Wednesday, December 30, 2020

मोठी त्याची सावली


मोठी त्याची सावली : भाग ७
- - - - - - -
प्रतिभेच्या उगमापाशी...

"तळ्याकाठचं गवत
तळ्याशी सलगीनं वागायचं
कारण त्याला जगायला
तळ्याचं पाणी लागायचं"
अशा शब्दांत जगाचा आपमतलबीपणा मांडताना "मिठी या शब्दात किती मिठास आहे, नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे", असा तरल शृंगारही चंद्रशेखर गोखले यांनी मांडला. त्यांच्या अर्थगर्भी चारोळ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस नादावला. निर्मितीच्या यशानंतर चंद्रशेखर गोखले यांच्या वाट्याला आभाळभर मानसन्मान आला...! पण प्रतिभेच्या उगमापाशी होती पराकोटीची अवहेलना आणि अस्थिरता!
गोखलेंच्या काव्यातूनही त्यांचं सोसलेपण बोलकं होतं. आयुष्यानं पोरवयातच बरंच काही शिकवलं. आपण शिक्षणाच्या फळीवर फार काही करू शकणार नाही, ही बोचरी जाणीवदेखील! मात्र त्यांनी परिस्थितीचा निमूटपणे स्वीकार केला. आपणहूनच त्यानं वर्गाच्या अगदी शेवटच्या बाकावरला एक कोपरा धरला. पण दोन गोष्टी आतल्याआत सुरू होत्या 'चिंतन' आणि 'चित्रकारी'. भोवतालच्या घटनांचा त्यांच्या मनावर होणारा परिणाम व्यक्त व्हायला प्रवृत्त करायचा. मध्यमवर्गीय पांढरपेशा कुटुंबात जन्माला आलेला तो. तीन बहिणींच्या पाठीवर चौथा मुलगा. मुलांनी शिकण्याशिवाय तरणोपाय नाही, या विचाराशी बांधलेलं घर होतं त्याचं. कला बिला सगळं काही नंतर..! वडिलांचं एक वाक्य तो कायम स्मरणात ठेऊन होता, "शिकला नाहीस तर कॉलनीतल्या साठेंच्या किराणा दुकानात पुड्या बांधायला पाठवीन." तेव्हापासून साठ्यांच्या दुकानासमोरून जातानाही तो धास्तावलेला असायचा.
तो जे. जे. आर्ट्स स्कूलमध्ये दाखल झाला. त्याचं कागदावर व्यक्त होणं घरात रुचायचं नाही फारसं. त्यातून वाद व्हायचे. पुढं पुढं कुरबुरी इतक्या वाढल्या की त्याचं हळुवार मन दुखावलं जायचं. अगदीच नाईलाज झाल्यानं एक दिवस घर सोडावं लागलं. मोठ्या बहिणीनं आश्रय दिला आणि सोबतच विचार आणि कृतीचं स्वातंत्र्यही! एकदा लहानग्या भाचीला अंघोळ घालून देताना तिच्या हातातली बाहुली पाण्याच्या टबात पडली. ताठरलेले हात-पाय...छताकडं लागलेले डोळे... आणि पाण्याच्या  पृष्ठभागावर विखुरलेले बाहुलीचे केस... निर्जीव बाहुलीच ती. पण ते दृश्य पाहून तो कमालीचा अस्वस्थ झाला आणि आयुष्यातली पहिली चारोळी जन्माला आली...
"पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहणाऱ्याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत"
घर सोडल्यानंतरचा प्रसंग. एका संध्याकाळी तो 'जेजे'तून बाहेर पडला. बाहेर पावसाची रिपरिप चालली होती. पुस्तकं डोक्यावर धरून पावसाचे थेंब अंगावर झेलत तो आपल्याच तंद्रीत घराकडे निघाला. पावलं वळतील तसा तसा! ती कुठं पडतायत हेही कळत नव्हतं त्याला. घराच्या फाटकापाशी आला आणि एकाएकी भान आलं. जे घर कधीचंच सोडलं आहे तिथं येऊन पोहोचलो आहोत आपण. पावलं थबकली आणि मागं वळली. सख्ख्या नात्यांमधली दरी जरा अधिकच रुंद भासली त्याला. डोळे डब्ब भरून आले आणि त्या भावनेनं एका अजरामर चारोळीचं रूप घेतलं...
"पुसणारं कुणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
रडणारंच कुणी नसेल तर
मरणही व्यर्थ आहे"
लग्न करायचंच नाही, हे त्याचं जवळपास ठरलं होतं. एक दिवस एका मित्रानं सांगितलं, "तुझ्या कवितांची एक चाहती आहे. तुला भेटायचं म्हणतेय ती." तिच्याशी भेट झाली. पुढे उलगडा झाला की तिला भेटायला आणताना मात्र "हे तुझ्याकरता आलेलं स्थळ आहे", असं सांगितलं गेलं होतं. रीतसर पसंती झाली आणि लग्न उरकलं. 'उमा' नावाची अत्यंत समजूतदार मुलगी आयुष्यात आली. "शेखर, तू लिहीत रहा. वाटल्यास मी लोकांसाठी भाजी- पोळ्या करून विकेन", असं म्हणणाऱ्या अर्धांगिनीनं त्यांच्या अडचणीच्या काळात आपला शब्द खरा केला. हा समंजसपणाचा भाव त्यांच्या एका कवितेतून असा उमटला..."घर दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं...एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं". आता चंद्रशेखर गोखले छानपैकी स्थिरावले आहेत. जगाच्या पाठीवर त्यांच्या चारोळ्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत करियरसाठी धडपडणाऱ्या होतकरूंचे मॉडेल को-ऑर्डीनेटर, मालिकांचे संवादलेखक, कथालेखक अशा विविध रुपांत ते आपल्याला भेटतात. सौभाग्यवती उमा गोखले मालिकांच्या जगातली प्रेमळ आई आणि समंजस काकू किंवा मावशीच्या रुपात बघायला मिळतात. मराठी कवितेच्या प्रांतात गोखल्यांनी इतिहास घडवला. "मी माझा"संग्रहाच्या लाखो प्रती खपल्या. इतर भाषेत रूपांतरित झाल्या. "मराठी चारोळीचा जनक" ही बिरुदावली ते विनयपूर्वक हसून अमान्य करतात, हे गोखलेंचं मोठेपण आहे. दिवस निघून जातात... जखमा साकळतात...उरलेले व्रण मात्र जन्माची सोबत करतात. अजूनही कधीतरी कातरवेळी जुन्या आठवांनी त्यांचा स्वर कापरा होतो... डोळे भरून येतात...काही क्षण निःशब्द जातात... पुन्हा चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंच्या चेहऱ्यावर हसू विलसतं... "मी माझा"संग्रहाच्या मुखपृष्ठावरच्या फोटोतल्यासारखं...!
© नितीन भट

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3986990831386283&id=100002262164906

Friday, September 25, 2020

Monday, July 27, 2020

मिसाईलमॅन भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम

मिसाईलमॅन भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा आज स्मृतीदिन!!! 
   विनम्र अभिवादन!!
🙏🙏🙏💐💐💐
आदरणीय अब्दुल कलामांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख मुलांना गोष्टीरुपाने करुन देणारे चार भाग व्यास क्रिएशन्स ने प्रकाशित केलेले आहेत.
डॉ. अब्दुल कलाम यांची संघर्षाची प्रेरणादायी कहाणी 

       
           तामिळनाडूतील 'रामेश्वरम ' सारख्या छोट्याशा गावामधे एका नावाड्याच्या पोटी जन्म घेतलेल्या एका महान वैज्ञानिकांचा थक्क करणारा प्रवास. 
 एका विशिष्ट ध्येयाला केंद्रस्थानी ठेवून, अतिशय प्रतिकूल परिस्थतीत  काळाच्या कसोटीवर स्वतःला तपासत, आजमावत शांतपणे यशाची एकेक उत्तुंग शिखरं जिंकणारा जणू योद्धाच !. एक विद्यार्थी, एक प्राध्यापक, संशोधक, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, लेखक, मार्गदर्शक आणि त्यानंतर थेट राष्ट्रपती, भारतरत्न या सर्वोच्च स्थानापर्यंतचा  विशाल कॅनव्हास आणि त्या कॅनव्हासवर अभिमानाने चितारलेले एक महान व्यक्तिमत्व, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. आपल्या हिंदुस्तानातीलच नव्हे तर इतर देशातील समस्त विद्यार्थ्यांनी त्यांचा अदभूत जीवन प्रवास अभ्यासण्यासारखा आहे. हेच महत्व,  हाच विचार  मनाशी घेऊन ठाण्यातील व्यास क्रिएशन्स यांनी 'मिसाईल मॅन' हे डॉ. कलाम यांच्या संपूर्ण जीवन प्रवासावरची एकूण चार  पुस्तके ( भाग १ ते ४ ) नुकतीच प्रकाशित केली आहेत.खास विद्यार्थी वर्ग नजरेसमोर ठेवून अतिशय सोप्या, सुटसुटीत, प्रवाही, ओघवत्या शैलीत ही चारही पुस्तके कलात्मकरित्या कुमार वाचकांसमोर आली आहेत. हे सुंदर आणि नेमके लेखन  आजचे आघाडीचे बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले आहे. खरंतर, डॉ कलाम हा विषय इतका मोठा आहे, त्यांचे कार्य इतके थोर आहे की हे सारे संचित चार पुस्तकांत कसे साकारायचे. मात्र हे आव्हान आव्हाड यांनी छानपणे लीलया पेलले आहे. 
१५ ऑक्टोबर म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आणि हा दिवस आपण वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा देखील करतो. 
हेच निमित्त साधून व्यास क्रिएशन्स यांनी त्या दिवशी मुंबईतल्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या, शिक्षकवर्गांच्या उपस्थितीमध्ये या 
चार भागातील पुस्तकांचे प्रकाशन केले हे महत्वाचे आहे. यामुळे समस्त विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व देखील अधोरेखित झाले. 
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आयुष्यभर जपणारे, आपण राष्ट्रपती आहोत असा कुठलाही आव न आणता अनेक विद्यार्थ्यांशी त्यांनी 
केलेला सुंदर सुसंवाद, सर्वानाच वंदनीय, प्रेरणादायी असणारे डॉ. कलाम म्हणजे सर्वांच्याच आपुलकीचा विषय. ही चारही पुस्तके वाचताना आपणाशी जणू 
डॉ कलाम हे संवाद साधत आहेत, गप्पा मारीत आहेत असे वाटते. विदयार्थ्यांना जणू ते आशेचे किरण देत आहेत असा भास होतो.आव्हाडांच्या लेखनाचा हा विशेष गुण पुस्तक वाचताना आवर्जून जाणवतो. कलामांनी व्यक्त केलेले विचार हे किती काळाच्या पुढे आहेत याचा प्रत्यय प्रत्येकाला येईल. असे उद्बोधक विचार पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. त्यातील काही..... 
" काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवत असतो. " 
" तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलवतील ! " 
" झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून, स्वप्ने ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला झोपू देत नाही." 
"आकाशाकडे बघा आपण एकटे अजिबात नाही, सर्व ब्रह्माण्ड तुमचे मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देते, जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो." 
.....कलामांचे हे विचार आजच्या पिढीतल्या विदार्थ्यांसाठी ही जणू आधुनिक सुभाषिते आहेत. या चारही पुस्तकांमध्ये डॉ. कलाम यांच्या जीवन प्रवासातले विविध टप्पे गोष्टीरूपाने सुंदरपणे रेखाटले आहेत. त्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. लहानपणाचा काळ, विदयार्थीदशेतील काळ, शिक्षणाचे महत्त्व, त्यासाठी खाल्लेल्या खस्ता, गुरुजनांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, विविध संस्थांमध्ये केलेली कामे, आलेले अनुभव, शास्त्रज्ञ होण्याचा प्रवास, केलेला संघर्ष, स्वतःचा लेखन प्रवास, ग्रंथांचे महत्त्व, राष्ट्रपती पदावर काम करताना आलेला अनुभव, भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान मिळाल्यावर 
त्यांनी व्यक्त केलेले मनोगत हे सारं सारं या चार पुस्तकांमध्ये व्यापलेले आहे. मिसाईल मॅन असे या पुस्तकांचे नाव आहे. डॉ कलाम यांनी आपल्या 
हिंदुस्तानाच्या संरक्षणासाठी जी क्षेपणास्त्रे बनवली त्यांची नावेही त्यांनीच दिलीत. अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग, ही त्यांनी दिलेली नावे किती अद्भूत, सुंदर आहेत याची आपणाला प्रचिती येते. वैज्ञानिक प्रगती करुन हिंदुस्थानने स्वयंपूर्ण व्हावे हेच त्यांचे अंतिम ध्येय होते. 
आव्हाडांनी कुमारांसाठी लिहिलेली ही चारही पुस्तके  मुलांना वाचनाचा आनंद तर देतीलच त्याबरोबर कळत नकळतपणे मुलांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवतील असा विश्वास आहे. डॉ कलाम यांची ही नुसतीच आत्मचरित्रे नसून चांगला माणूस बनण्यासाठी केलेल्या एका जीवन संघर्षाची, प्रयत्नांची ती जणू वैज्ञानिक कहाणी 'आहे. 

मिसाईल मॅन..भाग १ ते ४ . ( डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.) 
लेखक:  एकनाथ आव्हाड 
प्रकाशक: व्यास क्रिएशन्स, ठाणे. 
मूल्य : रु. २५०/- ( चारही पुस्तकांचा रंगीत सचित्र संच ) 

लेखक- रामदास खरे.

