Friday, January 12, 2018

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!


रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

सुरेश भटांचे काव्य

Interview ~ Sambhaji Bhide

‘If my words hurt sentiments of non-Hindus I cannot help it … my speeches meant to teach values of oneness’

January 12, 2018, 2:00 AM IST 




Blamed for sparking controversy which culminated in violence in Bhima Koregaon, founder of Shiv Pratishthan Hindusthan, octogenarian Sambhaji Bhide talks toSugandha Indulkar about the controversy and his worldview:


Were you in Bhima Koregaon on December 31 or January 1?
I have not stepped in that region since the past one-and-half to two years. On the said day I was attending NCP leader and former home minister, Jayant Patil’s mother’s last rites.
It has been alleged that your fiery speeches led to the attacks on January 1.
I do not agree. I have never made any controversial or fiery speeches. Wrong messages were doing the rounds on social media, which has led some segments of the society to believe that I gave some provocative speeches in Bhima Koregaon. This is totally wrong. In fact, my speeches are aimed to pacify disturbed minds and avoid disruption of peace and harmony in the society. My speeches are meant to teach values of oneness, compassion, and are filled with patriotic fervour.
Do your words provoke violence?
Misinterpretation of my words may provoke people to take wrong steps. But that does not mean I should stop directing my energies towards what I know are the highest ideals, by which all Indians should live. It is their lack of knowledge, which needs to be addressed.
How would you define Hindutva?
Lives of Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj epitomise Hindu religion completely. Their intelligence, values that they expressed throughout their lives and also in death are exemplary. Any life lived in sync with the principles laid down by this father-son duo is for me Hindutva or Hindu dharma.
Life of Sambhaji as brought to us through texts is quite controversial.
It is sad to see that many historians and littérateurs have misrepresented Chhatrapati Sambhaji. Even in the face of imminent death Sambhaji displayed immense courage and unmatched valour. He suffered extreme torture and brutality for 30 days, when he was imprisoned by Mughal emperor Aurangzeb. Therefore, I and many of my followers observe a 30 day period of grief, in memory of the great leader.
When you voice your views so vehemently do you hurt the sentiments of non-Hindus which results in widening the rift in Indian society at large?
If my words hurt the sentiments of non-Hindus, I cannot help it. I am stating the truth with the sole aim of unifying all Indians. India is the land of Hindus. Hinduism is not just a religion – it is a way of life. One which has taught us values of truth, peace, harmony, compassion towards all living beings. We have been taught lessons of ‘vasudhaiva kutumbakam’, the whole world is one family.
Hinduism is arguably the only religion in the world which treats all living beings at par with humans as well. We believe in the presence of a soul which exists in every living organism – right from plants to animals. Furthermore, we also believe that the soul is an integral part of the supreme soul or the highest one. At the same time, human beings have a mind of their own, which is subject to wrong influences, which may lead to certain wrong actions. My aim is clear – to instil patriotic fervour and inspire people to dedicate themselves to the cause of their people and their nation.
Do you believe in caste system?
I have never given any importance to caste, creed, gender, educational and economic background of any person. The sun, moon, trees and mountains do not have any caste – human values, a strong character and values of love for the nation and extraordinary dedication to upholding the values of truth, peace and harmony is all that matters for me. Anyone who possesses these qualities and expresses them through his life, irrespective of his caste is someone I would respect totally.
You are a gold medallist in nuclear physics. Yet you do not use any footwear and ride a bicycle. Why?
My parents have imbibed in me values of patriotism and dedication to the motherland. Nothing else matters, therefore my lifestyle is simple and I dedicate all my energies to uphold these principles. I do not wear footwear because our tradition says that a celibate should not wear any footwear.

