Saturday, May 28, 2022

post 15

मी कागद झाले आहे.....

अंदमानात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्य स्फुरू लागले. 
जवळ कागद नव्हते. 
त्यांनी उष:कालच्या आभाळाला विचारले, 
'माझा कागद होतोस काय?'
आभाळ उत्तरले....
मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?
माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार

आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'

मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'

(ती पहाट लालम् लाल - अनपेक्षित झाली काळी)
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली

'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली........

मित्रांनो, सावरकरांच्या कवितांचा व साहित्य निर्मितीचा इतिहास मोठा रोचक आहे. आराम खुर्चीवर बसून शांतचित्ताने आभाळाकडे पाहात कविता लिहिण्याचे योग सावरकरांच्या नाशिबी नव्हते. 
मार्सेलीसच्या बंदराजवळ मोर्या बोटीतून समुद्रात उडी घेवून सावरकरांनी जगाला आपल्या अतुलनीय धैर्याचा परिचय करून दिला. 

माझे कान पकडण्याचा अधिकार केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनाच असेे ते आत्मविश्वासपूर्वक म्हणायचे. 

औरंगजेबाच्या कैदेतून सहीसलामत निसटण्याचा पराक्रम महाराजांनी केला होता. तो प्रसंग सावरकरांना प्रेरणा देत होता. अचाट शौर्याचा परिचय देत आगबोटीतून निसटलेले सावरकर दुर्दैवाने पकडले गेले. ब्रिटिश शिपायांनी सावरकर चोर असल्याची बतावणी करून त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उलंघन करत फ्रांसच्या भुमीवर अटक केली. सावरकरांच्या बेड्या ठोकलेल्या  शरीरावर जोड्याच्या टाचांचे शिपायांनी प्रहार केले. निसटू न शकल्याचे अपयश पदरी आलेले व शरीरावर जीवघेणे प्रहार सुरु असतांनाही सावरकर डग़मगले नाही. या मृत्युंजयाला तिथेही कविता स्फुरते.. 

अनादी मी, अनंत मी, अवध्य मी भला....
मारिन मज जगती असा रिपू कवण जन्मला !

Fb page @ स्वा.  सावरकर


post 14

हे हिंदूशक्ती-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदूतपस्या-पुत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदू-नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ... 
                 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
Fb share

post 12

Great to see बदलता बॉलीवुड 

मुग़ल नहीं #Prithviraj चौहान अब नायक है

सिर्फ गांधी ही नहीं राष्ट्र नायक #VeerSavarkar अब फिल्मों के भी महानायक है

असली भारत की फिल्में अब बननी शुरू हुई है

शुभकामनाएं  
#SwatantraVeerSavarkar 
#139yearsofsavarkar

Fb @  Kapil Mishra

post 11

माँ भारती की सेवा में अपना सम्पूर्ण जीवन समर्पित करने वाले अभिजात राष्ट्रभक्त एवं महान स्वतंत्रता सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जी की जयंती पर उन्हें कोटिशः नमन।

मातृभूमि के लिए 'वीर सावरकर' जी का त्याग और बलिदान करोड़ों भारतीयों के लिए प्रेरणास्रोत है।

Fb Dr. Sambit  Patra

post 9

#बखरसावरकरांची #पुस्तक 

तयार केलेले सगळे ग्रुप्स बऱ्यापैकी भरले असल्यानं पुढच्या तीन ग्रुप्स च्या लिंक्स देत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित बखर सावरकरांची या पुस्तकातील लेखन सावरकर जयंती म्हणजेच 28 मे 2022 पासून प्रत्येक दिवशी एक कथा याप्रमाणे प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे. 

आपणास किंवा अन्य सावरकर प्रेमी मंडळींना बखर सावरकर मधील लेखन हवे असल्यास त्यांनी खलील व्हाट्सएप ग्रुप मधील एक ग्रुप जॉईन करावा. लिंक वरून ग्रुप जॉईन करता येईल. प्रत्येक दिवशी संध्याकाळी आपणास त्या ग्रुपवर एक मेसेज येत जाईल. ५ ग्रुप्स बऱ्यापैकी भरले आहेत,म्हणून पुढच्या ३ ग्रुप्स च्या लिंक्स देतो.