गुरुपौर्णिमेचा शिक्षकांशी संबंध नाही

*गुरुपौर्णिमेचा शिक्षकांशी संबंध नाही* 

हेरंब कुलकर्णी____

अनेक शाळेत गुरुपौर्णिमेला शिक्षक सत्कार केले जातात अनेकजण शिक्षकांना शुभेच्छा देतात..आणि हेच पुन्हा शिक्षक दिनाला ही केले जाते.. एकाच गोष्टीसाठी दोन दिवस कसे असतील ? समजण्यात चूक होते आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त अध्यात्मिक मार्गदर्शन केलेल्या किंवा करू शकणाऱ्या गुरू साठी असतो. जो ध्यान शिकवतो व आंतरिक षड्रिपु पासून मुक्तीचा मार्ग दाखवत आंतरिक परिवर्तन करू शकतो तोच गुरू असतो..शिक्षक हा काहीसे या लौकिक जगातील जगण्याचा मार्गदर्शक असतो..तो लौकिक जगण्यात नैतिकता शिकवतो व आध्यत्मिक प्रवासाच्या दारापर्यंत आणून सोडतो..त्यामुळे दोघांचे कार्यक्षेत्र पूर्ण वेगळे आहे तेव्हा शिक्षकांना शिक्षक दिनाला सन्मानित करावे व आध्यत्मिक गुरुला आज।जर असे गुरू आजूबाजूला नसतील तर विविध संत,योगी हे त्या पात्रतेचे आहेत...आपण शिक्षक म्हणजे गुरू असे सुलभीकरण करून गुरू शब्दातील महान आशय मर्यादित करतो असे मला वाटते...संगीत क्षेत्रात गुरू शब्द असाच सोपेपणाने वापरला जातो,पण तिथे केवळ मार्गदर्शक/शिक्षक असेच म्हटले पाहिजे । निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर ते रामकृष्ण विवेकानंद ही परंपरा यांच्यासाठी आजचा दिवस असतो। त्यातही बुद्ध ते कृष्णमूर्ती ही परंपरा अध्यात्मिक विकासाला गुरुची गरज नाही असे मानते..कोणता मार्ग निवडायचा ते व्यक्तीच्या जडणघडणीवर किंवा क्षमतेवर अवलंबून आहे आणि ज्यांना अध्यात्म मान्य नाही त्यांनी हे सर्वच नाकारावे पण एक नक्की शिक्षक म्हणजे गुरू नव्हे ।।
(हेरंब कुलकर्णी)

Wednesday, July 8, 2020

राष्ट्रीय सौर दिनदर्शिका

 आपल्या संसदेने व  देशाने २२ मार्च १९५७ रोजी राष्ट्रीय सौर कॅलेण्डरचा स्वीकार केला तो दिवस १ चैत्र १८७९ होता. त्यानंतर हे कॅलेण्डर जरी जनमानसात रुजले गेले नाही तरी सर्व जगाने त्याचा स्वीकार करावा इतके ते वैज्ञानिक व सोपे असून, भारत देशाने जगद्गुरु व्हावे असे वाटणाऱ्या सर्वांनी हे कॅलेण्डर निदान भारतात तरी रुजवण्याचे प्रयत्न करायला हवे आहेत. ही सर्व चर्चा या लेखांत वाचता येईल. 

Sunday, July 5, 2020

ई साहित्य पुस्तक

आज आषाढाचा पहिला दिवस. 
आजचा दिवस महाकवी कालिदासांना समर्पित. संस्कृत महाकाव्यांच्या त्या असीम वैभवाचा रसास्वाद घ्यायचा दिवस.
तसाच हा ई साहित्य चा. २००८ च्या आषाढाच्या पहिल्या दिवशी ई साहित्य चे पहिले पुस्तक, छापील पुस्तक, ’ऑडवाटेच्या कविता’ बरोब्बर बारा वर्षांपुर्वी प्रकाशित झाले.
कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यमंदिरात झालेला तो सोहळा, ती गर्दी, त्या गळाभेटी, ती भाषणं, ते कवितावाचन आणि पुस्तकप्रकाशनाचा तो क्षण आपल्यापैकी प्रत्येकाला आठवत असेलच. ती सुरुवातच एवढी जबरदस्त होती की तो दमखम एक शतकभर तरी नक्कीच पुरेल. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गर्दीमुळे “आपल्या” सर्व लोकांनी उभे राहून आलेल्या पाहुण्यांना बसायला जागा करून दिली आणि माझा ऊर अभिमानाने भरून आला. कारण हे “आपले” लोकही काही जवळपासचे रहाणारे नव्हते. नाशिक, पुणे, बोरिवली पनवेल अशा लांब्लांबच्या ठिकाणाहून आलेले. आणि तीन तास उभे राहिलेले हे माननीय कविगण होते. आजही त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे.
कार्यक्रमाचं नियोजन आणि संयोजन सॅमने केलेलं. पूर्ण स्वतःच्या खिशातून. अतिशय बारिकसारिक डिटेल्सची काळजी घेऊन त्याने हा कार्यक्रम पडद्याडून संयोजित केला. कुठेही कसलाही गडबड गोंधळ नव्हता.  प्रविण दवणे सरांना आणायची आणि परत न्यायची जबाबदारी स्वतःची गाडी घेऊन किरण मल्लावने पार पाडली होती. पुस्तकाचे संपादन प्रभा आणि मुक्ताने अत्यंत कुशलतेने केलं होतं. मुखपृष्ठावर अमृताने एक उडणारी कापसाची म्हातारी ठेवली होती. ती आपोआप हवेवर उडत उडत कुठवर आली ते आपण पहात आहोतच. प्रत्येकाकडे काही ना काही रोल होता आणि प्रत्येकाने तो समर्पणाने आणि समर्थपणे निभावला. सगळेच अननुभवी आणि अव्यावहारिक. त्यामुळे नवथर उत्साहाचा वावर जाणवत होता. सुदैवाने आजही तो उत्साह आणि प्रेम जाणवण्याइतपत उसळत आहे. 
कार्यक्रम तीन तास चालला. मला मिळालेले फ़ोटो व व्हिडिओ सोबत जोडले आहेतच. अजून कोणाकडे असतील तर द्या. भूपेशने आधीच दिलेले आहेत.  
ई साहित्य या शब्दाला जाहिर व्यासपीठ मिळाल्याला आज बारा वर्षे पूर्ण होत आहेत. एक तप. त्यासाठी कोणी कोणाचे आभार मानायचे आणि कोणी कोणाचे कौतुक करायचे हा प्रश्नच आहे. तर ते सगळे तूर्तास बाजूला ठेवून पुढचा मार्ग चालूया.
तू चालत रहा। तू चालत रहा।
चरैवति। चरैवति॥
#नाम
२२.६.२०२०
#esahity


Wednesday, June 24, 2020

शिक्षण

सगळीकडे  कसा आनंदी आनंद सगळे एकमेकांना प्रोत्साहन देताय ' सगळे सगळ्यांची काळजी घेताय , एकमेकांना समजून घेताय , त्यात काही अपवाद तर आहेच आणि नेहमीच असतात , ते कोणीच टाळू शकतच नाही ,
मग आता काय झाले ,नाही म्हणजे मी जे वरती लिहिले आहे ते अजून पण सगळे करतातच आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात।
प्रश्न असा आहे ।।
जीवन इतके सोपे झाले आहे का , जीवनाचे महत्व कमी झाले आहे का ,का आपण सगळे जीवनाचे महत्व अगदी रसातळाला नेऊन ठेवले आहे , विचार करण्याची गोष्ट आहे ,
माणसाचा जन्म किती योनी तुन गेल्यावर मिळतो माहीत नाही, अरे पण माणूस म्हणून जन्म झाला ना मग  का ।। त्या जन्माला पण काही भावना आहेत ,मोठे होण्याची जिज्ञासा आहे , प्रेम व्यक्त  करण्याची इच्छा आहे ।। आणि ते जीवन आपल्या  शरीराच्या रूपाने    आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे । 
मग का ,मग का आणि मग का ।।आपण त्याला आडवतो,
संकट सॉरी संकटे अजून पण त्सुनामी वेगाने येतील मग काय त्या जीवनाला संपवून टाकायचे ।।
इतके सगळे आपण कमजोर आहेत ।। नाही।।
विचार करण्याची क्षमता खूप खूप कमी झाली आहे ।। ती वाढवण्यासाठी कोण काय प्रयत्न करतोय , जो तो आपल्या तच busy । माझी कंपनी ,माझा boss माझे प्रमोशन माझे incerment माझे पैसे ,माझे प्रॉपर्टी ,अहो ते तर हवेच ।।पण वेळ ,वेळ वेळ दिलाच जात नाही ज्या गोष्टीला द्यायला पाहिजे।।।
आधी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे घरातल्या सगळ्यांना adjestment करायची सवय होती नकार पचवायची सवय होती आता विभक्त ,मला  हे पाहिजे म्हणजे पाहिजे ।। खर सांगू का नकार पचवायची क्षमता पूर्ण पणे संपली आहे , जो तो पाळतोय कुठे जातोय माहीत नाही।।
काल आमचा हिरो सुशांत ।।
काय कमी होते  त्याच्याकडे , उभारता कलाकार होता ,टॅलेंट होते ,पैसा भरपूर होता , मग का ।।
आहे त्या परिस्थितीत जगण्याची ।एन्जॉय करण्याची जीवन समृद्ध करण्याची , कला विकोपाला गेली असेच वाटते आता ।।
परीक्षांची निकाल लागतात तेव्हा हमखास  बातम्या येतात नापास झाला , कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या ।। कोण जबाबदार याला ।। आत्महत्या करणारा ,  आई बाबा ,की आजची शिक्षण पद्धती।। 
Positive रहा ह्याचे शिक्षण दिलेच जात नाही ।।
मनाचा कमकुवतपणा काढून टाका तुम्ही ग्रेट आहात तुम्ही ठरवले तर काहीही करू शकतात तुमच्यात शक्ती आहे तुम्ही ठरवले तर तीच पूर्व दिशा असेल असे का समजावले जात नाही, सांगितले जात नाही मन वळवण्याचा प्रयत्न का केला जात नाही ।।।
चूक कोणाची आपल्या सगळ्यांची आहे असे माझे मत आहे ।।
आता सरकार वर येतो नेहमी अभ्यासक्रम बदलत असतात ।।
मग।।
Depression । निराशा । एकटेपण वाटायला लागले ।। lost lost वाटायला लागले ।।
जीवन संपवण्याचे विचार डोक्यात यायला लागले ।। आणि अजून काही निराशात्मक त्याला अभ्यासक्रमात काही धडे आहेत का । नाही  नाही नाही ।।
हीच ती वेळ आहे, अश्या प्रकारचे शिक्षण लहानपणापासूनच द्यायला हवे असे नाही का वाटत ।।
 बुद्धी स्ट्रॉंग करा, संकटाला सामोरे जायची शिकवण  द्या ।। कठोर बनायला शिकवा
आणि हे सगळे अभ्यासक्रमात समाविष्ट करा ।।
बघा कसा फरक पडतो ।।
सगळे जग सुखी होईल ।।
लेखक
शेखर अरुण लोहकरे
9822329328
श्रीराम । 
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Thursday, June 18, 2020

depression



When Sushant has now suicided with depression as a reason , every single person writes that depression is not a shame and there is always someone to talk to etc etc etc. But in reality, when you tell someone that you’re depressed most times , people tend to wonder what’s there to be depressed about when he/she has a beautiful life and just advice to take life easy or to take a chill pill or to relax etc.  .. Well !! 

Depression can not be explained .. it cannot be discussed with or worked out with anyone.. it’s a process very personal to an individual .. and here is the bitter truth, but it needs to just be SELF-FOUGHT!

 Doesn’t matter how many friends we have or how many counselling organisations gets introduced in this world. It’s a very very very personal pain & experience (Sometimes mentally sometimes physically & sometimes both) & nobody ever, ever in this world can relate to an individual completely when they are depressed except for themselves. Which is why working on a strong self is very important so that when the mind loses interest in life, the heart provokes the interest to live & gives out a reason to live and finds strength in every way possible! 

Find peace within you for you and just for you whatever it takes. Do things that you love love n so love be it anythin! Stop thinking about others and think more about you literally all the time (it’s not called being selfish, it’s called being self-loving & self-aware). 

The more we give time for ourselves, the more we will be in peace and find happiness deep within which in turn will help during such times of depression & will also spread happiness to our surrounding. Yeah if talking to friends during bad times helps, do that.. but first make yourself your best friend that gives you more positivity and hope in life. That’s the best thing one can do to themselves to fight any damn mental or physical pain in life. 

If this post of mine is being read by someone somewhere in this world who is depressed right now, Just do this! Talk to yourself on how brilliantly & beautifully you have fought your mind all these days during different difficult times In life(be it anythin). 

Wipe your tears and cheer up. And you will in no time get back to a normal state of mind. All it calls for is a reminder on how strong you’re & keep reminding yourself for a lifetime.
#suman post

मानसिक आजार १

#Mental_Health_Awareness

मिडिया,काही साहित्यिक लेखकांनी थोडं आवरतं घ्यावं.
काहीजण त्यालाच दोषी ठरवल्यासारखं बोलतायेत. 
काही जण ही दुनियाच दोषी अाहे टाईप बोलतायेत.
जग खूप वाईट आहे. इथे हळव्यांची कदर नाही. 
भावनाशून्य दुनिया आहे ही.माणुसकी हरवली आहे. संवेदनशिलता लोप पावली आहे.वगैरे.वगैरे.!
तुमचा प्रेक्षकवर्ग फैनफलोविंग भरपूऱ असते.
तुमच्या लिखाणावर,बोलण्यावर जनसामान्यांचा
 डोळे बंद करून खूप विश्वास असतो.असू शकतो.
जपून बोला.भावनेच्या आहारात काहीही बोलू नका.

