Friday, December 23, 2011

काही शब्दांच्या व्याख्या

काही शब्दांच्या व्याख्या



वक्तृत्व : दोन मिनिटात सांगता येणा-या कल्पनेकरिता दोन तास घालविणे.

शेजारी : तुमच्या गोष्टींची तुमच्यापेक्षा अधिक माहिती जशीच्या तशी सांगणारा नारदमुनी.

बेकार पदवीधर : हातात ब्याग घेऊन प्रवास करणारा एस.टी. चा राखीव प्रवासी.

पुढारी : जनतेच्या जीवावर स्वताःचे भले करून घेणारा डोमकावळा.

मुंबई : माणसांनी गजबजलेले मनोहर संग्रहालय.

विद्यार्थी : परीक्षादेवीचा लाडका पुत्र.

फ्याशन : शिंप्याच्या हातून चुकून झालेला बदल.

रोगी : अशी आग आहे, जिच्यावर डॉक्टर पोळी भाजतात.

वकील : गुन्हेगारांचा बाप......नरकात दाखल होण्याचे फर्स्ट-क्लासचे तिकीट.



ईश्वर : कोणालाही भेट न देणारा अभिमानी म्यानेजर.

नृत्य : पद्धतशीरपने लाथा झाडण्याची कला.



शिक्षक : निमुटपणे देशकार्य करणारा गरीब प्राणी.

जीवन : मरण येईपर्यंत काहीतरी भानगडी करत घालवायचा काळ.

मन : नेहमी चोरीस जाणारी वस्तू.

Tuesday, December 13, 2011

स्त्री गर्भाचा गर्भपात



स्त्री गर्भाचा गर्भपात
-वृषाली मगदूम , शनिवार , १०  डिसेंबर २०११
(सौजन्य : लोकसत्ता)

मुलगी असल्याने जन्मल्यावर खड्डय़ात गाडल्या गेलेल्या पण जगलेल्या सुनीता असो की सासू-सासऱ्याचा मार खाऊनही गर्भजल चाचणीला नकार देणारी अर्चना वा मंगल असो. स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीला जन्माला घालण्यासाठी आजही तिला प्रचंड यातना भोगायला लागत आहेत. अशिक्षित कुटुंबात आणि अगदी सुशिक्षित कुटुंबातही. पण तरीही लढणं सुरूच आहे. नकाराला होकारात बदलणाऱ्या अशाच काही स्त्रियांच्या या सत्यकथा...
चोवीस वर्षांची अर्चना. अनदूर तालुक्यातली. फारसं शिकलेली नसली तरी बचत गटात सक्रिय असणारी. आधीच्या दोन मुली आणि आता पुन्हा गर्भवती असल्याने घरातलं तणावाचं वातावरण सहन करणारी. तिचा नवरा एकुलता एक असल्याने आता मुलगाच व्हायला हवा म्हणून तिच्यावर गर्भजल परीक्षेची सक्ती होतेय. तिने त्याला ठाम नकार दिलाय. सासू तर भांडून निघूनही गेली होती. पण तिचा निर्णय ठाम आहे. मी कोणतीही चाचणी करणार नाही. मुलगा असो की मुलगी ते माझं बाळ आहे. मी ते जगात आणणारच ..
सोलापूरला राज्यस्तरीय लिंग निवड चाचणी प्रतिबंध कार्यशाळेत गेले होते. तिथे लातूरच्या सुनीता अरळीकर भेटल्या. आज त्या ५६ वर्षांच्या आहेत. मुलगी झाली म्हणून त्यांच्या वडिलांनी जन्मत:च खड्डा खणून त्यांना पुरलं होतं. आजोबांना हे कळताच त्यांनी त्यांना खड्डय़ातून काढून आपल्या घरी आणलं. आजोबा एवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी सुनीताला स्वत:चे नाव दिले. सुनीताचे शिवकांता असे नाव आजोबांनी (आईचे वडील) ठेवले व स्वत:चे कुंडलिकराव हे नाव वडील म्हणून दिले. सुनीता लग्न होईपर्यंत शिवकांता कुंडलिकराव माने हे आजोबांचे नाव तर लावत होतीच, पण तिथेच ती शिकली. आज सामाजिक कार्यकर्ती म्हणून विविध चळवळींत तिचा सक्रिय सहभाग असतो.
माझी एक उच्च विद्याविभूषित मैत्रीण, गर्भलिंग निदान व मुलींची घटती संख्या यावर पोटतिडीकीनं बोलायची. उच्चभ्रू घरातल्या या मैत्रिणीला त्याबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘पहिल्या मुलीनंतर मला घरच्या लोकांनी चार वेळा मुलीचा गर्भ आहे म्हणून गर्भपात करायला लावला. मुलगा झाल्यावरच हे थांबलं. माझ्या मनात या साऱ्यांची टोचणी व अपराधी भावना आणि खूप काही साचलं आहे गं! डोक्यातून जातच नाही. त्यावेळी मी फक्त गृहिणी होते. घरातल्यांवर अवलंबून होते. हातात पदवी नव्हती. विरोध करण्याचं बळ नव्हतं, पण म्हणूनच मग  अर्धवट शिक्षण पुरं केलं. पदवीधर झाले. कायद्याची पदवी घेतली. हे शिक्षण व आर्थिक बळ त्यावेळी असतं तर माझ्या छकुलींना मी जन्माला येऊ दिलं असतं.. कशाकरिता गं मुलाची हाव. ते जीव गेलेच. माझं आयुष्यही पणाला लागलं. आज सायटिका, कंबरदुखी, पाठदुखी असे अनेक आजार शरीरात घर करून आहेत.’’
या मैत्रिणीनं आपलं मन मोकळं केलं, पण अशीच व्यथा घेऊन वावरणाऱ्या आजूबाजूला कितीतरी भेटतात. वंशाचा दिवा फक्त श्रीमंत घरातच हवा असतो, असं मला परवा-परवापर्यंत वाटत होतं. पण सारसोळे विभागात आमच्या कचरावेचक भगिनची बैठक घेत होते. कोण, कोठल्या विभागातून आले यावर गप्पा सुरु होत्या. परभणी, औरंगाबाद, लातूर, बीड, परळी वैजनाथ अशा भागांतून या महिला दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असल्यामुळे मुंबईत आल्या व कचरा वेचू लागल्या. बीडमध्ये मुलींची संख्या किती कमी आहे, असं मी विचारताच त्या भडाभडा बोलायला लागल्या. माया म्हणाली, ‘‘ताई, मी खिल्लारीची आहे. मला पहिल्या चार मुली झाल्या. प्रत्येक मुलीच्या वेळी सासू व नवऱ्याच्या शिव्या व मार खाल्ला. पाचव्या वेळी सासूनं मला ती टेस्ट करायला लावली. टेस्टमध्ये मुलगा आहे, असं सांगितलं; पण काय झालं माहीत नाही. मुलगी झाली. मला, ओल्या बाळंतिणीला चार मुलींसह घरातून हाकलून दिलं. तिकीटसुद्धा न काढता मी इथं बहिणीकडे येऊन धडकले. ‘कचऱ्यावर’ जायला लागले. काही दिवसांनी नवरा आला. तोपण बिगारी काम करायला लागला. आता पोरी चांगल्या शिकताहेत बघा. चांगलं वाटतंय. मुलगा नाही म्हणून काही वाईट वाटत नाही बघा.’’
मंगला काटे म्हणाली, ‘‘ताई, मला पण सगळ्या  मुलीच आहेत.’’ मंगलच्या दोन मुलींनी नर्सिगचं शिक्षण घेतलंय. एक माझ्या कॉलेजात बारावीला आहे. एक शाळेत शिकतेय. सात वर्षांची प्रिया दोन वर्षांपूर्वी ब्लड कॅन्सर होऊन गेली. मंगल दिवस-रात्र मुलीसाठी खपत होती. प्रियाला डी. वाय. पाटीलला मोफत उपचार मिळालेच, पण ती इतकी लाघवी होती की, डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये तिचा वाढदिवस दणक्यात साजरा केला होता. मला हे सारं आठवलं. मंगला म्हणाली, ‘‘ताई मुलीच होताहेत म्हणून नवऱ्यानं व सासूनं खूप त्रास दिला. पण माझी आई म्हणायची, असली चाचणी करायची नाही व मूल पाडायचंही नाही. माझी तिसरी मुलगी वर्षांची असताना नवऱ्यानं तिचं डोकं जमिनीवर इतक्या जोरात आपटलं होतं की, सात टाके पडले होते. पण आज घरात तीच सगळ्यात हुशार आहे व बापाची लाडकीपण आहे.’’ मंगलच्या स्वरात सार्थकता होती.
परभणीची नंदा फार चुणचुणीत आहे. ती व तिची सासू दोघीही गटात आहेत. तिची सासू तिला त्रास देते. बैठकींना येऊ देत नाही, पण यावेळी साासू बाहेर गेली होती. त्यामुळे नंदा हजर होती. ‘‘तुझं काय नंदा?’’ मी विचारलं तर इतरजणीच म्हणाल्या, ‘‘तिला मुलगी झाली असती तर तिच्या सासूनं पोरीसकट तिला उचलून फेकूनच दिलं असतं.’’
‘‘हो ताई, मला दोन मुलगे झाले, पण पहिल्या वेळी सासू रोज धमकी द्यायची. मुलगा झाला नाही तर बघ म्हणायची.’’
मीरानं बचत गटातून कर्ज काढून मुलीचं लग्न केलं होतं. जावई बऱ्यापैकी नोकरीत आहे. मीरा म्हणाली, ‘‘माझा जावई या दिवाळीच्या आधी मुलीला घेऊन मुलगा की मुलगी बघायला (सोनोग्राफी) निघाला होता. मी दोघांनाही सांगितलं, असं काय करणार असाल तर मी तुमच्या दोघांचंही तोंड बघणार नाही. मग लेकीचं बाळंतपण वगैरे लांबच. असं म्हटल्यावर गुपचूप घरी बसला.’’
बराच वेळ चर्चा चालू होती. मुलगा हवाच ही मानसिकता गरीब घरातूनही आढळते, पण लिंगनिदानाचे प्रमाण कमी आहे. मुलगी झाल्यावर काही दिवस राग व्यक्त होतो, पण मग तिचा स्वीकार केल जातो. हेही वास्तव आहे.
आज स्त्रियांच्या चळवळी स्त्री भ्रूणहत्या शब्द वापरू नका, असा आग्रह धरीत आहेत. हत्या हा शब्द स्त्री हक्कासाठी अयोग्य आहे. त्यामुळे ‘स्त्री गर्भाचा गर्भपात’ हा शब्द वापरावा, असं वारंवार सांगूनही स्त्रीभ्रूणहत्या शब्द सहजपणे वापरला जातो. गर्भपाताचा कायदा १९७१ साली अतिशय सहज संमत झाला. सुरुवातीला हा प्रश्न कुटुंबनियोजनाशी संबंधित आहे, असं साऱ्यांनाच वाटलं. सुरक्षित गर्भपात हा अधिकार असून त्यावर बंधन येऊ नये, हा स्त्रीवादी चळवळीचा आग्रहही रास्त आहे. गर्भपात हा प्रजनन व मानवी हक्कांशी जसा निगडित आहे तसा तो नैतिकतेशीही जोडलेला आहे. पण आज हा प्रश्न लिंग निवडीसाठी जोडला जातोय. ही अतिशय गंभीर समस्या आहे. हे सारं किती नकळत होत होत असतं याचं उदाहरण म्हणजे १९७१ साली एका कंपनीनं महिलांसाठी आरोग्यविषयक एक प्रकल्प घेतला. प्रकल्पाचा भाग म्हणून १० हजार महिलांची गर्भजल परीक्षा करण्यात आली. यात महिलांना लिंग निवड कळली आणि अनेक महिलांनी गर्भपात कायद्याचा दुरुपयोग केला. ज्या स्वयंसेवी संस्थेनं हा प्रकल्प घेतला त्यांना हे फार उशिरा लक्षात आले. आज कुटुंब नियोजनामुळे लिंग निवड (मुलगाच हवा) ही
प्रवृत्ती वाढीला लागली आहे. सरकार प्रलोभनं किंवा शिक्षा असा सूर असल्याने पळवाटा काढल्या जात आहेत. तंत्रज्ञानाची होणारी जलद प्रगती आपण थांबवू शकत नाही. वैद्यकीय व्यवसायातलीही घसरलेली नितिमत्ता थांबवण्यासाठी काय करायचे, हाही प्रश्न आहेच.
नुकतीच रुजू झालेली आमची एक कार्यकर्ती सांगत होती की, तिच्या घरात ती चौथी मुलगी होती. ३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ती झाली तेव्हा आजी तिला बघायला दवाखान्यात आली नाही. वडिलांनीही तिला बघायचे नाकारले. आई तिला घरी घेऊन आली. आईनं नोकरी शोधली व दोन महिन्यांच्या तिला घरात टाकून आई नोकरीवर जाऊ लागली. आजीला नाईलाजानं हिच्याकडे बघायला लागायचे. मी नसल्याने तरी सासू मुलीकडे बघेल हा तिचा उद्देश होता. आईने आपला हट्टीपणा सोडला नाही. शेवटी वडील म्हणाले, ‘‘बाई गं, तुझ्या पाया पडतो, पण हे थांबव. तुला व आपल्या मुलीला वाऱ्यावर सोडणार नाही, हे वचन देतो.’’ त्यानंतरच आईनं नोकरी सोडली.
अशा नकुशीच्या किती कहाण्या आजूबाजूला पूर्वी घडत होत्या. आजही घडताहेत. किंबहुना पूर्वीपेक्षा आज या प्रमाणात वाढ होतेय. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून आपण ओळखतो. महाराष्ट्रात प्रथम ‘प्रसवपूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान कायदा’ PCPNDT १९८८ साली झाला. पण आज मुलीच्या घसरत्या प्रमाणात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतोय. पहिला क्रमांक जम्मू व काश्मीरचा आहे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्य़ात सर्वात कमी मुली आहेत. सध्या तिथली संख्या आहे हजाराला ८४८. या जिल्ह्य़ातल्या शिरुर, कासार आणि धारुर या तालुक्यात सर्वात कमी मुली आहेत.
या वर्षीच्या एका दिवाळी अंकात एका डॉक्टरांचं संपादकीय आहे. ज्यात त्यांनी डॉक्टरांची बाजू मांडली आहे. त्यांच्या मते, गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकीच आहे. डॉक्टरांना सतत सुळावरच द्यायचं का? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. हा एक छुपा दहशतवाद असंही ते म्हणतात. त्यापुढे जाऊन गर्भलिंग निदानासाठी पेशंटच आले नाहीत. तर डॉक्टर कोणाची सोनोग्राफी करणार, असं विचारून डॉक्टर किती निरपराध, नीतीमान आहेत, हे सांगितलं आहे. मग त्यांना असं विचारावंसं वाटतं की, या दशकात चार लाख ७० हजार मुली जन्माला येऊ दिल्या नाहीत ते कोणी? कुठे?
सातत्याने घडत असलेल्या या घटना पाहून महिला चळवळींनी जेव्हा सरकारला वेठीला धरले तेव्हा गेल्या चार महिन्यांत स्टेट मेडिकल कॉन्सिलनं महाराष्ट्रातील ८१२५ नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटरवर धडक मोहीम सुरू केली. ३५२ ठिकाणी मशिन्स सील केल्या. आज १६३ केसेस न्यायालयात दाखल केल्या आहेत. पूर्वीच्या १३८ केसेसचा निकाल लागायचा आहे. ३१ डिसें. २०११ च्या आत या साऱ्या केसेस निकालात लावण्याचा आदेश दिला आहे. प्रत्यक्ष कृती होते का कागदी घोडे नाचवले जातील, हे काळच ठरवेल.
पण आजही मुलगा हवा याचं वेड प्रचंड आहे. त्यासाठी भावनेच्या भरात स्त्रिया स्वत:वर कोणतेही उपचार करवून घेतात. कितीही रक्कम खर्च केली जाते. मध्यंतरी एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये ‘मुलगा हवा का?’ अशी जाहिरात होती. मोबाइल नंबर दिला होता. या नंबरवर संपर्क करून ‘डेकॉय’ (रुग्ण असल्याचे भासवून चौकशी करणं) केली असता तेथील डॉक्टरांनी ३०० बायकांना मुलगे दिल्याचे अभिमानाने सांगितले. न्यायलयात हे प्रकरण दाखल झाले आहे. मात्र प्रत्येकवेळी हा डॉक्टर गैरहजर रहातो. आणखी एका प्रकरणात नागपूरहून एक मुलगी नवी मुंबईत आली. दोन सोनोग्राफी सेंटर्समध्ये तिची सोनोग्राफी करून लिंग निवड करण्यात आली. मुलगी आहे म्हणताच तिला कायमचं माहेरी पाठविण्यात आले. दोन्ही सोनोग्राफी सेंटर्सनी कानांवर हात ठेवून आम्ही असं काहीही न केल्याचं छातीठोकपणे सांगितलं. मुलगी साक्षीदार म्हणून यायला घाबरते. एवढंच नव्हे तर एका प्रख्यात मोबाइल कंपनीनं मुलगा व्हावा म्हणून बाईनं काय खावं, हे आपल्या साईटवर चायनीच कॅलेंडर तयार करून दिलं. दिल्लीतील निवृत्त न्यायाधीशांनी हे निदर्शनास आणले असता मोबाइल कंपनीनं साईट डीलीट तर केलीच, पण ही साईट तयार करणाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले, हे कौतुकास्पद आणि अपवादात्मक.
आजूबाजूला दिसणाऱ्या या घटना, माणसांचे अनुभव अस्वस्थ करतात. कायदा सक्षम आहे. तरीही पळवाटा काढल्या जाताहेत. मुलीची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. सरकार, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन रणनीती ठरविण्याची गरज आहे. सुटे सुटे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ‘मुलगा हवा’ या मानसिकतेवर साऱ्यांनीच आत्मपरीक्षण करायला हवं. व्यवस्था ही नेहमीच बळकट व चिवट असते. आपल्याला बदल हवाय. त्यासाठी वेळ पडल्यास धक्कातंत्राचा वापर करून जे कोणी मुलींना जगण्याचा अधिकार नाकारतेय वा नाकारतोय त्यांना वेठीस धरलेच पाहिजे. कोणत्याही मार्गाने अगदी साम-दाम-दंड-भेद वापरून.
(लेखिका स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यां तसेच पीसीपीएनडीटी समितीच्या सल्लागार सदस्य आहेत. )

