Sunday, October 31, 2010

विडंबन

खालील विडंबन म्हणजे, "मी माझा" प्रमाणे एका नव-याचे संक्षिप्त मनोगत "मी हिचा".
आशा आहे तुम्ही सर्व छान आस्वाद घ्याल.
बायकोने लाटणे फ़ेकले
तरी आवाज होत नाही,
ह्याचा अर्थ असा नाही
कि नव-याला ईजा होत नाही. 
तुला मी कधीही
वजन करायला लावत नाही,
कारण तुझ्या शरिराचा व्यास त्या
इवल्याशा मशिनवर मावत नाही.
जडावलेल्या पापण्या
मिटायला तयार होत्या,
तेव्हाच हिच्या घोरण्याच्या
सिमा पार होत होत्या.

Sunday, October 24, 2010


आयुष्य
दुखा:मध्ये डोळ्यातून धार आणू नका,
संकुचित जगण्यालाच सार मानू नका,
जीवनाला कधी भार मानू नका,
शिवरायांची शप्पथ कधी हार मानू नका,
गाढवांच्या संगती राहाल तर माती व्हाल,
शिवरायांच्या विचारांनी जगाल तर छत्रपती व्हाल...!
-अनामिक 

Saturday, October 23, 2010

मराठी हास्यकट्टा 31

काही सुविचार ..


१. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
२. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
... ३. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
४. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
५. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो....

*******************
सेल्समन गणप्या : ओ सायब, घ्या की हो कायतरी इकत तुमच्यासाठी...

बंडोपंत : छे छे .. मला काही नकोय.

सेल्समन गणप्या : अवो मग ही झुरळांची पावडर तरी घ्या की.. एकदम झ्यॅक हाये.
...
बंडोपंत : ती तर अजिबातच नको. आम्ही आमच्या झुरळांचे इतके लाड करत नाही. त्यांचा काय नेम.
अहो, आज पावडर दिली तर उद्या डिओड्रंट मागतील.

*******************
अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते.
तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले
' काय बाबूराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?'
अत्रे म्हणाले. 'अरे आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाही बरोबर ?
कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?
*******************
वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणा सामान, दूध, पावआणि अंडी घेऊन यायचो...
मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!!
*******************
शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लासठेवला, पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?
चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो.
*******************
‘तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केलीय!’ तो म्हणाला.
‘पण मी काही तुझ्या पाठीमागे लागले नव्हते.’ ती ठसक्यात म्हणाली.
‘बरोबर आहे. सापळा कधी उंदराचा पाठलाग करतो का?’ त्यानं विचारलं.
*******************
दोन स्त्रियांशी विवाह का केला या प्रश्नावर एका अर्थशास्त्रज्ञाने मांडलेली २ मत.

पाहिलं मत : मक्तेदारी मोडली जाते.
...
दुसरं मत : स्पर्धा निर्माण झाल्यामुळे सेवा सुधारते.
*******************
साहेब : अच्छा तर तुमचं नाव बंडू बोंबटे तर…
बंडू : होय साहेब.साहेब : तर तुम्ही म्हणताय तुम्ही फारच कार्यतत्पर आहात, म्हणून मी तुम्हाला नोकरी द्यावी.
बंडू : अगदी साहेब…
साहेब : बरं मिस्टर बोंबटे. मग मला सांगा. तुम्हाला एमएस ऑफीस माहितीये?
बंडू : पत्ता द्या सर. आत्ता जाऊन पोचतो तिथे.
*******************
शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक : बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस . तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?

बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.
*******************
एका खानावळीवर पाटी होती, खानावळ " घरची आठवण "
एक दिवशी मेंबर ओरडला, " मालक, भात कच्चा व पोळी करपलेली आहे. "
मालक म्हणाला उगीच नाही नाव, 'घरची आठवण' ठेवले.
*******************
शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का ?
राजू : नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.
*******************
बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?
राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना.त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.
*******************
विडंबन



खालील विडंबन म्हणजे, "मी माझा" प्रमाणे एका नव-याचे संक्षिप्त मनोगत "मी हिचा".
... आशा आहे तुम्ही सर्व छान आस्वाद घ्याल.


