Friday, February 8, 2019

लेख

प्रवास - एका अदम्य जिद्दीचा, माती, पंख आणि आकाशाचं स्वप्न पहायला शिकवणाऱ्या योध्याचा - ज्ञानेश्वर मुळे

सत्संग करायला म्हातारं व्हावं असा काही नियम नाही. मनात इच्छा असेल तर अगदी ४-६ वर्षांचा लहान मुलगासुद्धा हरिपाठ, भजन, कीर्तन यात दंग होऊन जातो. अगदी त्याचप्रमाणे काही लोकांनी आयुष्यातील एक टप्पा एका नोकरीत यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या महत्वकांक्षी प्रकल्पाकडे जायचं ठरवलं तर त्यात वावगं वाटता कामा नये. विकास या सर्वसमावेशक संकल्पनेविषयी सध्या अनेक वल्गना होत असताना आयुष्यातील दीर्घकाळ प्रशासनात व्यतीत केलेल्या व्यक्तीने राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक जण त्याला स्वार्थी किंवा आपमतलबी ठरवतात. पण या व्यक्तीने आपला निर्णय आधीच जाहिररित्या सांगून विरोधकांची बोलती बंद केली आहे.

प्रशासन आणि राजकारण ज्याठिकाणी हातात हात घालून पुढे जावं असं आपल्याला वाटतं, त्याठिकाणी ज्ञानेश्वर मुळेंसारखे अधिकारी जन्म घेतात. त्यांचा उदय ही नांदी असते - पर्यायी राजकारणाची. आपण ज्या समाजातून आलेलो असतो, त्या समाजाला वारंवार त्याच त्याच सुधारणांचं आमिष दाखवून राजकारण करणाऱ्या राजकारण्यांपेक्षा ज्ञानेश्वर मुळे हे नक्कीच वेगळे आहेत. लहानपणापासून असलेली अभ्यासाची आवड जोपासत त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. अनेक शिष्यवृत्ती मिळवत आपल्या ज्ञानाची चुणूक त्यांनी दाखवून दिली. भारतीय विदेश सेवेत निवड झाल्यानंतर जपान, मालदीव, अमेरिका या देशांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. लिखाणाची आवड असल्याने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत त्यांनी साहित्यनिर्मितीही केली. साप्ताहिक साधनामध्ये त्यांनी लिहलेलं लिखाण विशेष लोकप्रिय आहे. मागील २ वर्षांमध्ये पासपोर्ट सेवा तळागाळातील सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी ज्ञानेश्वर मुळेंनी विशेष परिश्रम घेतले आहेत. यामुळेच देशाचे पासपोर्ट मॅन म्हणूनही ते आता प्रसिद्ध आहेत.

आई-वडील हे भक्तीसंप्रदयातील असल्याने घरात आध्यात्मिक वातावरण पहिल्यापासून असल्याचं मत ज्ञानेश्वर मुळे यांचे ज्येष्ठ बंधू ज्ञानदेव मुळे यांनी व्यक्त केलं. बँक ऑफ बडोदातून निवृत्त झालेले ज्ञानदेव मुळे अब्दुल्लाट मध्येच आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांच्या घरातील प्रत्येक जण आपापलं काम करुन स्थिरस्थावर झाला आहे. कुणीही कुणाची पुण्याई वापरायची नाही, असा मुळे घराण्याचा दंडकच आहे. ज्ञानेश्वर मुळेंची आई आजही त्याच साधेपणाने सर्वत्र वावरत असते. त्यांच्या चेहऱ्यावरील वात्सल्यपूर्ण भाव एका आईने मुलांना मोठं करताना, त्यांची जडणघडण करताना केलेल्या कष्टाची जाणीव करुन देतात. त्यांच्या चुलतबंधुंचं कपड्याचं दुकान आहे. देव-देवतांसाठी लागणारी वस्त्रे बनविण्याचं काम गेली अनेक वर्षांपासून ते करत आहेत. यासोबत अनिलकुमार मुळे हे त्यांचे दुसरे चुलतबंधू पुण्यातील कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तर एक बंधू गावातील व पंचक्रोशीतील लोकांसाठी फोटोग्राफीचं काम करतात.

