Saturday, July 23, 2022

post 6

“Summarizing the immediate action points for the party, Savarkar concluded:

(a)To secure entry for as many Hindu recruits as possible into the army, navy and the air forces.
(b)To utilize all facilities that are being thrown open to get our people trained into military and mechanical manufacture of up-to-date war materials.
(c)To try to make military training compulsory in colleges and high schools.

(d)To intensify the organization of the Ram Sena.
(e)To join the civic guard movement with a view to enable to defend our own people?against foreign invasion or internal anarchy, provided always that the civic guards are not used against any patriotic political movements in India or in any activities detrimental to the legitimate interests of the Hindus. 
(f)To start new industries on large scales to capture the market where foreign articles to defeat the entry of new foreign competitors.
(g)To boycott foreign articles to defeat the entry of new foreign competitors.
(h)To set on foot an all-India movement to secure the correct registration, in the coming Census, of the popular strength of the Hindus including Tribal Hindus such as Santhals, Gonds, Bhils, etc., and to secure their enlistment as Hindus instead of as Animists or Hill Tribes and by taking every other step necessary to secure the object in view.”

Savarkar (Part 2): A Contested Legacy, 1924-1966
Vikram Sampath


post 4

“Summarizing the immediate action points for the party, Savarkar concluded:

(a)To secure entry for as many Hindu recruits as possible into the army, navy and the air forces.
(b)To utilize all facilities that are being thrown open to get our people trained into military and mechanical manufacture of up-to-date war materials.
(c)To try to make military training compulsory in colleges and high schools.

(d)To intensify the organization of the Ram Sena.
(e)To join the civic guard movement with a view to enable to defend our own people?against foreign invasion or internal anarchy, provided always that the civic guards are not used against any patriotic political movements in India or in any activities detrimental to the legitimate interests of the Hindus. 
(f)To start new industries on large scales to capture the market where foreign articles to defeat the entry of new foreign competitors.
(g)To boycott foreign articles to defeat the entry of new foreign competitors.
(h)To set on foot an all-India movement to secure the correct registration, in the coming Census, of the popular strength of the Hindus including Tribal Hindus such as Santhals, Gonds, Bhils, etc., and to secure their enlistment as Hindus instead of as Animists or Hill Tribes and by taking every other step necessary to secure the object in view.”

Savarkar (Part 2): A Contested Legacy, 1924-1966
Vikram Sampath

post 3

*बखर_सावरकरांची:* भाग ४० (०९/०७/२०२२)

*१९. मित्रमेळ्याचा विस्तार.*

 हळूहळू मित्रमेळ्याचा विस्तार होऊ लागला. तात्यारावांच्या संपर्कात येणारा बहुतेक मित्रमेळात सामील व्हायचा. तात्यारावांची मैत्री म्हंटले की, तिचा मुख्य कटाक्ष हाच असे. आपले विचार आपल्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीस सांगावेत. आपले म्हणणे सर्वांना पटवून द्यावे. हा तात्यारावांच्या मैत्रीचा अविभाज्य घटक असे. तात्यारावांना देशभक्ती आणि सशस्त्र क्रांती हे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे सगळ्यात जास्त महत्वाचे वाटे. चकाट्या पिटत बसण्यात त्यांना अजिबात रस नसे. त्यांच्या अभ्यासात, खेळण्यात, बोलण्यात, हसण्यात एकच विचार असे. तो म्हणजे, स्वदेश स्वातंत्र्य. कोणीही त्यांचा एकदा मित्र झाला की, त्यात अमुलाग्रह बदल होत असत. ती व्यक्ती आग्रहाने स्वदेशी वस्तू वापरू लागे. त्या व्यक्तीत स्वदेशाभिमान जागा होई. त्यास स्वदेशाच्या स्वातंत्र्याची तळमळ लागे. पुढे त्यांच्या विचारात देखील देशा शिवाय बाकी काही उरत नसे. यावेळी त्यांचे अनेक जण मित्र होत असत, त्यात जयवंत बंधू आणि शंकर वाघ देखील होते.

 मित्रमेळ्याच्या सभासदांना त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे विषय दिले जात. त्या विषयात त्या सभासदाने पूर्ण अभ्यास करून त्या विषयाची तयारी करायची. त्यासाठी लागले तर ग्रंथ वाचावेत. त्यावरून निबंध लिहून काढावा, तो इतर सर्व सभासदांसमोर वाचून दाखवावा किंवा त्यावर भाषण द्यावे. शनिवार, रविवारच्या बैठकीत अशी भाषणे ठेवली जात. त्यामुळे सर्वच सभासदांना अनेक विषयातील माहिती होई. विविध विषय त्यांचे तयार होत. आपले विचार मांडण्यासाठी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना पुरेस साधन मिळत असे. ज्या सभासदांना अभ्यास करून विषय मांडण्याची जबाबदारी दिलेली असे, ते देखील मनापासून आपले काम करत असत.

 प्रत्येक बैठकीस तात्याराव उपस्थित असतच. पण अनेक सभासदांना या साप्ताहिक बैठकीत फारसा रस नसे. बैठकीत चालणाऱ्या चर्चेत उत्साह वाटत नसे. अशा सभासदांना सार्वजनिक मिरवणुका किंवा एखाद्या उत्सवात जास्त रस असे. त्यामुळे अशी काही मंडळी फक्त कार्यक्रमापुरती जमत. किंवा बैठकीस कोणी मोठा माणूस बोलावलं की तेवढ्या पुरती ही मंडळी येत. त्यांना प्रत्येक सप्ताहात तेच ते चिंतन, मनन नको असे. (१)
© आदित्य रुईकर

post 2

  एक धनी जाऊन दुसरा यावा अशी हिंदूंची इच्छा नाही. हिंदुस्थानच्या सीमेत जन्मला म्हणून एडवर्डचे जागी औरंगजेब आणावा येवढयासाठी लढा, युध्द करुन प्राण देण्यास हिंदू सिध्द झालेले नाहीत. यापुढे स्वत:च्या भूमीवर, स्वत:च्या घरात, स्वत:च स्वामी व्हावे अशी हिंदूंची इच्छा आहे.

post 1

“Even the so-called nationalist Muslim leaders of the Congress like Maulana Azad say openly that they will not compromise on the interests of Muslims in India. Have you heard any Hindu leader talk about Hindu interests so openly? If a Hindu starts speaking like this, the Congress will start calling him communal. Isn’t this unfair?

Savarkar in 1940 in South India 

Savarkar (Part 2): A Contested Legacy, 1924-1966
Vikram Sampath

Friday, June 24, 2022

post 3

#fbshare  ! 
......
आता वर्क फ्रॉम होममुळे घरूनच काम असतं पण एका वेळेला तसं नव्हतं. सलग दोन, तीन, चार महिने पुण्यातच जायचे आणि मग घरची गावची आठवण यायला लागायची. कधीतरी MH०७ पासिंगची गाडी पुण्यात दिसली की एकदम बरं वाटायचं, कुठला का माणूस असेना, तो देवगडचा असेना कि बांद्याचा. आपण एकाच जिल्ह्यातले, आपल्या आवडीनिवडी एकच,  त्यालाही चायघावणे, आंबोळीचटणी आवडतच असणार, तोही माझ्यासारखाच काजीआंब्याला पिसाच असणार, देवळाचं पालखीचं जत्रेचं दशावताराचं त्यालाही माझ्यासारखंच अप्रूप असणार. "खयले तुम्ही" अशी हाक घातल्यावर तोही खुश होऊन उत्तर देणारच असं वाटत राहायचं. साधारण २०१४ मध्ये टिळक रोडच्या इथे गाडी थांबवून चहा पित असताना दोन मुलांनी बाईकची नंबरप्लेट बघून हाक मारली,  "काय ओ, खयचे तुम्ही". "मी कणकवलीचो, तुम्ही खयचे?", ह्यावर त्यांचं "आम्ही फोंड्याचे" असं उत्तर आलं, फक्त १४ किलोमीटर अंतर आमच्या गावात. म्हणजे आपलीच माणसं ती. एकदम हायसं वाटलं. 

एकदा विकेंडला संध्याकाळी झोपेतून उठलो तेव्हा रूमवर कोणीच नव्हतं, उठून बाहेर येऊन बसलं तरी काही हुरूप वाटत नव्हता. अरविंद गोखले कथा लिहायचे त्यातल्या काहूर मन:स्थितीसारखं वाटायला लागलं. जरा चालून येऊ म्हणून बाहेर पडलो तर वाटेत एक माणूस भेटला, बोलता बोलता समजलं कि ते सावंतवाडीचे गावडे आहेत. गाडी रुळावरून घसरावी तसं आम्ही पुढच्या क्षणाला मराठीवरून मालवणीवर घसरलो आणि मीही तिकडलाच म्हटल्यावर तेही उत्साहाने बोलू लागले. गप्पा होत गेल्या, पुढे चालता चालता वळणावर दत्त आश्रम आला तिथे ते या म्हणाले. तिथे गेलो तर लक्षात आलं कि इथे सिंधुदुर्गातले बरेच जण होते, त्यांच्या इकडच्या तिकडच्या गजाली ऐकता ऐकता मन गावातल्या तिठ्यावरून, सडयावरून, गोरवांच्या पाठीवरून, व्हाळातून धावायला लागलं आणि बघता बघता उगाचच काळवंडलेलं मन लख्ख दिव्यासारखं झालं. 

एसटी रात्रीच्याच असायच्या, एसटीत बसलं कि ती ह्या स्टॅन्डमधून त्या स्टॅन्डवर जात राहायची, फक्त पणजी गाडी असल्यामुळे गाडीत मालवणी, कोकणी ऐकू यायला लागायचं. मागे वळून बघितलं तर नऊवारीतल्या म्हाताऱ्या बायका दिसायच्या, टिपिकल ढगळ शर्टपॅन्ट घातलेले बाप्ये दिसायचे. वाटायचं कि आपली ओळख नसली तरी आपली भाषा सारखी आहे, भुकेला हात पसरला तरी कोणी नाही म्हणायचं नाही, "मका पण देवा जरा वायच " एवढं म्हटलं कि डबा सरकवला जाईल याची खात्री वाटायची. गाडी कात्रज, सातारा, कराड, कोल्हापूरमधून जाताना अध्येमध्ये झोप येत राहायची, मधेच जाग यायची पण एकदा का एसटी गगनबावडा घाट उतरली कि मग ओळखीच्या खुणा दिसायला लागायच्या, लाल माती दिसायला लागायची, डांबरी काळे रस्ते, त्याच्या बाजूला मळे, मळ्यातली तरव्यांची खुट, अध्येमध्ये लागणाऱ्या वाड्यांचे बोर्ड, डोक्यावर कौलं घेतलेली घरं, देवळं दिसायला लागली कि आपण आपल्या जागेत आलो याची खात्री पटायची, वाटायचं - एसटी थांबवून इथेच कुणाकडे उतरलं तरी आपल्या घरात आणि इथे काही जास्त फरक वाटणार नाही, आपण सगळे एकाच जमिनीवरचे आहोत. तेव्हा माझ्या लक्षात आलं कि अगदी काटा खोलवर रुतावा तसं कोकण माझ्यात रुतलेलं आहे. 

