Showing posts with label शब्दोत्सव. Show all posts
Showing posts with label शब्दोत्सव. Show all posts

Monday, February 27, 2017

मन

मन ताजं व्हावं, म्हणून घरासमोरच्या आवारात फेरफटका मारायला आले . माझे घरही एका सुंदर डोंगराच्या पायथ्याशीच आहे. हिरव्यागार गवतावर  चालताना आजूबाजूचा जुनाच निसर्ग नव्याने पाहण्याचा प्रयत्न सुरू होता. संध्याकाळी घरट्याकडे परतलेल्या आणि परतणाऱ्या पक्षांची टेहळणी चालू होती.
निसर्गामधील माझ्या कुतूहलाचा विषय ठरलेला हमिंगबर्ड सतत लक्ष वेधून घेत होता. एकाच फुलावर पुढे जाऊन क्षणात मागे परतण्याच्या त्याच्या हालचालींनी तो नेहमीसारखाच कुतूहल निर्माण करत होता.
मला तो नेहमी विसरभोळा वाटतो. जणू त्याला फुलाच्या कानात काहीतरी सांगायचे असते आणि थोडं सांगून झाल्यावर पुढे जातो अन उरलेलं सांगायला पुन्हा मागे येतो. इवलासा रंगीत पक्षी; पण त्याचा वेग आणि चंचलता भुरळ पाडणारी, वेड लावणारीच.
काही महिन्यांपूर्वी, त्याला कॅमेराबंद करताना त्याने माझी अगदी दमछाक केली होती. त्यावेळी तीन-साडेतीन तासांचा आटापिटा करून त्याने मनाजोगता ‘शॉट‘ दिला होता. हे सर्व चालू असतानाच संध्याकाळचा थंड वारा मनाला सुरेल गाण्यांच्या आठवणींचे हिंदोळे देत होता.

या सगळ्या आठवणींमध्ये रमताना आणि निसर्ग न्याहाळताना पाच-दहा मिनिटं अगदी छान गेली आणि चालता-चालता अलगद एक थेंब अंगावर पडला, तो पुढे येणाऱ्या आनंदाची चाहूल घेऊनच! अलबत, तो पावसाचाच थेंब होता. क्षणातच थेंबांच्या सरी झाल्या आणि सरींचा पाऊस झाला.

पाऊस, पावसाची सर आणि एक सुखद अनुभव. प्रत्येकाचा पावसातला, पावसाबद्दलचा काही ना काही अनुभव असतोच; तसाच हा माझा अनुभव..

ढगांना आलेली करडी काळीभोर छटा,
त्यातून डोकावणारी विजांची चमकदार, क्षणभंगुर; पण विस्मयकारक अशी नक्षी,
अंगावर अलवार विसावणारे टपोरे थेंब, तो त्यांचा शहारे आणणारा स्पर्श..
सो सो करणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याला साथ देणारा ढगांचा गडगडाट
आणि या आविष्काराला कोणतीही उणीव भासू अन्ये, म्हणून मृदूपणे दरवळणारा मातीचा सुगंध... हे सारं जणू पंचमहाभूतांच्या प्रीतीभेटीची एक अनोखी निसर्गभेटच!

पायवाटेवरून वाहणारं, पायात रुंजी घालणारं पाणी,
त्यातच, स्वत:ची जाणीव करून देणारा खळखळणारा निर्झर,
क्षणात कायापालट झालेला डोंगरावरचा हिरवा शालू,
अन तिच्यात जरी भरल्यासारखं उठावदार अस्तित्व दाखवणारा धबधबा..
पाना-पानांना आलेला चंदेरी रंग आणि त्यावरून ओघळणारे थेंब, जणू कारंजेच..
पावसाच्या पाण्याने न्हाऊन निघालेली झाडं, जणू नुकतीच न्हालेली सुंदर तरुणी..
जिचं सौंदर्य उजळलं असावं आणि तिच्या केसांतून अजूनही मोत्यांचे थेंब ओघळत असावेत, तसं पानांवरून ओघळणारं पाणी
अन सुष्टीचीही मोहून टाकणारी जादू पाहून तजेलदार झालेलं मन..!

या अनुभव-साक्षात्कारात रमून झाल्यावर मी भानावर आले.  मनाचा थकवा दूर पळून गेला होता आणि नवा उत्साह निर्माण झाला होता. आता आवारातून घराकडे जायला पाऊल पुढे टाकलं.......रानु

Tuesday, December 13, 2016

आयुष्य

सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..
आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे !
"सुखासाठी कधी हसावं लागंत, तर
कधी रडावं लागतं,
.
.
.
कारण सुंदर
धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन
पडावं लागतं"...