बाकी प्रशासकीय अधिकाऱ्यांसारख्या शेकडो एकर जमिनी मिळवणे, बंगले बांधणे अशा कोणत्याच भौतिक सुखांमध्ये मुळे कुटुंबीय कधीच अडकले नाहीत. हाच त्यांचा साधेपणा त्यांच्या दैनंदिन व्यवहारातूनही पाहू शकतो. स्थानिक लोकप्रतिनिधींशी उत्तम संपर्क असलेले ज्ञानेश्वर मुळे आता कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. हातकणंगले मतदारसंघात त्यांचे विश्वासू सहकारी राजू शेट्टी हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या विरोधात जाणं हे तूर्तास तरी ज्ञानेश्वर मुळेंना शक्य होणार नाही. साखर कारखानदारी समवेत अनेक महत्वाचे विषय कोल्हापूर भागात अजून दुर्लक्षित आहेत. महाराष्ट्रातील अनेक खासदारांना केवळ भाषिक अडचणीमुळे केंद्रात आपल्या समस्या मांडता येत नाहीत. किंबहुना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा अभ्यासही तुटपुंजा असल्याने विकासाच्या नवीन कल्पना आपल्याकडील ग्रामीण भागात राबविल्या जात नाहीत. अशा वेळी ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा फायदा मतदारसंघातील लोकांना झाल्याशिवाय राहणार नाही. गरज आहे फक्त डोळसपणे राजकारणाकडे पाहण्याची - आणि योग्य माणसाची पारख करण्याची..!!

- साभार योगेश जगताप, पत्रकार सातारा.

Monday, January 14, 2019

इंद्रायणी काठी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

लागली समाधी, ज्ञानेशाची

ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव

नाचती वैष्णव, मागेपुढे



मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड

अंगणात झाड कैवल्याचे

उजेडी राहिले उजेड होऊन

निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई

गीतकार : गदिमा
गायक : पं. भीमसेन जोशी
संगीतकार : पु ल देशपांडे

https://youtu.be/2Lcb7vTUlvE

ज़िंदगी ख़्वाब है

रंगी को नारंगी कहे, बने दूध को खोया चलती को गाड़ी कहे, देख कबीरा रोया...

ज़िंदगी ख़्वाब है,
ख़्वाब में झूठ क्या
और भला सच है क्या

सब सच है ज़िन्दगी ख्वाब है...

दिल ने हमसे जो कहा,
हमने वैसा ही किया
फ़िर कभी फ़ुरसत से सोचेंग
बुरा था या भला ज़िन्दगी ख़्वाब है...

एक कतरा मय का जब
पत्थर से होंठों पर पड़ा
उसके सीने में भी
दिल धड़का ये उसने भी कहा क्या

एक प्याली भर के मैंने,
ग़म के मारे दिल को दी
ज़हर ने मारा ज़हर को
मुरदे में फिर जान आ गई

ज़िन्दगी ख़्वाब है...

गाना : ज़िंदगी ख़्वाब है, ख़्वाब में झूठ क्या
संगीतकार : सलील चौधरी
गीतकार : शैलेन्द्र
गायक : मुकेश
https://youtu.be/mVGqFJcKOi8

Thursday, January 10, 2019

मराठी साहित्याची उलटी गंगा

मराठी साहित्याची उलटी गंगा :श्रीधर तिळवे नाईक

कुठलेही युग अद्ययावयता जोपासण्यासाठी अद्ययावत माध्यमे वापरत पुढे जात असते किंबहुना जितके माध्यम अद्ययावत तितके ते युग अद्ययावत ! प्रत्येक युगात अद्ययावत माध्यमे वापरणाऱ्यांना सहजासहजी जागा मिळत नाही त्यामुळे अद्ययावत लोकांना बंड करावे लागते आणि आपल्या युगाची नवता तिच्यातील अद्ययावतता विश्लेषण करून मांडावी लागते

