Friday, February 26, 2016

Sunday, February 14, 2016

दोन हे आहेत पेले

दोन हे आहेत पेले आपुले नाही जणू
कोणता आहे तुझा अन कोणता माझा म्हणू

दोन धारा एक झाल्या या प्रवाही तू नि मी
पूर येतो वाढणारा आपुली नाही तनू

दोन हे आहेत पेले एक माझा संपला
झाकुनी अर्धाच पेला टेकिली का वर हनु

नीट न समजणारे कडवे:
दे तुझा झोकून दे तो आणि माझा घे तुला
होत जागी रानगीते हृदय लागे गुणगुणू
~ आरती प्रभू
=============

Meaning in English : Shared by Shailesh Vaite
( https://www.facebook.com/shailesh.vaite )
I believe the poem is about two people in an intimate relationship where the sense of separateness has started fading. But one partner is still not ready to surrender totally to this merger and the other partner is urging him/her to just jump into this blissful togetherness. Thus the poem goes-

We have our own separate bodies (and lives), but perhaps they are not our own anymore (दोन हे आहेत पेले आपुले नाही जणू), because at present we are so entangled in each other, it is so confusing as to where your existence begins and where mine ends (कोणता आहे तुझा अन कोणता माझा म्हणू)

These two streams of separate existence have merged with each other (दोन धारा एक झाल्या या प्रवाही तू नि मी), this merger has enriched both of us and the sense of separate bodily existence has ceased to exist now (पूर येतो वाढणारा आपुली नाही तनू)

We have these two separate bodies but I have given up on mine totally (दोन हे आहेत पेले एक माझा संपला), but you still have not been able to jump into this stream of joint existence and still trying to look at this relationship with objectivity of an outsider, (झाकुनी अर्धाच पेला टेकिली का वर हनु) (I love this reference to resting of chin, it just so beautifully talks about looking at a situation objectively)

I urge you to just throw in your existence into this relationship and merge into mine (दे तुझा झोकून दे तो आणि माझा घे तुला) and enjoy the bliss and the ecstasy of togetherness (होत जागी रानगीते हृदय लागे गुणगुणू)

Song @ https://www.youtube.com/watch?v=NNofkLly06k
song @ https://www.youtube.com/watch?v=drEJr3WlSSU

