Thursday, March 25, 2010

Sunday, March 14, 2010

चारोळी

मराठी कविता


कोणी तरी लागतं
आपल्याला आपल म्हणणारं
आपल म्हणताना आपल्यातलं
शहाणपण जाणणारं.


एकदा मला ना
तू माझी वाट पहाताना पहायचंय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळूच लपून रहायचंय.


माझ्या वहीचं एक पान
कोरच राहून गेलं
आता वही जुनी झाली पण
त्यावर लिहायचच राहून गेलं.


विसरलेलं सगळं
पुन्हा आठवतं
सगळं विसरलोय
हे आठवलं की.


असे बेसावध क्षणच
सावधपणे टाळायचे असतात
जवळ येताना दुराव्याचे
काही नियम पाळायचे असतात.




पुसणारं कोणी असेल तर
डोळे भरुन यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे.


मी आहेच जरा अशी
एकटी एकटी राहणारी
वाळकं पान सुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारी.


पिंपळाचं रोप कसं
कुठेही उगवतं
कुठेही उगवतं म्हणून
त्याचं कसही निभावतं.


मरताना वाटलं
आयुष्य नुसतच वाहून गेलं
मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना
माझं जगायचंच राहून गेलं.

~ चंद्रशेखर गोखले

आयुष्यात प्रेम करायचय मला..

प्रेम


आयुष्यात प्रेम करायचय मला..
दुर कुठेतरी समुद्र किनारी हातात हात घालून बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला…


माझ्या मांडीवर डोके ठेऊन तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला…


तिच्या सोबत थोडं दुष्टपणे वागुन तिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवे पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय मला…


आयुष्यतील माझं शिखर तिच्या सोबतीने चढायचय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीचा आनंद 
तिच्या डोळ्यांतून व्यक्त झालेला अनुभवायचा मला
आयुष्यात प्रेम करायचय मला..
-अनामिक 



नाती


हळवं अनामिक नातं ***
नाती अनेक प्रकारची असतात
पण एखादं नातं असं असतं
ज्याला नाही बांधता येत शब्दात
नाही अडकवता येत कुठल्याच बंधनात
ते असतं स्वैर .............
फ़क्त ह्रुदयाचं ह्रुदयाशी असलेलं नातं !!!


त्याचं गहिरेपण नाही कोणी समजू शकत
ते केवळ त्या दोन वेड्या जीवांनाच माहित असतं
अगदी जगावेगळं ............
कदाचित समाजाच्या रूढींमधे न बसणारं
तरीही अगदी हवंहवंसं ... खूपच खास
ज्या नात्याला नाही देता येत काही नाव .........
एक असं नातं .........


जसं कोणीतरी अंतर्मनात घर करून रहावं
जसं उदास असताना येऊन कोणीतरी हसवावं
एक असं नातं ........


जणू अंधाऱ्या वाटेवर दिसावा प्रकाशाचा किरण
जणू बेरंगी जीवनात उधळावे कोणी हजारो रंग
असं एक सुंदर, हळवं अनामिक नातं .....



बालपण


!! बालपणात जायचयं !!
देवा मला परत बालपणात जायचयं,
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं......
पुरणाच्या पोळीसोबत,
आईचं प्रेम होतं,
जखमेचं माझ्या,
काळजावर तिच्या व्रणं होतं
देवा मला परत बालपणात
जायचयंआनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!१!!


शाळेत काही चुकलं तर्‌,
सरांची छडी होती,
’तिच्या’ समोर नाही मारलं,म्हणुन
मनात आनंदाची गुढी होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!२!!


चांदण एकटक पाहण्यासाठी,
निरभ्र मोकळं आकाश होतं,
अन्‌ भरपूर खेळण्यासाठी,
उजाडं असं रान्‌ होतं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!३!!


बाबांच्या मारापुढे,
बत्ती माझी गुल होती,
अन्‌, आसू आईचे नकोत, म्हणुन
हास्यकळी माझी सदा फ़ुलत होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!४!!


लहान भावाचं,
कायमच मागं राहणं,
अन्‌ तो मागे का? म्हणून,
आईच मलाच दम देणं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!५!!