चौथ्या नवतेला हा संघर्ष हा अटळ होता आणि तिने तो केलाही ! कुठल्याही नवतेतील दुसरी व तिसरी पिढी ही पहिल्या पिढीपेक्षा आपली नवता अधिक चांगल्या रित्या पेलते हा इतिहास असल्यानेच मी चौथ्या नवतेची मांडणी करतांना आमच्या ऎशोत्तर पिढीपेक्षा नव्वदोत्तर पिढी आणि नव्वदोत्तर पिढीपेक्षा दोन हजारोत्तर पिढी आमच्यापेक्षा ताकदीने लिखाण करेल अशी मांडणी केली होती प्रत्यक्षातही आमच्यापेक्षा नव्वदोत्तरीत सलील वाघांच्या पासून नितीन वाघ संतोष पवारपर्यंत आणि आत्ता ओंकार कुलकर्णी प्रणव सुखदेव पासून स्वप्नील शेळकेपर्यंत अनेकजण अतिशय अव्वल लिखाण करतांना दिसतायत पण एक गोष्ट जी बदलेल असं वाटलं होतं ती मात्र बदललेली दिसत नाही ती म्हणजे माध्यम !

वास्तविक चौथ्या नवतेत घडलेला सर्वात मोठा बदल हा इंटरनेट आणि डिजिटल क्रांती होता जिने ऍनालॉगस रिप्लेस करत हळू हळू डिजिटल माध्यम स्थिर केले त्यामुळे साहित्यातही हळूहळू का होईना डिजिटल क्रांती होऊन डिजिटल माध्यमे सेटल व्हायला हवी होती ते काळाला धरून होते पण प्रत्यक्षात मात्र सगळं जग डिजिटल होत चालले असूनही मराठीत विशेषतः साहित्यात मात्र अजूनही छापीलतेचा दबदबा संपतच नाहीये आजही एखाद्या कवीचा वा लेखकाचा विचार करतांना तो छापील माध्यमात काय उपलब्ध आहे त्यावरूनच त्याची लायकी ठरतीये आणि जे त्याचे छापील लेखन आहे आहे तेच आजही प्रमाण मानले जाते हरिश्चन्द्र थोरातांसारखा मागासलेला समीक्षक असे करत असेल तर ते समजून घेता येईल पण जेव्हा नितीन वाघांसारखा अद्ययावत माणूसही असे म्हणतो तेव्हा काय करायचे हा खरोखरच प्रश्न पडतो

ह्याही पुढचा एक प्रश्न येतो तो म्हणजे छापीलला केंद्रस्थानी का ठेवले जात आहे कि ही छापीलला अधिकृत आणि डिजिटलला मार्जिनलाईज्ड करण्याची साजिश आहे ? असे असेल तर मराठीची गंगा केवळ उलटीच वाहतिये असं नाही तर ती हिमालयाच्या छापील जटेत बांधण्याची ही कॉन्स्पिरसी आहे असंच म्हणावे लागेल

ह्यातून असा प्रश्न निर्माण होतो कि ह्या कारस्थानाचे उद्देश काय आहेत ?

