Saturday, April 29, 2017

मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा
_________________________________

गीतकार :सुधीर मोघे
गायक :श्रीधर फडके
संगीतकार :श्रीधर फडके

Friday, April 28, 2017

जगण्या मध्ये ब्रह्मानंद

जगण्या मध्ये ब्रह्मानंद

बरगड्यांच्या तुरुंगातून मी हृदयाला मुक्त केले 
जिथे जिथे धमनी आहे तिथे माझे रक्त गेले 
दिक्कालाच्या जबड्या मधील 
लवलवणारी जीभ मी 
आसक्ती च्या गर्भामधील 
धगधगणारे बीज मी 
माझ्या हातात महा यंत्र 
माझ्या मुखात महा मंत्र 
सगळे मिळून सगळ्या साठी 
मरण्यातही मौज आहे 
सगळे मिळून सगळ्या साठी 
जगण्या मध्ये ब्रह्मानंद 

विं दा करंदीकर

Sunday, April 23, 2017

Urdu ghazals Veer Savarkar wrote in Andaman found




MUMBAI: 
A Dadar-based institute has discovered two ghazals in Urdu written by freedom fighter Veer Savarkar during his 11-year imprisonment in the Andaman Cellular Jail.

The ghazals, patriotic in character, are part of a notebook kept by Savarkar in prison, and there is much surprise that Savarkar has written in fluent Urdu, a language considered unlikely for the champion of political Hindutva. A ghazal is a sublime form of Urdu poetry.

The notebook was found in the collection of books handed down by the late S P Gokhale, an associate of Savarkar, to his daughter Manjiri Marathe, a trustee of the Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak, who made the discovery.

The notebook is currently on display at the Smarak opposite Shivaji Park maidan.

Savarkar's grandson and chairman of the Smarak Ranjit Savarkar said, "Nobody knew of Savarkar's proficiency in Urdu till this manuscript was found." The two ghazals, running into five pages, portray Savarkar's hope for the freedom of his motherland, a hope he fervently nursed even while incarcerated in the Andamans, better known as Kaala Pani, from 1910 to 1921.



Notebook also contains a Hindi poem



The notebook containing Savarkar's Urdu ghazals also has a Hindi poem written by him, which runs into three pages, Savarkar's grandson said.

He added that except for certain Persian words, the ghazals can be understood by anybody, and the facing pages have their lyrics in Devanagri script.

Noted Urdu poet Nida Fazli, who saw the ghazals, reportedly commented, "Looking at their content and quality, it is clear that you cannot discriminate between languages on the basis of religion. Savarkar learnt and studied Urdu while serving a life imprisonment term in the Andamans. He was a great patriot, which is evident from his poetic creations."

Ranjit Savarkar said the notebook is a hand-made one, its cover fashioned by sticking jail records together. "During the last few months of his stay in the Andamans, Savarkar was made foreman of the oil godown in jail. There, for the first time, he had access to ink and paper. His earlier poems were written on the walls using nails and were memorised by him and then sent via prisoners returning to India. The prisoners too had to memorise the poems to carry them all the way to India."

http://timesofindia.indiatimes.com/india/Urdu-ghazals-Veer-Savarkar-wrote-in-Andaman-found/articleshow/21410362.cms

२९ स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन

२९ स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन



Tuesday, April 11, 2017

माधुरी पुरंदरेंचा सांगावा आणि ‘अशी ही बनवाबनवी’!

माधुरी पुरंदरेंचा सांगावा आणि ‘अशी ही बनवाबनवी’! 