   © रोहित भिडे


Sunday, June 19, 2022

post 2

कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे नवीन पुस्तक ‘मराठीतील काव्यरंग - -एक समीक्षात्मक अध्ययन’
लेखक- श्रीनिवास हवालदार
********************************************************************
- ओळख-
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश
- सुधीर मोघे
मराठी साहित्यातील गूढरम्य कवी ग्रेसच्या १७० कविता दोन पुस्तकांच्या माध्यमाने ‘धुक्यातून प्रकाशाकडे’ आणल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की ग्रेसच्या कविता सखोल विश्लेषण करून रसिकांसमोर आणण्याचे साहस तर अन्य समीक्षकांनी केले नाहीच परंतु बा.सी.मर्ढेकर, आरती प्रभू, बालकवी, ‘बी’ इत्यादी कवींच्या कवितांचे काही समीक्षकांनी केलेले विश्लेषणही कवींच्या अभिप्रेत भावांशी जुळणारे नाही.काही प्रथितयश समीक्षक त्यांच्या कवितांच्या भोवती घिरट्या घालत बसले आणि काहींने तर अर्थ निर्णयात विक्षिप्ततेची सीमा गाठली.कविततेचे संदर्भ आणि अभिप्रेत प्रतिमांची उकल ना झाल्यामुळे असे प्रसंग उद्भवणे अपरिहार्य होते.
माझ्या मते कवितेतील गूढता चांगल्या कवितेचे एक वैशिष्ट्य असते.आनंदवर्धन या भारतीय साहित्यशास्त्रज्ञाने इ.स.च्या ११व्या शतकात ' ध्वनिआत्मा काव्यस्य' म्हणजे ध्वनि हाच काव्याचा आत्मा आहे हा सिद्धांत मांडला.वाच्यार्थाच्या पलीकडील व्यंग्यार्थ हाच ध्वनि असून त्याने ध्वनि हाच श्रेष्ठ काव्याचा निकष मानला आहे.त्याची ध्वनि ही काव्यातील अर्थाचा अर्थ अशा व्यंग्यार्थ संकल्पनेशी संबंधित आहे.याचे स्पष्टीकरण करताना आनंदवर्धनाने उदाहरण दिले आहे की ज्या प्रमाणे स्त्रीच्या ठिकाणी तिच्या शरीराहून वेगळे असे लावण्य दिसून येते त्या प्रमाणेच महाकवींच्या काव्यात वाच्यार्थाहून वेगळा असा अर्थ प्रतीयमान किंवा व्यंग्यार्थ असतो.आनंदवर्धंनाच्या मते या ध्वनीचा प्रत्यय येण्यासाठी रसिकाजवळ विशिष्ट प्रकारची योग्यता लागते.केवळ शब्दार्थ ज्ञानाने तो कळत नाही.त्यासाठी वाचक काव्यार्थ तत्वज्ञ हवा.कवीला महाकवित्व मिळते ते या ध्वनीच्या उचित वापरामुळेच.
कवी ग्रेस हेच तथ्य काही निराळ्या शब्दात असे मांडतात "जीवन,निसर्ग आणि अध्यात्मसत्ता यातील कोणत्याही अनुभवाच्या चक्रव्यूहात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेशकर्त्याजवळ त्या अनुभवात प्रवेश करण्याची एक प्रकारची किमान इयत्ता लागत असते आणि यालाच मी प्रवेशपत्रिका म्हणतो. केवळ इच्छा, लहर म्हणून अशी प्रवेशपत्रिका कुठल्याही अनुभवधारकाला स्वतःजवळ बाळगता येत नाही.एखाद्या कैफात, एखाद्या पोटतिडिकीच्या आविर्भावात अशी पत्रिका अळेबळे घेऊन जर अनुभवधारक त्या अनुभवात शिरला तर त्याच्यावर तो ओढवलेला, त्याने ओढवून घेतलेला दुरापास्त प्रसंगच म्हटला पाहिजे.”
या बाबतीत मर्ढेकरांसंबंधी ही आठवण प्रसिद्ध आहे.श्री.पु.भागवतांनी एकदा गप्पा मारताना मर्ढेकरांना विचारले तुमची ‘झोपलीं ग खुळीं बाळें ' ही कविता मला नीटशी कळली नाही.ती कशाबद्दल आहे? त्यावेळी मर्ढेकर नुसतेच ’ हूं' करून थांबले नाहीत.त्यांनी एका संपूर्ण वाक्यात उत्तर दिले! म्हणाले, “Then the poem does not exist for you at all !”
साहित्य समीक्षा सामान्यतः प्रात्यक्षिक समीक्षा अथवा सूक्ष्म विश्लेषण, सैद्धांतिक समीक्षा आणि वाङ्मयीन ऐतिहासिक समीक्षा या तीन वर्गात विभक्त केली जाते.दुर्बोध, गूढ अथवा गूढतेच्या सीमारेषे वर असणाऱ्या कविता सामान्य रसिकांस सुबोध करण्यासाठी मला प्रात्यक्षिक समीक्षा अथवा सूक्ष्म विश्लेषण करणे हाच एक योग्य मार्ग वाटतो.सैद्धांतिक समीक्षा आणि वाङ्मयीन ऐतिहासिक समीक्षा हे प्रकार शैक्षणिक[ Academic] असल्यामुळे सर्वसामान्य रसिक वर्गासाठी उपयुक्त नाहीत आणि कविता समजल्याशिवाय अनुभवण्याचा आव आणणे ही तर निव्वळ पळवाट आहे कारण निर्मिति करणारा कलाकार केवळ अनुभवण्यासाठी निर्मिति करत नसतो.त्याला आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात.
गूढ किंवा गूढतेच्या सीमारेखेवर असलेल्या कविता सामान्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम चोखंदळ समीक्षकांचे आहे.या बाबतीत त्यांची भूमिका कवी आणि रसिक यांच्यातील सेतुबंधाची आहे.एका लेखकाने साहित्य समीक्षकांसाठी प्रस्तावित केलेली खालील आचार संहिता मला उपयुक्त वाटते परंतु दुर्दैवाने ह्याचे पालन फार कमी समीक्षकांनी केले आहे आणि त्यामुळे काही मूळ निर्मितीकारांचे साहित्य विकृत अवस्थेत सामान्य वाचकांपर्यंत पोहोचून ते अधिकच दुर्बोध झाले आहे:
“A critic must have a sound commonsense and clear thinking in order to judge or evaluate the works of literature in an efficient way. He is well-read person to exercise judgment on literary works in a way as it should be. He must know the fact that to understand the works of literature; he needs to put himself in the place of a writer so to that he can appraise the work from the viewpoint of a writer as well. In order that the excellence or shortcomings may be examined properly, he does not preform opinion, but interprets literary values on the basis of his knowledge and experience without an aggressive and unreasonable belief or without any prejudice.”
या पुस्तकात गूढ अथवा गूढतेच्या सीमा रेषेवर असणाऱ्या ज्या रम्य कवितांचे विश्लेषण केले आहे त्यांची पृष्ठभूमि प्रस्तुत करणे उपयुक्त होईल.
केशवसुतांनंतरचे मराठी साहित्यातील एक युगप्रवर्तक कवी म्हणून बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर१, १९०९-मार्च२०, १९५६) यांचा उल्लेख केला जातो.त्यांनी कवितेची पूर्वपरंपरा मोडून तिला नवीन दिशा देण्याचे काम केले.कविते प्रमाणेच समीक्षा, कादंबरी, नाटक या प्रांतांतही त्यांनी महत्वाचे योगदान केले. मर्ढेकरांची कविता ही नवकविता किंवा नवकाव्य म्हणून ओळखली जाते.त्यांनी परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला हे त्यांच्या काव्यातील आशय आणि दुरूह असल्याचे कारणही आहे परंतु त्यांची नवकविता पूर्व परंपरेशी दुभंगून न राहाता अनेक ठिकाणी अभंग आणि ओवी ह्या प्राचीन मराठी रचनाप्रकारात आपल्या समोर येते. संतकवितेतील सांसारिक वैफल्य आणि अर्थशून्यता आधुनिक यंत्रयुगात आणि जगातील विज्ञान प्रगतीच्या संदर्भातही किती खोलवर रुजली आहे याची प्रचीती त्यांच्या नवकवितेत प्रकर्षाने येते.
त्यांच्या' शिशिरागम' या कवितासंग्रहातल्या कविता सुबोध आहेत परंतु नंतरच्या लेखनकालातील ' काही कविता' आणि' 'आणखी काही कविता‘तील अनेक कविता अत्यधिक गूढ असून त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही घटनांशी, व्दितीय महायुद्धाशी, मानवनाशास कारणीभूत विज्ञानाच्या दुरुपयोगाशी, माणसाच्या अज्ञानमूलक धारणांशी आणि काही अध्यात्म विषयक संकल्पनांशी संबंधित आहेत.या पुस्तकात त्यांच्या १८ कविता सम्मिलित करून त्या सर्व कवितांवर नवीन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.विशेष म्हणजे मराठी साहित्यक्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या ‘पिपात मेले ओल्या उंदिर ' या कवितेचे विस्तृत आणि सखोल विश्लेषण नवीन संदर्भात केले आहे. प्रसिद्ध अष्टपैलू साहित्यक प्रल्हाद केशव अत्रे यांनी या कविते बद्दल म्हटले होते "मर्ढेकरांची पिपांत मेले ओल्या उंदीर' ह्या कवितेचा प्रत्यक्ष परमेश्वराला तरी अर्थ लावता येईल का? उंदीर ते काय,ते बिळात कां जगले, पिपात कशाला न्हाले अन उचकी देऊन कां मेले? आणि मेले तर मेले!त्यांची दुर्गंधी इतक्या रसिकतेने हुंगीत बसण्याचे कवीला काय कारण? ह्याच ह्या पिपात मेलेल्या उंदरांच्या पाठीवर बसून नवकाव्याचा प्लेग आपल्या महाराष्ट्रात आला"
.“जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे” अशी श्रद्धा व धारणा ठेवणारे पुरुषोत्तम शिवराम रेगे [२ ऑगस्ट, १९१०- १७ फेब्रुवारी,१९७८] हे मराठी लेखक, कवी व नाटककार होते.पु.शि.रेगे यांनी स्वतः म्हटलंय की ‘जीवनात विविध रूपांनी वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषत: तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप त्यांच्या कविमनाला मोहवीत आले आहे.‘त्रिधा राधा’ ही रेग्यांची प्रसिद्ध कविता या पुस्तकात सम्मिलित केली आहे.
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (मार्च ८, इ.स.१९३०-एप्रिल २६, इ.स.१९७६) एक अग्रगण्य कवी आणि लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार यांना आर्ततेच्या शोधातला एक शब्दयात्री म्हणतात. ही आर्तता त्यांच्याच शब्दात अशी व्यक्त झाली आहे:
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.
त्यांनी ‘जोगवा’, ‘ दिवेलागण’,‘ नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातल्या कवितेतून अनेक उत्कृष्ट कविता लिहिल्या.त्यांच्या ‘गेले द्यायचे राहून, ‘ती येते आणिक जाते, ‘समईच्या शुभ्र कळ्या’ ‘तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी’ या संगीतबद्ध झालेल्या आणि रसिकांत प्रिय असणाऱ्या कविता गूढतेच्या आवरणात असून समजण्यास थोड्या कठिण असल्यामुळे मी या पुस्तकात सम्मिलित केल्या आहेत.