एक गोष्ट साफच दिसते ती म्हणजे अनेक छापील पुस्तके छापणाऱ्या प्रकाशकांना छापीलता प्रमोट करणे भागच आहे कारण त्यांचा धंदा छापीलतेवर अवलंबून आहे असे त्यांना वाटते पण ज्यांचा धंदा नाही त्या कविंनाही छापीलता भयानक महत्वाची का वाटावी ? कि बक्षिसे आणि पारितोषिके फक्त छापीलतेला मिळतात म्हणून हे घडते ? वास्तविक आज ना उद्या सर्वच प्रकाशकांना ऑनलाईन पब्लिकेशन स्वीकारावे लागणे अटळ आहे आणि ज्यांना धंद्यात टिकायचे आहे त्यांनी त्याची तयारी करावी हे उत्तम

एक गोष्ट स्पष्टच दिसते ती म्हणजे डिजिटलला संपादकाची फारशी निकड भासत नाही ज्याच्या त्याचा ब्लॉग आणि जो तो आपल्या ब्लॉगचा संपादक अशी डिजिटलची अवस्था आहे आणि यदाकदाचित डिजिटल नियतकालिक (मासिक पाक्षिक वैग्रे ) अनियत्कालिक असेल तर त्याला ती सत्ता प्राप्त होत नाही जी छापील माध्यमातील संपादकाला प्राप्त होते छापीलमध्ये संपादकाची सत्ता टिकते म्हणून तर मराठीत छापीलतेचा गवगवा नाही ना ?

छापीलतेत ग्रुप स्थापून गोतावळा जमवून साहित्यात स्वतःच्या गोतावळ्याची मक्तेदारी निर्माण करता येते कदाचित त्यामुळे तर सारे गोतावळाकर छापीलतेच्या नादी लागलेले नाहीत ना ? वास्तविक डिजिटलमध्ये गोतावळा अधीक प्रभावीपणे काम करतो हे अलीकडच्या टोल आणि प्रतिटोल अश्या दोन्ही प्रकारच्या टोलभैरवांनी उत्तम सिद्ध केले आहे कि पूर्वी जशा काही गूढवाद्यांच्या सीक्रेट टोळ्या वा गोतावळे असायचे तसा हा प्रकार आहे आणि छापीलता ही ह्या लोकांच्या सिक्रेसीची कोडीफिकेशन आहे ?

की अकादमीक प्राध्यापकांना छापीलतेचे व्यसन लागलं आहे म्हणून ही अफूची शेती केली जातीये ? छापीलतेत अकादमीक बागुलबुवा अकॅडमिशयनना विशेषतः प्राध्यापकांना वाढवता येतो त्यांच्या चैनीसाठी आणि बागुलबुवा टिकवण्याच्या हव्यासासाठी तर ही छापीलतेची शेती केली जात नाहीये ना ? कि हे बंद पडलेले डिपार्टमेंटल कारखाने जिवंत आहेत म्हणून छापील तोफांची सातत्याने सलामी दिली जातीये ?

कि डिजिटल म्हणजे एलिट आणि छापील म्हणजे परिवर्तनवादी असा आभास निर्माण करून परिवर्तनवादी चळवळीचे आम्हीच साहित्यातले कंत्राटदार वा कर्ते असा आभास निर्माण करता येतो म्हणून छापीलता परिवर्तनवादी चळवळीचे हत्यार म्हणून जिवंत ठेवली जातीये आणि तिला केंद्रस्थानी आणून डिजिटल जाणीवपूर्वक मार्जिनलाईज केली जातीये ?

गरीब माणसेही व्हॉट्सप ग्रुप काढत असतांना साहित्यिकांना असले मागासपणाचे धंदे सुचावे हे दुर्देव
उच्च जातींनी मुद्दाम स्वतःला मागासलेले म्हणवून घेण्यासाठी मेळावे घ्यावेत तसा हा मागासलेपणा केन्द्रीयस्थानी आणून मान्यतेची सवलत लाटण्याचा प्रयत्न आहे

माझा छापीलतेला विरोध नाही छापीलता ज्यांना जिवंत ठेवायची आहे त्यांनी खुशाल ठेवावी पण ती जिवंत ठेवण्यासाठी डिजिटलता मार्जिनलाईज करण्याला माझा ठाम विरोध आहे येणारे युग हे पोस्टडीजिटलतेचे आहे त्याला जर सामोरे जायचे असेल तर मराठी साहित्यात आता डिजिटलता केंद्रीय बनणे आवश्यक आहे नाहीतर झोपी गेलेला जागा झाला हा फार्स पुन्हा एकदा साहित्याचे थिमसॉन्ग म्हणून सादर करण्याची वेळ येईल आणि आणखी एक कापले गेलेले नाक मराठी नौवारीच्या पदरात पडेल .

