Sunday, March 30, 2025

Saturday, March 29, 2025

भगवद्गीता ६.१८



यदा विनियतं 
चित्तमात्मन्येवावतिष्ठते।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो 
युक्त इत्युच्यते तदा ।।६.१८ ।।


पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते, तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो.
 ॥ ६-१८ ॥


वशमें किया हुआ चित्त जिस कालमें अपने स्वरूपमें ही स्थित हो जाता है और स्वयं सम्पूर्ण पदार्थोंसे निःस्पृह हो जाता है, उस कालमें वह योगी है - ऐसा कहा जाता है।


Perfectly controlled mind The mind with onepointedness.When all desires for the objects of pleasure seen or unseen die, the mind becomes very peaceful and rests steadily in the Supreme Self within. As the Yogi is perfectly harmonised, as he has attained to oneness with the Self and as he has become identical with Brahman, sense phenomena and bodily affections do not disturb him. He is conscious of his immortal, imperishable and invincible nature.Yukta means united (with the Self) or harmonised or balanced. Without union with the Self neither harmony nor balance nor Samadhi is possible. || 6.18 ||

Wednesday, March 26, 2025

करावी ते पूजा मनेचि उत्तम – संत तुकाराम अभंग


करावी ते पूजा मनेचि उत्तम ।
लौकिकाचें काम काय असे ॥१॥
कळावें तयासि कळे अंतरींचें ।
कारण तें साचें साच अंगीं ॥ध्रु.॥
अतिशया अंतीं लाभ किंवा घात ।
फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥२॥
तुका म्हणे जेणें राहे समाधान ।
ऐसें तें भजन पार पावी ॥३॥
अभंग १

Sunday, March 23, 2025

शब्दरंग १

येडचॅप.... २३ ०३ १६

आबा म्हणजे माझे आजोबा. केवढं मोठ्ठ नाव आहे त्यांचं 'मधुसूदन'. ओल्ड स्टाईल. मी 'आरोह', पहिलीत आहे. एकदा मी गमतीने म्हटलं, ए आबा,  करायचं का जरा तुझं नाव छोटुस्स. आधी म्हणाले कर. म्हटलं 'मॅडी' कसं वाटेल तर म्हणाले, ये तुझ्या कुल्यावर लिहून दाखवतो. ख्या ख्या हसत म्हणाले, अरे हे नाव मी लहान असताना सुचायला हवं होतं रे, तसाही मी शहाणा नव्हतोच कधी. काय रे तुमची नावं हल्लीची. अर्थ माहित असो नसो, चिकटवतात नुसती. चल सांग बरं, तुझ्या नावाचा अर्थ. आता मला कसा कळणार. काहीतरी सुराच्या खालच्या पट्टीतून सुरवात करत वरच्या पट्टीत नेत घेतलेल्या आलापाला आरोह असं म्हणतात, असं म्हणाले. मला काही कळलं नाही. 'अरे, पण तू रडतोस तेंव्हा मात्र नाव सार्थकी लावतोस. चला म्हणजे आपल्या दोघांच्याही नावात अर्थ आहे आणि बसले हसत म्हटलं ना जरा येडचॅपच् आहेत. 

पण माझी आणि आबांची जाम गट्टी आहे. दिवसभर माझ्याशी खेळतात, अभ्यास घेतात, कोडी घालतात, (स्पेलिंग पण घालतात, वाईट्ट आहेत अगदी), घोडा घोडा पण खेळतात, मला शाळेतून आलो आणि कंटाळा आला (तो रोजच येतो) तर भरवतात पण नंतर घोग-या आवाजात गाणं म्हणून झोपवतात पण. मला झोपवून आरामखुर्चीत बसून पुस्तकं वाचतात आणि तिथेच झोपतात. पण आबांना ना सगळ्यातलच सोल्लिड कळतं. माझ्या दोस्तांनी काही विचारलं आणि मला येत नसेल ना तर मी आबांनाच विचारतो, बाबापेक्षा जास्त माहिती आहे आबांना. बाबा आबा नसताना म्हणतो, त्यांना 'गुगलोबा' म्हणत जा तू. (जळकू आहे नुसता). आबांना सांगितलं मी एकदा बाबा ओरडल्यावर. आबा म्हणाले, अरे हो, पण आमच्या वेबसाईटची एक्सपायरी आता जवळ येत चालली आहे, रिन्यू नाही होणार. मधेच ना असं मला कळत नाही असं बोलतात. म्हटलं ना जरा येडचॅपच् आहेत.

परवा पण असच झालं. आई म्हणाली होती, आज शनिवार, मी लवकर येते, आज आपण बागेत जाऊ. आलीच नाही सहा वाजले तरी. आबा म्हणाले, मी नेऊ का? मी नाहीच म्हटलं, आई नेहमीच असं करते. आली की मीच देणार आज तिला धम्मक लाडू. एकतर आबांनी मला साडेचार पासून तयार करून ठेवलं. दोघं कंटाळलो खिडकीत बसून वाट बघत. मला रडू यायला लागलं तर लागले मला चिडवायला 'कुकुल्ल्या बाळाला आईची आठवण आली का?' मग मला अजूनच् रडू आलं. असं चिडवतात का कुणी लहान मुलाला? म्हटलं ना जरा येडचॅपच् आहेत.

