Wednesday, May 27, 2020

बातमी

भारतीय राज्यघटनेचे प्रकरण चार - विशेष निदेशक तत्त्वे : अनुच्छेद ३५०-क प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी - प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी, भाषिक अल्पसंख्यांक समजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि अशा सोयी पुरविणे शक्य व्हावे यासाठी राष्ट्रपती स्वत:ला आवश्यक किंवा योग्य वाटतील असे निदेश कोणत्याही राज्याला देऊ शकेल. असे असता प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण झाले असून ते तात्काळ थांबवावे.
#मराठीशाळावाचवा
#मातृभाषेतूनशिक्षण

#मराठीएकीकरणसमिती


विचार

हे आहेत खरे #कोरोनायोद्धा ! 🙏 अन्नदान श्रेष्ठ दान!
....

व्यवसाय करता करता मराठीपणा कसा जपावा यात उत्तम उदाहरण. #मराठीबोलाचळवळ

रांगोळी

परभणी जिल्ह्यातील, जिंतूर येथील 'ज्ञानेश्वर बर्वे पाटील' यांनी रांगोळीच्या माध्यमातून श्री गजानन महाराजांची साकारलेली अप्रतिम कलाकृती...👌👌👌 
🌺🌺🙏🙏जय श्री गजानन🙏🙏🌺🌺

Fb page @ #गणगणगणातबोते

Tuesday, May 19, 2020

देशभक्त नथुराम गोडसे जयंती

आज देशभक्त  #नथुराम_गोडसे यांची जयंती...

 नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे १९१०
ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे
झाला होता. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट
ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती.
त्यांची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने
फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती.
आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे
प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याचे नाक
टोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे
लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध
झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता.
 धार्मिक आणि अलौकिक आवडी
नथुराम गोडसे लहानपणी ध्यानावस्थेत जाऊन जे श्लोक
म्हणत ते त्यांनी कधीच वाचले नव्हते, असे म्हणतात.
या अवस्थेमध्ये ते आपले कुटुंब
आणि कुलदेवता यांच्या दरम्यान माध्यमाचे काम करीत
असेही सांगितले जाते. पण हे सगळे वयाच्या १६
व्या वर्षापासून संपून गेले .
यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. भारतीय
स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग
घेण्यासाठी त्यांनी यांनी हायस्कूलचे शिक्षण मध्येच
सोड्ले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक
पुस्तकांत मन रमवले. त्यांनी रामायण, महाभारत, गीता,
पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर
टिळक, मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर
अभ्यास केला होता .

 ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे दिल्ली येथील
बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींच्या ४०
मिनिटे आधी पोहचले. गांधी सभेसाठी जात असताना नथुराम
यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहनदास करमचंद
गांधी यांचा खून केला. खुनानंतर पळून जाण्याचा गोडसे
यांनी अजिबात प्रयत्न केला नाही.  (वाद सुरू आहे फक्त दोन गोळ्या नथुराम जींच्या पिस्तूल च्या होत्या तिसरी नाही)
गांधींच्या खुनाचा खटला
नथुराम गोडसेंवर मोहनदास
गांधी यांचा हत्येचा खटला पंजाब उच्च न्यायालयात
चालविण्यात आला. याव्यतिरिक्त त्यांच्यावर अवैध
शस्त्र बाळगणे यांसारखे अजून १७ आरोप ठेवून खटले
चालविण्यात आले होते .
गांधीहत्येचे कारण
खून खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम
गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे
यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम गोडसेंचे ते निवेदन
भारत सरकारने प्रतिबंध घालून प्रसिद्ध करण्यास मनाई
केली होती. या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ
आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे यांनी ६० वर्षे
न्यायालयीन लढाई केली. परिणामस्वरूप सर्वोच्च
न्यायालयाने हा प्रतिबंध
काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला परवानगी दिली .

न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५०
कारणे सांगितली होती. त्यांतली प्रमुख अशी --

1. अमृतसरच्या सन १९१९च्या जालियनवाला बाग
हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर
यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात
यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास
गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला .
2. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव
यांना दिलेल्या फाशी मुळे संतापलेली जनता गांधींकडे
आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण
देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण
गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक
कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .
3. ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनात
संबोधित करताना गांधीने मुस्लीम लीगच्या हिंसेसमोर
जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.
4. महंमद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुस्लीम
यांच्या विरोधाला न जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत
आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण केरळमध्ये
मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण केली, आणि जवळ
जवळ १५०० हिंदू ठार मारले गेले आणि २०००
हिंदूना बाटवून मुसलमान केले. गांधीनी याचा निषेध न
करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो की बहादुरी असे केले.
5. सन १९२६ मध्ये आर्यसमाजाच्या शुद्धीकरण
आंदोलनाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल
रशीद नावाच्याएका मुसलमान युवकाने केली. यावर
प्रतिक्रिया देताना गांधीनी, या अब्दुल रशीदला आपला भाऊ
म्हटले, त्याचे कृत्य बरोबर आणि आर्य
समाजाची शुद्धीकरण चळवळ ही राष्ट्रविरोधी आणि हिंदू
मुसलमान एकतेसाठी घातक आहे असे जाहीर केले.
6. गांधींनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज,
महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट
राष्ट्रभक्त म्हटले होते.
7. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर
मुस्लिमबहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन
प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट
हैदराबादच्या निझामाला हैदराबाद हिंदुबहुल
असूनही समर्थन दिले होते.
8. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच दिली होती.
9. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१ मध्ये
चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय
घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज
तिरंगी केला गेला.
10. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष
निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन
पट्टाभिसीतारामय्या यांना असल्यामुळे आणि सुभाष
बाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे
आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.
11. लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई पटेल हे
बहुमताने निवडूनआले असूनही केवळ गांधींच्या हट्टामुळे
हे पद जवाहरलाल नेहरू यांना दिले गेले.
12. १४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये आझालेल्या अखिल
भारतीय काँग्रेस समितीमध्ये भारताच्या फाळणीचा निर्णय
अस्वीकृत होणार होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस
विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले. या आधी त्यांनीच
म्हंटले होते की विभाजन हे माझ्या प्रेतावरच होईल.
13. जवाहरलाल
नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर
पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित
केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसतानादेखील
त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले, आणि त्याच
वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने
व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण करून सरकारवर
दबाव आणला.
14. पाकिस्तानातून आलेले हिंदू
निर्वासितांनी जेव्हा मशिदीत
तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला,
वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर
राहण्यास भाग पाडले.
15. ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर
अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न
देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे
हे दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून
ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास
सरकारला बाध्य केले.

