Tuesday, December 31, 2019

कविता

*राष्ट्रकवि रामधारी सिंह दिनकर जी द्वारा #अंग्रेजी #नववर्ष पर रचित एक प्रेरणादायक कविता*

*ये नव वर्ष हमें स्वीकार नहीं,*
है अपना ये त्यौहार नहीं।
है अपनी ये तो रीत नहीं,
है अपना ये व्यवहार नहीं।

धरा ठिठुरती है सर्दी से,
आकाश में कोहरा गहरा है।
बाग़ बाज़ारों की सरहद पर,
सर्द हवा का पहरा है।

सूना है प्रकृति का आँगन,
कुछ रंग नहीं , उमंग नहीं।
हर कोई है घर में दुबका हुआ,
नव वर्ष का ये कोई ढंग नहीं।

चंद मास अभी इंतज़ार करो,
निज मन में तनिक विचार करो।
नये साल नया कुछ हो तो सही,
क्यों नक़ल में सारी अक्ल बही।

उल्लास मंद है जन -मन का,
आयी है अभी बहार नहीं।
ये नव वर्ष हमें स्वीकार नहीं,
है अपना ये त्यौहार नहीं।

ये धुंध कुहासा छंटने दो,
रातों का राज्य सिमटने दो।
प्रकृति का रूप निखरने दो,
फागुन का रंग बिखरने दो।

प्रकृति दुल्हन का रूप धार,
जब स्नेह – सुधा बरसायेगी।
शस्य – श्यामला धरती माता,
घर -घर खुशहाली लायेगी।

तब *चैत्र शुक्ल की प्रथम तिथि*,
*नव वर्ष मनाया जायेगा।*
आर्यावर्त की पुण्य भूमि पर,
जय गान सुनाया जायेगा।

युक्ति – प्रमाण से स्वयंसिद्ध,
नव वर्ष हमारा हो प्रसिद्ध।
आर्यों की कीर्ति सदा -सदा,
नव वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा।

अनमोल विरासत के धनिकों को,
चाहिये कोई उधार नहीं।

ये नव वर्ष हमें स्वीकार नहीं,
है अपना ये त्यौहार नहीं।
है अपनी ये तो रीत नहीं,
है अपना ये त्यौहार नहीं। 

-राष्ट्रकवि रामधारीसिंह दिनकर

Tuesday, December 24, 2019

सुभाषित

पापान्निवारयति योजयते हिताय
गुह्यं निगूहति गुणान् प्रकटीकरोति|
आपद्गतं च न जहाति ददाति काले
सन्मित्रलक्षणमिदं निगदन्ति सन्तः||

जो आपल्या मित्राला पापांपासून वाचवतो, त्याचे हित साधतो, त्याची गुपिते राखतो, त्याचे गुण सर्वांना  सांगतो. संकटसमयी त्याला सोडून जात नाही, वेळेवर त्याच्या उपयोगी पडतो, ही चांगल्या मित्राची लक्षणे असल्याचे मोठे लोक सांगतात.

Sunday, December 15, 2019

हे परमेश्वरा

हे परमेश्वरा…मला माझ्या वाढत्या वयाची
जाणिव दे. बडबडण्याची माझी
सवय कमी कर.
आणि प्रत्येक प्रसंगी मी
बोललंच पाहिजे ही माझ्यातली
अनिवार्य इच्छा कमी कर.

दुसर्‍यांना सरळ करण्याची
जबाबदारी फक्त माझीच व
त्यांच्या खाजगी प्रश्नांची
दखल घेउन ते मीच
सोडवले पाहिजेत अशी
प्रामाणिक समजूत माझी
होऊ देऊ नकोस.

टाळता येणारा फाफटपसारा
व जरुर नसलेल्या तपशिलाचा
पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची मला 
सवय कर.

इतरांची दुःख व वेदना
शांतपणे ऐकण्यास मला
मदत करंच पण त्यावेळी
माझं तोंड शिवल्यासारखे
बंद राहु दे. अशा प्रसंगी
माझ्याच निराशा, वैफल्यांचे
रडगाणे ऐकवण्याची माझी
सवय कमी कर.