(वीर सावरकरांचे सोप्या भाषेत लिहिलेलं संपूर्ण चरित्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे यासाठी हा प्रयत्न आहे.) 

अधिकाधिक लोकांना या अभियानात सामील करून घ्यावे, ही विनंती.

~आदित्य रुईकर

लिंक्स

६. https://chat.whatsapp.com/C7Nx5723Z9oIbxi5DWHruw

७. https://chat.whatsapp.com/DZhPyy4MjhK9r7MS9ES936

८.  https://chat.whatsapp.com/D26G9isqMEW2e8V52yu3Vg

3. 
https://chat.whatsapp.com/B86xwWpNxJiLi6G4B4xSIX


Thursday, May 26, 2022

post 7

हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोहही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करणे सोडणार नाही.
*
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. 
पण, एकच गोष्ट अशी आहे की 
जी एकदा हातातून निसटली की, 
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
 आणि ती असते..
      "आपलं आयुष्य"..
          म्हणूनच..
    ....मनसोक्त जगा..
*
डीडी क्लास : आपल्या आयुष्याची वही तीन पानांची असते. पहिल्या पानावर "जन्म" लिहिलेला असतो तर तिसऱ्या पानावर "मृत्यू"
मधलं पान कोरे असते 
ते म्हणजे आपले जीवन असते ! 
त्या कोऱ्या पानावर आपण आपल्या कर्माने काय लिहितो 
त्याचेच रिटर्न आपल्याला मिळतात !
त्या कोऱ्या पानातील किमान चतकोर भाग जरी 
इतरांच्या आनंदासाठी राखीव ठेवलात 
तरी तुमचं पूर्ण पान समृद्धीने भरून जाईल !
स्वानुभवाने सांगतोय 
बँक बॅलन्स पेक्षा फ्रेंड बॅलन्स महत्वाचा ठरतो !
तो ज्याचा जास्त 
तो जगेल मस्त !
ⓒधनंजय देशपांडे  (dd)

Sunday, May 15, 2022

post 8

ना पुणेकर,  ना मुंबईकर आम्ही आहोत ठाणेकर!🤣😅

My old एडिटींग 🙃🙂 जिकडे बघू तिकडे इंग्रजी  भाषेत शहरांची नाव म्हणून हे सुचले.

सगळ बाहेरच्या  देशातला कॉपी पेस्ट करायची गरज काय??