 फाशीची कार्यवाहि होण्यापुर्वि काहि मिनिटे
आधि नथुराम गोडसे यांनी आपले बंधु श्री दत्तात्रय
यांच्या कडे आपली अंतिम
ईछ्चा प्रकट केली..
" जो पर्यंत सिंधू नदी अखंड
हिंदुस्तानातून प्रवाहित होत नाही ..भले
त्या साठी कितिहि वर्षे लागोत..
कितिहि पिढ्या येवो जाओ तो पर्यंत
माझ्या अस्थिचे विसर्जन करु नये..
श्री नथुराम गोडसे व श्री नारायण आपटे
यांच्या वर अंतिमसंस्कार झाल्या नंतर
अस्थि कुंभ त्यांच्या नातेवाईकां कडॆ
सोपवण्यात आला नव्हता..
...जेल प्रशासनाच्या लोकांनी तो अस्थि व
रक्षा कुंभ रेल्वे पुलावरुन खाली वहाणा~या नदित
फेकुन दिला...
परंतु जेल कर्मचा~या पैकी एकाने
हि घटना एका दुकादारास सांगीतली...
व त्या दुकानदाराने तत्परतेने
हि बातमी हिन्दू महासभा कार्यकर्ता इन्द्रसेन
शर्मा यांच्या पर्यंत पोहोचवली..
शर्मा आपल्या कार्यकर्त्यांना घेवुन
नदिवर गेले.. व तो अस्थि व रक्षा कुंभ
सुरक्षित पणे बाहेर काढला व स्थानीय
कॉलेज चे एक प्रोफ़ेसर ओमप्रकाश कोहल
यांच्या कडे सुपुर्द केला जो त्यांनी नंतर डॉ एल
व्ही परांजपे यांचे कडे नाशिकला जावुन सुपुर्द
केला...
पुढे हा अस्थि-कलश १९६५ मधे नाथूराम
गोड़से याचे छोटे भाऊ गोपाळ गोड़से
यांचे कडे पोहोचता केला गेला ज्या वेळी ते
शिक्षा भोगुन जेल च्या बाहेर आले..
१५ नोव्हेंबर १९५० ते आज पर्यंत
प्रत्येक १५ नोव्हेंबर ला गोड़से
यांचा "#हुतात्मा_दिवस" साजरा केला जातो...
सर्वात प्रथम गोड़से व आपटे
यांच्या फोटोस व अखंड भारताच्या फोटोस
पुष्पहार घातला जातो व
त्यांच्या मृत्यस जितके वर्षे झालीत
तितके दिप प्रज्वलीत केले जातात व भारत
मातेची आरति केली जाते..व नंतर उपस्थित
सर्वलोक गोडसे यांच्या अखंड
भारताच्या स्वप्ना साठी काम करित राहु
अशी शपथ घेतात....
आजहि नथुराम गोडसेंच्या अस्थींचे
अद्याप विसर्जन झालेले नाही आहे.
त्यांची अंतिम इच्छा अशी होती
" जो पर्यंत #सिंधू_नदी_अखंड_हिंदुस्तानातून_प्रवाहित_होत_नाही_तो_पर्यंत_माझ्या_अस्थी_विसर्जित_करण्यात_येवू_नये, भले
त्याला कितीही वर्षे लागली तरी चालतील
तो पर्यंत त्या पिढी दर पिढी हस्तांतरित
करण्यात याव्यात".
दरवर्षी १५ नोव्हेंबरला (नारायण आपटे
व नथुराम गोडसे उत्सर्ग दिवस)
इच्छापत्र पुनरुच्चार समारोह पूर्वक
केला जातो.

नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५
नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये
फाशी देण्यात आले. त्यांचे अंतिम शब्द असे होते, 

" जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप
केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर
मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो". 

 नथुरामजी यांना विनम्र अभिवादन..!!
#जय_हिन्दूराष्ट्र!🚩

Saturday, May 9, 2020

पैलपाखरांचा थवा ऐल तटावर उतरविणारा अनुवादकार : रवींद्र गुर्जर -- प्रा. कृष्णाजी कुलकर्णी

या लेखाचा संपादित अंश आजच्या eSakal मधे प्रसिध्द झाला आहे.

पैलपाखरांचा थवा ऐल तटावर उतरविणारा अनुवादकार : रवींद्र गुर्जर
 -- प्रा. कृष्णाजी कुलकर्णी
भ्रमणध्वनी : 9960487995

सुमारे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ आठवतो... वाचन हा तसा एकमेव आनंद त्या
काळात उपलब्ध होता. अर्थात्, त्या वेळेच्या आमच्या पिढीला आजही हाच ‘एकमेव आनंद
वाटतो’ हे कदाचित आमच्या पिढीचे माहिती आणि तंत्रज्ञान युगातले अज्ञान असावे.  असेल ते
असो - पण आजही वाचनाचा आनंदच खरा आनंद वाटतो! त्यावेळी म्हणजे पंचेचाळीस वर्षांपूर्वी
तर रेडिओ ऐकणेही चैनीची बाब होती. साथीला होती ती ग्रंथसंपदा! ती सुद्धा ग्रंथालयाच्या
कपाटात! खरे तर त्या काळी अभ्यासक्रमाला नेमलेल्या पुस्तकांखेरीज इतर वाचन करणे म्हणजे शुद्ध ‘उडाणटप्पूपणा'च होता! तो उडाणटप्पूपणा आमच्या पिढीने भरपूर केला. स्वत:चे एखादे आवडते पुस्तक असणेही दुरापास्तच! अशा काळात आमच्या गळतग्यासारख्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील खेड्यात माझ्या हाती ‘पॅपिलॉन’ पडले! पुस्तक नावापासूनच आगळेवेगळे. हेन्री शॅरियर नावाच्या जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका फ्रेंच व्यक्तीचे आत्मचरित्र. मराठीत त्याचा अनुवाद करणारे श्री. रवींद्र गुर्जर! इतकाच तपशील ज्ञात होता. पुस्तक एका झपाटलेल्या आघाशीपणाने वाचून काढले. पुन्हा वाचले, पुन:पुन्हा वाचले... ह्या प्रवासात हे पुस्तक परभाषेतली अनुवादित पुस्तक आहे हे देखील विसरून गेलो. लक्षात राहिले ते पॅपिलॉन आणि रवींद्र गुर्जर!

तसा आजच्या दृष्टीने तो स्वस्ताईचा काळ होता असे म्हणतात. (आम्हाला ही स्वस्ताई कधी
भेटलीच नाही. प्रत्येक काळ आम्हाला महागाईचाच वाटतो!) चांदोबा 50 पैसे आणि अमृत
(मासिक) 1.50 पै. इतके स्वस्त!. ते सुद्धा विकत घेणे कठीणच होते! सत्यकथा लायब्ररीत बसून आधी मुखपृष्ठावरून हात वगैरे फिरवून मग उघडायचे! आपण सत्यकथा वाचतो म्हणजे कुणी मोठे ज्ञानी आहोत असे वाटे! अशा काळात पॅपिलॉनने झपाटले होते!