संपादकीय - संपादकीय  संपादक अक्षरनामा

प्रसारमाध्यमांपासून कटाक्षाने दूर राहणाऱ्या, पुरस्कार-सत्कार सोहळे यांच्यापासून अलिप्त असलेल्या आणि कुठल्याही साहित्यिक गटातटात न वावरणाऱ्या प्रसिद्ध बालसाहित्यिका म्हणजे माधुरी पुरंदरे. याचे एक कारण बहुधा हे असावे की, त्या केवळ बालसाहित्यिका नाहीत. चित्रकार, गायक, अभिनेत्या, चरित्रकार, अनुवादक, सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांना कुठल्याही एका साच्यात बसवता येत नाही. त्यांनीही सुरुवातीपासूनच हे साचे आपल्यापुरते मोडून काढण्याचा प्रयत्न केला. जे काही करायचे ते मनापासून करायचे, त्यात तनमनधन झोकून द्यायचे, हा त्यांचा बाणा असल्याने त्यांचे साहित्य, संगीत, अभिनय, चरित्रलेखन अशा प्रत्येक क्षेत्रातले काम वाखाणण्याजोगे आहे. आपल्या ‘टर्म्स अँड कंडिशन्स’वर जगणारी माधुरीताईंसारखी माणसे आपल्या समाजात असणे, हे आजच्या अराजकसदृश काळात मोठा दिलासा ठरतो. साहित्यापासून अभिनयापर्यंत प्रसिद्धीच्या क्षेत्रात राहूनही त्या कधी प्रसारमाध्यमांना फारसे आपल्या जवळ फिरकू देत नाहीत. आपले काम आपल्या मस्तीत करणे, हा पं. सत्यदेव दुबे स्टाइल बाणा त्यांच्याकडेही आहे.
वयाच्या साठीनंतर मात्र माधुरीताई थोड्याशा ‘सामाजिक’ होऊ लागल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनात ज्योत्स्ना प्रकाशनाने केवळ माधुरीताईंच्या साहित्याचे स्वतंत्र ग्रंथदालन करण्याची कल्पना त्यांच्यापुढे मांडली, तेव्हा त्याला त्या होकार देतील की नाही हा सर्वांत कळीचा मुद्दा होता. पण माधुरीताईंनी त्याला होकार दिला एवढेच नव्हे तर एक दिवस त्या ग्रंथदालनात रसिकवाचकांच्या भेटीसाठीही थांबल्या. त्याआधी त्यांनी टाटा लिट फेस्टच्या वतीने दिला जाणारा बालसाहित्यासाठीचा पुरस्कार मुंबईमध्ये येऊन स्वीकारला होता. आणि परवा मुंबईच्याच भाऊ दाजी लाड संग्रहालयात त्यांनी आपला शब्द-चित्र प्रवास उलगडून सांगताना मराठी भाषेविषयी काही मौलिक निरीक्षणे परखडपणे मांडली. ‘बनवणे’ या क्रियापदाने मराठीमध्ये सध्या जो काही धुमाकूळ घातला आहे, त्याविषयी त्यांनी तीव्र खंत व्यक्त करत भाषाशिक्षण, बालसाहित्य याविषयीही तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्यांची खंत अतिशय रास्त आहे. त्यांनी उदाहरणे देत मराठी भाषेच्या सौष्ठवाचा ऱ्हास आणि अध:पात याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावाने शंखनाद करणाऱ्या आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत कसा नाही, यासाठी ओचेकोचे सरसावून चर्चा करणाऱ्यांच्या मनापर्यंत, काळजापर्यंत आणि संवेदनेपर्यंत ते पोहचेल का? कदाचित नाही. कारण मराठी भाषेच्या नावाने गळा काढत राहिल्याने आपल्या पोटापाण्याची सोय होत असेल तर कोण कशाला आपल्या जिवाला घोर लावून घेईल? केवळ महाराष्ट्र सरकारच मराठी भाषेविषयी उदासीन आहे अशातला प्रकार नाही. मराठी समाज, मराठी साहित्यिक, मराठीचे प्राध्यापक-शिक्षक, पत्रकार सारेच मराठी भाषेविषयी कमालीचे उदासीन आणि बेफिकीर आहेत. वरवर पाहता असे दिसते की, सरकार मराठी भाषेविषयी किती काय काय करत असते. पण मराठी विश्वकोशासारखा एक प्रकल्प पूर्ण करायला या सरकारच्या एका विभागाला ३०-४० वर्षे लागतात, यातूनच या सरकारच्या आणि विश्वकोशासाठी काम करणाऱ्यांच्या वकुबाचा अंदाज येतो. गेल्या पंचवीस वर्षांत जागतिकीकरणाने जी काही सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक आव्हाने उभी केली आहेत, त्यात मराठी भाषेसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पण त्याविषयी कुणीही गंभीर नाही. या पंचवीस वर्षांच्या काळात एकच गोष्ट झाली आहे. मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावाने गळा काढण्याची फॅशन सरकारपासून साहित्यिकांपर्यंत आणि प्रकाशकांपासून प्राध्यापकांपर्यंत सर्वत्र बोकाळली आहे. हल्ली जो तो मराठी भाषेच्या नावाने गळा काढत असतो. पण गेल्या पंचवीस वर्षांत संगणकामुळे, मोबाईलमुळे, सोशल मीडियामुळे जे नवीन शब्द तयार झाले आहेत, त्यांना समर्पक मराठी प्रतिशब्द तयार करण्याचे काम प्रसारमाध्यमे, प्राध्यापक, साहित्यिक, कोशकार यांच्यापैकी कुणी केले आहे का? फार जुने सोडून द्या, पण गेल्या पंचवीस वर्षांत मराठीमध्ये कुठले नवीन शब्द आले, रुळले याविषयी तरी कुणी तपशीलवार सांगू शकेल का? सरसकट इंग्रजी, हिंदी या भाषेतून शब्दांची जी उचलेगिरी मराठीमध्ये चालू आहे, त्यावर काही पर्याय शोधण्याचा प्रयत्न कुणी केला आहे का?