श्रीधर तिळवे नाईक

Sunday, January 6, 2019

Friday, December 28, 2018

दादा आता आई बाबा माझ्याकडे राहतील

गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावेत मी ही त्यांचा मुलगा आहे.माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली 25 वर्ष सेवा करत आहे.आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या कुटूंबियांना ही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे. व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे.माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्यांने अत्यंत चांगला सांभाळ केला आहे.

पण आता तोच थकला आहे मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत. आई- वडिलांना सांभाळन्यासाठी दोनों भाऊ कोर्टात भांडत आहेत। हा विलक्षण प्रकार आहे. आईवडिलांना न साभांळना-या नालायक अवलादीच्या गालफडात लावलेली जबरदस्त चपरा आहे. जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्ध आश्रमात ठेवनारा जमाना आला आहे. तेथे हे श्रावणबाळ कसे जन्माला आले. जजला निकाल देता येइना. त्यांनी आईवडिलानाच विचारले आपली काय ईच्छा आहे.तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते.

तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले.तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावनार याचे खुप दु:ख झाले. धन्य ते आई वडिल ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले.या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणा-या व आईची मान कापना-या परशुरामांची अवलादी जन्माला आल्या आहेत. आईवडिलांना वृदाश्रमात ठेवनारे आयआयटी पास नालायक आहेत. सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्च भ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवन्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करना-यां न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत.

या देशात शिकून परदेशात नोकरी करनारे महाभाग आहेत. ज्यांनी देशसेवा करायची सोडून परकियांची नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अवस्था निपुत्रिका सारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतील पण आईवडिलांना सांभाळतील. पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत. वरिल कथा आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे. वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतिय संस्कृती ची सर्वात मोठी अधोगती आहे.


एका माझ्या मित्राच्या मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी पुण्यात गेलो असता मुलगी स्पष्ट म्हणाली लग्नानंतर मुलाचे आईवडिलांना आमच्या सोबत राहता येणार नाही ही माझी पहीली अट आहे


धन्य आहे पुणेकरांची हिंदु संस्कृतीचे माहेरघर पुणे असलेल्या परिसरात सर्वात जास्त वृध्दाश्रम आहेत. अशी भावंडं हवीत. सलाम त्यांना. तुम्ही पण तुमच्या आई-बाबा वर प्रेम करत असाल तर नक्की शेअर करा. धन्यवाद..!

http://meemarathi.in


Tuesday, December 25, 2018

Tuesday, December 18, 2018

नज्म

नज्म

मुझसे इक नज़्म का वादा है,
मिलेगी मुझको
डूबती नब्ज़ों में,
जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिए चाँद,
उफ़क़ पर पहुंचे
दिन अभी पानी में हो,
रात किनारे के क़रीब
न अँधेरा, न उजाला हो,
यह न रात, न दिन
ज़िस्म जब ख़त्म हो
और रूह को जब सांस आए
मुझसे इक नज़्म का वादा है मिलेगी मुझको....
#गुलजार #hindi #poem #eaksharman

सौंदर्य साधने आणि स्त्रिया


Destroy The Makeup आणि आपण भारतीय स्त्रिया

By: कविता ननवरे, लेखिका 

समाजाच्या मुख्य प्रवाहाने ठरवून दिलेल्या कोणत्याही मापदंडांमध्ये सामील होण्यासाठी प्रवाहाबाहेरील वर्गाला जेवढी ऊर्जा खर्च करावी लागते तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ऊर्जा त्या मापदंडांविरोधात बंड उभं करण्यासाठी लागते. आणि निर्भिडपणे या बंडाचा झेंडा हाती घेणे स्त्रियांसाठी तर कधीच सोपे नसते. जगव्यापी मीटू चळवळीच्या यशस्वीतेनंतर दक्षिण कोरीयात एक नवी चळवळ बाळसे धरत आहे ती म्हणजे Escape The Corset. मेन स्ट्रीममधील बाह्य सौंदर्यविषक संकल्पनांच्या बळी ठरत असलेल्या कोरीयातील महिला खोट्या सौंदर्यविषयक संकल्पनांना फाट्यावर मारण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.

