Tuesday, January 31, 2017

ओली ती माती, ओला तो गंध

ओली ती माती, ओला तो गंध
ओली ती सांज, तुझा सुगंध
माझ्या मनात एक तू, माझ्या श्वासात एक तू
पानांत तू, दंवात तू
रोमारोमांतच तू
सरीत तू, लहर तीच तू

माझी न मी राहे, पाहुनी तुला रे
आतुरले किती मी, मिठीत घे मला रे
मेघ कसे दाटले, बरसुनी तू ये ना रे

ढगांचा स्पर्श मृदुल तो
रवीला ही लपवतो
मंद वारा वाहतो, चांद खुशीत हासतो
ओठांत मी गुणगुणू, कानत तू रुणुझुणू
ऊन ही तू, सावली तू, इंद्रधनु तू
पहाटेचा समीर तोच तू

गीतकार : नेहा राजपाल, गायक : -, संगीतकार : नेहा राजपाल, चित्रपट : फोटोकॉपी (२०१६)


चित्रपट ~ फोटो कॉपी 

Sunday, January 29, 2017

९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर



९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

लोकसत्ता http://epaper.loksatta.com/c/16367689
९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन


९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन






सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जिवाशिवाचे मिलन
या सुरेल शब्दांनी ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सांगीतिक गौरव केला जाणार आहे. साहित्यप्रेमी, रसिक आणि सुजाण वाचकांना साहित्यिकांशी जोडणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डोंबिवलीकर कलाकारांचा सहभाग असलेले गीत तयार करण्यात आले असून साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये डोंबिवलीतील सर्व कलाकार एकत्र येऊन या गीताचे सादरीकरण करणार आहेत. संगीतकार सुखदा भावे दाबके यांनी या गाण्याला संगीत दिलं असून आनंद पेंढारकर यांनी या गीताचे लेखन केले आहे. डोंबिवलीतील ज्येष्ठ संगीतकार आणि गायक वसंत आजगावकर यांच्या हस्ते या सुरेल गीताचे अनावरण डोंबिवलीमध्ये करण्यात आले यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी,स्वागताध्यक्ष गुलाब वझे आणि आगरी युथ फोरमचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
डोंबिवलीमध्ये वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत असणारे कलाकार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने डोंबिवलीकर कलाकारांनी सर्वांसमोर यावे या हेतूने या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबतची संकल्पना सुखदा भावे दाबके यांनी आयोजकांसमोर मांडल्यानंतर त्यांची मंजुरी तात्काळ मिळाली आणि या गाण्याची निर्मिती करण्यात आली . साहित्य संमेलनातील विविध कार्यक्रम, संमेलनाची परंपरा याचा गौरव या गाण्याद्वारे करण्यात आलेला आहे.संमेलनामध्ये होणाऱ्या कवीकट्टा,चर्चा, परिसंवाद यांसारख्या उपक्रमांचा दाखला गाण्याद्वारे देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या बोलीभाषांचाही उल्लेख गाण्यामध्ये करण्यात आला आहे.
डोंबिवलीमधील जास्तीत जास्त कलाकारांना यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. शहरातील प्रतिष्ठित गायकांबरोबरच तरुण होतकरू गायकांनासुद्धा या गाण्यामध्ये संधी देण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचासुद्धा या गाण्यामध्ये समावेश आहे. सर्व वयोगटातील रसिकांना हे गाणं आवडावं या हेतूने या गाण्याचे संगीत संयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचे हे गौरवगीत असून संमेलन या व्यासपीठाचा गौरव करण्याच्या हेतूने या गाण्याची निर्मिती केल्याचे संगीतकार सुखदा भावे दाबके यांनी सांगितले. अमोघ दांडेकर आणि ऋषिराज साळवी यांनी या गाण्यासाठी वादन केले आहे. तर परीक्षित कुलकर्णी आणि आशिष गमरे यांनी गाण्याचे ध्वनीमुद्रण डोंबिवलीतील प्रभा डिजिटल स्टुडीओ येथे केले आहे.