वाटावळणांचा प्रवास चालूच राहिला. वाचनातही अनेक संस्मरणीय ठिकाणे भेटली; पण
त्यावेळेच्या पॅपिलॉनच्या वाचनाचा ठसा मात्र अमीट राहिला. नोकर्‍या बदलत-बदलत
अखेरीस गोव्यात शिक्षक झालो. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गोवा-कोकण भागात भ्रमंतीही झाली. एक-दीड वर्षापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकणात- देवरुखला जाण्याचा योग आला. आयोजकांनी आम्हा पाहुण्यांची सोय एकत्र केली होती. बदलापूरचे ‘ग्रंथसखा’चे शिल्पकार श्री. श्याम जोशी प्रमुख पाहुणे होते. आदल्या दिवशीच्या रात्रीच्या वेळी आम्ही शेकोटीभोवती गप्पा मारत बसलो. श्याम जोशींनी आपल्याबरोबर आलेल्या स्नेह्यांची ओळख करून दिली. शांत, मितभाषी असे एक गृहस्थ श्याम जोशींच्या मागून पुढे आले. श्याम जोशी म्हणाले, ‘‘हे पुण्याचे प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर!’’ - झाले माझ्या डोळ्यांसमोरून
पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ झपाट्याने सरकू लागला. ‘पॅपिलॉन’ आणि ‘रवींद्र गुर्जर’ हे अद्वैत
असे अचानक नजरेसमोर साकारावे, त्या आश्‍चर्याच्या धक्क्यात मी होतो.

बघता-बघता पंचेचाळीस-पन्नास वर्षांचे अंतर तुटले आणि गुर्जरांशी खूप वर्षांची मैत्री असावी,
तशा गप्पा झाल्या. स्वत:विषयी अत्यंत कमी बोलणारे व्यक्तिमत्त्व, पण वाचन प्रवासात
‘पॅपिलॉन’नंतरही ते अनेक ठिकाणी भेटतच होते. तो सारा आलेख आठवत राहिलो. नंतरच्या
वाचनयात्रेत गुर्जरांची किती तरी पुस्तक वाचनात आली. ‘पॅपिलॉन’चा दुसरा भाग म्हणून
‘बँको’, पुझोचे 'गॉडफादर’, ‘कोमा’, ‘चार्ली चॅपलीन’, ‘सेकंड लेडी’, ‘आईनस्टाईन’, ‘हाईनरिश
श्लीमान’वर लिहिलेले ‘सुवर्णयोगी’ अशी किती तरी...! नव्याने झालेल्या या भेटीला संवादांचे
धुमारे फुटले. रवींद्र गुर्जर हे अत्यंत साधे, सरळ, शांत, मितभाषी, पण सतत काही ना काही
उपक्रमांत गुंतलेले आढळले. वास्तविक पाहता त्यांचे शिक्षण बी.ए. (गणित), बी. जे.
(वृत्तपत्रविद्या), एम.ए.पीएच्.डी. (पुरातत्त्व) अशा वैविध्याने साकारले आहे. आयुर्वेद रसशाळा, विशाल सह्याद्री पुरवणी संपादक, संतकृपा/धर्मश्री प्रकाशन, डेक्कन कॉलेजमध्ये  पुरातत्त्व विभाग - संगणक विभागप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे; पण खर्‍या अर्थाने ते रमले ते अनेक दर्जेदार इंग्रजी पुस्तके मराठीत भाषांतरित करण्याच्या कामात. गेली चाळीस वर्षे ते ‘गायत्री साहित्य’ हे प्रकाशन चालवितात. या माध्यमातून कथा, कादंबर्‍या, धार्मिक, संस्कृत- अनुवाद. अशी सुमारे 100 हून अधिक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. इंग्रजी वाचनाचा आणि इंग्रजी सिनेमांचा प्रचंड नाद! अक्षरश: हजारो चित्रपट पाहिले आहेत. ह्या व्यासंगाबरोबरच पर्यटन, आपले स्वास्थ्य, संतकृपा, विश्‍व पांथस्थ, समर्थ संदेश, ग्रंथ भारती यांसारखी अनेक नियतकालिके आणि पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ग्रंथ आणि वाचन यांच्यावरील प्रेमामुळे ‘स्वायत्त मराठी विद्यापीठ, बदलापूर' या वाचन संस्कृतीला वाहिलेल्या संस्थेचे ते मार्गदर्शकही आहेत.

माझ्यासारख्या इंग्रजी वाचनाची ‘फ्युएन्सी’ नसलेल्या वाचकावर रवींद्र गुर्जरांचे अनंत उपकार
आहेत. अन्यथा, ‘गॉडफादर’, ‘सेकंड लेडी’, ‘कोमा’, ‘पेलिकन ब्रीफ’, ‘आईनस्टाईन’, ‘चॅपलीन’,
‘बिटवीन शेड्स ऑफ ग्रे’.... यांसारख्या अभिजात इंग्रजी ग्रंथांच्या वाचनाला मुकावे लागले
असते. भाषांतर ही साहित्याची एक वेगळी शाखा आहे. आपल्या संस्कृतीशी, विचारपद्धतींशी,
जीवनशैलीशी अत्यंत अपरिचित असलेल्या परप्रांतीय, परभाषिक वाङ्मयाचा वेध घेऊन त्या
साहित्य-संस्कृतीचे मराठीत साधे, सरळ, सुबोध आणि ओघवते भाषांतर करणे म्हणजे केवळ
भाषा-अंतर नव्हे! इंग्रजीमधल्या लेखनातील सर्व कंपने, संवेदना आणि अर्थछटांचा संवेदनशील
वेध घेऊन पुन्हा मराठी भाषेत लिहिणे म्हणजे एक नवसृजनच आहे, असे मला वाटते. खरे तर
स्वलिखित साहित्यकृतीमध्ये आणि सुंदर, ओघवत्या, आशयसंपन्न आणि अर्थपूर्ण अशा
भाषांतरामध्ये कोणताही दर्जात्मक फरक करावा, असे मला वाटत नाही. आज मराठी भाषा
विविध अंगाने समृद्ध होत आहे. इतर भाषांतून मराठीमध्ये आलेल्या भाषांतरित साहित्याने
आपले स्वत:चे असे एक समृद्ध दालन सजविले आहे. ह्या दालनामध्ये अनेक चमकून
दिसणार्‍या कलाकृतींची भर रवींद्र गुर्जरांना घातली आहे. मराठी भाषेच्या समृद्ध आणि
विकसित होण्याच्या ह्या प्रवासास गुर्जरांचे योगदान महत्त्वाचे आहे.