जून २०१८ मध्ये लीना बेई नावाच्या कोरीयन ब्यूटी ब्लॉगरने यू ट्यूब या सोशल नेटवर्कींग साईटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला. काही तासातच या व्हिडीओला लाखो हिट्स आणि व्ह्यूज मिळाले. काय वेगळं होतं या व्हिडीओत? 'प्रत्येक स्त्रीने मेकअप केलाच पाहिजे. तिने प्रेझेंटेबल दिसलेच पाहिजे' अशी रिस्ट्रीक्शन असणाऱ्या देशात लीना बेईने चेहऱ्यावर लावलेले मेकअपचे थर पूसून टाकत "मी जशी आहे तशीच बरी आहे." म्हणण्याचं धाडस दाखवलं होतं. काही दशकांपूर्वी परंपरावादी भारत देशातील स्त्रीने मंगळसूत्र घालायला, कुंकू लावयला दिलेला नकार इथल्या समाजासाठी जितका धक्कादायक होता तितकचं कोरीयन लोकांसाठी धक्कादायक होतं लिना बेईचं चेहऱ्याला करण्यात येणाऱ्या रंगरंगोटीला नकार देणं. तिच्या अशा स्टेटमेंटनं नाइलाज म्हणून आपला अमूल्य वेळ आणि पैसा मेकअपवर खर्च करणाऱ्या कोरियातील अनेक स्त्रिया प्रभावीत झाल्या. त्यांनी EscapeThe Corset हा हॅशटॅग वापरून मेकअपविरूद्ध बंड पुकारलं. आपापल्या मेकअपच्या किट्स डिस्ट्रॉय करतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केले. सोळाव्या शतकात साऊथ कोरियामध्ये शरीर व्यवस्थित शेपमध्ये बसविण्यासाठी स्त्रियांकरता कोरसेट नावाच्या कंपनीने काही पट्टे बाजारात आणले होते. कोरीयन स्त्रियांचं सौंदर्याच्या चुकीच्या मापदंडांना बळी पडणं तिथूनच सुरू झालं म्हणून या चळवळीला हे नाव दिलं गेलं. महिलांनी डायरेक्ट कॉस्मेटीक वापरायलाच नकार दिल्यानं जगातील आठव्या नंबरची कॉस्मेटीकची मोठी इंडस्ट्री असणाऱ्या साऊथ कोरीयातील व्यापारी वर्गाचं धाबं दणाणलं नसेल तर नवलंच.