Saturday, October 11, 2014

पुर्वी मोबाईल नावाचं

काय गम्मत असते पहा !
पुर्वी मोबाईल नावाचं यंत्र भारतात नव्हतं तेव्हा महिला आपल्या चेहर्‍यावरचा मेकअप, ओठांवरची लिपस्टिक , डोळ्यांला लावणारे काजळ, केसांचि बटा, कानातले डूल हे सगळं एकाच वेळी न्याहाळायला पर्स मधी किंवा पावडरच्या डब्यावरील काँप्लिमेंटरी मिळणार्‍या आरशाचा वापर व्हायचा. आता मोबाईल आला आणि सगळं रुपंच बदललं. पिढी इतकी अद्ययावत झाली की मोबाईलमध्ये कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत असताना मोबाईलच्या बंद स्क्रीन कडे बघत मेकअप चेक् करण्याची लगबग दिसते.
अस्पष्ट स्क्रीनमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्वत:ला न्याहाळण्यापेक्षा आपल्या प्रगत यंत्रामध्ये फ्रंट कॅमेरा उर्फ सेल्फी कॅमेरा नावाचा एक प्रकार अस्तित्वात आहे त्याचा उपयोग मेक अप चेक करण्यापासून ते बेडवर बसून दात घासेपर्यंत आणि मोबाईल फ्लॅशचा वापर टाॅर्च म्हणून बर्‍याच ठिकाणि वापरता येऊ शकतो.
तंत्रज्ञान आपल्याला हवं तसं वापरता येत असतं पण आपण त्याच्याकडे फक्त एक करमणूकीचं उपकरण म्हणून वापरतो
असो.
आतातरी मेकअप साठी बंद स्क्रीन पाहून स्वत:चीच होणारी कूचंबना थांबवा.

प्रथमेश सुरेश शिरसाट
https://www.facebook.com/prathmesh.shirsat21071988

Friday, October 10, 2014

विचार


भरत दादा -
आपण जितके साधे राहत जाऊ,आपल आयुष्य तितक सोप आणि सुंदर होत जात.
मोठेपणा मिरवणारी माणस नंतर एकलकोंडी होत जातात..!!
~ Bharat Jadhav 
https://www.facebook.com/maharashtrachasahinayak

Thursday, October 9, 2014

माझ्या मराठीचा बोल कौतुके

माझ्या मराठीचा बोल कौतुके

मराठी माणसाला मराठी भाषेचा तीव्र आभिमान आहे. शिवाजी महाराजांच नाव घेतल तरी आपलं मन आभिमानाने भरून येत. पण मराठी बोलताना मात्र आमची जाम पंचाईत होते. शिकली सवरलेली चार मराठी माणस एकत्र आली की त्यांच्या गप्पा रंगणार त्या इंग्रजीतूनच. बर मराठी भाषा वाचली पाहीजे असही त्यांना मनापासून वाटत पण मराठी चित्रपट बघायला बायको बरोबर कींवा मैत्रीणी बरोबर जाण त्यांना जाम "लो स्ट्याडर्ड" वाटत. "मराठीच आता कस होणार?"अशा परीसंवादात तावातावाने बोलणार्यांची मुल, नातवंड शिकणार मात्र इंग्रजी माध्यमातून. मराठी भाषा कशी वाचेल याचा गांभीर्याने कुणी विचारच करत नाही. कधी आपण मुलांना आभिमानाने ज्ञानेश्वरी दाखवून म्हणत नाही की "बघ पोरा वयाच्या १६व्या वर्षी हे अनमोल धन त्या सन्याशाच्या पोराने आपल्या साठी साठवून ठेवलय. याचा वापर कीतीही केलास तरी हे संपणार नाही"तुकारामांचे अभंग खरच अभंग आहेत कधीही भंग न पावणारे. ते आमृत आपण लहानपणा पासून मुलांना पाजतच नाही. बहीणाबाई चौधरी आपल्यालाच ऊशीरा उमगल्यात. पु. ल., व. पु. यांच्या कडेखांद्यावर आपण मुलांना बसवतच नाही...हो पण आपण पाहूण्यासमोर मुलांना इंग्रजी पोयेम जरूर म्हणायला लावतो.त्या वेळी आपला चेहरा आभिमानाने कसा फुलून येतो. तर थोडक्यात काय तर मराठी वाचायला पाहीजे पण आमची पुढची पीढी काही मराठी वाचणार नाही.... मग कशी वाचणार मराठी? मला कृपा करून कुणी सांगेल?