डिप्रेशन अनस्टेबल मूड साठी प्रत्येकवेळेसच दुसरा,
 हे जग,ही दुनिया जबाबदार असतेच असे नाही.
ते आपल्या मनातलं वादळ असतं.
अशावेळी सायंटीफीक प्रोफेशनल मदत गरजेची असते.त्यापर्यंत कुणाला पोचवता यावं.कुणाचं मन हलकं करायचा,आधार द्यायचा
 प्रयत्न करायला हवा. सपोर्ट सिस्टम महत्वाची.
जग वाईट नाहीच. आपले वैयक्तिक अनुभव
 वाईट असू शकतात.सरसकटीकरण करणं टाळायला हवं.

एक चांगला कलाकार आपल्यातून गेलाय
असं कुणासोबतही होऊ शकतं
 आपण मेंटल हेल्थ स्ट्रॉंग करायला मदत करायला हवी.
तो ब-याच जणांचा रोल मॉडल होता.
त्याचावर खासकरून टीनेजर्सचा खूप जीव होता.
त्यांच्या मनावर,त्यांच्या आयुष्याबद्दलच्या 
कल्पनेवर पण फरक पडायला नको.

मानसिक आजार २

......आणि मग येतात

आमच्याकडे साहित्य,चारोळ्या,लाईफ कोच,
 मोटीवेशनल कोट्स वगैरे ने कुठलेही, 
कितीही टोकाचे मानसिक आजार, टेंशनवेंशन
 १००टक्के गैरंटी के साथ ठिक होतात. 

 चा दावा ठोकणारे विचारवंत दादाताईलोक्स. 👏

#उसकेलिये_डॉक्टर_कायको_लगता?

Depression_is_Treatable ३

#SeekHelp
#Depression_is_Treatable 

कुणावरही कधीही पाळी येऊ शकते.
तर्कवितर्क लावू नये फार...मृत्यू दु:खदच.मनाचं गणित
 इतकं सोपं नाही...कुणीही यातून सुटलं नाही आजतागायत...
स्वत:ला संपवण्याइतपत टोकाला जातो माणूस...
ती एक साचत गेलेली अन क्षणार्धात अचानक 
डोकं वर काढणारी नैराश्याची अवस्था आहे....
त्याला मदत हवीच.मानसोपचार डॉक्टरांची,समुपदेशनाची,कॉंसेलींगची,
मित्राची,आपल्या जीवाभावाच्या माणसांची,प्रेमाची...!
मदत घ्यायला लाज कसली? आपल्याला त्रास होतोय 
हे कळणं अन न लपवता कुणाला सांगता येणं
 तसं डेरींगबाज असण्याची पावती...
अन दु:ख वाईट नाहीच..ती एक अवस्था आहे....
मरेपर्यंत अधुनमधून येणारच.

मनाप्रमाणं होत नाहीच बरेचदा...
सारं ऐशोआराम,सुखसोयी,असुनही
 माणूस विवंचनेत असू शकतो....
मनाला, मेंदुतल्या रसायनांना वैभव,नाव,आध्यात्म,
बडेजाव काही काही कळत नाही...
बस्स त्याला फार नकारात्मक तीव्रतेचं,
अपेक्षांच ओझं नकोसं असतं....
त्याला नैसर्गिक सहजता अन निरोगीपण हवं असतं...
ते तो शोधतो आयुष्यभर.अन कित्येकदा बेभान होऊन
 त्या सुखाच्या मृगजळी शोधात हरवून जातो....
सुख दुर नव्हतचं...ते जवळपासंच होतं.असतं...
आपल्या मायेच्या प्रेमाच्या माणसांजवळच....
दुसरा कुठलाही पर्याय नसतो.बाकी सारं दुय्यम.
माणसं महत्वाची,माणुसकी प्रेम वात्सल्य महत्वाचं, 
छंद,अन जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा....
मग काट्यांचीही मखमल होते....

सुखाची,समाधानाची कारणं शेवटी आपल्याच मेंदुत,
मनात असतात.हे समजलं की माणुस ख-या अर्थानं 
समग्र शहाणा समजदार होतो.स्पिरीच्युयालीटी
 अध्यात्म याहून वेगळं नसतं...
मनाला शांत करण्यासाठी, दिखाव्याचं झगमगाटाचं 
वादळ मेंदुत घुसता कामा नये...!🌿
आपण अतिहळवे होतो. भावनिक होतो एखाद्या वळणावर.
तेव्हा सायंटीफीक प्रोफेशनल मदत लागते. औषधं लागतात. Antidepressants लागतात.
प्रॉपर कौंसेलिंग लागते. थेरपीज लागतात.
 इतर आजारासारखंच यालाही फार जपावं लागतं.
"सुसाईड" या आजाराने कुणी जातो.
 कुणी सुसाईड करत नसतो.
"he died by suicide not committed suicide"

आपल्याला कुणालाही शुन्य मिनटात दोषी ठरवण्याची,
 जज करण्याची  खूप विचित्र सवय असते.
त्याने सुसाईड केलं. मग खरंच खूप वाईट आहे हे जग. इथे भावनांची कुणाला कदर नाही. भावनाहीन झालाय माणूस वगैरे,.नैराश्यातून झालेला भावनिक उद्रेक इंपल्स थांबवता येऊ शकतो. टायमिंग वेळ फार महत्वाची असते. वेळ निघून गेला की हाती काही उरत नाही.

आवडता अभिनेता. त्याने पडद्यावर एम एस धोनी साकारल्यावर धोनी अजूनच आवडाया लागला होता. 
चांगला कलाकार गेला. 
चांगली माणसं अशी अवेळी निघून गेली की एकंदरीतच अवतीभवती एक रितेपण जाणवतं. आपणही बेचैन होतो.

                  - डॉ. श्यामल सराडकर. (सायकियाट्रिस्ट)

Wednesday, June 17, 2020

मानसिक स्वास्थ्य

*थोडक्यात नाहीये, पण महत्त्वाचं*

रविवारच्या बातमीनंतर बरेच विषय चघळले जात आहेत. हो, मी त्याला 'बातमी' म्हणतेय कारण ती बातमीच आहे. आपण त्यावर एखाद-दोन दिवस विचार करत बसू किंवा आठवडाभर किंवा आणखीन थोडा काळ; त्याउपर नाही. हे 'असं कसं बाई बोलता येतं' असं वाटू शकेल पण आहे ते असं आहे. आणि फार वाईट तरी कुठेय. आपण परवाही, कालही आणि आजही जेवलो, झोपलो (शांत लागली नसेल झोप पण झोपलो) - ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातल्या सकारात्मकतेचीच लक्षणं आहेत.... म्हणजे अजूनही आपल्याला जगावंसं वाटतं, येणाऱ्या दिवसासाठी सज्ज राहावंसं वाटतं - चांगलंच आहे की!

याची दुसरी बाजू अशी की अजूनही आपण मानसिक आजारांची तीव्रता ओळखलेली नाहीये. कशी लक्षात येतील ती? अशी आजारपणं दिसतात का? छे! ताप आहे का? पोटात दुखतंय? जुलाब? उलटी? नाही ना. मग काही होत नाहीये. कारण मेंदू कसा काम करतो हे दिसतंय थोडंच. हे मन काय काय खेळ खेळतं, आयुष्यात काय उलथापालथ करतं हे भोगणाऱ्या माणसाच्या मेंदूत/मनात डोकावून कुठे पाहता येतं?

एका मर्यादेनंतर ते शरीरावर परिणाम करू लागतं पण आपण कधी थांबून विचार करतो का - शरीरावर परिणाम दाखवण्याइतपत मन किती ढवळून निघालं असेल? समुद्राच्या खोल तळाशी पाणबुड्यांच्या गोळीबाराच्या आवाजाने हैराण होऊन देवमाश्यांच्या कानातून रक्त येतं आणि ते समुद्र काठावर येऊन आपला प्राण त्यागतात तशी गत आहे ही! 

Clinical depression, PTSD, anxiety disorders, panic attacks - थोडक्यात नैराश्यापासून आत्महत्येचा विचार करणं इथवरच्या अनुभवावरून सांगते, हे वाटतं त्याहून प्रचंड भीषण आहे. पण आता मी यातून बाहेर पडलेय. माझे मानसोपचारतज्ञ म्हणत, "हे elastic सारखं आहे, एकदा ताणलं की पुन्हा कधीच पूर्ववत होत नाही. त्यामुळे मला माहितीये मी कुठल्याही क्षणी या खोल दरीत उडी मारू शकेन आणि मी त्यासाठी मानसिकरीत्या तयारही आहे. फक्त आता मी मागच्या panic attack पेक्षा आगामी panic attackसाठी अधिक सज्ज आहे. माझ्या मानसिक स्वास्थ्याने (किंवा त्याच्या स्वस्थ नसण्याने) मला खूप काही शिकवलंय. 

मागील काही वर्षात मी त्यावर उपाय शोधण्याचा, ते बरं करण्याचा आणि त्यासोबत जगायचा एकूणेक प्रयत्न करून पाहिला आहे. ज्यांनी मला या प्रवासात साथ दिली त्या डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ, counsellorsची मी ऋणी आहे. पण त्याहूनही अधिक मी आभारी आहे त्या प्रत्येक अनुभवासाठी आणि या मानसिक रोगांसाठी. त्यांनी माझ्या आयुष्याला समृद्ध केलंय, मला शहाणं केलंय.

त्या अनेक प्रयोगांपैकी काही आठवड्यांपूर्वीच केलेला self-love चा म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याचा प्रयोग. माझी मैत्रीण मधुरिमा मजुमदार याची कार्यशाळा घेते, त्यातच मी ह्याबद्दल शिकले. या प्रवासात, मला माझ्यातल्या “मला” शोधायचं होतं - नैराश्याच्या आणि चिंतेच्या काळ्या ढगांपलीकडे असलेल्या मला. कारण पाऊस कोसळत असला, ढग दाटून आलेले असले तरी सूर्य तिथेच असतो - आपल्या भव्य दिव्य तेजाने सगळी सृष्टी झळाळून टाकत असतो. आपल्या आतले आपण त्या सूर्यासारखेच असतो. आपल्यालाच हे नैराश्याचे, चिंतेचे ढग बाजूला सारून (कधी कधी ढकलून) त्या सूर्यप्रकाशात न्हावं लागतं. आणि हे आपल्यासाठी इतर कुणीही करू शकत नाही. कारण तो सूर्य आपल्या आत असतो - आपल्या मन, मेंदू आणि नकारात्मक विचारांप्रमाणेच.

या आत्मशोधाच्या, स्वतःला शोधून काढण्याच्या प्रवासात मी खूप काही शिकले. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे इथे नमूद करते. (डिप्रेशन आणि मानसिक रोगांवरचे हे काही रामबाण उपाय नाहीत पण यांनी मदत होऊ शकेल नक्कीच ... अनुभवांवरुन सांगते)

१. स्वतःवर तस्संच प्रेम करा जसं प्रेम तुम्हाला इतरांकडून हवंय

 स्वतःला आरशात पहा आणि स्वतःशी तस्सेच बोला जसं तुम्हाला इतरांनी बोलणं अपेक्षित आहे. हे फार बाळबोध आणि सोप्पं वाटेल पण तसं नाहीये. Anxiety issues आणि depression असणाऱ्यांसाठी एखाद्याच्या डोळ्यात बघून बोलणं म्हणजे वाघाशी नजरानजर केल्यासारखंच आहे. आणि ज्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलायचे आहे ते आपण स्वतःच असू तर अधिकच कठीण. खूप प्रत्यनांनी त्यात सहजता येऊ लागते. 

असं म्हटलं जातं की इतरांकडून अपेक्षाच करू नये आणि स्वतःवरच इतकं प्रेम करावं की इतरांच्या प्रेमाची गरज भासू नये वगैरे वगैरे ते काही तेवढं खरं नाहीये. आपण समाजात राहतो, माणसाला माणूस लागतो. फक्त आपण आपल्यावर प्रेम केल्याने इतरांची गरज कमी भासते. आणि जसजसं इतरांवर अवलंबून राहणं कमी होतं तसतसं आपल्याला सशक्त वाटू लागतं. मानसिक आजारांमध्ये बऱ्याचदा निर्बळ असल्याची भावना सतत जाणवत राहते. ह्या प्रयोगामुळे या भावनेवर नियंत्रण ठेवता येते.  

आणि असंही, आपण आपल्या माणसांवर "प्रेम" करायला पाहिजे; त्यांना आपली "गरज" बनावता कामा नये. ते एकूणच चुकीचं आणि अन्याय्य आहे - आपल्यावरही आणि आपल्या माणसांवरही.

२. "असू दे" असं म्हणा 

जेव्हा इतर कुणीही असं म्हणत नसेल तेव्हा तुम्ही स्वतः म्हणा "असू दे" "It is Okay" "होतं असं". ना ह्यात अपराधीपणा वाटला पाहिजे, ना स्वतःला माफ करण्याची गरज आहे. फक्त स्वतःला आहोत तसे स्वीकार करण्याची गरज आहे. आणि जगाने तुमचा स्वीकार करण्याआधी तुम्ही स्वतःचा स्वीकार करणे फार गरजेचे. 