केव्हा तरी माझीही चूक
होऊ शकते, कधीतरी माझाही
घोटाळा होऊ शकतो,
गैरसमजुत होऊ शकते
ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात
प्रेमाचा ओलावा, गोडवा,
लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही
हे मला माहीत आहेच,
पण एक बिलंदर बेरकी
खडूस माणूस म्हणून मी
मरू नये अशी माझी
प्रामाणिक इच्छा आहे.

विचारवंत होण्यास माझी
ना नाही पण मला लहरी
करू नकोस. दुसर्‍याला
मदत करण्याची इच्छा
आणि बुद्धी जरूर मला
दे पण गरजवंतांवर
हुकूमत गाजवण्याची
इच्छा मला देऊ नकोस.

शहाणपणाचा महान ठेवा
फक्त माझ्याकडेच आहे
अशी माझी पक्की खात्री
असूनसुद्धा, परमेश्वरा,
ज्यांच्याकडे खरा सल्ला
मागता येइल असे मोजके
का होईना पण
चार मित्र मला दे

एवढीच माझी प्रार्थना…-पु.ल.देशपांडे

Monday, June 24, 2019

बातमी

राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याबाबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही ही बाब समोर आली आहे. यासाठी कायद्यात बदल करून अतिशय कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘मराठीच्या भल्यासाठी’या मंचाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक मराठी भाषेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची सक्ती तामिळनाडूच्या धर्तीवर झाले पाहिजे यासाठी विकास प्राधिकरण कायदा पावसाळी अधिवेशनात मंजूर करणे, मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी, शाळा बंद पडू नये यासाठी मराठी शाळांच्या गुणवत्तेबाब सक्षमीकरण करणे, मुंबईत मराठी भाषा भवन उभारणे, शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी परिपत्रक काढणे अशा मागण्या मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठाने केल्या आहेत. दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी सक्तीचे करण्यात यावे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/20/marathi-language-is-compulsory-in-all-education-boards.html

Wednesday, June 19, 2019

नव्या मराठी संख्या वाचन पद्धतीवर आक्षेप

महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. रमेश पानसे ह्यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'नव्या मराठी संख्या वाचनाच्या पद्धतीवर' आक्षेप घेत, ह्या तकलादू बदलाबद्दल मुद्देसूद मांडणी केली आहे. नक्की वाचा...  

मराठी संख्या वाचनात जोडाक्षरांचा अडथळा येतो,  विद्यार्थ्यांना जोडाक्षरे उच्चारण्यात समस्या येते असा दावा करून शालेय विद्यार्थ्यांना संख्या वाचनाची नवी आणि वेगळी पद्धत शिकवावी, असा सल्ला महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीशी संबंधित गणित अभ्यास मंडळातील तज्ञांनी दिल्याचे समजते. या निर्णयाची समाजात कोणती व्यापक चर्चा झाली, ती कोणत्या पातळीवर झाली सदर चर्चेत शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण खात्यातील  अधिकारी सहभागी होते याची माहिती प्रसिद्ध झालेली  नाहि.  संख्या वाचनातील ही नवी पद्धत थेट पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून जाहीर करण्यात आली आहे. या नव्या पद्धतीनुसार ६३ त्रेसष्ठ, ७३ त्र्याहत्तर  किंवा ३२ बत्तीस या संख्यांचे वाचन अनुक्रमे साठ तीन,  सत्तर तीन किंवा तीस दोन  असे  करावे हे इयत्ता दुसरीच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात म्हटले आहे. 

जोडाक्षरे उच्चारणे विद्यार्थ्यांना जमत नाही हे या बदलासाठी दिलेले कारण फारच तकलादू आहे आणि समर्पक नाही. महाराष्ट्र शासनाने पुढील मुद्यांचा विचार करून सदर नवी पद्धत तातडीने मागे घ्यावी अशी मा
गणी मी संबंधित शासकीय यंत्रणेकडे केली आहे. माझ्या मागणीच्या पुष्ट्यर्थ मी पुढील मुद्दे मांडत आहे.