ता. क. माझा मुलगा मराठी माध्यमातून शिकलाय आणि आता मराठी भाषेत लिखाणाच काम तो करतोय.
~ Vasundhara Sable
https://www.facebook.com/vasundhara.sable.3

Wednesday, October 8, 2014

आजी कोड़े घालायची लहानपणी


#मराठी

आजी कोड़े घालायची लहानपणी
" टोपल्यात तीन भाकरी आहेत , पण खायला सहा जणी .... कोण कोण ?
तर , माय - लेक / नणंद- भावजय / सासू - सुन
आन हां एकेकी ला एकेक भाकर पायजे , टुकड़ा मोडायचा न्हाय "
आमची शालेतल्या गणिताच्या बाई वर पूर्ण श्रध्हा असल्याने पाटी पेन्सिल घेउन आकडेमोड सुरु
नाहीच सुटायच कोड ते
मग ती पाटी हातात घ्यायची आणि समजुन सांगायची
" अग म्हणजे मी , तुझी आई , आणि तुझी मामी अश्या आमी तिघी आहोत न तसच . मी आणि तुझी आई माय - लेकी , तुझी आई आणि तुझी मामी नणंद - भावजय , आणि मी आणि तुझी मामी सासू - सुन . मग आम्हा तिघीं ना तीन भाकरी झाल्या की बरोबर "
खटकन ट्यूब पेटायची डोक्यात
आजकाल चे राजकारणी, त्यांचे निष्क्रिय विचारवंत पाठीराखे आणि अडाणचोट अतिउत्साही कार्यकर्ते पाहिले की ही तिन्ही नाती आठवतात
आणि त्या भाकरी च्या ऐवजी दिसतात सामान्य लोक ज्यांच मन विचारवंत खातात, धन राजकारणी खातात आणि तन कार्यकर्ते खातात
टोपले भरते च आहे प्रत्येक पिढीने
पिढ्या संपतील ........
यांची भूक संपेल ?
~ Roshni

Saturday, October 4, 2014

लेख

#मराठी

मला नेहमी साधं सरळ जगायला आवडतं. जेव्हा आजच्या सारखा खूप पाऊस पडतो, तेव्हा आत्ताच्या सारखा मी खिडकी शेजारी माझी आरामशीर खुर्ची टाकून बसतो आणि मी आधी कधी न वाचलेल्या पुस्तकांची वाफाळलेल्या कॉफीबरोबर चव घ्यायला लागतो. खिडकीबाहेर पावसात उभा असलेला पिंपळ वाऱ्याने उगाच सळसळू लागला आणि त्याची नुकतीच नवीन जन्मलेली कोवळी नाजूक मऊशार तपकीरी हिरवी पानं पाहिली, की मग मला उगाच काहीतरी रंगवावंस वाटू लागतं. एखादा कागद घेऊन मी उगाच काहीतरी त्यावर मिळेल त्याने रंगवतो. तसं काही खास कारण नसतं आणि मला काही सिद्ध वगैरे पण करायचं नसतं. बस्स! मला फक्त काही तरी रंगवायचं असतं. असंच एखादं जुनं भावगीत मला आठवतं, ते आत्ता यावेळी का आठवावं याला काही उत्तर नसतं. कोणी प्रेम करायला जवळ नसतानाही एखादं पावसात भिजलेलं गीत मनातून उमलून का बाहेर यावं यालाही काही स्पष्टीकरण नसतं. खिडकीतून आत येणाऱ्या पावसाच्या आवाजात सुस्पष्ट ऐकता यावं म्हणून मग मी आवाज थोडा मोठा करतो आणि ऐकत राहतो. मला गीताचे शब्द ऐकू येतातच असं नाही. पण काही तरी कुठं तरी मनात उगाच हिरव्या कच्च पानावर पहाटे एखादा दवबिंदू पडल्यावर पान जसं थरथरतं तसं थरथरल्यासारखं वाटतं. मग मला उगाच बेडवर लोळायची हुक्की येते. सबंध दिवस मी काही काम करत नाही. डोळे मिटून बेडवर लोळत पडतो. कधी झोपतो, कधी जागा होतो. पावसांच्या सरींबरोबर स्वत:च स्वत:ला ऐकत स्वत:च स्वत:शी स्वत:लाच गुणगुणत राहतो. दिवसभर पडला की पाऊस पण दमतो आणि संध्याकाळी विश्रांती घेतो. रात्री आकाशातले काळे ढग थोडे विरळ होतात आणि चंद्र हळूच उगवतो. मी हळूच उठून बसतो आणि डोळे किलकिले करून इकडे तिकडे पाहतो. मी बिलकूल घाईत नसतो. मला कधीच कुठेच कोणाकडे जायचं नसतं. मानवी मनाला निर्जीव करून टाकणारी पैसा, घड्याळ आणि इतर कृत्रिम बंधनांनी माझं आयुष्य नियंत्रित करणं मला मान्य नसतं. मी स्वैर होतो सळसळणाऱ्या पिंपळासारखा...पावसांच्या सरीसारखा...मी एक धबधबा होतो माझ्या आतमध्ये फेसाळणारा पांढरा शुभ्र...चैतन्याने भरलेला आणि उर्जेने सळसळणारा...कोसळायला लागला की प्रचंड ताकदीने कोसळणारा...मला माहित आहे मला कोणी रोखू शकत नाही...आयुष्य जगण्यापासून. मी अनंत होतो थोडासा माझ्या आतमध्ये...आणि परत एकदा थंडगार धुकं दाटून येतं चहूबाजूने माझ्या. मी हरवून जातो स्वत:तच काही क्षण का होईना अनंत काळासाठी...

