Tuesday, July 27, 2010


मराठी  सुविचार 
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

आधी विचार करा; मग कृती करा.
आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,

फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास
तर जगलास !

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
अतिथी देवो भव ॥
अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका
निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं
काहीतरी शिकण्याची संधी असते.
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
सत्याने मिळतं तेच टिकतं.
जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा
पशुची !

स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर
राजहंस !!

जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा

मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.
आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
खिडकी म्हणजे आकाश नसतं.

 जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
 भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.

कविता म्हणजे भावनांचं चित्र!
 संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
 तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक

पटीने देव तुम्हाला देईल.
 ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
 स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा

वापर कुणाला करु देऊ नका.
 अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
 तुलना करावी पण अवहेलना करू नये.
 समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
 मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

 चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
 आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
 अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
 विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

 मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
 आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.

 तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
 काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.

 लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

 भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद
देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

 उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
 पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
 अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

 मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
 रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
 अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

अंथरूण बघून पाय पसरा.
 कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;



Monday, July 26, 2010

आषाढी एकादशी




आषाढी एकादशी

हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.

पौराणिक काळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून ''तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल'' असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला.
परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.

सर्वेपि सुखिन: सन्तु ।
सर्वे सन्तु निरामया ।
सर्वे म्रदाणि पश्यन्तु ।
मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।


Sunday, July 25, 2010

Thursday, July 22, 2010

खरंच तू कशी ?.......

खरंच तू कशी ?................
तू अशी तू तशी, खरंच तू कशी ?

तू अशी लडिवाळ
तू प्रेमाचा वेल्हाळ
वाणी तुझी रसाळ
म्हणून का तू मला पाडलंस फशी ?

तू मैत्र अन प्रेमाचा मळा
तू मम जीवीचा जिव्हाळा
तू प्रेममयी घुंगुरवाळा
काय तुझी मी वर्णू महती अशी ?

तू दीपस्तंभाची ज्योती
तू सृजन्मनाची प्रीती
तुजसवे उमलती सरी नाती
कळले आता मनास ओढ तुझी का अशी ?


---**----

.... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
अवघड वळणावरचा वेडा बहाणा
तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला
तुजवर रचलेल्या कवितांमधून
जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?

---**-----
तेव्हा आले सगळे बघायला !!


होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,


नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,


आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,


जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,


जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,

आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?
---**----


आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वात पाहत असेल ,,,
माझ्याकडे पावसाचा पहिला थेंब पडला आहे
तुझ्याकडे पण पडला असेल
आठवला मला तो आपल्या भेटीचा पहिला क्षण
कदाचित तुला पण आठवला असेल ,,,,,,,,,

रप रप ना-या आवाजात
तो तुला काही तरी विचारित असेल
आकाशात ढग दाटलेत
तसेच मनात आठावानिचे काहुर माजले असेल ,,,,,,,,,,,

तुझा मनात त्याला
खुप काही सांगायचे असेल
परन्तु तोपर्यंत तो कसा थांबेल
कारण ,,,,,,,,,
आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वात पाहत असेल ,,,,,,,,

Tuesday, July 20, 2010

जीवन
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !

सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हालता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !

चिमणाबाई हिरमुसली गाल फुगवुनी का बसली ?
सान बाहुली ही इवली लटकी लटकी का रुसली ?
रुसली रुसली, खुदकन हसली, पापे किति घ्यावे !
जीवनगाणे गातच रहावे !

मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या प्रीतीला, या मातीला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे !

