Friday, December 29, 2017

आरोग्यवर्धक मनुका

रोज करा 5 मनुकांचे सेवन, आणि बघा त्याचे फायदे

आयुर्वेदानुसार मनुकांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आम्हाला रोज 4-5 मनुका खायलाच पाहिजे. मनुकांना सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात उत्तम औषध मानले जाते. त्याशिवाय देखील मनुकांचे बरेच फायदे असतात. त्यात उपस्थित न्यूट्रिएंट्स बर्‍याच आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. तर जाणून घेऊ रोज मनुका खाण्याचे काय फायदे आहेत.

1. मनुका खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव होत. यामुळे त्वचेची रंगत वाढते आणि रंग देखील निखरण्यास मदत होते.

2. मनुकांमध्ये फायबर्स असतात. हे डायजेशन योग्य ठेवण्यास मदत करतात.

3. यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते. मनुका हार्ट अटॅकच्या आजारांमध्ये इफेक्टिव आहे.

4. यात आयरन असत. हे अॅनीमिया (रक्ताची कमतरता) दूर करण्यास फायदेशीर ठरतात.

5. यात अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे कँसर सारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते.

6. यात अँटीबॅक्टीरियल गुण असतात. यामुळे सर्दी-खोकला ठीक होण्यास मदत मिळते.

7. यात बीटा कॅरोटीन असतो. जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरत.

8. यात ऑक्जेलिक ऍसिड असत. यामुळे दात मजबूत होतात. यामुळे गम प्रॉब्लमपासून बचाव होतो.

9. यात कॅल्शियमची मात्रा अधिक असते. म्हणून ज्वॉइंट पेनपासून बचाव होतो.

10. याचे सेवन केल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होऊन हेयर फॉलची समस्या देखील दूर होते.

मनुका खाण्याचे हेल्दी मार्ग

कब्ज दूर करण्यासाठी रात्री पाच मनुका आणि एक लसणाची कळी खायला पाहिजे.
मनुकांत मध मिसळून खाल्ल्याने देखील फायदा होतो.
याला दुधात उकळून त्याचे सेवने केल्याने देखील फायदा होतो.
मनुकांमध्ये शेप आणि ओवा मिसळून खाल्ल्याने देखील फायदा होतो.
Fb @प्रसाद पिंगळे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1624235117633637&id=100001414928490

Wednesday, December 27, 2017

आत्‍मपरिचय हरिवंशराय बच्‍चन

मैं जग-जीवन का भार लिए फिरता हूँ,

फिर भी जीवन में प्‍यार लिए फिरता हूँ;

कर दिया किसी ने झंकृत जिनको छूकर

मैं सासों के दो तार लिए फिरता हूँ!


मैं स्‍नेह-सुरा का पान किया करता हूँ,

मैं कभी न जग का ध्‍यान किया करता हूँ,

जग पूछ रहा है उनको, जो जग की गाते,

मैं अपने मन का गान किया करता हूँ!


मैं निज उर के उद्गार लिए फिरता हूँ,

मैं निज उर के उपहार लिए फिरता हूँ;

है यह अपूर्ण संसार ने मुझको भाता

मैं स्‍वप्‍नों का संसार लिए फिरता हूँ!


मैं जला हृदय में अग्नि, दहा करता हूँ,

सुख-दुख दोनों में मग्‍न रहा करता हूँ;

जग भ्‍ाव-सागर तरने को नाव बनाए,

मैं भव मौजों पर मस्‍त बहा करता हूँ!


मैं यौवन का उन्‍माद लिए फिरता हूँ,

उन्‍मादों में अवसाद लए फिरता हूँ,

जो मुझको बाहर हँसा, रुलाती भीतर,

मैं, हाय, किसी की याद लिए फिरता हूँ!


कर यत्‍न मिटे सब, सत्‍य किसी ने जाना?

नादन वहीं है, हाय, जहाँ पर दाना!

फिर मूढ़ न क्‍या जग, जो इस पर भी सीखे?

मैं सीख रहा हूँ, सीखा ज्ञान भूलना!


मैं और, और जग और, कहाँ का नाता,

मैं बना-बना कितने जग रोज़ मिटाता;

जग जिस पृथ्‍वी पर जोड़ा करता वैभव,

मैं प्रति पग से उस पृथ्‍वी को ठुकराता!


मैं निज रोदन में राग लिए फिरता हूँ,

शीतल वाणी में आग लिए फिरता हूँ,

हों जिसपर भूपों के प्रसाद निछावर,

मैं उस खंडर का भाग लिए फिरता हूँ!


मैं रोया, इसको तुम कहते हो गाना,

मैं फूट पड़ा, तुम कहते, छंद बनाना;

क्‍यों कवि कहकर संसार मुझे अपनाए,

मैं दुनिया का हूँ एक नया दीवाना!


