Tuesday, December 16, 2008

एकदातरी आयुष्यात कुणी असे भेटावे
ज्याला आपल्या मनातले सर्व कही सांगावे,
संगता संगता आयुष्य पूर्ण सरून जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे ......

एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे,
ज्याला घेवून सोबतीने खुप खुपछलावे,
चलता दुरवर खुप खुप थकावे ,
पण थकल्या वरही आधार साठी त्यच्या कडेच पाहावे.............
एकदातरी आयुष्यात कोणी असे भेटावे,

दुख त्यचे आणि आश्रू माझे आसवेत,
त्याच्या साथी मी जगताच रहावे जगताच रहावे
आणि त्यच्या साठी जगतानाच आयुष्य सरून जावे ...............
एकदातरी आयुष्यात कोणी असे भेटावे

ज्याच्या सोबतीला प्रतेक क्षणाने सुखावे,
उनत त्याने सावली तर पावसात थेम्ब व्हावे,
आणि मायेच्या थेम्बानी मी ,चिम्ब भिजुन जावे ,
एकदातरी कोणी असे भेटावे ,सुर त्याचा आणि शब्थ माझे असाव

Thursday, October 30, 2008

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.
आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.
आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.
असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद तर,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं ........!!!!!!!!!

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..!!!!

Wednesday, October 29, 2008

आयुष्य
ठरवल होत खुप काही पण सारच तस घडल नाही
विधिलिखित असत सार मीही याला अपवाद नाही

सुर्याच्या कक्षेबाहेर पृथ्विलाही जाता येत नाही
भल्यासठीच होते सारे कलतय पण वळत नाही...........
हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं...."

मला एवढेच वाटते..................................
मला एवढेच वाटते सुन्दर आयुष्य जगावे,
स्वप्नाचे गाव पवलोपावली बसावे

सुन्दर कल्पनानी सजलेले असावे,
वास्तवाचे भान मात्र सदैव रहावे

जगण्याला मानाचा मुजरा असावा,
अपमानाला क्षणीकही थारा नसावा

एक विश्वासाची सोबत असावी,
प्रेमाने मयेने मने जुळावी

मला एवढेच वाटते नवी आशा फुलावी,
येणार्या शतकची सुन्दर पहाट असावी.........

मन
मन कधी फ़सत,मन कधी रुसत...
कुनाला हे कळत,कुणी उगाचच हसत..
हसताना मनात बरंच काही असतं...
सांगायला मात्र काही जमत नसत...
समजुन घ्यावं असं खुप वाटतं...

Tuesday, October 28, 2008

आयुष्याच्या अल्बममध्ये
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे

पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर पण
Movie सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल ?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या .

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या ,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा ........................

Monday, October 27, 2008

तिच्या प्रेमात अजुनही झुरतो आहे नाव
तिचे घेण्यात वेगळीच नशा आहे
कधीतरी हो म्हणेल अशी वेडी आशा आहे.
प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं...

प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं,
पाखरू बनून उंच उंच
तिला घेवून उडायलाच हवं...

तिच्या हस-या चेह-यावर जावू नका
अंतर्मनात जावून दुःख
एकदा तरी बघायलाच हवं,
अगदी मरण यातना सोसून
तिचा श्वास होवून जगायलाच हवं...

आयुष्याचा श्वास आहे ती
म्हणुन आयुष्य अजुन टिकून आहे,
तिलाही खुप त्रास होत असेल
केवळ तुम्हाला त्रास नको म्हणुन
ती हातचं काही राखून आहे...

असं प्रेम मिळणं हा
नशिबाचा एक भाग आहे,
ते मिळवण्यासाठी थोडं धडपडायलाच हवं,
त्यासाठी प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं..

Sunday, October 26, 2008

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद तर,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं ........!!!!!!!!!!

Friday, October 24, 2008

ठरवल होत खुप काही पण सारच तस घडल नाही
विधिलिखित असत सार मीही याला अपवाद नाही
सुर्याच्या कक्षेबाहेर पृथ्विलाही जाता येत नाही
भल्यासठीच होते सारे कलतय पण वळत नाही...........
हे जीवन एक रहस्य आहे,तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,तरी जगा समोर हसावं लागतं...."
मला एवढेच वाटते..........

Thursday, October 23, 2008

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !


शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबून
स्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढून
पॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन..
...टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून


दुरुनच बघायचय तिला चाकां आडून
विचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणून
चालायचय सोबत मग सायकल हातात धरून..
...विचारणारे तिला आता योग्य संधी बघून


शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटून
बोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळून
बोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून..
...कुणाचा रे विचार करतोयस तू अजून?


नकळत त्या शब्दाने पडायचय घसरून
पहायचय तिने मग माझ्याकडे चमकून
मी मात्र तिच्या नजरेला चुकवून..
...काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून?


तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवून
हातातली छत्री झटकन उघडून
माझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून..
...पहायचय रे मला एकदा प्रेम करून

Wednesday, October 22, 2008

तूका कोंकण साद घालता



कोकणातून शहरात आलेल्या प्रत्येक चाकरमन्याची कर्मभूमि जरी मुंबई असली
तरी कोकण ही त्याची जन्मभूमि जननी आहे.
त्या जननीची निदान आठवण तरी काढणे हे प्रत्येक चाकरमन्याचे कर्तव्य आहे.

अरे शहरी धन्या चाकरमन्या
तूका कोंकण साद घालता
वरसातून एकदातरी भेटिक बोलयता
अरे सायबा भेटाक बलयता

शहरात गेलंय चाकरी केलयं
कसो रे कनो वाकयलंय
पैश्यामागे लागान कसो घराक इसारलंय
अरे पोरा घरार पाणी सोडलंय

मातयेत लोळान मोठो झालंय
कसो मातीक इसारलंय
आनी मातीच्याच छातीवर बंगले उभारलंय
अरे लेका जमीन खावनं बसलंय

हुतुतू खेळलंय खोखो खेळलंय
कसा मैदान गाजयलंय
फळकुट हातात घेऊन खेळाची वाट लायलंय
अरे गड्या खेळार ओस मारलंय

हापूस चोकून मिटके मारलंय
आंब्यार ताव मारलंय
तोरा चावान पोरां तुझी त्वांड आमट करतत
अरे बाबा तोंडार म्हावं मारलंय

शिकान-शिकान पदव्या घेतलंय
मोठो बॅरीस्टर झालंय
कोंन्व्हेंटमध्ये पोरां शिकवून मराठी बिगड़लंय
अरे पुता मराठीची वाट लायलंय

लयं बरा केलंय रेल्वे हेलंय
थोडो परवास सुखावलो
भैयाक वसरी दिलंय तूझो भावबंद दुखावलो
अरे भावा भावाशीक दुखयलंय

अरे इस्टेट् कमयं पैसो कमयं
कर झिला घराची आठवं
-अनामिक

Tuesday, October 21, 2008

कोकणात येवा



कोकणात येवा आंबोलीक जावा, धबधब्यात न्हावा!
मालवणचो बांगडो खावा,खाजा घेवा, दर्यात थोडे पेवा!!

चारय बाजुक दर्यो आणी किल्ल्यात पाणी गोड!
उगाच नाय सगळ्याका सिंधुदुर्ग किल्ल्याबद्द्ल ओढ!!

वाडीचो डोंगर चढा, मोती तलाव फिरा, खेळणी घेवा लाकडी!
आरवलीचो वेतोबा, रेडीचो गणपती बघुक वाट करा वाकडी!!

आंबे, फणस, जांभळा, काजु, कोकणचो मेवो!
शिपये, मुले, तिसरे खरो रत्नागिरीचोच ठेवो!!

डोंगरमळे शेती, पोफळी, माडार नारळाचो भार!
गाडयेत्सुन बघीत येवा सगळा हिरव्या हिरव्या गार!!

नापरे, आंबोली धबधब्यासाठी पावसात तुंम्ही येवा!
तेरेखोल खाडी बघताना फेरीबोटीचोय अनुभव घेवा!!

डोंगरदरे, शेतीमळे, पार करुन कोकण रेल्वे सुरु झाली!
मुंबयपासुन गोव्या पर्यंत माणसा एकदम जवळ ईली!!

निसर्ग सौंदर्य म्हणतत ता तुंम्हीच डोल्यांनी बघा!
बघुन वगी र्‍हवा नको इतर लोकांका तुंम्ही सांगा!!