स्वतःला एखाद्या ३ वर्षाचं मूल आहोत असे समजा, ज्याने आत्ताच TVचा रिमोट पाडलाय. तुमच्याकडे काही पर्याय आहेत: तुम्ही त्या बाळावर खेकसू शकता, त्याला शिक्षा करू शकता, त्याने केलेल्या कृतीचं समर्थन करू शकता किंवा नुसतं "असू दे" म्हणू शकता. कारण तुम्हाला माहितीये की त्या बाळाला काहीच कळलेलं नाहीये, कळू शकणार नाही कारण ते लहान आहे. ज्याला आपली चूक समजू शकते त्याला तुम्ही माफ करू शकता. पण नसेल कळत तर "असू दे" म्हणून विषय संपवू शकता. 

तुम्हीच ते मूल आहात. तुम्ही चुकताय कारण तुम्ही ३ वर्षांचे आहात. तुम्हाला अजून १३ वर्षांचं व्हायचंय जेव्हा तुम्हाला कळेल की रिमोट असा फेकायचा, पाडायचा नसतो. (३ किंवा १३ हे प्रातिनिधिक अंक आहेत. अक्कल यायची तेव्हाच येते. वय बघून येत नसते)

बरेच लोक (किमान मी तरी) दुःखी असतात, निराश असतात कारण त्यांना "असू दे" म्हणणारं कुणी नसतं. मी स्वतःला शिक्षा करत असे आणि अधिकाधिक नकारात्मक विचार करत असे. आता मला कळतंय की कुणी हे म्हणेल म्हणून थांबू नये. आपणच आपल्याला म्हणावे "असू दे गं. होतं असं."

मला आठवतं, जेव्हा PTSD चा खूप परिणाम माझ्यावर झाला होता तेव्हाचा हा किस्सा. मी दुधाची पिशवी फोडून दूध उकळलं. त्यानंतर मी त्यावरून वाफ जावी म्हणून झाकण ठेवताना ते अर्धवट ठेवलं. मग मी फ्रिजमधून बटर काढलं आणि ते त्या तापलेल्या दुधाच्या झाकणावर ठेवलं. उकळेलंल दूध होतं म्हणजे झाकण किती तापलं असेल. अर्थातच बटर विरघळलं आणि टपाक्कन दुधाच्या पातेल्यात पडलं. दूध वाया गेलं. माझ्या घरच्यांनी काही बोल लावावा त्यापेक्षा खूप जास्त मीच स्वतःला बोलले. खरंतर घरचे कुणीच मला काही बोलले नाही. उलट मीच सतत स्वतःला बोल लावत होते, "मी अशी कशी वागू शकते!" मी जेव्हा हे माझ्या डॉक्टरांना सांगितले तेव्हा ते म्हणाले "असू दे गं". पण बहुतेक मला ते ऐकूच आलं नाही. आज लक्षात येतंय मी स्वतःला "असू दे गं" म्हणायला हवं होतं. 
पण म्हटलं ना, अक्कल यायची तेव्हाच येते आणि ती योग्य वेळीच येते.

३. स्वतःला सांगा "हे ही सरेल. मी आहे तुझ्यासोबत. कधीच साथ सोडणार नाही"

हा पुढचा टप्पा आणि हीच शेवटची टीप. स्वतःला सांगा, "ज्यात तू अडकला आहेस/अडकली आहेस ते तात्पुरतं आहे. हे ही सरेल. आपण यातून बाहेर पडू. मी तुझ्यासोबत आहे. तुझी साथ कधीही सोडणार नाही." तुम्हाला इतरांनी जसं आश्वस्त करायला हवंय, अगदी त्याच पद्धतीने स्वतःशी बोला. कारण इतर लोक तसे बोलतील ही, आश्वासन देतील ही पण तुमचं मन त्यावर विश्वास ठेवलंच याची खात्री नाही. तुमचं मन आजारी आहे. ते इतरांचं नाही ऐकणार कदाचित पण तुमचं नक्की ऐकेल. 

ते एका ३ वर्षाच्या बाळासारखं आहे. डॉक्टर म्हणतात, तू बरा/बरी होशील. पण त्याचा त्यावर विश्वास नसतो. पण हेच जेव्हा त्याची आई म्हणते तेव्हा ते बाळ विश्वास ठेवतं. कारण इतर कुणाहीपेक्षा त्या बाळाचा आपल्या आईवर विश्वास असतो. ती त्या बाळाला भरवते, बाळ आनंदी आणि सुदृढ असावं यासाठी सगळे प्रयत्न करते आणि त्यावर निरपेक्ष प्रेम करते. 

आपल्याला नेमकं हेच करायचंय. स्वतःवर निस्सीम, निरपेक्ष प्रेम.

ता. क.: ही पोष्ट मी काल इंग्रजीत लिहिली होती. पण बहुतेक माझ्या मराठी वाचकांनी 'एवढं English कोण बरं वाचेल' असं म्हणून सोडून दिली असेल किंवा वाचली असेल पण नीट उमगली नसेल...  म्हणून मी ती संपूर्ण पोष्ट मराठीतून लिहिली. या पोष्ट प्रपंचामुळे एका व्यक्तीला आधार मिळाला, मार्ग दिसला किंवा स्वतःवर प्रेम करावंसं वाटलं तरी मला पुरे. आपल्या मानसिक अवस्थेबद्दल असं समाज माध्यमावर लिहिणं सोपं नसतं पण आधार नसणं (अनेकदा असूनही) किंवा मार्ग न सापडण्याचे काय परिणाम होतात हे अवगत असल्याने, ते इतर कुणाच्या वाटेला येऊ नये असं मनापासून वाटतं.

यात बऱ्याच ठिकाणी भाषा आणि व्याकरण चुकलेलं असू शकतं. काही शब्दांना मला पर्यायी मराठी सुचले नाहीत/सापडले नाहीत किंवा मला नाही वाटलं त्या ठिकाणी मराठीतून व्यक्त व्हावं. आहे ते असं आहे. “असू दे”. असं मी स्वतःला सांगितलंय. तुम्हीसुद्धा मला समजून घ्याल ही अपेक्षा. :)


It's all about mental health

*Long Post Alert*

A lot has been doing the rounds since we got to know yesterday's news. Yes, I am referring to it as "news" because it IS news - nothing more, nothing less. We are going to ruminate over it for a day or two, perhaps for a few weeks or a little longer. This may sound oh-so-negative but it is true. And it isn't that bad. We've lived yesterday's day, had our meals, slept well (or intermittently) - all of these are positive signs that we are living and looking forward to the next day. 

The other thing is, we haven't taken mental illness that seriously yet. Because it is not visible. Is it a fever? Do you have stomachache? Are your motions loose? Nope! Then all is okay. Because no one can see how the brain functions, how the mind manipulates and how it wreaks havoc in the lives of the person in question. 

Beyond a point, it starts manifesting physically but do we realize to what extent has something gone for the mind to show physical symptoms! It's like those submarines bombarding in the deep blue sea and the whales' ears bleeding so much that they come to the shores and die there! 

For someone who has been through all of this - clinical depression, PTSD, anxiety disorders, panic attacks, contemplating suicide - let me tell you, it's far from bad. But I am also someone who is out of it (presently). My psychiatrist used to say, it's like an elastic - it's been stretched so much that it can never go back to normal now. So, I know I may dip into this state anytime but I am getting used to this new normal. I am more prepared for the upcoming panic attack than I was for the last. My mental unwell-being has taught me a lot.

Over the last few years, I have been grappling to learn ways to sort it, to fix it, to cure it, to live with it. I am grateful to all the mental health professionals who supported me in my journey. But, most importantly, I am grateful to all those episodes and my mental health issues. They have contributed to my life and given me the wisdom I carry today. 

Of the many things I tried, the recent one was my journey of self-love that I had my friend Madhurima Mazumdar hold my hand and take me along. In this journey, I had to discover my authentic self - the one that resides beyond the clouds of depression and anxiety. Even when it rains and the clouds may be dark, but the Sun is always there, right behind them - magnanimously showering its light on the world. Our inner authentic self is that sun. We need to push the clouds aside to let the sun shine upon us. And no one else can do that except us because the sun lies inside of us - just as the mind and the thoughts and the negative patterns. 

There are a lot of things that I learned in this journey but I will tell you the most important ones (not that they are the "bingo" answer to depression and mental health issues but they help)

1. Love yourself the way you want to be loved. Look at yourself in the mirror and talk to yourself the way you want to be spoken to. 

It may sound childish and easy-peasy but it is NOT. For someone with anxiety issues and depression, looking into someone's eye is like facing a tiger. And if that someone is they themselves, it's worse to say the least. Needs a lot of practice but do it. 

They say, you should stop expecting from others and love yourself enough to not need others' love. That's BS. We are social animals and we need each other. But as we love ourselves more and more, we need others less. And as this dependency breaks, we start feeling powerful. An important feature of mental health issues is the feeling of powerlessness. So this exercise takes care of that. 

Also, we need to "love" the other person, not "need" them. That in itself is so wrong and unfair on ourselves as well as the other person. Think about it.

2. Say "IT IS OKAY"

Yes, even no one says that to you, you say to yourself "It is Okay". There is no need to carry the guilt or "forgive" yourself. There is a need for acceptance. And before the world accepts you, you need to "accept" yourself. 

Think of yourself as a child, perhaps a 3-YO that breaks the TV remote. You have your options: you can yell at it, you can punish the child, you can forgive the child or support their behavior or you can just say "It's Okay" because you know the child doesn't understand. You can forgive someone who understands their mistake. But if someone doesn't, you can't do much about it apart from saying "It is Okay". 

You are that child. You are making mistakes because you are the 3-YO. You are yet to become a 13-YO to understand that the remote musn't be thrown around and broken. (3 or 13 are just numbers. Wisdom comes at the right time. Age doesn't matter) 

Most people (at least in my case I was) are depressed because no one said "It is okay" to me. I kept punishing myself, sinking in negative thought patterns. Now I know that I shouldn't wait for anyone. I say it to myself, "It's Okay" for everything. 

I remember once (when I was at the peak of PTSD), I had just boiled milk, put a lid on it keeping it half covered, took butter out of the fridge and kept the block directly on the lid. Obviously it melted within seconds and it fell into the fresh milk! 

I reprimanded myself much more than anyone in my family did. In fact, they were nice. They didn't say a word. I kept thinking to myself "How could I do it!" I told this to my psychiatrist and he said "It's okay. Happens" but it fell upon deaf ears. Today, I realize that I should have said "It's okay" to myself. But, as I said earlier, wisdom comes at its own merry time and that is the right time. 

3. Say "This too shall pass. I am with you. I will never leave you"

That brings me to the next and the last pointer. Say to yourself, this what you are stuck in is temporary. It will pass. We will get through this. "I am with you and I will never leave your hand". Reassure yourself like you want to hear from someone else. Because someone else may say it and you may still not trust it. Your mind is not well. It will not believe their word. But it will believe what you say. 

It's again like a 3-YO. It is unwell. The doctor says, you will be fine. But it doubts his/her words. The mother says the same to the 3-YO and it believes her immediately. Because the child trusts the mother more than anyone else. She feeds the child, does everything to keep the child happy and healthy and loves her unconditionally. 

That's what we got to do. Love ourselves unconditionally.

Tuesday, June 9, 2020

Friday, June 5, 2020

कुंकू

♦️🛑♦️ कुंकू कसे लावावे ? ♦️🛑♦️

🛑लहान मुलीपासून वयस्कर स्त्रीपर्यंत सर्व हिंदु स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. केवळ विधवा कुंकू लावत नाहीत. लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला आहे.

🛑उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे भेद देशकालपरत्वे आहेत.

🛑कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ.

🛑अ: कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन तोंडवळ्याच्या (चेहर्‍याच्या) स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो.

🛑आ:  कपाळावरील स्नायूंचा ताण अल्प होऊन मुख उजळ दिसते.

🛑इ. कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो.

🛑कमळ हे साकारस्वरूप, कुंकू हे शक्तीस्वरूप, तुळस हे श्रीकृष्णतत्त्वस्वरूप, तर बेल हे शिवस्वरूप आहे.

🛑कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत होऊन तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते.

🛑कुंकवामध्ये तारक आणि मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते. देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळण्याच्या हेतूने स्त्रीच्या भ्रूमध्यावर तिने स्वतः किंवा दुसर्‍या स्त्रीने कुंकू लावल्यास स्त्रीमधील तारक शक्तीतत्त्वाची स्पंदने जागृत होऊन वातावरणातील शक्तीतत्त्वाची पवित्रके त्या स्त्रीकडे आकृष्ट होतात.

🛑ब्रह्मतत्त्व.

साभार.....🙏

Wednesday, June 3, 2020

महाभारत

 महाभारत  - तत्व, तर्क व तात्पर्य 

महाभारतातील प्रत्येक पात्र आणि प्रत्येक प्रसंग ही एक शिकवण आहे तसंच त्याकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून न पाहता किंवा खिल्ली न उडवता अभ्यास म्हणून पाहिलं तर हेच महाभारत आपल्याला प्रत्येक प्रसंगी मार्गदर्शक बनू शकतं, असं मला वाटतं. मी महाभारताची जाणकार नाही! एक सामान्य वाचक म्हणून कथा कादंबऱ्यांतून वाचलेल्या तसंच महाभारतावर आधारित मालिकांमधून जे समजलं, अभ्यासलं त्यातून मला जे कळलं त्यावर 'महाभारत - तत्व, तर्क व तात्पर्य' यावर या पोस्ट्स असतील. माहितगारांनी यावर जरूर प्रकाश टाकावा मात्र यावर कुठलाही वाद किंवा उटपटांग कॉमेंट्स करू नये, ही नम्र विनंती! __/\__

भाग १ - महत्वाकांक्षा 

महत्वाकांक्षेचं उग्र रूप महाभारतात पाहायला मिळतं. महत्वाकांक्षेचा अतिरेक किती विनाशी व विदारक  असू शकतो, याचे अनेक उदाहरण महाभारतात वाचायला मिळतात.

तर्क : अति महत्वाकांक्षा मत्स्यगंधा सत्यवतीने धरली. राजा शंतनूचा प्रथम पुत्र देवव्रत राजसिंहासनवर न बसता आपला व राजा शंतनूचाच पुत्र सिंहासनाचा उत्तराधिकारी व्हावा, ही अट तिने राजा शंतनूपुढे टाकली. राजा शंतनूसारखा प्रतापी पती व कुरुवंशासारखं संपन्न राजघराणं मिळत असूनही सत्यवतीच्या वडिलांना आणि सत्यवतीलाही राजसिंहासनाचा मोह सुटला नाही! सत्यवतीच्या अटीबद्दल कळताच देवव्रताने जन्मभर ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे तसेच राजसिंहासनाचा कायम त्याग करण्याची प्रतिज्ञा केली. राजसिंहासन राजा शंतनूच्या प्रथम पुत्राला न मिळता आपल्याच पुत्राला मिळावं या महत्वाकांक्षेपोटी राजा शंतनूला घातलेल्या अटीची फार मोठी किंमत सत्यवतीला चुकवावी लागली. 

सत्यवतीचा मत्स्यकन्या सत्यवती कुरुवंशाची सम्राज्ञी झाली! मात्र कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त मिळूनही सत्यवती कधीही सुखी राहिली नाही. राजा शंतनू व सत्यवतीचा ज्येष्ठ पुत्र चित्रगंध गंधर्वांसोबत युद्धात मारला गेला तर कनिष्ठ पुत्र विचित्रवीर्य विवाहानंतर काही काळातच टीबीने मृत्युमुखी पावला. दोघेही अल्पवयीन व  निपुत्रिक मेल्यामुळे राजसिंहासन रिक्तच राहिलं. कुरुवंशाला वारस मिळावा या हेतूने सत्यवतीने देवव्रताला विचित्रवीर्याच्या विधवा पत्नींशी, अंबिका व अंबालिकाशी विवाह करण्याबद्दल सुचवले. परंतु भीष्माने प्रतिज्ञा मोडायला नकार दिला. नाईलाजास्तव अंबिका व अंबालिका यांना पुत्र व्हावे याकरिता नियोग पद्धती अवलंबली गेली. अंबिका व अंबालिका दोघींना झालेल्या अनुक्रमाने धृतराष्ट्र व पांडू या दोन मुलांपैकी धृतराष्ट्र जन्मतःच अंध निघाला. त्यामुळे त्याला राजसिंहासनावर बसवणे नियमाविरुद्ध होते.

राजा पंडूला शापामुळे अल्पवयात मृत्यू आला. धृतराष्ट्राला कार्यकारी राजा म्हणून घोषित करावं लागलं! धृतराष्ट्राची राजा होण्याची तीव्र महत्वाकांक्षा त्याच्या मुलात, दुर्योधनात पूर्णपणे उतरली होती. त्याला धृतराष्ट्राचा व इतर भावांचा पाठिंबा होताच. तरीही पांडूपुत्र युधिष्ठिरपेक्षा वयाने लहान असल्याने त्याला राजसिंहासनावर बसवणे शक्य नव्हते. परंतु दुर्योधनाला राजसिंहासनाची महत्वाकांक्षा असल्याने त्याने ते युधिष्ठिराला कधीही प्राप्त होऊ दिले नाही. कौरव पांडवांमध्ये कायम वैर राहिलं. याच वैराचा परिणाम पुढे महायुद्धात झाला, ज्यात पाच पांडव व अभिमन्यूच्या पुत्र सोडून संपूर्ण कुरुवंशाचा नाश झाला. सत्यवतीला पश्चाताप झाला तेव्हा वेळ टळून गेली होती. आत्मचिंतन वेळीच झाले नाही तर ते निरर्थक व निरुपयोगी ठरते.

सत्यवतीने राजसिंहासनाची अती महत्वाकांक्षा ठेवली नसती, राजसिंहासन भीष्माकडे राहिलं असतं, त्याने विवाह केला असतं.. तर हे महायुद्ध कदाचित टळू शकलं असतं! धृतराष्ट्राने राजसिंहासनाची महत्वाकांक्षा न धरता मुलांना स्वकीयांबद्दल प्रेम व संस्कारांचे धडे दिले असते तरी देखील हे महायुद्ध घडलं नसतं..! महाभारतातील महत्वाकांक्षेचा अजून एक बळी म्हणजे महारथी कर्ण! या महायोद्धयाने कायम त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान अर्जुनाची स्पर्धा केली. आपण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान आहोत आहोत, हे दाखवण्यात याने संपूर्ण आयुष्य एका अधर्मीच्या संगतीत घालवलं अन एकानंतर एक पापात सहभागी झाला!  महत्वाकांक्षा चुकीची नाही पण चुकीची महत्वाकांक्षा व त्यासाठी अवलंबलेले चुकीचे मार्ग अयोग्यच! त्याचे परिणाम कधीही संतोषजनक नसतात.

कसंही करून अभिनेत्री व्हायचंच अति महत्त्वाकांक्षेमुळे कितीतरी अभिनेत्रींचे जीवन उध्वस्त झालेत. विमी नावाची अभिनेत्री तिच्या अति महत्त्वाकांक्षेमुळे संसारावर पाणी सोडून चित्रपट सृष्टीत आली. एक दोन चित्रपट यशस्वी झाल्यानंतर एक दोन आपटले. नवऱ्याने बोलावल्यानंतरदेखील परत न जाता चित्रपट सृष्टीतच राहिली. चित्रपट निर्मात्यांकडे चकरा मारत राहिली.. एकाने फायदा घेतला..दुसर्याने बनवलं..तिसऱ्याने फसवलं..तरीही तिची महत्वाकांक्षा कमी झाली नाही! उलट ती अजूनच गर्तेत गेली. न चित्रपट मिळाले...न संसार! कधीकाळी टॉपवर असणारी एक सुंदर अभिनेत्री आपल्याच कर्माने मृत्यूसमयी बेवारस मेली.. नुसती बेवारसच नाही तर हालहाल होऊन मेली! विमीची महत्वाकांक्षा चुकीची नव्हती पण तिने अवलंबलेले मार्ग अयोग्य होते. त्याचे परिणाम तिला भोगावे लागले. अशीच कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आढळतील.  

तात्पर्य : जीवनात महत्वाकांक्षा हवीच. काहीतरी भरीव करण्याची उर्मी व ऊर्जा महत्वाकांक्षेतूनच मिळते. परंतु अति महत्वाकांक्षा मार्ग भरकटवते, लक्ष्य प्राप्तीकरीता चुकीचे मार्ग सुचवते, बुद्धीचे कवाडं बंद करते. नोकरीत बढती व्हावी याकरीता सचोटीने केलेले प्रयत्न महत्वाकांक्षा... त्याकरीता कुमार्गाने जाणे, ही अति महत्वाकांक्षा! महत्वाकांक्षी लोकं जीवनात काहीतरी भरीव कामगिरी करायचा प्रयत्न करतात, शिकत राहतात, आत्मसात करत राहतात, टीकांना सकारात्मक घेतात.. अति महत्वाकांक्षी लोकं दुसऱ्यांना तुच्छ समजतात. त्यांना काही शिकवायला गेल्यास त्यांना तो त्यांचा अपमान वाटतो.. आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हे कोणताही मार्ग अवलंबायला मागेपुढे पाहत नाहीत. सत्यवती, धृतराष्ट्र, दुर्योधन ही अति महत्वाकांक्षेचेच उदाहरण आहेत. आपल्याला कोणत्या गटात रहायचे, आपल्या पुढील पिढीला कोणता मार्ग दाखवायचा, हे आपणच ठरवायला हवे!

आसावरी इंगळे
(३ जून, २०१८)

Wednesday, May 27, 2020

बातमी

भारतीय राज्यघटनेचे प्रकरण चार - विशेष निदेशक तत्त्वे : अनुच्छेद ३५०-क प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी - प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी, भाषिक अल्पसंख्यांक समजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि अशा सोयी पुरविणे शक्य व्हावे यासाठी राष्ट्रपती स्वत:ला आवश्यक किंवा योग्य वाटतील असे निदेश कोणत्याही राज्याला देऊ शकेल. असे असता प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण झाले असून ते तात्काळ थांबवावे.
#मराठीशाळावाचवा
#मातृभाषेतूनशिक्षण

#मराठीएकीकरणसमिती


विचार

हे आहेत खरे #कोरोनायोद्धा ! 🙏 अन्नदान श्रेष्ठ दान!
....

व्यवसाय करता करता मराठीपणा कसा जपावा यात उत्तम उदाहरण. #मराठीबोलाचळवळ

रांगोळी

परभणी जिल्ह्यातील, जिंतूर येथील 'ज्ञानेश्वर बर्वे पाटील' यांनी रांगोळीच्या माध्यमातून श्री गजानन महाराजांची साकारलेली अप्रतिम कलाकृती...👌👌👌 
🌺🌺🙏🙏जय श्री गजानन🙏🙏🌺🌺

Fb page @ #गणगणगणातबोते

Tuesday, May 19, 2020

देशभक्त नथुराम गोडसे जयंती

आज देशभक्त  #नथुराम_गोडसे यांची जयंती...

 नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे १९१०
ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे
झाला होता. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट
ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती.
त्यांची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने
फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती.
आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे
प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याचे नाक
टोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे
लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध
झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता.
 धार्मिक आणि अलौकिक आवडी
नथुराम गोडसे लहानपणी ध्यानावस्थेत जाऊन जे श्लोक
म्हणत ते त्यांनी कधीच वाचले नव्हते, असे म्हणतात.
या अवस्थेमध्ये ते आपले कुटुंब
आणि कुलदेवता यांच्या दरम्यान माध्यमाचे काम करीत
असेही सांगितले जाते. पण हे सगळे वयाच्या १६
व्या वर्षापासून संपून गेले .
यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. भारतीय
स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग
घेण्यासाठी त्यांनी यांनी हायस्कूलचे शिक्षण मध्येच
सोड्ले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक
पुस्तकांत मन रमवले. त्यांनी रामायण, महाभारत, गीता,
पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर
टिळक, मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर
अभ्यास केला होता .

 ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे दिल्ली येथील
बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींच्या ४०
मिनिटे आधी पोहचले. गांधी सभेसाठी जात असताना नथुराम
यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहनदास करमचंद
गांधी यांचा खून केला. खुनानंतर पळून जाण्याचा गोडसे
यांनी अजिबात प्रयत्न केला नाही.  (वाद सुरू आहे फक्त दोन गोळ्या नथुराम जींच्या पिस्तूल च्या होत्या तिसरी नाही)
गांधींच्या खुनाचा खटला
नथुराम गोडसेंवर मोहनदास
गांधी यांचा हत्येचा खटला पंजाब उच्च न्यायालयात
चालविण्यात आला. याव्यतिरिक्त त्यांच्यावर अवैध
शस्त्र बाळगणे यांसारखे अजून १७ आरोप ठेवून खटले
चालविण्यात आले होते .
गांधीहत्येचे कारण
खून खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम
गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे
यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम गोडसेंचे ते निवेदन
भारत सरकारने प्रतिबंध घालून प्रसिद्ध करण्यास मनाई
केली होती. या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ
आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे यांनी ६० वर्षे
न्यायालयीन लढाई केली. परिणामस्वरूप सर्वोच्च
न्यायालयाने हा प्रतिबंध
काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला परवानगी दिली .

न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५०
कारणे सांगितली होती. त्यांतली प्रमुख अशी --

1. अमृतसरच्या सन १९१९च्या जालियनवाला बाग
हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर
यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात
यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास
गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला .
2. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव
यांना दिलेल्या फाशी मुळे संतापलेली जनता गांधींकडे
आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण
देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण
गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक
कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .
3. ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनात
संबोधित करताना गांधीने मुस्लीम लीगच्या हिंसेसमोर
जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.
4. महंमद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुस्लीम
यांच्या विरोधाला न जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत
आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण केरळमध्ये
मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण केली, आणि जवळ
जवळ १५०० हिंदू ठार मारले गेले आणि २०००
हिंदूना बाटवून मुसलमान केले. गांधीनी याचा निषेध न
करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो की बहादुरी असे केले.
5. सन १९२६ मध्ये आर्यसमाजाच्या शुद्धीकरण
आंदोलनाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल
रशीद नावाच्याएका मुसलमान युवकाने केली. यावर
प्रतिक्रिया देताना गांधीनी, या अब्दुल रशीदला आपला भाऊ
म्हटले, त्याचे कृत्य बरोबर आणि आर्य
समाजाची शुद्धीकरण चळवळ ही राष्ट्रविरोधी आणि हिंदू
मुसलमान एकतेसाठी घातक आहे असे जाहीर केले.
6. गांधींनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज,
महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट
राष्ट्रभक्त म्हटले होते.
7. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर
मुस्लिमबहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन
प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट
हैदराबादच्या निझामाला हैदराबाद हिंदुबहुल
असूनही समर्थन दिले होते.
8. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच दिली होती.
9. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१ मध्ये
चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय
घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज
तिरंगी केला गेला.
10. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष
निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन
पट्टाभिसीतारामय्या यांना असल्यामुळे आणि सुभाष
बाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे
आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.
11. लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई पटेल हे
बहुमताने निवडूनआले असूनही केवळ गांधींच्या हट्टामुळे
हे पद जवाहरलाल नेहरू यांना दिले गेले.
12. १४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये आझालेल्या अखिल
भारतीय काँग्रेस समितीमध्ये भारताच्या फाळणीचा निर्णय
अस्वीकृत होणार होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस
विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले. या आधी त्यांनीच
म्हंटले होते की विभाजन हे माझ्या प्रेतावरच होईल.
13. जवाहरलाल
नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर
पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित
केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसतानादेखील
त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले, आणि त्याच
वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने
व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण करून सरकारवर
दबाव आणला.
14. पाकिस्तानातून आलेले हिंदू
निर्वासितांनी जेव्हा मशिदीत
तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला,
वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर
राहण्यास भाग पाडले.
15. ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर
अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न
देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे
हे दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून
ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास
सरकारला बाध्य केले.