मुद्दा क्र. १ - जोडाक्षरे नको व जोडाक्षर विरहित अक्षरांसह संख्या वाचन केले जावे असे सुचवणाऱ्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील   पानावर ज्या टिपणात हे सुचवले आहे त्या  टिपणातच भरपूर जोडाक्षरे आहेत.  महाराष्ट्र, राज,  मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री,  अभ्यासक्रम, गुणोत्तर, संख्या, स्पर्शिका, वर्तुळ, क्रम, प्रश्न, उत्तर, चक्रीय चौकोन, वक्रपृष्ठभाग, वक्रपृष्ठफळ, क्षेत्रफळ, त्रिकोणमिती या गणिताशी संबंधित सर्व शब्दांमध्ये भरपूर जोडाक्षरे आहेत. केवळ गणित नव्हे तर सर्व विषयांच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये मिळून हजारो जोडाक्षरे आहेत.  ती सर्व जोडाक्षरे उच्चारण्याचे शिक्षण सर्व शाळांमध्ये देतात आणि बहुसंख्य विद्यार्थी त्या सर्व जोडाक्षरांचा उच्चार व्यवस्थित करतात. जोडाक्षरे हा सर्वच भारतीय  भाषांचा आत्मा आहे. जोडाक्षरे हद्दपार करायची असतील तर सर्व भारतीय भाषांमधून शिक्षणच नव्हे तर भारतीय भाषांमधून सर्व व्यवहार  थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. भारतातून भारतीय  भाषा हद्दपार करण्याचा निर्णय अजून तरी महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने घेतलेला   नाही. असा दुर्दैवी निर्णय घेतल्यानंतर आपोआपच संख्या वाचनातील जोडाक्षरे हद्दपार होतील.

मुद्दा क्र. २ -  संख्या वाचनातील जोडाक्षरांचे प्रमाण शालेय अभ्यासक्रमातील व पाठ्यपुस्तकातील एकूण जोडाक्षरांच्या तुलनेत लाखात एक या प्रमाणाहून कमी आहे.  असे असताना जोडाक्षरे अवघड जातात या किंचितही संयुक्तिक नसलेल्या युक्तिवादाच्या आधारे संख्या वाचनातून जोडाक्षरे वगळण्याचा निर्णय सर्वथैव अयोग्य आहे.

मुद्दा क्र. ३ - संख्यावाचन सोपे करावे असा  उपरोक्त  प्रस्तावित बदलांचा हेतू आहे असे सदर बदल सुचवत असलेल्या इ. २ रीच्या पाठ्यपुस्तकातील टिपणात नमूद  आहे.  प्रत्यक्षात, या प्रस्तावित बदलानुसार संख्यावाचन अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघडच  होणार  आहे.  ६३ ला साठ तीन  म्हणायचे  असेल तर ६३४५ चे  वाचन कसे करायचे ?  साठ तीन चाळीस पाच  की सहा हजार तीनशे चाळीस पाच  ?  याचा  उलगडा सदर टिपणात नाही. 

मुद्दा क्र. ४ - जोडाक्षर विरहित अक्षरांसह संख्या वाचन केले जावे असे सुचवणाऱ्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील   पानावर ज्या टिपणात अशी सुचवलेली पद्धत केवळ पन्नास ( याला काय म्हणावे ? कारण या पन्नास मध्ये देखील जोडाक्षर आहे.) या संख्येपर्यंतच वापरावी असे म्हणले आहे, पण  प्रस्तावित संख्या वाचन पद्धत सुचवण्यासाठी ६३ त्रेसष्ठ,  ७३  त्र्याहत्तर   यातील  उच्चार अवघड जातात अशी अडचण  मांडली आहे. 

मुद्दा क्र. ५ - सुचवलेली नवी पद्धत अधिक  गुंतागुंतीची, अवघड व अधिक  वेळखाऊ  आहे.  ११ +१/४ सव्वा अकराचे वाचन  कसे करावे  याबाबत  काहीही  सुचवलेले नाही. त्याचे  शालेतील कोवळ्या, अजाण  बालकांनी  ११.२५  हे रूपांतर करून मग त्याचे वाचन दहा एक पूर्णांक वीस पाच  करावे असे गणित  अभ्यास  मंडळाचे  मत  आहे  का ?