Sunday, December 11, 2011

मराठी हास्यकट्टा 37

सौ.पवारांचा नवा उखाणा
घोटाळे करून कमावले घबाड,
घोटाळे करून कमावले घबाड,
... ... नवरा माझा लबाड,
शरदरावांचे नाव घेते, हरविंदरने फोडले थोबाड.....
(टीप:- या उखाण्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही.
ज्यांना उखाणा आवडला नाही त्यांनी वाचू नये.)
----------
चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....
एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो....
पिंटू - हेलो.
पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे.
पिंटू - मग?
... ... ... ......मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का?
पिंटू - ठीक आहे घे....
.....आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे....
पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की.
.....जानु, तुम्ही किती चांगले आहात? मीतुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे....
पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल ते घे डार्लिंग.. ..
.....जानु आय लव यू...
पिंटू - सेम टू यू डार्लिंग.. ......
मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुलाकाय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस?
पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे????
-----------
दीपिका जेव्हा युवराज सिंग कडे गेली तेव्हा त्याचा फोर्म गेला आणि
त्याला भारतीय टीम मधून निघावे लागलेले
ती जेव्हा रणबीर कपूर कडे गेली तेव्हा रणबीर कपूर च्या फिल्म्स फ्लोप व्हायला लागल्या
आता ती मल्ल्या कडे आहे तर त्यांची किंगफिशर एयरलायींस कंपनी
एकदम बंद पडायच्या लायकीला आली आहे
माहित नाही ती कॉंग्रेस मध्ये कधी जातेय ?

एक विनोद, निखील वागळे साहेबांनसाठी,

एक विनोद, निखील वागळे साहेबांनसाठी,

एकदा वागळे साहेब आजचा सवाल संपऊन घरी येतात घरातले वातावरण गरम दिसते श्रिमती रागावलेल्या असतात,
श्रिमती : रोज राञी 12 , 1 वाजतात यायला तुम्हाला, आमची तर काही काळजीच नाही बुवा जेव्हा बघाव तेव्हा हातवारे करत बातम्या देता राञी झोपत पण भाई 1 मिनिट थांबा, चांदुलकर पुर्ण करा, अण्णा बोला बोला, मेधा ताई याच ऊत्तर द्या अशी नाव घेता माणसाला झोप म्हणुन येऊ देत नाही

... ... वागळे(हातवारे करत)
काय मागण्या आहेत आपल्या ?
यावर आपणाला शांततेच्या मार्गाने उपाय काढता येणार नाही का ?

श्रिमती
मलाही वाटते तुम्ही कधी तरी प्रेमाचे दोन शब्द बोलावे माझ्याशी, एखादी छानशी चारोळी लिहावी माझ्यासाठी, पण तुमच आपल फक्त आँफिस आणि बातम्या हं हं हअअअअअअ

वागळे
ठिके, अहो तुम्ही रडु नका
यावर उपाय आहे
मला उत्तर देऊ द्या
ब्रेकवर जाण्यापुर्वी माझा प्रश्न पहा
घरातील लोकांना मि वेळ देत नाही हा आरोप योग्य आहे का ?
होय म्हणतात 99 टक्के लोक,
जनता श्रिमतीच्या बाजुने आहे ब्रेकवर जाणापुर्वी माझे ऊत्तर देखील ऐका, श्रिमतीजीँसाठी एक चारोळी,

तेरे प्यार मेँ लिखे मेँने हजारे खत
ते रे
तेरे
तेरे प्यार मेँ लिखे मेँने हजारे खत
.
.
.
.
.
.
.
अचुक बातमी ठाम मत पहा फक्त आयबीयन लोकमत
:-D

Saturday, December 10, 2011

विनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका

प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.

... प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ?

उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.



प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.

प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर – मेव्हणी
प्रश्न – कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर – अमिताभ बच्चन.
प्रश्न – उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर – उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.
प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.
प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.
प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक.
प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर – चार.
तुमच्या आवडीची जाहिरात लिहून दाखवा.
उत्तर -

…….. काय झालं ?

…….. बाळ रडत होतं.

…….. एक कानशिलात दे त्याच्या.

…….. तू लहान असताना मी पण तुला तेच देत होते.

