Friday, April 29, 2022

post 2

गुलजार यांची मुलाखत..

सुमारे ४५ वर्षांपूर्वी डॉ. राम पंडित यांनी गुलजार यांची घेतलेली ही मुलाखत, मित्र ज्ञानेश्वर आगाशे, विजय हरी वाडेकर यांच्या 'राजस' या मासिकात प्रकाशित झाली होती. आजही त्यातील मजकूर, गुलजार यांचे लिखाण, विचारधारा व व्यक्तिमत्त्व जाणण्यासाठी सहाय्यक ठरेल.

ह्या मुलाखतीत डॉ. राम पंडित यांनी गुलजार यांना विचारलेले प्रश्न आणि गुलजार यांनी मांडलेली स्पष्टीकरणे ह्यातील दूरदृष्टीला सलाम केला पाहिजे..

--------------------------------------------------
गुलजार यांची मुलाखत : भाग १
--------------------------------------------------

सोना,
काही श्वास तुझ्या पूर्वी जगलो
काही श्वास तुझ्यासवे जगत आहे
असं होत नाही का गं सोना,
की साऱ्या जीवनात
एक श्वास मिळतो जगण्यासाठी
अन् कधीकधी एका श्वासात
कोणी सारे जीवन जगतो
ह्या कवितांमधे मी
आपले श्वास एकत्र केले आहेत

सोना,
जे तुझ्या झोळीत टाकीत आहे
काही श्वास जे मी जगून घेतले
काही श्वास जे मी जगू शकलो नाही
आणखी काही अर्धेअपूर्ण श्वास, 
ज्यात तू
आपले श्वास जोडून देशील तर शप्पथ
एका श्वासात सारे जीवन जगून घेईन
--------------------------------------------------

होय ही कविता आहे; पण ही अर्पणपत्रिका आहे. ही आहे गुलजारची कविता. होय हा आहे कवितेतील सुगंधाला देहरूप देणारा गुलजार. चित्रपटातील संवाद, दिग्दर्शन ह्यापलीकडेही एक गुलजार उभा आहे. तो आहे कवी गुलजार. 

जीवनातील कडू-गोड अनुभव, प्रत्येक क्षणाच्या पडद्यात दडलेल्या जाणिवांचा शोध घेत अनंत श्वासांच्या प्रवासाला निघालेला हा यात्रिक स्वतःच्या कवितांबद्दल, उर्द साहित्याबद्दल काय म्हणतो, हे जाणून घेण्यासाठी मी ही त्याची घेतलेली मुलाखत. अनिवार मोह होत असतानाही मी त्याला त्याच्या वैयक्तिक व चित्रपट जीवनाबद्दल काहीही विचारले नाही; पण त्याबद्दल खंत नाही; पण तरीही वाटतं खूपच विचारायचं राहूनच गेलंय. 

हा संवाद गुलजारच्या साहित्यजीवनावर खूप प्रकाश पाडेल, यात शंका नाही. ‘राजस’चा वाचकवर्ग ह्या मुलाखतीचे सहृदयतेने स्वागत करेल अशी आशा नाही तर मला पूर्ण खात्री आहे. 
--------------------------------------------------

त्या वेळी 'राजस'च्या वाचकांनी ह्या मुलाखतीचे स्वागत केले होतेच.. आज फेसबुकवरील वाचक मंडळीही ह्या मुलाखतीचे तितक्याच आत्मियतेने स्वागत करतील...
--------------------------------------------------

राम : आपण कविता लिहिण्यास केव्हा व कुठे सुरुवात केली?

गुलजार : हे फॅसिनेशन जे असत ते शाळेच्या वेळी लागलं. “विंटल कॉलस् ए पोएट” असं म्हणतात. शायरीचा शौक त्या कच्या वयातच लागला. शहर दिल्ली.. शाळेचे दिवस अन् भाषा उर्दू.. कारण शिक्षणाचे माध्यम उर्दूच होते, त्यामुळे प्रारंभ तेथूनच झाला. (माईक पाहिजे?)

राम : नको, मी नंतर प्रश्न लिहून घेईन. 

राम : तुम्ही कधी मुशायऱ्यात भाग घेतला आहे काय? कारण माझ्या तरी पाहण्यात आले नाही. 