मला खूप खूप राग आला होता त्यांचा त्या दिवशी. परवा आरामखुर्चीत असेच शांत बसले होते, पुस्तक छातीवर ठेवून. मी पण त्यांना चिडवलं त्यांच्यासारखच, आजीची आठवण येते का मोठया बाळाला? तर अचानक रडायलाच  लागले, मग मलाही रडू आलं. म्हटलं पण मी, आबा सॉरी म्हणून. तर म्हणाले,  असू दे रे. मग मला जवळ घेतलं आणि म्हणाले 'तू रडतोस, आईला उशिर झाला म्हणून पण ती येणार हे निश्चित आहे रे'. पुढे काही बोललेच नाहीत डोळे पुसत खिडकीतून बाहेर बघत बसले दुपारभर...

म्हटलं ना मी, जरा येडचॅपच आहेत काहीही बोलतात, मला न समजेलसं....

जयंत विद्वांस

भगतसिंग दिवस

हा भगतसिंग ! हाय हा ! !

सरदार भगतसिंग दि. २३ मार्च १९३१ या दिवशी फाशी गेले. त्या वेळी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे रत्नागिरी येथे स्थानबद्ध होते. त्यांना भगतसिंग यांच्या फाशीची बातमी दुसऱ्या दिवशी मिळाली आणि त्या बातमीने निर्माण झालेल्या मनःक्षोभातून सावरकरांनी प्रस्तुत कविता रचली. लगोलग रत्नागिरी मधील 'हिंदु तरुण मंडळा'तील तरुणांनी ती गुप्तपणे पाठ केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी पोलिस सावध होण्यापूर्वीच त्या निवडक तरुणांनी हे गीत गात-गात रत्नागिरी नगरातून प्रभातफेरी काढून सारे रत्नागिरी नगर भगतसिंगाच्या नि स्वातंत्र्यलक्ष्मीच्या जयजयकाराने दणाणून सोडले.

हा भगतसिंग, हाय हा
जाशि आजी, फांशि आम्हांस्तवचि वीरा, हाय हा !
राजगुरु तूं, हाय हा !
राष्ट्र समरी, वीर कुमरा, पडसि झुंजत, हाय हा !
हाय हा, जयजय अहा !
हाय हायचि आजची, अुदयीकच्या जिंकी जया ॥
राजमुकुटा तो धरी
मृत्यूच्या मुकुटासि आधी बांधि जो जन निजशिरीं !
शस्त्र धरूचि अम्हि स्वतः 
धरुनि जें तूं समरिं शत्रुशि मरसि मारित मारतां !
अधम तरि तो कोणता?
हेतुच्या तव वीरतेची जो न बंदिल शुद्धता ॥
जा हुतात्म्यांनो, अहा !
साक्ष ठेवुनि शपथ घेतों आम्हि अुरलो ते पहा !
शस्त्रसंगर चंड हा
झुंजवुनि कीं, जिंकुची स्वातंत्र्यविजयाशी पहा !
हा भगतसिंग, हाय हा ! ! ॥

भगतसिंगाचा विजय असो... स्वातंत्र्यलक्ष्मीचा विजय असो !!!

सौमित्र लिखित

आता मी हे लिहितो आहे पण हे प्रसिद्ध करे पर्यंत मी असेन का ?
प्रसिद्ध झालं हे तुमच्या वाचनात येई पर्यंत तरी असेन का ? 
आपण कधीही जाऊ शकतो या शक्यते सोबत आता आता आपण सगळेच जगत नसतो का ?

मृत्यू यावा तर मांजराच्या पावलांनी 
कळूही नये कधी उडून गेला आपल्यातला 
हंस अकेला....

गुलज़ार साहेबांची एक नज्म़ आहे...

" मिटा दो सारे निशाँ कि थे तुम
उठो तो ऐसे कि कोई पत्ता हिले न जागे
लिबाज़ का एकेक तागा उतारकर यूँ उठो
कि आहट से छूँ न जाओ

अभी यहीं थे
अभी नहीं हो

ख़याल रखना कि ज़िंदगी की कोई भी सिलवट
न मौत के पाक़ साफ़ चेहेरे के साथ जाए....!!
_______________________

धर्मराज. धर्मराज पाटील. 
वय वर्ष अवघं चाळीस.
मी याला ओळखत नव्हतो 
जो गेल्या  एक मार्चलाच निघून 
गेलाय या जगातून. 