सतत सुंदर दिसण्यासाठी कोणतीही किंमत चुकवणाऱ्या स्त्रियांनी या चळवळीला का पाठिंबा दिला असावा? या प्रश्नाच्या मुळाशी जाताना काही मूलभूत गोष्टी समोर येतात ज्यांचा अतिरेक या चळवळीला कारणीभूत ठरला असं खात्रीने म्हणता येऊ शकतं. आपल्या न्याय-हक्कांसाठी जागृत झालेल्या स्त्रीचा अजूनही एक उपभोग्य वस्तू म्हणूनच वापर होतोय हे नुकत्याच येवून गेलेल्या metoo चळवळीच्या वादळावरून कळलेच आहे. ही चळवळच Escape The Corset ची प्रेरणा आहे. प्रसारमाध्यमांमधून स्त्रीचा जो काही वापर केला जातोय त्याचा अर्थही 'Woman is only An OBJECT' असाच होतो. पुरूषांची मक्तेदारी असलेली प्रसारमाध्यमं स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या ठरवून देतात आणि त्या व्याख्येत स्वतःला फिट बसवण्यासाठी स्त्री स्वतःची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शक्ती खर्च करते. स्त्रीचं खरं सौंदर्य हे 'सौंदर्य प्रसाधनांच्या वापरानेच सिद्ध होतं' असा बुद्धीभेद प्रसाधन उत्पादकांनी सुरू केला. आणि स्त्री त्याला बळी पडली. या कंपन्यांनी आधी समाजातील वरच्या वर्गातील महिलांना टार्गेट केलं. तुम्हांला सुंदर दिसायचं असेल तर सौंदर्य प्रसाधनं वापरायलाच हवीत असा अपप्रचार करत त्यांना आपला कायमचा ग्राहक बनवलं. वरच्या वर्गातील स्त्रीयांप्रमाणे सुंदर दिसण्याचा हट्ट खालच्या वर्गातील स्त्रिया धरू लागल्या व त्या प्रसाधनांच्या वापरांकडे वळल्या. त्यावर वाट्टेल तितका पैसा उधळू लागल्या. आपण जशा आहोत त्यापेक्षा पुरूषांना आपण कशा दिसायला हव्या आहोत याचा विचार स्त्रिया अधिक करतात हे म्हणणं धाडसाचं असलं तरी खरं आहे.

'सुंदर दिसणाऱ्या, सुंदर नसल्या तरी मेकअपचे थरावर थर लावून सुंदर दिसू पाहणाऱ्या, सतत अप टू डेट राहणाऱ्या स्त्रीलाच समाजात मान प्रतिष्ठा आहे. तुम्ही तशा नसाल तर तुमच्यातल्या टॅलेंटला कुणी विचारत नाही. 'हे आजचं जगभरातलं वास्तव चित्र आहे. हे चित्र निर्माण व्हायला जेवढी पुरूषप्रधान संस्कृती जबाबदार आहे तेवढंच जबाबदार आहे स्त्रीवर्गाचं आंधळेपणानं भांडवलशाहीने तयार केलेले कोणतेही चुकीचे ट्रेंड फॉलो करणं. सौंदर्याचा वापर करून हवं ते काबीज करता येतं, जिंकता येतं हे स्त्रियांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे.

स्वतःतला सिद्ध करण्यासाठी आपलं सौंदर्य विकणाऱ्या स्त्रिया आहेत. ते विकत घेणारी बाजारपेठही आहे कारण कोणतीही वस्तू विकायची असेल तर बाजारपेठ चलनी नाणं म्हणून स्त्रीचा वापर करते मग ती वस्तू पुरूषाने वापरायचीही असू देत अथवा स्त्रीने. पण हा ट्रेंडकाही स्त्रियांनी सेट केला नाही तर प्रसारमाध्यमांचे दोर हाती असणाऱ्या पुरूषवर्गानं केला.

त्वचेला व एकूणच शरीराला हानीकारक असणाऱ्या प्रसाधनांचा मारा करून आपल्याला केवळ एक वस्तू म्हणून मार्केटमध्ये उभं केलं जातय. ही भांडवलशाहीची गल्लेभरू चाल स्त्रियांच्या लक्षात येत नाही का? तर येते. काही स्त्रियांना या सौंदर्याच्या बाजारात आपली शोभेचे बाहुली होऊच द्यायची असते, आत्मसन्मान गहाण टाकून आर्थिक कमाई करायची असते तर काहींना सेट असलेल्या ट्रेंडचा मनस्वी तिटकाराही असतो. पण मुख्य प्रवाहात राहायचं असेल तर त्या प्रवाहाचा ट्रेंड फॉलो करणं त्यांना भाग असतं. काही ज्या बोटावर मोजण्याइतक्या स्त्रिया असतात त्या हे कायदे-कानून, नियम धुडकावून लावतात. इतर स्त्रियांनाही हे करायला भाग पाडतात. मुख्य प्रवाहाचे सगळे नियम धाब्यावर बसवून आपला आत्मसन्मान जपू पाहणारी ती कधी अलिसा मिलानो (मीटू चळवळीची उद्गाती) असते तर कधी लीना बेई असते. पुरूषांना सेवा देणारी आपण केवळ एक उपभोग्य वस्तू होतोय हे त्यांच्या ध्यानात आलेलं असतं. आपल्या शरीराचा उपभोग घेतला जातोय , घातक उत्पादनांचे आपल्या शरीरावर किती वाईट परिणाम होऊ शकतात याबद्दल त्या अवेअर झालेल्या असतात. शिवाय आपण जशा आहोत तसं स्वीकारण्यासाठी त्यांचं शरीर आणि मनही आनंदानं तयार झालेलं असतं.