Saturday, May 14, 2022

post 4

जी .ए. कुलकर्णी - कथासंग्रह पिंगलावेळ- कथा ‘ऑर्फियस’
-आंतरिक सुखाचा शोध घेणारी एक शोकांतिका
समीक्षक - श्रीनिवास हवालदार
जी .ए. कुलकर्णी यांची  ‘ऑर्फियस कथा एका ग्रीक पुराणकथेवर आधारित आहे. मूळ पुराणकथेत ‘ऑर्फियस’ हा तंतुवाद्य [सारंगी] वाजवणारा महान वादक आपल्या संगीताच्या सामर्थ्याने मनुष्य ,पशुपक्षी,वृक्ष व दगडधोंडे यांनादेखील प्रभावित करतो ते इतके की ते त्याचे संगीत ऐकण्यासाठी त्याच्या मागे धावत असतात. ऑर्फियस कथेचे बरेच ग्रीक Versions आहेत परंतु खालील कथानकाबद्दल सामान्यतः एकमत आहे. जी.ए. नी या पुराणकथेस जीवन आणि मृत्यु यांचा परिवेश पांघरून  आंतरिक सुखाचा शोध घेणारी एक शोकांतिका घडवून एक नवीनच संदेश दिला आहे.
ऑर्फियस आणि त्याची प्रेमिका युरिडिसी यांच्या लग्नाच्या दिवशीच युरिडिसीवर एक अन्य प्रेमी तिच्यावर होणाऱ्या बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो.याचा प्रतिरोध करण्यासाठी जंगलात पळून जाताना युरिडिसी  साप चाउन मरते आणि तिच्या मृत्यूमुळे व्हिवळ झालेला ऑर्फियस तिला जिवंत परत आणण्यासाठी आपल्या संगीताच्या सामर्थ्यावर अनेक बाधा दूर करून मृत्युलोकाच्या डोहात प्रवेश करण्यात सफल होतो. तेथील दारावरच्या महाकाय, भीषण तीन मुखे असलेल्या श्वानास आपल्या अमोघ वादनाने गुंगवुन मृत्युलोकात मृत्यू देवते पर्यंत पोहोचतो. मृत्यू देवता Hades ही त्याच्या संगीतामुळे मुग्ध होते आणि ऑर्फियस मृत्युदेवतेकडून युरिडिसीला पृथ्वीवर पोचे पर्यंत तिच्याकडे मागे वळून न पहायच्या अटीवर परत न्यायची परवानगी मिळवतो पण ऑर्फियस मृत्युदेवतेच्या युरिडीस मृत्युलोकात परतण्याच्या आश्वासना बद्दल साशंक असतो आणि युरिडीस खरोखरीच आपल्यामागे येत आहे का नाही हे बघण्यासाठी मागे बघतो आणि त्याला युरिडिसी मृत्युलोकात परत जाताना दिसते.  पृथ्वीवर पोहोचण्याच्या काही क्षणापूर्वीच ऑर्फियस मागे वळून बघतो आणि त्याला युरिडिसी मृत्युलोकात परत जाताना दिसते. ही घटना केंद्रस्थानी ठेऊन  नंतर जी. ए. ग्रीक पुराणकथे पासून वेगळे होऊन कथेस अगदी वेगळीच कलाटणी देतात परंतु त्या अगोदर मूळ पौराणिक कथेचा शेवट समजणे आवश्यक आहे.
ऑर्फियस पुनः त्याच्या संगीताच्या माध्यमाने  मृत्युलोकात जाण्याचा प्रयत्न करतो परंतु असफल होऊन पृथ्वीवर येतो. तो पृथ्वीतील दुसऱ्या कोणाही स्त्रीशी प्रेम करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो.यावर Thrace येथील काही जंगली स्त्रिया मत्सर भावनेने त्याला धरून त्याच्या शरीराचे दोन फाक करून एका पहाडा खाली पुरून देतात पण त्याचे डोके सतत  गाणाऱ्या अवस्थेत समुद्रात फेकून देतात. ग्रीक तत्ववेत्ता Plato ह्याने ऑर्फियसला 'भेकड' म्हणून संबोधिले आहे आणि त्याला त्याच्या भेकडपणाची कठोर शिक्षाही मिळाली असेही त्याचे मत आहे.”In fact, Plato's representation of Orpheus is that of a coward, as instead of choosing to die in order to be with the one he loved, he instead mocked the gods by trying to go to Hades to bring her back alive. Since his love was not "true"—he did not want to die for love—he was actually punished by the gods, first by giving him only the apparition of his former wife in the underworld, and then by being killed by women.”