तो रानावनात फिरायचा .. पक्षांशी बोलायचा .. एक नामवंत पक्षीतज्ञ होता तो.. त्याची या विषयात पीएचडी होती. उद्या, म्हणजे एकवीस मार्चला त्याचा वाढ दिवस. आणि एकवीस मार्च म्हणजे 'वनदिन'. फॉरेस्ट डे.

त्याच्या बद्दल वाचून आणि ऐकून पुशी रेग्यांची कविताच आठवते.

" पक्षी जे झाडावर गाणे गातो 
आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात 
झाडावर गाणे जे पक्षी गातो 
आहे पक्षी दुसरा गाण्यातच त्या पुन्हा ..."

असेल .. तो कुठल्यातरी झाडाच्या कुठल्यातरी फांदीवर बसून कुठल्यातरी पक्षाशी गप्पा मारत बसला असेल. म्हणूनच ....

"मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ ध डे धर्मराज. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
________________________

दिनांक : अगदी परवा परवाची तेवीस फेब्रुवारी.रात्री पावणे  दहा.
मला अमित भंडारी या माझ्या जिवलग मित्राचा एक मेसेज येतो .. त्यात फक्तं एक वॉइस क्लिप असते..आवाज एका मुलीचा असतो. खूप असहाय आणि रडवेला ..

" हाय अमित मी तुला माझ्या फ्रेंड विषयी सांगितलं होतं ना जो गुलज़ारचा  एकदम फॅन आहे आणि खूप छान पोएट्री लिहितो तो फ्रायडेला त्याच्या घरात बेशुद्ध सापडला ही हॅड ब्रेन हॅमरेज चौदा तास तो तसाच पडून होता अनमॅरीड आहे त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं तर तो फ्रायडे पासून कोमात गेल्याचं सांगितलं आम्ही सगळे ट्राय करतोय कि तो कोमातून बाहेर यायला पाहिजे तर माझी एक अशी रिक्वेस्ट होती की तो जस्ट महिनाभरापूर्वी भेटला होता आणि म्हणाला होता कि मी खूप वर्ष मी गुलजारांना भेटायचा प्रयत्न करतोय पण जमलं नाही पण आता आयुष्यात एकदातरी त्यांना भेटायलाच पाहिजे असं डेस्परेटली वाटतं आहे तर मी त्याला म्हटलं आपण ट्राय करू कसं पण गुलजारांना भेटणं त्याचं एकदम काय म्हणतात लाईफ ॲम्बीशन होतं तर माझी अशी रिक्वेस्ट होती की तो कोमातून बाहेर येण्यासाठी कॅन गुलज़ारजी सेंड हिम वन वॅाइस मेसेज अड्रेसिंग धर्मराज जो त्याला रिपीटेडली ऐकवला तर कदाचित काहीतरी फायदा होईल तो कोमातून बाहेर येईल आणि त्याची लाईफ हे होऊ शकेलकॅन यू हेल्प प्लिज ? ….”

एका अनोळखी माणसासाठी किशोरला कसं सांगायचं हा कॉम्प्लेक्स घेऊनच अमितने नुस्ती ती वॅाइस क्लिप पाठवली असावी.. 

मी ऐकून सुन्न होतो. रात्रीचे पावणे दहा वाजलेले असतात.
" गोंधळ " नावाच्या चित्रपटाच्या शूटला मी राजगुरू नगर मधल्या व्हिट्स कामत ह्या हायवे लगतच्या हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरल्या  ३०१ नंबरच्या रूममध्ये असतो .. 

ते वाचून काय वाटलं अजून कळत नाही कदाचित कोमात गेलेल्या माणसालाही असच होत असेल. 

मी खूप वेळ नुस्ता हायवे वरलं ट्राफिक पाहत खिडकीशी उभा राहतो .. काळ सेकंदांचा आवाज करत प्रत्यक्ष जातांना जाणवत राहातो .. मला गुलज़ार साहेबांच्याच ओळी अचानक आठवू लागतात .. 

"वक्त को आते ना जाते ना गुज़रते देखा 

ना उतरते हुए देखा कभी इलहाम की सुरत 

जमा होते हुए एक जगह मगर देखा है....

शेवटी न राहून मी गुलज़ार साहेबांना फोन लावतोच .. रिंग वाजत राहते .. त्यांनी फोन उचलावा ... प्रत्येक रिंग नंतर आता उचलावा...  आता उचलावा .. उचलावा असं मनोमन म्हणत  राहातो .. पण खूप वेळ रिंग वाजून थांबते  .. झोपले असतील कदाचित .. कारण ते दहालाच झोपतात हे मला माहित असतं ..
मी पुन्हा ट्रॅफिक पहात राहातो .. त्यांना मेसेज करावा असं वाटतं पण मेसेजमध्ये या घटनेचं गांभीर्य वा मला जे होतंय ते कळेल का त्यांना म्हणून मेसेज करत नाही .. आणि इतक्या रात्री गुलज़ार साहेबांना परत फोन करून उठवावंच. मन धजत नाही ..