गीत - शांता शेळके
संगीत - राम-लक्ष्मण
स्वर - उषा मंगेशकर, महेंद्र कपूर
चित्रपट - आपली माणसं (१९७९)
__._,_.___

..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
अवघड वळणावरचा वेडा बहाणा
तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला
तुजवर रचलेल्या कवितांमधून
जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?
---**-----
आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वाट  पाहत असेल ,,,
माझ्याकडे पावसाचा पहिला थेंब पडला आहे
तुझ्याकडे पण पडला असेल
आठवला मला तो आपल्या भेटीचा पहिला क्षण
कदाचित तुला पण आठवला असेल ,,,,,,,,,
रप रप ना-या आवाजात
तो तुला काही तरी विचारित असेल
आकाशात ढग दाटलेत
तसेच मनात आठावानिचे काहुर माजले असेल ,,,,,,,,,,,
तुझा मनात त्याला
खुप काही सांगायचे असेल
परन्तु तोपर्यंत तो कसा थांबेल
कारण ,,,,,,,,,
आपल्यासारखीच पुढे त्याची कोणीतरी वाट  पाहत असेल ,,,,,

-----**----

Monday, July 19, 2010




आठवण 
"तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा देउन जाते..

तुझ्या पैजणांची रुणझुण
कानांमध्ये दाटुन येते,
मी मिटुन घेतो डोळे तेव्हा
तु मिठीत हळुवार भेटुन जाते...

स्वप्नांतले जगणे माझे
वास्तवाचे भान सुटुन जाते,
मनात तुझ्या आठवांचे
पुन्हा रान पेटुन येते....

तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते..,

हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा... देउन जाते....."
-अनामिक 

मराठी हास्यकट्टा 33

गंपूने आपली जुनी सायकल दुरुस्तीला नेली.
सायकलवाला : ही सायकल अगदी खराब अवस्थेत आहे. ती दुरुस्त करणं अशक्य आहे.
गंपू : पण, नेपोलियन म्हणतो की, जगात काहीच अशक्य नाही...
सायकलवाला : मग त्याच्याकडेच घेऊन जा दुरुस्तीला!
******************
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
आपटे : काय, बापट आज अगदी खुशीत आहेस.
बापट : अरे म्हणजे काय, असणारच. त्या गोगटेला लॉटरीचं तिकीट लागलंय.
... आपटे : काय सांगतोस? मग त्यात तू इतकं खुश होण्यासारखं काय आहे?
बापट : अरे त्याला ते लॉटरीचं तिकीटच सापडत नाहीये.

******************
घोर कलियुग -
मुलगा - बाबा माझ्या वर्गातला एक मुलगा मला gay असं चिडवतो. बाबा - मग २ सणसणीत कानाखाली दे ना त्याच्या. . . .... . . .
मुलगा - नको बाबा, तो फ़ार cute आहे!!!!!
******************
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते....
नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक . .... . . . . . . .
बायको : Aiyyaaaaaa... सासूबाई !!!!!
******************
आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी आण.
बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!!
आजोबा - माहितीये रे....... ...
समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!
******************
एकदा टाटा मोटर्स चे काही अधिकारी "नॅनो" बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी

पुण्यात सर्व्हे घेत असतात. फिरत फिरत ते सदाशिव पेठेत तात्यांच्या घरी येतात.

अधिकारी : नमस्कार ! आमच्या "नॅनो" बाबतीत आपले काय मत आहे ?
...
तात्या : मला तुमच्या ह्या "न्यानो" गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं..

अधिकारी : का बरं ?

...तात्या : तुमचे सेल्समन म्हणतात " न्या ".. आणि आम्ही म्हणतो " नो " !
******************
ती : अहो, परवा 'राशीरंजन'मध्ये शरद उपाध्यांनी सांगितलं म्हणे
की स्वर्गात पतीपत्नींना एकत्र प्रवेश देत नाहीत म्हणून!
तो : उगाच का त्याला स्वर्ग म्हणतात?!!!
******************
चिंगू शाळेत दररोज उशीरा यायचा. एक दिवस वर्गातल्या बाई त्याच्यावर भयंकर चिडल्या.
बाई : चिंगू.. तू दररोज वर्गात उशीरा येतोस. त्यामुळे मला वर्गही उशीरा सुरु करावा लागतो.
चिंगू : बाई एक विनंती करायची होती.
बाई : काय?चिंगू : प्लीज, तुम्ही तुमच्या वेळेत वर्ग सुरू करा. उगाच माझी वाट बघू नका.
******************
गुणगुणे सर : काय रे, वाजले किती? आणि तू वर्गात उगवलायस किती वाजता?लेक्चर सुरू होऊन पंचवीस मिनिटं होऊन गेली. हे चालणार नाही.बंड्या : पण सर...गुणगुणे सर : (रागाने) पण काय... स्वत:ला बादशहा समजोस की काय तू?बंड्या : तसं नाही सर. मी वेळेवर निघालो होतो. पण बाईकच स्टार्ट होईना.गुणगुणे सर : अरे मूर्खा...मग सरळ बसने यायचं ना.बंड्या : हो सर...मी बसनेच येणार होतो. पण तुमची लाडकी लेक ऐकेचना.