कवी बा.भ.बोरकर (३० नोव्हेंबर १९१०- ८ जुलै १९८४) यांना सर्व महाराष्ट्र 'आनंदयात्री कवी' म्हणून ओळखतो.त्यांच्या कवितात पसरलेल्या निसर्गाच्या देखण्या लावण्यात ठिकठिकाणी सृष्टीत भरलेल्या सौंदर्याची अनुभूती होते परंतु हा निसर्ग मानवासाठी लौकिक पातळीवर निर्हेतुक प्रेम आणि समर्पणाच्या भावनेचा संदेश घेऊन येतो.त्यांच्या काही आशयघन कवितांचे विश्लेषण आपणास आवडेल.
कवि ग्रेस [१० मे १९३७-२६ मार्च २०१२] यांच्या १७० गूढरम्य कवितांचे रसग्रहण २०१४ आणि २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे’ पुस्तकाच्या दोन खंडात मी केले होते.ग्रेसच्या काही प्रातिनिधिक नवीन कविताही या पुस्तकात आपणास सापडतील.
बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे [१३ ऑगस्ट १८९०- ५ मे १९१८]’ फुलराणी’, ‘निर्झरास, ‘आनंदी आनंद गडे, ‘श्रावणमास, ‘औदुंबर’ अशा अनेक कविता लिहून निसर्गाच्या सुंदर निराळ्या विश्वात वावरणारे आणि रसिकांना ही भूल पाडणारे बालकवी यांच्या ' औदुंबर' या कवितेवर अनेक समीक्षा झाल्या आहेत.या कवितेने अनेक वर्षानंतर ही आपले आकर्षण कायम ठेवले आहे.ही विख्यात कविता लोकप्रिय तर आहेच परंतु एक अतिशय समीक्षकप्रिय कविता आहे.प्रा.एस एस नाडकर्णी यांनी बालकवींच्या या कवितेवर अनेक समीक्षकांनी लिहिलेल्या ‘समीक्षांवर’ एक संपादित पुस्तकच लिहिले आहे.काही समीक्षकांनी पांढरी वाट म्हणजे गोरीपान स्त्री वा विधवा, औदुंबर म्हणजे सन्यस्त योगी,क्रीडामग्न बालक, प्रेयसीची प्रतीक्षा करणारा पुरुष आणि प्रियकराकडे संकेत स्थानी भेटायला निघाली विधवा स्त्री किंवा समाजाला झिडकारून बेभान करून डोहात विलीन होणाऱ्या प्रेमिकेची कहाणी वगैरे तर्कशून्य अर्थ कवितेतील प्रतिमांना बहाल केले आहेत.काही समीक्षक ही कविता अपूर्ण लिहिलेली मानतात परंतु अन्य समीक्षकांच्या या 'भटकेगिरीत' सामील ना होता मी या कवितेचे आणि अन्य कवितांचे मला भावलेले विश्लेषण केले आहे.
'सौंदर्यचि काव्य’ ही काव्याची व्याख्या करणारे कवी 'बी’ म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते [जून १, १८७२-ऑगस्ट३०,१९४७) म्हणतात,”अंतरंग ओथंबुन ओसंडे ती सुंदरता.” त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इत्यादि नानाविध विषयांवर कविता केल्या.त्यांच्या प्रसिद्धीपराङ्‌मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते. कवी ‘बी’ यांनी एकूण ४९ कविता लिहिल्या. 'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून ‘पिकले पान’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह.त्यात ११कविता होत्या.त्यांची 'चाफा बोलेना, चाफा चालेना' ही अंतरंग ओथंबून ओसंडणारी सुंदर कविता अजूनही रसिकांना प्रिय आहे.
कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील एक बहुमुखी प्रतिमा-सम्पन्न कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते.त्यांनी कवितेत साकार केलेली पृथ्वी आणि सूर्याची पुरातन अजरामर रम्य प्रेमकथा ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
सुधीर मोघे [८ फेब्रुवारी, इ.स.१९३९-१५ मार्च, इ.स.२०१४] सुमारे ५० हून अधिक चित्रपटांचे गीतलेखन करणारे आणि ६ कविता संग्रहाचे लेखन करणारे लोकप्रिय कवी यांची एक सुंदर कविता ‘रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा’ मधील चांदण्या गूढ असूनही रम्य आहेत.
आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३- डिसेंबर ७, १९४१) एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी म्हणून त्यांचे अर्वाचीन कवींमधील स्थान फार वरचे आहे.ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते.’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांच्या कविता सन १९३५ मध्ये प्रकाशित झाल्या आहेत.त्यात एकुण २२५ कविता आहेत.या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत.गान सम्राज्ञी लता मंगेशकर तांबे यांच्या कवितांबद्दल म्हणतात की ग्वाल्हेरचे राजकवी असलेले भास्कर रामचंद्र ऊर्फ भा. रा. तांबे, माझे अतिशय आवडते कवी.माझ्याकडे त्यांच्या कवितांचं पुस्तक होतं.त्यातल्या अनेक कविता मी लहानपणी गुणगुणत असे.त्यांच्या कवितेतला नाद, त्यातली लय आणि गेयता मला भुरळ घालत असे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कवितांमधला आशय मला सतत खुणावायचा.तांबे यांच्या कवितांतले शब्द तर सुंदर होतेच, मात्र त्या शब्दांना अनेक अर्थछटा होत्या.वरवर सरळ साध्या आणि सोप्या वाटणाऱ्या त्यांच्या कवितेच्या गर्भात काही गूढ दडल्यासारखं वाटायचं.मला वाटतं, तेच मला खुणावायचं. म्हणूनच मी त्यांच्या काही कविता गाणीरुपात गायचा निर्णय घेतला.
तांबे यांच्या गूढतेकडे कळलेल्या 'घन तमीं शुक्र बघ राज्य करी ' , रिकामे मधुघट' आणि 'कशी काळनागिणी' या कविता या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.
मराठी साहित्यात विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घालणाऱ्या गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर' (२३ऑगस्ट १९१८-१४ मार्च २०१०) यांच्या गूढतेकडे वळणाऱ्या कविता एक नवा अनुभव रसिकांस देतील.
मराठी साहित्यास अनेक सुंदर भावकविता कविता लिहून समृद्ध करणाऱ्या प्रतिभासंपन्न कवियित्री इंदिरा संत [४ जानेवारी१९१४-१३ जुलै २०००] यांनी पन्नास वर्षांच्या अवधीत नऊ स्वतंत्र कवितासंग्रह रसिकास दिले.त्या म्हणतात "माझ्या  बहुसंख्य कवितांतून प्रीती आणि निसर्ग यांनाच अभिव्यक्ती मिळाली आहे.निसर्ग सुद्धा पुष्कळदा निसर्गासाठी आला नसून प्रीतीच्या अभिव्यक्तीसाठी आलेला आहे." त्यांच्या ४ प्रसिद्ध कविता ‘मृण्मयी’,‘कुब्जा’, ‘किती लुटावे डोळ्यांनी’ आणि ‘आषाढ’ यांचे रसग्रहण एका वेगळ्या स्वरुपात या पुस्तकात आपणास दिसेल.
शांता शेळके (ऑक्टोबर१२, १९२२-जून ६, २००२) या बहुमुखी प्रतिभा संपन्न लेखक आणि मराठी कवयित्री यांनी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले परंतु कविता हा त्यांच्या आवडीचा साहित्य प्रकार होता.या पुस्तकात सम्मिलित केलेल्या त्यांच्या वेगळ्या धर्तीच्या ३ कविता रसिकास त्यांच्या भावविश्वाचा निराळाच अनुभव देतील.
अरुण कोलटकर [१नोव्हेंबर१९३२-२५ सप्टेंबर २००४] हे कोल्हापुरात जन्मलेले एक सर्जनशील कवी आणि कलाकार होते.त्यांनी मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता केल्या. मर्ढेकरांप्रमाणे यांच्या कवितेनेही आधुनिक मराठी कवितेला एक नवे वळण मिळवून दिले. ‘भिजकी वही ' या काव्यसंग्रहाला त्यांना २००५ चा साहित्य अकादमी अवार्ड मिळाला होता. त्यांच्या कवितांचं एक वैशिष्ट्य असे की त्यांच्या कविता सहज बोलल्यासारख्या साध्या असतात परंतु कोलटकरातला सुप्त कलाकार कवितेतच एक गूढ अर्थ दडलेले चित्र रेखाटून आपणास बुचकळ्यात टाकतो. त्यांच्या ' भिजकी वही', 'आरसे' आणि 'वामांगी' या ३ प्रातिनिधिक कविता पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत आहेत.
मराठी साहित्याच्या या नवीन कालखंडातील खालील प्रतिभावंत कवी आणि कवयित्रींच्या रचना आणि माझ्या पूर्वीच्या समीक्षेप्रमाणे वेगळेपण असणारे पृथगात्म रसग्रहण या पुस्तकातही आपणास सापडेल.
कवी- बा.सी.मर्ढेकर
१ पिपात मेले ओल्या उंदीर
२ पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी
३ अजून येतो वास फुलांना
४ नाही कोणी का कुणाचा
५ झोपलीं ग खुळीं बाळें
६ बन बांबूचे पिवळ्या गाते
७ बोंड कपाशीचे फुटे
८ आहे बुद्धीशी इमान
९ जगाचा लिप्ताळा
१० दवांत आलीस भल्या पहाटीं
११ जे अज्ञानांत जन्मले
१२ आग अंधाराची जीवा
१३ अंधाऱ्या जगाची
१४ फुटेल [होती वेडी आशा]
१५ ह्या गंगेमधि गगन वितळले
१६ शिवलिंग माझे लिंग
१७ पळापळातील जोर मनगटी
१८ वावडी वाह्यात माझी
कवी-पु.शि. रेगे
१९. त्रिधा राधा
कवी-आरती प्रभू
२० गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
२१ समईच्या शुभ्र कळ्या
२२ तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी
२३ ती येते आणिक जाते
कवी-बा. भ. बोरकर
२४ तव नयनांचे दल हलले ग !
२५ झिणि झिणी वाजे बीन
२६ नाही पुण्याची मोजणी
२७ झाड गूढ झाड गूढ
२८ लावण्य रेखा
२९ रस्त्यांत कोणसा आंधळा गातो
कवी-ग्रेस
३० केतकी दल
३१ नवी द्यूतकांता
३२ काळा घोडेस्वार
३३ सारंगा
३४ ज्ञानेश्वरीय वर्षा
३५ सूर्यास्ताचे पाणी- इथे गंगेपाशी
३६ अंधारांतून जात कुणीतरी गात पुढे क्षितिजाला
३७ पाण्याची भूल
३८ चाफा
बालकवी- त्र्यंबक बापुजी ठोंबरे
३९ औदुंबर
४० गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी
कवी 'बी' ऊर्फ नारायण मुरलीधर गुप्ते
४१ चाफा बोलेना, चाफा चालेना
कवी- कुसुमाग्रज
४२ पृथ्वीचे प्रेमगीत
कवी- सुधीर मोघे
४३ रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
कवी-विंदा करंदीकर
४४ ओशट रात्र, वषट प्राण
४५ भुते झाडांची
४६ डोळ्यातल्या डोहामध्ये
४७ वेडी
कवी- भास्कर रामचंद्र तांबे.
४८ घन तमीं शुक्र बघ राज्य करी
४९ रिकामे मधुघट
५० कशी काळनागिणी
कवयित्री-इंदिरा संत .
५१ मृण्मयी
५२. कुब्जा
५३. किती लुटावे डोळ्यांनी
५४. आषाढ
कवयित्री-शांता शेळके
५५ जाईन विचारित रानफुला
५६.हे रान चेहऱ्यांनचे माझ्या सभोवती
५७ घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे .
कवी- अरुण कोलटकर
५८ भिजकी वही
५९ आरसे
६० वामांगी

