Sunday, December 26, 2010

मराठी हास्यकट्टा 30

एका मराठी लेखकाच्या आत्मचरित्रांच प्रकाशन झाल्यावर आठच दिवसांनी त्यांची मुलाखत घेणाऱ्या एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला,

"आत्त्मचरित्र लिहून तुम्हाला काय मिळालं?"

’दोन हजार शत्रू," लेखक महोदय म्हणाले!

*****************

एकदा धर्मेन्द्रच्या घरी रात्री एक चोर येतो.

धर्मेन्द्रला जाग येते आणि तो ओरडतो, "कमीने!"

यावर चोर काय म्हटला असेल??

..
चोर म्हणतो, "ठीक आहे, कमी नेतो!"


*****************
महाराज: कोण आहे रे तिकडे?
नोकर: मी महाराज.
महाराज: आयला, तु महाराज तर मी कोण?
*****************
राजू : आई गं, आमचे गुरुजी ज्ञानेश्ववर आहेत.
आई : असे का म्हणतोस राजु?
राजू : आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडुन कविता पाठ करुन घेतली.
*****************
एकदा शाळेत शिक्षक एका मुलाला विचारतात ‘सांग इंद्रधनुष्य कोणी मोडले?’
त्यावर मुलगा म्हणतो ‘खरचं सांगतो गुरुजी मी नाही हो मोडले‘.
तेवढयात वर्गात हेडमास्तर येतात.
शिक्षक त्यांना सांगतात सर या मुलाला इंद्रधनुष्य कोणी मोडले ते माहीत नाही.
त्यावर हेडमास्तर म्हणतात, ‘जावूद्या अहो जुने झाले असेल त्यामुळे मोडले असेल.
*****************
चौखुरे गुरुजी : १८६९ साली काय झालं?

नन्या : गांधीजींचा जन्म झाला.

चौ. गु. : आणि १८७३ साली काय झालं?

नन्या : गांधीजी चार वर्षांचे झाले!!!!
*****************
शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ?
चिन्टु : हो
शिक्षक : कोणत्या ?
चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे .
*****************
दिर्घ अजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात.

डॉ. कर्वे : तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोणते?
अण्णा : डॉ. देशपांडे.
डॉ. कर्वे : अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.
तुम्हाला कोणता दिला?
अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा..........
*****************
जज : बोल मरण्यापुर्वि कोणती इच्छा आहे?

कैदी : माझ्या ऎवजी तुम्ही फ़ाशी जावे.
*****************
एकदा ३ सरदार स्कुटर वरुन जात असतात..
हे बघुन पांडु त्यांना थांबायला हाथ दाखवतो..
तर सरदार त्याला म्हणतो..
.
.
... .
.
.
.
"३ पहिल्या पासुन आहेत.. आता तुला कुठे बसवु.. ?? "
*****************
चिंटू- रावण कोण होता?
पप्पा- जा शाळेत जावून महाभारत बघून ये.
*****************
पप्पा : इतिहासात नापास का?
चिंटू-सर्व प्रश्न मी जन्मलो नसतानाचे आले होते.
*****************
एक बाप आपल्या मुलाला म्हणाला, "गुंड्या! तो आकाशातून पक्ष्यांचा थवा उडत चाललाय तो पाहिलास ना? त्यातल्या त्या पांढऱ्या पक्ष्यावर मी बंदुकीतून गोळी झाडली."
यावर गुंड्या म्हणाला, "बाबा! तरीच तो पांढरा पक्षी सर्वांच्या पुढे निर्धास्तपणे व ऐटीत उडत चालला आहे."
*****************
एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात.
मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही. का?
कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.
*****************
चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते........
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते........
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ......
ते असे.......

...

" प्रिय प्राण नाथ,



तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला.



काल मुलगा झाला आजीला.



दम्याचा त्रास होतो कुत्रीला.



आज चार पिल्ले झाली मामाला.



दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला.



दवाखान्यात अद्मित केले बकरीला.



हजार रुपयात विकले आत्याला.




नमस्कार तुमची लाडकी गंगू......
*****************

पहिली भेट...

पहिली भेट

नाही हो म्हणता म्हणता, एकदाची ती येणार होती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट ठरली होती

ठरल्याप्रमाणे ती आली
स्टेशनवर गर्दीत शोधत होती
थोडी लाजत, थोडी घाबरत
ओढणीशी चाळा करीत होती

मी दुरूनच पाहिले तिला, पाहता मला गोड हसली ती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट ठरली होती

क्षणभर मग कुणी काहीच बोललं नाही
गाडी हलली ... बाकी काहीच घडल नाही
काठोकाठ भरलेले ते चार डोळे
आवरता आवरता मग कुणीच सावरले नाही

नि:शब्द प्रेमाची भाषा निराळी, न बोलता सहज कळली होती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट ठरली होती

तिच्यासोबत नंतर देवळात गेलो
तिला हात जोडताना फक्त पहात राहिलो
लोभस किती ते शांत निर्मळ भाव
हरपून भान कसे हरवून गेलो

नव्या नात्याची, नव्या आयुष्याची, तेव्हा जणू नवी रुजवात होती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट ठरली होती

निघालो तेव्हा तिचा हात हातात होता
अन मनाच्या कोपऱ्यात विरह सलत होता
स्टेशनाच्या गर्दीत तिचा हात सुटला जेव्हा
दुराव्याचा तो क्षण काळीज चिरत होता

खिडकीतून बघताना वाकून मला, उमाळ्यांना ती अडवित होती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट ठरली होती

मी तेव्हा तिथे तसाच उभा
सोबतीला सारे ते क्षण घेऊन
पहिल्या भेटीच्या मोहक, सुंदर
ती गेली खूप साऱ्या आठवणी देऊन

घडतील पुन्हा कितीतरी अशाच, पहिली भेट ती पहिली होती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट घडली होती

-अनामिक 

Saturday, December 25, 2010

शिवरायांची शप्पथ कधी हार मानू नका........