मी त्या धर्मराजला ओळखत नसतो पण तो कोमात  आहे .. अजूनही जगू शकतो .. फक्त गुलज़ार साहेबांचा आवाज .. पण  ..मी असह्य होतो .. खिडकीशी उभा राहुन नुस्ते ट्रॅफिकचे दिवे इकडून तिकडे तिकडून इकडे पळतांना पाहात राहातो ... पाय दुखू लागतात .. मोबाईल पाहातो तर रात्रीचे बारा वाजलेले असतात .. मग बेशुद्ध होण्यासाठी मी खूप पितो .. सकाळी सातचा कॉलटाइम असतो .. हायवेवर सैरावैरा पळणारे दिवे पाहात कधी कोमात जातो कळत नाही.

पहाटे कधीतरी झोप उचटते .. पाच वाजलेले असतात .. उठून झटपट अंघोळ करून गाडीची वाट पाहतो .. गाडी सात वाजता येणार असते आणि आता पावणे सहा वाजलेले असतात .. मी पुन्हा तो वॉइस मेसेज ऐकतो .. पुन्हा ट्रॅफिक पाहत राहातो  ... पुन्हा पापण्या जड होतात मी पुन्हा बिछान्यावर कोलमडतो.

आठला अचानक जाग येते .. खडबडून जागा होतो .. एवढ्या सकाळी करावा का फोन गुलज़ार साहेबांना ? .. मन धजावत नाही .. 
साढे आठला गाडी येते .. मी त्यात बसतो .. लोकेशन "वळद"  नावाचं सत्तेचाळीस किमी लांबचं गाव असतं .. मी गाडीत बसतो.पुन्हा डोळे मिटतात .. गाढ झोप लागते .. 

"सर लोकेशन आलं ".. माझा  हेल्पर बॉय जयराम सांगतो ..मी उठतो .. कुठे आलोय कळत नाही मग क्षण दोन क्षणात मेंदू भानावर येऊन मी उतरतो .. माझे डोळे लाल असतात .. माझ्याकडे सगळे कसनुसं बघतात .. मी नजर खाली करून मेकपरूमच्या दिशेने जातो .. 

यंत्रवत कॉस्ट्यूम,मेकप, कॉफी सगळं होत राहतं .. कधी दहा वाजतायत याची मी मनोमन वाट पाहात असतो .. तितक्यात असिस्टंट येऊन मला सीन सांगतो .. सीन विनोदी ढंगाचा असतो .. ( इतक्या गंभीर मनःस्थितीतुन रात्रभर गेल्या नंतरही हे असं... असच फिल्मी वाटणारं घडत असतं कितीकदा आपल्या आयुष्यात पण तेच पडद्यावर पाहून आपण हसतो ) मी नुसता ऐकून घेतो दहा कधी वाजतात याची मी वाट पाहत राहातो. 

दहा वाजायला दोन तीन मिनिटं असतांना मी चालू सीन थांबवतो आणि सगळ्यांना काय झालंय आणि मला आता काय करावं लागेल ते सांगतो .. आक्ख युनिट गंभीर होतं .. मी गुलज़ार साहेबांना फोन लावतो .. ते उचलतील का नाही .. सकाळच्या मिटिंग मध्ये असतील तर ... या संभ्रमात असतांनाच चार रिंग नंतर ते उचलतात .. मी त्यांना रात्री फोन केल्याचं सांगतो... 'तुम्ही रात्रीच का उचलला नाहीत फोन ' हे न बोलता बोलण्याच्या सुरात सांगू पाहातो .. मग मी ती वॉइस क्लिप , तो मुलगा, तो कोमा हे सगळं सांगतो ... ते शांतपणे ऐकून घेतात .. माझं संपत .. मध्ये काही क्षण फक्त आमचे श्वासोच्छवास ऐकू येत राहातात.

मग ते म्हणतात " ठिख हैं चलो करते हैं .. पर एक काम करो उस लड़के के आसपास कोई जो होगा उसका नंबर मुझे दे दो .. मैं उससे बात करके उस लड़के ..क्या नाम उसका ....धर्मराज के कान पर फोन ले जाने को केहेता हूँ और बात करता हूँ .. उसके जितना करीब पोहोंच पाऊँ उतना अच्छा है ना बेटा ?" 

"पर सर ..मैं शूट कर रहा हूँ .. मैं उस लडकी का नंबर आपको देता हूँ और आपका नंबर उसको शेअर करता हूँ .. आप प्लिज कोऑर्डिनेट कर लीजिये प्लिज मैं शायद फिर फोन पर नहीं आ सकूँ .." 

