Saturday, February 27, 2010

 मराठी अभिमान गीत !!



India’s ‘biggest song’ set to strike a chord in the hearts of Maharashtrians 



 मराठी अभिमान गीत !!! 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
READ MORE                                                 

Friday, February 19, 2010

शिवाजी महाराज जयंती



शिवाजी   महाराज  जयंती 


सिंहाच्या जबड्यात,घालुनी हात,मोजीन दात..ही जात मराठ्यांची!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..


















Sunday, February 14, 2010

आता कुठॆ सुरवात ही झाली..

आता कुठॆ सुरवात ही झाली

आता कुठॆ सुरवात ही झाली.................
मानात नकार आणि ऒठावर हॊकार
वॆळ पडली कि घॆतलि माघार
जगाची कॆली त्यानॆ रित स्विकार

हॊतॆ गाठायचॆ यशाचॆ शिखर
सुरु झाली त्याचि धडपड,
गॆला जीव कुणचा न कॆली फिकर

हॊती त्यास कुणाचि परवा
न राहिलॆ जगाचॆ भान
जिंकित गॆला तॊ नॅहमिच
चढला मग त्यास गुमान

पादाक्रांत करीत गॆला एक एक टप्पा
प्रॅमाच्या झाल्या नुसत्याच गप्पा
वापरलॅ त्यानॆ तिलाही नॅहमी
प्रॅमाच्या हॊता डाव फसवा

म्हणतात प्रॆम आंधळॆ असतॆ
तिहि कुठॆ अपवाद हॊती
सवॅ काहि दॆऊनि
राहिली रीत्या हाती

कळाली तीलाहि जगाचि रित
शॆवटचा डाव तिनॆ खॆळिला
उत्तुंग शिखराचा मॊह त्यालाही पडला

लाविलॆ पणास सवॅ,खॆळली शॆवटचि बाजि
कळायला झाला उशीर गमावलॆ सवॅ काहि
हपापलॆलॆ चॆलॆहि माग दुर झालॆ
हॊती आता खरी परिक्शा

मनातुनि आवाज आला
दिली साद मग त्यानॆ तीला,
नॆहमी प्रमाणॆ ती आलि
घॆउनि हातात हात म्हणालि
आता कुठॆ सुरवात ही झाली

पावसात रमत गमत चालायच असतं
वेळाने उठायचं अन मग
चहा चहा म्हणत
घर डोक्यावर घ्यायचं असतं
पावसात रमत गमत चालायच असत..........
कपडे ख़राब होतात असं
आई कितीही ओरडली
तरी पांढऱ्या कपडयानाच
प्राधान्य द्यायच असत
पावसात रमत गमत चालायच असतं.........
collage ला जाताना नेमकी
छत्री विसरायची असते
दादा द्यायला आला तरी
आपण लपायाचं असतं
पावसात रमत गमत चालायच असतं...........
छोट्या छोट्या नावा करून
पाण्यात सोडायच्या असतात
दिसेनाश्या होईपर्यंत
न्याहलायाच असतं
पावसात रमत गमत चालायच असतं ............
आडोश्याला उभ राहून देखील
चिंब चिंब भिजायचं असतं
पाय घसरला नहीं तरी
चिखलात पडायचं असतं
पावसात रमत गमत चालायचं असतं ..........

आज तुझ्याशिवाय...
आज तुझ्यासाठी काही लिहायचे ठरवले होते..
पाहता पाहता तुझ्या प्रत्येक क्षणांनी मला हरवले होते..

आज या क्षणाला..तुझे प्रत्येक क्षण मला डिवचत होते..
प्रेम करायचे नव्हते तर.. इतके क्षण दिले का होते...?

असेच जर वागायचे होते तर.. माझे प्रत्येक क्षन तुला हवे का होते?
असेच जर वागायचे होते तर. प्रेमाचे क्षण दाखविले का होते..?

असेच जर तोडायचे होते तर.. क्षण जोडले का होते..?
मनात नसुन सुद्धा तुझ्या अस्तित्वाने मला हरविले होते..

आता कितीही रागवायचे म्हटले.. तरी तुझ्यावरच्या प्रेमाने गुंतविले होते..
यात तुझा दोष नाही !!.. कारण , तुझ्या अस्तित्वाचे सर्वच क्षण मला प्रिय होते.

