Sunday, December 30, 2012

काव्यसंग्रह विभाग




८:०५ :: ७:१६ ~ सचिन काकडे
-----------
सचिन काकडे याचे हे ८:०५ :: ७:१६ अशा विचित्र नांवाचे पुस्तक म्हणजे अशा लखलखीत कवित्वाचा पुरावा. मुंबईत रोज चाळीस लाख लोक लोकलचा प्रवास करतात. पण सचिनला कॉलेज आणि नोकरीची कसरत करत असताना, जी लोकल दिसली ती लाखातील एखाद्यालाच दिसते, जाणवते, सतावते आणि आश्वस्तही करते. ही लोकल कधी त्याला आईसारखी मायाळू भासते तर कधी तिचा राक्षसी थंडपणा त्याला हादरवून टाकतो. लोखंडाच्या अनेक पत्र्यांच्या पलिकडे चिरडत जाणारा जीव सचिनच्या काळजाला हात घालतो. गार हिरवळ त्याचे डोळे शेकते. सूक्ष्म निरीक्षण आणि धारदार जाणीवांनी सचिनची कविता अतिशय टोकदार झाली आहे. हे टोक जाणवायला कातडी मात्र जिवंत असायला हवी. नाहीतर आजकाल बघू नये ते बघून बघून डोळे, मन आणि आत्मासुद्धा निर्जीवच अस्ल्यासारखे असतात. त्यांना संजीवनी देण्याचे काम सचिनच्या या कविता करतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.
------------
Free download #eBook copy @ 








बालभारती आठवणीतील कविता
------------
Free download #eBook copy @ 
------------------
ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com



बालभारती आठवणीतील कविता
------------
Free download #eBook copy @ 
------------------



बालभारती २ 
-----------
आठवणीतील कविता
------------
Free download #eBook copy @ 




चार क्षण ~ संतोष नार्वेकर 
-----------
कविता संग्रह
------------
Free download #eBook copy @ 
------------------




क्युबिकल्स~ आनंद माने
-----------
कविता संग्रह
------------
Free download #eBook copy @ 






लालनाक्या ~ प्राजक्त देशमुख
------------
Free download #eBook copy @ 


------------------




डरकाळी ~ गणेश पावले
------------
संग्रहातून :
वाघासारखी डरकाळी द्यायला नुसत वाघ असून चालत नाही 
त्यासाठी अंगात शिवाचा अंश असावा लागतो ...
रणांगणात उतरून नुसती हाताची मुठ वळवून चालत नाही 
त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद असावा लागतो..
अरे लढाया खुल्या मैदानात असोत किंवा खवळलेल्या सागरात
जिंकण्यासाठी सह्याद्रीसारखा कणा ताठ असावा लागतो ..
स्वराज्य उभ करायचं म्हणजे खायचं काम न्हाय 
त्यासाठी रक्ताचा अभिषेक करावा लागतो..
लढण म्हणजे नुसत प्राण तळहातावर घेवून चालण न्हवे 
त्यासाठी शत्रू सोडाच त्याच्या घोड्यालाही पाण्यात दिसावं लागतं..
आग्राहून सुटका.. आणि शास्तेखनाची फजिती.. अहो राजा होण्यासाठी 
अफजाल्यासारख्या पाप्याला वाघासारख फाडावं लागतं..
वाघाच्या घुरघुरण्याला डरकाळीच महत्व यायला
माझ्या राजांसारख रयतेचा वाली छत्रपती शिवाजी राजे भोसले असावं लागतं...
------------
Free download #eBook copy @ 
------------------



ग्रेव्हयार्ड लिटरेचर ~ प्राजक्त देशमुख
------------
Free download #eBook copy @ 
------------------





कृष्णा ~ स्वप्ना कोल्हे 
------------
Free download #eBook copy @ 

------------------




अहं ब्रहास्मि
-----------------

Free download #eBook copy @ 
------------

ई-साहित्य प्रतिष्ठान
esahity@gmail.com



------------------

Tuesday, November 13, 2012

दिवाळी SMS

दिवाळी SMS


सप्तरंगाच्या या प्रकाशपर्वाने
उजळून गेले कोपरे सारे

किरणांना ओंजळीत भरा त्या
अन् दीनांघरी घेऊन जा रे...