रवींद्र गुर्जर येत्या २९  एप्रिल रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने
त्यांच्या कार्याचा, विविध व्यासंगांचा, त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांचा वेध घ्यावासा वाटतो.
आयुष्याच्या त्या टप्प्यावरही त्यांच्या सुरू असलेल्या उपक्रमांची यादी मोठी आहे. संगीत व
नाट्यकलेचे चाहते असलेल्या गुर्जरांनी अक्षरश: हजारो कार्यक्रमांचा आस्वाद घेतला आहे.
त्यांच्या अनुवादाचे हजारो वाचक देशात, परदेशात विखुरलेले आहेत. आजही अनेक
कार्यशाळा, मुलाखती, ग्रंथोत्सव, व्याख्यानमाला ह्या निमित्ताने समस्त मराठी विश्‍वात
त्यांचा संचार सुरूच आहे. बदलापूरच्या ग्रंथसखाचे निर्माते श्री. श्याम जोशी यांच्या समवेत
महाराष्ट्रभर वाचन संस्कृतीच्या अभिवृद्धी योजनांमधून ते कार्यरत आहेतच. ह्याच योजनेचा एक भाग म्हणून अगदी परवा ते गोव्यात येऊन गेले. वाचन संस्कृतीच्या प्रेमापोटी त्यांनी
फोंड्याजवळच्या बोरी (बा. भ. बोरकरांचे गाव) ह्या छोट्याशा गावात आम्ही चालवीत
असलेल्या लहानशा वाचनालयाला भेट देऊनही गेले. वाचन संस्कृती सर्वदूर पसरावी, अगदी
खेड्यापाड्यांतही सुजाण वाचक निर्माण व्हावेत, ह्या तळमळीतून वाचनसंस्कृतीला जे-जे पोषक आणि साह्यभूत आहे, त्यात भाग घेण्याची त्यांची धडपड विलक्षण आहे. गेल्या 100 वर्षांत गाजलेल्या मराठी पुस्तकांचे त्यांचे संकलन आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रभर
किमान 500 सांस्कृतिक केंद्रे आणि घरगुती वाचनालये सुरू व्हावीत, असा त्यांचा प्रयत्न आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परभाषेतील उत्तमोत्तम साहित्य मराठी भाषेत यावे व मराठी
अनुवादाचे दालन अधिक समृद्ध व्हावे, या दृष्टीने ‘अनुवाद’ या विषयावर ते बहुमोल मार्गदर्शन
करतात. सुमारे 500 हून अधिक अनुवादक त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.

आज वयाच्या अमृतमहोत्सवी टप्प्यावरही रवींद्र गुर्जरांचा वाचन-लेखन प्रवास त्याच वेगाने
चालला आहे. जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्याच्या आस्वादाने त्यांचे मन अधिकच
आत्मलक्ष्यी बनते. मग 'मम आत्मा गमला' सारखी छोटी पण ‘स्व’चा शोध घेणारी पुस्तिका
आपसूकच साकार होते. गुर्जरांनी आपल्या भोवतीच्या साहित्याचा, संगीताचा, नाट्यसृष्टीचा,
चित्रपटसृष्टीचा मनमुराद आस्वाद घेतला. अनेक प्रतिभावंतांचा सहवासही त्यांना लाभला.
मनात येईल, त्या उपक्रमांत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. डोळ्यांसमोर मात्र ‘वाचन
संस्कृतीची अभिवृद्धी’ हाच ध्यास ठेवला. आजही त्याच ध्यासाने ते कार्यरत आहेत. अशा अनेक
उपक्रमांत ते जरी ते मग्न असले, तरीही त्यांची हजारो वाचकांच्या मनातील प्रतिमा मात्र
‘पॅपिलॉन’कार गुर्जर! हीच आहे. एखाद्याच कलाकृतीच्या वाट्याला असे भाग्य येते. इतकी वर्षे
होऊन गेली.  रवींद्र गुर्जरांची 35 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली, तरीही माझ्या मनातले
‘पॅपिलॉन’ पंख मात्र रवींद्र गुर्जरांच्या नावाबरोबरच लयबद्ध हलल्यासारखे वाटतात!  पंचेचाळीस वर्षांपूर्वीचे  ते पुस्तक आजही मी हाताळतो आहे, असे वाटते आणि जागतिक साहित्यातील पैलपाखरे मराठी माणसाच्या अंगणात उतरविण्याचे श्रेय रवींद्र गुर्जरांचे आहे, ह्याची साक्ष पटते.

Tuesday, May 5, 2020

Sunday, May 3, 2020

महाराष्ट्र दिन

मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य 
संघटना आयोजित 


#महाराष्ट्र_दिन प्रश्न मंजुषा या स्पर्धेचे उत्तरे







....







जय मराठी ! जय महाराष्ट्र 
#मराठीएकीकरणसमिती

Friday, May 1, 2020

गोष्ट कोकणातली


#Goshtakokanatli

आज दिनांक १ में २०२० रोजी

आपलो गाववालो अनिकेत रासम पेपरात झळकलो आसा!☺️ अभिनंदन त्याचे ! 👏👏👏👏


महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩



Wednesday, April 29, 2020

आदि शंकराचार्य जयंती

आदि शंकराचार्य जिन्हें भगवान शिव का अवतार भी माना जाता है उनकी जयंती 28 अप्रैल को देशभर में मनाई जाती है
 हिंदू धर्म की महान शख्सियत को उनके जन्म दिवस के अवसर पर सादर नमन. 
देश के चारों कौनों में अद्वैत वेदांत मत का प्रचार करने के साथ ही आपने पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारों दिशाओं में मठों की स्थापना की इन्हें पीठ भी कहा जाता है।

वेदांत मठ – दक्षिण भारत में आपने वेदांत मठ की स्थापना श्रंगेरी (रामेश्वरम) में की। यह आप द्वारा स्थापित प्रथम मठ था इसे ज्ञानमठ भी कहा जाता है।

गोवर्धन मठ – इसे आपने पूर्वी भारत (जगन्नाथपुरी) में स्थापित किया। यह आदि शंकराचार्य जी द्वारा स्थापित दूसरा मठ था।

शारदा मठ – पश्चिम भारत (द्वारकापुरी) में आपने तीसरे मठ की स्थापना की इसे कलिका मठ भी कहा जाता है।

बद्रीकाश्रम – इसे ज्योतिपीठ मठ कहा जाता है। यह आप द्वारा उत्तर भारत में स्थापित किया गया।
Source fb


Sunday, April 26, 2020

उपक्रम

हाय एव्हरीबडी..

'बिइंग वुमन'ची नवीन आणि आकर्षक वेबसाईट..

या नवीन वेबसाईटमुळे आता आपण एकमेकांशी फास्ट कनेक्ट होणार आहोत..!!
करोनामुळे या वेळचा अंक आम्ही तुमच्यापर्यंत ई-पेपरच्या स्वरुपात पाठवला आहे...
आपल्या वेबसाईटवर जाऊन बिइंग वुमनचे यापूर्वीचे अंकपण तुम्ही वाचू शकाल....

वाचा आणि अभिप्राय द्या... वाट बघतोय....
घरीच राहा....सुरक्षित राहा...

ई-पेपर, वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, नवनवीन सदरं वाचा या नव्या वेबसाईटवर!

Going Digital With Keeping Our Roots with The Print!!