https://www.facebook.com/groups/1788863474722340/permalink/3251372801804726/




Post 1

गेले दयायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे-  कवी आरती प्रभू  
[माझ्या 'मराठीतील काव्यरंग' या नवीनतम पुस्तकातून]
प्रस्तुती - श्रीनिवास हवालदार   
गेले दयायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया
आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता
रात्र रात्र शोषी रक्त
आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा
 'नक्षत्रांचे देणे' ची पहिली ओळख एका दूरदर्शन वाहिनीवर बरेच वर्षांपूर्वी झाली. मराठीच्या  अनेक प्रसिद्ध कवी , संगीत नियोजक इत्यादिंच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल निर्मित केलेला हा धारावाहिक कार्यक्रम फार लोकप्रिय होता. त्यावरून असा अनुमान  केला की नक्षत्राप्रमाणे चमकणारे जे व्यक्ती समाजास भरभरून योगदान करतात त्यांना आपण ही काही देणे लागते. परंतु  'गेले दयायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे'  ही आरती प्रभूं ची संगीतबद्ध कविता बरेच वेळा ऐकल्यानंतरही त्यातील धागे दोरे माझ्या पूर्व अनुमानाशी तंतोतंत जुळत नव्हते. कविता कोणाला उद्देशून आहे, त्याला काय द्यायचे राहिले आणि नक्षत्रांशी त्याचा काय संबंध असावा या बद्दल काही स्पष्ट चित्र समोर येत नव्हते. तेंव्हा आकाशातील सुदूर नक्षत्रांशी जवळीक साधणे आवश्यक होते.अंतर्जालावर नक्षत्रांबद्दल खालील माहिती मिळाल्यामुळे आरती प्रभूंची कविता उलगडण्यास मदत झाली-   
     “ पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकुण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. उदा. १) अश्विनी- कुचला २) भरणी- आवळा ३) कृत्तिका- उंबर ४) रोहिणी- जांभूळ वृक्ष वर्षांतून एकदा तरी नक्की लावावी. आयुर्वेदानुसार संकटकाळी व तब्येत खराब झाली तर आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते.,” 
   आरती प्रभू आपल्या प्रिय व्यक्ती समोर आपल्या आपराधिक भावना आणि पश्चात्ताप  व्यक्त करत आहेत की माझ्या हलगर्जीपणा मुळे मी तुझ्या जन्मानंतर तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या जन्म नक्षत्राचा एक साधासा आराध्यवृक्ष ही लावून शकलो नाही आणि पालन पोषण करण्यासाठी वेळही देऊ शकलो नाही इतके वर्ष गेल्यानंतर आता मी इतका दरिद्री झालो आहे की तुझा संरक्षणासाठी माझ्याकडे वृक्षा ऐवजी फक्त काही कळ्या आणि ओली पाने शिल्लक आहेत.त्याने कदाचित तुझे प्राण वाचू शकतील.  
  मी तुझ्या भेटीसाठी हसत आलो होतो.मला माहित नव्हते की ही भेट शेवटचीच आहे. आणि आता दिवसरात्र मला पश्चात्तापाच्या अग्नीत जळावे लागणार आहे.मी आता पर्यंत दगडासारखा भावनाहीन होऊन तुझ्याशी वागलो हे शल्य मला रात्रंदिवस टोचत राहील
मला आता जाणीव होते आहे की माझ्या अशा भावनाहीन वागण्यामुळे बालपणामध्येच तुला अकाली मृत्यू येत आहे.


Sunday, June 12, 2022

post 3

शिवकल्याण राजा !! 🚩🚩

जेष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व महादेवाचे दर्शन घेतले. महाराजांनी सर्व श्रेष्ठ पुरुषांचे पूजन करून दक्षिणा व वस्त्रे अर्पण केली, आऊसाहेबांसह सर्वांचे आशीर्वाद घेतले. मातोश्री जिजाऊ डोळे भरून सोहळा पाहत होत्या, आज त्यांच्या शिवबाचा राज्याभिषेक होता, छत्रपतींच्या मातोश्री म्हणवून घेण्याचे भाग्य त्या माउलीला कर्तृत्ववान पुत्रामुळे लाभले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून, भरजरी शेला पांघरलेले राजे अद्वितीय तेजस्वी दिसत होते. राजा हा विष्णूचा अवतार अशी हिंदू धर्मात समजूत होती ती खरी वाटावी इतके तेज शिवरायांच्या मुखावर होते. सुवर्ण चौरंगावर महाराज व सोयराबाईसाहेब बसले, सप्तनद्यांच्या जलाने त्यांचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजांनी राजपोषाख चढविला, अंगावर भरजरी शेला घेऊन, उजव्या हातात श्री विष्णुंची मूर्ती घेतली, डाव्या हाताने खांद्याला लावलेले धनुष्य धरले, कुटुंबियांसह राजे राजदरबारी सिंहासनाकडे निघाले. त्यावेळी पहाटेचे साडेचार वाजले होते, सर्वत्र जल्लोष होता, दिवट्या व मशालींच्या सुवर्णप्रकाशात रायगड उजळून गेला होता. जिकडे तिकडे भगवे झेंडे, पताका, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या यांनी रायगड नखशिखांत सजला होता. राजे संथ पावले टाकीत, अभिवादन स्वीकारीत सिंहासनाच्या पायऱ्या चढतांना थबकले. क्षणभर त्यांना त्यांच्या जिवाभावाच्या सवंगड्यांची आठवण झाली. बाजीप्रभू, तानाजी, बाजी व इतर सर्वांच्या आठवणीने राजांना भरून आले. स्वतःला सावरीत त्यांनी सुवर्णसिंहासनाला वंदन केले व पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर आरूढ झाले. सगळीकडे एकच जल्लोष झाला, “क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराज शिवछत्रपती की जय” अशी घोषणा राजसभेत होताच जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धारा वाहू लागल्या. महाराज मातोश्रींना दंडवत घालण्यास अधीर झाले होते, ते मासाहेबांपुढे आले व अत्यानंदाने आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेविले. राजमातेने आशीर्वाद दिला “औक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशस्वी व्हा, रामराज्य करा, धर्मराज्य करा.” पन्नास वर्षांपासून जिजाऊ पाहत असलेले स्वप्न शिवबाने आज पूर्ण केले होते, मातेच्या ममतेचे पांग फेडून राजे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले होते. राजे सिंहासनावर आरूढ झाले व एकेकाने त्यांना शुभेच्छा देण्यास प्रारंभ केला. कविराज भूषण यांनी आपल्या खास शैलीत दरबारात आनंदकाव्य सादर केले. आता तेच काव्य स्वरसरस्वती लता मंगेशकर यांच्या आवाजातून ऐकतानाही अंगावर शहारे येतात. 

“इंद्र जिमी जंभ पर, वाडव सुअंभ पर  । 
रावण सदंभ पर, रघुकुल राज है ।। १ ।। 
पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है ।। २ ।।
द्रावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है ।। ३ ।।
तेजतम अंस पर, कान्ह जिमी कंस पर ।
त्यों म्लेंच्छ बंसपर, शेर सिवराज है  ।। ४ ।।

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले होते, विजय खेचून आणला होता. ही विजयश्री पाहून इतरांचा स्वतःवरील विश्वास वाढला. आज हीच विजयश्री आपण पुढच्या पिढीला देताना स्वतःला भाग्यवान असंच समजायला हवं. 