गुलजार : दिल्लीत शाळा व कॉलेजमधे असताना मुशायऱ्यात भाग घेतला. नंतर मुंबईला आलो व येथेही कॉलेज जॉईन केले. इथेही पी. डब्लू. ए. मीन्स प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन हीयर यु नो. त्यावेळी बन्नेखाँ सज्जाद जहीर आदिबरोबर मुशायर्‍यात हजेरी लावीत असे; पण हे मुशायर्‍यात जाणे हळूहळू कुठंतरी सुटत गेलं.. अन् मग असं सुटलं की बस्स.. 

राम : पण मजरूह, साहिर आदि अजूनही भाग घेतात. 

गुलजार : होय, ते घेतात भाग.. पण, माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडीबहूत पुढे पुढे मला भीतीच बसली. आता माईकच्या समोर जाण्याचं धैर्यही राहिलं नाही, असं म्हणाल तर हरकत नाही. 

राम : मी तुम्हाला काय म्हणू? गीतकार की कवी? कारण आजचे समीक्षक तरी हे दोन भेद पद्य साहित्यात मानतात. त्यामुळेच मराठीत माडगुळकर आणि हिंदीत नीरजला कवी म्हणावयास ते तयार नाहीत. 

गुलजार : हे मी गीत लिहिण्यास फार उशिरा सुरुवात केली. तुम्ही तर माझे 'जानम' आणि 'एक बंद चांद' हे कवितासंग्रह वाचलेच आहेत. त्यात तुम्हाला दिसलंच असेल की मी मूलतः कविताच लिहितो. गीत लिहिण्याची मला संधी चित्रपटात आली तरीही मी प्रथमतः ती स्वीकारली नाही; आणि आताही लिहितो तेही अगदी ठराविकच. करीअर म्हणून त्याचा स्वीकार केला नाही. 

राम : तुमच्या कवितेबाबत आमच्या उर्दूस्नेही व समीक्षक मित्रांचा आरोप आहे की, ती ती मीराजी एवढी नाही; पण अख्तर उल इमान एवढी अस्पष्ट भाषा आहे. ह्याविषयी तुम्हांला काय सांगायचं आहे?

गुलजार : होय, इमेजेसच्यामुळे; भाषेमुळे नाही; कारण इमेजेस थोड्या कठीण आहेत. त्या सर्वपरिचित नाहीत. माझ्या कविता वाचल्यानंतर जर तसे वाटत असेल तर ते मी कबूल करतो. जर तो गुन्हा आहे तर मला तो मान्य आहे, पण आता जेव्हा मी माझ्या जुन्या कविता वाचतो तेव्हा मला जाणवतं की पूर्वी मी जी उभाषा वापरत होता ती फार मिलष्ट होती व इमेजेस सोप्या होत्या. आता हळहळ भाषा सोपी होऊ लागली व व्यस्त प्रमाणात इमेजेस मात्र कठीण होत चालल्या आहेत परिवर्तन मी स्वत: अनुभवतो. 
--------------------------------------------------

