Tuesday, July 6, 2021

माझे अंतरंग

ईशान्य वार्ता या त्रैमासिकातून संपादक "उत्तम रानडे काका"(Uttam Ranade) यांनी माझे अंतरंग (भटकंती विशेष) या पुस्तकाबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया.....
धन्यवाद काका... आपले आशीर्वाद असेच कायम राहूदे..._/\_

धीरज लोके (२००७)

Friday, July 2, 2021

शंख

शंख...पृथ्वीवर मिळणारं एक चमत्कारिक शास्त्र ..हो शास्त्रच म्हणावं लागेल.समुद्रमंथनात प्राप्त झालेल एक उत्तम रत्न आहे.शंखाला श्री लक्ष्मी देवींचा छोटा भाऊ मानला जातो.अथर्व वेदाच्या चौथ्या कांड मध्ये दहाव्या सुक्तामध्ये म्हटलं गेलं आहे की शंख हा अंतरिक्ष ,वायु,ज्योतिमंडल आणि स्वर्ण युक्त आहे.याचा ध्वनी शत्रूला म्हणजेच नकारात्मक उर्जेला निर्बल करतो,राक्षस /पिशाच्च यांना वाशीभूत करतो,अज्ञान व दारिद्रता,रोग निवारण करतो आणि आयुष्य वृद्धी करतो.
       शंख रोज वाजविणाऱ्या व्यक्तीची फुफ्फुसे खूप मजबूत असतात.अशी व्यक्ती दमा अस्थमाची शिकार होत नाही.शंख वाजविल्यानंतर शरीरातील पेशी आणि पेशी जागृत होतात.मेंदू जागृत होऊन मुक्ती स्थिती प्राप्त होते.शंखामध्ये गंधक,फॉस्फरस आणि कॅल्शियम आहेत.त्यामुळे शंखात पाणी भरले व ते प्यायले असता हे गुण आपल्याला मिळतात.शाखाचे पाणी किटानुनाशक आहे तसेच हे पाणी रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.शंखनाद नियमित करणाऱ्याना यकृताची समस्या ,डोकेदुखी,कर्णबाधा होत नाही.याचा ध्वनी मानसिक तणाव दूर करतो व त्यामुळे कुंडलिनी जागृत होतो.लहान मुलांमध्ये वाणी समस्याच असल्यास मुलांना शंखजल दिल्यास ही समस्या दूर होते असे म्हणतात.
      जोरात शंखनाद केल्याने गॅस्ट्रिक आणि पोटाच्या समस्या दूर होतात.शंख वाजविल्याने छातीचे स्नायू बळकट होतात.गळ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.vocal cord आणि थायरॉइड संबंधित समस्या दूर होतात.शंख वाजवत अस्तनाशरीरात रक्तप्रवाह वेगाने होतो,केस गळण्याची समस्या देखील दूर होते,चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळून सुरकुत्या दूर होतात,रात्रभर पाणी ठेवलेले शंखजल त्वचारोगावर लावल्यास त्वचा रोग दूर होण्यास मदत होते,शंखजलामध्ये गुलाबपाणी मिसळून केस धुतल्याने ते काळे व मुलायम दाटही  होतात ,शंखजल मध्ये तेवढेच पाणी मिसळून डोळे धुतल्यास डोळे निरोगी होतात.शंखजल सकाळी 3च. घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होते.शंखनाद केल्याने प्रोस्टेट मसल्सना व्यायाम होतो,आंघोळीनंतर शंख त्वचेवर घासल्यास त्वचा उजळते व टवटवीत होते.
    माझा स्वतःचा अनुभव आहे की शरिरात उष्णता वाढल्यास शंख तळहातावर काही वेळ घासावा,म्हणजे शरीराचा दाह कमी होतो,शंखजलाने बीपी  नॉर्मल राहायला मदत होते.
       महाभारतातील श्री कृष्णांचा पांचजन्य शंख प्रसिद्ध आहे.तसेच अर्जुनाचा देवदत्त,भीमाचा पौंड्र ,युधिष्ठिराचा आनंतविजय ,नकुळाचा सुघोष व सहदेवचा मणीपुष्पक शंख प्रसिद्ध आहेत.शंखाचे एकूण तीन भाग आहेत1)पन्हळ 2)अग्र 3)मागील बाजू जिथे वलय असतात.
    शंखाच्या पृष्ठभागावर ब्रम्हा व अग्रभागात गंगा,यमुना आणि सरस्वतीचा वास आहे.दक्षिणावती शंखाच्या वरच्या बाजूला चंद्राचा वास असतो तर मध्य भागाला वरुणाचा.शंखजल स्नान तिर्थसमान फळं देते.
     जिथे शंखनाद होतो तिथे ईश्वरकृपा होते.शंखध्वनी जिथवर पोहोचतो तिथवर सकारात्मक ऊर्जा पसरते.हवेतील काही घातक विषाणूदेखील शंखनादाने मरतात.आपण शंखाला कान लावला तर समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.शंख हा एक नादब्रम्ह आहे.शंखाचे तसे अनेक प्रकार आहेत पण शास्त्रानुसार वामवर्ती व दक्षिणावर्ती हे प्रमुख.
   शंखनाद शुभ जरी असला तरी रात्रीच्या वेळी तसेच संध्या आरतीला शंख वाजवणे अशुभ मानले गेले आहे.तसेच गर्भवती महिलांनी शंखनाद करू नये,अन्यथा गर्भावर अवास्तव दबाव पडण्याची शक्यता असते.पूजेचा शंख वाजविण्यास वापरू नये.शंख नर व मादी देखील असतात.नर शंख उजवे(पोकळ बाजू उजवीकडे) तर मादी शंख दवे असतात.मादी शंख ध्वनी करत नाहीत.उजव्या शंखाना दक्षिणावर्ती तर डाव्या शंखाना वामवर्ती वा लक्ष्मी शंख म्हणतात.
      परिवारात ताळमेळ वाढविण्यासाठी शंख उपयुक्त आहे.
वास्तुशास्त्रमध्ये मध्ये देखील शंखाचे महत्त्व आहे.शंख नेहमी प्रातःकाळीच वाजवाव,शुभ फळं देतो.
   - तन्वी भोसले