तेव्हा मला खरचं,
काही नाही कळायचं,
जसा छंदच मला,
विनाकारण भांडायच,
भांडलेल्या सर्वानाचं,
सॉरी म्हणुन यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं



स्वप्नं


हरवलेली स्वप्नं


मी,
गारव्याला झाडाखाली
ती,
विस्कटलेल्या चेहऱ्याची
गालावर आसवांचे डाग
हातात टोपली....
माझ्याजवळ आली
इकडं तिकडं घोटाळली
काय हरवलं असावं?
तिचं ते धांडोळण
बघता बघता
माझी नजर
पायाकडं
बरीच चाल
चाललेले पाय
काय शोधत फिरताहेत....?
मी विचारलं
तिचं उत्तर....
हरवलेली स्वप्न!

मी

मी

मी आणि माझी दोन मन
नेहमी आम्ही भांडतो  असतो
 एखाद्या प्रश्नावर १० वेळा  विचार करतो
त्या प्रश्नाचा उत्तर तिघपन शोधतो
कधीतरी प्रश्न प्रश्नच राहतो
तिघ आम्ही एकाच मुलिवर प्रेम करतो
तरी त्या दोघात कोण तरी विरोधात असतो
त्या दोघांचा भान्दनात मी मात्र एकता असतो
मी अणि माझी दोन मन.
-अनामिक 



मैत्री


मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा
प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा
आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावनारा


मी आहेच असा सतत बोलनारा
मित्राना नको ते प्रश्न विचारनारा
प्रश्न विचारुन त्याना सतवनारा
उत्तरे संग म्हणुन
तगादा लावणारा


मी आहेच असा मस्त जगनारा
सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा
आपल्यातच आपलपन जपनारा
पण इतरांच्या आनंदासाठी
स्वतालाही विसरनारा


मी आहेच असा मनासारख जगनारा
यशाचे शिखर चदताना हाथ देणारा
अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा
सुखाच्या रस्त्यावरून जाताना
आयुष्य सजवनारा


मी आहेच असा सर्वांच ऐकनारा
आई वडील याना देव माननारा
त्यांचावर जास्त विश्वास ठेवणारा
त्यांच्या कोणत्याही निर्णयावर
समाधानी असणारा

Saturday, March 13, 2010



नातं


या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.


अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...


कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....


जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..


रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....
असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...


तरीही,
या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.



मराठी मुलगी


मराठी मुलगी
class मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.


class मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.


class मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.


class मध्ये अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते


class अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते


शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये....



कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये....


कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी


डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे


स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे


कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा


कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

मन


मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळ त नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो
मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?
मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो...........

मैत्री


आयुष्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा,


मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,
हसने रुसने चालत राहवे,


एकमेकांना समजुन घ्यावे,
मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,


सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी



आयुष्य


कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं...
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं....
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो


कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात


पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....


आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं


कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी


म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर...........



मैत्री


मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे


आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे


आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे


आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे


आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे


आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे


आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे


आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे


आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे


आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे

मैत्री


मैत्र! एक गोंडस नाव,
एका नात्याचं. रम्य बालपणात;
त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात
हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं
आपल्याबरोबर, नाही?
या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा.
समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून.
मग वाळू सोडून नावेत बसतो आपण;
लाटांवर स्वार होण्यासाठी, एकटेच.
पण कसा कुणास ठाऊक,
आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला.
कायमची चुकामूक.
मग आपापल्या वाटेवरून चालत राहायचं,
एवढंच उरतं आपल्या हातात.
पण त्या मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचं काम चोख बजावतं आपलं मन.
आणि जसा जसा आयुष्याचा किनारा जवळ येऊ लागतो,
तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा.



मराठी कविता


करु वाटे खरे तर तुला एक फोन
यावा वाटे खरे तर तुझा एक फोन
असे काही होत नाही मग उगाचच
याला कर फोन कधी त्याला कर फोन


फोन तुझा सदा चालू कधी बंद नाही
आणि त्याला तारेचाही आता बंध नाही
पक्षापरी निरोपांची हवेतून ये-जा
हातातून तो ही परी झेपावत नाही
हातामध्ये फोन तरी प्रश्ण एवढाच
बोलायचे काय आणि बोलणार कोण


कसा बघ फोन माझा गावोगाव फ़िरे
हातातल्या हातामध्ये एकटाच झुरे
ह्रदयात साठवल्या काही जुन्या खुणा
टाकवेना फोन बाई जरी झाला जुना
पुन्हा पुन्हा करतो मी बटणाशी चाळा
पुन्हा पुन्हा बदलतो रींगरचा टोन !