अंधाराच्या प्रत्येक कणावर
मात करणाऱ्या या

**दीपोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा**



******************
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!
************

Thursday, November 1, 2012

कलाविष्कार ई दिवाळी अंक नोव्हेंबर २०१२

Kalaavishkaar_E-Diwali Magazine_November_2012




कलाविष्कार - ई दिवाळी अंक 
--------------- 
प्रथमश सुरेश शिरसाट 
संपादक आणि प्रकाशक 
Fb page @ https://www.facebook.com/kalavishkaar.ediwaliank
Fb Profile @ http://www.facebook.com/prathmesh.shirsat21071988

Wednesday, October 17, 2012

नवरात्र

नवरात्र


 अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे देवीचे नवरात्र साजरे केले जाते. प्रतिपदेस या दिवशी देवीचा घट बसवितात, देवघरा समोर एक पत्रावळ घेऊन त्यावर काळ्या मातीचा ढीग करतात यावर पाच प्रकारची धान्य टाकतात, यावर मातीचा घट ठेवतात. या घटास कडेने नागिणीची पाच पाने बांधतात. त्याचे तोंडाला पाच पाने कडेनी लावतात. घाटात पाणी, नाणे व हळकुंड टाकतात अश्या पद्धतीने घट स्थापना करून त्यावर फुलांची माळ सोडतात,   नऊ दिवस रोज ...
एक नवीन माळ सोडली जाते. त्यात प्रामुख्याने विडयाच्या पानाच्या तसेच तरवड या झाडाची फुले व पानांच्या माळा वहिल्या जातात. देवघरात तेलाचा दिवा लावतात तो कोजागिरी पौर्णिमे पर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात. नऊ दिवस उपवास धरतात, तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. पंचमीला ललिता पंचमी म्हणतात, पंचमीस घटावर सायंकाळी कडकनी , करंज्या, गोड वडे पिठा पासुन बनविलेले करंडा, फनी व खोबर्याची वाटी वगैरे टांगतात. काही ठिकाणी या वस्तू अष्टमी पर्यंत टांगतात . विविध खेळ फुगड्या, फेर रात्री खेळले जातात, या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना, प्रार्थना करतात. अष्टमीचे रात्री पूजन व होम केला जातो कोहळा दिला जातो. रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचतात. नवमीला शस्त्रपूजन होते. दशमी दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून घाटाचे माळा उतरून घटावर उगविलेले धान देवास वाहून घटाचे उत्थापन करून उपवासाची सांगता करतात.

आदिशक्तीची नऊ रुपे  :  नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.

पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्‍मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री

Tuesday, October 16, 2012

दुर्गेचे रूप

दुर्गेचे रूप 

दुर्गेचे रूप 
  • दुर्गेचे पहिले रूप शैलीपुत्री या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिलाशैलपुत्रीअसे नाव पडले आहे....
  •  नवशक्तीपैकी ब्रम्हचारिणी हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे.
  •  दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते.
  • दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव कुष्मांडा आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते.
  • दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते.
  •  दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते.
  •  दुर्गेचे सातवे रूप कालरात्री या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते
  • दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते.
  • दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे

Monday, October 15, 2012

55 कोटींचे बळी - गोपाळ गोडसे लेखक

"55 कोटींचे बळी" वाचा म्हणजे हे बेगडी गांधीप्रेम निवळेल. गोपाळ गोडसे लेखक आहेत. Gandhi-vadh-kyo-गाँधी-वध-क्यों Hindi version of Marathi Book "55 कोटींचे बळी"

Sunday, October 14, 2012

नवरात्र शुभेच्छापत्रे

नवरात्र शुभेच्छापत्रे 

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ
साधिके,शरण्ये त्र्यंबके
गौरी नारायणी नमोस्तुते "
सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !


Friday, July 6, 2012

सारेच काही मनातले, मनापासून दडविले मी


सारेच काही मनातले, मनापासून दडविले मी
ओठान्तले मोती नकळत, शब्दांत ओविले मी

अश्रूतला सूर मज, कळला उशिरा जेव्हा
डोळ्यांच्या ओल्याव्यास आधी ,खूप तुडविले मी

परतीच्या वाटेला मी, पाठ फिरविली अशी
मग दूर जाता -जाता असे,मार्ग हरविले मी

आज पावेतो आयुष्याचे, गूढ सुटेना मजला
आता नकळत जाळ्यांचे, फास सोडविले मी

जे पाश मजला हवे ,त्यांनीच दूर लोटिले
मग ती बंधने इथे, कधी न जुळविले मी

आजचाच चंद्र हा, अर्धाच इथे दिसतो मज
कधी काळी पुनवेत त्याचे, वर्तुळ घडविले मी

नितळ निर्झर निरंतर, वाह्तोच हा रोज झरा
घालून बांध आज तयाच्या ,सुरास अडविले मी

इथे सारेच नियम माझे ,तरीही अनघाच आज
चिरीमिरी आयुष्यात, प्रारब्धासहि फितविले
-रजनीकांत दुसने 

Thursday, July 5, 2012

का मोगरा उशाला, तू माळतेस आता



का मोगरा उशाला, तू माळतेस आता
काळीज आठवांनी, का जाळतेस आता

मोडून स्वप्न सारी ती रात रंगलेली
त्या काजळी सुखांना का भाळतेस आता
...
गेला निघून गेला तांडा नव्या दिशेला
त्याच्या खुणा कशाला सांभाळतेस आता

काळास दोष नाही वेळाच थांबलेल्या
का जाहल्या चुकांना मग चाळतेस आता

सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले
डोळ्यातले झरे का ते गाळतेस आता

आक्रोश या 'मनी'चा कोणास ना कळाला
जखमा जुन्या कशाला तू पाळतेस आता
-रजनीकांत दुसने

Wednesday, July 4, 2012

मराठी चारोळ्या

मराठी चारोळ्या

सागराच्या लाटांची एक ,
वेगळीच गम्मत असते 
जेंव्हा आपण जातो किनार्यावर,
तेंव्हा ती स्वागत करते आणि 
जेंव्हा आपण निघतो किनार्यावरून,
तेंव्हा ती"परत या माझ्या भेटीला"
असे नकळत सांगून जाते

****************************
पावसाच्या सरी..
पसरल्या सार्‍या अंगणी.
ओल्या मातीत भिजलेल्या...
ओल्या तुझ्या आठवणी...

****************************
ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात,
मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो..

****************************
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला.....
होता जरा शहारा, वेडा खुला बहाना
ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला....

****************************
... संगीत शांत केले अंधार गात गेला
बेहोश रम्य राती उधळून श्‍वास गेला....
भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारे
रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...

****************************
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि ..
मन तुटायला हि वेळ लागत नाही 
वेळ लागतो फक्त ...
ते गुंतलेले मन आवरायला आणि
तुटलेले मन सावरायला

****************************
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणाने सुखावावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानि मी चिंब भिजुन जावे.

****************************
 -अनामिक
  ****************************

Tuesday, July 3, 2012

तुझ्या विना

तुझ्या विना ..............!!!!!!!!


भास का हा तुझा होत असे मला सांग ना .......
लागती ओढ का सारखी अशी सांग ना...........
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना ...
तुझ्या विना ..............!!!!!!!!
तुझ्या विना ..............!!!!!!!!

उमजुन सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांगना जीव हा गुंतला
झाले आता जरी...होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे सांग ना...
तुझ्या विना ...........!!!!!!!!
तुज्याविना ..............!!!!!!!!

वाटे जरी माझी तुझी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली
फिरुनी पुन्हा नवे... नाते मला हवे..
जीव तुटतो का हा असा रे सांग ना...
तुझ्या विना .............!!!!!!!!
तुझ्या विना ..............!!!!!!!!