क्रमशः

Wednesday, April 27, 2022

post 1

आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट 
पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.
***
वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील! जगण्याची एक संधी मिळावी म्हणून या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... त्यांना ती संधी मिळालीच नाही!
        कोविडमुळे पाच लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना? 
        आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?
       जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!
        तीनशे पासष्ट दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते, बेड मिळाला ऑक्सिजन पुरत नव्हता, ऑक्सिजन मिळायचा तर औषधं नव्हते... आणि कुठेतरी हे सगळं मिळायचं तर व्हेंटिलेटर नसायचं. स्वतःच्या गळ्याभोवती बोटं गच्च पकडून, घोगऱ्या आवाजात... "डॉक्टर वाचवा... जीव घाबरलाय" म्हणत तरणीताठी पोरं जीव सोडताना बघितली आहेत...
        खरंतर त्यांचं कर्तव्य होतं, व्यवहारिक भाषेत त्यांना त्याचे पैसे मिळायचे पण तरीही त्यापलीकडे जाऊन सफाई कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान दिलं, रुग्णांचं हागणं मुतणं साफ केलं, सिस्टर लोकांनी घरी लेकरं बाळं सोडून त्या नरकयातना देणाऱ्या किट घालून अठरा-वीस तास काम केलं, आपल्या जीवाचा विचार न करता असंख्य डॉक्टरांनी उपचार केले. ते सर्व काही आजचा दिवस पाहण्यासाठी नक्कीच नव्हतं...माणूस जगला पाहिजे हीच सर्वांची एकमेव इच्छा होती!
         शंभर वर्षांपूर्वी युरोपमध्ये आलेल्या साथीच्या रोगांनी त्यांच्या जगण्याच्या पद्धती बदलल्या. साफसफाई आली, बंद नाल्या आल्या, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल आला, वरून 'सॉरी' बोलणं आलं... आपण एवढ्या मोठ्या आजाराच्या लाटेनंतर काय शिकलो? धर्म, जाती, दंगली,झेंडे आणि अजेंडे? शतकातून एखादी अशी आपत्ती येते जी माणसामध्ये परिवर्तन घडवून आणते... इथे आपण रानटी माणसासारखं एकाच वर्षात काही शतकं मागे गेलोय! आपत्तीच्या काळात जात, भाषा, धर्म, अस्मिता, अजेंडा असलं काहीच नव्हतं... एक माणूस दुसऱ्या माणसाला वाचविण्यासाठी शक्य होईल ते सर्व काही करत होता एवढं सरळ सोपं होतं... एकाच वर्षात सगळं संपलंय!
         आपली प्राथमिकता काय आहे हे अजूनही कळू नये यापेक्षा दुर्दैव ते काय? सत्ताधारी असो की विरोधक... यांची पोटं भरलेली आहेत, यांच्या पुढच्या सात पिढ्या बसून खाणार आहेत. भरल्यापोटी त्यांचे खेळ सुरू आहेत! नोकऱ्या, महागाई या गोष्टी तर फार दूरच्या राहिल्या पण उद्या जर ही किंवा अशी आपत्ती पुन्हा आली तर आपली तयारी काय आहे हा प्रश्न आज विचारणं गरजेचं असताना आपणच जर अर्थहीन अस्मितेमध्ये आनंदी होत असू तर मग आज ना उद्या आपली लायकी साथीच्या रोगात मरण्याचीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 
       कसल्या राजकारण आणि धर्मकारणाच्या टिमक्या वाजवता... श्वास पुरत नव्हता म्हणून पायाच्या टाचा घासून गोळामोळा झालेल्या पाचशेहून अधिक बेडशीट अजून नजरेसमोर आहेत...! आपण त्यांच्यापैकी एक नव्हतो, आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.

डॉ. प्रकाश कोयाडे

Tuesday, April 12, 2022

Sunday, April 10, 2022

post 2

 




आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌॥

संकटाचे हरण करणारा,सर्व प्रकारचे वैभव देणारा,लोकांना आनंद देणारा असा जो श्रीराम, त्याला मी पुनः पुन्हा वंदन करतो. 

जय श्रीराम !



post 1

 What was Dharma in the eyes of Ram?

“परहित सरिस धरम नहिं भाई ।
पर पीड़ा सम नहिं अधमाई ।।” 
The greatest religion is to serve others. And to harm others is greatest sin.

Saturday, April 2, 2022

आरंभ है

 आरम्भ है प्रचण्ड बोले मस्तकों के झुण्ड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो,
आन बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष के बाण पे उतार दो !!!

मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले
वही तो एक सर्वशक्तिमान है,
विश्व की पुकार है ये भागवत का सार है की
युद्ध ही तो वीर का प्रमाण है !!!
कौरवो की भीड़ हो या पाण्डवो का नीड़ हो
जो लड़ सका है वही तो महान है !!!
जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं
क्या ज़िन्दगी है ठोकरों पर मार दो,
मौत अन्त हैं नहीं तो मौत से भी क्यों डरे
ये जाके आसमान में दहाड़ दो !

आरम्भ है प्रचण्ड बोले मस्तकों के झुण्ड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो,
आन बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष के बाण पे उतार दो !!!

वो दया का भाव या की शौर्य का चुनाव
या की हार का वो घाव तुम ये सोच लो,
या की पूरे भाल पर जला रहे विजय का लाल,
लाल ये गुलाल तुम ये सोच लो,
रंग केसरी हो या मृदंग केसरी हो
या की केसरी हो लाल तुम ये सोच लो !!
जिस कवि की कल्पना में ज़िन्दगी हो
प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो,
भीगती नसों में आज फूलती रगों में
आज आग की लपट तुम बखार दो  !!!

पीयूष मिश्रा