Saturday, April 25, 2020

परशुराम कथा

वंशज हूँ परशुराम का,शास्त्र मेरी गाथा है🚩🚩🚩
हिन्दू धर्म में जन्मा हूँ, भारत मेरी माता है🚩🚩🚩

भगवान विष्णु जी के छठवें अवतार भगवान श्री #परशुराम जी की जयंती पर समस्त देश एवं प्रदेशवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं 🙏🏻🙏🏻🙏🏻

पौराणिक मान्यता अनुसार अक्षय तृतीया के दिन किए गए शुभ एवं पुण्य कार्य अनंत और अक्षय फल देने वाले होते हैं। इसी मान्यता ने संपूर्ण जनमानस को आज के दिन अधिकाधिक स्थिर वैभव, शांति और पुण्य अर्जित करने हेतु प्रेरित किया है। आज के दिन स्वर्ण आभूषण आदि का क्रय शुभ एवं स्थाई माना जाता है। आज का दिन बिना किसी लग्न और मुहूर्त के विचार के समस्त शुभ और मांगलिक कार्य करने हेतु सर्वश्रेष्ठ समझा जाता है।  इसीलिए बिना किसी शुभाशुभ के विचार के विवाह आदि मांगलिक कार्य बहुतायत से संपन्न किए जाते हैं। 

आज का दिन भगवान परशुराम के जन्मोत्सव के रुप में भी मनाया जाता है। पौराणिक मान्यता अनुसार भगवान परशुराम विष्णु के छठे अवतार हैं। उन्हें भगवान विष्णु का "आवेशावतार" भी माना जाता है। परसुराम का उल्लेख कई पुराणों, महाभारत और रामायण आदि ग्रंथों में प्रचुरता और प्रमुखता से पाया जाता है।

परशुराम एकमात्र अवतार हैं जो सतयुग, त्रेता और द्वापर तीनों युगों में महत्वपूर्ण रूप से उल्लिखित है। परशुराम का अवतरण तत्कालीन समाज में व्याप्त अराजकता, अत्याचार,अनाचार, दुराचार को समाप्त करने के लिए हुआ माना जाता है जिसे उन्होंने भगवान शंकर द्वारा, इसी उद्देश्य के लिए प्रदत्त "परशु"नामक अस्त्र से समाप्त किया। ऐसी मान्यता है कि उन्होंने 21 बार अनाचारी  शासकों का संहार किया।

त्रेता युग में सीता स्वयंवर हेतु खंडित हुए "पिनाक" शिव धनुष के कारण भगवान परशुराम का मिलन राम से हुआ। अपने क्रोध अतिरेक के कारण वे राम को नहीं पहचान पाए,परंतु श्रीराम द्वारा अत्यंत विनम्र भाव से उन्हें वस्तु स्थित समझाई गई और उन्हें स्मरण कराया गया कि वह ब्राह्मण हैं "नव गुण परम पुनीत तुम्हारे" कहकर श्रीराम द्वारा स्मरण कराए जाने पर उन्होंने राम को पहचाना, और अपनी संशय समाप्ति भगवान विष्णु द्वारा प्रदत्त "सारंग" नामक धनुष की प्रत्यंचा चढ़ाने का अनुरोध किया और संशय मिट जाने के पश्चात वह जनक की सभा से शालीनता पूर्वक,युग-संरक्षण का दायित्व प्रतीकात्मक रूप से, "सारंग" नामक दैवी धनुष के साथ श्रीराम को सौपकर, तपश्चर्या हेतु वन प्रस्थान कर गए।

यह घटना शास्त्रों में इस रूप में वर्णित है कि धर्म रक्षा का दायित्व जो अब तक परशुराम को दिया गया था उसे अब आगे त्रेता युग में श्री राम संभालेंगे।इस घटना के बाद ही "आवेशावतार" परशुराम "तेजो हरण" के उपरांत कल्पांत पर्यंत भूलोक पर तपस्यारत रहने हेतु वन गमन कर गए। ऐसी मान्यता है की परशुराम पृथ्वी के सात चिरंजीवियों में एक हैं जिनकी मृत्यु अब तक नहीं हुई है और वह कलयुग के अंत तक इस पृथ्वी पर अपने दायित्व का निर्वहन करते रहेंगे।

भगवान राम ने परशुराम जी से जिन नव गुणों की चर्चा की थी वह मनुष्यता के लिए अत्यंत आवश्यक हैं।यह सभी नव गुण ब्राह्मणों में होना अनिवार्य बताया गया है।इन्हें ही "नव-निधि" के नाम से भी जाना जाता है। यह निधियां आत्मिक, बौद्धिक और सांसारिक हैं। आत्मिक निधि के अंतर्गत 1-विवेक 2-पवित्रता 3-शांति को गिना जाता है बौद्धिक निधि के अंतर्गत 4-साहस 5- स्थिरता और 6-कर्तव्यनिष्ठा तथा सांसारिक निधि के अंतर्गत 7-उत्तम स्वास्थ्य 8-समृद्धि और 9-परस्पर सहयोग को माना जाता है। इन्हीं का स्मरण भगवान राम ने "नव गुण परम पुनीत तुम्हारे" कहकर कराया था। ब्राह्मणों द्वारा धारण किए जाने वाले जनेऊ के तीन सूत्र इन्ही आत्मिक,बौद्धिक और सांसारिक निधियों का प्रतिनिधित्व करते हैं। प्रत्येक सूत्र में तीन तीन सूत्र और होते हैं जो पुनः ऊपर बताई गई निधियों को इंगित करती हैं।इस प्रकार प्रत्येक जनेऊ में 9 धागे होते हैं जो उसे निरंतर इन नव निधियों की प्राप्ति का अभ्यास करने हेतु प्रेरित करते हैं।

पौराणिक आख्यान के अनुसार भगवान विष्णु ने त्रेता युग में अपना "सुदर्शन चक्र" भगवान परशुराम को सौंप दिया था। जो द्वापर युग में भगवान परशुराम ने श्री कृष्ण को ऋषि संदीपनी के आश्रम में प्रदान कर त्रेता युग में अनीति, अधर्म, अन्याय आदि की समाप्ति में उनकी भूमिका को रेखांकित कर दिया था।

अक्षय तृतीया के इस पुनीत अवसर को ब्राह्मण समाज अपने पुनर्जागरण, पुनर्संगठन और पुनरुत्थान के अवसर के रूप में अपनी पुरातन- प्रतिष्ठा एवं सामाजिक श्रेष्ठता की पुनर्प्राप्ति की आकांक्षा से मनाता है।भगवान परशुराम से ज्ञान और शक्ति दोनों दृष्टियों से अपने को सामर्थ्यवान बनाने का अभिलाषा करता है। परंतु यह अभिलाषा चिरकाल से अपूर्ण ही है। इसकी पूर्ति के लिए आवश्यक है कि ब्राह्मण समाज अपने में आई विकृतियों,अहंकार, लोभ, दंभ, नशा, आहार-विचार भ्रष्टता, अज्ञानता आदि को दूर करने हेतु त्याग और तपश्चर्या पूर्ण जीवन को अपनाए।ऊपर लिखित नौ निधि या सद्गुणों का निरंतर अभ्यास करे। समाज के सब भांति उत्थान हेतु अपने को समर्पित करें,तभी सामूहिक रूप से ब्राह्मण समाज अपने पूर्व गौरव को प्राप्त करने में समर्थ हो पाएगा। 