हकडे तकडे खयच जवक नको, कोकणच आमचा बरा!
कोकण बगुन पाय उचलाचो नाय, जावक तुमच्या घरा!
ज़ावक तुमच्या घरा!!
-अनामिक

Monday, October 20, 2008

नका शंका करू माझ्या मैत्रीवर--
कराल माझ्या मैत्रीवर शंका
तर पेटेल रावणाची लंका
वाजेल सर्वत्र डंका
जर कराल माझ्यावर शंका
नेहमी चांगल्या मित्रांसाठी मी धडपडतो
बोलताना त्यांच्याशी थोडा गड़बड़तो
चुक माझी असता थोड़ा हडबडतो
आणि चुक नसेल तर मित्रांना खुप बडबडतो
आहे मी हळव्या मनाचा
लोभ नाही मला धनाचा
नेहमी विचार करतो जनाचा
पण या जगात कुणी ना कुणाचा ..

Sunday, October 19, 2008

चांदण्या रात्री आकाशाकडे बघून
ढगांच्या पलिकडचे जग पहावं,
कुशित घेऊन तारे मोजावे वाटावं
असं कोणीतरी असावं

धगधगत्या आयुष्यात विसावा घ्यावा
ज्वलंत जीवनाचे चित्र निर्माण करावं
हातात हात घेऊन चालत रहावं
असं कोणीतरी असावं

ओलावलेल्या पापण्यांच्या कडा पुसून
थेट ह्रदयापर्यंत पोचावं,
असं नक्षत्रासारखं
कोणीतरी असावं....

Saturday, October 18, 2008

प्रेम

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते

Friday, October 17, 2008

दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं
ऊन पावसाचे क्षण सारे
भरभरून जगावं

खुलावं चिखलातून
कधी बागेत बहरावं
सुख दु:खांच्या भ्रमरांना
कधी ओंजळीत धरावं

कधी प्रियकराच्या हातातून
प्रेयसीच्या हाती जावं
अश्या सोनेरी क्षणांचा
कधी साक्षीदार व्हावं

वधूवरांच्या सोबतीने
कधी शुभ-मंगल करावं
मनोरथ पूर्णं करण्या
चरणी ईश्वराच्याही जावं

सुखात कुणाच्या उधळावं
तर दु:खातहि सामील व्हावं
शोभून हार तुऱ्यातून
कधी सरणावरही जळावं.

दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं.......

Thursday, October 16, 2008

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!
भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!
जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!
तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!
"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."
ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"
बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!
कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!
अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"
"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही..

Wednesday, October 15, 2008


ती डोळ्यांतुन खुदकन हसते
अन गिरक्या लगबग घेते |
ओठांच्या शिंपलीवरती
इंद्रधनु सुंदर अवतरते ||

त्या नाजूक गालांवरती
फुलपाखरे किती भिरभिरती |
सायीच्या हातांमधुनी
प्रेमामृत नित पाझरते ||

मखमाल तिच्या स्मरणाने
जीव हलका फुलका होतो |
ममतेचे रेशीम धागे
ती असेच गुंफुनी जाते |
|

Tuesday, October 14, 2008

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..!!!!

Monday, October 13, 2008

स्वप्न

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात

Sunday, October 12, 2008

तुझी आठवण..
तुझी आठवण..
सकाळी आठवण रात्रीची आठवण..
दिवसभर मनात रेंगा लनारी आठवण ..
कस सांगू काय असत या साठ्वानित..
अजुन ही काय काय जपले या आठवणीत..
कधी असते एका छत्रीत घालवलेली एक ओलिचिम्ब संध्याकाळ..
तर कधी रन रन त्या उन्हत उगाच फटकत घालवलेली दुपार ..
कधी तू सहज बोलता बोलता दूर सारलेली माझ्या केसांची बट,
तर कधी अड़ खलत धरलेला हात..
कधी असतात आपलं खोटी खोटी भाडन,
आणि मी रुस्ल्यावर तुझ डोळ्यातून हसन..
कधी असतात उगाचच तासंतास मारलेल्या गप्पा..
तर कधी असतात तू सवईने मारलेल्या गमज्या..
कधी असत रंगलेले आपले sms war.
तर कधी मुदाम हुन घातलेला वाद..
कधी असत रात्रि उशीराच च्रोरून बोलने...
तर कधी असते तू नेहमी माझ्यासाठी गायलेले गाने..
अशा तुझ्या आठवणी
एक्ट साधून नेहमीच येतात...
तर कधी चार चौघात गाढ्तात..
कधी हसवतात तर कधी रडव तात..
तुज्या आठवणी म्हणजे
बेधुंद कोसलनारा पाउस
कधी गार गार वार
तर कधी बोचणार उन
कधी रंगांची उधलन
तर कधी मोरपिशी स्वप्न
कधी दिवसाचा हर एक प्रहर
तर कधी दोन स्वसामधिल अंतर..
कधी असतात माझ्या जगण्याच कारण
तर कधी माज्या अस्तित्वाचा एक भाग..
तुझी आठवण

Saturday, October 11, 2008

"नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो...
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो...
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो...
चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो...
सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो.....
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शहाणा करणारा एखादाच असतो...
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो...