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याण राजा ।।

- सर्वेश 
छायाचित्र साहाय्य - पराग घळसासी


post 2

शिवकल्याण राजा !! 🚩🚩

जेष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व महादेवाचे दर्शन घेतले. महाराजांनी सर्व श्रेष्ठ पुरुषांचे पूजन करून दक्षिणा व वस्त्रे अर्पण केली, आऊसाहेबांसह सर्वांचे आशीर्वाद घेतले. मातोश्री जिजाऊ डोळे भरून सोहळा पाहत होत्या, आज त्यांच्या शिवबाचा राज्याभिषेक होता, छत्रपतींच्या मातोश्री म्हणवून घेण्याचे भाग्य त्या माउलीला कर्तृत्ववान पुत्रामुळे लाभले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून, भरजरी शेला पांघरलेले राजे अद्वितीय तेजस्वी दिसत होते. राजा हा विष्णूचा अवतार अशी हिंदू धर्मात समजूत होती ती खरी वाटावी इतके तेज शिवरायांच्या मुखावर होते. सुवर्ण चौरंगावर महाराज व सोयराबाईसाहेब बसले, सप्तनद्यांच्या जलाने त्यांचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजांनी राजपोषाख चढविला, अंगावर भरजरी शेला घेऊन, उजव्या हातात श्री विष्णुंची मूर्ती घेतली, डाव्या हाताने खांद्याला लावलेले धनुष्य धरले, कुटुंबियांसह राजे राजदरबारी सिंहासनाकडे निघाले. त्यावेळी पहाटेचे साडेचार वाजले होते, सर्वत्र जल्लोष होता, दिवट्या व मशालींच्या सुवर्णप्रकाशात रायगड उजळून गेला होता. जिकडे तिकडे भगवे झेंडे, पताका, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या यांनी रायगड नखशिखांत सजला होता. राजे संथ पावले टाकीत, अभिवादन स्वीकारीत सिंहासनाच्या पायऱ्या चढतांना थबकले. क्षणभर त्यांना त्यांच्या जिवाभावाच्या सवंगड्यांची आठवण झाली. बाजीप्रभू, तानाजी, बाजी व इतर सर्वांच्या आठवणीने राजांना भरून आले. स्वतःला सावरीत त्यांनी सुवर्णसिंहासनाला वंदन केले व पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर आरूढ झाले. सगळीकडे एकच जल्लोष झाला, “क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराज शिवछत्रपती की जय” अशी घोषणा राजसभेत होताच जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धारा वाहू लागल्या. महाराज मातोश्रींना दंडवत घालण्यास अधीर झाले होते, ते मासाहेबांपुढे आले व अत्यानंदाने आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेविले. राजमातेने आशीर्वाद दिला “औक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशस्वी व्हा, रामराज्य करा, धर्मराज्य करा.” पन्नास वर्षांपासून जिजाऊ पाहत असलेले स्वप्न शिवबाने आज पूर्ण केले होते, मातेच्या ममतेचे पांग फेडून राजे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले होते. राजे सिंहासनावर आरूढ झाले व एकेकाने त्यांना शुभेच्छा देण्यास प्रारंभ केला. कविराज भूषण यांनी आपल्या खास शैलीत दरबारात आनंदकाव्य सादर केले. आता तेच काव्य स्वरसरस्वती लता मंगेशकर यांच्या आवाजातून ऐकतानाही अंगावर शहारे येतात. 

“इंद्र जिमी जंभ पर, वाडव सुअंभ पर  । 
रावण सदंभ पर, रघुकुल राज है ।। १ ।। 
पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है ।। २ ।।
द्रावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है ।। ३ ।।
तेजतम अंस पर, कान्ह जिमी कंस पर ।
त्यों म्लेंच्छ बंसपर, शेर सिवराज है  ।। ४ ।।

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले होते, विजय खेचून आणला होता. ही विजयश्री पाहून इतरांचा स्वतःवरील विश्वास वाढला. आज हीच विजयश्री आपण पुढच्या पिढीला देताना स्वतःला भाग्यवान असंच समजायला हवं. 

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याण राजा ।।

- सर्वेश 
छायाचित्र साहाय्य - पराग घळसासी


Tuesday, June 7, 2022

post 2

#fbshare 
वाफाळलेला चहा आणि बाहेर कोसळणारा पाऊस.. हा पाऊस असतो..

आपल्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहायला लावणारा ,
सळसळणारा वारा , विजांचा लखलखाट आणि मेघांचा गडगडाट,
वातावरणात एक सुखद गारवा , वेगळीच धुंदी घेऊन येणारा ,
सर्वांनाच वेडावणारा , सुखावणारा ,
सगळीकडे नवचैतन्याची उधळण करणारा ,
आपल्या टपोऱ्या थेंबांनी पानांवर दवाबिंदुंच्या मोत्यांची पखरण करणारा ,
व्यवहाराची गणितं न मानणारा ,
सगळ्या चौकटी मोडून मुक्तपणे बरसणारा ,
वेळकाळाचं कुठलंही बंधन न जुमानता मनसोक्त बागडणारा ,
कधी उग्र , विराट तर कधी सौम्य रूपाचं दर्शन घडवणारा ,
आपल्या जवळचं सर्व संचित मुक्तपणे उधळणारा ,
कधीकधी मनाला अनामिक हुरहूर लावणारा ,
बरसणाऱ्या प्रत्येक थेंबागणिक मनात वेगळेच विचार , आठवणी , स्वप्नं जागवणारा ,
आपल्या आयुष्याशी एक वेगळंच नातं जोडणारा ,
असताना अथवा नसतानाही आपलं आयुष्य मात्र व्यापून टाकणारा..

हे सगळं लिहितांनाच आठवांचा पाऊस मात्र डोळ्यांत कधी साचला हे कळलंदेखील नाही. या पावसाची हि अशीही एक वेगळीच अनुभूती..

- Sammy


post 1

#news 

"नमस्कार, संध्याकाळचे सात वाजतायत. मी प्रदीप भिडे. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर..." अशी ज्यांची सहज शब्दफेक ऐकत आपण सारेच मोठे झालो, ते महाराष्टाच्या मनामनात स्वतःचं स्थान निर्माण करणारे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज  प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
दूरदर्शनवरील बातम्या हाच ज्या काळात  सर्वांच्या माहितीचा आधार होता, तेव्हापासून वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात उतरलेल्या भिडे यांची मराठी बातम्यांवर अमीट छाप पडली होती. काळ कितीही बदलला तरी ती कायम राहील. 
१९९४-९५ पासून दूरदर्शनवर, सह्याद्री वाहिनीवर काम करताना मला त्यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळाले, मार्गदर्शन लाभले.
सदैव हसरा चेहरा, हस्तांदोलनासाठी पुढे असणारा हात आणि "काय रे कसा आहेस" हा आपुलकीचा आवाज म्हणजे भिडे साहेब. 
आज दूरदर्शनमधील त्या सर्व आठवणी मनात दाटून आल्या आहेत... 
भिडेसाहेब... भावपूर्ण श्रद्धांजली !
#महेश_म्हात्रे 

...............

DD सह्याद्री वर चे माझ्या आवडते वृत्त निवेदक होते !
😢भावपूर्ण श्रद्धांजली ! 

जसं जसं वय वाढत जातंय तसं तसं नश्वर जगाची आठवण करून देते ! 

ॐ शांती !  🙏
........
ई अक्षरमन 
......

दूरदर्शनचा आवाज असलेले प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन. 
..
सूत्रसंचालन, मुलाखत आणि वृत्तनिवेदन यांच्या धीरगंभीर आणि सुस्पष्ट आवाजाला भावपूर्ण श्रद्धांजली.
..
दूरदर्शनरून ज्यांच्या ७ च्या बातम्या ऐकत लहानाचा मोठा झालो. ज्यांच्या भारदस्त आवाजानं कायम भुरळ घातली. ज्यांनी वृत्तविवेदक म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात, मनामनात स्थान निर्माण केलं असे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे.
.
Tejas K

Saturday, May 28, 2022

post 15

मी कागद झाले आहे.....

अंदमानात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्य स्फुरू लागले. 
जवळ कागद नव्हते. 
त्यांनी उष:कालच्या आभाळाला विचारले, 
'माझा कागद होतोस काय?'
आभाळ उत्तरले....
मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?
माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार

आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'

मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'

(ती पहाट लालम् लाल - अनपेक्षित झाली काळी)
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली

'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली........

मित्रांनो, सावरकरांच्या कवितांचा व साहित्य निर्मितीचा इतिहास मोठा रोचक आहे. आराम खुर्चीवर बसून शांतचित्ताने आभाळाकडे पाहात कविता लिहिण्याचे योग सावरकरांच्या नाशिबी नव्हते. 
मार्सेलीसच्या बंदराजवळ मोर्या बोटीतून समुद्रात उडी घेवून सावरकरांनी जगाला आपल्या अतुलनीय धैर्याचा परिचय करून दिला. 

माझे कान पकडण्याचा अधिकार केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनाच असेे ते आत्मविश्वासपूर्वक म्हणायचे. 

औरंगजेबाच्या कैदेतून सहीसलामत निसटण्याचा पराक्रम महाराजांनी केला होता. तो प्रसंग सावरकरांना प्रेरणा देत होता. अचाट शौर्याचा परिचय देत आगबोटीतून निसटलेले सावरकर दुर्दैवाने पकडले गेले. ब्रिटिश शिपायांनी सावरकर चोर असल्याची बतावणी करून त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उलंघन करत फ्रांसच्या भुमीवर अटक केली. सावरकरांच्या बेड्या ठोकलेल्या  शरीरावर जोड्याच्या टाचांचे शिपायांनी प्रहार केले. निसटू न शकल्याचे अपयश पदरी आलेले व शरीरावर जीवघेणे प्रहार सुरु असतांनाही सावरकर डग़मगले नाही. या मृत्युंजयाला तिथेही कविता स्फुरते.. 

अनादी मी, अनंत मी, अवध्य मी भला....
मारिन मज जगती असा रिपू कवण जन्मला !

Fb page @ स्वा.  सावरकर


post 14

हे हिंदूशक्ती-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदूतपस्या-पुत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदू-नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ... 
                 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
Fb share

post 12

Great to see बदलता बॉलीवुड 

मुग़ल नहीं #Prithviraj चौहान अब नायक है

सिर्फ गांधी ही नहीं राष्ट्र नायक #VeerSavarkar अब फिल्मों के भी महानायक है

असली भारत की फिल्में अब बननी शुरू हुई है

शुभकामनाएं  
#SwatantraVeerSavarkar 
#139yearsofsavarkar

Fb @  Kapil Mishra

post 11

माँ भारती की सेवा में अपना सम्पूर्ण जीवन समर्पित करने वाले अभिजात राष्ट्रभक्त एवं महान स्वतंत्रता सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जी की जयंती पर उन्हें कोटिशः नमन।

मातृभूमि के लिए 'वीर सावरकर' जी का त्याग और बलिदान करोड़ों भारतीयों के लिए प्रेरणास्रोत है।

Fb Dr. Sambit  Patra

post 9

#बखरसावरकरांची #पुस्तक 

तयार केलेले सगळे ग्रुप्स बऱ्यापैकी भरले असल्यानं पुढच्या तीन ग्रुप्स च्या लिंक्स देत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित बखर सावरकरांची या पुस्तकातील लेखन सावरकर जयंती म्हणजेच 28 मे 2022 पासून प्रत्येक दिवशी एक कथा याप्रमाणे प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे. 

आपणास किंवा अन्य सावरकर प्रेमी मंडळींना बखर सावरकर मधील लेखन हवे असल्यास त्यांनी खलील व्हाट्सएप ग्रुप मधील एक ग्रुप जॉईन करावा. लिंक वरून ग्रुप जॉईन करता येईल. प्रत्येक दिवशी संध्याकाळी आपणास त्या ग्रुपवर एक मेसेज येत जाईल. ५ ग्रुप्स बऱ्यापैकी भरले आहेत,म्हणून पुढच्या ३ ग्रुप्स च्या लिंक्स देतो.

(वीर सावरकरांचे सोप्या भाषेत लिहिलेलं संपूर्ण चरित्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे यासाठी हा प्रयत्न आहे.) 

अधिकाधिक लोकांना या अभियानात सामील करून घ्यावे, ही विनंती.