बोल ना रे काही तरी...
शी बाबा......आज काहीच का बोलत नाहीस...
हळूच मी त्या डोळ्यांकड़े पहिल...
चेहरयावर हास्य मग राहिले...
तिला कुठे माहित...
बोलक्या ओठानचा आज अबोलच होता...
आवाजासाठी चक्क आतुर होता...
तीच हसन...ते लाजन...
तीच रुसन..तर कधी भांडन...
तिचे प्रश्न...ती उत्तर...
कधी सवांद... तर कधी वाद...
कोण होती ती....???
नव्हती रक्ताची...
ना नात्याची....
परी होती ती या मनाची...
स्नेहच्या बंधाची....
अंतरीच्या गाभ्याची...
आठवणींनच्या काही गोड क्षणंची...
होती ती श्रावण सर...
वालवंटातही ओले चिम्ब करणारी...
की होती ती काजवा...
अंधारया आयुष्याची...
रेशीम गठिनचा बंध होता...
ह्या दोन खुळ्या मनांचा...
मैत्रीचा की प्रेमाचा...
हा प्रश्न नव्हता मनांचा...
तिझ सोबतचा वेळ क्षणात संपून जाई...
परत भेटीची ओढ़ आता अंतरी राहून जाई...
मी स्वर्ग नाही पहिला...
तिझ सोबतचा प्रतेक क्षण...
स्वर्गाहून सुन्दर राहिला..

कधी मिळतो मदतीचा हात,
हिच मैत्रीची सुरुवात

मैत्री म्हणजे
प्रत्येक पायरीवर एक हळुवार फ़ुंकर

मैत्री म्हणजे
प्रत्येक वळणावर एक भक्कम आधार

मैत्री म्हणजे
मायेची जिव्हाळ्याची साठवण
मनाने दिलेली मनाची आठवण

हा मैत्रीचा धागा नीट जपायचा असतो
कारण .....................
काही नाती तुटत नाहीत
ती आपोआप मिटुन जातात

जशी बोटांवर रंग ठेवुन
फ़ुलपाखरु हातुन सुटून जातात


Monday, February 8, 2010



मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....१


मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....२


मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....३


तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा...

मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण


कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही


मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं


मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक


मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात


मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली


मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे !!!!!

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!


आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा


कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ


पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्यापाशी
तळं होऊन साचायचं!


आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील


ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे


असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!


म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!




आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल


माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल


कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल


कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
प्रेमाची उब देणारी ती झुळुक मीच असेल.............

मैत्री! 



मैत्री! एक गोंडस नाव,

एका नात्याचं.
रम्य बालपणात;
त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात
हे मैत्री किती तऱ्हांनी बागडत असतं
आपल्याबरोबर, नाही?
या मैत्रीला कुठे बांधून
धरून ठेवावं
कळतच नाही तेव्हा.
समुद्रकाठच्या वाळूसारखी
सटकून जाते ती पायाखालून.
मग वाळू सोडून
नावेत बसतो आपण;
लाटांवर स्वार होण्यासाठी,
एकटेच.
पण कसा कुणास ठाऊक,
आहे आहे म्हणेपर्यंत
रस्ता चुकतो आपला.
कायमची चुकामूक.
मग आपापल्या वाटेवरून
चालत राहायचं,
एवढंच उरतं आपल्या हातात.
पण त्या मैत्रीला
सुरक्षित जपून ठेवायचं
काम चोख बजावतं
आपलं मन.
आणि जसा जसा
आयुष्याचा किनारा
जवळ येऊ लागतो,
तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा








आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल


माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल


कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल


कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
प्रेमाची उब देणारी ती झुळुक मीच असेल.............







मैत्री म्हणजे विश्वास......


मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान


मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव


मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश


मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श


मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन


मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट


मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा


मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण


मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण


मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग


मराठी कविता

कमळपत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत
निसटत्या क्षणाला कधी जवळ करायच नसत
आपल आयुष्यही असच असत
बरच काही हरवल असल तरी,खुप काही उरलेल असतं!

क्षणांवर जगतो आपण,
कारण क्षण आयुष्य घडवतात,
आठवणीत रमतो आपण,
कारण क्षण आठवणी बनवतात......