Friday, October 10, 2008

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!

भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!

तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!

"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."

ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"

बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!

कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!

अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!

Thursday, October 9, 2008


छत्रपती शिवाजी महाराज !!!

ज्यांनी मराठी साम्राज्यासाठी, हिंदू संरक्षणासाठी, आणि स्वराज्यासाठी स्वताचे सर्व आयुष्य पणाला लावलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ई. स. १६३० फेब्रुवारी १९, शिवनेरी किल्ला,
पुणे येथे राजमाता जिजाबाई यांच्या पोटी जन्म झाला........... ज्या काळी स्वातंत्र्याचा
विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी 5 पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला
स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी।

हे दुर्दैव म्हणव लागेल कि, सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यापासून, दिल्लीच्या तख्तापर्यंत ज्याच्या घोड्याच्या टापा गेल्या त्या शिवबाचे वारस आपण पण आज किती जनांना महाराजांचा इतिहास माहित आहे............ अगदी कमी...........

ज्यांनी अख्ख आयुष्य या मातीसाठी बहाल केल, वयाच्या अगदी १६ व्या वर्षापासून ५० पर्यंत फक्त स्वराज्य आणि स्वराज्य हाच विचार केला............

२२ हजारांची फौज घेवून आलेला अफझल खान, ३२ हजार फौझ घेवून आलेला सिद्धी जोहर, ६० हजारच्या आसपास फौज घेवून उतरलेला शाहिस्तेखान, या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. या सगळ्यावर मात केली....... एक हिंदू राजा
पण औरंग्याचा चाकर मिर्झा राजा १ लाख फौज घेवून उतरला, पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव
होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य
देखील केला............ राजे आग्र्यामध्ये कैद असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला,

बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच
लढतात ही अभुपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ??? महाराजांकडून............

हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला...........
कडेकपारीत उगवलेलं रानफूल, पुष्पराज गुलाबाप्रमाणे सौंदर्यसंपन्न,सुगंधी नसतं,पण म्हणून ते कधी गुलाबाची बरोबरी करू शकणार नाही असं मुळीच नाही, किंबहुना ते रानफुल या गुलबापेक्षाही श्रेष्ठ असतं जेव्हा ते माझ्या राजाच्या एखाद्या गडकोटावर उगवलेलं असतं.

महाराजाविषयी थोडेशे............ .

अधिकारकाळ- जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक- जून ६, १६७४
राज्यव्याप्ती- पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी- रायगड
पूर्ण नाव- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
पदव्या- गोब्राह्मणप्रतिपालक
जन्म- फेब्रुवारी १९, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यू- एप्रिल ३, १६८० रायगड
उत्तराधिकारी- छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील- शहाजीराजे भोसले
आई- जिजाबाई
पत्नी- सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई
संतती- छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले
राजघराणे- भोसले
राजब्रीदवाक्य-'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन- होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.
शिवकल्याण राजा।।
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।
कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला
।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते आणि अश्या नाट्यमय घटनांमुळे खरे कर्तुत्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो. महाराजांच्या जीवनात अश्या घटना ५-६ पेक्षा अधिक नाहीत. पहिली अद्भुत घटना
१६५९ मध्ये अफझलखानवध ही आहे. तर शेवटची १६६६ ला आग्र्याहून सुटका ही आहे. ह्या ७ वर्षात
पन्हाळा - बाजीप्रभु, शाहिस्तेखान प्रकरण, सूरतलूट ह्या घटना आहेत. म्हणजे एकुण ५०
वर्षाच्या जीवनात पाहिल्या नाट्यमय घटनेपूर्वी २९ वर्षांचा नाट्यशून्य काळ आणि शेवटच्या
नाट्यमय घटनेनंतर १४ वर्षांचा कालखंड...!!! ह्या अश्या ५-६ घटनांवर आपल्या कर्त्या
पुरुषाचे चरित्र कसे पूर्ण होइल ??? छत्रपतींचे कार्य आणि चरित्र समजुन घेताना ह्या
नाट्यमय रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिले.