 फाशीची कार्यवाहि होण्यापुर्वि काहि मिनिटे
आधि नथुराम गोडसे यांनी आपले बंधु श्री दत्तात्रय
यांच्या कडे आपली अंतिम
ईछ्चा प्रकट केली..
" जो पर्यंत सिंधू नदी अखंड
हिंदुस्तानातून प्रवाहित होत नाही ..भले
त्या साठी कितिहि वर्षे लागोत..
कितिहि पिढ्या येवो जाओ तो पर्यंत
माझ्या अस्थिचे विसर्जन करु नये..
श्री नथुराम गोडसे व श्री नारायण आपटे
यांच्या वर अंतिमसंस्कार झाल्या नंतर
अस्थि कुंभ त्यांच्या नातेवाईकां कडॆ
सोपवण्यात आला नव्हता..
...जेल प्रशासनाच्या लोकांनी तो अस्थि व
रक्षा कुंभ रेल्वे पुलावरुन खाली वहाणा~या नदित
फेकुन दिला...
परंतु जेल कर्मचा~या पैकी एकाने
हि घटना एका दुकादारास सांगीतली...
व त्या दुकानदाराने तत्परतेने
हि बातमी हिन्दू महासभा कार्यकर्ता इन्द्रसेन
शर्मा यांच्या पर्यंत पोहोचवली..
शर्मा आपल्या कार्यकर्त्यांना घेवुन
नदिवर गेले.. व तो अस्थि व रक्षा कुंभ
सुरक्षित पणे बाहेर काढला व स्थानीय
कॉलेज चे एक प्रोफ़ेसर ओमप्रकाश कोहल
यांच्या कडे सुपुर्द केला जो त्यांनी नंतर डॉ एल
व्ही परांजपे यांचे कडे नाशिकला जावुन सुपुर्द
केला...
पुढे हा अस्थि-कलश १९६५ मधे नाथूराम
गोड़से याचे छोटे भाऊ गोपाळ गोड़से
यांचे कडे पोहोचता केला गेला ज्या वेळी ते
शिक्षा भोगुन जेल च्या बाहेर आले..
१५ नोव्हेंबर १९५० ते आज पर्यंत
प्रत्येक १५ नोव्हेंबर ला गोड़से
यांचा "#हुतात्मा_दिवस" साजरा केला जातो...
सर्वात प्रथम गोड़से व आपटे
यांच्या फोटोस व अखंड भारताच्या फोटोस
पुष्पहार घातला जातो व
त्यांच्या मृत्यस जितके वर्षे झालीत
तितके दिप प्रज्वलीत केले जातात व भारत
मातेची आरति केली जाते..व नंतर उपस्थित
सर्वलोक गोडसे यांच्या अखंड
भारताच्या स्वप्ना साठी काम करित राहु
अशी शपथ घेतात....
आजहि नथुराम गोडसेंच्या अस्थींचे
अद्याप विसर्जन झालेले नाही आहे.
त्यांची अंतिम इच्छा अशी होती
" जो पर्यंत #सिंधू_नदी_अखंड_हिंदुस्तानातून_प्रवाहित_होत_नाही_तो_पर्यंत_माझ्या_अस्थी_विसर्जित_करण्यात_येवू_नये, भले
त्याला कितीही वर्षे लागली तरी चालतील
तो पर्यंत त्या पिढी दर पिढी हस्तांतरित
करण्यात याव्यात".
दरवर्षी १५ नोव्हेंबरला (नारायण आपटे
व नथुराम गोडसे उत्सर्ग दिवस)
इच्छापत्र पुनरुच्चार समारोह पूर्वक
केला जातो.

नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५
नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये
फाशी देण्यात आले. त्यांचे अंतिम शब्द असे होते, 

" जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप
केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर
मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो". 

 नथुरामजी यांना विनम्र अभिवादन..!!
#जय_हिन्दूराष्ट्र!🚩

Saturday, May 9, 2020

पैलपाखरांचा थवा ऐल तटावर उतरविणारा अनुवादकार : रवींद्र गुर्जर -- प्रा. कृष्णाजी कुलकर्णी

या लेखाचा संपादित अंश आजच्या eSakal मधे प्रसिध्द झाला आहे.

पैलपाखरांचा थवा ऐल तटावर उतरविणारा अनुवादकार : रवींद्र गुर्जर
 -- प्रा. कृष्णाजी कुलकर्णी
भ्रमणध्वनी : 9960487995

सुमारे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ आठवतो... वाचन हा तसा एकमेव आनंद त्या
काळात उपलब्ध होता. अर्थात्, त्या वेळेच्या आमच्या पिढीला आजही हाच ‘एकमेव आनंद
वाटतो’ हे कदाचित आमच्या पिढीचे माहिती आणि तंत्रज्ञान युगातले अज्ञान असावे.  असेल ते
असो - पण आजही वाचनाचा आनंदच खरा आनंद वाटतो! त्यावेळी म्हणजे पंचेचाळीस वर्षांपूर्वी
तर रेडिओ ऐकणेही चैनीची बाब होती. साथीला होती ती ग्रंथसंपदा! ती सुद्धा ग्रंथालयाच्या
कपाटात! खरे तर त्या काळी अभ्यासक्रमाला नेमलेल्या पुस्तकांखेरीज इतर वाचन करणे म्हणजे शुद्ध ‘उडाणटप्पूपणा'च होता! तो उडाणटप्पूपणा आमच्या पिढीने भरपूर केला. स्वत:चे एखादे आवडते पुस्तक असणेही दुरापास्तच! अशा काळात आमच्या गळतग्यासारख्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील खेड्यात माझ्या हाती ‘पॅपिलॉन’ पडले! पुस्तक नावापासूनच आगळेवेगळे. हेन्री शॅरियर नावाच्या जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका फ्रेंच व्यक्तीचे आत्मचरित्र. मराठीत त्याचा अनुवाद करणारे श्री. रवींद्र गुर्जर! इतकाच तपशील ज्ञात होता. पुस्तक एका झपाटलेल्या आघाशीपणाने वाचून काढले. पुन्हा वाचले, पुन:पुन्हा वाचले... ह्या प्रवासात हे पुस्तक परभाषेतली अनुवादित पुस्तक आहे हे देखील विसरून गेलो. लक्षात राहिले ते पॅपिलॉन आणि रवींद्र गुर्जर!

तसा आजच्या दृष्टीने तो स्वस्ताईचा काळ होता असे म्हणतात. (आम्हाला ही स्वस्ताई कधी
भेटलीच नाही. प्रत्येक काळ आम्हाला महागाईचाच वाटतो!) चांदोबा 50 पैसे आणि अमृत
(मासिक) 1.50 पै. इतके स्वस्त!. ते सुद्धा विकत घेणे कठीणच होते! सत्यकथा लायब्ररीत बसून आधी मुखपृष्ठावरून हात वगैरे फिरवून मग उघडायचे! आपण सत्यकथा वाचतो म्हणजे कुणी मोठे ज्ञानी आहोत असे वाटे! अशा काळात पॅपिलॉनने झपाटले होते!

वाटावळणांचा प्रवास चालूच राहिला. वाचनातही अनेक संस्मरणीय ठिकाणे भेटली; पण
त्यावेळेच्या पॅपिलॉनच्या वाचनाचा ठसा मात्र अमीट राहिला. नोकर्‍या बदलत-बदलत
अखेरीस गोव्यात शिक्षक झालो. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गोवा-कोकण भागात भ्रमंतीही झाली. एक-दीड वर्षापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकणात- देवरुखला जाण्याचा योग आला. आयोजकांनी आम्हा पाहुण्यांची सोय एकत्र केली होती. बदलापूरचे ‘ग्रंथसखा’चे शिल्पकार श्री. श्याम जोशी प्रमुख पाहुणे होते. आदल्या दिवशीच्या रात्रीच्या वेळी आम्ही शेकोटीभोवती गप्पा मारत बसलो. श्याम जोशींनी आपल्याबरोबर आलेल्या स्नेह्यांची ओळख करून दिली. शांत, मितभाषी असे एक गृहस्थ श्याम जोशींच्या मागून पुढे आले. श्याम जोशी म्हणाले, ‘‘हे पुण्याचे प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर!’’ - झाले माझ्या डोळ्यांसमोरून
पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ झपाट्याने सरकू लागला. ‘पॅपिलॉन’ आणि ‘रवींद्र गुर्जर’ हे अद्वैत
असे अचानक नजरेसमोर साकारावे, त्या आश्‍चर्याच्या धक्क्यात मी होतो.

बघता-बघता पंचेचाळीस-पन्नास वर्षांचे अंतर तुटले आणि गुर्जरांशी खूप वर्षांची मैत्री असावी,
तशा गप्पा झाल्या. स्वत:विषयी अत्यंत कमी बोलणारे व्यक्तिमत्त्व, पण वाचन प्रवासात
‘पॅपिलॉन’नंतरही ते अनेक ठिकाणी भेटतच होते. तो सारा आलेख आठवत राहिलो. नंतरच्या
वाचनयात्रेत गुर्जरांची किती तरी पुस्तक वाचनात आली. ‘पॅपिलॉन’चा दुसरा भाग म्हणून
‘बँको’, पुझोचे 'गॉडफादर’, ‘कोमा’, ‘चार्ली चॅपलीन’, ‘सेकंड लेडी’, ‘आईनस्टाईन’, ‘हाईनरिश
श्लीमान’वर लिहिलेले ‘सुवर्णयोगी’ अशी किती तरी...! नव्याने झालेल्या या भेटीला संवादांचे
धुमारे फुटले. रवींद्र गुर्जर हे अत्यंत साधे, सरळ, शांत, मितभाषी, पण सतत काही ना काही
उपक्रमांत गुंतलेले आढळले. वास्तविक पाहता त्यांचे शिक्षण बी.ए. (गणित), बी. जे.
(वृत्तपत्रविद्या), एम.ए.पीएच्.डी. (पुरातत्त्व) अशा वैविध्याने साकारले आहे. आयुर्वेद रसशाळा, विशाल सह्याद्री पुरवणी संपादक, संतकृपा/धर्मश्री प्रकाशन, डेक्कन कॉलेजमध्ये  पुरातत्त्व विभाग - संगणक विभागप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे; पण खर्‍या अर्थाने ते रमले ते अनेक दर्जेदार इंग्रजी पुस्तके मराठीत भाषांतरित करण्याच्या कामात. गेली चाळीस वर्षे ते ‘गायत्री साहित्य’ हे प्रकाशन चालवितात. या माध्यमातून कथा, कादंबर्‍या, धार्मिक, संस्कृत- अनुवाद. अशी सुमारे 100 हून अधिक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. इंग्रजी वाचनाचा आणि इंग्रजी सिनेमांचा प्रचंड नाद! अक्षरश: हजारो चित्रपट पाहिले आहेत. ह्या व्यासंगाबरोबरच पर्यटन, आपले स्वास्थ्य, संतकृपा, विश्‍व पांथस्थ, समर्थ संदेश, ग्रंथ भारती यांसारखी अनेक नियतकालिके आणि पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ग्रंथ आणि वाचन यांच्यावरील प्रेमामुळे ‘स्वायत्त मराठी विद्यापीठ, बदलापूर' या वाचन संस्कृतीला वाहिलेल्या संस्थेचे ते मार्गदर्शकही आहेत.

माझ्यासारख्या इंग्रजी वाचनाची ‘फ्युएन्सी’ नसलेल्या वाचकावर रवींद्र गुर्जरांचे अनंत उपकार
आहेत. अन्यथा, ‘गॉडफादर’, ‘सेकंड लेडी’, ‘कोमा’, ‘पेलिकन ब्रीफ’, ‘आईनस्टाईन’, ‘चॅपलीन’,
‘बिटवीन शेड्स ऑफ ग्रे’.... यांसारख्या अभिजात इंग्रजी ग्रंथांच्या वाचनाला मुकावे लागले
असते. भाषांतर ही साहित्याची एक वेगळी शाखा आहे. आपल्या संस्कृतीशी, विचारपद्धतींशी,
जीवनशैलीशी अत्यंत अपरिचित असलेल्या परप्रांतीय, परभाषिक वाङ्मयाचा वेध घेऊन त्या
साहित्य-संस्कृतीचे मराठीत साधे, सरळ, सुबोध आणि ओघवते भाषांतर करणे म्हणजे केवळ
भाषा-अंतर नव्हे! इंग्रजीमधल्या लेखनातील सर्व कंपने, संवेदना आणि अर्थछटांचा संवेदनशील
वेध घेऊन पुन्हा मराठी भाषेत लिहिणे म्हणजे एक नवसृजनच आहे, असे मला वाटते. खरे तर
स्वलिखित साहित्यकृतीमध्ये आणि सुंदर, ओघवत्या, आशयसंपन्न आणि अर्थपूर्ण अशा
भाषांतरामध्ये कोणताही दर्जात्मक फरक करावा, असे मला वाटत नाही. आज मराठी भाषा
विविध अंगाने समृद्ध होत आहे. इतर भाषांतून मराठीमध्ये आलेल्या भाषांतरित साहित्याने
आपले स्वत:चे असे एक समृद्ध दालन सजविले आहे. ह्या दालनामध्ये अनेक चमकून
दिसणार्‍या कलाकृतींची भर रवींद्र गुर्जरांना घातली आहे. मराठी भाषेच्या समृद्ध आणि
विकसित होण्याच्या ह्या प्रवासास गुर्जरांचे योगदान महत्त्वाचे आहे.