Tuesday, January 9, 2018

अभी तो सिर्फ कागज़ पर लिखे अलफ़ाज़ हैं


अभी तो सिर्फ कागज़ पर लिखे अलफ़ाज़ हैं 
तू गुनगुना दे गर तो मुकम्मल ये ग़ज़ल हो जाये

यूँ तो मंज़िल की तमन्ना में ही निकले थे घर से 
गर तू हमसफ़र बने तो रास्ता ही मंज़िल हो जाये

बिखरना भी कई दफा कितना हसीन होता है
मैं लहर लहर बिखर जाऊं गर तू समंदर हो जाये

तेरे चश्म-ए-आईने में देखा है अक्सर अक्स अपना
दिल में भी गर उतर जाऊं तो मुकामे-ज़िन्दगी हासिल हो जाये

इक दूजे से दूर ज़िंदा रहने की फकत रस्म ही निभा रहे हैं
रूह रूह में समा जाये तो जिस्म को मायने मिल जाये

आपकी गुज़ारिश पर एक के बाद एक शेर लिख डाले
गर आपकी नज़रे-इनायत हो तो इनका नाम ग़ज़ल हो जाये
~ अनामिक

Sunday, January 7, 2018

भक्ती कशी ?

भक्ति कशी ?

भक्ति हा द्वैतभावातला प्रकार आहे, असं बर्‍याच अडाण्यांना वाटतं. ते म्हणत असतात, भगवंत वेगळा आणि भक्त वेगळा ! अशी वेगळीक असल्याखेरीज भक्ति होणारच नाही. ही मंडळी सतत अथ पासून ते इति पर्यंत द्वैतभावातच डचमळत असतात.

भागवतधर्म मंदिराचा पाया घालणारे ज्ञानोबाराय [पुढील सगळे वैष्णव यांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरणारे असून त्याचेच पाईक आहेत] त्यांना मात्र द्वैता-अद्वैताच्या चांदण्या गिळून द्वैतभावाच्या पलिकडे गेलेला, ईश्वराशी पूर्णत्वाने एकरूप झालेला भक्त कळला आहे.

हा भक्त आहे तरीही त्याला विश्वव्यापी चेतनातत्त्वाची जाण आहे. त्याचबरोबर सगुणाचे विलक्षण प्रेम ही आहे.

सर्वव्यापी परतत्त्वाचे भान असल्याने, आणि सर्वत्र तेच एकमेव परतत्त्व अनुभवत असल्याने, हा ज्ञानी भक्त कुणाचाही द्वेष करत नाही. कारण द्वेष भावना ही परकेपणातच असते. या ज्ञानी भक्ताला सारे विश्वच स्वकीय झालेले असते. "किंबहुना चराचर आपणचि जाहला" - त्यामुळे तो सर्वांचाच मित्र असतो. प्रत्येक भूतमात्राबद्दल त्याच्या मनात अपार करुणाच असते. आत्मीयताच असते.

चराचर सृष्टीच्या ठिकाणी, ज्ञानी भक्ताची ऐक्यभावाची भूमिका असते. त्यामुळे तो निरहंकारी असतो. तो अत्यंत निःस्वार्थी असतो. त्याचा "स्व" मर्यादित न राहतां आत्मस्वरूपी विसर्जित झालेला असतो. त्याचा "मी"पणा एका विश्वात्मक भावनेने पुसून गेलेला असतो. पृथ्वी, प्राण, पाणी, दीप या दाखल्यांनी ज्ञानराजांनी १२व्या अध्यायांत, या ज्ञानी भक्ताची अपूर्व गुणवत्ता, त्यांनी मूर्तिमंतपणे साकार केली आहे.

हा ज्ञानी भक्त कायम संतृप्त असतो. वर्षाकाळ असो अथवा नसो, सागराची पातळी नेहमी तेवढीच असते ना ! तो सतत संतुष्ट असतो. या संतोषाचे कारण म्हणजे जीव आणि परमात्मा हे दोघेही त्याच्या हृदयांत एकाच आसनावर विराजमान झालेले असतात.

" जीवू परमात्मा दोन्ही । बैसोनि ऐक्यासनी ।

जयाच्या हृदयभुवनी । विराजति ॥ "

जीव व परमात्मा, देव आणि भक्त, श्रीगुरु सत्‌शिष्य यांचे ऐक्य त्याने जाणलेले असते. तसेच जगाचे व आपले ऐक्यही त्याने ओळखलेले असते, नुसते ओळखलेले नसते तर तो ते प्रत्यक्ष जगतच असतो. " हे विश्वचि माझे घर " अशी त्याची मति स्थिर झालेली असते.