क्षण... काही आनंदाचे,
तर काही खूप दुख:चे,
क्षण.... हास्य-विनोदाचे,
तर काही फक्त रडण्याचे.......


क्षण असतात मैत्रीचे,
क्षण असतात प्रेमाचे,
क्षण असतात मायचे,
अन् आपण जोपासलेल्या नात्यांचेही.......


क्षणात येते दाटून भीती,
क्षणात सारे बळही येते,
येती कधी क्षण सोबतीचे,
तर कधी येती एकाकी क्षण.......


समाधान मिळते क्षणात एका,
वादळही उतते पुढल्या क्षणी,
वाटे हक्क मात्र ज्या क्षणावर,
तेव्हा काळ उभा ठाकतो समोर........

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.


अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...


कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....


जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..


रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....


असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...


तरीही,
या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

मैत्री


दोन मनांची अशी असावी मैत्री
सुखात अन दु:खात टिकावी मैत्री...


दोघांपाशी काही उरले नाही;
दोघांमध्ये तरी उरावी मैत्री...


भेटगाठ घडते अथवा ना घडते
न भेटताही मनी जपावी मैत्री...


चढ-उतार असतातच नात्यांमध्ये
कठिण प्रसंगांतच दृढ व्हावी मैत्री...


'उपकारां'ची भाषा मैत्रीमध्ये?
द्यायचेच तर फक्त स्मरावी मैत्री...


जगायचे या जगात कोणासाठी?
जगायचे तर फक्त 'जगावी' मैत्री...



मैत्री


एक सांगू का... मैत्री कधी ठरवून होत नाही.
आपण आपल्या वाटेवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात
एकमेकात येऊन रस्ते मिसळत असतात


आपल्या नकळ्त कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळ्ते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालू लागतो
नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो, सोबत करतो


एकमेकांची दु:खे वाटून घेतो
आनंदाचे क्षण साजरे करतो
मैत्री अशी होते
काय जादू असते मैत्रीत!


मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ


मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास


कधी कधी वाटतं समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं त्यात खेळ्त असावं


शिंपलेच शिंपले...विविध रंगाचे, आकारांचे, प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा


अलगद उघडावा अन त्यात मोती सापडावा
खर्रा खुर्रा, तुझ्यासारखा खरं सांगू का!


मोतीसुदधा लाभावा लागतो
तुझ्यासारखा..........

का कोणी...
का कोणी आपल्याला इतके आवडावे,
त्याच्यासाठीच वाटावे जगावे वा मरावे?...
मला वाटते आपण नेहेमी स्वत: साठीच जगावे,
कशाला आठवणीत कुणाच्या उगीचच झुरावे?...
वाटते तसे आपल्याला कधीच जगता येत नाही,
आठवण तिची आल्यावाचुन दिवस एकही जात नाही...
हा मूर्खपणाच माझा की मी खूपच प्रेम करतो,
इच्छा नसूनही आठवनींवर रात्री सा-या जागुन काढतो...
प्रेम मनात मावेना म्हणून डोळ्यात माझ्या पाणी आलं,
तिने मात्र पटकन मला "an imotional fool" म्हटलं...
जगतो आहे मी, जगेन आयुष्य सारं,
कारण माहितीये मला माझं प्रेम आहे अगदी खरं...


कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी


जॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं,
बदलत्या जगाबरॊबर बदलायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

कु‍ठून सुरू झालं हॆ माहित नसलं,
तरी कुठेतरी थांबायचं असतं
आयुष्य असचं जगायचं असतं.

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणॆ करायचं असतं,
स्वतःच्या सुखापॆक्षा इतरांना सुखवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

दुःख आणि अश्रुंना मनात कॊडुन ठेवायचं असतं,
हसता नाहि आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

पंखामध्यॆ बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झॆपाहुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

मरणानं समॊर यॆऊन जीव जरी मागितला,
तरी मागून मागून काय मागितलस? असचं म्हनायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं.

इच्छा असॆल नसॆल तरी जन्मभर जगायचं असतं,
पण जग सोडताना मात्र समाधानानॆ जायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं




ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
"प्रेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही........