Sunday, September 27, 2015

चारोळ्यांचा स्टोरी board

चारोळ्यांचा स्टोरी board 



नुसतं दिसणं पुरेसं असतं !
बोलायची गरज नसते !!
अशी नजरभेट मग कितीवेळ !
मागल्यादारी
मी आठवत बसते !

=================
वेड्या क्षणी भास होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगाच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा


=================

आता आपण भेटलोतर
मी आधी बोलणारच नाही तुझ्य़ाशी
एरवी असं जमत नाही पण
यावेळी मी वाट पाहीन जराशी....
~चंद्रशेखर गोखले
=================
जेंव्हा डॊळ्य़ाना नजर
थोपवता येत नाही
तेंव्हा नजरेवर सगळं
सोपवता येत नाही...

=================

ओठात गुदमरलेले शब्द
अलगद डोळ्यांकडे वळले
पापण्य़ा जरा थरथरल्या
म्हणून गूपीत तुला कळले.

=================
माझी गोष्ट मला सांगताना
मी जास्त खोलात शिरत नाही
कारण नावालाही मग मी
निर्दोष असा उरत नाही ...

=================
चंद्राला माझं घर
तुझ्यामुळे माहीत
कारण हल्ली मी त्याच्या सोबत जागतो
तुझ्या स्वप्नांसहीत........

=================
 तू सोबत असलीस की
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही..
=================
एकांतात स्वता:ला आरशात पाहणं
हा अनुभव साधा नाही
तसे आपण साधे असतो
पण मनातला चोर सीधा नाही.....

=================
तिन्हिसांजेला...
तळ्याकाठी...
कोणी खोळंबतं
कुणासाठी............
===========
नसती उत्तरं द्यावी लागतात
वेड्यासारखं वागल्यावर
पण वेड्यासारखच वागायला होतं
पाऊस पडायला लागल्यावर..........
चंद्रशेखर गोखले

Posted by  : विद्या 

Monday, September 21, 2015

दुष्काळ



दुष्काळाच्या झळा संपता संपेना
कर्जाचा बोजा काय कमी होईना

ह्यातही घोटाळ्यावर खापर
नेत्यांचा नुसता दिखावा सुरु

शब्द फार आणि कामाची नुसती बोंब त्यांची फक्त
दुष्काळात होरपळून शेतकऱ्यांचे  जीव गेले किती

नेत्याचं नुसतं जखमेवर मीठ चोळणं उरलं
आश्वासनांचा नुसता पाऊस

येथे खेळ खंडोबा चाले
पाणी मात्र उद्योग धंद्यान साठी मिळे
चारा छावणी नाव फक्त
जिथे आसरा घेतात गुरं आणि माणसं

तरीही त्यातही घोटाळे तोंड वर करून बोले
दुष्काळाच्या झळा संपता संपेना


~ विद्या पालकर