Friday, December 9, 2011

मराठी हास्यकट्टा 36

डॉ. श्रीराम लागू एका उपहारगृहात गेले. तिथे एक तरुण सुंदरी त्यांना म्हणाली, “तुम्हाला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय.”
डॉ. लागू खूष होऊन म्हणाले, “तुम्ही नटसम्राट नाटक पाहिलं आहे का?”
“हो”,
... “मग त्यावेळी तुम्ही मला पाहिलं असणार”, डॉ. लागू हसले.
“असेल बाई” ती म्हणाली, “ते नाटक पहायला तुम्ही कुठं बसला होता?”
डॉ. लागू कोसळले, ते बराच वेळ उठले नाहीत.
-----------

आपणास काय पाहिजे सर?
घरचा नोकर (दारात उभ्या असलेल्या अनोळखी माणसास) :- आपणास काय पाहिजे सर?
माणूस :- मला तुझ्या मालकास भेटायचे आहे.
घरचा नोकर :- काय काम आहे ते मला कळू शकेल?
माणूस:- मी एका पेमेंटच्या संदर्भात इथे आलो आहे...
... घरचा नोकर :- ओ हो ... ते तर काल सकाळीच आपल्या गावी गेले ...
माणूस:- की जे पेमेंट मला आता त्यांना करायचे होते...
नोकर:- आणि ते आज सकाळीच परत आले आहेत... :)

-----------

बाबा (झम्प्याला ) - तुझ्या रिजल्टचे काय झाले..?
झम्प्या (बाबाना) - तो प्रिंसीपल
सरांचा मुलगा फेल झाला..
... ...
बाबा - मी तुझा रिजल्ट विचारतोय..?
झम्प्या – तो खान काकांचा मुलगा पण फेल
झाला..
बाबा- पण मी तुझा रिजल्ट विचारतोय..?
झम्प्या – तो डॉक्टर काकांचा मुलगा पण
फेल झाला..
बाबा (रागात)- अरे येड्या पण
मी तुझा रिजल्ट विचारतोय..?
झम्प्या – अरे मग तुम्ही कुठले प्रधानमंत्री आहात जो तुमचा मुलगा पास
होईल.......

-----------

गंपू: (मुलीकडे बघून) चलते चलते यूँही रुकजाता हूँ मैं... बैठे बैठे यूँही खो जाता हूँ मैं.... क्या यहीं प्यार हैं?......
मुलगी : नाही.. तुला अशक्तपणा आलाय.... ग्लुकोंडी पी....
-----------

प्रियकर आपल्या प्रियासी ला: मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसत, ???
बाजूनी जाणारा एक पुणेकर विचारतो: जरा कर्वे रोड वर ट्राफिक आहे का बघ रे. :

-----------

एका सरकारी कार्यालयात पाटी लिहिलेली असते,
" कृपया शांतता राखा."
एक जण त्याच्या खाली लिहून जातो,..............

" नाहीतर ह्या कुंभकर्णाची झोपमोड होईल...
---------
पप्पूच्या बायकोची मराठी थोडी कच्ची, तिला फुल स्टोप कुठे द्यायचा, तेच काळात नाही. तरी तिने पप्पूला पत्र लिहिले, आणि मग मध्ये मध्ये फुल स्टोप दिले. ते पत्र असे…….. ” प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला.दम्याचा त्रास होतोय कुत्रीला. आज चार पिल्ले झाली मामाला. दाढी करताना ब्लेड लागले वहिनीला .दवाखान्यात admit केले बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला. नमस्कार
--------
शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास
ठेवला, पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?
चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो. :)
--------------------------
सकाळ सकाळ जोशी काका पेपर वाचत बसलेले असतात
तेवढ्यात जोशी काकू येऊन लाडाने म्हणतात.....
"अहो काल आपले डॉक्टर सांगत होते...माझा B .P . वाढला आहे म्हणून...
तर B .P . म्हणजे नक्की काय हो ?"
...जोशी काका ताडकन उत्तर देतात .." बावळट पणा !!! "



Thursday, December 8, 2011

कॉलेज मधला ’ गारवा ‘

कॉलेज मधला ’ गारवा ‘
सिल्याबस जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो ……..
chapters पाहून passing चा
प्रोब्लेम मनात दाटतो ……….. तरी लेक्चर्स चालूच राहतात
... डोक्यात काही घुसत नाही …………
चित्र विचित्र figures शिवाय
बोर्ड वर काहीच दिसत नाही ……….. तितक्यात कुठून तरी function ची
date जवळ येते ……
सेम मधले काही दिवस …….
न कळत चोरून नेते ………….. नंतर lectures extra घेऊन
भरा भरा शिकवत राहतात …….
problems example theory सांगून
सिल्याबस लवकर संपवू पाहतात ………..
पुन्हा हात चालू लागतात ………….
मन चालत नाही ………..
सरां शिवाय वर्गामध्ये ……………
कुणीच बोलत नाही ………..
lectures संपून submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ
journal complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ ……
चक्क डोळ्या समोर syllabus ……….
चुटकी सरशी संपून जातो
PL ‘s मध्ये वाचून सुद्धा
पेपर का बरं सो… सो…. च जातो ?????

Sunday, November 27, 2011

मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?


एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?

तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची

तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?

आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे

नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून,
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून.

तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ,
ती त्याचीच बनुन जाते.

एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते.

पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं ,

पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं…………
-अनामिक 

Wednesday, November 23, 2011

आयुष्य जास्त सुंदर वाटत



आयुष्य जास्त सुंदर वाटत......
गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…….

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत……….

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव
भूतकालातल रंगवून पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत………

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत……

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत………..

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत……..

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत……

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…..
-अनामिक

Saturday, November 19, 2011

मराठी मुलाचे मुलीला प्रपोज ..

मुलगा : शब्द तुझे, गीत माझे....
जीवन गाणे गाऊ का ?

मुलगी : गाल तुझे, हात माझे....
कानाखाली लाऊ का ?
****************

OTHER LANGUAGE JOKES !!

OTHER LANGUAGE JOKES !!

एकदा मुन्नाभाई आणि सर्किट अमेरीकेला जात असतात.
तेव्हा ते इंग्लिश ची प्रॅक्टीस कशी करतात ते पहा...

... सर्किट :-भाई!अमेरिका मे पता पुछनेका तो क्या बोलनेका?
मुन्ना :-धोबी घाट.
सर्किट :-भाय!इंग्लिश मे बोलनेका तो ?
मुन्ना :-अरे क्या तु तेरेको इतना नही आता.
सर्किट :-बोलो ना भाय.
मुन्ना :-Washington.....


सर्किट :-भाय! इधर आ कैसा बोलने का ?
मुन्ना :-Come here.
सर्किट :-फ़िर उधर जा कै्सा बोलने का?
मुन्ना :-पहले उधर जाने का और बोलनेका Come here.


सर्किट :-भाय! ये कैसे बोलने का,
"चल ए हवा आने दे "
मुन्ना :-simple hai,"Hey you move sideways,
late the Airforce come in.."


मुन्ना :-अभी मै पुछता हू तु बोल .
"ए मामू भेजा मत फ़िरा."
सर्किट :-"Mother's brother dont rotate my brain."


मुन्ना:-ये बोल,"इधर आ खजूर देता हू खर्चापानी"
सर्किट :-"खजूर याने date,"
"Come with me for a date i will pay u."

मुन्ना:-"अब ये बोल,अपून को बहोत सर्दि हो गएली है."
सर्किट :-"I got big winter in small nose..."

प्रोफ़ेसर:-"अकल बडी के भैस बडी?"
मुन्नाभाई:-"बोले तो पहले'DATE OF BIRTH'तो बता मामू...


मुन्नाभाई:-सर्किट, बोले तो ये’FORD'क्या है?
सर्किट:- क्या भाई!’FORD' गाडी है.
मुन्नाभाई:-तो फ़ीर ये 'OXFORD'क्या है?
सर्किट:-बोले तो सिंपल है भाई.
’OX’बोले तो बैल,’FORD'बोले तो गाडी.
"बैलगाडी"...........


मुन्नाभाई:-ए मामू! तु कितना पढा है ?
मामू :- B.A.
मुन्नाभाई:- साला दो अक्षर पढा है और वो भी उलटा.......

Tuesday, November 8, 2011

मराठी हास्यकट्टा 1

राजू : आई गं, आमचे गुरुजी ज्ञानेश्ववर आहेत.
आई : असे का म्हणतोस राजु?
राजू : आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडुन कविता पाठ करुन घेतली.

***********************
डॉ. श्रीराम लागू एका उपहारगृहात गेले. तिथे एक तरुण सुंदरी त्यांना म्हणाली, “तुम्हाला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय.”
डॉ. लागू खूष होऊन म्हणाले, “तुम्ही नटसम्राट नाटक पाहिलं आहे का?”
“हो”,
... “मग त्यावेळी तुम्ही मला पाहिलं असणार”, डॉ. लागू हसले.
“असेल बाई” ती म्हणाली, “ते नाटक पहायला तुम्ही कुठं बसला होता?”
डॉ. लागू कोसळले, ते बराच वेळ उठले नाहीत.

***********************
पुणेरी झणझणीत झटका……

पुण्यात एका हॉटेलमध्ये दोन उतारू उतरले.

हॉटेलची व्यवस्था पाहून पुणेरी खवचटपणा करण्याची त्यांना लहर आली.
... …
त्यांनी मॅनेजरला विचारले, ‘‘तुमच्या गोठ्याचे भाडे किती ?’’

‘‘एका बैलाला तीनशे रुपये, दोन बैलांचे पाचशे फक्त’’ मॅनेजर म्हणाला !

***********************
शिक्षक मुलांना जीवनातील उच्च मुल्ये काय ती समजावून सांगत होते.

शेवटी त्यांनी मुलांना प्रश्न केला, "समजा, रस्त्यात गाढवाला काही लोक विनाकारण मारीत आहेत आणि मी त्यांच्यापासून गाढवाला वाचवल. तर या कृत्याला तुम्ही काय म्हणाल ?"

त्यावर बंडू तात्काळ म्हणाला, "बंधुप्रेम !"

***********************
शिक्षक – भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?
बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,
.
.

.
“जमिनीवर!!”

***********************

पक्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?

मंग्या : अरे बहिणीशी रे …

पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?
मंग्या : बहिण तुझी आहे….

**************

इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट
हिंदी मा म्हणते शुभ रात्री
मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता..
*****************
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला."सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!"
*****************
नवरा- जर मला लॉटरी लागली तर काय करशिल?
बायको- अर्धे पैसे घेइन अन या नरकातुन निघुन जाईल.
.
.
.
.
.

नवरा- मला दहा रूपयाचं बक्षिस लागलय, हे पाच रूपये घे अन निघ .

*****************
एक डॉक्टर एका लहान मुलाच्या घरी जातात.
त्यांना त्या मुलाच्या पायाचे टाके काढायचे असतात.
त्यावेळी त्याचं लक्ष दुसरीकडे राहावं म्हणून झाडाकडे बोट दाखवून त्याला म्हणतात, “ती बघ तिकडे चिमणी.”
लहान मुलगा : ओ चिमणीचे मामा, खाली नीट बघा नाहीतर पाय कापाल माझा.

*****************

अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता, हे समजल्यावर त्याची आई संतापलीच.
त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, ”तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?”
त्यानं उत्तर दिलं, ”पाहिलं.”
...
कानावर हात ठेवून तिनं विचारलं, ”काय पाहिलंस?”
” आपले बाबा!!!!”
*************
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास
होतात..
पहिला: जाऊ दे यार चल आत्महत्या करू..
.
.
... ... ... .
दुसरा: येडा झाला का भावड्या तू..?
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट
करावं लागंल.

Monday, November 7, 2011

आचार्य अत्रे

आचार्य अत्रे.. विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व

'' एकटा पुरतो ना ?''


... आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.

मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.

अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.

अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले ,

' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता

पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ? ''

बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले ,

'' बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ? ''

'' तर . चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की ! ''

'' आणि कोंबडे किती ?''

'' फक्त एक हाये ''

'' एकटा पुरतो ना ?''

उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला

पत्रकारही त्या हंशात सामील झाले.

मराठी माणसाने व्यवसाय की नोकरी करावी ??

मराठी माणसाने व्यवसाय की नोकरी करावी ?


कॅश ( Cash ) म्हणजे ' धन ' कमविण्याचा कॅश ( KASH ) मंत्र :
बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रॉप आऊट. Microsoft ची स्थापना.

लेरी अलीसन ( Larry Elloson ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago ) मधून ड्रॉप आऊट. Oracle ची स्थापना.

स्टीव जॉब्स ( Steve Jobs ) :- रीड कॉलेज ( Reed College Portlad ) मधून ड्रॉप आऊट. Apple ची स्थापना.