शिवरायांची शप्पथ कधी हार मानू नका..........

दुखा:मध्ये डोळ्यातून धार आणू नका,
संकुचित जगण्यालाच सार मानू नका,
जीवनाला कधी भार मानू नका,
शिवरायांची शप्पथ कधी हार मानू नका,
गाढवांच्या संगती राहाल तर माती व्हाल,
शिवरायांच्या विचारांनी जगाल तर छत्रपती व्हाल...!
-अनामिक 

Thursday, December 16, 2010

गारवा ........ मिलींद इंगळे.

गारवा ........ मिलींद इंगळे



उन जरा जास्त आहे...दर वर्षी वाटत
भर उन्हात पाऊस घेऊन...आभाळ मनात दाटते

तरी पावले चालत राहतात...मन चालत नाही
घामा शिवाय शरीरात...कोणीच बोलत नाही
तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
उन्हा मधला काही भाग पंखांखाली घेतो
वारा उनाड़ मूला सारखा सैरा वैरा पळत रहातो
पाना फूला झाडांवरती छ्परावरती चढूंन पाहतो

दूपार टळून संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हा मागुं चालत येते गार गार कातरवेळ
चक्क डोळयां समोर रुतु कूस बदलून घेतो
पावसाआधी ढ्गां मधे कुठुन गारवा येतो ...

गारवा..... ह्म्हम्म्मम ह्म्हम्म्मम
वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये............. नभात ही, चांदवा नवा नवा
गारवा......................

गवतात गाणे झूलते कधीचे....२
हिरवे किनारे हिरव्या नदीचे...२
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये......... मनात ही, ताजवा.... नवा नवा
गारवा......................

आकाश सारे माळून तारे.... २
आता रुपेरी झालेत वारे........२
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये.......... तुझा जसा, गोडवा... नवा नवा
गारवा......................

वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये............. नभात ही, चांदवा नवा नवा
गारवा......................

गीतकार :सौमित्र
गायक :मिलिंद इंगळे
संगीतकार :मिलींद इंगळे

Monday, December 13, 2010

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती जमीनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर


करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
-गुरु ठाकूर.

Sunday, December 5, 2010

उखाणे

उखाणे
कपावर कप कपाखालि बशि
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी

आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव -- आणि -- च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा

नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू

चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप
--- रावां समवेत ओलांडते माप

पाव शेर रवा पाव शेर खवा
...चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
दही,साखर,तुप
...राव माला आवडतात खुप

बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस

मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ
--- मुळेच माझ्या जीवनाला अर्थ

सूपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ वाकु कशी,
पायात पैंजण चालू कशी,
........ बसले मित्रपाशी,
कपाटाची चावी मागू कशी..?

हिरव्या शालुला जरिचे काठ
चे नाव घेते, सोडा माझी वाट

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखद चा घास

एक होति चिऊ, एक होता काऊ,
.. ना घास भरवला तर मि काय खाऊ?


लग्नात्त लागतात हार आणी तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे


कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!


आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते राखते तुमचा मान


सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
...रावाचे नाव घेते ...ची सुन


शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने

एक होति परि .....
नाव घेते आता जावा आपापल्या घरि


केलेीच पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना कस कस वाटत


नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
...रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा

एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .

दोन वाति एक ज्योति,दोन शिम्पले एक मोति ----रावाचि मि सौभाग्यवति.

ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
---- नाव घेते सौभाग्य माझे


श्रावणात पडतात सरीवर सरी
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
----- नाव घेते सोडा माझी वाट

************************************************************

मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे
...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे


निळे पाणी, निळे डोगर, हिरवे हिरवे रान,
.... चे नाव घेउन राखतो सर्वांचा मान

काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून


भाजित भाजि पालक,
...माझि मालकिन अन् मि मालक !


खोक्यात खोका टि वी चा खोका,
खोक्यात खोका टि वी चा खोका
.......माझी मांजर मि बोका..


उमाचा महादेव आणि सितेचा राम
... आलि जीवनी आता आयुषयभर आराम


पुणे तेथे नाही काही उणे,
.... गेले गावाला तर घर होते सुणेसुणे

अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला


मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न - ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
........ ची व माझी जडली प्रिती

Wednesday, December 1, 2010

तुझ्या जाण्याने, जरी डोळे पाणावलेले असले .....

तुझ्या जाण्याने,
जरी डोळे पाणावलेले असले
तरी ते तुलाच पाहत आहेत
तुझ्या जाण्याने,
ओठांवर असले जरी रडू
तरी ते हाक् तुला मारत आहे
तुझ्या जाण्याने
मनात व्याकुळता पसरली
तरी ते आठवण तुझीच काढत आहे
तुझ्या जाण्याने
हातातला हात सुटला तरी
तो साथ तुझीच मागतो आहे
तुझ्या जाण्याने
तुझी सोबत उठलेले पाऊल
तुझ्या पावलाच्या खुनान वरच पडत आहेत
तुझ्या जाण्याने
निराशा झाली तरी
तू परत येणार हि आशा आहे
अर्धवट सोडून गेलेले स्वप्न
नव्याने माझ्या करिता सजवणार आहे
माझा तू माझ्या साठी परत
येणार आहेस ............................

साभार - कवियेत्री : प्रिया उमप