शब्दकोश, विश्वकोश, ज्ञानकोश यांची एकेकाळी मराठीमध्ये समृद्ध परंपरा होती. श्री. व्यं. केतकर यांनी तर एकट्याच्या बळावर ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’सारखे अवाढव्य काम केवळ बारा वर्षांत पूर्ण करून दाखवले. त्या तोडीचे काम पैसा, साधनसंपत्ती, मनुष्यबळ, सुविधा असूनही राज्य सरकारच्या विश्वकोशमंडळालाही करता आले नाही. हा विश्वकोश अलीकडेच पूर्ण झाला आहे. त्यावरून या मंडळाने आणि सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेतली खरी, पण हा विश्वकोश इतका आउटडेटेड आणि निरुपयोगी झाला आहे की, तो शालेय विद्यार्थ्यांच्याही कामाचा नाही, याविषयी महाराष्ट्रात कुणीही ब्र उच्चारण्याचे धाडस दाखवलेले नाही.
असाच प्रकार मराठी प्राध्यापकांच्या लेखनाचा. त्यातही समीक्षा लेखनाचा. हीच बहुतांश मंडळी मराठीमधील साहित्यिक म्हणून गणली जातात. पण यांचे लेखन वाचले तर कुणाच्याही लक्षात येईल की, यांनी मराठी भाषेला ‘फोले पाखडितो आम्ही’ या स्थितीला नेऊन ठेवले आहे. निरुपयोगी, कुचकामी, आशयहीन परिभाषेचा उपयोग करून आपण काहीतरी मौलिक सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत, या अभिनिवेषापलीकडे त्यांच्या लेखनात दुसरे काहीही फारसे सापडत नाही. यूजीसीच्या नियमामुळे शोधनिबंध, पुस्तके यावर वेतनवाढ, पदश्रेणी अवलंबून असल्याने ही मंडळी वारेमाप लेखन करतात, पण त्याचे वर्णन ‘सुमार’ या शब्दाच्या पलीकडे जाऊन करता येणे शक्य नाही. कविता, कादंबऱ्या, कथा या ललितवाङ्मयप्रकाराने तर केवळ ‘आत्ममग्न सुमारांच्या धाडसी फौजा’ तयार करण्याचेच काम चालवले आहे. पण हेच लोक मराठी भाषेच्या नावाने मोठ्या प्रमाणात गळे काढताना दिसतात. कारण त्यांनी स्वत:च्या नावाने छापलेली रद्दी इतरांनी वाचावी, यासाठी मराठी भाषेचे भवितव्य हे गळा काढण्याचे नामी अस्र आहे.
प्रसारमाध्यमांनी एकेकाळी नवनवीन शब्द घडवण्याचे काम केले. केसरी, नवाकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ अशा वर्तमानपत्रांनी कितीतरी नवीन शब्द घडवले. ‘नोकरशाही’, ‘मध्यमवर्ग’, ‘कात्रजचा घाट’ असे कितीतरी शब्द ‘केसरी’ने मराठीमध्ये रूढ केले क्रिकेटमधील ‘कॅच’, ‘एलपीडब्ल्यू’, ‘आऊट’ यांसारख्या इंग्रजी शब्दांसाठी ‘झेल’, ‘पायचित’, ‘बाद’ हे मराठी प्रतिशब्द रूढ करण्याचे श्रेयही एका मराठी वर्तमानपत्रालाच जाते. पण गेल्या पंचवीस वर्षांत मराठी वर्तमानपत्रांनी मराठी भाषा घडवण्याऐवजी ती उत्तरोत्तर बिघडवण्याचेच काम चालवले आहे. अनावश्यक भाषिक कोट्या, निरुपयोगी भाषिक खेळ, अर्थहीन शाब्दिक कसरती याच्यापलीकडे मराठी वर्तमानपत्रांची भाषिक इयत्ता जायला तयार नाही.
हाच प्रकार बालसाहित्याबद्दल आहे. माधुरीताई आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, “विंदा, पाडगावकर, बापट आदी १९६० च्या दशकातील पिढीनंतरच्या मराठी साहित्यिकांनी मुलांसाठी खास म्हणून काही लिहिले नाही. याच काळात बालसाहित्य म्हणून आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी अनेक पुस्तके येत राहिली; पण आदली पिढी बालपणीच विंदा- बापट- पाडगावकरांचा ‘कसदार’ संस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञ राहाते; तर त्याच कवितांमधले अनुभवविश्व पुढल्या पिढ्यांतल्या मुलांना परके वाटते.” अगदी योग्य निरीक्षण नोंदवले आहे त्यांनी. कारण मुलांसाठी लिहिणे हे सर्वाधिक जोखमीचे काम असते, याचे भानच नंतरच्या मुलांसाठी लेखन करणाऱ्या बहुतेकांकडे नव्हते, नाही. त्यांना मुलांसाठी लिहिणे म्हणजे शाब्दिक गमतीजमती, नीतीमत्तेचे डोस आणि प्राणीकथा असेच वाटत राहिले. थोडक्यात त्यांचा मुलांसाठी लेखन करण्यामागचा दृष्टिकोन अतिशय सामान्य राहिला. ज्यांना मोठ्यांसाठी लिहिता येत नाही अशीच बरीचशी मंडळी केवळ लेखनाच्या हौसेखातर मुलांसाठी लिहू लागली. त्यांच्याकडे ना कल्पनांचे नावीन्य दिसते, ना काही सांगण्यासारखे. असे लोक वाईटच लेखन करू शकतात.
माधुरीताईंनी मुलांसाठी लिहिलेली पुस्तके हा मराठीतल्या बालसाहित्याचा सर्वोच्च मानदंड ठरायला हवा होता. ‘वाचू आनंदे’, ‘लिहावे नेटके’, ‘चित्रवाचन’, ‘आमची शाळा’, ‘राधाचं घर’ यांसारखी पुस्तके मुलांसाठी कसे लिहावे याचा वस्तुपाठ आहेत. पण ते लक्षात कोण घेतो?
 ‘‘‘वाचू आनंदे’चा पुढला भाग काढू या असं म्हटलं तर कोणाचं लिखाण त्यात असेल, असा प्रश्नच पडतो मला’’ किंवा ‘‘आठ-नऊ वर्षांच्या पुढल्या वयातल्या मुलांसाठी मराठीत काही लिहिलं जात नाही’’ ही माधुरीताईंची वाक्ये अतिशय जळजळीत आहेत. पण बहुधा त्याकडे मराठी सारस्वतनामक जमात अहंता, आत्मप्रौढी एवढ्याच दृष्टिकोनातून पाहण्यापलीकडे काही करणार नाही. या मंडळींना हा प्रश्नही पडणार नाही की, माधुरीताई आत्मसमर्थन वा आत्मप्रौढी या शब्दांच्या वाऱ्यालाही कधी उभ्या राहिलेल्या नाहीत.