रवींद्र गुर्जर येत्या २९  एप्रिल रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने
त्यांच्या कार्याचा, विविध व्यासंगांचा, त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांचा वेध घ्यावासा वाटतो.
आयुष्याच्या त्या टप्प्यावरही त्यांच्या सुरू असलेल्या उपक्रमांची यादी मोठी आहे. संगीत व
नाट्यकलेचे चाहते असलेल्या गुर्जरांनी अक्षरश: हजारो कार्यक्रमांचा आस्वाद घेतला आहे.
त्यांच्या अनुवादाचे हजारो वाचक देशात, परदेशात विखुरलेले आहेत. आजही अनेक
कार्यशाळा, मुलाखती, ग्रंथोत्सव, व्याख्यानमाला ह्या निमित्ताने समस्त मराठी विश्‍वात
त्यांचा संचार सुरूच आहे. बदलापूरच्या ग्रंथसखाचे निर्माते श्री. श्याम जोशी यांच्या समवेत
महाराष्ट्रभर वाचन संस्कृतीच्या अभिवृद्धी योजनांमधून ते कार्यरत आहेतच. ह्याच योजनेचा एक भाग म्हणून अगदी परवा ते गोव्यात येऊन गेले. वाचन संस्कृतीच्या प्रेमापोटी त्यांनी
फोंड्याजवळच्या बोरी (बा. भ. बोरकरांचे गाव) ह्या छोट्याशा गावात आम्ही चालवीत
असलेल्या लहानशा वाचनालयाला भेट देऊनही गेले. वाचन संस्कृती सर्वदूर पसरावी, अगदी
खेड्यापाड्यांतही सुजाण वाचक निर्माण व्हावेत, ह्या तळमळीतून वाचनसंस्कृतीला जे-जे पोषक आणि साह्यभूत आहे, त्यात भाग घेण्याची त्यांची धडपड विलक्षण आहे. गेल्या 100 वर्षांत गाजलेल्या मराठी पुस्तकांचे त्यांचे संकलन आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रभर
किमान 500 सांस्कृतिक केंद्रे आणि घरगुती वाचनालये सुरू व्हावीत, असा त्यांचा प्रयत्न आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परभाषेतील उत्तमोत्तम साहित्य मराठी भाषेत यावे व मराठी
अनुवादाचे दालन अधिक समृद्ध व्हावे, या दृष्टीने ‘अनुवाद’ या विषयावर ते बहुमोल मार्गदर्शन
करतात. सुमारे 500 हून अधिक अनुवादक त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.

आज वयाच्या अमृतमहोत्सवी टप्प्यावरही रवींद्र गुर्जरांचा वाचन-लेखन प्रवास त्याच वेगाने
चालला आहे. जागतिक स्तरावरच्या अभिजात साहित्याच्या आस्वादाने त्यांचे मन अधिकच
आत्मलक्ष्यी बनते. मग 'मम आत्मा गमला' सारखी छोटी पण ‘स्व’चा शोध घेणारी पुस्तिका
आपसूकच साकार होते. गुर्जरांनी आपल्या भोवतीच्या साहित्याचा, संगीताचा, नाट्यसृष्टीचा,
चित्रपटसृष्टीचा मनमुराद आस्वाद घेतला. अनेक प्रतिभावंतांचा सहवासही त्यांना लाभला.
मनात येईल, त्या उपक्रमांत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. डोळ्यांसमोर मात्र ‘वाचन
संस्कृतीची अभिवृद्धी’ हाच ध्यास ठेवला. आजही त्याच ध्यासाने ते कार्यरत आहेत. अशा अनेक
उपक्रमांत ते जरी ते मग्न असले, तरीही त्यांची हजारो वाचकांच्या मनातील प्रतिमा मात्र
‘पॅपिलॉन’कार गुर्जर! हीच आहे. एखाद्याच कलाकृतीच्या वाट्याला असे भाग्य येते. इतकी वर्षे
होऊन गेली.  रवींद्र गुर्जरांची 35 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली, तरीही माझ्या मनातले
‘पॅपिलॉन’ पंख मात्र रवींद्र गुर्जरांच्या नावाबरोबरच लयबद्ध हलल्यासारखे वाटतात!  पंचेचाळीस वर्षांपूर्वीचे  ते पुस्तक आजही मी हाताळतो आहे, असे वाटते आणि जागतिक साहित्यातील पैलपाखरे मराठी माणसाच्या अंगणात उतरविण्याचे श्रेय रवींद्र गुर्जरांचे आहे, ह्याची साक्ष पटते.

Tuesday, May 5, 2020

Sunday, May 3, 2020

महाराष्ट्र दिन

मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य 
संघटना आयोजित 


#महाराष्ट्र_दिन प्रश्न मंजुषा या स्पर्धेचे उत्तरे







....







जय मराठी ! जय महाराष्ट्र 
#मराठीएकीकरणसमिती

Friday, May 1, 2020

गोष्ट कोकणातली


#Goshtakokanatli

आज दिनांक १ में २०२० रोजी

आपलो गाववालो अनिकेत रासम पेपरात झळकलो आसा!☺️ अभिनंदन त्याचे ! 👏👏👏👏


महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩



Wednesday, April 29, 2020

आदि शंकराचार्य जयंती

आदि शंकराचार्य जिन्हें भगवान शिव का अवतार भी माना जाता है उनकी जयंती 28 अप्रैल को देशभर में मनाई जाती है
 हिंदू धर्म की महान शख्सियत को उनके जन्म दिवस के अवसर पर सादर नमन. 
देश के चारों कौनों में अद्वैत वेदांत मत का प्रचार करने के साथ ही आपने पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारों दिशाओं में मठों की स्थापना की इन्हें पीठ भी कहा जाता है।

वेदांत मठ – दक्षिण भारत में आपने वेदांत मठ की स्थापना श्रंगेरी (रामेश्वरम) में की। यह आप द्वारा स्थापित प्रथम मठ था इसे ज्ञानमठ भी कहा जाता है।

गोवर्धन मठ – इसे आपने पूर्वी भारत (जगन्नाथपुरी) में स्थापित किया। यह आदि शंकराचार्य जी द्वारा स्थापित दूसरा मठ था।

शारदा मठ – पश्चिम भारत (द्वारकापुरी) में आपने तीसरे मठ की स्थापना की इसे कलिका मठ भी कहा जाता है।

बद्रीकाश्रम – इसे ज्योतिपीठ मठ कहा जाता है। यह आप द्वारा उत्तर भारत में स्थापित किया गया।
Source fb


Sunday, April 26, 2020

उपक्रम

हाय एव्हरीबडी..

'बिइंग वुमन'ची नवीन आणि आकर्षक वेबसाईट..

या नवीन वेबसाईटमुळे आता आपण एकमेकांशी फास्ट कनेक्ट होणार आहोत..!!
करोनामुळे या वेळचा अंक आम्ही तुमच्यापर्यंत ई-पेपरच्या स्वरुपात पाठवला आहे...
आपल्या वेबसाईटवर जाऊन बिइंग वुमनचे यापूर्वीचे अंकपण तुम्ही वाचू शकाल....

वाचा आणि अभिप्राय द्या... वाट बघतोय....
घरीच राहा....सुरक्षित राहा...

ई-पेपर, वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, नवनवीन सदरं वाचा या नव्या वेबसाईटवर!

Going Digital With Keeping Our Roots with The Print!!

Saturday, April 25, 2020

परशुराम कथा

वंशज हूँ परशुराम का,शास्त्र मेरी गाथा है🚩🚩🚩
हिन्दू धर्म में जन्मा हूँ, भारत मेरी माता है🚩🚩🚩

भगवान विष्णु जी के छठवें अवतार भगवान श्री #परशुराम जी की जयंती पर समस्त देश एवं प्रदेशवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं 🙏🏻🙏🏻🙏🏻

पौराणिक मान्यता अनुसार अक्षय तृतीया के दिन किए गए शुभ एवं पुण्य कार्य अनंत और अक्षय फल देने वाले होते हैं। इसी मान्यता ने संपूर्ण जनमानस को आज के दिन अधिकाधिक स्थिर वैभव, शांति और पुण्य अर्जित करने हेतु प्रेरित किया है। आज के दिन स्वर्ण आभूषण आदि का क्रय शुभ एवं स्थाई माना जाता है। आज का दिन बिना किसी लग्न और मुहूर्त के विचार के समस्त शुभ और मांगलिक कार्य करने हेतु सर्वश्रेष्ठ समझा जाता है।  इसीलिए बिना किसी शुभाशुभ के विचार के विवाह आदि मांगलिक कार्य बहुतायत से संपन्न किए जाते हैं। 

आज का दिन भगवान परशुराम के जन्मोत्सव के रुप में भी मनाया जाता है। पौराणिक मान्यता अनुसार भगवान परशुराम विष्णु के छठे अवतार हैं। उन्हें भगवान विष्णु का "आवेशावतार" भी माना जाता है। परसुराम का उल्लेख कई पुराणों, महाभारत और रामायण आदि ग्रंथों में प्रचुरता और प्रमुखता से पाया जाता है।

परशुराम एकमात्र अवतार हैं जो सतयुग, त्रेता और द्वापर तीनों युगों में महत्वपूर्ण रूप से उल्लिखित है। परशुराम का अवतरण तत्कालीन समाज में व्याप्त अराजकता, अत्याचार,अनाचार, दुराचार को समाप्त करने के लिए हुआ माना जाता है जिसे उन्होंने भगवान शंकर द्वारा, इसी उद्देश्य के लिए प्रदत्त "परशु"नामक अस्त्र से समाप्त किया। ऐसी मान्यता है कि उन्होंने 21 बार अनाचारी  शासकों का संहार किया।

त्रेता युग में सीता स्वयंवर हेतु खंडित हुए "पिनाक" शिव धनुष के कारण भगवान परशुराम का मिलन राम से हुआ। अपने क्रोध अतिरेक के कारण वे राम को नहीं पहचान पाए,परंतु श्रीराम द्वारा अत्यंत विनम्र भाव से उन्हें वस्तु स्थित समझाई गई और उन्हें स्मरण कराया गया कि वह ब्राह्मण हैं "नव गुण परम पुनीत तुम्हारे" कहकर श्रीराम द्वारा स्मरण कराए जाने पर उन्होंने राम को पहचाना, और अपनी संशय समाप्ति भगवान विष्णु द्वारा प्रदत्त "सारंग" नामक धनुष की प्रत्यंचा चढ़ाने का अनुरोध किया और संशय मिट जाने के पश्चात वह जनक की सभा से शालीनता पूर्वक,युग-संरक्षण का दायित्व प्रतीकात्मक रूप से, "सारंग" नामक दैवी धनुष के साथ श्रीराम को सौपकर, तपश्चर्या हेतु वन प्रस्थान कर गए।

यह घटना शास्त्रों में इस रूप में वर्णित है कि धर्म रक्षा का दायित्व जो अब तक परशुराम को दिया गया था उसे अब आगे त्रेता युग में श्री राम संभालेंगे।इस घटना के बाद ही "आवेशावतार" परशुराम "तेजो हरण" के उपरांत कल्पांत पर्यंत भूलोक पर तपस्यारत रहने हेतु वन गमन कर गए। ऐसी मान्यता है की परशुराम पृथ्वी के सात चिरंजीवियों में एक हैं जिनकी मृत्यु अब तक नहीं हुई है और वह कलयुग के अंत तक इस पृथ्वी पर अपने दायित्व का निर्वहन करते रहेंगे।

भगवान राम ने परशुराम जी से जिन नव गुणों की चर्चा की थी वह मनुष्यता के लिए अत्यंत आवश्यक हैं।यह सभी नव गुण ब्राह्मणों में होना अनिवार्य बताया गया है।इन्हें ही "नव-निधि" के नाम से भी जाना जाता है। यह निधियां आत्मिक, बौद्धिक और सांसारिक हैं। आत्मिक निधि के अंतर्गत 1-विवेक 2-पवित्रता 3-शांति को गिना जाता है बौद्धिक निधि के अंतर्गत 4-साहस 5- स्थिरता और 6-कर्तव्यनिष्ठा तथा सांसारिक निधि के अंतर्गत 7-उत्तम स्वास्थ्य 8-समृद्धि और 9-परस्पर सहयोग को माना जाता है। इन्हीं का स्मरण भगवान राम ने "नव गुण परम पुनीत तुम्हारे" कहकर कराया था। ब्राह्मणों द्वारा धारण किए जाने वाले जनेऊ के तीन सूत्र इन्ही आत्मिक,बौद्धिक और सांसारिक निधियों का प्रतिनिधित्व करते हैं। प्रत्येक सूत्र में तीन तीन सूत्र और होते हैं जो पुनः ऊपर बताई गई निधियों को इंगित करती हैं।इस प्रकार प्रत्येक जनेऊ में 9 धागे होते हैं जो उसे निरंतर इन नव निधियों की प्राप्ति का अभ्यास करने हेतु प्रेरित करते हैं।