मार्क झुकेरबर्ग( Mark Zuckerberg ) :- हार्वर्ड मधून ड्रॉप आऊट. Facebook ची स्थापना.

जेरी यांग ( Jerry Yang ) आणि डेव्हिड फिलो ( David Filo ):- दोघेही Stanford युनिवर्सिटी मध्ये पी. एच डी. करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Yahoo ची स्थापना.

सर्जी ब्रिन ( Sergey Brin ) आणि ल्यारी पेग ( Larry Page ) :- दोघेही Stanford मध्ये पी. एच डी करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Google ची स्थापना

वरील लोकांमधे एक गोष्ट कॉमन आहे . ती म्हणजे ही सर्व मंडळी शिक्षण अर्धवट सोडलेली आहेत . त्यातील कांही जणांकडे डिग्र्या आहेत. पण अंतिम शिक्षण पूर्ण केलेले नाही. पण आज ही सर्व मंडळी प्रसिध्दी झोतात आहेत, ती त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमुळे !

आज जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते आहे . हे कसे शक्य झाले ? शिक्षण पूर्ण न करता सुध्दा त्यांना हे कसे जमले ?

मराठी समाजात पहिल्या पासूनच शिक्षणाला महत्व आहे . शिक्षण क्षेत्रांत मराठी माणूस, विशेषतः मराठी स्त्रिया नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. ही खरे तर एक चांगली आणि अभिमानाची बाब आहे. शिक्षणाने माणूस नुसता सुशिक्षितच बनत नाही तर हुशार, ज्ञानी, व्यवहारी बनतो. त्याला इतर अनेक कौशल्ये प्राप्त होतात असे समजले जाते. पण हल्लीचे शिक्षण हे फक्त डिग्र्या मिळविणे आणि डिग्र्यांची सर्टीफिकीटे ( Certificates) गोळा करणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले असावे असे वाटू लागले आहे. कारण हल्ली शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा मिळणाऱ्या डिग्र्यांना नको एवढे महत्व प्राप्त झाले आहे. ज्याच्याकडे जास्त डिग्र्या तो जास्त हुशार आणि ज्याच्याकडे कमी डिग्र्या तो कमी हुशार असे समीकरण बनले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मराठी समाज अजूनही नोकरीच्या मानसिकतेमध्येच अडकलेला आहे. चांगल्या नोकऱ्या मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी आणि नोकरीतील प्रगतीसाठी डिग्र्यांची आवश्यकता ही असतेच असा समज आहे.

एखादा मनुष्य जर खरोखरच हुशार असेल पण त्याच्याकडे साधे १० वी किंवा १२ वी चे Certificate नसेल तर तो अशिक्षित आणि निर्बुध्द समजला जातो. या हिशोबाने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,समर्थ रामदास ही मंडळी तर अशिक्षितच समजायला हवीत. कारण ते कोणत्या शाळेत गेल्याचे किंवा त्यांच्याकडे कोठली Certificates असल्याचे अजूनपर्यंत तरी आढळून आलेले नाही . पण संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, रामदास स्वामींचा दासबोध व मनाचे श्लोक हे ग्रंथ गेली शेकडो वर्षे, पिढ्यान पिढ्या अगदी आवडीने आणि भक्ती भावाने वाचले जात आहेत. त्यांची पारायणे होत आहेत . अजूनही हे ग्रंथ मराठीतील ' बेस्ट सेलर ' या कॅटेगिरीत ( Category ) मोडतात. हे कशाचे प्रतिक आहे ?

फक्त इयत्ता ४ थी पर्यंत शिकलेला आणि रेल्वेच्या डब्यात वर्तमान पत्रे टाकणारा थॉमस अल्वा एडिसन ( Thomas Alva Edison ) जगातला मोठा, नावाजलेला शास्त्रज्ञ बनला. शेतकरी कुटुंबात जन्मलेला हेन्री फोर्ड (Henry Ford ) नावाचा फिटर जगातील मोठा मोटारींचा कारखानदार बनु शकला. त्याने स्थापन केलेली फोर्ड मोटर कंपनी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल ( Automobile) कंपनी आहे. साईचीरो होंडा (Soichiro Honda) हा जपानमधील एका गॅरेज मधे काम करणारा एक साधा मोटार मेकॅनिक पण मोटारींचा कारखानदार होऊ शकला .

त्याने स्थापन केलेली होंडा मोटर कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे . इंजिनिअरिंगच्या क्षेत्रांत या तिघांचे योगदान महत्वाचे आहे. पण या तिघांकडे इंजिनियरिंग ची कोठली डिग्री ,डिप्लोमा किंवा कोणतेही Certificate नव्हते. या सगळ्यांचा चुकून मराठी समाजात जन्म झाला असता, तर डिग्रीचे सर्टीफिकेट नाही म्हणून एडिसन शेवट पर्यंत वृत्तपत्र विक्रेता राहिला असता. तर हेनरी फोर्ड आणि होंडा हे अनुक्रमे फिटर व मेकॅनिक म्हणून राहिले असते आणि नोकरी करून निवृत्त झाले असते.

भारतातही अशी उदाहरणे आहेत. मुळात चित्रकलेचे शिक्षक असलेले बेळगावचे सायकल दुकानदार लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाचा पाया घातला. तर गुजरातमधील ग्रामीण भागातील एका प्राथमिक शिक्षकाच्या फक्त मॅट्रिक पर्यंत शिकलेल्या धीरूभाई अंबानी या मुलाने रिलायन्स उद्योग समूहाचा पाया घातला. तो सुध्दा कोणत्याही डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट शिवाय.

चंद्रकांत किर्लोस्कर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की डिग्री मिळाली म्हणजे सर्व ज्ञान मिळाले असे नव्हे. डिग्रीचा अर्थ तुम्ही कांही पुस्तकांचा अभ्यास केला आहे आणि काही परीक्षा उत्तीर्ण झाला आहात एवढ्यापुरताच मर्यादित आहे. खऱ्या शिक्षणाची सुरवात शाळा, कॉलेजमधून बाहेर पडल्यावरच होते.

शिक्षणाच्या क्षेत्रांत मागे पडलेल्या वरील लोकांनी अपरंपार धन संपदा कमावली. आयुष्यात तुफान प्रगती केली . त्यातील कित्येक जण तर गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले. त्यांना उद्योग व्यवसायाची कोठल्याही तऱ्हेची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. आर्थिक परिस्थिती पण कधीच धडधाकट नव्हती. मग त्यांना एवढी प्रगती करणे कसे जमले ? त्यांना नशीबाची साथ मिळाली म्हणून?त्यांच्या पत्रिकेतील ग्रह उच्चीचे होते म्हणून? का दैवाची त्यांच्यावर विशेष कृपा होती म्हणून? याचे कारण म्हणजे या सर्वांनी 'कॅश '( Cash ) म्हणजे धन कमविण्यासाठी ' कॅश ' ( KASH ) या मंत्राचा पुरेपूर उपयोग करून घेतला .

या ठिकाणी ' धन ' म्हणजे फक्त पैसा अडका समजू नये. धनामध्ये पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, गौरव, मान सम्मान , समाजात आदरणीय स्थान, चांगले मित्र - सहकारी - शिक्षक - विद्यार्थी या सगळ्यांचा समावेश होतो. धनाची किंमत फक्त पैशाने होत नसते.

तर हा ' कॅश ' ( KASH ) मंत्र काय आहे ते आता बघुया .

K - Knowledge - ज्ञान

A - Ability - क्षमता

S - Skill - कौशल्य

H - Habits - सवयी

K - Knowledge - ज्ञान :-

वरील सर्व जण, ज्या क्षेत्रात आपण काम करतो आहोत त्या क्षेत्राविषयी जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले. ज्ञान अनेक मार्गांनी मिळविता येते. शाळा कॉलेजमधील शिक्षण हा ज्ञान मिळविण्याचा एक मार्ग झाला . त्याशिवाय प्रशिक्षण ( Training ), वाचन, संशोधन, प्रयोग, तज्ञांचे मार्गदर्शन, गाठी - भेटी, चर्चा , विचार -विनिमय , विचारांची देवाण घेवाण, प्रवास,प्रदर्शने, सेमिनार्स, कॉन्फरन्स या मार्गांनी पण ज्ञान मिळविता येते. आपले ज्ञान अत्याधुनिक

( Most Modern) आणि अद्ययावत ( Up to date ) असावे याची ते सतत काळजी घेत गेले. आपल्या क्षेत्रांत काय घडामोडी चालू आहेत, कोणते नवीन संशोधन होत आहे, कोणते नवीन ट्रेंड्स निर्माण होत आहेत यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवले. कारण शेवटी ज्ञान हेच खरे भांडवल आहे हे त्यांनी अचूक ओळखले होते .

A - Ability - क्षमता:-

आपल्या क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आपल्या क्षमतेबद्दल त्यांनी त्यांच्या मनात अविश्वासाची भावना कधीच येवू दिली नाही. ज्या क्षेत्रांत आपण कमी पडत आहोत त्या क्षेत्रांत इतरांची मदत घेण्यामध्ये त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. आपली क्षमता सतत कशी वाढत राहील या कडे त्यांनी लक्ष दिले. आपल्या कल्पना इतरांपेक्षा जास्त चांगल्या आहेत. आपली उत्पादने इतरांपेक्षा जास्त चांगली आहेत. आपल्या आयडियाज इंतारांपेक्षा जास्त फायदेशीर आहेत याबद्दल त्यांना पूर्ण आत्मविश्वास होता. आपल्या बरोबर आपले सहकारी, संगठना, कंपन्या, कर्मचारी यांची क्षमता कशी वाढविता येईल या विषयी ते सतत प्रयत्नशील राहिले

S - Skill - कौशल्य :-

आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्याची जी प्रक्रिया असते त्याला कौशल्य म्हणतात. आपल्याकडे जर ज्ञान असेल पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग करता येत नसेल तर त्या ज्ञानाला फारसे महत्व उरत नाही. आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे त्याचा व्यवहारामध्ये जास्तीत जास्त उपयोग व्हावा या साठी ते सतत प्रयत्नशील राहिले. यासाठी त्यांनी अनेक निरनिराळे प्रयोग केले. अनेक नवीन मार्ग शोधून काढले. अनेक नवीन कौशल्ये प्राप्त केली आणि विकसित केली. कोठलेही नवीन कौशल्य आत्मसात करायचे म्हणजे त्यासाठी भरपूर कष्ट लागतात, मेहेनत लागते. या ठिकाणी आपण कमी पडणार नाही याची ते काळजी घेत गेले. 'Practice makes the man perfect' या म्हणीप्रमाणे ते सतत आपल्या कौशल्याचा उपयोग करीत गेले. आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांच्या कौशल्यात सतत वाढ कशी होत राहील याची काळजी ते घेत गेले.

H - Habits - सवयी:-

आपल्या व्यवसायासाठी आवश्यक त्या सवयी त्यांनी स्वीकारल्या. तसेच आवश्यकतेनुसार या सवयींमध्ये बदल करण्याची लवचिकता त्यांनी दाखवली. या मधे त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता. कित्येक वेळा त्यांना सर्वसाधारण कुटुंबाला मिळणाऱ्या साध्या-साध्या सुखांचा त्याग करावा लागला. पण या बद्दल त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधी तक्रार केली नाही.