या गाण्याचा छोटासा भाग होता आल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे सांगत वसंत आजगावकर यांनी गाण्यातील सर्व गायकांचे कौतुक केले आणि संमेलनाला शुभेच्छा दिल्या. तर स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी साहित्य संमेलनामध्ये सर्वांना घेऊन पुढे जाण्याची इच्छा असल्याचे सांगत कोणालाही बाजूला करण्याचा हेतू नसून सर्वांनी आपले घरचे कार्य समजून संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी केले. यावेळी या गाण्यातील गायक कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तर या गाण्यातील बालगायकांनी गाण्याच्या ओळी अनावरणानंतर रसिकांसमोर सादर केल्या.
मी आता डोंबिवलीकरच
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आता डोंबिवलीमध्ये येणे झाल्यामुळे डोंबिवलीकरांच्या सांस्कृतिकतेची प्रचीती मला झाली आहे. वारंवार डोंबिवलीमध्ये येणे होत असल्यामुळे मी आता आनंदाने डोंबिवलीकर झालो असल्याचे यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवारांचे पद्म पुरस्काराबद्दल अभिनंदन करत राजकारणापलीकडे जाऊन केलेल्या कामाचा हा गौरव असल्याचे सांगितले. पुढील दहा वर्षांसाठी हे संमेलन गीत ठेवता येऊ शकते इतकी चांगली निर्मिती केली असल्याचे महामंडळाच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितले.
'आगरी युथ फोरम' निर्मित,
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गीत २०१७
गीत: आनंद पेंढारकर
संगीत: सुखदा भावे-दाबके
गायक: वसंत आजगावकर, निनाद आजगावकर, विनायक जोशी, हृषिकेश अभ्यंकर, केतन पटवर्धन,विवेक ताम्हनकर, रेश्मा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, ओंकार प्रभुघाटे, तन्वी गोरे, मानसी जोशी, श्रद्धा देवधर, क्षितिजा जोशी, रचना मुळ्ये
कोरस: आनंद पेंढारकर, श्रीनिवास आठल्ये, महेश देशपांडे, ओंकार भागवत, अभिलाषा वेदपाठक, शमिका केळकर, मृणाल केळकर, श्वेता रानडे
बालगायक: आशना राऊत, मृण्मयी भट, चैताली मसुरकर, कृतिका भिडे, निधी खांडेकर, तुषार सिरसे
तालवाद्य: ऋषिराज साळवी
गिटार: अमोघ दांडेकर
बासरी: अवधूत फडके, प्रणव हरिदास
ध्वनीमुद्रण व मिक्सिंग: परीक्षित कुलकर्णी, आशिष गमरे
संमेलन गीत
सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन
शब्दप्रभूंचे रसिकांशी हे जीवाशिवाचे मीलन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
चरित्र, कादंबरी, कथा या साऱ्यांचा संदेश मराठी
नाट्य, चित्रपट, दूरचित्र येती लेऊनी वेश मराठी
ओव्या, अभंग, गोंधळ, भारुड, भक्तीची ती आस मराठी
लोकगीत, भावगीत, कविता अन गजलेचा श्वास मराठी
सह्याद्रीच्या छातीवरची रांगडी तरी गोड
परदेशातुन आंतर जालावर जपलेली ओढ
प्रबोधनाचे भान ठेवुनी रसिकमनाचे रंजन
संमेलन, संमेलन, डोंबिवलीचे संमेलन
संमेलन, संमेलन, हे नव्वदावे संमेलन
फलक, तोरणे, रांगोळ्यांनी मंद, सुशोभित विशाल प्रांगण
साहित्यातिल दीप्तीमान ताऱ्यांचे लखलखते हे तारांगण
भाषण, चर्चा, परीसंवाद, मुलाखतीही सादर
कविसंमेलन, मुशायरे अन काव्याचा जागर
व्यासपीठावर विद्वत्तेची मांदियाळी अन समोर दर्दी
ग्रंथखरेदी साठी साऱ्या दालनांमध्ये सुजाण गर्दी
प्रतिभेच्या तेजाला साऱ्या रसिकांचे हे वंदन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
आगरी ठाकरी संगमेश्वरी
धनगरी कोकणी मालवणी
वऱ्हाडी अहिराणी मावळी
डांगी दख्खिनी वडवाळी
मराठी×८
रंग वेगळे, ढंग वेगळे, एक तरीही स्पंदन
संमेलन, संमेलन, हे शब्दांचे संमेलन
संमेलन, संमेलन, साहित्याचे संमेलन
संमेलन, संमेलन, डोंबिवलीचे संमेलन
संमेलन, संमेलन, हे नव्वदावे संमेलन
आनंद पेंढारकर
fb@https://www.facebook.com/anand.pendharkar.92
....….…....................
सरस्वतीच्या पदस्पर्शाने झाली धरणी पावन




मराठी साहित्य संमेलन Fb page  @ Marathi Sahitya Sammelan2017
website : http://www.90thsahityasammelan2017.com/
Twitter : https://twitter.com/90thSammelan 