शिवरायांच्या नेत्रुत्वाचा विचार जेंव्हा जेंव्हा पडतो तेंव्हा २ प्रश्न समोर येतात ...
१. खुद्द औरंगजेब आपली राजधानी सोडून दक्षिणेत का उतरला ???
२. १६९२ नंतर आपण ही लढाई पूर्णपणे जिंकू शकत नाही, हे माहीत असुनही पुढची १५ वर्षे लढत का राहिला ???

त्याच्यासारख्या कसलेल्या युद्धनितीतज्ञ आणि मुत्सद्दी अश्या बादशहाला महाराष्ट्रातल्या पश्चिमेकडील एका कोपऱ्यातल्या डोंगराळ भागात वसलेले छोटेसे राज्य बूडवण्यात अपयश का आले ??? औरंगजेबाने केलेल्या तयारीवरुन हे स्पष्ट दिसते की त्याने ही लढाई साधी - सोपी नक्कीच समजली नव्हती. लाखोच्या फौजा
जातीने घेउन उतरणे यावरुनच ते स्पष्ट समजते. लाखोने मुघल फौजा सीमेवर उभ्या असताना
अवघ्या ५० व्या वर्षी छत्रपतींना मृत्यू आला. पण तरीही राजधानी पासून दूर राहून, दरवर्षाला
कोट्यावधी खर्च करून आणि उत्तर भारतात अव्यवस्था निर्माण होउन देखील औरंगजेब अखेरपर्यंत
लढत राहिला. त्याने अनेक लढाया जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता. मराठ्यांना
अपुऱ्या साधन-सामुग्रीवर मोघलांचा पराभव करणे शक्य नव्हते. तरीही सर्व प्रतिकूल परिस्थितिमध्ये
मराठे लढत राहिले. छत्रपति संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षे आणि त्यांच्या
वधानंतर १९ वर्षे जनता लढत राहिली.

पृथ्वीराज चौहान, राणा प्रताप, रामराजा ह्यांनी सुद्धा परकियांविरुद्ध प्रखर लढा दिला. पण जिकडे जनता लढते तिकडे फौजा निकामी होतात. भारताच्या इतिहासात १२०० वर्षांनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी जनता अखंड
२७ वर्षे लढली. हयात धर्माभिमान नव्हे तर आपण लढू शकतो हा आत्मविश्वास जास्त महत्वाचा
आहे. छापे घालण्याचे नवे तंत्र निर्माण करणे, विरतेच्या खोट्या कल्पनेच्या आहारी जाउन
'लढून मरणे' यापेक्षा - टिकणे, गरज असल्यास पळणे, मग पळवणे, थकवणे आणि अखेर नाश करणे
हे जास्त महत्वाचे. यासोबत प्रजेच्या इहलौकिक गरजा सांभाळणे आलेच. यानंतर धर्माभिमान
महत्वाचा. एखादे राज्य टिकवण्यासाठी जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा, ही घटनाच हिंदुस्तानच्या
इतिहासात सर्वात जास्त रोमांचक आहे... नवखी आहे...

शिवछत्रपतींच्या कार्यपद्धतीचा विचार अधिक तपशीलवारपणे समजुन घेणे महत्वाचे आहे. 'शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह ... त्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी युद्ध हे साधन.' सन १६४५ ते १६४९
ही ४ वर्षे बारा मावळची व्यवस्था लावण्याचे काम अखंड सुरू होते. वतनदारांचा बंदोबस्त
करणे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे ही सर्वात महत्वाची कामे ह्या काळात केली
गेली. सामान्य असणाऱ्या मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे आणि प्रतापराव गुजर अश्या व्यक्तिंमधून
असामान्य कर्तुत्ववान प्रधान, सेनापति, सुभेदार निर्माण करणे हा महाराजांचा आणखी एक
पैलू.