शिक्षणाला किती महत्व द्यायचे. त्यातून मिळणाऱ्या डिग्रीला किती महत्व द्यायचे हे प्रत्येकावर अवलंबून आहे. याचा अर्थ शिक्षणाची कास सोडावी असा होत नाही. कारण शिक्षण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, त्याला काही ना काहीतरी महत्व हे असतेच. तसेच प्रत्येक डिग्री, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट ला महत्व हे असतेच. पण जर शिक्षण माणसाला फक्त पुस्तकी ज्ञान देऊन केवळ 'पुस्तक पंडित ' बनवत असेल. फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून 'परीक्षार्थी' होण्याची प्रेरणा देत असेल. ज्याचा व्यवहारात फारसा उपयोग करता येत नसेल. जे माणसाचे 'व्यवहारज्ञान' न वाढविता माणसाला जास्त 'अव्यवहारी' बनवत असेल. केवळ नोकरीचे माफक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याची प्रेरणा देणारे असेल. आणि ज्यामुळे प्रतिष्ठेचा खोटा तोरा निर्माण होत असेल. तर अशा शिक्षणासाठी आयुष्याची किती वर्षे आणि पैसा खर्च करायचा याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा. एखादी डिग्री मिळाली म्हणजे सर्व कांही मिळाले असे समजू नये. तसेच डिग्री मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे पण समजू नये. कारण शिक्षणाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते .तसेच शिक्षण नाही किंवा पूर्ण झाले नाही म्हणून मागे पडू ही भावना पण मनातून काढून टाकायला हवी.

हल्लीचे मराठी तरुण / तरुणी पुष्कळ Talented आहेत . अनेकांनी शिक्षण क्षेत्रांत उत्तम यश मिळवले आहे. पण अजूनही बरेच जण नोकरीच्या मानसिकते मधेच अडकले आहेत. मायक्रोसोफ्ट च्या बिल गेट्स सारखे न होता बिल गेट्स च्या मायक्रोसोफ्ट मधे नोकरी करण्याची स्वप्ने बघत आहेत किंवा धन्यता मानत आहेत. आणि त्यांचे पालक पण याचा अभिमान बाळगत आहेत. आज भारताची वेगाने जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने प्रगती चालू आहे. याचा अर्थ जागतिक स्तरावर उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी भारतीय तरुणांपुढे चालून आली आहे. मराठी तरुण/ तरुणींनी या संधीचा फायदा करून घेतला नाही तर त्यांच्या सारखे कर्म दरिद्री तेच ठरतील. आपल्या शिक्षणाला 'कॅश' ( KASH ) मंत्राची जोड देऊन मराठी तरुण /तरुणींनी बिल गेट्स किंवा मार्क झुकेरबर्ग सारखे व्हायचा प्रयत्न का करू नये ?
-अनामिक

Wednesday, November 2, 2011

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज


दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा !!
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
असो आमुचा मुजरा माझा श्रीशिवरायाला!!
जय भवानी जय शिवाजी..

Tuesday, November 1, 2011

बहीण

बहीण

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण. 

असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली
     कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं..
    मी असंख्य उदाहरणे पाहिलीत व ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ पाहून थक्क झालोय. पोटची पोरगी असली की आईला मुलाची काळजी नसते. तिच्या पदरात मुलाला टाकून ती निर्धास्त होते. बहीण स्वत:ची व आईची अशा दोन्ही भूमिका निभावत असते. वडील असू देत, भाऊ असू देत, काका-मामा असू देत, मावश्या-आत्या असू देत; पण बहीण ती बहीण. हे सगळे मिळून एका रक्ताच्या बहिणीची जागा घेऊ शकत नाहीत.
    भावाची काळजी करणे, त्याच्यासाठी नवस व उपासतापास करणे, त्याच्या यशाने हरखून जाणे हे सगळे ती कोणी सांगायची वाट न पाहता स्वप्रेरणेने, मनापासून करीत असते.निसर्गाचा नियम आहे, सारी दुनिया एक तरफ और जोरू का भाई एक तरफ!
       भाऊबीज हा तिच्या लेखी वर्षातला सगळ्यात मोठा सण असतो. भाऊ जेवायला येणार म्हणजे काय लहानसहान गोष्ट आहे? ती आदल्या दिवशीपासून खपून त्याच्या आवडीचा मेनू करणार. अगदी आई करायची व तो तुटून पडायचा तसा. नवर्‍याने व मुलांनी त्या दिवशी मध्ये लुडबुडायचं नाही. एक दिवस एकट्या भावाचा. तो रक्षाबंधनाला येऊ शकला नाही तर त्याच्या बचावार्थ झाशीच्या राणीच्या आवेशात हीच पुढे सरसावणार.
मला या सगळ्या कोमल, हळव्या भावना कळतात. फक्त मला बहीणच नाही.

-शिरीष  कणेकर

Monday, October 31, 2011

कलाविष्कार ई दिवाळी अंक ऑक्टोबर २०११

Kalaavishkaar_ E-Diwali Magazine_ October - 2011




कलाविष्कार - ई दिवाळी अंक 
--------------- 
प्रथमश सुरेश शिरसाट 
संपादक आणि प्रकाशक 
Fb page @ https://www.facebook.com/kalavishkaar.ediwaliank
Fb Profile @ http://www.facebook.com/prathmesh.shirsat21071988

Sunday, October 30, 2011

मराठी हास्यकट्टा 3

मुला कडचे : आम्हाला स्थळ पसंद आहे . मुली कडचे : पण , अजून आमची मुलगी शिकत आहे . मुला कडचे : मग आमचा मुलगा काय लहान आहे , पुस्तक फाडायला .... :)

******************

प्रवाहा बरोबर तर सगळेच जातात.
प्रवाहाविरुद्ध जो जातो तोच जिवनात यशस्वी होतो…
हे मी ट्राफीक पोलिसला सांगितल,
तरी त्याने पावती फाडलिच. :)

******************

मास्तर:- बोल बंड्या बिरबल कोण होता माहित आहे का?
बंड्या:- नाही माहित सर ?
मास्तर:- गधड्या अभ्यास केला असता तर माहित पडल असत. …….
बंड्या:- सर तुम्हाला माहित आहे का? सचिन,रोहित आणि प्रथमेश कोण आहेत ते?
मास्तर:- मला नाही माहित ?
… … …
बंड्या:- कस माहित पडणार? स्वताच्या पोरीवर लक्ष्य ठेवला असत तर माहित पडल असत

******************

नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून ..
... ...
बायको :-विचार करा ..
द्रौपदीला ५ नवरे होते..
नवरा :- माफ कर ...
गम्मत केली ग :)

*************

दिग्विजय सिंग एकदा नेट सर्फ़िंग करत होते.
अचानक त्यांनी घाबरुन आपले ब्राऊझर बंद केले.
.
..
.
कारण जवळपास प्रत्येक वेबपेजवर RSS FEED असा option येत होता !!!!!

******************

मुलगा - आपली कालच मैत्री झाली आहे. आता तू माझ्याकडे 'त्या' नजरेने बघायला सुरुवात कर.
मुलगी - 'त्या' म्हणजे कोणत्या रे?.......
मुलगा - ते तुलाच माहित आहे. कारण काही काळानंतर मी जेंव्हा तुला प्रपोज करेन
तेंव्हा "आपण तर चांगले मित्र आहोत. मी तुझ्याकडे 'त्या' नजरेने कधी
बघितलेच नव्हते." असे उत्तर मला नकोय. BCOZ
˙٠•●♥♥" FRIENDSHIP IZ THE 1ST STEP OF LOVE "♥♥●•٠˙
मुलगी - पण मी तर तुला कालपासूनच त्या नजरेने पहातीये...♥

Saturday, October 29, 2011

तुमचं मन ही तुमची मौलिक संपत्ती आहे

तुमचं मन ही तुमची मौलिक संपत्ती आहे 
-डॉ. जोसेफ मर्फी
(मानसोपचार तज्ज्ञ) 


अंतर्मन कधीच झोपत नाही, ते विश्रांतीही घेत नाही. झोपण्यापूवीर् त्यास एखादी जबाबदारी सोपवली तर, तुम्ही उठण्यापूर्वी त्यानं ती पार पाडलेली असते. ते तुमच्या समस्यांवर उत्तर शोधून ठेवतं. याच अंतर्मनात आजारातून बरं करण्याचीही अपार शक्ती असते. झोपण्यापूवीर् केलेल्या प्रार्थनेचा चांगला परिणाम होऊन अनेक आजार पूर्ण बरे होऊ शकतात...


तुमचं मन ही तुमची मौलिक संपत्ती आहे. ते नेहमीच तुमच्या सोबत असतं. मनं दोन असतात. एक बाह्यमन, दुसरं अंतर्मन. एक समंजसपणा दाखवितं, दुसरं असंमजसपणा. तुम्ही नेहमी बाह्यमनानं विचार करता. सातत्यानं केलेले विचार अंतर्मनात जाऊन खोलवर रूजतात. मग त्याप्रमाणं तुमच्या प्रवृत्तीत बदल होत जातो. तुमचं अंतर्मन, तुमच्या भावनांवर नियंत्रण करीत जातं. हे अंतर्मन सृजनशील असतं. तुम्ही चांगला विचार केला तर चांगले परिणाम तुम्हाला दिसू लागतात. वाईट विचार केल्यावर वाईटच सर्वत्र भासू लागते.

महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अंतर्मन जी एखादी कल्पना स्वीकारते, तीच अमलात आणते. अंतर्मनाचा हा नियम आहे. त्यास चांगलं आणि वाईट सर्वच सारखं असतं. त्यामुळे या नियमाचा नकारात्मक वापर केला तर तुमचं जीवन अपयश, नैराश्य, दु:ख यानंच भरून जाईल. तुम्हास चांगला, विधायक विचार करण्याची सवय असेल तर तुमचं आरोग्य चांगल राहील, यश हाती येईल, भरभराट होईल.

मात्र, प्रत्यक्षात बाह्यमन व अंतर्मन अशी दोन मन नाहीत. केवळ एकाच मनाची ती दोन रूपं आहेत. तुमचं बाह्यमन हे केवळ कारण जाणतं. प्रत्येक गोष्टीचा विचार करून तिचा स्वीकार करते. तुम्ही पुस्तकाची निवड करता. घर पसंत करता, जीवन साथीदाराची निवड करता, हे सर्व कार्य बाह्यमनाच्या साह्यानं आपण करतो. सर्व निर्णय आपण बाह्यमनाच्या मदतीनं घेत असतो.

परंतु, हृदयाची धडधड, श्वासोच्छवास, अन्नपचन, रक्ताभिसरण अशी शरीरातील अनेक महत्त्वाची कायेर् तुमच्या मजीर्वर अवलंबून नसतात. त्यासाठी तुमच्या मनानं निर्णय घ्यायची गरज नसते. ही सर्व कायेर् अंतर्मनाने होतात. तुमच्या अंतर्मनावर जे बिंबवलं जातं, किंवा तुमचं बाह्यमन ज्याच्यावर विश्वास ठेवतंं, त्या सर्वांचा स्वीकार अंतर्मन करतं. ते कसलंही वाद घालत नाही.

तुमचं अंतर्मन हे जमिनीचे मशागत केलेल्या वाफ्यासारखं असतं. त्याच्यात जे बियाणं पेरलं जातं, मग ते चांगलं असो की वाईट, त्याचा स्वीकार करतं. तुमचे विचार बियाणासारखेच असतात. नकारात्मक, विध्वंसक विचार तुमच्या अंतर्मनात नकारात्मक कार्य करीत असतात. ते बाह्यअनुभवांच्या जोडीनं लगेच किंवा योग्य वेळी प्रतिक्रियांच्या रूपानं बाहेर पडत असतात. उदाहरणार्थ तुमच्या बाह्यमनानं, ठरवलं की, एखादी गोष्ट खरी आहे, प्रत्यक्षात ती खोटी असेल, तरीही तुमचं अंतर्मन ती गोष्ट खरीच असल्याचं समजेल आणि त्या दृष्टीनं कार्य करीत राहील.

मानसोपचारतज्ज्ञ आणि इतर अनेकांनी यासंबंधी प्रयोग केले आहेत. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांतून हीच एक बाब स्पष्ट झाली आहे. अंतर्मन कधीही निवड करण्याच्या किंवा तुलना करण्याच्या फंदात पडत नाही. बाह्यमनानं केलेली सूचना, मग ती खोटी असली तरी, अंतर्मन त्याचा स्वीकार करतं.