‘आपण केवळ मराठी भाषेचा अभिमान बाळगतो, कारण अभिमान बाळगण्यासाठी काही करावं लागत नाही’ हे माधुरीताईंचे शब्दही अनेकांना कळणार नाहीत. त्यावर ही मंडळी असा प्रतिवाद करतील की, ‘म्हणजे काय? आम्ही मराठी बोलतो, मराठी लिहितो, मराठीमध्येच विचार करतो आणि मराठीमध्येच जगतो. आणखी काय करायला हवं आम्ही?’ कुठलीही भाषा केवळ एवढे केल्याने जगत, तगत नसते, हे उमगायला भाषाशास्र नीट समजून घ्यायला लागेल. दोन डॉक्टर किंवा दोन वकिल किंवा दोन शास्त्रज्ञ आपल्या कामाविषयी पूर्णपणे मराठीमध्ये संवाद करू शकतात का? एकही इंग्रजी शब्द न वापरता ते बोलू शकतात का? मग कुठल्या तोंडाने मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी आम्ही कांगावा करावा? दोन डॉक्टर किंवा दोन वकिल किंवा दोन शास्त्रज्ञ यांना अस्सखलित मराठीमध्ये बोलता यावे, यासाठी या क्षेत्रातील परिभाषा मराठीमध्ये रूढ व्हायला हवी. त्यासाठी मराठी प्रतिशब्द तयार केले जायला हवेत. पण ते कोण करणार?
वेगवेगळ्या शब्दांचे कोश त्या भाषेत नव-नव्या शब्दांची भर घालण्याचे काम करत असतात. त्यामुळे शब्दकोशांची संख्या जास्त असायला हवी. भाषा समृद्ध करण्यासाठी ते आवश्यक असतात. पण चांगले शब्दकोशच नसतील तर ते होणार कसे? सध्या बाजारात उपलब्ध असलेला कुठला ‘इंग्रजी-मराठी शब्दकोश’ उत्तम म्हणावा असा आहे, या प्रश्नांचे उत्तम फारसे समाधानकारक नाही. कारण या कोशांच्या नव्या सुधारित आवृत्त्या, पुरवण्या ज्या सातत्याने प्रकाशित व्हायला हव्यात, त्यांच्या अद्ययावतीकरणाचे जे प्रयत्न व्हायला हवेत, तेच होताना दिसत नाहीत. त्यामुळे सोवनी, नवनीत आणि ऑक्सफर्ड मराठी हेच तीन कोश वापरावे लागतात. पण हे तीनही कोश फारच अपुरे आहेत, मात्र त्यांच्याशिवाय पर्यायही नाही! अशीच इंग्रजी-मराठी आणि मराठी-मराठी या शब्दकोशांचीही अवस्था आहे. मराठी-मराठी शब्दकोशामध्ये प्र. न. जोशी यांचा ‘आदर्श मराठी शब्दकोश’ हाच काय, तो त्यातल्या त्यात चांगला म्हणावा असा कोश. पण तोही बहुतेकांना माहीत नसतो.
शब्दकोश, वाक्यसंप्रदाय कोश, संज्ञा-संकल्पना कोश अशा चढत्या क्रमांच्या कोशांची सतत निर्मिती होणे आणि त्यांच्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित होणे, हा भाषेच्या समृद्धीचा आणि वाढीचा उत्तम पर्याय असतो. पण तेही होताना दिसत नाही. मग भाषिक वृद्धी व समृद्धी होणार तरी कशी?
भाषा ही सतत प्रवाही असते. त्या प्रवाहाला तुम्ही कसे वळण देता, यावर तिची वृद्धी आणि समृद्धी होत जाते. नुसत्या साहित्याने भाषेची वाढ आणि समृद्धी होत नाही. दर्जेदार साहित्य फक्त भाषेला स्थिरत्व देते, असे ‘मराठी भाषा - उद्गम आणि विकास’कर्ते कृ. पां. कुलकर्णी यांनी म्हटले आहे ते खरेच आहे.
भाषा समृद्ध होण्यासाठी आणि तिचा प्रवाह सतत सशक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. काळाच्या गतीनुसार भाषा बदलत असते आणि समाजही. त्यामुळे त्या गतीने भाषेमध्ये नव्या नव्या शब्दांची-संज्ञा-संकल्पनांची निर्मिती होणे गरजेचे असते.
इंग्रज अधिकारी भारतीय कनिष्ठ अधिकाऱ्यांना ‘You damned rat!’ आणि ‘You damned beast!’ अशा शिव्या देत असत. त्यावरून मराठीत ‘डांबरट’ आणि ‘डँबीस’ हे शब्द आले असल्याचे भाषावैज्ञानिक डॉ. अशोक केळकर यांनी म्हटले आहे. ‘कँडल’वरून ‘कंदिल’, ‘रँक’वरून ‘रांग’, ‘फ्लॉवर’वरून ‘फुलवर’, ‘रॉक आईल’वरून ‘रॉकेल’ असे मराठी प्रतिशब्द रूढ झाले.
गेल्या पंचवीस वर्षांत असे किती शब्द मराठीमध्ये रूढ झाले आहेत? याचा कुणी अभ्यास केला आहे? त्याविषयी कुणाला काही माहीत आहे? असे शब्द तयार करण्याचे काम मराठी पत्रकार, साहित्यिक, प्राध्यापक यांच्यापैकी कुणी किती प्रमाणात केले आहे? ज्यांनी केले आहे त्यांना कुणी पाठबळ दिले आहे?
आम्ही फक्त मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावाने गळा काढणार आणि भाषिक प्रेमाच्या नावाखाली इतरांना ‘बनवत’ राहणार! इंग्रजी माध्यमाच्या शाळा, टीव्ही यांच्यावर खापर फोडत राहणार! या पलीकडे आपण दुसरे काहीच करू शकत नाही. त्यामुळेच तर हिंदीतील ‘बनाना’ हा शब्द मराठीमध्ये अवतरून मराठीमधील त्याच्यापेक्षा उत्तम, सरस आणि अनेक सूक्ष्म अर्थछटा असणारी कितीतरी क्रियापदे सहजपणे फस्त करून टाकतो! ही इतकी साधी गोष्टही माधुरीताईंनी सांगितल्यावर तरी आमच्या लक्षात येईल की नाही, हाही प्रश्नच आहे.
editor@aksharnama.com