पौराणिक आख्यान के अनुसार भगवान विष्णु ने त्रेता युग में अपना "सुदर्शन चक्र" भगवान परशुराम को सौंप दिया था। जो द्वापर युग में भगवान परशुराम ने श्री कृष्ण को ऋषि संदीपनी के आश्रम में प्रदान कर त्रेता युग में अनीति, अधर्म, अन्याय आदि की समाप्ति में उनकी भूमिका को रेखांकित कर दिया था।

अक्षय तृतीया के इस पुनीत अवसर को ब्राह्मण समाज अपने पुनर्जागरण, पुनर्संगठन और पुनरुत्थान के अवसर के रूप में अपनी पुरातन- प्रतिष्ठा एवं सामाजिक श्रेष्ठता की पुनर्प्राप्ति की आकांक्षा से मनाता है।भगवान परशुराम से ज्ञान और शक्ति दोनों दृष्टियों से अपने को सामर्थ्यवान बनाने का अभिलाषा करता है। परंतु यह अभिलाषा चिरकाल से अपूर्ण ही है। इसकी पूर्ति के लिए आवश्यक है कि ब्राह्मण समाज अपने में आई विकृतियों,अहंकार, लोभ, दंभ, नशा, आहार-विचार भ्रष्टता, अज्ञानता आदि को दूर करने हेतु त्याग और तपश्चर्या पूर्ण जीवन को अपनाए।ऊपर लिखित नौ निधि या सद्गुणों का निरंतर अभ्यास करे। समाज के सब भांति उत्थान हेतु अपने को समर्पित करें,तभी सामूहिक रूप से ब्राह्मण समाज अपने पूर्व गौरव को प्राप्त करने में समर्थ हो पाएगा। 

                   🚩🙏🏻जय श्री महाकाल🙏🏻🚩

#fbshare

जात

#परशुराम श्रावण संवाद !
जातीचा संबध कर्माशी असतो ! ब्राम्हण चा मुलगा ब्राह्मण ..वैश्य चा मुलगा वैश्य नसतो!
https://youtu.be/Mo2f6iElKWY

परशुराम जन्माने ब्राह्मण आणि कर्माने क्षत्रिय होते !
विद्या

Tuesday, April 21, 2020

लेख २

 "#एका_संन्यासाची_खरी_गोष्ट ".......!!!!
(योगी आदित्यनाथ महाराज) 
😪😪😪😪😪😪

आई !!! मला खरंच संन्यासी बनण्याची इच्छा आहे.
माझ्या जीवनाची सुरवात येथे होणार नाही......... मला माझा समाज मला आर्तभावातुन बोलवत आहे!
मला जायला लागेल आई!
कोणाला तरी अग्नीकुंडाची आहुती बनले पहिजे!

आई!!! तर तू कधीच माघारी येणार नाहीस का.......???

 दोघांत वडील आनंद रडत योगीना एक प्रश्न विचारतात - " जेव्हा मी मरत असेल तेव्हा, पण तू येणार नाहीस का "........??? 

बाबा, मी माझ्या कर्माने तुम्हाला तर्पण (संतूृष्ट)करेल. 

आज सरकारी वार्ताफलमध्ये(मिटिंग)असताना  वडिलांचे निधन झाल्याची बातमी  फोनवरून समजली तरीही पडक्या चेहरा घेऊन रडक्या  आवाजात मिटींगमध्ये कोरोना सबंधीत विषयावर सरकारी यंत्रेला आदेश देत होते....... आपल्या वडिलांच्या अंतिमसंस्कार पेक्षा आपल्या कर्तव्यास प्रथम प्रधान्य देत आपल्या जनतेचे हित लक्षात ठेवत आपल्या राज्याची सेवा 'दिवस-रात्र' योगी आदित्यनाथ करत आहेत........लॉकडाउननंतरच आपल्या घरातील सदस्याना ते भेटण्यास जाणार आहेत व त्याचबरोबर अंतिमदर्शनास जास्त गर्दी करु नये म्हणून ही आदेश दिला आहे........एकदा श्रीराम प्रभू सहज बोलले होते संतापेक्षा कोणताच राजा मोठा नसतो......... त्याचबरोबर एका राजाचे गुणवर्णन करताना सांगितले होते एका राजासाठी आपल्या घरातील सदस्यांपेक्षा प्रजाच (जनता)सर्वस्व असते......... आपल्या जनतेसाठी जो राजा आपले सर्वस्व त्यागण्याची क्षमता ठेवतो तोच सर्वश्रेष्ठ राजा असतो !

" #योगी_आदित्यनाथ_यांचे_वडिल_ आनंद_सिह_बिश्त_यांना_भावपुर्ण_श्रद्धांजली ".
            🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

   

✍️ लेखक :- रितेश राजाराम काळोखे.

लेख १

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला साष्टांग नमस्कार ! ! 
नमस्कार बंधूंनो,
आज एक खूप सुंदर अनुभव आला. संघ कार्याचा हा महिमा असेच म्हणावे लागेल.

विलेपार्ले ला एक ८५+ वयाचं मुजुमदार नावाचं जोडपं रहातं . त्यांच्या मुलीने त्यांना जेवणाचा डबा लावून दिला  आहे .डबा आणि इतर सहायता म्हणून एक नर्स लावून दिली आहे. इथे त्यांचं दुसर कोणी नाही. ५२ वर्षाचा मुलगा आहे पण तो अधू आहे.  मुलगी अमेरिकेत आहे.

कोरोना प्रकरणात डबा पोचला नाही, नर्स पोचली नाही म्हणून मुलगी काळजीत. तिने तिथल्या संघाच्या कार्यकर्त्याला काही मदत करता येईल का ते पाहावे असे सांगितले. ज्याला सांगितले तो अमेरिकेतील कार्यकर्ता माझ्या नागपूरच्या आदित्य नावाच्या एका स्वयंसेवक बंधूचा मित्र आहे. आदित्य त्याला म्हणाला," बघतो". आदित्य ने मला फोन केला की असं असं आहे काय करता येईल. त्याला सांगितले की मी बघतो. काल उशीर झाला होता, रात्री पावणे बारा वाजले होते, म्हणून पार्ल्या च्या कार्यकर्त्याचा नंबर कसा मिळवायचा ह्या विचारात असताना, तिकडे जर्मनी मध्ये फ्रॅंकफर्ट चा मुख्यशिक्षक, आदित्य नावाचाच  संघाचा एक कार्यकर्ता आहे जो की मूळ चा विलेपार्लेचा आहे त्याची आठवण झाली. शिवाय जर्मनी वेळेनुसार तीकडले संध्याकाळचे सव्वासातच झाले होते म्हणून त्याला व्हॉटसअप कॉल वर सांगितल की मला पार्ले च्या कार्यकर्त्याचा नंबर देऊन ठेव, अशी अशी मदत हवीये. त्याने नंबर दिला, श्री जयेश शाह पार्ले सहकार्यवाह. मी म्हंटलं," मी उद्या त्यांच्याशी बोलतो तू तूर्तास मेसेज पाठवून ठेव त्यांना".

आता आज त्यांना फोन करणारच होतो, तर त्यांचाच मला मेसेज आला की *काम फत्ते*. श्री दिलीप सोनी नावाचे पार्ल्याचेच स्वयंसेवक त्यांच्या घरा जवळच्याच सोसायटी मध्ये  राहतात. त्यांनी त्यांची जाऊन चौकशी केली आणि त्यांना आश्वस्त केलं. त्यांनी व्हिडिओ पण बनवून पाठवला.

विलेपार्ले...अमेरिका...नागपूर...दादर... फ्रॅंकफर्ट...विलेपार्ले अस वर्तुळ पूर्ण झालं.

मस्त वाटल. संघ स्वयंसेवकांचं जाळं किती मजबूत विणलं गेलंय ते पाहून धन्य वाटलं.

प्रद्युम्न गाडगीळ.

Saturday, April 18, 2020

"वरती" गेल्यावरही उत्तर देता यायला हवं !

"वरती" गेल्यावरही उत्तर देता यायला हवं !

**

सुश्री निर्मलाताई पुरंदरे 

उच्चस्तरीय पुरस्कारांकित व आयुष्यभर समाजभान जपणारे हे नाव. 

डोंगराइतकं काम उभं करूनही आयुष्यात त्यांनी कधीच कुणाला मुलाखत दिली नव्हती. प्रसिद्धीपेक्षा सिद्धी महत्वाची. असं त्यांच मत. 

मात्र जीवनात त्यांनी एकमेव मुलाखत दिली ती मला. "कर्तृत्वाला सलाम" या पुस्तकात मी काही उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा परिचय करून देण्याचं मिशन घेतलेलं. त्यासाठी मला ताईंची मुलाखत हवी होती. मलाही सुरुवातीला नकारच मिळाला. पण जवळपास पंधरा दिवस पाठपुरावा केल्यावर शेवटी त्या हसत हसत म्हणाल्या, "किती चिवट रे तू पण" 

आणि तब्ब्ल दोन अडीच तास मस्त मुलाखत दिली.  

यथावकाश त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी त्यांनाच निमंत्रित केलं. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात देखील माझ्या त्या एकूणच "चिवटपणाचा" उल्लेख पॉजिटिव्हली करून "ध्येय गाठायचे असेल तर असा चिवटपणा अंगी असावा" हे सर्वाना सांगितलं. 

तर त्यांच्या त्या मुलाखतीत त्यांनी इतके सुंदर विचार दिले की त्याचीच एक मोठी सिरीज होईल. पण एक विचार फारच आवडला. 

मी त्यांना विचारलं होत की, "घरी सगळं उत्तम, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेसारखे पती, माधुरी सारखी गुणवान गायिका / लेखिका मुलगी,. प्रसाद अमृत सारखी ध्येयवादी मुलं, हे सगळं करत करत किंवा याना प्रसंगी थोडं बाजूला ठेवून तुम्ही बाकी सामाजिक काम इतकं कसं करू शकला?"

तर त्या म्हणाल्या होत्या, "कसे आहे न की, देवाने आपल्याला इतके चांगले आयुष्य दिले, इतकी चांगली बुद्धी दिली. मग ती वापरली नाही तर काय उपयोग? इथलं सगळं आटोपून "वर" गेल्यावर त्याने जर विचारलं की, बाई ग, इतकं सगळं चांगलं आयुष्य दिल होत, काय केलं तू त्याच? तर मला त्या देवाला किमान एक तरी काम सांगता आलं पाहिजे."

समाजसेवेची हि अनोखी व्याख्या ऐकून मी निशब्द !

अजून एक असाच सुंदर विचार त्यांनी दिलेला (जो पुस्तकात पण मी लिहिला आहे)

मी विचारलं होत, "बाबासाहेब इतिहासात मग्न, तुम्ही वर्तमान व भविष्यकाळ घडवण्यात दंग. पण मग दोघेही जाहीर ठिकाणी कधीच पती पत्नी असा परिचय / उल्लेख करत नाही. असं का ?" 

त्या म्हणाल्या, "हे बघ धनंजय, रेल्वेचे दोन रूळ समांतर असतील तरच त्यावरून रेल्वे नीट धावेल न. रूळ एकमेकांना चिकटत बसले तर अपघात होईल. तसेच दोघेही आपापल्या कार्यात, विश्वात मग्न असतील तर उगीच एकमेकांच्या जगण्यात, कामात लुडबुड करू नये. जन्माला आलेला प्रत्येकजण तसाही स्वतंत्र येतो व जातो. मग उगीच पायात पाय कशाला?"

आजकाल अनेक घरात पती पत्नी दोघेही करियर करत असतील तर त्यापैकी ९०% घरात विसंवाद आणि काही ठिकाणी पराकोटीचा वाद झडत असतो. त्यांच्यासाठी निर्मलाताई किती छान संदेश देऊन गेल्या न ?

अंगणवाडीच्या माध्यमातून हजारो महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या "वनस्थळी" संस्थेच्या संस्थापक व जिथे मी घडलो वाढलो त्या विद्यार्थी सहायक समितीच्या ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय निर्मलाताई पुरंदरे, यांचे नुकतेच "वरती" प्रयाण झाले. त्यावरून मला त्यांचे हे विचार आठवले तेच तुमच्यासोबत शेयर केले. 

"पोरकं होणं म्हणजे काय?" हे मला पुन्हा एकदा जाणवलं. दोन वर्षांपूर्वी मातृछत्र हरवलं तेव्हा आणि आता निर्मलाताई गेल्यावर एकदा! कारण माझ्या हॉस्टेल जीवनात कायमच ताईंनी जणू आईची भूमिका घेतली. प्रसंगी कठोर तर प्रसंगी हळव्या होऊन जपलं. माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी असेच जपले. 

शेवटी शेवटी त्या आजारी असताना आम्ही भेटायला गेलेलो. थोडा विकनेस वाढल्याने विश्रांती घेत होत्या तरी स्मरणशक्ती तल्लख होती. समोर पाहताच म्हणाल्या, "आलास का रे बाबा, कसा आहेस? आता खोड्या कमी केल्यास न"?

अशा या निर्मलाताई. 

त्यांच्या कार्याला हि शब्दांची सुमनांजली !!

- धनंजय देशपांडे (dd)

*

फोटो : हाच तो पुस्तक प्रकाशन समारंभ (सर्वात डावीकडे आदरणीय निर्मलाताई)

(पोस्टमधील विचार आवडले असतील तर प्लिज शेयर करा, जेणेकरून त्यातून इतर अनेक घरातील विसंवाद कमी होऊन सुसंवाद सुरु होतील)