या ऐक्य भावनेमुळेच भवतीच्या व्यक्तीची, परिसराची त्याला भिती वाटत नाही. कारण सार्‍या चराचरातून एकच चैतन्याचा/ ब्रह्मचैतन्याचा [म्हणजे फक्त गोंदावलेकर महाराज नव्हेत तर एकच एक सच्चिदानंद प्रेममय भगवंताचा] स्त्रोत वहात असतो, ह्याचे त्याला ज्ञान आहे. सागर खवळला तरी माशांना (माशी नव्हे, मासा याचे अनेकवचन) त्याची भिती वाटत नाही.

आपले शरीर आणि आपलेच हात-पाय आदि अवयव यांच्यात जी ऐक्यता/एकता असते तशीच एकरसता जग व ज्ञानी भक्त यांच्यात असते. याच्या ठायी समग्र विश्वाविषयी कोणताच दुरावा नसतो. आज आपण बोलघेवडे, सामाजिक बांधिलकीचे कोरडे गोडवे गातो, पण ज्ञानी भक्त मात्र विश्वात्मक बांधिलकीचा पुरस्कार करतो, आचार करतो. ही विश्वात्मकता त्याच्या ठायी इतकी भिनलेली असते की जगच त्याचा देह झालेला असतो, त्यामुळे द्वैतबुद्धीच निखळून पडलेली असते.

"हे जगचि देह झाले । म्हणौनि प्रियाप्रिय गेले ॥" हा भक्त "कैवल्याचा अधिकारी" असून "मोक्षाची सोड-बांध करणं ही त्याची लीला असते. तो म्हणेल त्याच्यापाशी महाबोधाचा सुकाळ होत असतो / झालेला असतो. मात्र हा बोध ओळखता आला पाहिजे.

-- अण्णा
एकोहम्
http://harichintan.blogspot.in/2008/01/?m=1

Saturday, January 6, 2018

नाटककार विजय तेंडुलकर

नाटककार विजय तेंडुलकर

जानेवारी १९२८- १९ मे २००८

विजय तेंडुलकरांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. प्रारंभीचा बराचसा काळ पुणे, मुंबई येथे गेला. त्यांना आर्थिक अडचणींमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. प्रारंभीच्या काळात अर्थार्जनासाठी नवभारत, मराठा, लोकसत्ता या दैनिकांत व नवयुग साप्ताहिकात त्यांनी पत्रकारिता केली. ‘वसुधा’ मासिकाचे त्यांनी काही काळ संपादन केले.

तेंडुलकरांची नाटके हा मराठी रंगभूमीवरचा एक स्वतंत्र प्रकार आहे. प्रायोगिक, व्यावसायिक अशा दोन प्रकारांत मराठी नाटक दुभंगले असता तेंडुलकरांनी या दोन्ही प्रकारांचा मध्य गाठणारा ‘तेंडुलकरी नाटक’ नावाचा नवा प्रकार अस्तित्वात आणला. तेंडुलकरांची नाटके कोणत्याही चौकटीत बसवता येत नाहीत, कारण प्रचलित चौकटी झुगारून ती लिहिलेली आहेत. नाटकाकडे पाहण्याच्या त्यांच्या चाकोरीबाह्य दृष्टिकोनाचे चोखंदळ मराठी प्रेक्षकांनी / समीक्षकांनी स्वागत आणि कौतुक केले. सनातनी वर्गाला तेंडुलकर मूर्तिभंजक वाटले. त्यांनी तेंडुलकरांच्या नाटकांवर वेळोवेळी हल्ले चढविले. ओरडा करून त्यांच्यापैकी काहींनी तेंडुलकरांच्या नाटकांवर बंदी घालायची मागणी केली. तेंडुलकरांच्या नाटकावरची या वर्गाची ही प्रतिक्रिया नैसर्गिक होती.

वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, बाळ कोल्हटकर, जयवंत दळवी ही मंडळी नाट्यवेड्या मराठी मनावर राज्य करत होती. अशा वेळी वर्गात मागच्या बाकावरच्या एखाद्या व्रात्य पोराने आवाज देऊन वर्गाची शिस्त बिघडून टाकावी, तसा तेंडुलकरांचा मराठी रंगभूमीवरचा प्रवेश होता. प्रेक्षकानुनयी नाटकाने मराठी रंगभूमीला आणलेल्या मरगळीवर तेंडुलकरांची नाटके हा जहाल उतारा होता. विषय, रचना आणि आशयात्मक विधान ह्या तिन्ही बाबतींत तेंडुलकरांनी केलेले नाट्यात्मक प्रयोग रंगभूमीला हादरून सोडणारे होते. एकूण २७ नाटके, २५ एकांकिका तेंडुलकरांनी लिहिल्या. याखेरीज आठ – दहा बालनाट्ये लिहिली.