बायकोने लाटणे फ़ेकले
तरी आवाज होत नाही,
ह्याचा अर्थ असा नाही
कि नव-याला ईजा होत नाही.



अशी एक बायको हवी
तोंड हे अंग नसलेली,
अशक्यातली गोष्ट आहे पण
देवाने आशा नाही सोडलेली.



तुला मी कधीही
वजन करायला लावत नाही,
कारण तुझ्या शरिराचा व्यास त्या
इवल्याशा मशिनवर मावत नाही.


जडावलेल्या पापण्या
मिटायला तयार होत्या,
तेव्हाच हिच्या घोरण्याच्या
सिमा पार होत होत्या.
*******************
परीक्षेच्या RESULT नंतर:

जर चांगले गुण मिळून पास झाला तर…

शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
... आई: सगळी देवाची कृपा
बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू
आणि...
जर नापास झाला तर….

शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस . .. पण .
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू

खरंच....
सगळे बदलतात पण मित्र नाही..
*******************
अतीभयानक पीजे ........

सिंड्रेलाचं आवडतं गाणं कोणतं ??...........
.
.
.
मला जाऊ द्या न घरी ....................आता वाजले कि बारा....
*******************

Thursday, October 21, 2010

मराठी हास्यकट्टा 32

प्रपोज करण्याची नवीन पद्धत.मिकू : तुझं नाव गूगल आहे का?चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं....
*****************
वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पावआणि अंडी घेऊन यायचो...मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!!
*****************
गण्या बस स्टॉपवर उभा होता.एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, '' लिफ्ट हवी आहे का?"..'गण्या- ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!
*****************
गावकरी :- १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉल्क टाईम मिळेल?
दुकानदार :- सात रुपये.

गावकरी :- ठीक आहे मग, ३ रुपयांची कोथिंबीर द्या.
*****************
मास्तर : चिंटू...अरे तुझे बाबा काय करतात?
चिंटू : मास्तर...माझे बाबा एस. बी. आय चे मालक आहेत.

मास्तर : वा मुला... एस. बी. आय बँकचे मालक !

चिंटू : नाही मास्तर... एस. बी. आय म्हणजे सावित्री भोजनालय आणि इडली सेंटर!!!
*****************
कावळा सरळ का उडतो ?

कारण तो विचार करतो,

उगाचच "का वळा?"
*****************
विद्यार्थी :आज मी होमेवोर्क करायचे विसरून गेलो .शिक्षक :राजू तू सांग हिमालयाचा टोक किती उंच आहे.राजू:मला माहिती नाही सर.शिक्षक :(रागाने) बाकावर उभे रहा.राजू:बाकावर उभे राहिल्या मुले हिमालायाचे टोक थोड़ी दिसणार आहे
*****************
बाबा आपल्या तिन्ही मुलांना समोर बोलावून विचारतात,
'सांगा बरं, आज दिवसभरात सगळ्यात आज्ञाधारकपणे कोण वागलं आणि आईचं सगळं कोणी ऐकलं?'
तिन्ही मुलं एकासुरात ओरडतात, 'तुम्ही, बाबा!'
*****************
'मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.

खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.

पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!' तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'
उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?'
*****************
चारोळ्या

जडावलेल्या पापण्यामिटायला तयार होत्या,
तेव्हाच हिच्या घोरण्याच्या सिमा पार होत होत्या.
*****************
विनोदी चारोळ्या

बायकोने लाटणे फ़ेकलेतरी आवाज होत नाही,
ह्याचा अर्थ असा नाहीकि नव-याला ईजा होत नाही.
*****************
शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत
जावे. रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
..रोहन-
श्रीमतीराम!शिक्षिका - गाढवा, वडिलांच्य नावामागे
श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?रोहन-
पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!
*****************
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
पत्नी - कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?
गोपाळराव - तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
*****************
व्याकरणाच्या तासाला शिक्षिकेनं मोरूला विचारलं, " काय रे, `मी सुंदर आहे' या वाक्याचा `काळ' कोणता?"
तिच्या चेहेऱ्याकडे पाहून मोरूनं उत्तर दिलं, "भुतकाळ."
*****************
एका छायाचित्रकाराला रस्त्यावर खूप गर्दी जमलेली दिसली.
त्या ठिकाणी अपघात झाला होता.
छायाचित्रकाराला अपघाताचे छायाचित्र घ्याचचे होते,पण त्याला गर्दीतून आत शिरता येईना.
मग त्याने मोठमोठ्याने ओरडण्यास सुरवात केली,
''मला आत जावू द्या! ज्यांचा अपघात झाला आहे, त्यांचा मी नातेवाईक आहे !"
लोकांनी त्याला आत जाऊ दिले. त्याने पाहिले तर, एका गाढवाला अपघात झाला होता.
*****************