~ MKs Kimantu Omble
https://www.facebook.com/profile.php?id=100001951428644

Friday, October 3, 2014

मनाच्या आरशात आपल प्रतिबिंब


#मराठी

मनाच्या आरशात आपल प्रतिबिंब पहाताना परिवारातील .शेजारातील इतर अनेक सख्यांची प्रतिबिंब गॊळा झाली .....त्या प्रतीबिम्बांकडे आरपार नजर गेली आणि जाणवल यानां बघत, निरखत तर आपण मोठे झालो .त्यांची तन्मयता , आपुलकी ,नात्यांना फुलवत जपण्याची शर्थ .....आपला संसार आनंदी करत दुसऱ्यालाही आनंदी करण्याची वृत्ती.... ..नकळत मन गुंतत गेल .एक छंदच जडला जणू यानां निरखण्याचा . त्या वयात कामचुकार पणा करून पळ काढताना गम्मत यायची पण हे कष्टाळू चेहरे समोर यायचे अन अलगदमनावर ठसायचे.ते चेहरे काम तर करायचेच, पण त्यात भावनेचा ओलावाही असायचा .झोकून देऊन कार्य करण्याची क्षमता !!
...त्या चेहऱ्यांनवरचे ते स्मित आजही आठवते . समोरच्या साठी खूप काही करून काही केलेच नाही हे भासवणे .. ...'.प्रकाशून अप्रकाशित रहाणे '.स्वतःच्या कर्तुत्वाची कोणतीही टिमकी न वाजवता अप्रकाशित राहिलेल्या.......या सख्या आज अचानक त्यांच्या प्रतीबिम्बांचा खेळ रंगला !!
~ Neeta Jaywant
https://www.facebook.com/neeta.jaywant

Wednesday, October 1, 2014

विचार

विचार 
==============


उद्यापासून आसपासच्या समाजाचा विचार करून आवाजावर नियंत्रण व शांत गीतांची निवड करतील तेच संस्कृतीचे रक्षक ठरतील. बाकीच्यांनी आपण 'विकृतीची संस्कृतीभक्षक बांडगुळे' आहोत हे समजून चालावं.



==============


प्रामाणिकपणाने जगताना घरातील प्रत्येकाची छोटी छोटी स्वप्ने पूर्ण करताना जरी ऊर फुटेपर्यंत धावावं लागत असलं, तरी ऊर भरून यावा एवढा आनंद त्या धावण्यात नक्कीच सामावलेला असतो. फक्त त्यासाठी घरच्यांच्या भावनांच महत्व तेवढं समजून घ्यावं लागतं एवढंच.
~ Vikram Raut 
https://www.facebook.com/vikram.raut.75

Tuesday, September 30, 2014

Saturday, September 6, 2014

विचार



पाश्चिमात्य देशातील भांडवलशाही ग्लोबालायझाशनच्या नावर सगळीकडे पसरली आहे. पाश्चात्य देशात तुम्ही म्हणतात तसेच होते बडे उद्योजकच ठरवतात कोण नेतृत्व करणार ते. पहिले पाऊल म्हणजे लोकांमध्ये जागरुकता आणणे आज अमेरिकेत दुधामधे जे हार्मोन्स टाकले जायचे ते लोकाच्या जागरूकतेने टाकणे बंद झाले. भारत मुख्य करून शस्त्रे व विमानांची खरेदी पाश्चात्य देशाकडून करतो त्यामुळे शास्त्रास्तानसाठी भारतावर सहज
दबाव आणल्या जातो त्याबरोबरच भाष्टचारी नेते व त्यांची स्वार्थी नितीमत्तेला आपयाला बळी पडावे लागते युरोप माधे GMO फूड चालत नाही अमेरिकेत पण त्याला मागील काही वर्षापासून विरोध सुरु आहे त्यांना लेबलवर GMO आहे हे लिहा ह्यासाठी कायदा अणायाच प्रयत्न सुरु आहे हेच कारण आहे मन्सेनटो सारख्या कंपनी भारतासारख्या देशांमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आहे. आपण आपल्या येथे जास्तीत जास्त उत्पादन सुरु करणे हा त्यावर इलाज आहे त्यासाठी रशिया व इजारायीलची मदत घेऊ शकतो. भारतात हुशार लोकांची कमी नाही पण नीट आखणी करून ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे.
धन्यवाद
****शब्द शृंगार
https://www.facebook.com/profile.php?id=100008046221528