समाजाला धक्का देण्यासाठी तेंडुलकर मुद्दामच काहीतरी खळबळजनक (सेन्सेशनल) लिहितात, असा आरोप काही परंपरावादी करत. तेंडुलकरांच्या नाट्यसंपदेचे हे यथार्थ वर्णन आहे. तेंडुलकरांच्या नाटकातून दिलेले धक्के हे केवळ समाजाला नव्हते तर मराठी रंगभूमीच्या परंपरेला होते. ‘गिधाडे’, ‘बेबी’, ‘सखाराम बाईंडर’, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकांतून तेंडुलकरांनी मराठी रंगमंचावर ‘अँटी हिरो’ आणले. त्यांच्या नाटकात समाजातल्या सांस्कृतिक दांभिकतेवर हल्ले असायचे. ‘घाशीराम कोतवाल’मध्ये पेशवेकालीन ब्राह्मणवर्गाचे जे चित्र तेंडुलकरांनी केले, त्यामुळे ब्राम्हणवर्ग खवळला; पण आपल्याकडल्या ब्राम्हणवर्गाचे वैशिष्ट्य असे की, त्यात  जसे सनातनी आहेत तसे पुरोगामीही आहेत. या पुरोगामी वर्गाने हे नाटक उचलून धरले. ‘घाशीराम’ मध्ये काम करणारे कलावंत तर बव्हंशी ब्राह्मणच होते.

‘कन्यादान’ मधल्या दलित तरुणाच्या चित्रणाने दलितवर्ग नाराज झाला. लोकानुनय हा शब्द तेंडूलकरांच्या शब्दकोशात नसल्याने तेंडुलकरांनी विरोधाला न जुमानता समाजातल्या बऱ्यावाईट वृत्तींवर आघात करणे चालूच ठेवले.

‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाचे इंग्रजीसह अनेक भाषांत भाषांतर झाले. नंतर गाजलेल्या इतर नाटकांचीही विविध भाषांत भाषांतरे होत गेली. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ आणि ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकांमुळे तेंडुलकरांचे नाव राष्ट्रीय पातळीवर गेले.

‘सामना’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, या मराठी चित्रपटांबरोबरच श्याम बेनगेल, गोविंद निहलानी यांच्या चित्रपटांसाठी तेंडुलकरांनी पटकथा लिहिल्या. त्यातून ते अमराठी वर्गाला परिचित झाले. ‘गृहस्थ’ हे पहिले नाटक तेंडुलकरांनी विशीत लिहिले. त्यांचे अखेरचे नाटक २००४ सालचे आहे आणि ते इंग्रजी आहे – ‘हिज फिफ्थ वुमन’.

 या दरम्यान ‘श्रीमंत’, ‘मी जिंकलो मी हरलो’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अशी पाखरे येती’, ‘गिधाडे’, ‘पाहिजे जातीचे’, ‘कन्यादान’, ‘कमला’ यांसारखी समाजवास्तावर भाष्य करणारी एकाहून एक भेदक नाटके तेंडुलकरांनी रंगभूमीवर आणली. प्रत्येक नाटकाचा विषय वेगळा, आविष्काराची शैली वेगळी. सत्तरीनंतरची पिढी तेंडूलकरांच्या नाट्यक्षेत्रातल्या या विलक्षण कामगिरीने भारून गेली.