खिडकीत साधुनिया सिग्नलचा कोन
कसे कसे किती किती बोलायचा फोन!
आता कसा उगामुगा वरवर बोले
जिभेवर जसे काही त्याच्या वारे गेले !
गोड गोड बोलायला एकटा मी पुरे
भाडायला तरी सखे लागतात ना दोन !



प्रेम


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?


असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !


तरीसुद्धा
तरीसुद्धा,


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !


मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !


सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !


आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !


बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !


तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !


कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !


प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !


असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही;
पाप"


प्रेम

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,

माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे,

तू आहेस माझी स्वप्न परी,
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी,
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी,
मी मात्र तसाच राहील वार्यावरी,

येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी,
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी,
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी,

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!

च्यायला परत हिचा फोन....


प्रीत

च्यायला परत हिचा फोन.......,
च्यायला परत हिचा फोन.......,
आणि पुन्हा तेच प्रश्न,
कुठे आहेस..?, कसा आहेस..?,
काय करतोssssssय ..,?
झाली का कामं..?
कप्पाळ माझं...!,
हिला समजत नाही का.., मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन,
चायला, च्यायला परत हिचा फोन.......,

कुठे पाळून नाही जाणार, सयंकाळी येइल न घरी,
'तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते...,
सारं काही सांगेल.
झालंsssssss.., रडा-रडी सुरु - , 'तू खुप बदललाय,
लग्न आगोदर असा नव्हातास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, ' तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकनार कोण.?,
च्यायला परत हिचा फोन.......,

बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, ---- यू आणि काय काय..,
SMS पाठवला, भावना पोहोचल्या मग फोन चे काय काम,
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्यानी ओरडतोच,


आयुष्य

मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो
मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो
मला, स्वप्नही बघण्यासाठी वेळच नसतो...

वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो...

ओळख असलेलेच भेटती लोक मला, पण
बघून 'त्यांना' हसण्यासाठी वेळच नसतो...

प्रेम कुणीही का माझ्यावर करीत नाही?
प्रेम कुणा का करण्यासाठी वेळच नसतो?...

नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हा
नशिबी माझ्या 'घडण्यासाठी' वेळच नसतो...

'अजब' चालली कशाला पुढे इतकी दुनिया?
कुणास मागे वळण्यासाठी वेळच नसतो...

मराठी कविता

मावळत्या पहिल्या किरणाचा आनंद मी
पानावर शांत पहुडणारा दवबिन्दु मी
सागराशी नाळ जोडणार्‍या नदीचे समिप्य मी
किनार्‍यावर आदळणार्‍या लाटेचा आवेग मी
पावसाच्या थेंबाकरिता आतुरलेला चातक मी
स्वार्थी जगातील 
उरलेली माणुसकी मी


मैत्री

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा....

 प्रेम


जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल


आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील




जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...


तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....


माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

कोणी तरी लागतं असावं...

प्रेम


कोणी तरी लागतं असावं,
आपल्याला आपल म्हणणारं
आपल म्हणताना आपल्यातलं
शहाणपण जाणणारं.


एकदा मला ना
तू माझी वाट पहाताना पहायचंय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळूच लपून रहायचंय.


माझ्या वहीचं एक पान
कोरच राहून गेलं
आता वही जुनी झाली पण
त्यावर लिहायचच राहून गेलं.


विसरलेलं सगळं
पुन्हा आठवतं
सगळं विसरलोय
हे आठवलं की.


असे बेसावध क्षणच
सावधपणे टाळायचे असतात
जवळ येताना दुराव्याचे
काही नियम पाळायचे असतात.


पुसणारं कोणी असेल तर
डोळे भरुन यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे.


मी आहेच जरा अशी
एकटी एकटी राहणारी
वाळकं पान सुद्धा गळताना
तन्मयतेने पाहणारी.


पिंपळाचं रोप कसं
कुठेही उगवतं
कुठेही उगवतं म्हणून
त्याचं कसही निभावतं.


मरताना वाटलं
आयुष्य नुसतच वाहून गेलं
मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना
माझं जगायचंच राहून गेलं.



कधी असेही जगून बघा.....


माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....


कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....


संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....


वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....


प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा ...............



प्रेम...