Saturday, April 8, 2017

ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

औदुंबर - बालकवी
ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

Friday, April 7, 2017

सल्लागार

सल्लागार.... जीवनात बहार
************
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....
हे फार महत्वाचे आहे....
पराक्रमी तर दुर्योधन पण होता
मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता
आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....
************
इतके जरी लक्षात घेतले तरी जीवनातील निम्मे प्रश्न आपोआप सुटतील.
मात्र यासाठी स्वतः जागरूक राहणेही गरजेचे. आपल्याला छान वाटेल असे काहीतरी बोलतोय म्हणून ती व्यक्ती सल्लागार होऊ शकत नाही. तटस्थ पणे त्या व्यक्तीने वागणे आवश्यक !!
***
सुदैवाने मला त्या त्या काळात असेच अनेक श्रीकृष्ण लाभले म्हणूनच तर खेड्यातून पुण्यात आलेला हा "धनंजय" काहीतरी करू शकला !!
**
#DD

साकेत प्रकाशन



ग्रंथास्वाद

साकेत प्रकाशनच्या बाबा भांड यांनी त्यांच्या योगी या पुस्तकाचे ग्रंथास्वाद मधे केलेले अवलोकन. एका जन्मजात योग्याची कहाणी.





कवितेच्या कॅनव्हासवर मराठी गजल

"कवितेच्या कॅनव्हासवर मराठी गजल"

२७ फेब्रुवारी २०१७ रोजी मराठी राज भाषा दिनाचे औचित्य साधून
 प्रकाशित झालेल्या "साहित्य संवेदन" या विशेषांकातील
 "कवितेच्या कॅनव्हासवर मराठी गजल" हा लेख ...
- जनार्दन केशव










पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा....
पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचा....
पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे....
आईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील पोरांचे....
मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरती....
पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्र चिंब भिजलेला.....
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला....
पाऊस पडून गेल्यावर, मन भिरभीरता पारवा....
पाऊस पडून गेल्यावर, मन गारठता गारवा ....
- सौमित्र

Thursday, April 6, 2017

कुठल्याही पानावर लिहावं

कुठल्याही पानावर लिहावं
अशी वही मला दिलीस
आतून दार उघडेल 
अशीच खोली मला दिलीस...!!
माझ्या काचेच्या तावदानातून
दिसणाऱ्या सूर्याला
सूर्य म्हणू दिलंस
आणि माझ्या
अडगळीच्या खोलीत
चुकूनही नाही डोकावलंस....
हं आता माझ्यासारख
कागदाच्या होडीत बसून
तरंगता येत नाही तुला....
पण त्या होडीवर
छत्री धरुन
पावसातून धावतोस
हेही कळतेच ना मला !!!
- संजीवनी बोकील