Tuesday, October 12, 2010

माझी पहाट





माझी पहाट....
.
- गणेश के.
पहाटेच्या वाऱ्यात असतो तेंव्हा गारठा...
मात्र मी चालत राहतो....
अंधुकश्या प्रकाशात तुझ्याशी
बोलत राहतो.....
बोलता बोलता असे किती नाले , नदी -डोंगर
सरत जातात....
मग परत फिरताना
तुझ्या त्या आठवणी फक्त उरत जातात....


आता आंब्याला मोहर आलाय
अन कोकिळा हि गातेय..
पण तू आता नाहीस सोबत
हीच एक कमी राहतेय...
मग त्या विहिरीच्या काठावर बसतो
समोर झाडाखाली केवड्याचा सडा पहात राहतो,
सुगंधाच्या नशेत मग
तुझ्या विरहाचा साप असा डसत राहतो....
मलाही मग राहवत नाही
त्या फुलांचा मी गजरा करतो...
मग रम्य अश्या आठवणी काढत
रोजच्या सारखा गजरा तुझ्या कबरेवर सारतो...
असंच माग फिरतो
तुझी आठवणी नि डोळ्यात अश्रू घेऊन,
तुझ्या शपथेन बांधलेल्या
जीवनाची आणखी एक पहाट घेऊन........

Tuesday, October 5, 2010


पान जरी कोरं असलं,तरी...




पान जरी कोरं असलं,
तरी पानालाही भावना असतात.
मन जरी वेडं असलं,
तरी मनालाही भावना असतात.
पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.
मनं हे असचं असतं,
इकडून तिकडे बागडत असतं.
मनाला काही बंधनं असतात,
म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात
म्हणून मानत चालणार्या भावनेचा खेल आपल्याला कळत नाही
एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...
आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे....
-अनामिक 

Saturday, October 2, 2010

पसारा ..घर आवरावे तसे एकदा मन पण आवरले पाहिजे

पसारा 


घर आवरावे तसे 
एकदा मन पण आवरले पाहिजे 
नकोसे काय काय साठलेले
पाहून ठेवले पाहिजे.....


पण नक्की अडगळ कशाकशाला मानायचे..
पहिले वाहिले अल्पायुषी प्रेम 
की साहोदारांचे तोडकेमोडके  भावबंध
ही पण अडगळच  ना......


कितीतरी सल अगदी  तळात
 खोलवर  आहेत साठलेले मनाच्या 
न  ढाळलेले अश्रुंचे कढ
त्यांचे डोह तसेच अजूनही आहेत.......


तुझ्यामाझ्या नात्यातले 
अवघडलेले क्षण तसेच उभे आहेत
तुझे नकोसे स्पर्श काही
अजून अवघडलेले तसेच आहेत......


या सगळ्याचे काय करायचे 
खरच माहित नाही मला...
वापरून झाले की टाकायचे 
तुझ्यासारखे नाही जमले मला...


पहिले प्रेम पण तेवढाच खरं होते
जेवढी रक्ताची नाती खरी होती
तुझेमाझे लग्नही तेवढाच खरं होते 
आणि झालेल्या जखमाही तेवढ्याच खऱ्या ...


म्हणूनच  हा सारा पसारा
कितीतरी वर्षे आहे तसाच आहे
वाटते कधीतरी  अवचित 
कुठला जुना धागा अजूनही जुळेल....


या पसाऱ्याचे खरच काय करायचे असते?
घर आवरावे तसे
एकदा मनही आवरायला पाहिजे
अडगळ एकदा साफ करायला पाहिजे .......


-माधुरी