संमोहन विद्येद्वारेही हे प्रयोग करण्यात आले आहेत. एखाद्यास संमोहित करून त्यास सांगण्यात आलं की, तू नेपोलियन बोनापार्ट आहे, किंवा मांजर आहे, किंवा कुत्रा आहे. तर संमोहित व्यक्तीच्या अंतर्मनावर ते लगेच बिंबतं, ही व्यक्ती मग ती सांगितल्याप्रमाणं वागायला लागते. अशा व्यक्तीचं संमोहित झालेलं बाह्यमन, त्यास मिळणारे आदेश अंतर्मनाकडे पाठविते आणि अंतर्मन कसलाही विचार न करता, त्या सूचना, आदेश खरे मानून तशी कृती करायला लागतं.

बाह्यमनास वस्तुनिष्ठ मन, असंही म्हटलं जातं. कारण ते वास्तवाचं भान राखून, निर्णय घेतं. त्यासाठी शरीरातील पाच ज्ञानेदियांचं साह्य घेण्यात येतं. त्यांच्या साह्यानं बाह्यमन भोवतालच्या परिस्थितीचं निरीक्षण करतं व नंतर निर्णय घेतं. परंतु, जेव्हा बाह्यमन काही कारणास्तव निर्णय घेण्याचं थांबवतं, त्यावेळी अंतर्मन सक्रिय होतं व स्वत: निर्णय घेऊ लागतं. झोपताना किंवा ग्लानी आली असेल, अशावेळी अंतर्मन काम करू लागतं. त्यासाठी त्याला ज्ञानेदियांची गरज भासत नाही. इतरत्र घडणारी घटनाही ते बघू शकतं किंवा ऐकू शकतं. ते तुमच्या शरीरातून बाहेर पडून, दूरवर जाऊन माहितीही गोळा करून आणतं.

अंतर्मन झोपत नाही किंवा विश्रांतीही घेत नाही. त्यामुळे तुम्ही झोपण्यापूवीर् त्यास एखादी जबाबदारी सोपवली तर, तुम्ही उठण्यापूवीर् त्यानं ती पार पाडलेली असते. ते तुमच्या समस्यांवर उत्तर शोधून ठेवतं. याच अंतर्मनात आजारातून बरं करण्याचीही अद्भुत आणि अपार शक्ती असते. झोपण्यापूवीर् केलेल्या प्रार्थनेचा चांगला परिणाम होऊन अनेक आजार बरे होऊ शकतात, असं सिद्ध झालं आहे. प्राचीन काळी मंदिरातील अनेक धर्मगुरू आजारी माणसाला औषध देऊन त्यास लगेच झोपायला सांगत. झोपेत देव येऊन तुम्हास बरं करील, असं ते त्याला सांगत. तसं सांगण्यामागचं खरं कारण अंतर्मनाची अपार ताकद हेच होतं!

अनुवाद : जॉन कोलासो


मजेदार पुणेरी मराठी

मजेदार पुणेरी मराठी

पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते. म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human

Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती

आहे.काही उदाहरणे देत आहोत ..

पुणेकराकडून पुणेकरांसाठी

1. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .
2. ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी
3. नाही
4. ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल ..
5. ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही.
6. गावच्या गप्पा घरी !
7. ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य
8. काडी चावापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स
9. शोभेचे नाहीत .गुमान बूड त्याच्यातच विझवा. .
10. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.
11. संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसंआहोत.

Friday, October 28, 2011

दिवाळी SMS


दिवाळी SMS
 ****************************

********************
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी
उजळेल आयुष्याची वहिवाट !!
 शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !

********************
 दिपावलीच्या शुभ क्षणांनी ,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!!

********************
फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत,
फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

********************
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

********************
तेजोमय दीप तेवावा
आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा
सदैव तुमच्या जीवनी !
॥ शुभ दीपावली ॥

********************
यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग,
सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ,
प्रेमाची भाऊबीज
अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

********************
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

********************
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

********************
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

********************
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

********************
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

********************
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

********************
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! 
 ********************
 यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदिल,
आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

********************
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

********************
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

********************
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!

********************
पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

********************

Wednesday, October 26, 2011

मराठी हास्यकट्टा 11

अमेरिका : आमची कुत्री फुटबॉल खेळतात.
जपान : आमचे मासे नृत्य करतात.
चीन : आमचे हत्ती सायकल चालवतात.
भारत: आमची गाढवं देश चालवतात...

*************

झम्प्या बोड़ीस्प्रे मारून बसमधे चडला
एका मुलीने कमेंट्स पास केलि - आज काल फिनेलचा वापर जास्त होतोय ना .....?
झम्प्या - तरी पण माश्या काही पाठलाग नाही सोडत.. :-D


*************

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं ,
एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन लावला
"मग आम्ही काय करू"-पलीकडून उर्मट प्रश्न आला
"तुम्ही काही करू नका" - अत्रे शांतपणे म्हणाले,
मृतांच्या नातेवाईक यांस कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवढच.......

*************

मुलगी एका गाडीतून
एका मुलाला ओव्हरटेक
करते.
मुलगा : (जोरात ओरडून )
ए....... म्हैस.
मुलगी : तू गाढव... मूर्ख...
बिनडोक..
एवढं बोलत असतानाच
तिची गाडी एका म्हशीला धडकते
आणि अपघात होतो.
.
.
.
तात्पर्य :
मुलींना त्यांच्या भल्याचं
सांगितल तरी कळत
नाही..................


*************

पुणेरी बॉय फ़्रेंड :-

मुलगी : आपन मेक डोनॉल्ड ला जाऊ या का ? मला खुप भूख लागली आहे..
मुलगा : पण मझी एक आट आहे, मला मेक डोनॉल्ड चे स्पेलिंग़ सांग मग जाऊ...!!
...
मुलगी थोडा वेळ विचार करून बोलते, जाऊ दे ना आपन " के एफ़ सि " ला जाऊ...!!
मुलगा हुशार आसतो तो तिला विचारतो मला जरा " के एफ़ सि " चा फ़ुल फ़ॉर्म सांग मग जाऊ....!!
मुलगी : आपन ना मीसळ पावच खाउ खुप छाण मीळतो...

**************
विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!'
October 26 at 8:47pm

दिवाळी शुभेच्छापत्रे

दिवाळी शुभेच्छापत्रे

                                                                          1 2

Sunday, October 23, 2011

मराठी हास्यकट्टा 2

मी नेहमी तुज्या घरा समोर येताना मन माझ घाबरत असत ,
मी नेहमी तुझ्या घरा समोर येताना मन माझ घाबरत असत ,
कारण ?
कारण !

तुज्या बापच लक्ष्य सारख माझ्या वर असत ..... :)

****************
बायकांच्या या पाच गोष्टी कधी समजत
नाहीत .....
* तुम्ही ना अगदी "हे" आहात ? ( "हे"
म्हणजे काय ? )
* तुम्ही पहिल्या सारखे
आता नाही राहिलात !! ( मग काय
दुसऱ्या सारखे झालो ?)
* मला तुमच्या कडून
हि अपेक्षा नव्हती ( बये मग
कसली अपेल्षा होती ?)
* खर्र सांगा ... मी कशी दिसते ? (खर
सांगून का मार खायचाय ?)
* मी खूप स्वार्थी आहे ना ? ( हो म्हटलं
तर झालच .....आपल् .....

Saturday, October 22, 2011

मराठी हास्यकट्टा 4

लग्न मंडपात सारे गाव पेटले
कारण
काय म्हणे तर
...
त्या नवऱ्याने नवरी एवजी
करवली चे नाव घेतले ................

*****************
गेलो होतो रानात..
उभा होतो उन्हात..
दिसली "ती"एका क्षणात..
भरली माझ्या मनात..
म्हणून I LOVE U बोललो तिच्या कानात..
दिली ना तिने एक सटकन "गालात."
आता पुन्हा नाही जाणार त्या रानात..!!!!

****************
"आई म्हणते आजकाल,
झोपेत मी सारखा हसत असतो..
कस सांगू तिला कि,
स्वप्नांत तिच्या सुनेलाच मी पाहत असतो..!" .... :D

************
आजकाल अलिबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो ...
पण आता त्याने नामी युक्ति काढलिय ...
तो दरवाजा जवळ जावुन जोरात ओरडतो ..
.
.
... .
.
" दया दरवाजा तोड दो "
आणी दरवाजा भितिने आपोआप उघडतो :-)

************

हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला? बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर. हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का ??? ... बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ

***************

एका मुलाला १ चिराग मिळाला... खुश होऊन त्यानी तो घासला....
लगेचच धूर झाला... आणि थोड्याच वेळात..............
.
.
"धड्दम" असा स्फोट झाला.. ५ जागीस ठार !! आणि ७ जखमी....!!!!!
अल्लादिन चा जमाना गेला आता....
****************
रजनीकांत:
लहानपणी माझ्या घरात लाईट
नव्हती, म्हणून मी "अगरबत्ती लाऊन
अभ्यास केला!"
मकरंदा: हो का? आमच्याकडे पण
लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती, मग काय
माझं एक दोस्त व्हता, 'प्रकाश'
नावाचा, त्याला सोबत बसून अभ्यास
केला, . . पण पुढे तो पावसात
भिजला नि विझला... . ... . . . .
रजनीः मग काय केलं?. . . . . ....
मकरंदा: काय नाय, माझही एक
मैत्रीण पण होतो....'ज्योती'
नावाची.... . . ..........

Friday, October 21, 2011

लळा जिव्हाळा शब्दच खोटे

लळा जिव्हाळा शब्दच खोटे


लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।
मासा मासा खाई॥
कुणी कुणाचे नाहि,
राजा कुणी कुणाचे नाहि ।

कुणी कुणाचे नाहि,
राजा कुणी कुणाचे नाहि ।

लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।
पिसे तणसडी, काड्या जमवी चिमणी बांधी खोपे ।
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे ।
बळावता बळ पंखामधले पिल्लू ऊडूनी जाई ॥१॥

रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया ।
कोण कुणाची बहिण भाऊ, पती पुत्र वा जाया ।
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही ॥२॥

कुणी कुणाचे नाहि, राजा कुणी कुणाचे नाहि ।
लळा जिव्हाळा शब्दच खोटे ।

चित्रपट : जिव्हाळा
गायक : सुधीर फडके
गीतकार : ग. दि. माडगूळकर
संगीतकार : श्रीनिवास खळे

Sunday, October 16, 2011

मराठी हास्यकट्टा - 5

मुलगी:- आपण लग्न कधी करायचे?
मुलगा:- घरी विचारूनसांगतो.
मुलगी:- तुझे माझ्यावर जास्त प्रेम आहे कि घरच्यांवर?
मुलगा:- घरच्यांवर
मुलगी:- का?
... ... मुलगा:- मी जेव्हा लहान होतो तेव्हा, चालताना पडलो कि आई उचलयाची, बाहेर
जायचो तेव्हा पप्पा बोट पकडायचे, रडायला लागलो तर ताई आणि दादा त्यांची
खेळणी द्यायचे. कळले का
मुलगी:- पण घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्या कडे न जाता माझ्याकडेच येतो ना रे माकडा.
:) :)

**************
मुलगी मुलाला Message करते....

मुलगी: ये मला जोक पाठवणा..
मुलगा message करतो
मुलगा:मी अभ्यास करतोय,मला वेळ नाहीये..
... ... .
.
.
.
.
.
मुलगी:आणखी एक जोक पाठवणा....

********************
झम्प्या बोड़ीस्प्रे मारून बसमधे चडला

एका मुलीने कमेंट्स पास केलि - आज काल फिनेलचा वापर जास्त होतोय ना .....?