मुद्दा क्र. ६ - ९. ३१४५६ या  संख्येचे वाचन  पुढील  वरच्याइयत्तेतील  मुलांनी कसे करावे याबाबात गणित  गणित  अभ्यास  मंडळाचे  काय मत  आहे ? 

मुद्दा क्र. ७ - महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ या दिवशी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या शासन निर्णयात मराठी वर्ण चिन्हे, मराठी अक्षरे, मराठी जोडाक्षरे, मराठी वाक्यरचना, मराठी अंक,  अंकातील मराठी संख्या,  अक्षरी मराठी संख्या  आणि या दोन्ही प्रकारे संख्या कागदावर कशा लिहाव्यात किंवा उमटवाव्यात याविषयी प्रत्यक्ष उदाहरणे  देऊन सविस्तर आणि पुरेसे मार्गदर्शन केलेले आहे. महाराष्ट्र या शासनाच्या शासन निर्णयात यात नमूद केलेल्या प्रकारे संख्या वाचन न करता अन्य पद्धतीने करावे असा निर्णय घेण्याचा सल्ला देण्याबाबतचे अधिकार गणित अभ्यास मंडळाला आहेत का ? याचा प्राथमिक आढावा घेतला असता उपरोक्त गणित अभ्यास मंडळाला असा अधिकार दिलेला नसावा असे अनेक शासकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.                                                                                    

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता मराठी संख्यांचे वाचन करण्याची नवी, अशास्त्रीय पद्धत केवळ अनुकरणाच्या हौसेने   आणि  “  आली लहर, केला कहर “ या तत्वावर सुचवलेली  असावी,  असे मला वाटते.

शासनाच्या ६ नोव्हेंबर २००९ या दिवशीच्या शासन निर्णयाशी पूर्णपणे विसंगत आणि संख्या वाचन   आत्ताच्या पद्धतीपेक्षा प्रचंड प्रमाणात अधिक गुंतागुंतीचे करणारी ही नवीन पद्धत पाठ्यपुस्तकातून काढून टाकावी आणि ती वापरण्याचा जो सल्ला शिक्षकांना दिला आहे तो स्वतंत्र परिपत्रकाद्वारे मागे घ्यावा अशी मागणी मी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाकडे केली आहे.

मुद्दा क्र. ८ - जोडाक्षरे हे मराठी तसेच सर्व भारतीय  भाषांचे महत्वाचे वैशिष्ट्य असून जगातील इतर  भाषा आणि लिप्यांच्या तुलनेत  जोडाक्षरांमुळेच मराठी तसेच सर्व भारतीय भाषांतून अधिक वेगाने लेखन, वाचन, बोलणे करता येते. जोडाक्षरे हा  भारतीय  भाषाच्या  तसेच मराठीच्या मूलभूत रचनेशी जोडलेले जगात दुर्मीळ असे एकमेव वैशिष्ट्य  आहे.  महाराष्ट्र शासनाच्या गणित अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी नेमलेल्या  गणित  अभ्यास मंडळाला भारतीय भाषांच्या आणि विशेषत:  मराठीच्या मूलभूत  रचनेतच  बदल करण्याचा अधिकार आहे  का ?  या मुद्द्यावर देखील  शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही  मी शासनाकडे  केली आहे. गणित अभ्यास मंडळाची नेमणूक करताना त्यांनी पाठ्यपुस्तकाचा  आराखडा अथवा संपूर्ण पाठ्यपुस्तकाचे प्रारूप  तयार करून  देताना भाषेच्या  मूलभूत  रचनेतील बदल भाषा तज्ज्ञांशी विचारविनिमय  करून  समाविष्ट केले  की भाषा तज्ज्ञांशी  विचारविनिमय न करता केले आहेत याचा आढावा  शासनाने घ्यावा  आणि मगच व्यपक विचरविनिमय  झाल्यावरच इतका मूलभूत बदल लागू  करावा, अशी मागणी मी  शासनाकडे  केली आहे. भाषा तज्ज्ञांशी असा औपचारिक  विचारविनिमय  न करताच इतका मूलभूत बदल केला असेल तर तो बदल तातडीने स्थगित कारावा  आणि या संबंधीचा  आशय पाठ्यपुस्तकातून वगळण्याचे परिपत्रक  ( शुद्धिपत्रक ) तातडीने काढावे, अशी मागणीही मी शासनाकडे केली  आहे. 

