटेकू
देऊनही ....
प्रतिज्ञा म्हणायचो ...
प्रार्थनेच्या वेळी मात्र....
सगळ्यांसारखे ...
नुसतेच ओठ हालवायचो ....
पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन .... मुद्दामचभिजत
जायचं ...
पुस्तक भिजू नये म्हणून ....
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं....
शाळेतून येता येता ... एखाद्या डबक्यात
उडी मारून ...
उगीचच सगळ्यांच्या अंगावर
पाणी उडवायचं ....
Black -board वर
बोलणार्या मुलांमध्ये ....
Monitor नेहमीच आमचं नाव
लिहायचा ...
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे ...
हातावर duster चा व्रण असायचा....
प्रयेत्येक Off -period ला P.T.
साठी ....
आमचा आरडाओरडा असायचा ...
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा....
तो बर्फाचा गोळा संपवायचा....
मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही....
कधी कोणी link नाही लावायचं...
प्रत्येक महिन्यातून एकदातरी ...
डोक्यावरचे केस कापायचो ...
आणि आज-काल सारख्या प्रत्येक
वाक्यात ....
शिव्या सूद्धा नाही द्यायचो ...
इतिहासात वाटतं ....
होता शाहिस्तेखान ...
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ....
गणित... भुमितीत होतं ... पायथागोरस च
प्रमेय ...
भूगोलात वाहायचे वारे .... नैऋत्य...
मॉन्सून ...
का कुठलेतरी ... वायव्य....
हिंदीतली आठवते
ती "चिंटी कि आत्मकथा"
English मधल्या grammar नेच
झाली होती आमची व्यथा ...
शाळेतल्या gathering चा dance...
बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा...
तो मराठी चा तास ....
दरवर्षी नवीन भेटायचे ....
Uniforms
आणि वह्या पुस्तकांचा set.....
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच
करावा लागायचा wait ....
शाळा म्हटली कि अजूनही आठवतात....
desk वर pen ने त्या "pen fights"
खेळणं ....
exams मधल्या ...
रिकाम्या जागा भरणं ... आणि जोड्या
जुळवणं ...
चिखलातल्या त्या football
च्या matches ...
कबड्डीत ... पडून धडपडून ....
हातापायांवर आलेले scraches ...
खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा....
मला पुन्हा लहान व्हायचं ....
हसायचं .... खेळायचं ....
मला पुन्हा शाळेत जायचं ..
-अनामिक

Wednesday, March 21, 2012

तुझ्यावर जिवापार प्रेम करावस वाटत

तुला चोरून बघताना
मला खुप बर वाटत
तुझ्या मागुन फिरताना
तुझ्या सोबत फिरावस वाटत

तुझ ते निरागस हास्य
निहारून पहावस वाटत
हातात हात घालून
तुझ्या सोबत चालावस वाटत

तुझ्या त्या लाजन्या कड़े
एकटक पहावस वाटत
तुझ्या समोर उभा राहून
तुझा चेहरा मनात भरावसा वाटत

मला खुप खुप खुप
तुझ्या सोबत बोलावस वाटत
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत

खरच
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत..
-अनामिक

Sunday, March 11, 2012

मुलीचें जिवन हे असंच असतं

मुलीचें जिवन हे असंच असतं


 हि कविता खास मुलींनसाठी.. .............

मुलीचें जिवन हे असंच असतं,
तुझं आणि तिच...ं सारखचं असतं..
ज्या कुटुंबात वाढुन मोठे व्हायचं असतं,
त्याचं कुटुंबाला सोडून जायचं असतं..

ज्या आईचे बोट धरून चालण शिकायचं असतं,
त्याचं बोटाने कुंकू लावून निघायचं असतं..
ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळून मोठ व्हायचं असतं,
त्याचं खांद्यावर डोकं ठेवून रडायचं असतं..

ज्या बहीण भावाला भांडूंण रड्वायचं असतं,
त्यांनाचं सोडून जाताना रडायचं ही असतं..
मुलीचें जिवन हे असंच असतं..
-अनामिक

Saturday, March 10, 2012

आयुष्य


किती क्षणाचं आयुष्य असतं.
आज असतं तर उद्या नसतं.

म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं.
कारण इथं कुणी कुणाच नसतं.

जाणारे दिवस जात असतात
येणारे दिवस येतच असतात.

जाणा-यांना जपायचं असतं
येणा-यांना घडवायचं असत
आणि जीवनाच गणित सोडवायचं असतं...!
-अनामिक