" अच्छा तुम बम्बई मे नहीं हो ? कहाँ हो ?"
" यहाँ राजगुरूनगर मे सर.." 
" ये कहाँ पडता है ? " 
" पुणे के पास सर "
" तो हिमाचल मे तो नहीं हो ना ? " 
" हाँ सर पर यहाँ नेटवर्क का बहोत प्रॉब्लेम है सर " 
ते पॉज घेतात.. मग म्हणतात " अच्छा चलो ठीक है मुझे भेजो उस लडकी का नंबर और मेरा उसको देना .. क्या नाम उसका ?" 
" रुपाली सर .. वो पुलिस सुप्रिटेंडन्ट ऑफ ठाणे है सर " 
" अच्छा .. ? ओके उसको कहो कोई अच्छा रेकॉर्डिंगवाला फोन उस हॉस्पिटल मे अरेंज करें और मुझे फोन करें .. मै रेडी रेहेतां हूँ इधर " 
" ओके सर ..." असं बोलून मी फोन कट करतो. अमितला फोन लावतो .. त्याचा फोन एंगेज येतो .. सतत अंगेजच येत राहातो .. 
सगळं युनिट सीन अर्धवट ठेऊन माझ्या समोर समोर उभं असल्याचा प्रचंड गिल्ट येऊन मी वैतागून फोन ठेऊन सीन  सुरु करणार इतक्यात अमितचा फोन येतो .. तो रुपालीशीच बोलत असल्याचं सांगतो .. मी त्याला गुलज़ार साहेबांचा नंबर देतो ..रुपालीचा नंबर मला पाठवायला सांगतो .. बाकी कोऑर्डिनेट करून घ्या  ' मी सीनमध्ये ..'  असल्याचं सांगतो. फोन ठेवतो .. सीन सुरु होतो. पण सीन करतांना सतत  'तिकडे काय झालं असेल'  ची उत्सुकता.. की निराशा.. की हतबलता घेरून टाकते .. फोन परत वाजतो .. तो रुपालीचा असतो .. मी तिला पुन्हा सगळं एक्सप्लेन करतो .. ती तिच्याकडे आयफोन असल्यामुळे फोनवरून रेकॉर्डिंगचं कळत नसल्याचं सांगते . .. आयफोनला कंटाळलेला मीही आयफोनला शिव्या घालत फोन ठेवतो .. सीन सुरु होतो .. तरी मी सीनमध्ये जितकं विनोदी राहाता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करतो .. सकाळचं ऊन आता तापायला लागलेलं असतं .. आम्ही भर उन्हात एका घराच्या अंगणात हा विनोदी सीन करत असतो .. पण काय झालं असेल तिकडे .. काय .. काय .. कायकायकायकाय.. च्या माशा मस्तकातल्या पोळ्या भोवती घोंघावत राहातात ..

पंधरा मिनिटाने रुपाली कडून एक वॉइस  क्लिप येते ..  त्या क्लिप खाली " धर्मराज रिसायटींग हिज पोएम " असं लिहिलेलं असतं .. आता युनिटभर सगळी उत्सुकता उन्हा सारखीच पसरलेली असते ... सगळं युनिट जमा होतं .. मी ती क्लिप ऑन करतो ..येणारा आवाज धर्मराजचा असतो .. तो गुलज़ारांसाठी लिहिलेली कविता त्याच्या दणकट आवाजात म्हणत असतो .... 

" काफी वक्त़ बीता गुलजाऱ 
तुम्हारा इंतज़ार करते करते 
शायद चंद सदीयॉं बीती हों 
मैं वहीं बैठा हूँ उस मोडपर 
जहाँ तुम्हारे छाँव की उँगली 
पहली बार थामी थीं मैंने 
सोचा के तुम आओगे कभी 
ख़ुद की छाँव कि तलाश मे 
जिस पेड़ के नीचे मै बैठा रहा 
उसकी सारीं पत्तीयॉं अब 
सुख़कर गिर चुकी हैं गुलज़ार
हजारों बारिशें आकर चली गईं 
लाखों मुसाफ़िर गुज़रे यहॉं से 
फिर भी एक पत्ता नया न आया 
इस पेड की शांख आज भी 
उसी तरह कॉंप उठती है गुलजा़र 
समझा बुझाकर सुला देता हूँ 
आओ कूछ बातें कर लें 
नज़्म के छाले देखें दिखॉंए
कब तक मैं अपनी छाँव 
घूमता रहूँगा ऐसे 
जगाओ मुझे यहॉं से 
जहॉं इंतजा़र भी पिघलने को है 

काफ़ी वक़्त बीता गुलजा़र ...