******************
बंद असलेल्या घरात !"घरात चोरण्यासारखे काही नाहीये,त्यामुळे चोरट्यांनी आपला वेळ वाया घालवु नये.बंद घरात भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे,चावले तर जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील.
******************
बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?

राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना.
त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.
म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.
******************
टिचर : पिंट्या, सांग पाहू, तुझा जन्म कुठे झाला?

पिंट्या : थिरुअनंतपुरम, टिचर
टिचर : शाब्बास मग आता थिरुअनंतपुरमचं स्पेलिंग सांग पाहू
पिंट्या : अं...अं...!! मला वाटतं टिचर, माझा जन्म बहुधा गोव्याला झाला असावा.
******************
टिचर : पिंट्या, सांग पाहू, तुझा जन्म कुठे झाला?

पिंट्या : थिरुअनंतपुरम, टिचर
टिचर : शाब्बास मग आता थिरुअनंतपुरमचं स्पेलिंग सांग पाहू
पिंट्या : अं...अं...!! मला वाटतं टिचर, माझा जन्म बहुधा गोव्याला झाला असावा.
******************
पीजे रिर्टन्स

गंपू: बाबा, तुमचं लग्न झालंय का?

बाबा: हो.
... गंपू: कोणाशी?
बाबा: अरे वेड्या, कोणाशी म्हणजे काय? तुझ्या आईशी!
गंपू: बरं आहे तुमचं, तुम्ही घरातच सेटिंग लावलीत!!

******************
पत्नी : काल रात्री झोपेत तू मला खूप शिव्या देत होतास.
पती : तुझा काही तरी गैरसमज होतोय..

पत्नी : कसला गैरसमज? मी माझ्या कानांनी ऐकलंय..
पती : पण मी झोपेत नव्हतोच!
******************
९९ वर्षांचे आजोबा स्वर्गात पोहोचले,

स्वर्गलोकीचा थाटमाट आणि अप्सरा बघून खुश झाले.

मग थोडे हळहळले,
'अर्रर्र... त्या रामदेव बाबाच्या नादाला लागलो नसतो, तर ३० वर्षे आधीच इथे आलो असतो...'
******************
गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु...."70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय त नाय!!!"
******************
मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्‍या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!
******************
एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात
तर एक मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल?उत्तर: काय मग काय चाल्लय?
******************
अतीभयानक पीजे रिर्टन्स

पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?...............
मिथुन 'चक्रवरती'आणिपाल 'भिंतीवरती'

******************

Monday, July 12, 2010

Sunday, July 11, 2010

उखाणे-1

उखाणे


अंधाऱ्या रात्री चांदणी फ़क़्त चंद्राची
रात्रीच काय .... दिवसा सुद्धा मी फ़क़्त तुझी




भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर
रावांच्या मिठित विसरते मी माहेर


श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी


चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा ,
--- रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा.


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट


हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
....... चे नाव घेते सत्यनारायणापुढे


रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य ----- च्या सहीत


संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ------- ची जोडी
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला


कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित


वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.




साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला




सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
..... चे नाव घेऊन घेते मी रजा.


नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
.....नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी


श्रावण जलधारांनी शांत होते धरती,
..... च्या पुढे कर माझ्हे जुऴती


वारुळाला जाऊन मी नागाची पुजा करते,
..... चे नाव घेऊन सौभाग्याचे आशिर्वाद मागते


भाजीत भाजी मेथीची,
.....माझ्या प्रितीची.


नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात


रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
..... चे नाव घेते असु द्या लक्षात.