तुझ्या विना...
गीतकार - अमोल पठारे
संगीतकार - नीलेश मोहरीर
गायक - वैशाली सामंत, मंगेश बोरगावकर

Monday, July 2, 2012

आई


आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥

कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥

कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥

दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥

असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥
-अनामिक

Sunday, July 1, 2012

शाळा


शाळा 
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे,कोणे एके काळी मी देखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.

इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .

पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .

पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.

मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .

शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .

काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली.

शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी
-अनामिक

Saturday, June 30, 2012

आषाढी एकादशी शुभेच्छापत्रे

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेछा !!

“बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | | ”
!! जय हरी !!

|| पुंडलिक वर दे, हरी विठ्ठल ||
|| श्री ज्ञानेश्वर महाराज कि जय ||
|| जगद्गुरू तुकाराम महाराज कि जय ||


Thursday, June 21, 2012

आयुर्वेद आणि आरोग्य



आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.



१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.



२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.



३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.



४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.



५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.



६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.



७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.



८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.



९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.



१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.



११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.



१२) जस्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.



१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.



१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.



१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपाना मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.



१६) कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.



१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.

Wednesday, June 20, 2012

कुणाला आपलसं करणं......इतकं सोपं नसतं कधी

 कुणाला आपलसं करणं........



आत्मा देखील विकावा लागतो ...
या प्रेमाच्या बाजारात ...
कुणाला आपलसं करणं ...
इतकं सोपं नसतं कधी ...

श्वासदेखील ...
गहाण ठेवावे लागतात ...
कुणाच्यातरी हृदयात ...

त्या व्यक्तीला ...
त्या व्यक्तीच्या भावनांना ...
तितकचं हळुवार पणे ... जपावं लागतं ...

कुणाला जीवापेक्षाही ...
जास्त प्रेम करणं ...
इतकं सोपं नसतं कधी ...!!!
-अनामिक

Monday, June 18, 2012

शाळेचे ते दिवस आठवले की

शाळेचे ते दिवस आठवले की..........


शाळेचे ते दिवस आठवले की …
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….
पुन्हा शाळेत जावसं वाटतं ….

शाळा आमची छान होती …
Last bench वर आमची team होती ….
 आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन मधल्या वडा-पाव
साठी ….
साला नेहमीच line असायची …
जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत जायचं
पुस्तक भिजू नये म्हणून ….
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
शाळेतून येता येता … एखाद्या डबक्यात
उडी मारून …

उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ….
Black -board वर बोलणार्या मुलांमध्ये ….
Monitor नेहमीच आमचं नाव लिहायचा …
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे …
हातावर duster चा व्रण असायचा ….

प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ….
आमचा आरडाओरडा असायचा …
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ….
तो बर्फाचा गोळा संपवायचा ….

इतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान …
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ….
गणित… भुमितीत होतं … पायथागोरस च
प्रमेय …
भूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून …
का कुठलेतरी … वायव्य….

हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा”
English मधल्या grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
शाळेतल्या gathering चा dance …

बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा …
तो मराठी चा तास ….
दरवर्षी नवीन भेटायचे ….
Uniforms आणि वह्या पुस्तकांचा set …..
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच
करावा लागायचा wait ….

शाळा म्हटली कि अजूनही आठवतात ….
desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं
….
exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं …
आणि जोड्या जुळवणं …
चिखलातल्या त्या football च्या matches

कबड्डीत … पडून धडपडून ….
हातापायांवर आलेले scraches …
खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा ….