~आदित्य रुईकर

लिंक्स

६. https://chat.whatsapp.com/C7Nx5723Z9oIbxi5DWHruw

७. https://chat.whatsapp.com/DZhPyy4MjhK9r7MS9ES936

८.  https://chat.whatsapp.com/D26G9isqMEW2e8V52yu3Vg

3. 
https://chat.whatsapp.com/B86xwWpNxJiLi6G4B4xSIX


Thursday, May 26, 2022

post 7

हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोहही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करणे सोडणार नाही.
*
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. 
पण, एकच गोष्ट अशी आहे की 
जी एकदा हातातून निसटली की, 
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
 आणि ती असते..
      "आपलं आयुष्य"..
          म्हणूनच..
    ....मनसोक्त जगा..
*
डीडी क्लास : आपल्या आयुष्याची वही तीन पानांची असते. पहिल्या पानावर "जन्म" लिहिलेला असतो तर तिसऱ्या पानावर "मृत्यू"
मधलं पान कोरे असते 
ते म्हणजे आपले जीवन असते ! 
त्या कोऱ्या पानावर आपण आपल्या कर्माने काय लिहितो 
त्याचेच रिटर्न आपल्याला मिळतात !
त्या कोऱ्या पानातील किमान चतकोर भाग जरी 
इतरांच्या आनंदासाठी राखीव ठेवलात 
तरी तुमचं पूर्ण पान समृद्धीने भरून जाईल !
स्वानुभवाने सांगतोय 
बँक बॅलन्स पेक्षा फ्रेंड बॅलन्स महत्वाचा ठरतो !
तो ज्याचा जास्त 
तो जगेल मस्त !
ⓒधनंजय देशपांडे  (dd)

Sunday, May 15, 2022

post 8

ना पुणेकर,  ना मुंबईकर आम्ही आहोत ठाणेकर!🤣😅

My old एडिटींग 🙃🙂 जिकडे बघू तिकडे इंग्रजी  भाषेत शहरांची नाव म्हणून हे सुचले.

सगळ बाहेरच्या  देशातला कॉपी पेस्ट करायची गरज काय??

Saturday, May 14, 2022

post 4

जी .ए. कुलकर्णी - कथासंग्रह पिंगलावेळ- कथा ‘ऑर्फियस’
-आंतरिक सुखाचा शोध घेणारी एक शोकांतिका
समीक्षक - श्रीनिवास हवालदार
जी .ए. कुलकर्णी यांची  ‘ऑर्फियस कथा एका ग्रीक पुराणकथेवर आधारित आहे. मूळ पुराणकथेत ‘ऑर्फियस’ हा तंतुवाद्य [सारंगी] वाजवणारा महान वादक आपल्या संगीताच्या सामर्थ्याने मनुष्य ,पशुपक्षी,वृक्ष व दगडधोंडे यांनादेखील प्रभावित करतो ते इतके की ते त्याचे संगीत ऐकण्यासाठी त्याच्या मागे धावत असतात. ऑर्फियस कथेचे बरेच ग्रीक Versions आहेत परंतु खालील कथानकाबद्दल सामान्यतः एकमत आहे. जी.ए. नी या पुराणकथेस जीवन आणि मृत्यु यांचा परिवेश पांघरून  आंतरिक सुखाचा शोध घेणारी एक शोकांतिका घडवून एक नवीनच संदेश दिला आहे.
ऑर्फियस आणि त्याची प्रेमिका युरिडिसी यांच्या लग्नाच्या दिवशीच युरिडिसीवर एक अन्य प्रेमी तिच्यावर होणाऱ्या बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो.याचा प्रतिरोध करण्यासाठी जंगलात पळून जाताना युरिडिसी  साप चाउन मरते आणि तिच्या मृत्यूमुळे व्हिवळ झालेला ऑर्फियस तिला जिवंत परत आणण्यासाठी आपल्या संगीताच्या सामर्थ्यावर अनेक बाधा दूर करून मृत्युलोकाच्या डोहात प्रवेश करण्यात सफल होतो. तेथील दारावरच्या महाकाय, भीषण तीन मुखे असलेल्या श्वानास आपल्या अमोघ वादनाने गुंगवुन मृत्युलोकात मृत्यू देवते पर्यंत पोहोचतो. मृत्यू देवता Hades ही त्याच्या संगीतामुळे मुग्ध होते आणि ऑर्फियस मृत्युदेवतेकडून युरिडिसीला पृथ्वीवर पोचे पर्यंत तिच्याकडे मागे वळून न पहायच्या अटीवर परत न्यायची परवानगी मिळवतो पण ऑर्फियस मृत्युदेवतेच्या युरिडीस मृत्युलोकात परतण्याच्या आश्वासना बद्दल साशंक असतो आणि युरिडीस खरोखरीच आपल्यामागे येत आहे का नाही हे बघण्यासाठी मागे बघतो आणि त्याला युरिडिसी मृत्युलोकात परत जाताना दिसते.  पृथ्वीवर पोहोचण्याच्या काही क्षणापूर्वीच ऑर्फियस मागे वळून बघतो आणि त्याला युरिडिसी मृत्युलोकात परत जाताना दिसते. ही घटना केंद्रस्थानी ठेऊन  नंतर जी. ए. ग्रीक पुराणकथे पासून वेगळे होऊन कथेस अगदी वेगळीच कलाटणी देतात परंतु त्या अगोदर मूळ पौराणिक कथेचा शेवट समजणे आवश्यक आहे.
ऑर्फियस पुनः त्याच्या संगीताच्या माध्यमाने  मृत्युलोकात जाण्याचा प्रयत्न करतो परंतु असफल होऊन पृथ्वीवर येतो. तो पृथ्वीतील दुसऱ्या कोणाही स्त्रीशी प्रेम करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो.यावर Thrace येथील काही जंगली स्त्रिया मत्सर भावनेने त्याला धरून त्याच्या शरीराचे दोन फाक करून एका पहाडा खाली पुरून देतात पण त्याचे डोके सतत  गाणाऱ्या अवस्थेत समुद्रात फेकून देतात. ग्रीक तत्ववेत्ता Plato ह्याने ऑर्फियसला 'भेकड' म्हणून संबोधिले आहे आणि त्याला त्याच्या भेकडपणाची कठोर शिक्षाही मिळाली असेही त्याचे मत आहे.”In fact, Plato's representation of Orpheus is that of a coward, as instead of choosing to die in order to be with the one he loved, he instead mocked the gods by trying to go to Hades to bring her back alive. Since his love was not "true"—he did not want to die for love—he was actually punished by the gods, first by giving him only the apparition of his former wife in the underworld, and then by being killed by women.”
आता जी. ए. ने ग्रीक पुराणकथे पासून वेगळे होऊन कथेस अगदी वेगळीच कलाटणी कशी दिली या बद्दल विचार करू.पृथ्वीवर पोहोचेपर्यंत मागे न पाहण्याची अट स्वीकारहूनही त्याने विपरीत आचरण का केले हा जी.ए.च्या कथेतील मुख्य मुद्दा आहे.याचे कारण मृत्यूलोकापासून पृथ्वीपर्यंत च्या मार्गात या दोघांच्या वार्तालापात सापडते. दोघांना एकमेकाशी बोलण्याची मुभा मृत्युदेवतेने दिली होती हे उल्लेखनीय आहे.
ऑर्फियस आणि युरिडिसी  या दोघांचा वार्तालाप वाचला तर कळेल की   ऑर्फियसला तिच्या मृत्यूपूर्वीच्या सर्व सुखद आठवणी त्याच्या मनात बिंबलेल्या आहेत आणि पृथ्वीवर पोहोचल्यावर पुन्हा दोघांचे जीवन पूर्वीप्रमाणेच आनंदी असेल असे त्याला वाटते. यावर युरिडिसीचा प्रतिसाद फारच निराशाजनक असतो. ती आर्त  स्वरात म्हणते की उत्कट आनंदाचे आपण गोळा करीत असलेले क्षण म्हणजे अखेर मृत्यूच्याच गळ्यात घालायच्या हातातील मणी आहेत, हे मला आता उमजत आहे. ती म्हणते की आपण अनेक वृद्ध, जर्जर माणसं पाहतो पण त्यांची दयनीय अवस्था म्हणजे आपलीच भविष्यातील प्रतिबिंब आहेत हे आपणास फार उशिरा जाणवते. आपले अनेक क्षण सुखाचे असतात परंतु ते सतत हातातून निसटत असतात याची जाणीव आपणास होत नाही. सगळ्यांचं मृत्यू अटळ आहे याची जाणीव सर्वांना  असते परंतु माहित असणं निराळं आणि आपण तो स्वतः भोगण निराळं. ऑर्फियस तिच्या शब्दाने चमकतो.तिच्या बोलण्याने ऑर्फियस समजतो की मृत्यूचा भीषण अनुभव घेतलेली युरिडिसी आणि मृत्यूपूर्वीची युरिडिसी ह्या दोन वेगळ्या व्यक्ती झाल्या आहेत. मृत्युचा अनुभव घेतलेली ही युरिडिसी त्या्ची लाडकी युरिडिसी असुनही मृत्युच्या भीषण अनुभवाने पूर्वीची युरिडिसी राहिलेली नाही. यानंतर पृथ्वीवर जिवंतपणात ही मृत्युचा तो भीषण अनुभव तिचा पाठलाग करणार आहे आणि त्यामुळे तिला जिवंतपणाही मृतःप्राय भासणार आहे. तिच्यासोबत पूर्वीचे जीवन जगणं शक्य नाही. तो युरिडिसीला पृथ्वीवर परत मृत्युलोकात पाठविण्याचा निर्णय घेऊन मुद्दाम मागे वळून तिच्याकडे पाहतो आणि युरिडिसी आर्त किंकाळी देऊन नाहीशी होते.
युरिडिसी लुप्त  झाल्यावर ऑर्फियस तेथे विचारमग्न होऊन उभा राहतो आणि त्याने घेतलेला निर्णय योग्य होता की काही दुसरा निर्णय शक्य होता या व्दिधा मनस्थितीत पुन्हा मृत्युदेवतेस भेटण्यास जाऊन प्रायश्चित स्वीकारण्याची तयारी दाखवतो. मृत्यु देवता त्याची कानउघाडणी करून परत जाण्याचा आदेश देतो.  मृत्युचा अनुभव घेतलेल्या युरिडिसीला जिवंतपणाही मृतःप्राय भासणार आहे आणि त्यामुळे तिच्यासोबत पूर्वीचे जीवन जगणं शक्य नाही हा तर्क ऑर्फियसने मृत्यदेवतेस पटवून दिल्या नंतर मृत्युदेवता त्याला पुनः त्याला युरिडिसी सहा महिने त्याच्याबरोबर सहा महिने पृथ्वीवर आणि सहा महिने मृत्युलोकात एकटी राहण्याचा पर्याय देते आणि या पर्यायाने त्याचे जीवन शक्यतोवर सुखकारक होऊ शकते याची कल्पना देते. मृत्युदेवता त्यास समजावते की क्षणभंगुरतेने माणसाचे मन विषण्ण होण्याचे कारण नाही. आपला प्रवास अगदी तात्पुरता आहे आणि या वाटेने पुन्हा येण्याची संधी मिळणार नाही हे समजूनच सुखाचा उपभोग घ्यायला हवा.
ऑर्फियसला देवते ने दिलेला पर्याय पटतो परंतु युरिडिसी आपल्या पूर्व मतावर ठाम असते वारंवार मृत्यू आणि जीवन यांचा जीवघेणा खेळ खेळण्यास नकार देऊन ती ऑर्फियसला परत जाण्यास सांगते.
जी.ए. ने  शेवटी  ऑर्फियस आणि युरिडिसी दोघांबद्दल म्हटले आहे " ती  दोघंही शहाणी आहेत , कारण त्या दोघांनीही आपल्या मर्यादा ओळखल्या आहेत. यालाच कदाचित ज्ञान देखील  म्हणता येईल”
"

Thursday, May 12, 2022

post 3

 कोणाला स्वत च्या किंवा  इतरां च्या 
पुस्तक परिचय video..
किंवा अभिवाचन शेअर करायचा असेल तर 
Eaksharman  youtube channel  वर publish करू शकता. 
Msg मध्ये कळवा .
Neeta Jaywant

#vidyamslife

Friday, April 29, 2022

post 2

गुलजार यांची मुलाखत..