वर उल्लेखित मुद्द्यांचा विचार करून अधिकाधिक विद्यार्थी, पालक, समाजसेवक, शिक्षक, विचारवंत, मराठी लेखक, गणिताचे शिक्षक, विविध शाळांचे मुख्याध्यापक यांनी याबाबत सदर नवीन पद्धत तातडीने रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे शिक्षण संचालकांकडे समक्ष पत्राने करावी असे मी सर्वांना आवाहन करतो.

| शिक्षणतज्ज्ञ श्री. रमेश पानसे.

Wednesday, May 22, 2019

Sunday, April 14, 2019

पूर्वी बाई ठेवणे

पूर्वी बाई ठेवणे हा प्रकार चालायचा. म्हणजे तिला सोप्या भाषेत “रखेल” म्हंटले जाई. यात जास्त करून नाचगाणे करणाऱ्या नायकिणी असत. त्याकाळी नाचगाणे करणाऱ्याना साधे पोटही भरता येत न्हवते. आणि त्यातच  या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे. आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत. मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई. आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे जन्मभर रखेल म्हणून रहात.

मग रंगेल असणारी लोकं आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतीच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे. अशा भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शनी कडेपाट असलेला सोपा असे. खुंटीवर तलवारी, बंदुका टांगलेल्या असत. खाली भली मोठी जाजमं, गादी, गालिचे आणे तक्के असत. काही श्रीमंत लोक वाड्यात अत्तराचे दिवे जाळून अशा नायकिणी रातभर नाचवायचे.

जणू “अत्तराचा फाया मला आणा राया” असेच स्वर भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यातून घुमत राहायचे. डोक्यावर दिवस रात्र पदर घेवून राहणाऱ्या त्यांच्या हक्काच्या बायका पुरुषांना सहसा विरोध करत नसत. केला तरी तो कोणाच्या पचनी पडत नसे. कारण घरात पुरुषाचा धाक असे.

बऱ्याच ठिकाणी या ठेवलेल्या बाईला मुलं होवू दिली जात नसत. कारण ती इस्टेटीत वाटा मागतील ही भीती त्यामागे असे. आणि चुकून बाई कधी गरोदर राहिलीच. तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येई. व प्रचंड वेदना झेलून या बाईला रिकामी केली जात असे. असले अघोरी उपचार करूनसुद्धा एखांदी बाई गरोदर राहिलीच. तर तिच्या मुलाच्या जन्मांतर काही वेळातच वाड्यात अथवा वाड्याच्या मागच्या बाजूला परूसभर खोल खड्डा खोदून ती मुलं जिवंतपणी गाडली जात. पण वाड्याबाहेरच्य माणसाला याची काहीच खबरबात मिळत नसे. कारण ठेवलेली बाई कधी कोणाच्या नजरेसही पडत नसे. काहीजण तर तिला माडीवरच घमेल्यात आंघोळ करायला लावून भरलेलं पाण्याचं घमेलं वाड्याच्या बाहेर आणून स्वत: ओतायचे. म्हणजे काही रंगेल माणसं तर तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंबायचे. ते तिचं मेल्यानंतर मढेच बाहेर काढायचे.

वाड्यातला वारा आणि अंधार पिवून सारा जन्म चिरेबंद भिंतीच्या आत घालविलेली बाई धान्य साठवायच्या कणगीसारखी फुगलेली असायची. तिला उचलायला तितकीच धिप्पाड देहाची माणसं लागायची. इतके करूनही तिच्या पोटी आलेलं एखांदे मुल जगलच तर त्याला मोठे झाल्यावर “कडू बियाणे” म्हणून संबोधले जाई. मग अशा मुलाला एखादा जमिनीचा तुकडा कसायला दिला जाई.