मला पुन्हा लहान व्हायचं ….
हसायचं …. खेळायचं ….
मला पुन्हा शाळेत जायचं …
---अनामिक

Tuesday, June 12, 2012

समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं

ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन् शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन् सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...
-अनामिक

Tuesday, June 5, 2012

पावसाच्या त्या सुंदर क्षणी


पावसाच्या त्या सुंदर क्षणी
तो अन मी असेच बसायचो
एकमेकांच्या गप्पांत
उगाच तासंतास रमून जायचो

आठवतात ते क्षण
सोबत एकमेकांच्या सहवासातले
दोघांनी समुद्र किनारी बसून
वाळूतही स्वप्नातले घर साकारलेले

ते बाईक वरून आमच फिरणं
रोज रोज नाही पण कधीतरी असायचं
दोघांच एकमेकांवर प्रेम करणं
जणू स्वप्न सुख भासायचं

त्यान माझी उगाच काळजी करणं
मला नेहमीच खटकायच
त्या काळजीतीलही त्याच प्रेम
मला नंतर जाणवायच

भर पावसातही दोघे
आम्ही स्वच्छंदी होऊन फिरायचो
सिहगड काय अन माथेरान काय
सर्वच पालथ घालायचो

पावसाचे ते टपोरे थेंब
अंगावर झेलायला त्याला खूप आवडायचे
त्याच्या ह्या आवडीवर
मी मात्र त्याच्यावर खूप चिडायचे

रुसवा फुगवा काढत
दिवस असेच उडून जायचे
जीवनाच्या वाटेवर आतातरी
आपण स्थिर व्हावे आसे मला वाटायचे

माझ्या वाटण्याचा आता त्याला नाही गंध
हे मला सारख जाणवायच
माझ्या पेक्षाही आता त्याला
कोणी दुसरेच जवळच भासायचं

दिशा बदलल्या , वाटा बदलल्या
पण तरीही मन त्याच्यासाठीच झुरायचं
कधीतरी तो परत येईल
असा वेडा विचार मन माझ करायचं

आजही पावसाचे ते क्षण
हवेहवेसे वाटतात
पण पाउस येताच
पाण्याबरोबर आठवणीही वाहून नेतात...!!! 
-अनामिक

Monday, June 4, 2012

रात्रीला मी म्हंटल


रात्रीला मी म्हंटल ,
अग जरा हळू चालत जा ,
झोप लागलीय नुकतीच चंद्राला आता कुठे ,
जरा कमी ठुमकत जा..........
साखरझोपेत पहाटेच्या स्वप्ने त्याला पाहू देवून
 प्रीतीचा शिंपडत रंग स्वप्नांना थोडं त्याच्या फुलवत जा .....
रुप पाहून चांदण्याचं पडलेली भूल 
त्याला आभाळाला दाखवून 
त्यालाही थोडसं मनी खुलवत जा .......
तू समोर असताना अंधारालाही 
मनचं थोडं लाजत का होईना पण कांही बोलू देत जा .....
यायच्या आधी पुरवाई साज तुझा उतरून 
रूप तुझं साजिरं पहाटेच्या दवात तू थोडं निरखून जा ..
-अनामिक

Monday, May 28, 2012

गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली

गोऱ्या गोऱ्या
गालावरी चढली लाजेची लाली
ग पोरी नवरी आली

सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

सजणी मैत्रिणी
जमल्या अंगणी
चढली तोरण मांडवदारी
किंकिण कांकण
रुणझून पैजण
सजली नटली नवरी आली

गोऱ्या गोऱ्या
गालावरी चढली लाजेची लाली
ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

नवऱ्यामुलाची आली
हळद हि ओली
हळद हि ओली लावा
नवरीच्या गाली
हळदीन नवरीच
अंग सारं माखवा
पिवळी करून तिला
सासरी पाठवा

सजणी मैत्रिणी
जमल्या अंगणी
चढली तोरण मांडवदारी
सासरच्या ओढीन हि हसते हळूच गाली
ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

सासरी मिळूदे तुला
माहेरची माया
माहेरच्या मायेसंग
सुखाची गा छाया
भरुनिया आले डोळे
जड जीव झाला
जड जीव झाला लेक
जाय सासराला
आनंदाच्या सरी तुझ्या बरसू दे घरी दारी
ग पोरी सुखाच्या सरी
सनईच्या सुरामद्धे चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली......
-गुरु ठाकुर 

Sunday, May 27, 2012

आयुष्य

आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका.साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल.देशपांडे