नाट्यक्षेत्रातल्या यशाशी तुलना करता ललित वाङ्मय क्षेत्रातल्या तेंडूलकरांच्या कामगिरीकडे मात्र काहीसे दुर्लक्ष झाले, असे म्हणावे लागेल. ‘कोवळी उन्हे’ हे त्यांचे सदर मराठीतल्या ललित लेखनाचा अजोड नमुना आहे. ‘कोवळी उन्हे’ एवढे एकच पुस्तक तेंडुलकरांनी लिहिले असते, तरी ते श्रेष्ठ साहित्यिक म्हणून मान्यता पावले असते, असे म्हटले जाते. ‘रातराणी’ हा दुसरा लेखसंग्रह देखील त्याच तोलमोलाचा आहे. ‘रामप्रहर’ हा अलीकडील संग्रह सत्तरीतही तेंडुलकरांची या माध्यमांवर किती पकड होती, हे दाखवून देतो. ‘कादंबरी-एक’ आणि ‘कादंबरी-दोन’ या शीर्षकांच्या कादंबऱ्यांत त्यांनी मराठी कादंबरी विश्वाला अपरिचित विषय हाताळले. मात्र नाटककार तेंडूलकर या वादळी व्यक्तिमत्त्वाने ललित लेखक तेंडुलकरांचे व्यक्तिमत्त्व झाकोळले. टेनेसी विल्यमच्या बहुचर्चित ‘स्ट्रीट कार नेम्ड डिझायर’ आणि मार्क डोरेनच्या ‘लास्ट डेज ऑफ लिंकन’ या नाटकांचे त्यांनी केलेले ‘वासनाचक्र’ आणि 'लिंकनचे अखेरचे दिवस’ हे अनुवाद वाचक/ प्रेक्षकांसमोर नीटपणे आले नाहीत. मोहन राकेशांचे ‘आधे-अधुरे’ आणि गिरीश कर्नाडांचे ‘तुघलक’ या दोन नाटकांचे तेंडुलकरांनी केलेले अनुवाद तेवढे मराठी रंगभूमीवर चांगल्या प्रकारे सादर झाले.

चित्रपट हे नाटकापेक्षा अधिक व्यापक प्रेक्षकवर्ग असलेले माध्यम आहे. त्याही क्षेत्रात तेंडुलकरांचे खास योगदान आहे. पण टीकाकारांनी त्याची फारशी दाखल घेतली नाही. ‘उंबरठा’, मंथन, ‘आक्रोश’, ‘निशांत’, ‘अर्धसत्य’ यांसारख्या महत्त्वपूर्ण चित्रपटांच्या पटकथा तेंडूलकरांच्या आहेत. त्यांच्यापैकी काही पटकथा पुरस्कारप्राप्त ठरल्या. केतन मेहतांनी सरदार पटेलांच्या जीवनावर काढलेल्या ‘सरदार’ या चित्रपटाची तेंडुलकरांनी लिहिलेली पटकथा हा आदर्श पटकथेचा नमुना मनाला जातो. स्वतः तेंडुलकरांना मात्र त्यांच्या पटकथेवर फार बोलायला आवडत नसे. त्यात बहुधा त्यांना मोकळेपणाने वावरता येत नसावे. दिग्दर्शकांशी, निर्मात्यांशी झालेल्या खडाजंगी वादानंतर झालेल्या तडजोडीतून  त्यांच्या पटकथा आकाराला येत, “माझी एकही पटकथा अजून पडद्यावर आलेली नाही”, असे ते काहीशा उपरोधाने म्हणत.

नाटक, ललित लेख, चित्रपटाच्या पटकथा या दरम्यानही तेंडूलकर वेळात वेळ काढून फिल्म सोसायटीच्या चित्रपटांना हजेरी लावत, नव्या तरुण पोरांची नाटके पाहत, नव्या लेखन मंडळींची पुस्तके; वाचत त्यांना उत्तेजनपर प्रस्तावना लिहून देत. त्यांच्या पुस्तक प्रकाशनांसाठी वक्ते म्हणून उपस्थित राहत.

अखेरच्या दोन दशकांत त्यांच्यावर पुरस्कारांचा, सन्मानांचा वर्षाव झाला. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतांनाही साहित्यिक मूल्य आहे. तरुण मित्रांना त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या दोन – चार ओळींच्या पत्रांतूनही त्यांच्या तल्लख बुद्धीची कल्पना येते. तेंडुलकरांनी लिहिलेल्या या चिठ्ठ्या – चपाट्या पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्या, तर तेंडूलकरांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाच्या वेगळ्या पैलूवर प्रकाश पडेल, यात शंका नाही.

त्यांना अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार लाभले. ‘पद्मविभूषण’ किताब देऊन केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला. महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार, सरस्वती सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार हे महत्त्वाचे पुरस्कार होत.

-अवधूत परळकर

सौजन्य : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश 

साहित्य खंड