महिला व पुरुषांमधील मैत्री बद्दल

महिला व पुरुषांमधील "मैत्री"बद्दल
आपण कधी विचार करायला शिकणार ?
**********
अनामिक
**********
काल एका मित्राला फोन केला होता. गप्पांमध्ये मैत्री, नातेसंबंध असं काहीकाही बोलत असताना तो अगदी सहज म्हणाला, “मला ना मित्र म्हणजे काऊन्सलर वाटतात.  बघ ना, आपण त्यांना काय काय सांगतो आणि ते काय काय ऐकून घेतात. आपल्याला जे म्हणायचं आहे ते तसंच्या तसं पोहचत नसेल ही. कदाचित त्यांच्या आकलन अंदाजानुसार ते त्या गोष्टी ऐकत राहतात. आपली काही अडचण असेल तर प्रत्येकवेळी ते उत्तर शोधायला मदत करतात असंही नव्हे. पण नुसतं आपलं ऐकून घेतल्यानंतरही आपण किती मोकळे होतो. भाव-भावनांचा निचरा झाल्यासारखं वाटतं. ‘व्हॉट अ रिलीफ’  ही टर्म आपण प्रत्यक्ष अनुभवतो. त्या अर्थी प्रत्येक मित्र-मैत्रिणी हे काऊन्सलरच असतात.
असं मनातला निचरा होऊ द्यावं असा ज्यांच्या आयुष्यात माणूस नसेल त्यांची काय घालमेल होत असेल. किती साठत असेल आणि मग ते काय करत असतील याचं, कसं डील करत असतील अशा अव्यक्ताला असा एक प्रश्‍न पडतो मला. काही वेळा मला सांगावंसं वाटतं त्यांना सांग, मला सांग. मनातल्या मनात विचार करत किती कुढशील? बोल एकदाचा आणि मोकळा हो. मैत्रीच्या या अर्थी एकाकी असणारी माणसं साहजिकच व्हलनरेबल होतात. ती शोधत राहतात आपलं असं ऐकणारं माणूस. बघ ना, आपल्याला खरोखरच मोकळं व्हावं असे किती मैतर असतात. मोजकीच असतात. त्या पलिकडच्या माणसांना खरं तर आपण परिचित, ओळखीचा म्हणायला हवं ना, पण तसं म्हणत नाही. उलट आपण किती मोघमपणे किंवा सरसकटपणे मित्र-मैत्रिण म्हणून मोकळे होतो.
काही वेळा आपल्या अगदी जवळच्या नात्यातही ही मोकळीक मिळत नाही. अगदी नवरा-बायकोच्याही. लग्नानंतरच्या काही काळात लक्षात येतं की, आपल्या आवडीनिवडी किंवा आपला साधा संवाद हा आपण आपल्या जोडीदाराशी करू शकत नाहीयोत. न बोलता येण्याची, न सांगता येण्याची ही भूक मग कशी भागवायची? नवरा बायकोत काही बिनसलेलं नाहीये पण संवादाच्या या जागा नाहीयेत मग काय करायचं? साहजिकच आपण आपल्या जोडीदारापलिकडंही अशी माणसं शोधू लागतो. ज्यांच्यासमवेत आपला संवाद होऊ शकतो. आपलं बोललेलं ऐकणारं आणि समजून घेणारं अशी कोणीतरी व्यक्ती हवी असते. विवाहित असल्यास ही जागा केवळ नवरा-बायकोतच मर्यादित असावी असं मानणं किती चूकीचं आहे. स्त्री-पुरूषांच्या नात्यांचा विचार वासनेच्या पलिकडं करता यायला हवा. मोकळ्या-ढाकळ्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या एकमेकांशी शेअरींग करणारं हे नातं तर मैत्रीच्याही पलिकडचं असेल. आपण उगीच अशा सगळ्या गोष्टींचा बाऊ करतो. ”
तो हे सर्व सांगत होता तेव्हा मला ‘डिअर जिंदगी’ चित्रपट आठवत होता. या चित्रपटात छोटे-छोटे असे अनेक घटक आहेत की जे आपल्याला आनंद देऊन जातात. याच चित्रपटात काऊन्सिलींगच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचलेली कायरा म्हणजेच आलिया भट शाहरूख खानला विचारते, “इज देअर सच थिंग अ‍ॅज अ परफेक्ट रिलेशनशिप? एक स्पेशल रिश्ता?” हा प्रश्‍न खूप मोलाचा आहे आणि यावरचं शाहरूख खानचं उत्तरही तितकंच महत्त्वाचं. तो म्हणतो, “का? असं एकच स्पेशल नातं का असावं? अलग अलग एहसासों के लिए अलग अलग स्पेशल रिश्ते क्यों नही हो सकते? एखाद्यासोबत स्पेशल म्युजिकल नातं, एखाद्यासोबत केवळ आवडीचा फक्कड चहा-कॉफी पिण्यापुरतंच नातं, एखाद्यासोबत गॉसिप करण्यासाठीच नातं. एखादं बौद्धिक नातं, ज्याच्याशी पुस्तकी गप्पा मारता येऊ शकतात. या सगळ्यांपैकी एक रोमॅण्टीकवालं नातं असतं. पण आपण या रोमॅण्टीक नात्यावर इतर सर्व नात्यांचं, अपेक्षांच ओझं टाकतो. त्याच एका नात्याकडून सर्वप्रकारची पूर्तता का बरं अपेक्षित करतो? असं करणं म्हणजे रोमॅण्टीक नात्यावर अन्याय करण्यासारखंच की.” किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपल्या वेगवेगळ्या भावना आणि वेगवेगळ्या आवडींसाठी वेगवेगळी विशेष नाती असू शकतात. जसा माझा मित्र सांगत होता की, मित्र-मैत्रिणी कान्ऊसलर असतात. म्हणजे डिअर जिंदगीतील स्पेशल नाती म्हणजे मित्राच्या व्याख्येनुसार स्पेसिफिक काऊन्सलरच की.
किती गंमतीदार आहे ना, जोडीदार निवडतानाही आपल्या सर्व भावनांसाठी एकच व्यक्ती हवी असा अनेकांचा अट्टाहास असतो, पण ते शक्य असतं का? आपण तरी आपल्या जोडीदाराच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकणारे असतो का? एकूणात काय, विवाहित जोडीदारापलिकडे अशी स्पेशल नाती असू शकतातच. त्यांना काय म्हणायचं? मैत्री? प्रेम? मैत्री-प्रेमाच्या अधेमधे? मैत्री-प्रेमाच्या पलिकडे? नाही माहित काय म्हणायचं.
मित्र जसा म्हणाला, “स्त्री-पुरूषांच्या नात्यात नेहमी वासनाच असते असं नाही गं.”
हे अगदी बरोबर आहे, आपण स्त्री-पुरूषांच्या नात्यांमध्ये अशी वासनाच शोधत असतो. त्यात त्या पलिकडं काहीतरी असेल याचा विचार करण्यात खुजेपणा दाखवतो. नाही का? मागे एकदा एका मैत्रिणीने, अशाच रितीचं एखादं बॉण्डींग शेअर करत असणार्‍या ऑफिसमधल्या दोन सहकार्‍यांवर कॉमेन्ट केली होती. “बघ, रोमिओ ज्युलिएट येताहेत.” मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. तेव्हा ती म्हणाली,  “हे मी नाही म्हणतेयं. अख्खं ऑफिस म्हणत आहे. ” स्वत: विचारांनी बर्‍यापैकी मोकळी असणार्‍या या मैत्रीणीकडून अशी कॉमेंट ऐकून कसंसच झालेलं. त्यावेळेसच्या धांदलीत तिला काही सांगता आलं नाही. पण तेव्हाही माझ्या मनात हे आलं होतं की, ‘पण तूही कोणाची अशी खास मैत्रिण असशील तर इतरांनी काय म्हणावं तुला?’ असो.  डिअर जिंदगी बघ म्हणून सल्ला द्यायला हवा तिला. नाहीतर मग तिच्या आयुष्यात माझ्या मित्रासारख्या काऊन्सलर तरी यायला हवा. जेणेकरून वेगवेगळ्या नात्यांना, वेगवेगळ्या भावनांना वेगवेगळे अर्थ असतात याचा उलगडा तरी होईल...!! 
*****

गीत रामायण

गीतरामायणातील सर्वात आवडणारे
एक गीत -खास आपल्या साठी...

।।पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।।

दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा !

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात ...
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्‍नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्‍निंच्या फळांचा ?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा ?