तो आवाज ज्याच्या गळ्यातून येतो तो तिकडे कोमात आहे ही जाणीव प्रत्येक ओळीमागून सरपटत येते. 
________________________

तो कोमात आहे त्याला  नक्की काय होत असेल ? 
तो फक्तं जिवंत असेल की त्याला जाणवत असतील आसपासच्या हालचाली ? 
त्याला फट्कन उठून बसावं असं वाटत असेल ? 
तसा प्रयत्न त्याचं मन करत असेल ? 
त्याचं शरीर काहीकेल्या हलत नसल्याचं जाणून त्याला काय वाटत असेल ? 
कोमातून जागे होऊन पुन्हा नॉर्मल आयुष्य जगणाऱ्यांच्या गोष्टी त्याला आठवत असतील ? 
स्वतःच्या डाव्या उजव्या हाताचं कुठलं तरी एक बोट हलवून पाहावं म्हणून तो सगळं भान त्या बोटा पर्यंत नेत असेल ? 
ते भान तिथपर्यंत पोहोचत असेल ? 
________________________

पंधरा मिनिटांनी रुपालीचा गुलजा़र साहेबांची क्लिप रेकॉर्ड झाल्याचा मेसेज येतो. सुगंधा नावाच्या त्या वेळी हॉस्पिटलमध्ये धर्मराज जवळ असलेल्या मैत्रिणीने गुलजा़र साहेबांशी बोलून…तिचा  फोन धर्मराजच्या कानाशी नेउन तो त्याला ऐकवत असतांनाच ती क्लिप रेकॉर्ड झाल्याचं सांगते .. 
आणि फोन धर्मराजच्या कानाशी असतांनाच त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळल्याचं ...त्याने एक दीर्घ श्वास घेतल्याचं सांगते. 

जवळजवळ अर्धा तास जातो .. आणि मला रुपाली कडून पुन्हा एक वॉइस क्लिप येते .. 
 " गुलजारजीज् एडिटेड क्लिप"  असं तिने त्या खाली लिहिलेलं असतं.मी सगळ्या युनिटला होल्ड करून वॉइस क्लिप ऑन करतो ..आक्खं युनिट माझ्या फोन भोवती गोळा होतं .. क्लिप सुरु होते. गुलज़ार साहेब बोलत असतात..

" धर्मराज ..! धर्मराज .. सुनो धर्मराज मैने सुना है~~ तुम मुझसे मिलना चाहते थे .. तुम्हे मेरीं कविताएँ अच्छीं लगतीं थीं .. तुम अच्छे हो जाओ जल्दी से … और अपने भाई के साथ आ जाओ मिलने .. मैं तुमसे केहेता हूँ तुम्हारी पसंद का कोई भी गाना सुना दुँगा मैं .. जो~~ तुम्हें पसंद था .. धर्मराज… आँखें खोलो धर्मराज और सुनो~~....जब आओगे ना तो नईं कविताएँ भी सुनाऊँगा… बस जल्दीसे अच्छे हो जाओ धर्मराज .. मेरी आवाज़ सुन रहे हो ना धर्मराज .. “ 

 क्लिप संपते .. 
कडकडीत उन्हात माझ्या सकट आक्ख्या युनिटच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी असतं.

धर्मराजने एकदाचा गुलजारजींचा आवाज ऐकला या आनंदात आम्ही पुढला सीन शूट करून संपवतो ... दुपारी पुन्हा गुलज़ारजींचा फोन येतो .. ते सगळं नीट झाल्याचं .. वॉइस क्लिप झाल्याचं सांगतात आणि त्याची तब्बेत कशीये ते दर तासा भराने कळव असा आदेश सोडून फोन ठेऊन देतात. 

दुपारी लचंच्या आसपास रुपालीचा आभाराचा फोन येतो. माझ्याशिवाय ते शक्य नव्हतं असं ती म्हणते. मी फक्तं निमीत्तमात्र असल्याचं तिला सांगतो. 
आपण सगळे निमित्तालाच जगत असतो असं वाटत राहातं. 

पंचवीस तारखेला रुपालीचा सकाळी दहा अठ्ठावनला मेसेज येतो.

गुड मॉर्निंग किशोरजी ! टुडे गुलज़ारजी इन्क्वायर्ड अबाउट धर्मराजस् हेल्थ.. ही इज स्टिल इन आयसीयू.. फायटिंग फॉर लाईफ.. प्लिज प्रे फॉर हिम.." 

“सर्टनली .. आय एम ऑलरेडी .." तिला रिप्लाय करतो.

मध्ये दिवस जात राहतात .. सबकॉन्शस माईंडमध्ये धर्मराज गुलजा़रजींच्या आवाजाच्या लाटांवर तरंगताना दिसत राहातो .. 

एक मार्चच्या दुपारी साढेतीनला रुपालीचा मेसेज येतो ..

" वी लॉस्ट हिम टुडे .. अवर बिल्व्हेड फ्रेंड धर्मराज पाटील पास्ड अवे पीसफुली धिस आफ्टरनून ट्वेल्व्ह पीएम .. ऑन मार्च टू थाउजंड ट्वेंटी टू..ॲट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इन पुणे. हिज लास्ट राईट्स विल बी कंडक्टेड ॲट वैकुंठ क्रिमेटोरियम.. नवी पेठ पुणे .. ॲट फाईव्ह पीएम .. ऑल आर रीक्वेस्टेड टु बी प्रेझेंट फॉर ध सेम". 