Tuesday, January 17, 2017

पु ल

नंदा जगण्यासाठी काय उद्योग करीत होता याची मात्र मला कल्पना नव्हती. भली मोठी मोटारगाडी होती. ताजमध्ये राहायचा. कदाचित बापाची प्रचंड इस्टेट शाबूत राहिली असेल.
.
आता मात्र आम्ही खूप मोकळेपणाने बोलते होतो. पण मला तो माझ्याबरोबर इतका वेळ का घालवतो याचे कोडे होते. एकदा मला तो ताजमहाल हॉटेलातल्या आपल्या खोलीत घेऊन गेला. ते वातावरण पाहून मी जवळजवळ भेदरूनच गेलो होतो. नंदा मात्र त्या वैभवात अत्यंत अलिप्तपणाने संचार करीत होता.
.
"आज आपल्याला बरोबर जेवायचं आहे."
.
"पण तुमच्या ह्या हॉटेलात जेवण्याचा पोशाख घालावा लागतो."
.
"डोंट वरी! तूच सांगितलंस ना भारत स्वतंत्र झाला म्हणून? तुझा हा वेष चालेल. अरे धोतर कुठंही चालतं!"
.
आणि त्या दिवशी प्रथम इंदू वेलणकर हा विषय निघाला. वीस वर्षापूर्वी ह्याच तारखेला आम्ही मोरेटोरमध्ये जेवायला गेलो होतो. माझ्या लक्षात तारीख नव्हती, नंदाच्या होती. हा योगी पुरूष भुतलाशी असला काही धागा ठेवून राहिला असेल अशी मला कल्पनाही नव्हती!
.
मी त्यांना कॅंपमध्ये सोडल्यानंतरचा सारा इतिहास त्याने मला सांगितला. युद्धाच्या त्या पेटत्या खाईत त्याच्या सर्वस्वाचा असंख्य वेळा नाश झाला होता; फक्त एक गोष्ट टीकून होती. ती त्याने एका पाकिटातून काढून माझ्यापुढे ठेवली! एक फार फार जुने पत्र होते. इंदूचे त्याला आलेले पत्र! इंदूने त्यात आपले अतं:करण मोकळे केले होते. मी पुस्तकातूनच काही प्रेमपत्रे वाचली होती. हे खरेखुरे प्रेमपत्र होते! वीस वर्षापूर्वीची त्याच्यावर तारीख होती. ते पत्र वाचता वाचता माझ्या डोळ्यांतून अश्रूंची धार लागली.
.
" ए वेड्या , रडतोस काय?" नंदा माझे सांत्वान करीत होता.
.
मला एकएकी नंदा वांद्रयाच्या समुद्रात दगड फेकणार्या पोराएवढा लहान वाटू लागला! माझ्या लहान मुलांना मी कुरवाळतो, त्यांची पाठ थोपटतो, त्यांचे मुके घेतो,त्याचे त्याला करावे असे वाटू लागले. पण वाटेल ते करून मन स्वच्छ करायला मी नंदा नव्हतो. कसली कसली सभ्यतेची, शिष्टाचारांची अनेक बंधने घेऊन हिंडणारा मी एक दुबळा कारकून होतो. फक्त माझ्या डोळ्यानी ही बंधने पाळली नाहीत. शेवटी ते पत्र त्याच्या हातात देऊन मी म्हणालो, -
.
" नंदा, जगात देव नाही आहे रे !" "अरे जगात काहीच नाही! ज्या क्षणाला आपण श्वास घेत असतो ना, तेवढा क्षण असतो. ते बघ" - खिडकी बाहेरचा समुद्र दाखवीत मला तो म्हणाला, "तो समुद्र आहे ना ? त्यात आपल्याला काय दिसतं? लाटा दिसतात, त्या बोटी दिसतात. ते कोळी, ती बघ लहान होडी घेऊन निघाले आहेत. त्यांना काय दिसत? फक्त मासे दिसतात. ते आणि मासे - त्यांच्यात येणारी अडचण म्हणजे समुद्र ! जीवन जीवन ज्याला म्हणतात ना , ते आपल्या जन्मापासून मरणापर्यंत नुसतं असं आड येत असत. बाकी काही नसतं! कधी प्रचंड लाटा होऊन येत. कधी उगीचच मठ्ठ्पणानं आडवं पडून राहतं मग कंटाळा येऊ नये म्हणून आपण त्याला लेबल लावतो - प्रेम म्हणतो, बायको म्हणतो, आई म्हणतो, धर्म म्हणतो, देव म्हणतो - काय वाटेल ते म्हणतो. एरवी जीवन म्हणजे एक निरर्थक फसवी,वस्तू आहे, ह्या समुद्रासारखी"
.
"असं का म्हणतोस? इंदूची आठवण तुला होतेच की नाही?"
.
"अरे, तु कोळ्याचं प्रचंड जाळं जेव्हा समुद्रातून ओढून काढतात तेव्हा पाहिलं आहेस? त्या जाळ्यात अडकलेले मासेदेखील तेवढ्यातल्या तेवढ्यात छोट्या मासळीला मट्ट करून गटकावतात. पुअर सोल्स!"

Monday, January 9, 2017

कितीदा नव्याने तुला आठवावे

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे


कितीदा झुरावे तुझ्याच साठी
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा झुरावे तुझ्याच साठी
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी

कितीदा सुकून पुन्हा फुलावे…

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे

किती हाक द्यावी तुझ्या मनाला
किती थांबवावे मी माझ्या दिलेला
कितीदा रडुनी जीवाने हसावे

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे


चित्रपट : ती सध्या काय करते
 Devayani Karve-Kothari