सुमारे ४५ वर्षांपूर्वी डॉ. राम पंडित यांनी गुलजार यांची घेतलेली ही मुलाखत, मित्र ज्ञानेश्वर आगाशे, विजय हरी वाडेकर यांच्या 'राजस' या मासिकात प्रकाशित झाली होती. आजही त्यातील मजकूर, गुलजार यांचे लिखाण, विचारधारा व व्यक्तिमत्त्व जाणण्यासाठी सहाय्यक ठरेल.

ह्या मुलाखतीत डॉ. राम पंडित यांनी गुलजार यांना विचारलेले प्रश्न आणि गुलजार यांनी मांडलेली स्पष्टीकरणे ह्यातील दूरदृष्टीला सलाम केला पाहिजे..

--------------------------------------------------
गुलजार यांची मुलाखत : भाग १
--------------------------------------------------

सोना,
काही श्वास तुझ्या पूर्वी जगलो
काही श्वास तुझ्यासवे जगत आहे
असं होत नाही का गं सोना,
की साऱ्या जीवनात
एक श्वास मिळतो जगण्यासाठी
अन् कधीकधी एका श्वासात
कोणी सारे जीवन जगतो
ह्या कवितांमधे मी
आपले श्वास एकत्र केले आहेत

सोना,
जे तुझ्या झोळीत टाकीत आहे
काही श्वास जे मी जगून घेतले
काही श्वास जे मी जगू शकलो नाही
आणखी काही अर्धेअपूर्ण श्वास, 
ज्यात तू
आपले श्वास जोडून देशील तर शप्पथ
एका श्वासात सारे जीवन जगून घेईन
--------------------------------------------------

होय ही कविता आहे; पण ही अर्पणपत्रिका आहे. ही आहे गुलजारची कविता. होय हा आहे कवितेतील सुगंधाला देहरूप देणारा गुलजार. चित्रपटातील संवाद, दिग्दर्शन ह्यापलीकडेही एक गुलजार उभा आहे. तो आहे कवी गुलजार. 

जीवनातील कडू-गोड अनुभव, प्रत्येक क्षणाच्या पडद्यात दडलेल्या जाणिवांचा शोध घेत अनंत श्वासांच्या प्रवासाला निघालेला हा यात्रिक स्वतःच्या कवितांबद्दल, उर्द साहित्याबद्दल काय म्हणतो, हे जाणून घेण्यासाठी मी ही त्याची घेतलेली मुलाखत. अनिवार मोह होत असतानाही मी त्याला त्याच्या वैयक्तिक व चित्रपट जीवनाबद्दल काहीही विचारले नाही; पण त्याबद्दल खंत नाही; पण तरीही वाटतं खूपच विचारायचं राहूनच गेलंय. 

हा संवाद गुलजारच्या साहित्यजीवनावर खूप प्रकाश पाडेल, यात शंका नाही. ‘राजस’चा वाचकवर्ग ह्या मुलाखतीचे सहृदयतेने स्वागत करेल अशी आशा नाही तर मला पूर्ण खात्री आहे. 
--------------------------------------------------

त्या वेळी 'राजस'च्या वाचकांनी ह्या मुलाखतीचे स्वागत केले होतेच.. आज फेसबुकवरील वाचक मंडळीही ह्या मुलाखतीचे तितक्याच आत्मियतेने स्वागत करतील...
--------------------------------------------------

राम : आपण कविता लिहिण्यास केव्हा व कुठे सुरुवात केली?

गुलजार : हे फॅसिनेशन जे असत ते शाळेच्या वेळी लागलं. “विंटल कॉलस् ए पोएट” असं म्हणतात. शायरीचा शौक त्या कच्या वयातच लागला. शहर दिल्ली.. शाळेचे दिवस अन् भाषा उर्दू.. कारण शिक्षणाचे माध्यम उर्दूच होते, त्यामुळे प्रारंभ तेथूनच झाला. (माईक पाहिजे?)

राम : नको, मी नंतर प्रश्न लिहून घेईन. 

राम : तुम्ही कधी मुशायऱ्यात भाग घेतला आहे काय? कारण माझ्या तरी पाहण्यात आले नाही. 

गुलजार : दिल्लीत शाळा व कॉलेजमधे असताना मुशायऱ्यात भाग घेतला. नंतर मुंबईला आलो व येथेही कॉलेज जॉईन केले. इथेही पी. डब्लू. ए. मीन्स प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन हीयर यु नो. त्यावेळी बन्नेखाँ सज्जाद जहीर आदिबरोबर मुशायर्‍यात हजेरी लावीत असे; पण हे मुशायर्‍यात जाणे हळूहळू कुठंतरी सुटत गेलं.. अन् मग असं सुटलं की बस्स.. 

राम : पण मजरूह, साहिर आदि अजूनही भाग घेतात. 

गुलजार : होय, ते घेतात भाग.. पण, माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडीबहूत पुढे पुढे मला भीतीच बसली. आता माईकच्या समोर जाण्याचं धैर्यही राहिलं नाही, असं म्हणाल तर हरकत नाही. 

राम : मी तुम्हाला काय म्हणू? गीतकार की कवी? कारण आजचे समीक्षक तरी हे दोन भेद पद्य साहित्यात मानतात. त्यामुळेच मराठीत माडगुळकर आणि हिंदीत नीरजला कवी म्हणावयास ते तयार नाहीत. 

गुलजार : हे मी गीत लिहिण्यास फार उशिरा सुरुवात केली. तुम्ही तर माझे 'जानम' आणि 'एक बंद चांद' हे कवितासंग्रह वाचलेच आहेत. त्यात तुम्हाला दिसलंच असेल की मी मूलतः कविताच लिहितो. गीत लिहिण्याची मला संधी चित्रपटात आली तरीही मी प्रथमतः ती स्वीकारली नाही; आणि आताही लिहितो तेही अगदी ठराविकच. करीअर म्हणून त्याचा स्वीकार केला नाही. 

राम : तुमच्या कवितेबाबत आमच्या उर्दूस्नेही व समीक्षक मित्रांचा आरोप आहे की, ती ती मीराजी एवढी नाही; पण अख्तर उल इमान एवढी अस्पष्ट भाषा आहे. ह्याविषयी तुम्हांला काय सांगायचं आहे?

गुलजार : होय, इमेजेसच्यामुळे; भाषेमुळे नाही; कारण इमेजेस थोड्या कठीण आहेत. त्या सर्वपरिचित नाहीत. माझ्या कविता वाचल्यानंतर जर तसे वाटत असेल तर ते मी कबूल करतो. जर तो गुन्हा आहे तर मला तो मान्य आहे, पण आता जेव्हा मी माझ्या जुन्या कविता वाचतो तेव्हा मला जाणवतं की पूर्वी मी जी उभाषा वापरत होता ती फार मिलष्ट होती व इमेजेस सोप्या होत्या. आता हळहळ भाषा सोपी होऊ लागली व व्यस्त प्रमाणात इमेजेस मात्र कठीण होत चालल्या आहेत परिवर्तन मी स्वत: अनुभवतो. 
--------------------------------------------------

क्रमशः

Wednesday, April 27, 2022

post 1

आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट 
पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.
***
वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील! जगण्याची एक संधी मिळावी म्हणून या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... त्यांना ती संधी मिळालीच नाही!
        कोविडमुळे पाच लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना? 
        आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?
       जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!
        तीनशे पासष्ट दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते, बेड मिळाला ऑक्सिजन पुरत नव्हता, ऑक्सिजन मिळायचा तर औषधं नव्हते... आणि कुठेतरी हे सगळं मिळायचं तर व्हेंटिलेटर नसायचं. स्वतःच्या गळ्याभोवती बोटं गच्च पकडून, घोगऱ्या आवाजात... "डॉक्टर वाचवा... जीव घाबरलाय" म्हणत तरणीताठी पोरं जीव सोडताना बघितली आहेत...
        खरंतर त्यांचं कर्तव्य होतं, व्यवहारिक भाषेत त्यांना त्याचे पैसे मिळायचे पण तरीही त्यापलीकडे जाऊन सफाई कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान दिलं, रुग्णांचं हागणं मुतणं साफ केलं, सिस्टर लोकांनी घरी लेकरं बाळं सोडून त्या नरकयातना देणाऱ्या किट घालून अठरा-वीस तास काम केलं, आपल्या जीवाचा विचार न करता असंख्य डॉक्टरांनी उपचार केले. ते सर्व काही आजचा दिवस पाहण्यासाठी नक्कीच नव्हतं...माणूस जगला पाहिजे हीच सर्वांची एकमेव इच्छा होती!
         शंभर वर्षांपूर्वी युरोपमध्ये आलेल्या साथीच्या रोगांनी त्यांच्या जगण्याच्या पद्धती बदलल्या. साफसफाई आली, बंद नाल्या आल्या, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल आला, वरून 'सॉरी' बोलणं आलं... आपण एवढ्या मोठ्या आजाराच्या लाटेनंतर काय शिकलो? धर्म, जाती, दंगली,झेंडे आणि अजेंडे? शतकातून एखादी अशी आपत्ती येते जी माणसामध्ये परिवर्तन घडवून आणते... इथे आपण रानटी माणसासारखं एकाच वर्षात काही शतकं मागे गेलोय! आपत्तीच्या काळात जात, भाषा, धर्म, अस्मिता, अजेंडा असलं काहीच नव्हतं... एक माणूस दुसऱ्या माणसाला वाचविण्यासाठी शक्य होईल ते सर्व काही करत होता एवढं सरळ सोपं होतं... एकाच वर्षात सगळं संपलंय!
         आपली प्राथमिकता काय आहे हे अजूनही कळू नये यापेक्षा दुर्दैव ते काय? सत्ताधारी असो की विरोधक... यांची पोटं भरलेली आहेत, यांच्या पुढच्या सात पिढ्या बसून खाणार आहेत. भरल्यापोटी त्यांचे खेळ सुरू आहेत! नोकऱ्या, महागाई या गोष्टी तर फार दूरच्या राहिल्या पण उद्या जर ही किंवा अशी आपत्ती पुन्हा आली तर आपली तयारी काय आहे हा प्रश्न आज विचारणं गरजेचं असताना आपणच जर अर्थहीन अस्मितेमध्ये आनंदी होत असू तर मग आज ना उद्या आपली लायकी साथीच्या रोगात मरण्याचीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 
       कसल्या राजकारण आणि धर्मकारणाच्या टिमक्या वाजवता... श्वास पुरत नव्हता म्हणून पायाच्या टाचा घासून गोळामोळा झालेल्या पाचशेहून अधिक बेडशीट अजून नजरेसमोर आहेत...! आपण त्यांच्यापैकी एक नव्हतो, आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे ही गोष्ट पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे.