धर्मराज ! 
मृत्यू नंतर आयुष्य असतं कि नाही ठाऊक नाही. .. अजून तरी माणसांवर पक्षी बसत नाहीत .. ते झाडावरच बसतात .. ज्या झाडांवर पक्षी बसतात,  त्या झाडांना सेलिब्रेट करतात ,  त्या दिवशी तू जन्मलास हे काय कमी आहे ..! 

धर्मराज ! झाडांमध्ये, पक्षांमध्ये राहिलेल्या कवितेच्या माणसा....  
" आनंद " मधली गुलज़ार साहेबांची कविता त्यांच्या वतीने तुला सादर अर्पण  .. 
 

" मौत तू एक कविता है 
मुझसे एक कविता का वादा है 
मिलेगी मुझको 
डूबतीं नब्जोंमे जब दर्द को नींद आने लगे 
ज़र्द सा चेहेरा लिए जब 
चाँद उफक़ तक पहुँचे 
दिन अभी पानी में हों 
और रात किनारे के क़रीब 
ना अभी रात ना दिन 
जिस्म जब ख़त्म हों 
और रूह को जब सॉंस आए 
मुझसे एक कविता का वादा है 
मिलेगी मुझको….. " 

                                                                                         
सौमित्र.




Saturday, March 15, 2025

कमी आणि नेमकं बोलणं महत्वाचे

जेव्हा आपण कमी आणि नेमकं बोलतो, तेव्हा आपल्या शब्दांना किंमत निर्माण होते.

मानसशास्त्रानुसार, लोक ज्या गोष्टी दुर्मिळ किंवा मोजक्याच प्रमाणात मिळतात, त्यांना अधिक महत्त्व देतात. 

यालाच scarcity principle म्हणतात. कमी शब्दांत नेमकेपणा ठेवल्याने आपल्या संभाषणाची गुणवत्ता वाढते आणि ऐकणाऱ्या व्यक्तीला आपल्या बोलण्याकडे अधिक लक्ष द्यायला भाग पाडते.

संशोधनानुसार, कमी बोलणाऱ्या लोकांकडे अधिक आत्मविश्वास आणि प्रगल्भतेचे लक्षण मानले जाते. 

त्यांचे शब्द सहजासहजी वाया जात नाहीत, त्यामुळे त्यांची मते आणि सूचना इतरांना अधिक महत्त्वाच्या वाटतात. 

शिवाय, अकारण बोलणे टाळल्याने सामाजिक नातेसंबंध सुधारतात आणि गैरसमज कमी होतात. 

कमी बोलण्याची सवय आपल्याला अधिक संवेदनशील, चातुर्यपूर्ण आणि विचारशील बनवते. 

त्यामुळे संवाद साधताना कमी आणि योग्य शब्दांचा वापर केल्यास आपण स्वतःला अधिक प्रभावीपणे मांडू शकतो.

राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ

#selfrespect #SelfCare #आपलंमानसशास्त्र #RakeshVarpe

Friday, March 14, 2025

कविता १

पेड़ के ऊपर चढ़ा आदमी
ऊंचा दिखाई देता है।
जड़ में खड़ा आदमी
नीचा दिखाई देता है।

आदमी न ऊंचा होता है, न नीचा होता है,
न बड़ा होता है, न छोटा होता है।
आदमी सिर्फ आदमी होता है।

पता नहीं, इस सीधे-सपाट सत्य को
दुनिया क्यों नहीं जानती है?
और अगर जानती है,
तो मन से क्यों नहीं मानती

इससे फर्क नहीं पड़ता
कि आदमी कहां खड़ा है?

पथ पर या रथ पर?
तीर पर या प्राचीर पर?

फर्क इससे पड़ता है कि जहां खड़ा है,
या जहां उसे खड़ा होना पड़ा है,
वहां उसका धरातल क्या है?

हिमालय की चोटी पर पहुंच,
एवरेस्ट-विजय की पताका फहरा,
कोई विजेता यदि ईर्ष्या से दग्ध
अपने साथी से विश्वासघात करे,

तो उसका क्या अपराध
इसलिए क्षम्य हो जाएगा कि
वह एवरेस्ट की ऊंचाई पर हुआ था?

नहीं, अपराध अपराध ही रहेगा,
हिमालय की सारी धवलता
उस कालिमा को नहीं ढ़क सकती।

कपड़ों की दुधिया सफेदी जैसे
मन की मलिनता को नहीं छिपा सकती।

किसी संत कवि ने कहा है कि
मनुष्य के ऊपर कोई नहीं होता,
मुझे लगता है कि मनुष्य के ऊपर
उसका मन होता है।

छोटे मन से कोई बड़ा नहीं होता,
टूटे मन से कोई खड़ा नहीं होता।

इसीलिए तो भगवान कृष्ण को
शस्त्रों से सज्ज, रथ पर चढ़े,
कुरुक्षेत्र के मैदान में खड़े,
अर्जुन को गीता सुनानी पड़ी थी।

मन हारकर, मैदान नहीं जीते जाते,
न मैदान जीतने से मन ही जीते जाते हैं।

चोटी से गिरने से
अधिक चोट लगती है।
अस्थि जुड़ जाती,
पीड़ा मन में सुलगती है।

इसका अर्थ यह नहीं कि
चोटी पर चढ़ने की चुनौती ही न माने,
इसका अर्थ यह भी नहीं कि
परिस्थिति पर विजय पाने की न ठानें।

आदमी जहां है, वही खड़ा रहे?
दूसरों की दया के भरोसे पर पड़ा रहे?