                   🚩🙏🏻जय श्री महाकाल🙏🏻🚩

#fbshare

जात

#परशुराम श्रावण संवाद !
जातीचा संबध कर्माशी असतो ! ब्राम्हण चा मुलगा ब्राह्मण ..वैश्य चा मुलगा वैश्य नसतो!
https://youtu.be/Mo2f6iElKWY

परशुराम जन्माने ब्राह्मण आणि कर्माने क्षत्रिय होते !
विद्या

Tuesday, April 21, 2020

लेख २

 "#एका_संन्यासाची_खरी_गोष्ट ".......!!!!
(योगी आदित्यनाथ महाराज) 
😪😪😪😪😪😪

आई !!! मला खरंच संन्यासी बनण्याची इच्छा आहे.
माझ्या जीवनाची सुरवात येथे होणार नाही......... मला माझा समाज मला आर्तभावातुन बोलवत आहे!
मला जायला लागेल आई!
कोणाला तरी अग्नीकुंडाची आहुती बनले पहिजे!

आई!!! तर तू कधीच माघारी येणार नाहीस का.......???

 दोघांत वडील आनंद रडत योगीना एक प्रश्न विचारतात - " जेव्हा मी मरत असेल तेव्हा, पण तू येणार नाहीस का "........??? 

बाबा, मी माझ्या कर्माने तुम्हाला तर्पण (संतूृष्ट)करेल. 

आज सरकारी वार्ताफलमध्ये(मिटिंग)असताना  वडिलांचे निधन झाल्याची बातमी  फोनवरून समजली तरीही पडक्या चेहरा घेऊन रडक्या  आवाजात मिटींगमध्ये कोरोना सबंधीत विषयावर सरकारी यंत्रेला आदेश देत होते....... आपल्या वडिलांच्या अंतिमसंस्कार पेक्षा आपल्या कर्तव्यास प्रथम प्रधान्य देत आपल्या जनतेचे हित लक्षात ठेवत आपल्या राज्याची सेवा 'दिवस-रात्र' योगी आदित्यनाथ करत आहेत........लॉकडाउननंतरच आपल्या घरातील सदस्याना ते भेटण्यास जाणार आहेत व त्याचबरोबर अंतिमदर्शनास जास्त गर्दी करु नये म्हणून ही आदेश दिला आहे........एकदा श्रीराम प्रभू सहज बोलले होते संतापेक्षा कोणताच राजा मोठा नसतो......... त्याचबरोबर एका राजाचे गुणवर्णन करताना सांगितले होते एका राजासाठी आपल्या घरातील सदस्यांपेक्षा प्रजाच (जनता)सर्वस्व असते......... आपल्या जनतेसाठी जो राजा आपले सर्वस्व त्यागण्याची क्षमता ठेवतो तोच सर्वश्रेष्ठ राजा असतो !

" #योगी_आदित्यनाथ_यांचे_वडिल_ आनंद_सिह_बिश्त_यांना_भावपुर्ण_श्रद्धांजली ".
            🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

   

✍️ लेखक :- रितेश राजाराम काळोखे.

लेख १

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला साष्टांग नमस्कार ! ! 
नमस्कार बंधूंनो,
आज एक खूप सुंदर अनुभव आला. संघ कार्याचा हा महिमा असेच म्हणावे लागेल.

विलेपार्ले ला एक ८५+ वयाचं मुजुमदार नावाचं जोडपं रहातं . त्यांच्या मुलीने त्यांना जेवणाचा डबा लावून दिला  आहे .डबा आणि इतर सहायता म्हणून एक नर्स लावून दिली आहे. इथे त्यांचं दुसर कोणी नाही. ५२ वर्षाचा मुलगा आहे पण तो अधू आहे.  मुलगी अमेरिकेत आहे.

कोरोना प्रकरणात डबा पोचला नाही, नर्स पोचली नाही म्हणून मुलगी काळजीत. तिने तिथल्या संघाच्या कार्यकर्त्याला काही मदत करता येईल का ते पाहावे असे सांगितले. ज्याला सांगितले तो अमेरिकेतील कार्यकर्ता माझ्या नागपूरच्या आदित्य नावाच्या एका स्वयंसेवक बंधूचा मित्र आहे. आदित्य त्याला म्हणाला," बघतो". आदित्य ने मला फोन केला की असं असं आहे काय करता येईल. त्याला सांगितले की मी बघतो. काल उशीर झाला होता, रात्री पावणे बारा वाजले होते, म्हणून पार्ल्या च्या कार्यकर्त्याचा नंबर कसा मिळवायचा ह्या विचारात असताना, तिकडे जर्मनी मध्ये फ्रॅंकफर्ट चा मुख्यशिक्षक, आदित्य नावाचाच  संघाचा एक कार्यकर्ता आहे जो की मूळ चा विलेपार्लेचा आहे त्याची आठवण झाली. शिवाय जर्मनी वेळेनुसार तीकडले संध्याकाळचे सव्वासातच झाले होते म्हणून त्याला व्हॉटसअप कॉल वर सांगितल की मला पार्ले च्या कार्यकर्त्याचा नंबर देऊन ठेव, अशी अशी मदत हवीये. त्याने नंबर दिला, श्री जयेश शाह पार्ले सहकार्यवाह. मी म्हंटलं," मी उद्या त्यांच्याशी बोलतो तू तूर्तास मेसेज पाठवून ठेव त्यांना".

आता आज त्यांना फोन करणारच होतो, तर त्यांचाच मला मेसेज आला की *काम फत्ते*. श्री दिलीप सोनी नावाचे पार्ल्याचेच स्वयंसेवक त्यांच्या घरा जवळच्याच सोसायटी मध्ये  राहतात. त्यांनी त्यांची जाऊन चौकशी केली आणि त्यांना आश्वस्त केलं. त्यांनी व्हिडिओ पण बनवून पाठवला.

विलेपार्ले...अमेरिका...नागपूर...दादर... फ्रॅंकफर्ट...विलेपार्ले अस वर्तुळ पूर्ण झालं.

मस्त वाटल. संघ स्वयंसेवकांचं जाळं किती मजबूत विणलं गेलंय ते पाहून धन्य वाटलं.

प्रद्युम्न गाडगीळ.

Saturday, April 18, 2020

"वरती" गेल्यावरही उत्तर देता यायला हवं !

"वरती" गेल्यावरही उत्तर देता यायला हवं !

**

सुश्री निर्मलाताई पुरंदरे 

उच्चस्तरीय पुरस्कारांकित व आयुष्यभर समाजभान जपणारे हे नाव. 

डोंगराइतकं काम उभं करूनही आयुष्यात त्यांनी कधीच कुणाला मुलाखत दिली नव्हती. प्रसिद्धीपेक्षा सिद्धी महत्वाची. असं त्यांच मत. 