झम्प्या - तरी पण माश्या काही पाठलाग नाही सोडत.. :-D

****************
एकदा गंपू प्रवचनाला जाऊन घरी परतला. घरी आल्या-आल्या त्याने बायकोला उचलून घेतलं.

गंपूची बायको : अहो...हे काय करताय? प्रवचनात नक्की काय सांगितलं तुम्हाला?

गंपू : हेच की...आपल्या दु:खांचा भार आपणच उचलला पाहिजे ....
************
पती : आज आपल्या चिरंजीवांनी माझ्या खिशातून काही पैसे चोरलेले दिसताहेत..... पत्नी : कशाला त्याच्यावर आळ घेता उगाच? मी तुमच्या खिशात हात घातला नसेल हे कशावरून? पती : अगं, खिशात अजून काही पैसे शिल्लक आहेत
************

दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेट वेडे असतात..एक मित्र मरत असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो ...तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव.. काही दिवसांनी मेलेला मित्र दुसर्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला ...एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट ...कोणती आधी सांगू ...दुसरा मित्र म्हणाला चांगली आधी ...मेलेला मित्र म्हणाला ..आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट आहे...वाईट बातमी म्हणजे ...बुधवारच्या म्याच मध्ये तुला बोलिंग करायची आहे :)

Saturday, October 15, 2011

feeling (फीलिंगस् )

feeling (फीलिंगस् )
fellings ह्या शब्दाचा अर्थ वळवताच येत नाही अनि “ दोस्ती , प्रेम अनि सहज , असच “ ह्या शब्दातूनच हा शब्द जातो “fellings “ . कधी घडली असेल तुमच्या बरोबर “हो” अनि “नाही “ स्वतालाच विचारा .......अशीच एक “ feelings” ..............



योग योग आहे का खरच योग माहित नाही पण माझ्या गोष्टी सर्व fb (facebook) वरच येतात, आता मनात येतो म्हणून लिहितो म्हणून हा योग होतो ...........

facebook वर “ती” खूप दिवसा पासून add होती पण कधी बोलत नसे ,मी पण तिला “message” करून थकलो अनि “ hopes” सोडून बसलो होतो ..एक दिवस “ reply” आला अन् त्यच दिवशी online भेटली. fb वरच normal बोलन ........

मी :- hiiiiiii..........

ती :- hiiiiiii..................

........

मी:- कशी आहेस अनि आज online कशी ?

ती :- असते कधी कधी अनि मी ठीक आहे ......(उत्तरावरून attitude girl वाटली )

मी :- okz......हो पण माझ्या एका पण msg चा reply नाही केला.

ती:- reply करायचा असतो .......

मी:- कल्याण .....

ती :- काय “कल्याण” ?

मी:- नाही मी “कल्याण” ला राहतो तू कुठे राहते ?

ती :- नवीमुंबई ......

मी:- gud मग fb कधी पासून आहे ...?

ती :- खूप नाही 6 months ......

मी :- अनि chat करते का नाही ?

ती :- नाही .......तेवढी मी बसतच नाही ....

मी :- okz.....

ती :-झाल का आपण नंतर बोलू मी जाते आता ......?

मी:- एवढ्या लवकर .........

ती :- नसीब मी बोलले तरी ......:)

मी :- ohhhh......as u wish ........

ती :- byeeeeee

मी :- tc ......



रोज online भेटायची अनि time झाल कि attitude मध्ये निघून जायची पण बोलताना माझ्या मनावर हावी असायची .एक दिवस असाच बोलताना ती oflline झाली. reply बंद म्हणून नेहमी प्रमाणे गेली म्हणून मी वाट बघायची सोडून मी पण logout झालो ..........

थोड्याच वेळात unknown no . वरून friendship msg आला..... मी मनातल्या मनात वाह..... आता हा no . कोणाचा म्हणून फोन लावला तर cut , दुसऱ्यांदा cut , तिसर्यांदा cut , चौथ्य्न्दा मीच cut-cut बंद केली. अनि थोड्याच वेळात त्या नंबर वरून फोन आला . मी विचारलं whos this ?

ती :- ओळख ......

मी :- कस ओळखू ........?

ती :- ते तुज बघून घे ......

मी :- अस कस ......?

ती :- असच ?

मी :- तुझं नावाचा पहिला अक्षर सांग अनि ,..शेवटच .......

(तिने सांगितलं अनि मी ओळखल पण )

ती :- मी direct offline झालो .तुला राग आला असता ना ......म्हणून मी msg केला .........

मी :- ohhhh......अस काय ?

ती :- चल झाल बोलून नंतर वेळ भेटला तर बोलेन नाही तर नाही .......

मी :- मी “msg” करेन ना ......

ती :- कशाला ......मी सहज फोन केला होता.......

मी :- okz........चांगल आहे तुज .........

अनि फोन कट झाला .......खरा खेळ तर आता सुरु झाला होता “feelings “ चा ......मला राग येईल म्हणून फोन केला होता पण लगेच तो कट पण केला ....पण २-३ दिवसांनी तिचे msg यायला सुरवात झाली मग मी पण msg करू लागलो .......



“ गोड गोड गोडवी .....

मन भरून जावी .....

शब्द च नाही वळत ...

हि feeling च नाही कळत ........”



“ hiiii.........hellooooo...

..

how r u ............

कशी आहेस ...? कसा आहेस तू ?

ह्या शब्दन मध्ये लपलेली .....

हि feeling च नाही कळत ........”



असाच दिवस–रात्र msg वर बोलायचो ...पण एक दिवस मीच विचारलं .......

मी :- hellllooooo मला काही तरी सांगायचं आहे .....?

ती :- मला माहित आहे तुला काय बोलायचं आहे .....

मी :- मग तुज उत्तर काय असेल .......

ती :- हे बघ उत्तर काही पण असल तरी आपण असे जास्त दिवस नाही बोलू शकत .........

मी :- अस का ?

ती :- असाच आहे अनि खर आहे ?

मी:- sorry मी माझ्या feelings चुकून मांडल्या ......

ती :- i recept ur feelings ..... अनि sorry ........ उद्या पासून मला msg पण नको करत जाऊ ...,,मला त्रास होतो ..... thanks for very nice friendship .................



तिने फोन कट केला अनि मी पण “कट” झालो .......त्या दिवसा पासून तिचा फोन च नाही लागला अनि facebook अनि friendship अनि feelings चा असा end झाला ........

तिने अस का केल मला नाही समजल ......तुम्हाला समजेल किवा नाही पण शेवटी राहते ती “FEELINGS” ......



“ “ मी अनि “ती “ मध्ये ......

तीच लांब झाली ........

एकट पडलेल्या मनाला हेच नाही वळत .......

. हि वेगळी अशी “feeling “ च नाही कळत........” “....................



feeling (फीलिंगस् )



fellings ह्या शब्दाचा अर्थ वळवताच येत नाही अनि “ दोस्ती , प्रेम अनि सहज , असच “ ह्या शब्दातूनच हा शब्द जातो “fellings “ . कधी घडली असेल तुमच्या बरोबर “हो” अनि “नाही “ स्वतालाच विचारा .......अशीच एक “ feelings” ..............



योग योग आहे का खरच योग माहित नाही पण माझ्या गोष्टी सर्व fb (facebook) वरच येतात, आता मनात येतो म्हणून लिहितो म्हणून हा योग होतो ...........



facebook वर “ती” खूप दिवसा पासून add होती पण कधी बोलत नसे ,मी पण तिला “message” करून थकलो अनि “ hopes” सोडून बसलो होतो ..एक दिवस “ reply” आला अन् त्यच दिवशी online भेटली. fb वरच normal बोलन ........

मी :- hiiiiiii..........

ती :- hiiiiiii..................

........

मी:- कशी आहेस अनि आज online कशी ?

ती :- असते कधी कधी अनि मी ठीक आहे ......(उत्तरावरून attitude girl वाटली )

मी :- okz......हो पण माझ्या एका पण msg चा reply नाही केला.

ती:- reply करायचा असतो .......

मी:- कल्याण .....

ती :- काय “कल्याण” ?

मी:- नाही मी “कल्याण” ला राहतो तू कुठे राहते ?

ती :- नवीमुंबई ......

मी:- gud मग fb कधी पासून आहे ...?

ती :- खूप नाही 6 months ......

मी :- अनि chat करते का नाही ?

ती :- नाही .......तेवढी मी बसतच नाही ....

मी :- okz.....

ती :-झाल का आपण नंतर बोलू मी जाते आता ......?

मी:- एवढ्या लवकर .........

ती :- नसीब मी बोलले तरी ......:)

मी :- ohhhh......as u wish ........

ती :- byeeeeee

मी :- tc ......



रोज online भेटायची अनि time झाल कि attitude मध्ये निघून जायची पण बोलताना माझ्या मनावर हावी असायची .एक दिवस असाच बोलताना ती oflline झाली. reply बंद म्हणून नेहमी प्रमाणे गेली म्हणून मी वाट बघायची सोडून मी पण logout झालो ..........

थोड्याच वेळात unknown no . वरून friendship msg आला..... मी मनातल्या मनात वाह..... आता हा no . कोणाचा म्हणून फोन लावला तर cut , दुसऱ्यांदा cut , तिसर्यांदा cut , चौथ्य्न्दा मीच cut-cut बंद केली. अनि थोड्याच वेळात त्या नंबर वरून फोन आला . मी विचारलं whos this ?

ती :- ओळख ......

मी :- कस ओळखू ........?

ती :- ते तुज बघून घे ......

मी :- अस कस ......?

ती :- असच ?

मी :- तुझं नावाचा पहिला अक्षर सांग अनि ,..शेवटच .......

(तिने सांगितलं अनि मी ओळखल पण )

ती :- मी direct offline झालो .तुला राग आला असता ना ......म्हणून मी msg केला .........

मी :- ohhhh......अस काय ?

ती :- चल झाल बोलून नंतर वेळ भेटला तर बोलेन नाही तर नाही .......

मी :- मी “msg” करेन ना ......

ती :- कशाला ......मी सहज फोन केला होता.......

मी :- okz........चांगल आहे तुज .........

अनि फोन कट झाला .......खरा खेळ तर आता सुरु झाला होता “feelings “ चा ......मला राग येईल म्हणून फोन केला होता पण लगेच तो कट पण केला ....पण २-३ दिवसांनी तिचे msg यायला सुरवात झाली मग मी पण msg करू लागलो .......



“ गोड गोड गोडवी .....

मन भरून जावी .....

शब्द च नाही वळत ...

हि feeling च नाही कळत ........”



“ hiiii.........hellooooo...

..

how r u ............

कशी आहेस ...? कसा आहेस तू ?

ह्या शब्दन मध्ये लपलेली .....

हि feeling च नाही कळत ........”



असाच दिवस–रात्र msg वर बोलायचो ...पण एक दिवस मीच विचारलं .......

मी :- hellllooooo मला काही तरी सांगायचं आहे .....?

ती :- मला माहित आहे तुला काय बोलायचं आहे .....

मी :- मग तुज उत्तर काय असेल .......

ती :- हे बघ उत्तर काही पण असल तरी आपण असे जास्त दिवस नाही बोलू शकत .........

मी :- अस का ?

ती :- असाच आहे अनि खर आहे ?

मी:- sorry मी माझ्या feelings चुकून मांडल्या ......

ती :- i recept ur feelings ..... अनि sorry ........ उद्या पासून मला msg पण नको करत जाऊ ...,,मला त्रास होतो ..... thanks for very nice friendship .................



तिने फोन कट केला अनि मी पण “कट” झालो .......त्या दिवसा पासून तिचा फोन च नाही लागला अनि facebook अनि friendship अनि feelings चा असा end झाला ........

तिने अस का केल मला नाही समजल ......तुम्हाला समजेल किवा नाही पण शेवटी राहते ती “FEELINGS” ......



“ “ मी अनि “ती “ मध्ये ......

तीच लांब झाली ........