इतकी का सुन्दर दिसतेस तू
इतकी का सुन्दर दिसतेस तू


मी विचारल्यावर
हळूच गालात का हसतेस तू
उघड कधीतरी हे रहस्य
ही कसली जादू केलीस तू


तुझ्यातच माझं मन रमत
तुझ्या सहवासताच ते हसतं
का समजुन घेत नाहीस तू
इतकी का सुन्दर दिसतेस तू


मनाच्या चित्रात रंगवल य तुला
प्रत्येक कवितेत कोरलय तुला
नाही भेटत कधी मला तू
तरी खुशाली का पुसतेस तू


इतकी का सुन्दर दिसतेस तू
डोळे बंद करताच येतेस तू
डोळे उघडताच जातेस तू
एवढच तुझं माझं नातं
नसतानाही माझ्या सोबत असतेस तू


इतकी का सुन्दर दिसतेस तू
इतकी का सुन्दर दिसतेस तू ????



मराठी कविता


आले आकंठ भरून
दिवेलावणीचे सल
पायातल्या सावल्यांची
नाही लागली चाहूल...


थेंब थेंब वेचणारा
हात असावा हाताशी
जिवाभावाच्या भेटीची
जशी तहान तळाशी...


एक डोळयातली वाट
एक अंगाच्या गावाची
क्रौंचवधाला किनार
वेधवंती विभ्रमाची...
कोणी पाहण्याच्या आधी
वाटे झाकावेत डोळे
आपल्याच नजरेला
दिसे डोळयातले काळे...


जागता हे अंगामध्ये
गाणे जुनेच नव्याने
माझ्या एकतारी पोटी
किती अव्यक्त तराणे...



आयुष्य


आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा !!!



मैत्री
चांगला मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांना मिळतोः
गर्दीतल्या थोडयांशीच आपला सूर जुळतो ....


सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करत
अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरत ...


सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे
त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यक्तीत होत आहे...


आपनातं कायम राहो हीच सदिच्छा
जीवनातील पत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्या !!



आयुष्य


कळत - नकळत कस आयुष्य बनत ,
जीवनाच गणित डोळ्यांसमोर उलगडत ,
आईची माया आठवताच मन भरून येत ,
खरच.. तिच्यासारख आपल्या कुणीही जवळच नसत ,
तिच्या सोबतीत जीवन स्वर्गापरी भासत ,
जस परिस लोखंडाला स्पर्श करत ,
शाळेत असताना मित्रांची सोबत असते ,
तिथे घडलेल्या सुख- दू:खाला त्यांच्या प्रेमाची झालर असते ,
त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मोलाचा असतो ,
कारन त्या क्षणाला समजुतपनाचा ओलावा असतो ,
तरुनाईच्या उम्बरठ्यावर पाउल ठेवताच कस पंख आल्यासारख वाटत ,
अन उडताना आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी हव असत ,
प्रेयसीच्या सोबतीत हायस वाटत ,
अन तिचा विरह जीवनात पडलेल विरझन वाटत ,
तरीही सर्व विसरून सुखाने सुरुवात कराविशी वाटते ,
कारन मागे पडलेल्या पाउलखुना अनुभवाची शिदोरी देते ,
एखाद्या सायंकाळी निवांतपणे हे सर्व आठवत ,
अन जीवनाच्या गणितात काय बाकी राहिल हे कळत -नकळत समजुन जात...



मैत्री


इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे


असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे


आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे.



कुणीतरी असाव .........


कुणीतरी असाव .........
कुणीतरी असाव,
आपल वाटणार,
कुणीतरी असाव,
आठवण काढणार !


कुणीतरी असाव,
स्वप्नी येणार !
कुणीतरी असाव,
आसव टीपणार !


कुणीतरी असाव,
गाली हसणार !
कुणीतरी असाव,
लाजवणार !


कुणीतरी असाव,
मोहरवुन टाकणार !
कुणीतरी असाव,
चांदण्यांचा वर्षाव करणार !


खरच कुणीतरी असाव,
क्षितिजापार घेवून जाणार



प्रेम....


का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते
कुणीतरी आपल्यासाठी असावे
ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे
आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे
रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे


मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे
उशिर झाला केंव्हा तर लटके लटके रुसावे
पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे


केंव्हा नटता सावरता आपण
त्याने मनापासुन कौतुक करावे
का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..
कुणीतरी आपल्यासाठी असावे!



कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही




मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

युष्य


तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....