मात्र जीवनात त्यांनी एकमेव मुलाखत दिली ती मला. "कर्तृत्वाला सलाम" या पुस्तकात मी काही उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा परिचय करून देण्याचं मिशन घेतलेलं. त्यासाठी मला ताईंची मुलाखत हवी होती. मलाही सुरुवातीला नकारच मिळाला. पण जवळपास पंधरा दिवस पाठपुरावा केल्यावर शेवटी त्या हसत हसत म्हणाल्या, "किती चिवट रे तू पण" 

आणि तब्ब्ल दोन अडीच तास मस्त मुलाखत दिली.  

यथावकाश त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी त्यांनाच निमंत्रित केलं. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात देखील माझ्या त्या एकूणच "चिवटपणाचा" उल्लेख पॉजिटिव्हली करून "ध्येय गाठायचे असेल तर असा चिवटपणा अंगी असावा" हे सर्वाना सांगितलं. 

तर त्यांच्या त्या मुलाखतीत त्यांनी इतके सुंदर विचार दिले की त्याचीच एक मोठी सिरीज होईल. पण एक विचार फारच आवडला. 

मी त्यांना विचारलं होत की, "घरी सगळं उत्तम, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेसारखे पती, माधुरी सारखी गुणवान गायिका / लेखिका मुलगी,. प्रसाद अमृत सारखी ध्येयवादी मुलं, हे सगळं करत करत किंवा याना प्रसंगी थोडं बाजूला ठेवून तुम्ही बाकी सामाजिक काम इतकं कसं करू शकला?"

तर त्या म्हणाल्या होत्या, "कसे आहे न की, देवाने आपल्याला इतके चांगले आयुष्य दिले, इतकी चांगली बुद्धी दिली. मग ती वापरली नाही तर काय उपयोग? इथलं सगळं आटोपून "वर" गेल्यावर त्याने जर विचारलं की, बाई ग, इतकं सगळं चांगलं आयुष्य दिल होत, काय केलं तू त्याच? तर मला त्या देवाला किमान एक तरी काम सांगता आलं पाहिजे."

समाजसेवेची हि अनोखी व्याख्या ऐकून मी निशब्द !

अजून एक असाच सुंदर विचार त्यांनी दिलेला (जो पुस्तकात पण मी लिहिला आहे)

मी विचारलं होत, "बाबासाहेब इतिहासात मग्न, तुम्ही वर्तमान व भविष्यकाळ घडवण्यात दंग. पण मग दोघेही जाहीर ठिकाणी कधीच पती पत्नी असा परिचय / उल्लेख करत नाही. असं का ?" 

त्या म्हणाल्या, "हे बघ धनंजय, रेल्वेचे दोन रूळ समांतर असतील तरच त्यावरून रेल्वे नीट धावेल न. रूळ एकमेकांना चिकटत बसले तर अपघात होईल. तसेच दोघेही आपापल्या कार्यात, विश्वात मग्न असतील तर उगीच एकमेकांच्या जगण्यात, कामात लुडबुड करू नये. जन्माला आलेला प्रत्येकजण तसाही स्वतंत्र येतो व जातो. मग उगीच पायात पाय कशाला?"

आजकाल अनेक घरात पती पत्नी दोघेही करियर करत असतील तर त्यापैकी ९०% घरात विसंवाद आणि काही ठिकाणी पराकोटीचा वाद झडत असतो. त्यांच्यासाठी निर्मलाताई किती छान संदेश देऊन गेल्या न ?

अंगणवाडीच्या माध्यमातून हजारो महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या "वनस्थळी" संस्थेच्या संस्थापक व जिथे मी घडलो वाढलो त्या विद्यार्थी सहायक समितीच्या ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय निर्मलाताई पुरंदरे, यांचे नुकतेच "वरती" प्रयाण झाले. त्यावरून मला त्यांचे हे विचार आठवले तेच तुमच्यासोबत शेयर केले. 

"पोरकं होणं म्हणजे काय?" हे मला पुन्हा एकदा जाणवलं. दोन वर्षांपूर्वी मातृछत्र हरवलं तेव्हा आणि आता निर्मलाताई गेल्यावर एकदा! कारण माझ्या हॉस्टेल जीवनात कायमच ताईंनी जणू आईची भूमिका घेतली. प्रसंगी कठोर तर प्रसंगी हळव्या होऊन जपलं. माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी असेच जपले. 

शेवटी शेवटी त्या आजारी असताना आम्ही भेटायला गेलेलो. थोडा विकनेस वाढल्याने विश्रांती घेत होत्या तरी स्मरणशक्ती तल्लख होती. समोर पाहताच म्हणाल्या, "आलास का रे बाबा, कसा आहेस? आता खोड्या कमी केल्यास न"?

अशा या निर्मलाताई. 

त्यांच्या कार्याला हि शब्दांची सुमनांजली !!

- धनंजय देशपांडे (dd)

*

फोटो : हाच तो पुस्तक प्रकाशन समारंभ (सर्वात डावीकडे आदरणीय निर्मलाताई)

(पोस्टमधील विचार आवडले असतील तर प्लिज शेयर करा, जेणेकरून त्यातून इतर अनेक घरातील विसंवाद कमी होऊन सुसंवाद सुरु होतील)

Monday, April 13, 2020

लेख

पाहिलात ना हा पोलीस अधिकारी... 
निःशब्द होऊन जातो आपण असं काही दिसलं की .. 

वाटतं याच्या तुलनेत आपण किती सुखात आहोत. आपल्याला घरातच तर राहायचं फक्त. 
इथे पहा.. दारात बसून जेवावं लागतंय कारण कर्तव्य साद घालतंय.. 

हक्काचं घर असून तो आत बसून जेऊ शकत नाही.. आपल्यामुळे घर संकटात टाकायचं नाही त्याला. 
ताटाखाली प्लास्टिकचा डबा घेतलाय आणि दोन घास पोटात टाकतोय कसेबसे.. 
नजर मात्र खिळलीये दारात उभ्या असलेल्या आपल्या चिमुरडीवर...
दारात उभं राहून चिमुकलीसुद्धा पाहतेय बापाला ! 
पण मोकळेपणाने उचलून सुद्धा घेऊ शकत नाही तो. 
जातील हेही दिवस असा दिलासा देतोय स्वतःला... 
घासासोबत गिळतोय एक आवंढाही !

हे त्याचं रोजचं जगणं झालंय आता. 
असाच जेवतोय फुटपाथवर, झाडाच्या सावलीत नाहीतर असा आपल्याच दाराशी निर्वासितांसारखा !
त्याची कशाविषयी तक्रार सुद्धा नाही कारण त्याला माहितीये माझ्यासारखे अनेकजण रोज यातूनच जातायत

कारण कोरोना नावाच्या महाराक्षसाशी दोन हात करायला तो उतरलाय मैदानात. 
 छातीचा कोट करून रोज तो उभा राहतोय रस्ते निर्मनुष्य करण्यासाठी !
आपल्याला पिटाळतोय घरी आपण सुरक्षित राहण्यासाठी !
स्वतः मात्र उभा राहतोय रस्त्यांवर तुमच्या आणि कोरोनाच्यामध्ये भिंत बनून !