माझ्या ऒळखीतली आज्जी एका रखेल बाईच्या पोटाला जन्मलेल्या माणसाचे नाव घेवून सांगायची की, “तो जन्मला तेव्हा त्याला वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ते चिमुकलं बापाकडे बघून ओठातून हसलं. मग बापानं क्षणभर विचार केला अन दया येऊन खड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर काढून वाढविला.” पुढे मोठे झाल्यावर त्याला “कडू बियाणे” म्हणून साऱ्या पंचक्रोषित ओळख मिळाली.

त्यामुळे अशा ठेवलेल्या बाईचा वापर फक्त जन्मभर भोगण्यासाठीच केला जाई. सालभरात एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नवं लुगडं, चोळी चढायची. त्यावरच ती समाधान मानायची. आणि आपला जन्म भोगण्यासाठीच झाला आहे अशी मनाची तयारी करून ती बाई आलेला दिवस ढकलत राहायची.

बाकी, 'बाई वाड्यावर या' म्हणून आज नाचणाऱ्या आताच्या मूर्ख पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दुखणं कधीच नाही   समजणार 
                                                       -ज्ञानेश्वर पोळ

Tuesday, March 26, 2019

वपु

फॅंन्टसी एक प्रेयसी

प्रेमाची खरी व्याख्या कुणाला समजलीय! अरे प्रेम म्हणजे महापूर असतो महापूर.. असं झूळझूळ वाहणारं एखाद पाणी…येतंय येत नाही… येतंय येत नाही...प्रेम म्हणजे वादळ आहे… प्रेम म्हणजे महापूर आहे…पण समाज आणि प्रेमाची ही संकल्पना यात हे जे अंतर पडलंय, त्याचे कारण माहीत आहे... प्रेमाचा स्वीकार करताना देखिल ते जर तुमच्या रुढ चाकोरीतून.. मान्यवर नात्यातूनच आलं तर त्याला तूम्ही प्रेम म्हणणार... मग ते गढूळ असलं तरी तुमच्या हिशेबी ते पवित्र, त्यात झेप नसली, उत्कटता नसली, तरी त्याला तुम्ही कवटाऴणार... त्यात तेज नसलं तरी तुम्ही दिपून जाणार... अरे त्या प्रेमात पेटवून टाकण्याची ताकद नसली तरी तुम्ही जऴून स्वत:ची राख होउन देणार का?… कारण ते चाकोरीतुन येतं... तुमच्या नीती अनीतीच्या कल्पनांची बूज संभाळत येतं.... बस तुमच्या सारख्यांना तेवढंच प्रेम समजतं... समाजालाही तेवढंच प्रेम कऴतं... बाकीच्या प्रेमाला मग समाज काय म्हणणार... कुठेही काहीही कमी नसताना माणसं दु:खी दिसतात ते यामुऴे... उत्कट प्रेम करणारी व्यक्ती त्यांना आयूष्यात भेटतच नाही... यदा कदाचित  भेटली तरी त्या प्रेमाला कधीही प्रतिष्ठा मिऴत नाही... आणि तरीही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला असं एखादं प्रेमाचं स्थान हवंच असतं... काय कारण असेल? एकच अशा तर्हेचं प्रेम भक्ती जिथं उगम पावते तिथं संकेत नसतात... असते फक्त उत्कटता.... तिथे बंधन नसतं... असते फक्त अमर्यादता.. त्यातली दाहकता... पचवायला पोलादी छाती लागते... त्यातून जे नंदनवन फूलतं ते पहायला दोन डोऴे पुरत नाहीत...अरे डोऴे पाहू शकणार नाहीत असं दाखवणारं निराऴं इन्द्रियं लागतं.... सामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाही... निभावण्याची ताकद असणाऱ्या माणसांचाच तो प्रांत आहे.... आणि प्रेमाच्या प्रांतात अशी उत्कटतेने उडी घ्याल... मागचा पुढचा विचार न करताना धाव घ्याल तेव्हाच तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते समजेल…

-वपु काळे

Sunday, March 10, 2019

Monday, February 25, 2019

कविता


इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज़्बातों से, 
अगर मैं इश्क़ लिखना भी चाहूँ तो इंक़लाब लिखा जाता है।
~ भगत सिंग