Tuesday, September 30, 2008

नाती

साला काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली........

काही जिवाभावने जपलेली
तर काही नुस्तीच नावापुरती उरलेली........

काही नितळ प्रेमासाठी जगलेली
तर काही बांन्डगुळासारखी दुस-याच्या जिवावर वाढलेली........

काही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली
तर काही भितीपोटी गुपितासारखी लपवलेली........

काही मैत्रीच नाव दिलेली
तर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव असलेली........

काहि ओझ्यासारखी वाहीलेली
तर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी जपलेली........

काहि नकळत मनाशी जुळलेली
तर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली........

काहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली
तर काही उराशी जिवापाड सांभाळलेली........

काहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली
तर काही मान-अपमानाच्या ओझ्याखाली दबलेली........

काही मोत्याहुन अनमोल ठरलेली
तर काही भंगारासारखी विकाया काढलेली........

साला काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली........

Monday, September 29, 2008

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे......... कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन....................म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

Sunday, September 28, 2008

प्रेम..

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!

ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं....!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्षणभर विसावं....!

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्षणभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!!

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!

Saturday, September 27, 2008

असंही प्रेम असतं!!

प्रेम

असंही प्रेम असतं!!

अशाच एका संध्याकाळी,मन खुप
जास्तच उदास झालं होतं....
काय करु? काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला, चल
स्मशानात जाऊयात....
गेलो मग स्मशानात
एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात
कुतूहल जागले....
थडग्यावरचे नाव वाचले...'
महनाज़ खान ' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!
कसं ग्रासलं असेल मृत्युने
तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात
दगावली असेल ती?
मनात उगाच प्रश्नांचे
काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या
थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ
का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो,
ज्याच्यासाठी तिने
आत्महत्या केली!'
मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड
कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले
आहेत फक्त!'
मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या
का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या
स्वागताच्या तयारीसाठी
पुढे गेली आहे!

Friday, September 26, 2008

काल म्हटलं पावसाला.....

काल म्हटलं पावसाला.....

काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.

न्हा‌ऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब

मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय

पा‌ऊस रिमझिम हसला.
ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.

जाता जाता म्हणाला,
"काळजी नको. भिजून घे खूप

Thursday, September 25, 2008

मी आहे हा असा आहे

मी....

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नहितर नीघून जा...

कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा...

तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य,
जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा...

तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास,
कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय...

करावस वाटलं तर एकच् करा
मी जगतोय तस मला जगू द्या...
का नवं ठेवता उगाच
मी करतोय ते मला करु द्या...
म्हणूनच म्हणतो..

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
-अनामिक

Wednesday, September 24, 2008

मैत्री

जी कधीही पुसली न जावी
जशी रेघ काल्या दगडावरची
कोणतही वातावरण पेलवनारी
एखाद्या लवचिक वेलीसारखी......

कुठेही दडली तरी अस्तित्व दाखवणारी
कुठेही चमकणार्या हिर्यासारखी
थोड्याश्यावर न भागणारी
दुष्काळात तहाननेल्या मनसासारखी.......

पवित्रतेने परिपूर्ण अशी
देववरचि फ़ुले जशि.....

कधीही न सम्पणारी
विशाल सागरासारखी
सतत बरोबर असावी
शरीराच्या प्रत्येक अवयवासारखी....

तुटली तरि कायम आठवणीत असणार्या
आयुष्यातल्या सोनेरी क्षणासारखी...........

मैत्री अशी असावी
प्रत्येक तासाला, क्षणात बदलणारी
मनाला तजेला देणारी
कधीही न मरणारी
अमर झालेल्या जिवासारखी

Tuesday, September 23, 2008

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही..

स्व...

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय ,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु , ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव , डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.

Monday, September 22, 2008

आयुष्य

मनमोकळं गाणं
.
.
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं !

सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत ?
डोळे उघडून पहा तरी :
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत !

हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं !

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !


आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा !

झुळझुळणार्या झर्याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या!

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

Sunday, September 21, 2008

मराठी कविता

एकदा महाराज मला भेटले,
झोपेत पाहून जोरात कडादले,
"अरे मावल्या झोपतोस काय?,
कोम्ब्डा अरवला ऐकू येत नाही काय?",
"महाराज हयात दोष माझा नाय ,
थंड AC आणि गजराच्या युगात,
कोम्ब्डया च महत्व तरी काय?"