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा

Wednesday, April 5, 2017

प्रेम हे काही सतत

प्रेम हे काही सतत बडबडण्यात आणि एकमेकांच्या पुढं पुढं
करण्यात नसतं.
प्रेम हे मनात असतं आणि वेळ आली की आपोआप ते
एखाद्या कृतीतून व्यक्त होतं.
त्यासाठी वेगळं धडपडावं लागत नाही.
त्याचं प्रदर्शन मांडावं लागत नाही.
- राजन खान

Tuesday, April 4, 2017

आपण आपला मार्ग निवडतो ?

आपण आपला मार्ग निवडतो ?
की रस्तेच आपल्याला येउन गाठतात....
कारण रस्ता चुकलेले कितीतरी जण
आपल्याला पावलो पावली भेटतात !
- चंद्रशेखर गोखले

Monday, April 3, 2017

किती पायी लागू तुझ्या

मर्ढेकरांची कविता

किती पायी लागू तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.

काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें
टिनपाट वा चोमडी.

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला!

- बा. सी. मर्ढेकर

http://kavitaapaanopaanii.blogspot.in/?m=1

ई साहित्य पुस्तके प्रकाशित

#esahity #ebooks #ईसाहित्य #मराठी #ईपुस्तक

या आठवड्यात आठ पुस्तके प्रकाशित होत आहेत

त्यात छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण हा मौल्यवान संस्कृत ग्रंथ आहे. चांगदेव महाराजांच्या समाधीपासून ते अमेरिकेपर्यंत, बाल साहित्यापासून ते ग्रामीण साहित्यापर्यंत आणि परमानंदस्वामींनी लिहिलेल्या कृष्णपरमात्मा पासून ते वीस वर्ष वयाच्या मयुरने लिहिलेल्या कादंबरी पर्यंत. एकसे एक भारी पुस्तकं आहेत. दोन उत्तम कथासंग्रहही आहेत.


१ ) बुधभूषणम् : (संस्कृत काव्य) : छत्रपती संभाजीमहाराज
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/budhabhushan__sambhajiraje.pdf

२ ) पुण्यक्षेत्र पुणतांबे चांगदेव समाधी : महेश एडके
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/changdev_mahesh_edake.pdf

३ ) बनूताई आणि बंटीबाबा (बालकविता) : मुकुंद कर्णिक
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/banutai_aani_bantibaba_mukund_karnik1.pdf

४ ) नवी पहाट (कादंबरी) मयुर देशमुख
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/navi_pahat_mayur_deshmukh.pdf

५) कृष्ण परमात्मा : श्रीस्वामीपरमानंद
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/krishna_paramatma_part_1.pdf
६ ) मला दिसलेली अमेरिका ( माहिती) : अरविंद साने
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mala_disaleli_america_arvind_sane.pdf
७ ) चांदवा नसलेली रात (कथासंग्रह) : नरेश रावताला
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/chandwa_nasalelee_rat_naresh_rawatala_2016.pdf
८ ) शावड्या (कथा) : साई चन्ने
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shavdya_sai_channe.pdf
---------------------
www.esahity.com
esahity@gmail.com
Whatsapp: 7710980841
-----------
ई साहित्यची सर्व ई पुस्तके विनामूल्य असतात
No Terms. No conditions.

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होई
पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.
एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी
साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले
तेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारख तू
म्हणाल होतास,
“आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? ”
हे सारे उद्याही तसेच असेल…….
ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील
संधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंत
न्हाउन निघेल.
आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा
कण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल
हे सारे तसेच असेल
फक्त तू नसशील………तू नसशील
मात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची
लालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.

– अनुराधा पोतदार
– सकाळ दिवाळी अंक २०००

Sunday, April 2, 2017

ताण’लेल्या गोष्टी : तोलामोलाचा पार्टनर


शिकलेली मुलगी डोईजड होईल म्हणून आधीच नकार मिळतो.

डॉ. वैशाली देशमुख | Updated: March 31, 2017 3:03 AM

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय – मुलांच्या आणि मुलींच्याही. तरी आजच्या लिबरल जमान्यातही मुलीच्या पालकांना तिच्या लग्नाची चिंता जरा जास्तच असते. लिबरल वातावरणात वाढलेल्या मुलींनाही त्यामुळे काही प्रश्न पडतात. जॉब, पगार, लुक्स, फॅमिली याच्यापुढे जातच नाही का आपण लग्न ठरवताना? आईवडिलांची चिंता रास्त की मुलींचे प्रश्न?

अनिशा लहानपणापासून ठाम विचारांची. वडिलांसारखं इंजिनीअर व्हायचं हे तिनं केव्हाच ठरवून टाकलं होतं. आईबाबांचा तिला नुसताच पाठिंबा नाही, तर प्रोत्साहन होतं. कॅम्पस इंटरव्ह्य़ूमधून लठ्ठ पगाराची नोकरी लागली, तेव्हा ती फक्त बावीस वर्षांची होती. बाबांच्या पगाराचा आकडा तिनं बघताबघता पार केला. तिचं काम ती मनापासून एंजॉय करत होती. ऑफिसनं तिला स्पेनला जायची ऑपर दिली होती. त्या दिवशी ती घरी आली तीच उडय़ा मारत! इतक्या ज्युनिअर मुलीला पहिल्यांदाच असा चान्स मिळत होता. त्यामुळे तिची कॉलर ताठ होती. कधी एकदा घरी जातेय आणि आईला सगळं हे सगळं सांगतेय असं तिला झालं होतं. पण सांगितल्यावर आईची रिअ‍ॅक्शन अनएक्सपेक्टेड होती. आनंद होण्याऐवजी ती वैतागलीच. अनिशाला कळेचना आईचं वागणं. ‘अगं आई, एवढी चांगली अपॉच्र्युनिटी मिळतेय मला आणि हे काय चाललंय तुझं?’ पण आईचा मूड काही सुधारला नाही. आईला कसंबसं पटवून ती फायनली स्पेनला गेली. एरवी मॉडर्न असलेली आपली आई मुलगी म्हटलं की, किती पारंपरिक होते, हे पाहून अनिशाला धक्काच बसला.

