Monday, January 14, 2019

इंद्रायणी काठी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

लागली समाधी, ज्ञानेशाची

ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव

नाचती वैष्णव, मागेपुढे



मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड

अंगणात झाड कैवल्याचे

उजेडी राहिले उजेड होऊन

निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई

गीतकार : गदिमा
गायक : पं. भीमसेन जोशी
संगीतकार : पु ल देशपांडे

https://youtu.be/2Lcb7vTUlvE

ज़िंदगी ख़्वाब है

रंगी को नारंगी कहे, बने दूध को खोया चलती को गाड़ी कहे, देख कबीरा रोया...

ज़िंदगी ख़्वाब है,
ख़्वाब में झूठ क्या
और भला सच है क्या

सब सच है ज़िन्दगी ख्वाब है...

दिल ने हमसे जो कहा,
हमने वैसा ही किया
फ़िर कभी फ़ुरसत से सोचेंग
बुरा था या भला ज़िन्दगी ख़्वाब है...

एक कतरा मय का जब
पत्थर से होंठों पर पड़ा
उसके सीने में भी
दिल धड़का ये उसने भी कहा क्या

एक प्याली भर के मैंने,
ग़म के मारे दिल को दी
ज़हर ने मारा ज़हर को
मुरदे में फिर जान आ गई

ज़िन्दगी ख़्वाब है...

गाना : ज़िंदगी ख़्वाब है, ख़्वाब में झूठ क्या
संगीतकार : सलील चौधरी
गीतकार : शैलेन्द्र
गायक : मुकेश
https://youtu.be/mVGqFJcKOi8

Thursday, January 10, 2019

मराठी साहित्याची उलटी गंगा

मराठी साहित्याची उलटी गंगा :श्रीधर तिळवे नाईक

कुठलेही युग अद्ययावयता जोपासण्यासाठी अद्ययावत माध्यमे वापरत पुढे जात असते किंबहुना जितके माध्यम अद्ययावत तितके ते युग अद्ययावत ! प्रत्येक युगात अद्ययावत माध्यमे वापरणाऱ्यांना सहजासहजी जागा मिळत नाही त्यामुळे अद्ययावत लोकांना बंड करावे लागते आणि आपल्या युगाची नवता तिच्यातील अद्ययावतता विश्लेषण करून मांडावी लागते

चौथ्या नवतेला हा संघर्ष हा अटळ होता आणि तिने तो केलाही ! कुठल्याही नवतेतील दुसरी व तिसरी पिढी ही पहिल्या पिढीपेक्षा आपली नवता अधिक चांगल्या रित्या पेलते हा इतिहास असल्यानेच मी चौथ्या नवतेची मांडणी करतांना आमच्या ऎशोत्तर पिढीपेक्षा नव्वदोत्तर पिढी आणि नव्वदोत्तर पिढीपेक्षा दोन हजारोत्तर पिढी आमच्यापेक्षा ताकदीने लिखाण करेल अशी मांडणी केली होती प्रत्यक्षातही आमच्यापेक्षा नव्वदोत्तरीत सलील वाघांच्या पासून नितीन वाघ संतोष पवारपर्यंत आणि आत्ता ओंकार कुलकर्णी प्रणव सुखदेव पासून स्वप्नील शेळकेपर्यंत अनेकजण अतिशय अव्वल लिखाण करतांना दिसतायत पण एक गोष्ट जी बदलेल असं वाटलं होतं ती मात्र बदललेली दिसत नाही ती म्हणजे माध्यम !

वास्तविक चौथ्या नवतेत घडलेला सर्वात मोठा बदल हा इंटरनेट आणि डिजिटल क्रांती होता जिने ऍनालॉगस रिप्लेस करत हळू हळू डिजिटल माध्यम स्थिर केले त्यामुळे साहित्यातही हळूहळू का होईना डिजिटल क्रांती होऊन डिजिटल माध्यमे सेटल व्हायला हवी होती ते काळाला धरून होते पण प्रत्यक्षात मात्र सगळं जग डिजिटल होत चालले असूनही मराठीत विशेषतः साहित्यात मात्र अजूनही छापीलतेचा दबदबा संपतच नाहीये आजही एखाद्या कवीचा वा लेखकाचा विचार करतांना तो छापील माध्यमात काय उपलब्ध आहे त्यावरूनच त्याची लायकी ठरतीये आणि जे त्याचे छापील लेखन आहे आहे तेच आजही प्रमाण मानले जाते हरिश्चन्द्र थोरातांसारखा मागासलेला समीक्षक असे करत असेल तर ते समजून घेता येईल पण जेव्हा नितीन वाघांसारखा अद्ययावत माणूसही असे म्हणतो तेव्हा काय करायचे हा खरोखरच प्रश्न पडतो

ह्याही पुढचा एक प्रश्न येतो तो म्हणजे छापीलला केंद्रस्थानी का ठेवले जात आहे कि ही छापीलला अधिकृत आणि डिजिटलला मार्जिनलाईज्ड करण्याची साजिश आहे ? असे असेल तर मराठीची गंगा केवळ उलटीच वाहतिये असं नाही तर ती हिमालयाच्या छापील जटेत बांधण्याची ही कॉन्स्पिरसी आहे असंच म्हणावे लागेल

ह्यातून असा प्रश्न निर्माण होतो कि ह्या कारस्थानाचे उद्देश काय आहेत ?