महाराज हसले अणि म्हणाले ,
"चल भवानी मातेच दर्शन घेउया,
ह्या युगातला महाराष्ट्र पाहुया"
दर्शन घेउनी महाराजांनी सर्व किल्ले पाहिले,
शेवटी राजगडअ वर येउनी स्तब्ध राहिले,
म्हणाले,"काय रे दशा झाली या किल्ल्यांची आज?
ज्यांना पाहुनी डगमगले होते पातशाही ताज!!!
मी म्हणालो ,"महाराज, अहो इथे इतिहास आठवतो तरी कुणाला आज?
रेव्ह पार्ट्या करतांना ह्या लोकांना वाटत नाही लाज...!

महाराज विचलित झाले,
म्हणाले,"चल येथून जाऊ यात ,
महाराष्ट्राची राजधानी पहुयात",
महाराजान्सोबत मुंबईत आलो,
तिथल्या झगमगाटआत पूर्णपणे हरवलो,
मुंबई बघता बघता २६/११ च प्रसंग ऐकविला,
तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या महाराजांनी मलाच प्रश्न केला,
"तुम्ही त्या नाराधामाला जित्ता कैसा सोडिला?"
उत्त्तर काय देणार माझाच चेहरा पडला ,
म्हणालो महाराज ,"तो पहा तो कसब त्यानेच हा प्रसंग घडविला,
पण आजच्या लोकशाहीत न्याय आहे प्रत्येकाला नाही तो फक्त माणुसकी 

Saturday, September 20, 2008

शाळे समोरुन जाताना
बालपण मनात गवसत
वर्गात डोकाऊन पहाताना
आठवणींनी मन भरतं
मागे वळुन पहाताना
वाटत तिथेच आहोत आज
तेच सर्व मित्र अन्
तोच बसायचा बाक
आठवणी असतात अभ्यासाच्या
मार दिलेल्या गुरु़जींच्या
मधल्या सुट्टीत गंमत भारी
होती शाळा माझी न्यारी.
माझ्याही आहेत अनेक आठवणी
शाळे मधल्या गमतीच्या
खेळामधल्या मस्तीच्या
सहलीतल्या सफरीच्या
ह्रदयात त्या रुजल्या आहेत
कायमच्या घर करुन बसल्या आहेत
जरी...
दिवस आता बदलले आहेत.
आठवणी विसरत नसतात
संस्कारां बरोबर येत असतात
घडवायचे असते जिवन आपुले
शाळेला कधी विसरायचे नसते.

Thursday, September 18, 2008

आयुष्याच्या वाटेवर चालताना मी पुष्कळदा चुकलो,
त्या चुकांचे मापदंड भरत गेलो, पण कधी नहारलो.
हरन्यातून खूप काही शिकत गेलो, चालत गेलो,
कुठे मिळाले यश तर कुठे मिळाले अपयश.
यश तर होते मुंगीसारखे अपयश पाहता पहाडासारखे,
अपयशाच्या पहाडाला कशी न घाबरलो..
मुंगी बनून पहाड चढलो पण कधी न हरलो.
पहाडातून वाट शोधात चालत गेलो.
काटे रुतली रुतल्या काचा,जखमी झाले मन
त्या जखमांची पर्वा न करता,बांधून पट्ट्या चालत गेलो.
पट्ट्या फाटल्या,रक्त वाहिले, पण मी न फाटलो.
नात्याचेही बांध फुटले, तुटले सखे सवंगडी
मग सोबतीला कोणी न उरले पडलो एकाकी
रडलो, थांबलो, पुन्हा चालत गेलो पण कधी न हरलो.
दुरून दिसली वाट नवीन,सुंदर आणि सुरेख चालत गेलो.
अपयशाला मागे टाकून याशाजवळ पोहचलो.
नात्याचेही बांध बांधिले, जुळविले सखे सवंगडी.
आता आयुष्याच्या या सुंदर वाटेवरती ना उरल्या काचा ना राहिले काटे

Wednesday, September 17, 2008

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

Tuesday, September 16, 2008

माझं मन
सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही
कितीही वाटलं तरी करवत नाही
कुणी काही सांगितल तर एकवत नाही
अश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच कळत नाही .
चटके कितीही बसले तरी ओरडत नाही
आपल्यानीच तोडल तरी दुरावायला तयार नाही
अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणता येत नाही.
माझं मन हे असं का ? कुणालाच उमजत नाही .
निस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही
कितिही केलं तरी केलं कुणी म्हणतच नाही
वाटतं मी कुणाची कुणी राहिलेच नाही
कारण कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतच नाही
माझं मन हे असं का ? कुणालाच समजत नाही .