आता जी. ए. ने ग्रीक पुराणकथे पासून वेगळे होऊन कथेस अगदी वेगळीच कलाटणी कशी दिली या बद्दल विचार करू.पृथ्वीवर पोहोचेपर्यंत मागे न पाहण्याची अट स्वीकारहूनही त्याने विपरीत आचरण का केले हा जी.ए.च्या कथेतील मुख्य मुद्दा आहे.याचे कारण मृत्यूलोकापासून पृथ्वीपर्यंत च्या मार्गात या दोघांच्या वार्तालापात सापडते. दोघांना एकमेकाशी बोलण्याची मुभा मृत्युदेवतेने दिली होती हे उल्लेखनीय आहे.
ऑर्फियस आणि युरिडिसी  या दोघांचा वार्तालाप वाचला तर कळेल की   ऑर्फियसला तिच्या मृत्यूपूर्वीच्या सर्व सुखद आठवणी त्याच्या मनात बिंबलेल्या आहेत आणि पृथ्वीवर पोहोचल्यावर पुन्हा दोघांचे जीवन पूर्वीप्रमाणेच आनंदी असेल असे त्याला वाटते. यावर युरिडिसीचा प्रतिसाद फारच निराशाजनक असतो. ती आर्त  स्वरात म्हणते की उत्कट आनंदाचे आपण गोळा करीत असलेले क्षण म्हणजे अखेर मृत्यूच्याच गळ्यात घालायच्या हातातील मणी आहेत, हे मला आता उमजत आहे. ती म्हणते की आपण अनेक वृद्ध, जर्जर माणसं पाहतो पण त्यांची दयनीय अवस्था म्हणजे आपलीच भविष्यातील प्रतिबिंब आहेत हे आपणास फार उशिरा जाणवते. आपले अनेक क्षण सुखाचे असतात परंतु ते सतत हातातून निसटत असतात याची जाणीव आपणास होत नाही. सगळ्यांचं मृत्यू अटळ आहे याची जाणीव सर्वांना  असते परंतु माहित असणं निराळं आणि आपण तो स्वतः भोगण निराळं. ऑर्फियस तिच्या शब्दाने चमकतो.तिच्या बोलण्याने ऑर्फियस समजतो की मृत्यूचा भीषण अनुभव घेतलेली युरिडिसी आणि मृत्यूपूर्वीची युरिडिसी ह्या दोन वेगळ्या व्यक्ती झाल्या आहेत. मृत्युचा अनुभव घेतलेली ही युरिडिसी त्या्ची लाडकी युरिडिसी असुनही मृत्युच्या भीषण अनुभवाने पूर्वीची युरिडिसी राहिलेली नाही. यानंतर पृथ्वीवर जिवंतपणात ही मृत्युचा तो भीषण अनुभव तिचा पाठलाग करणार आहे आणि त्यामुळे तिला जिवंतपणाही मृतःप्राय भासणार आहे. तिच्यासोबत पूर्वीचे जीवन जगणं शक्य नाही. तो युरिडिसीला पृथ्वीवर परत मृत्युलोकात पाठविण्याचा निर्णय घेऊन मुद्दाम मागे वळून तिच्याकडे पाहतो आणि युरिडिसी आर्त किंकाळी देऊन नाहीशी होते.
युरिडिसी लुप्त  झाल्यावर ऑर्फियस तेथे विचारमग्न होऊन उभा राहतो आणि त्याने घेतलेला निर्णय योग्य होता की काही दुसरा निर्णय शक्य होता या व्दिधा मनस्थितीत पुन्हा मृत्युदेवतेस भेटण्यास जाऊन प्रायश्चित स्वीकारण्याची तयारी दाखवतो. मृत्यु देवता त्याची कानउघाडणी करून परत जाण्याचा आदेश देतो.  मृत्युचा अनुभव घेतलेल्या युरिडिसीला जिवंतपणाही मृतःप्राय भासणार आहे आणि त्यामुळे तिच्यासोबत पूर्वीचे जीवन जगणं शक्य नाही हा तर्क ऑर्फियसने मृत्यदेवतेस पटवून दिल्या नंतर मृत्युदेवता त्याला पुनः त्याला युरिडिसी सहा महिने त्याच्याबरोबर सहा महिने पृथ्वीवर आणि सहा महिने मृत्युलोकात एकटी राहण्याचा पर्याय देते आणि या पर्यायाने त्याचे जीवन शक्यतोवर सुखकारक होऊ शकते याची कल्पना देते. मृत्युदेवता त्यास समजावते की क्षणभंगुरतेने माणसाचे मन विषण्ण होण्याचे कारण नाही. आपला प्रवास अगदी तात्पुरता आहे आणि या वाटेने पुन्हा येण्याची संधी मिळणार नाही हे समजूनच सुखाचा उपभोग घ्यायला हवा.
ऑर्फियसला देवते ने दिलेला पर्याय पटतो परंतु युरिडिसी आपल्या पूर्व मतावर ठाम असते वारंवार मृत्यू आणि जीवन यांचा जीवघेणा खेळ खेळण्यास नकार देऊन ती ऑर्फियसला परत जाण्यास सांगते.
जी.ए. ने  शेवटी  ऑर्फियस आणि युरिडिसी दोघांबद्दल म्हटले आहे " ती  दोघंही शहाणी आहेत , कारण त्या दोघांनीही आपल्या मर्यादा ओळखल्या आहेत. यालाच कदाचित ज्ञान देखील  म्हणता येईल”
"

Thursday, May 12, 2022

post 3

 कोणाला स्वत च्या किंवा  इतरां च्या 
पुस्तक परिचय video..
किंवा अभिवाचन शेअर करायचा असेल तर 
Eaksharman  youtube channel  वर publish करू शकता. 
Msg मध्ये कळवा .
Neeta Jaywant

#vidyamslife