एकट पडलेल्या मनाला हेच नाही वळत .......

. हि वेगळी अशी “feeling “ च नाही कळत........” “...............

Wednesday, October 12, 2011

मराठी हास्यकट्टा 7

मुलाची आई (मुलीच्या आईला)- ‘‘मला तुमची मुलगी पसंत आहे हो; पण एक सांगायला हवंच हं. माझा मुलगा ना नास्तिक आहे. त्याचा देवावर अजिबात विश्वास नाही.’’
मुलीची आई- ‘‘त्याची नका चिंता करू, एकदा लग्न होऊन तो माझ्या मुलीबरोबर राहू लागला की, आठ-दहा दिवसातच त्याला सारे देव आठवू लागतील.’’

************************

इतिहासाच्या तासाला पुरंदरे मास्तरांनी झोपलेल्या राजुला ऊठवुन विचारलं
"काय रे! दिल्लीचे तख्त कोणी फोडले ?"
राजु खडबडुन जागा होत " देवाशप्पथ सांगतो सर ! मी नाही फोडले "
पुरंदरे मास्तरांनी हा किस्सा दुपारी शिक्षकांच्या खोलीत सांगितला
तेव्हा जोशी बाई सोडुन सगळे हसले. जोशी बाई मात्र गंभीरपणे बोलल्या " कोण राजु ना ? एक नंबरचा वाह्यात मुलगा आहे. त्यानेच फोडले असेल.

************************
फलक.
एका ऊंच ईमारतीच्या गच्चीवर कठड्याजवळ लावण्यात आलेला फलक.

"येथुन वाकून पाहू नये. वाकून पहातांना पडल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल व अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल ताबडतोब अटक करण्यात येईल."

************************
अमितकडे त्याचे मामा, मामी त्यांची तीन मुले आणि मावशी अशी पाहुणेमंडळी अचानक येऊन टपकली. अमितच्या आईला फार आनंद झाला. ती आपल्या भावाचे, भावजयीचे, बहिणीचे स्वागत करायला आनंदाने पुढे झाली. सर्व मंडळी घरात येऊन बसली. चहा-पाणी झाले, बाबा म्हणाले, ‘‘अमित, पाहुण्यांसाठी काहीतरी घेऊन ये. हे ऐकून सर्वजण खुश झाले. अमित बाहेर गेला व पाहुण्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी दोन रिक्षा घेऊन आला.

************************
चिकटरावांचा मुलगा हजार जबाबी....!!
शिक्षक : राजा, या वेळी तू 80 टक्के मार्क्‍स मिळवायला हवेत बरं का!
चिकटरावांचा मुलगा : सर, मी 80 टक्के नाही तर 100 टक्के मार्क्‍स मिळवीन.
शिक्षक : माझी चेष्टा करतोस का रे?
चिकटरावांचा मुलगा: चेष्टा करायला तुम्हीच तर सुरुवात केली सर.

Thursday, October 6, 2011

दसरा

दसरा



’दश-हरा’ म्हणजे वाईटाचा अंत…….अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी नवरात्रीनंतर येणारा हा दहावा दिवस………याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून याला ’विजयादशमी’ असेही म्हणतात.संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात हा सण विविध प्रकारे साजरा होतो. केवळ भारतातच नव्हे तर भारताबरोबरच हा सण जावा, सुमात्रा व जपानमधेही साजरा केला जातो. नेपाळचा तर हा राष्ट्रीय सण आहे.

या दिवशीचे आणखी एक विशेष असे की याच दिवशी द...ुर्गामातेने महिषासुराचा वध केला.सलग नउ दिवस चाललेले हे युद्ध दहाव्या दिवशी संपले….तोच हा दसरा. साडेतीन मुहूर्तापैकी एक. आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणुन द्यायचे आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करायची. मनातले राग, दु:ख सगळ काही दहन होणाऱ्या रावणाच्या पुतळ्याबरोबर तिथेच सोडायचे आणि एक नवी प्रसन्न सुरुवात करायची. अज्ञातवास संपवून निघालेल्या पांडवांनी याच दिवशी शमीवृक्षाच्या ढोलीत लपवलेली हत्यार बाहेर काढून त्यांची पुजा केली होती. ह्यादिवशी सिमोल्लंघन केले जाते…….पुर्वी राजे याच दिवशी नवे प्रदेश काबिज करण्यासाठी निघत असत.

सौजन्य: Talyatil Ganpati (सारसबाग पुणे)

Wednesday, October 5, 2011

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला?

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला?

सीबीआयची साइट हॅक होण्यापासून ते फेसबुकवर सातत्याने येणारे व्हायरस यामुळे गेल्या काही दिवसांपासून सायबर जगतामध्ये खळबळ माजली आहे.
या असुरक्षिततेला तोंड देण्यासाठी जगभरातील अनेक देश सरसावले आहेत. भारतानेही ११ एप्रिल रोजी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचा उहापोह...
- नीरज पंडीत

फेसबुकवर कमेंट टाकत आहात

किंवा ट्विट करत आहात...जरा थांबा, आधी भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने नुकतीच जाहीर केलेली नियमावली वाचा आणि मगच पुढचे पाऊल उचला. नाहीतर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता.

जगातील कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी किंवा आपले मत व्यक्त करण्यासाठी सर्वात प्रभावी ठरत असलेल्या इंटरनेट या माध्यमाचा वाढता दुरुपयोग लक्षात घेता केंदीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने २०००सालच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याला पूरक ठरणारी नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली सायबर क्षेत्र अधिक सुरक्षित करणार असली तरी, यामधून इंटरनेट वापरणाऱ्यांवर आणि इंटरनेटवरील विविध साइट्सवर मोठे निर्बंध येणार आहेत. यामुळे कदाचित आपल्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा येणार असल्याची भीती तज्ज्ञांना आहे. याला जगभरातील विविध कंपन्यांनी तसेच देशातील अनेक संस्थांनी विरोध करण्यास सुरूवात केली आहे.

नवी नियमावली सांगते...

नव्या नियमावलीमधील दुसऱ्या उपनियमानुसार सोशल नेटवकिर्ं ग साइटवर अथवा आपल्या ब्लॉगवर एखाद्या विषयावर लिखाण केले. हे लिखाण जर बेकायदेशीर असेल तर त्यावर तातडीने कारवाई होईल. या बेकायदेशीर लिखाणाच्या व्याख्येमध्ये या नियमावलीत भारतातीलच नव्हे तर जगातील कुठल्याही आयटी कायद्यात तरतूद नसेलेले मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. हे लिखाण लहान मुलांच्या विचाराला हानी पोहचवणारे नसावे, त्यामधून कुठल्याही समाज घटकाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्या बद्दल गॉसिपिंग केलेले नसावे, तुटलेले नातेसंबंध, परराष्ट्राशी संबंधांवरील वक्तव्य, सरकार विरोधी भूमिका अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. यातील बहुतांश गोष्टी आपण रोजच्या नेट जीवनात करत असतो. पण नव्या नियमानुसार अशा गोष्टी केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. समजा याप्रकरणी कारवाई करायचे ठरवले तर यासाठी ठरविण्यात आलेली प्रक्रिया खूप विचित्र असल्याने याला सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटी तसेच गुगलसारख्या कंपन्यांनी विरोध केला आहे. नव्या नियमावलीनुसार एखाद्या साइटवर जर कोणी 'काळ्या' यादीत नमूद केलेल्या मुद्द्यांपैकी एखाद्याला पूरक ठरेल अशी कमेंट केली तर ती कमेंट ३६ तासांच्या आत त्या साइटवरून काढण्यात यावी. तसे झाले नाही तर त्या व्यक्तीबरोबरच त्या साइट कंपनीलाही आरोपी ठरवून कोर्टात खेचले जाणार आहे. मग ती साइट देशातील असो किंवा परदेशातील. समजा एखाद्या व्यक्तीने फेसबुकवर कसाबच्या फाशीसंदर्भात एखादी कमेंट केली तर, ती या नव्या नियमानुसार गुन्हा ठरू शकेल. ही कमेंट फेसबुकने ३६ तासांत डिलिट केली नाही तर, त्या व्यक्तीच्या आणि फेसबुकच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येईल. आता कमेंट करणारी व्यक्ती जर भारतात असेल तर, त्याला पकडणे सोपे आहे. परंतु, जर ती व्यक्ती परदेशात असेल तर त्याला पकडण्यासाठी त्या संबंधित देशाशी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागेल. त्या देशातील नियमांनुसार इंटरनेटवरील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने नसतील तर ती व्यक्ती तेथील कायद्यानुसार गुन्हेगार ठरणार नाही.

तसाच मुद्दा वेबसाइट कंपन्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे जर या प्रकरणी पोलिसांनी फेसबुकच्या विरोधात तक्रार दाखल केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वप्रथम भारताला अमेरिकेकडून परवानगी घ्यावी लागेल कारण भारतात फेसबुकचे कोणतेही र्सव्हर अथवा अधिकृत कार्यालय नाही. नियमातील विशेषत: या भागाला गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांनी विरोध केला आहे. तसेच या प्रकरणी जर कोणी पकडले गेलेच तर त्यांना दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तर हे नियम म्हणजे खरेखुरे हॅकर्स किंवा इंटरनेटचा गैरवापर करणाऱ्यांवर बंधने आणणारे नसून उलट सामान्य व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे असल्याचे सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीचे कार्यकारी संचालक सुनील अब्राहम यांनी स्पष्ट केले.

सायबर कॅफे चालकांना आंदण?

नव्या नियमावलीनुसार सायबर कॅफे चालकांना सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक बंधणे घालण्यात आली आहेत. मात्र यासाठी त्यांना दिलेल्या अधिकारांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर यानिमित्ताने आपली खासगी माहिती सायबर कॅफेचालक संग्रहीत करून ठेवू शकतो हे धोक्याचे असल्याचे अब्राहम यांनी स्पष्ट केले. नियमांनुसार सायबर कॅफे चालकाने त्याच्या कॅफेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत काढून ठेवणे, फोन नंबर घेणे तसेचत्याच्या इंटरनेट ब्राऊजिंगची माहितीही संग्रहीत करून ठेवणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात एवढी माहिती स्टोअर करून ठेवण्यासाठी सर्वच कॅफे धारकांकडे तेवढी स्पेस नसते, आणि असली तरी आपण केलेले ब्राऊजिंग आणि आपण त्याला दिलेली वैयक्तिक माहिती या सर्व गोष्टींचा तो गैरवापर करू शकतो. प्रत्यक्षात ही माहिती कोर्टाच्या परवानगी शिवाय कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला देता येणार नाही असे नियमांत आहे मात्र यावर लक्ष कोण ठेवणार?

सरकारची भूमिका

सायबर जगतात होणारी घुसखोरी आणि सामान्यांकडून आलेल्या तक्रारी विचारात घेऊन ही नियमावली तयार करण्यात आली आहे. आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान कायदा २००० सालचा असून, यापूवीर् २००८मध्ये त्यात काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी ठरविलेल्या काही नियम ११ एप्रिल २०११ रोजी जाहीर करण्यात आले असून त्याची कठोर अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव आर. चंदशेखर यांनी स्पष्ट केलेय.

तज्ज्ञांचा विरोध

सरकारच्या या नव्या नियमावलीला तज्ज्ञांनी प्रसार माध्यमे तसेच आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मोठा विरोध केला आहे. अब्राहम यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीने कोणत्याही वेबसाइटवर अथवा ब्लॉगवर आपली कमेंट टाकली आणि ती या नियमावलीत नमूद केलेल्या बेकायदेशीर मुद्द्यांमध्ये सापडली तर त्या ब्लॉगच्या मालकालाही शिक्षा होणार आहे, यामुळे बड्या कंपन्यांबरोबरच ब्लॉगचालकांनीही याला विरोध केला आहे.
-अनामिक