तीन वर्षांनी अनिशा तिचं काँट्रॅक्ट संपवून परतली. आता ती पंचवीस वर्षांची झाली होती. आईबाबांचं अर्थातच तिच्या मागे लग्नाचं टुमणं सुरू झालं. ती तिकडे असल्याच्या काळातही ते काही स्वस्थ बसले नव्हते. सतत स्थळं सुचवत होते. मुलांचे फोटो, काँटॅक्ट्स पाठवत होते. ती परत आल्यावर त्यांनी जरा जोर लावला. अनिशा मात्र डायलेमामध्ये होती. लग्न करायला तिची ना नव्हती. आत्तापर्यंत ती काही कुणाच्या प्रेमात वगैरे पडली नव्हती. त्यामुळे अरेंज्ड मॅरेज हाच पर्याय तिच्यासमोर आहे, याची तिला जाणीव होती. आईबाबांची अपरिहार्यता तिला समजत होती. पण त्याचबरोबर लग्नाळू मैत्रिणींचे किस्से ती ऐकत होती.

मधुरा – तिची मैत्रीण, लग्न ठरवणे या प्रोसेसमध्ये सध्या पिळून निघत होती. तिचे एकेक अनुभव ती अनिशाशी शेअर करायची. एक मुलगा बाकी चांगला होता, पण त्याची कंपनी आणि पगार दोन्ही तिच्यापेक्षा कमी होते. मधुराला चालणार होतं. पण बोलता बोलता तो म्हणाला, की लग्नानंतर नोकरी सोडायला तुझी हरकत नाही ना? दुसरा एक मुलगा नोकरी- पगाराच्या बाबतीत तिच्या बरोबरीचा निघाला. मग ते एकदा कॉफी प्यायला, म्हणजे खरं तर बोलायला गेले. ती परदेशी जाऊन आल्याचं कळल्यावर तो जरा अपसेट झाला. सरळ काही म्हणाला नाही, पण ‘तुम्ही काय बुवा.. फॉरेनची हवा चाखलेले. आम्ही आपले भारत सोडून कुठे गेलेलो नाही’, अशा तिरकस कमेंट्स त्यानं मारल्या. कितीही लिबरल आव आणला, तरी परदेशी जाणं हा मुद्दा नंतर त्रासदायक ठरू शकतो, हे तिच्या लक्षात आलं.

जान्हवी – त्यांच्या ग्रुपमधली तिसरी मैत्रीण. तिला मात्र लवकर करावं लागलं लग्न. या दोघींनी तिचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला. पण ती म्हणाली, ‘माझा नाइलाज आहे गं! आमच्यात कुणीच जास्त शिकत नाही. सगळे घरच्या व्यवसायात पडतात. शिकलेली मुलगी डोईजड होईल म्हणून आधीच नकार मिळतो.’

अनिशा या विषयावर मैत्रिणींशी तावातावानं वाद घालायची. तिचं मत स्पष्ट होतं – ‘आपण जर मारे विमेन्स लिबरेशनच्या बाता मारतो, तर बायकोहून कमी पगार मिळवणारा, कमी शिकलेला नवरा असायला काय हरकत आहे? तुम्ही पोसा ना त्याला. कुणीतरी एकाने पैसे मिळवल्याशी मतलब. मला तर अगदी हाऊस-हजबंड मिळाला तरी चालेल. लग्न म्हणजे पार्टनरशिप असेल तर दोन्ही पार्टनर्सना तितकेच हक्क आणि तितकंच स्वातंत्र्य असायला हवं. युटेरस फक्त बायकांमध्ये असतं म्हणून, नाहीतर मुलं होण्याचं कामही विभागून घेतलं असतं.’ तिच्या अशा कल्पना ऐकून मैत्रिणी अवाक् व्हायच्या आणि आई काळजीत पडायची. ‘लग्न वेळेवर करून घ्या आणि मग जे काही पुढे करायचं ते करा. हवं तितकं शिका, नाहीतर परदेशी जा’, असं आईला वाटायचं. अनिशाला स्पेनला पाठवायला त्यामुळेच रिलक्टंट होती ती.

आलेल्या अनुभवांवरून मधुरानं तिच्या आईबाबांना चक्क काही अटी सांगितल्या. – मला माझ्यापेक्षा जास्त पगार असलेला, माझ्याहून मोठय़ा कंपनीत काम करणारा आणि परदेशी जाऊन आलेला मुलगा बघा. ‘आता हिला साजेसा, आखूडशिंगी बहुगुणी नवरा कुठून आणायचा? काही उपयोग नाही मुलींना शिकवून. उगीच जिवाला घोर.’.. मधुराच्या आईचा असा त्रागा बघून अनिशा आणखीनच सावध झाली. रामदास स्वामींना जसं शुभमंगल सावधान म्हटल्यावर वस्तुस्थितीची जाणीव झाली, तसं झालं तिचं काहीसं. लग्न ठरवताना जॉब, पगार, लुक्स, फॅमिली यापलीकडे जातच नाही का आपण? मुलांच्या मनात खरं काय असतं? वरून लिबरल दिसले तरी ते खरंच असतात का? आपल्या तरी नक्की अपेक्षा काय असतात त्यांच्याकडून? लग्न या विषयावर जरा अधिक  संशोधन करून मत बनवायचं ठरवलं तिनं.

चुकत होतं का काही अनिशाचं ? तिचं बरोबर, मधुराचं बरोबर की आईचं बरोबर? विचार करून कळवाल तुमची मतं? पुढच्या आठवडय़ात बोलू यावर पुढे..

viva.loksatta@gmail.com