आपल्या भारतीय स्त्रियांनीही स्वतःच्या न्यायहक्कांसाठी मोठी चळवळी उभी केली. कधी ती सनातन संस्कृतीविरूद्ध होती, कधी तथाकथित पुरूषी वर्चस्वाविरूद्ध , कधी स्त्री-पुरूष असमानतेविरूद्ध तर कधी आपल्यावर होत असणाऱ्या अन्यायाविरूद्ध होती. आज सर्व क्षेत्रांत स्त्रीचा जो मुक्तसंचार आहे तो त्यांनी केलेल्या या चळवळींमुळेच आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. मीटू चळवळतही भारतीय स्त्रियांनी हिरीरीने भाग घेतला. आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात इथल्या बड्या बड्या धेंडांना सळो की पळो करून सोडलं. उशीरा का होईना हे धाडस दाखवणारी भारतीय स्त्री कौतुकाचा विषय ठरली. सध्यातरी दक्षिण कोरीयातलं 'Escape The Corset' चं वारं आपल्याकडे येणार नाही हे नक्की. पण कधीच येणार नाही का? कॉस्मेटीक साधनांची आयात करणाऱ्या देशांत भारत देशही काही मागे नाही. मागच्या काही वर्षात भारतातील स्त्रियांकडून सौंदर्य प्रसाधनांचा वापर प्रचंड वाढला आहे हे विविध सर्वेक्षणातून दिसून आलेलं आहे. स्त्री नोकरी करणारी असो अथवा गृहिणी असो किंवा शाळकरी मुलगी असो त्यांचे ड्रेसिंग टेबल कॉस्मेटीकच्या साहित्यांनी खचाखच भरलेले असतात. त्यातल्या किती वस्तू खरंच गरजेच्या असतात?

साऊथ कोरीयात जे सौंदर्याचे मापदंड आहेत तितके काटेकोर मापदंड भलेही सध्या भारतात नसतील पण भारतीय स्त्रीचं वरचेवर होणारं वस्तूकरण बघता येणाऱ्या दिवसात भारताचं साऊथ कोरीया होणार नाही कशावरून? बाह्यसौंदर्यातला तकलादूपणा, पुरूषी वर्चस्ववाद्यांकडून ऐनकेनप्रकारे घेतला जाणारा उपभोग, आपलं वरचेवर होणारं वस्तुकरण तासाभराच्या एखाद्या इव्हेंटसाठी हजारो-लाखो रूपये मेकअपवर खर्च करणाऱ्या स्त्रियांच्या जोवर नीटपणे लक्षात येत नाही तोवर त्यांचे टेबल्स, त्यांच्या पर्स आरोग्याला हानी पोहचवणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांनी ओसंडून वाहणार आहेत.आणि ' Woman is only An OBJECT' यावर वारंवार शिक्कामोर्तब होणार आहे.

- कविता ननवरे.
https://abpmajha.abplive.in/blog/destroy-the-makeup-and-indian-womens-kavita-nanavares-blog/amp