Thursday, February 11, 2016

Monday, February 8, 2016

चारचौघी : या जगण्यावर…

चारचौघी : या जगण्यावर…
डॉ. नीलम ताटके
‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं आपल्याला मंगेश पाडगावकर यांनी सांगितलंय. जगणं कसं असावं याची जाणीव करून दिलीय. परंतु जगण्यावर प्रेम करायचं म्हणजे काय, एखादी व्यक्ती, वास्तू, वस्तू जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं त्याचं अस्तित्व जाणवतं त्या सगळ्यावर आपण प्रेम करू शकतो. मग जगण्यावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय? हे मला श्रीमती शांताबाई शेळके यांचं ‘धूळपाटी’ वाचल्यावर कळलं.
आपल्या आसपासचा निसर्ग, माणसं, घर या सगळ्याविषयी असलेली आस्था, तन्मयता. माणसांविषयी बारीक-सारीक निरीक्षणं, स्वत:ने केलेल्या प्रत्येक लिखाणावर, आयुष्यात आलेले अनुभव यांच्याकडे सकारात्मतेने पाहणे, भाषांतरं, परीक्षण, स्तंभलेखन अगदी परीक्षांची गाईड लिहिणे, या प्रत्येकातून आपण शिकलो असे त्या म्हणतात. पोटासाठी कराव्या लागलेल्या इंग्रजी सिनेमाविषयीचे लिखाण असो, व्याख्यानं देण्याची सवय नसताना, गरज म्हणून ते केलं तेही अगदी उत्कृष्टपणे. बेकारीचा काळ हा संकट नाही तर तो आत्मभान देणारा काळ असतो असं त्यांना जाणवतं.
आयुष्यात अनेक माणसं भेटली. त्यांनी आपल्याला मदत केली. आपल्या लेखनात त्यांचा वाटा श्रीमती शांताबाई मानतात. अनंत अंतरकर, आचार्य अत्रे यांचा आवर्जून उल्लेख करतात.
काही व्यक्ती ज्या त्यांच्या नात्यातल्या होत्या, आसपास वावरणार्‍या होत्या त्यांचा शांताबाईंच्या मनावर ठसा उमटला. त्यात त्यांचे आई, वडील, आजोबा, आबई यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांच्या आजोबांनी म्हणजे वडिलांच्या वडिलांनी स्वत:च्या मुलांना व मुलींना त्या काळात आवर्जून शिक्षण घ्यायला लावले. मुलींना नोकर्‍या लावून स्वावलंबी केले याचा त्यांना अभिमान आहे. त्यांच्या आईला असलेली वाचनाची अतिआवड शांताबाईमधे आली आणि तीच पुढे त्यांची करीयर झाली. या वाचनाने त्यांना घडवलं.
जीवन जसं समोर येईल तसं जगावं असा त्यांचा विश्‍वास असल्याने पुढे आयुष्यात अमुक तमुक करायचं हे ठरवणं त्यांना मान्य नव्हतं, फक्त प्राध्यापक व्हायचा निर्णय हा त्याला अपवाद होता. आयुष्य जसं आलं तसं त्यांनी ते स्वीकारलं.
या शांताबाईंच्या आठवणी तर आहेतच, पण याला सामाजिक संदर्भ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यात त्यांनी सत्तर-बहात्तर वर्षांपूर्वीची समाजरचना, जाती संस्था, कुटुंबात शिक्षित व्यक्ती असल्यावर कुटुंबातील वातावरण कसे असते ते त्यांनी मांडले आहे.
नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेल्या आणि त्यांना मुंबईही आवडली. दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना वेगवेगळ्या भाषा बोलणारी, शिक्षणाची खरी गरज असलेली मुले, विद्यार्थी भेटले. या सगळ्या वातावरणात त्या समरसून गेल्या.
या समरसतेतूनच त्यांनी सुंदर कविता लिहिल्या, गीतं लिहिली, जी आजही आपल्याला खूप आनंद देऊन जातात, आपला मूडच बदलून टाकतात.
‘धूळपाटी’ हा एक रसरशीत जीवनानुभव आहे. ज्या गोष्टी अत्यंत खासगी आहेत किंवा वाचकांना त्या कळून किंवा नकळून काहीच फरक पडणार नव्हता त्या त्यांनी सांगायच्या टाळल्या आहेत. प्रत्येक अनुभवात रमणे व करायची असलेली प्रत्येक गोष्ट आत्मीयतेने करणे हेच कदाचित जगण्यावर प्रेम असावं.
http://www.saamana.com/utsav/charchaughi-ya-jagnyavar

Saturday, February 6, 2016

कधि कुठे न भेटणार

कधि कुठे न भेटणार
कधि न काहि बोलणार
कधि कधि न अक्षरात
मन माझे ओवणार

निखळे कधि अश्रू एक
ज्यात तुझे बिंब दिसे
निखळे निःश्वास एक
ज्यात तुझी याद असे

पण तिथेच ते तिथेच
मिटुनि ओठ संपणार
व्रत कठोर हे असेच
हे असेच चालणार
~  इंदिरा संत

मी तुझाच मध्ये उमा गोखले यांनी
गायलेली इंदिरा संत यांची कविता ..

Uma Gokhale sings kadhi kuthe n bhetnar: http://youtu.be/N2Rrbwnw6vg

Friday, February 5, 2016

सोबती सख्या रे तू असा



सोबती सख्या रे तू असा
विहरतो नभी पक्षी जसा...

तू दिशा तू माझे पंख तू ..
प्रीत तू सुखाचा आरसा ..

गुंतली तुझ्या नादात मी ..
धुंद दे जरी तू राजसा रे

ऊन पावसाळी
तू सावळा कवडसा

बावरी अशी मी
तू पाहुणा ऋतूचा

बदलता रंग तू
मनी स्वछंद तू
सख्या रेशमी सुराचा गंध रे तू...

- गजर चित्रपट गीत