डॉ. प्रकाश कोयाडे

Tuesday, April 12, 2022

Sunday, April 10, 2022

post 2

 




आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌॥

संकटाचे हरण करणारा,सर्व प्रकारचे वैभव देणारा,लोकांना आनंद देणारा असा जो श्रीराम, त्याला मी पुनः पुन्हा वंदन करतो. 

जय श्रीराम !



post 1

 What was Dharma in the eyes of Ram?

“परहित सरिस धरम नहिं भाई ।
पर पीड़ा सम नहिं अधमाई ।।” 
The greatest religion is to serve others. And to harm others is greatest sin.

Saturday, April 2, 2022

आरंभ है

 आरम्भ है प्रचण्ड बोले मस्तकों के झुण्ड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो,
आन बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष के बाण पे उतार दो !!!

मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले
वही तो एक सर्वशक्तिमान है,
विश्व की पुकार है ये भागवत का सार है की
युद्ध ही तो वीर का प्रमाण है !!!
कौरवो की भीड़ हो या पाण्डवो का नीड़ हो
जो लड़ सका है वही तो महान है !!!
जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं
क्या ज़िन्दगी है ठोकरों पर मार दो,
मौत अन्त हैं नहीं तो मौत से भी क्यों डरे
ये जाके आसमान में दहाड़ दो !

आरम्भ है प्रचण्ड बोले मस्तकों के झुण्ड
आज जंग की घड़ी की तुम गुहार दो,
आन बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष के बाण पे उतार दो !!!

वो दया का भाव या की शौर्य का चुनाव
या की हार का वो घाव तुम ये सोच लो,
या की पूरे भाल पर जला रहे विजय का लाल,
लाल ये गुलाल तुम ये सोच लो,
रंग केसरी हो या मृदंग केसरी हो
या की केसरी हो लाल तुम ये सोच लो !!
जिस कवि की कल्पना में ज़िन्दगी हो
प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो,
भीगती नसों में आज फूलती रगों में
आज आग की लपट तुम बखार दो  !!!

पीयूष मिश्रा

Sunday, March 27, 2022

जी ए ची पुस्तके

 जी.ए. कुलकर्णी यांची व त्यांचे साहित्य, आठवणींवरील पुस्तकांची विचारणा वारंवार होत असते. त्यासाठी ही एकत्रित यादी मी येथे देत आहे.
यादी परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही. * अशी खुण केलेली पुस्तके माझ्या संग्रही नाहीत. झेरॉक्स, पिडीएफ संबंधी विचारणा करु नये. काही पुस्तक दुर्मिळ असली तरी शोध घेतल्यास उपलब्ध होतात असा माझा अनुभव आहे.
कथासंग्रह
१) निळासावळा
२) पारवा
३) हिरवे रावे
४) रक्तचंदन
५) काजळमाया
६) रमलखुणा
७) सांजशकुन
८)पिंगळावेळ
९) कुसुमगुंजा
१०) डोहकाळीमा (निवडक कथा)
११) सोनपावले (असंगृहीत साहित्याचे संकलन)
१२) नियतिदान (जी.एं.च्या कथांचा हिंदी अनुवाद)
आधारीत वा अनुवादित
१३) अमृतफळे
१४) ओंजळधारा
१५) पैल पाखरे
१६) आकाशफुले
बालवाड्मय
१७) मुग्धाची रंगीत गोष्ट
१८) बखर बिम्मची
ललित
१९) माणसे : आरभाट आणि चिल्लर
अनुवादित
२०) स्वातंत्र्य आले घरा
२१) रानातील प्रकाश
२२) रान
२३) शिवार
२४) गाव
२५) वै-याची एक रात्र
२६) एक अरबी कहाणी
२७) लॉर्ड ऑफ दी फ्लाईज *
२८) सोन्याचे मडके *
नाटक
२९) दिवस तुडवत अंधाराकडे (भाषांतर)
पत्रसंग्रह
३० ते ३३) जी.एं.ची नीवडक पत्रे : खंड १ ते ४
३४) प्रिय जी.ए.स.न.वि.वि - नंदा पैठणकर
३५) प्रिय जी.ए. - सुनीता देशपांडे
३६) जीएंची पत्रवेळा… (ग्रेस व मिथिला यांना लिहिलेली पत्र)
३७) एक धारवाडी कहाणी - आनंद अंतरकर
३८) जी.ए.पत्रास विनाकारण की, - महेश आफळे
आठवणी
३९) जीए नावाचे स्वप्न - अप्पा परचुरे
४०) जी. ए. एक पोर्ट्रेट - सुभाष अवचट *
४१) प्रिय बाबुआण्णा - नंदा पैठणकर
समिक्षा
४२) पार्थिवतेचे उदयास्त - द. भि. कुळकर्णी
४३) डोहकाळीम्यात डोकावताना - रा. ग. जाधव
४४) जी.एं.च्या कथा : एक अन्वयार्थ - धों.वि.देशपांडे
४५) प्राक्तनाचे वेध - एस. डी. इनामदार
४६) जी.एं.च्या रमलखुणा - विजय पाडळकर
४७) जीएंची परिसरयात्रा - यार्दी आणि वडेर
४८) अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन - वि. गो. वडेर
४९) सहोदर - डॉ. माधवी वैद्य
५०) काळीजवेध - धनंजय आचार्य
५१) जी.एं.ची कथा - पंडित आवळीकर
५२)जीए : जीवनदृष्टी आणि प्रतिमासृष्टी - प्रा. स. त्र्यं. कुल्ली. *
५३) कृष्णचंदन - धनंजय आचार्य *
५४) जीएंची महाकथा - डॉ. द भी. कुलकर्णी 
कादंबरी
५५) गूढयात्री - विद्या सप्रे-चौधरी *
विशेषांक
५६)ललित (फेब्रुवारी १९८८)
५७) जीए कथाकार आणि माणूस (उगवाई दिवाळी अंक १९८८) *

Saturday, March 26, 2022

Blog share 1

आपण सगळेच प्रेम मिळवण्यासाठी धडपडत असतो . सगळी नाती जोडतो ती प्रेम मिळवण्यासाठीच. त्यातून आनंद मिळावा यासाठी. पण प्रत्येक वेळी आनंद मिळतोच असं नाही. काही वेळा प्रेम आणि आनंद मिळवण्यासाठी समाजाचा विरोध पत्करायची आपली तयारी नसते. प्रेम, आनंद आणि  स्वच्छ, मोकळ जगणं हे सगळ किती छान आहे.  आज मी दोन अप्रतिम कलाकृतींचा आनंद घेतला. तेव्हा मला प्रकर्षानी हे जाणवलं.
 एक म्हणजे उमा त्रिलोक यांचं अमृता आणि इमरोझ हे पुस्तकं. ज्ञानपीठ पुरस्कार विजेती लेखिका आणि एक चित्रकार यांची प्रेमकहाणी. प्रतिभा आणि प्रतिमा, मैत्री आणि प्रेम यांचा विलक्षण अविष्कार म्हणजे हे नातं. चाळीस वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवलेले दोन जीव. म्हणायला दोन पण खरं तर एकच. ज्यांना प्रेम ही एक भ्रामक कल्पना वाटते, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा.  समाजाच्या सो कॉल्ड चौकटीत बसणारं त्यांच हे प्रेम नव्हतं. पण अमृता आणि इमरोझ मोकळ्या मनानी जगले. प्रेमाची खात्री असली की अडथऴे जाणवत नाहीत. हे सगळ अमृता यांनी  नुसतं लिहून ठेवलं नाही तर त्या तसं जगल्या. इमरोझदेखील अमृतांच्या आजारपणात  सावलीसारखे त्यांच्याबरोबर राहिले. एक विलक्षण नातं. शब्दात बांधता न येणारं
शांता गोखले यांचं रीटा वेलिंगकर या पुस्तकानी आणि सिनेमानी  एका वेगळ्या मोकळ्या जगण्याविषयी सांगितलं. जगायचं पण आनंदानी ही थिअरी उषीरा का होईना कऴलेल्या एका स्त्रीची गोष्ट आहे यामध्ये. अमृता आणि इमरोझच्या निखळ आणि सुंदर प्रेमापेक्षा एकदम वेगळी कथा. जे मोकळ नातं त्या दोघांमध्ये होतं आणि समाजाचा रोष पत्करून त्यांनी स्वीकारलं होतं त्याला छेद देणारी ही गोष्ट. समाजाची चौकट न मोडता, गुडी गुडी संबंध जपणा-या साळवीची आणि रीटाची गोष्ट. रीटाला हवय मोकळ नातं आणि साळवी जपतोय चौकट. यातून झालेला संघर्ष. रीटाला मिळालेलं शहाणपण. सुंदर आहे सगळ. 
स्वच्छ आणि मोकळ जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. तसं जगलो तरच आनंदी रहाता येईल. एक तर आपण करत असलेल्या गोष्टी मोकळेपणानी स्वीकारायचं धैर्य हवं,  नाही तर असं काहीही करू नये ज्यामुळे आपल्या आयुष्यातला मोकळेपणाच संपून जाईल. निर्मळ , मोकळं, स्वच्छ असं जगता यायला हवं. हे सगळ अवलंबून आहे आपल्या  नात्यांमध्ये असलेल्या प्रामाणिकपणावर. हा प्रामाणिकपणा तेव्हाच ठेवता येईल जेव्हा आपुलकीनी आणि प्रेमानी एकमेकांना समजून घेतलं जाईल. विधात्यानी माणसं निर्माण केली, माणसानी निर्माण केली नाती, नातं कोणतही असो, हे बंध जोपासण्यासाठी आणि ते घट्ट करण्यासाठी धडपड करायला हवी......