श्रावणात बरसतात धुंद जलधारा,
.....च्या नावात फुलावा माझा सौभाग्याचा फुलोरा.


हिरवा श्रावण बहरलाय दरवळली माती,
..... च्या जीवनात सदैव मिळो शांती.


अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या
एकरुपतेने बनत असतो संसार,
..... चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.


धरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते,
..... च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते


भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,
..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.


आज आहे श्रावणी पोळा,
..... च्या जीवावर शृंगार केले सोळा.


अश्वीन प्रतिपदेला देवीचे बसता घट,
..... नी आमलाय माझ्याकरिता सोंगट्यांचा पट.


श्रावण महिन्यात वाजतगाजत येतात गौरी गणपती,
....चे नाव घेते ते आहेत माझे प्रेमऴपती.

Saturday, July 10, 2010

थोडासा थांब बघतर मागे वळून
कुठेपर्यंत आले आहे मी
तुझ्या सोबत तुझ्या नकळत
थोडासा थांब बघतर जरा
हे डोळे फक्त तुझीच वाट बघत आहे रात्रदिवस
थकलेत् रे ते
त्याना एकदा अलगद तुझ्या ओठानी पुसून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा
तुझ्या नसन्याने तुझ्या असण्याचे महत्व कळला आहे मला
तुझ असण पुन्हा एकदा देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा
तुझ काम, तुझ घर, तुझे मित्र, तुझ विश्व
सगळ सगळ मान्य मला
पण इथे कुणीतरी तुझ्यासाठी एक जग उभ केलय
ते बघून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा
हा चंद्र सुद्धा हसतो मला
म्हणतो, ज्याला तू आमच्यात शोधत असत्तेस रात्र रात्र
तोही तुझ्यासाठी झुरततोय का असाच
त्या चंद्राला उत्तर देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा
आठवण तुलाही येते माझी
पापणी तुझी ही ओलवते अश्रूनी
त्या अश्रूना माझ्या ओंज़ळीत देवून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा
तुझ हसण तुझ बोलण
तुझा राग तुझ गप्प राहण
घेऊन गेलास तुझ्याबरोबर तू सर्व
ज़गण्यासाठी तेवढेच आहे रे माझ्याकडे
माझ जगण देऊन तर ज़ा जरा...
थोडासा थांब बघतर जरा
माझ्या ज़वळ थोडा बसतर जरा
माझा सहवास, माझा श्वास, माझी सोबत
अनुभव तर जरा
थोडासा थांब बघतर जरा
प्रेमात म्हणे न सांगता न बोलता
सर्व काही कळत
मग न सांगता न बोलता
मला समजून तर घे जरा
थोडासा थांब बघतर जरा
तुझ्यात स्वत:लाच हरवून
बसले मी कुठेतरी
जरा येऊन मला माझेपन
शोधून तर दे जरा
थोडासा थांब बघतर जरा
माझ्या दिवसात, माझ्या रात्रीत
माझ्या प्रत्येक क्षणात तू आहेस
व्यापून टाकल आहेस तू मला
माझा एक एक क्षण
मला परत देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा
एकदा, फक्त एकदाच माझ्या मनात डोकवून तर जा
स्वता:लाच बघितल्यावर कस वाटत
ते सांगून तर जा जरा...
थोडासा थांब बघतर जरा
अळुवा वरच्या थेंबासारखा आहे रे हे आयुष्य... क्षणभंगुर
कुणी ते पाण हलवण्या आधी आणि तो इवलसा थेंब कुठेतरी लुप्त होण्याआधी एकदा
प्रेम करुन तर जा जरा...
थोडासा थांब बघतर जरा
शेवटचा थोडासा थांब
कसलीही अपेक्षा नाही... की कासलही बंध नकोत
प्रेम केल आहे तुझ्यावर... त्यात कसले व्यवहार नकोत
भावनाच फक्त कळतात रे मला
त्याचा पलिकडचे काहीही नको
एकदा त्या भावनाना स्पर्शून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा
ह्या वेडीला थोडस शहाणपण शिकवून तर जा जरा.
थोडासा थांब बघतर जरा