शिवरायांचे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्याचे वैशिष्ट्य ह्यात आहे की, जेंव्हा त्यांना माघार घ्यावी लागली, अपयश आले किंवा ताब्यातला प्रदेश होरपळून निघाला; तरीसुद्धा लोकांचा त्यांच्यावरील विश्वास तसूभरही
कमी झाला नाही. एखादा चुकार माणूस वगळता त्यांच्या फौजेने कधी बंद पुकारले नाही. १६४९
मध्ये सुद्धा सर्वच अनिश्चित असताना लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले असे लोकांना त्यांनी
दिले तरी काय होते ??? त्यांचे वैशिष्ट्य यात आहे की, ते जेंव्हा-जेंव्हा जिंकत तेंव्हा-तेंव्हा
नवा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेत आणि जेंव्हा पड़ती घेत तेंव्हा नव्याने जिंकलेल्या
प्रदेशाचा काही भाग सोडून देत असत. म्हणजेच पुढच्या वेळी लढण्याची शक्ती त्यांनी सुरक्षित
ठेवलेली असते. जन्मभर त्यांनी ह्याच पद्धतीने कारभार पाहिला. त्यांचे चौरस नियोजन आणि
युद्ध आखणीला राज्य विस्तारात रूपांतरित करण्याचे श्रेय अप्रतिम आहे.


Wednesday, October 8, 2008

असाच आहे मी


असाच आहे मी
चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा

वाऱ्याबरोबर दुर 
फिरायला जाणारा

हिरव्या सावलीत
कोठेतरी रमलेला

असाच आहे मी
कवितेतल्या चारओळीत
कोठेतरी हरवलेला
-अनामिक 

Tuesday, October 7, 2008

मैत्री अशी असते
रातोरात रडवणारी
आसवाणी भीजवणारी
हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री

मैत्री आकाराने लहान
पण अर्थाने मात्र महान असते

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात
कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात

मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण
मैत्रीत असते भावनांची जान

मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी
मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी

कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात
अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात

मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल
मैत्रीत असतो मनमनाचा समतोल

मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारी...

Monday, October 6, 2008

मी असाच आहे

मराठी कविता

मी असाच आहे
अनोळखीशी ओळख करणारा
पण निखळ मैत्रीवर विसावणारा
मी असाच आहे
कोणाच्या ध्येयासाठी
ध्यास पणाला लावणारा
मायेच्या आशेसाठी
आनंद वर्षाव करणार
डोळ्यातील अश्रू
ओठांवर ठेऊन हसणारा
मी असाच आहे
पाउसाच्या रिमझिम
सरीवर ओलाचिब भिजणारा
हळूच कोणाच्या आठवणीत मावळणारा
दिलेला शब्दासाठी
बेधुंदीने कर्तुत्व निभावणारा
मोठे तर सर्वच असतात
पण मनाने मोठे असणारा
शब्दांची भाषा नको मला
पण त्यांच्या भावनाने सर्वाना जाणणारा
कारण मी असाच आहे.
-अनामिक 

Sunday, October 5, 2008

माझी ऑनलाइन मैत्रीण...!
माझी ऑनलाइन मैत्रीण...!
कविता पोस्ट करता करता
अशीच एकीशी ओळख झाली...
तिच्या कवितेला रिप्लाय देता देता
ही ओळख फ्रेंड रिक्वेस्ट पर्यंत जाउन पोहचली...
फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाली
जी-टॉक वर आमची एक-मेकाशी बोलायला सुरुवात झाली,
एक-मेकांची ओळख पटताच
मन आमची एक-मेकाना ओळखु लागली ....
बोलणे आमचे दरोज होत होते,
मन आमचे तेवढेच जवळ येत होते...
एखाद्या ओळखिच्या व्यक्तीने प्रेम न द्यावे,
त्याहुन अधिक एक अनोलखी व्यक्ति ने आपल्यावर प्रेम करावे....
तिच्या विचारताच रात्र घालवावी....
सकाळ होताच ती ऑनलाइन येण्याची वाट पहावी..
ती आल्यावर कालचा दिवस कसा होता याची विचारपूस करावी
तिच्याशिच आधी बोलून मग आपल्या दिवसाला सुरुवात करावी..
ऑफिस नंतर ही तिच्याशी बोलायची अफाट इच्छा व्हावी
पण तिला तिचा नंबर मागायची हिम्मत न व्हावी..
दरोज बोलायची आपल्याला सवय लागावी
पण ही सवय मनाला आनंदायी व्हावी..
तिच्याशी बोलताच सार्या दुखाचा विसर पडावा
नव्याने पुन्हा जगायचा जोश जणू अंगात यावा..
फिरत होतो सर्वत्र एक मैत्रीसाठी
देव आहे दुनियेमधेय पाठवले तिला माझ्यासाठी.


शिरीष सप्रे (२८-११-२००९)

Saturday, October 4, 2008

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,

सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,

सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,

स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन

स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,

तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात

Friday, October 3, 2008