Monday, September 15, 2008

हे प्रेम म्हणजे नक्की काय असत...
कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असत...
कशाला म्हणतात प्रेम...

कोणाचीतरी सतत आठवण येण हे प्रेम असत...
दिवसरात्र त्याचा विचार करण हे प्रेम असत..
येणार नाही माहित असुनही त्याच्या फ़ोनची वाट पाहन हे प्रेम असत...
की तो नाही म्हणुन गर्दीतही एकाकी वाटन हे प्रेम असत....

ऑरकुट वर सारख त्याच्या प्रोफाइल ला visit करण...
त्याचा no डायल करून रिंग वाजन्याआधी फोन कट करण याला प्रेम म्हणतात
मी बोलणारच नाही त्याच्याशी ठरवूनही ...
फ़ोन नाही तर नाही...पण atleast एक मिस कॉल ची अपेक्षा करण याला प्रेम म्हणतात
की त्याला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ अस म्हणुनही
त्याच्या एका सॉरी ने क्षणात विरघलुन जाण याला प्रेम म्हणतात

त्याच्या एक नजरेसाठी व्याकुळ होण याला प्रेम म्हणतात...
त्याच्या मिठीसाठी आतुरण याला प्रेम म्हणतात...
त्याच्यासाठी वाटनार्या काळजिला प्रेम म्हणतात की
की त्या ख़ास मैत्रीला प्रेम म्हणतात...

त्याच्या जगात आपल स्थान नाही माहित असुनही
त्याच्या बरोबर स्वप्न रंगवन याला प्रेम म्हणतात...
स्वताच्याही नकळत त्याच्यात गुंतत जाण याला प्रेम म्हणतात की

Sunday, September 14, 2008

असंही प्रेम असतं!!
असंही प्रेम असतं!!
अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....
काय करु? काहीच सुचतं नव्हतं....
उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....
गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले॥
थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...
म्हणजे माझ्याच वयाची असेल!
कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?
आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...
तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला...
मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'
तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'
मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'
तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'
मी चकीत झालो!
विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'
तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'
.......मी निशब्द....

असंही प्रेम असतं

Saturday, September 13, 2008

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु.
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे.
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल........................!

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला,
अडखळलेला तो शब्द मीच असेल................!

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील,
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल....................!

कधी जर सुटला बेधुंद गार वारा.
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील.
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक.,
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल .....

Friday, September 12, 2008

रोज आठवण यावी असे काही नाही,
रोज भेट घ्यावी असेही काही नाही,
मी विसरणार नाही याला "खात्री" म्हणतात,
आणि तुला याची खात्री असेल तर
याला "मैत्री" म्हणतात........

Thursday, September 11, 2008

खरतर तुझ्याशी खुप काही बोलायचे होते...
पण कस तुला सांगायच हेच मला कळत नव्हते..

प्रेम करते तुझ्यावारती राग मनु नकोस..
काही ही असो तुझ्या मनात पण तू मैत्रिणीची साथ सोडू नकोस...

जीवनात एकटे असणे हे फार अवघड असत..
जीवनात तू भेटल्या शिवाय मला ते काळलच नसत...

काय सांगू मी तुला मला काहीच कळत नाही..
प्रेम करते मी तुझ्यावरती पण तुला ते अजिबातच कळत नाही

Wednesday, September 10, 2008


तुझे ते हास्य जीवनी
गंध फुलाचा देऊन गेला.
फक्त तुझ्या हसण्यासाठी
लाख चुका माफ तुला.
तुझ्या एकदा येण्याने
आसमंत हा आज खुलला
फक्त तुझ्या येण्यासाठी
आसमंत हा धरणीवर झुकला.
तुझ्या नुसत्या बोलण्याने
मानाने आकांत केला
फक्त तुझे बोल ऐकण्यासाठी
चारीदिषा वादळ उठवीत गेला.
तुझ्या माझ्या भेटीसाठी
माझ्या हृदयाने हट्ट केला
फक्त तुझी एक हाक ऐकण्यासाठी
साऱ्या आयुष्याने धोका दिला......