एक गोष्ट साफच दिसते ती म्हणजे अनेक छापील पुस्तके छापणाऱ्या प्रकाशकांना छापीलता प्रमोट करणे भागच आहे कारण त्यांचा धंदा छापीलतेवर अवलंबून आहे असे त्यांना वाटते पण ज्यांचा धंदा नाही त्या कविंनाही छापीलता भयानक महत्वाची का वाटावी ? कि बक्षिसे आणि पारितोषिके फक्त छापीलतेला मिळतात म्हणून हे घडते ? वास्तविक आज ना उद्या सर्वच प्रकाशकांना ऑनलाईन पब्लिकेशन स्वीकारावे लागणे अटळ आहे आणि ज्यांना धंद्यात टिकायचे आहे त्यांनी त्याची तयारी करावी हे उत्तम

एक गोष्ट स्पष्टच दिसते ती म्हणजे डिजिटलला संपादकाची फारशी निकड भासत नाही ज्याच्या त्याचा ब्लॉग आणि जो तो आपल्या ब्लॉगचा संपादक अशी डिजिटलची अवस्था आहे आणि यदाकदाचित डिजिटल नियतकालिक (मासिक पाक्षिक वैग्रे ) अनियत्कालिक असेल तर त्याला ती सत्ता प्राप्त होत नाही जी छापील माध्यमातील संपादकाला प्राप्त होते छापीलमध्ये संपादकाची सत्ता टिकते म्हणून तर मराठीत छापीलतेचा गवगवा नाही ना ?

छापीलतेत ग्रुप स्थापून गोतावळा जमवून साहित्यात स्वतःच्या गोतावळ्याची मक्तेदारी निर्माण करता येते कदाचित त्यामुळे तर सारे गोतावळाकर छापीलतेच्या नादी लागलेले नाहीत ना ? वास्तविक डिजिटलमध्ये गोतावळा अधीक प्रभावीपणे काम करतो हे अलीकडच्या टोल आणि प्रतिटोल अश्या दोन्ही प्रकारच्या टोलभैरवांनी उत्तम सिद्ध केले आहे कि पूर्वी जशा काही गूढवाद्यांच्या सीक्रेट टोळ्या वा गोतावळे असायचे तसा हा प्रकार आहे आणि छापीलता ही ह्या लोकांच्या सिक्रेसीची कोडीफिकेशन आहे ?

की अकादमीक प्राध्यापकांना छापीलतेचे व्यसन लागलं आहे म्हणून ही अफूची शेती केली जातीये ? छापीलतेत अकादमीक बागुलबुवा अकॅडमिशयनना विशेषतः प्राध्यापकांना वाढवता येतो त्यांच्या चैनीसाठी आणि बागुलबुवा टिकवण्याच्या हव्यासासाठी तर ही छापीलतेची शेती केली जात नाहीये ना ? कि हे बंद पडलेले डिपार्टमेंटल कारखाने जिवंत आहेत म्हणून छापील तोफांची सातत्याने सलामी दिली जातीये ?

कि डिजिटल म्हणजे एलिट आणि छापील म्हणजे परिवर्तनवादी असा आभास निर्माण करून परिवर्तनवादी चळवळीचे आम्हीच साहित्यातले कंत्राटदार वा कर्ते असा आभास निर्माण करता येतो म्हणून छापीलता परिवर्तनवादी चळवळीचे हत्यार म्हणून जिवंत ठेवली जातीये आणि तिला केंद्रस्थानी आणून डिजिटल जाणीवपूर्वक मार्जिनलाईज केली जातीये ?

गरीब माणसेही व्हॉट्सप ग्रुप काढत असतांना साहित्यिकांना असले मागासपणाचे धंदे सुचावे हे दुर्देव
उच्च जातींनी मुद्दाम स्वतःला मागासलेले म्हणवून घेण्यासाठी मेळावे घ्यावेत तसा हा मागासलेपणा केन्द्रीयस्थानी आणून मान्यतेची सवलत लाटण्याचा प्रयत्न आहे

माझा छापीलतेला विरोध नाही छापीलता ज्यांना जिवंत ठेवायची आहे त्यांनी खुशाल ठेवावी पण ती जिवंत ठेवण्यासाठी डिजिटलता मार्जिनलाईज करण्याला माझा ठाम विरोध आहे येणारे युग हे पोस्टडीजिटलतेचे आहे त्याला जर सामोरे जायचे असेल तर मराठी साहित्यात आता डिजिटलता केंद्रीय बनणे आवश्यक आहे नाहीतर झोपी गेलेला जागा झाला हा फार्स पुन्हा एकदा साहित्याचे थिमसॉन्ग म्हणून सादर करण्याची वेळ येईल आणि आणखी एक कापले गेलेले नाक मराठी नौवारीच्या पदरात पडेल .

श्रीधर तिळवे नाईक

Sunday, January 6, 2019