आपले दोन अश्रू त्याच्यासाठी देऊया.. 
त्याची ही मेहनत वाया जाणार नाही हे पाहूया.. 

लेखन :© पराग पोतदार


Sunday, April 5, 2020

पर्वणी २

तुम्ही दोन मित्र एकमेकांना भेटला, तर तुम्हांला किती आनंद होतो ! आणि पुष्कळ वर्षांनी भेटलात तर हा आनंद आणखी शतपट असतो. दोन मित्रांच्या भेटीत गोडी असते. कारण तेथे निर्मळ प्रेम असते. परंतु दोन थोर पुरुष परस्परांस भेटतात तेव्हा तर अपूर्व गोडी असते. ती चंद्रसूर्यांची भेट असते. हरिहरांची ती भेट असते. समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांची अशीच एकदा भेट झाली होती. एका नदीकिनारी या दोन साधूंचे काय बोलणे होणार म्हणून हजारो लोक जमले होते. परंतु एकाने पाण्यात दगड टाकला. दुसऱ्याने आकाशाकडे बोट केले. दोघे निघून गेले. त्याचा अर्थ काय? एकजण म्हणाला : ‘पाण्यात दगड बुडतो त्याप्रमाणे हे लोक संसारात बुडत आहेत.’ दुसरा म्हणाला : काय करणार? प्रभूची इच्छा.’

~ साने गुरुजी

पर्वणी १

धीरूभाई अंबानींचे व्यवसाय चातुर्य

धीरूभाई अंबानी यांचे व्यवहार आणि व्यवसाय चातुर्य आपणा सर्वाना माहित आहेच. दडून बसलेली संधी शोधणे आणि त्या संधीचा योग्य उपयोग करून त्यातून नफा मिळवण्याची धीरुभाईंची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी होती. धीरुभाईंच्या या हुशारीचे एक उदाहरण नुकताच वाचनात आले. ते असे...

गोष्ट आहे १९५० सालची. तेव्हा धीरूभाई येमेन या देशात नोकरी करत होते. त्या काळात येमेन सरकारच्या अर्थ खात्यातील काही अधिकाऱ्याना एक विचीत्र गोष्ट लक्षात आली. येमेनचे चलन असलेल्या रियालची (Rial) नाणी झपाट्याने लुप्त होत होती. ही नाणी अचानक कुठे जाऊ लागली याचा त्यांनी शोध सुरु केला. काही दिवसांनंतर त्यांचा लक्षात आले की सर्व नाणी येमेन मधील आदेन या शहरातून अदृश्य होत आहेत. आणखी चौकशी केली असता त्यांना कळले की धीरूभाई नावाचा एक भारतीय कारकून बाजारातून ही नाणी चलनाच्या किमतीपेक्षा जास्त भाव देऊन विकत घेत होता.

धीरूभाई तेव्हा जेमतेम २० वर्षांचे होते. त्यांच्या लक्षात आले होते की येमेनचे चलन असलेले रियाल हे नाणे चांदीचे होते. आणि चलनी बाजारात असलेल्या या नाण्याच्या ब्रीटीश पौंडामधील किमतीपेक्षा, तेवढयाच वजनाच्या चांदीची किमत अधिक होती. धीरुभाईंनी नाणी बाजारातून जास्त भावाने खरेदी केली आणि नंतर ती नाणी वितळवून धातूच्या बाजारात जास्त भावाने विकली.

केवळ तीन महिन्यात या सर्व व्यापातून धीरुभाईंनी त्याकाळी काही लाखांचा फायदा कमावला होता. पुढे सरकारच्या लक्षात आल्यावर धीरुभाईंनी हा उपद्व्याप थांबवला पण आपल्या व्यवहार चातुर्याची चुणूक मात्र त्यांनी दाखवून दिली होती...

जो सपने देखने की हिम्मत रखते है
वो पुरी दुनिया जीत सकते है...

पुढील लिंकवर क्लिक करून आगामी सर्व पोस्ट्स थेट व्हाट्सएपच्या माध्यमातून मिळवता येतील


Tuesday, March 31, 2020

अखेरचा निरोप घेताना...

अखेरचा निरोप घेताना... 
#जनता_कर्फ्यू  #युद्ध_कोरोनाशी

डॉक्टर फ्रास्न्सिस्का कोर्टेल्लारो सांगत होते,  
"तुम्हाला माहिती आहे का एका डॉक्टरसाठी सर्वात हृदयद्रावक गोष्ट कोणती? पेशंटला एकट्याने मरताना पाहताना.  आयुष्याच्या शेवटी मुलांना, नातवंडांना एकदा पाहायला मिळावे म्हणून हात जोडून दयेची भीक मागताना.  कोरोनाग्रस्त रुग्ण (Covid-19 Positive) एकट्याने येतात. कोणी सोबत नसते मदतीला... जवळचे नातेवाईक सुद्धा. 

ही एकाकी लढाई लढत असताना, कोरोनाग्रस्त रुग्णांना अखेर हे कळून चुकते की आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. एक बरं की, त्याची शुद्ध लगेच हरपत नाही. ते संपत जातात पण हळूहळू. पुरेसा वेळ असतो त्यांच्याकडे विचार करायला... शेवटी काय करावं!  

आज रात्री, ती अशीच शेवटची पेशंट होती.  एक आजीबाई... तिला नातीला एकदा डोळेभरुन पाहायचं होतं जाण्यापूर्वी.  मी खिश्यातून फोन काढला आणि विडियो कॉल लावला. नातीसह घरातल्या सर्वांनी तिला गुडबाय केलं. कॉल संपल्यावर थोड्याच वेळात तिने अखेरचा श्वास घेतला. 

माझ्याकडे आता अश्या विडियो कॉलची मोठी लिस्ट झाली आहे..... माझ्याकडील 'अखेरच्या निरोपांची यादी' !

मला आशा आहे की ते (प्रशासन) निदान छोटे आय-पॅड देतील.  ३-४ मिळाले तरी पुरेसे होतील, त्यांना एकटं मरण्याआधी अखेरचा निरोप घेण्यासाठी."

आता हे वाचून, तुम्हाला अजूनही तक्रार आहे का? की  प्रशासनाकडून सर्व व्यवहार बंद पाडून तुम्हाला उगाचच डांबून ठेवलं जाताय. घरात बसून तुम्हाला जाम बोअर झालंय?

उगाच त्रागा करण्याआधी ध्यानात ठेवा, ही निर्णायक लढाई आहे एका दिसू न शकणार्‍या अज्ञात शत्रूशी... 

(स्वैर अनुवाद)
- समीर दरेकर 
#IndiaFightsCorona #VideoCallForPatients