Tuesday, September 9, 2008

"पुरवतो मी आज तुझा हट्ट!"
कुणी तुला चंद्र म्हणतं
कुणी तुला फुल म्हणतं
प्रत्येक जण आपापल्यापरीनं
तुझ्या सौंदर्याचं वर्णन करतं
कोणासाठी तु आहेस जलपरी
तर कोणासाठी एक स्वप्नसुंदरी
आज तुझा जुना हट्ट मी पुरा करणारं
तुझ्या सौंदर्याचं वर्णन आज मी ही करणार......
केस तुझे रेशमी इतके
रेशीमही ज्याच्या शोधात भटके...
डोळ्यात तुझ्या मी हरवलो प्रथमदर्शनी
शोधतो आहे आजही स्वतःला.....
ओठांचा तर तुझ्या काय सांगु थाट
माझ्या प्रत्येक भावनेला फुटते तिथेच,
शब्दरुपी वाट......
तेज तुझ्या चेहऱ्यावरले पाहुन
सुर्यालाही लागे स्पर्धेची चाहूल.
जाण न प्रिये तु माझी व्यथा
काय सांगू तुझ्या सौंदर्याची कथा
तेज तुझ्या चेहऱ्यावरले पाहुन
सुर्यालाही लागे स्पर्धेची चाहूल.
जाण न प्रिये तु माझी व्यथा
काय सांगू तुझ्या सौंदर्याची कथा .

Monday, September 8, 2008

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !


शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबून
स्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढून
पॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन..
...टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून


दुरुनच बघायचय तिला चाकां आडून
विचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणून
चालायचय सोबत मग सायकल हातात धरून..
...विचारणारे तिला आता योग्य संधी बघून


शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटून
बोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळून
बोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून..
...कुणाचा रे विचार करतोयस तू अजून?


नकळत त्या शब्दाने पडायचय घसरून
पहायचय तिने मग माझ्याकडे चमकून
मी मात्र तिच्या नजरेला चुकवून..
...काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून?


तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवून
हातातली छत्री झटकन उघडून
माझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून..
...पहायचय रे मला एकदा प्रेम करून

Sunday, September 7, 2008

आयुष्य

आयुष्यात प्रेम करायचय मला..
दुर कुठेतरी समुद्र किनारी हातात हात घालून बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला…
माझ्या मांडीवर डोके ठेऊन तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला…
तिच्या सोबत थोडं दुष्टपणे वागुन तिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवे पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय मला…
आयुष्यतील माझं शिखर तिच्या सोबतीने चढायचय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीचा आनंद तिच्या डोळ्यांतून व्यक्त झालेला अनुभवायचा मला
आयुष्यात प्रेम करायचय मला..

Saturday, September 6, 2008

मैत्री

..मैत्रीच्या पलिकड़ल आणि प्रेमाच्या अलिकड़ल नात........

मिलालिस तू एक सुन्दर मैत्रिण
आनंद जाला मनाला
जसा होतो पावसाच्या भेटीत धरतीला

फरफटलेले आयुष मज़े तुज्या येण्याने सावरले
होते निवदुंड फ़क्त मनात आधी
आता फुलांचे ताटवे फुलले ...

यशामागे धावताना धरपदलो होतो
अनाथ मी जख्मी मन
दुनियेकडून तुदवलो होतो..

त्यावेळी तूच दिलास मैत्रीचा हाथ
अणि दिलीस लाखमोलाची साथ
तुज्या सहवासात वाढला आत्मविश्वास
आनंदाने घेत जगतो आहे मी आता प्रत्येक श्वास
तुज्यामुलेच मी आज पुन्हा उभा राहिलो
हिर्मुस्लेला मी पुन्हा एकदा फुल्लो

आयुष भर तू खुप केले माज्या साथी
आता मलाही करायचे तुज्यासाठी
उरलेले हे मज़े आयुष आता फ़क्त तुज्या साथी
अयुशाभर मी तुजा
दास बनुन राहिल
तुज्या एक हकेची वाट फ़क्त
हा मित्र तुज्या साथी जिव देऊन जाइल ............ ......... ....