जड़ता का नाम जीवन नहीं है,
पलायन पुरोगमन नहीं है।

आदमी को चाहिए कि वह जूझे
परिस्थितियों से लड़े,
एक स्वप्न टूटे तो दूसरा गढ़े।

किंतु कितना भी ऊंचा उठे,
मनुष्यता के स्तर से न गिरे,
अपने धरातल को न छोड़े,
अंतर्यामी से मुंह न मोड़े।

एक पांव धरती पर रखकर ही
वामन भगवान ने आकाश-पाताल को जीता था।

धरती ही धारण करती है,
कोई इस पर भार न बने,
मिथ्या अभियान से न तने।

आदमी की पहचान,
उसके धन या आसन से नहीं होती,
उसके मन से होती है।
मन की फकीरी पर
कुबेर की संपदा भी रोती है।

- अटल बिहारी वाजपेयी

Thursday, March 13, 2025

जोशी कुटुंब

जुनी पोस्ट 

हे व्हायरल झालेले पिशव्यावाले जोशी काका आणि काकू. मी अनेक दिवस त्यांच्याकडून जेवणाचा डबा घेतो. दोघं अफाट आहेत. काका ८७ वर्षाचे आणी काकू ८२. काका सुंदर शिवणकाम करतात आणी काकू अत्यंत रूचकर जेवण बनवतात. आज डब्यात पालकाच्या पुर्या होत्या. परिस्थिती मध्यमवर्गीय पण पुरेशी. एक मुलगा व एक मुलगी येऊन जाऊन असतात, त्यांची काळजी घेतात. दोघांची लग्न झालेली, सुस्थितीत. पण ही दोघं एकमेकांना धरून आहेत. 'स्वयंपुर्ण' आणी 'स्वाभिमानी'. काकू डबे देतात, काका हात पाय चालू रहावेत यासाठी कापडाच्या पिशव्या शिवतात आणी आठवड्यात दोन वारी ठराविक जागी जाऊन विकतात. 
सिन काय झाला कि काही दिवसांपूर्वी कोणीतरी पिशव्या विकत घेताना त्यांचा फोटो काढला आणी सोशल साईट्सवर टाकला. काकांना पत्ताच नाही. लिहिणार्या माणसाने लोकांनी काकांपासून श्रम प्रतिष्ठा व जगण्याची प्रेरणा घ्यावी या उद्देशाने पोस्ट टाकली पण लोकांनी त्याचा आपापल्या पद्धतीने अर्थ काढला. फोटोत गोड हसणारे काका व्हायरल झाले. आता काकांच्या घरी लोकांची रीघ लागलेय, फोन खणाणतायत. कोणी त्यांच्या पोरांना नावं ठेवतायत, कोणी २०० पिशव्यांच्या ऑर्डर्स देतायत, परदेशातून फोन येतायत, मदतीची तयारी दाखवतायत. काका सांगत होते सगळ्यात भारी म्हणजे दुबई च्या एका ग्रुहस्थांनी त्यांना व्रृध्दाश्रमात ठेवण्याची तयारी सुरू केली. सिरीयल मधले दोन तीन नट येऊन गेले, पेपर वाले आले, न्यूज वाले आले. सगळी गंमत चाल्लेय. 

आता यात त्यांना आणि त्याच्या मुलांना मनस्ताप होतोय खरा, पण मला आपला समाज अजूनही किती संवेदनशील आणी जिवंत आहे हे बघून भरुन आलयं. एक कुटुंब म्हणून आपण अजुनही किती बांधलेले आहोत. कोण कुठल्या जोशी काकांसाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोकांनी धाव घ्यावी हि कसली भारी गोष्ट आहे. 
आता या ठिकाणी जरी आमचे काका काकू स्वयंपूर्ण असले तरी दुसरे कुणीतरी काका खरच गरजवंत असतील.. त्यांना मदत व्हायलाच हवी. त्यामुळे यावेळेस जसं आपण मदतीचा हात पुढे केला तसाच प्रत्येक वेळी करायला हवा.
We rise by lifting each other.

**बाकी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे उभयतानी कुंठल्याही पध्दतीची पैशाची मदत किंवा निधी संकलन अपेक्षिली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने किंवा नावावर कोणीही पैसै गोळा करत असल्याचे निदर्शनास आल्यास ताबडतोब काकांच्या खालील नंबरवर संपर्क साधावा.**

- #बोलेगोड

सिध्देश्वर जोशी 8291036120

18 march 2020