मैं दीवानों का एक वेश लिए फिरता हूँ,

मैं मादकता नि:शेष लिए फिरता हूँ;

जिसको सुनकर जग झूम, झुके, लहराए,

मैं मस्‍ती का संदेश लिए फिरता हूँ!

तोसे नैना लागे तोसे नैना लागे

तोसे नैना लागे

तोसे नैना लागे

[तोसे नैना लागे पिया सांवरे
नहीं बस में अब ये जिया सांवरे] x २
[मोहब्बत तो एक जावेदा जिंदगी है] x २

[तोसे नैना लागे मिली रौशनी
तोसे मन जो लागा मिली जिंदगी] x २
[मोहब्बत तो एक जावेदा जिंदगी है] x २

[मोहब्बत की है दास्ताँ जिंदगी
मोहब्बत ना हो तो कहाँ जिंदगी] x २
[मोहब्बत तो एक जावेदा जिंदगी है] x २
तोसे नैना लागे

शमा को पिघलने का अरमान क्यूँ है
पतंगे को जलने का अरमान क्यूँ है
[इसी शौक का इम्तिहान जिंदगी है] x २

मोहब्बत जिसे बक्श दे जिंदगानी
नहीं मौत पर ख़त्म उसकी कहानी

[कैसे जिया जाए ] x ३
इश्क़ बिन
नहीं कोई इंसान मोहब्बत से खाली
हर एक रूह प्यासी
हर एक दिल सावनी
मोहब्बत जहाँ है वहाँ जिंदगी है
मोहब्बत ना हो तो कहाँ जिंदगी है
[तोसे नैना लागे मिली रौशनी

तोसे मन जो लागा मिली जिंदगी] x २

मोहब्बत जिसे बक्श दे जिंदगानी
नहीं मौत पर ख़त्म उसकी कहानी
Lyrics: Hasan Kamal
Movie: Anwar (2007)

Tuesday, December 26, 2017

कोषांतर ~ सुप्रिया जाधव


उंचावरून कोसळल्यावर कसे वाटते ?
कडेलोट झाल्या दगडाला विचारून ये
२०१७ या सरत्या वर्षात आणखी एक वाचनीय गजलसंग्रह वाचकांच्या भेटीला येतो आहे. आणखी एक हा शब्दप्रयोग अशासाठी केला, कारण २०१७ या वर्षाने काही चांगले गजलकार आणि गजलसंग्रह गजलरसिकांना देऊ केले आहेत. मात्र आज प्रकाशित होणाऱ्या “कोषांतर” या गजलसंग्रहाचे स्वत:चे असे एक वेगळेपण आहे.
हृदयात दडलेली व्यथेची कस्तुरी
उमगायचा नाही तिचा परिमळ तुला
मराठीमध्ये गजल लिहिणाऱ्या एकूण गजलकारांच्या तुलनेत स्त्री गजलकारांचे प्रमाण अगदीच अत्यल्प आहे. अगदी सुरेश भट यांच्या समकालीन गजलकारांपासून ते आजपर्यंतचा मागोवा घेतला तर स्त्री गजलकारांची एकूण संख्या ५० देखील होत नाही. त्यातही सातत्याने आणि तंत्रशुद्ध आणि आशयपूर्ण गजलयोगदान देणाऱ्या स्त्री-गजलकारांची संख्या अर्ध्याहून अर्धी होती. पण, जी गजल रसिकांच्या भेटीला येत आहे ती नक्कीच मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणारी आहे.
हिरकणी इतकीच फरफट रोज होते
मात्र अमुचा पाठ अभ्यासात नाही
या सिग्नेचर शेराने अनेक वाचकांनी आज भेटीला येणारा गजलसंग्रह कुणाचा हे नक्कीच ओळखले असेल. आज “सुप्रिया मिलिंद जाधव” यांचा “कोषांतर” हा गजलसंग्रह प्रकाशित होतो आहे. कालखंडाचा विचार केला तर सुप्रिया जाधव यांच्या गजललेखनाचा प्रवास हा साधारण २००१ नंतरचा असावा. मात्र त्यांच्या गजलेतील परिपक्वता ही त्यांच्या आधीच्या पिढीतील स्त्री आणि पुरूष दोहोंच्या गजलच्या समकक्षेला पुरून उरणारी आहे.
तिच्या अश्रूंमधे मनसोक्त दुनिया नाहलेली
जगाला प्रश्न पडलेला कसे दव ओसरेना ?
मी ह्या लेखाचा प्रवाह अजिबातच तुलनात्मक वगैरे ठेवणार नाही. आणि जरी तो तसा ठेवायचा झाल्यास आधीच्या पिढीतील अनेक स्त्रीगजलकारांच्या पंगतीत सुप्रिया जाधव यांची गजल मनाचे स्थान पटकवणारी आहे, यात तीळमात्र शंका नाही. गजल प्रवासाच्या ज्येष्ठताक्रमात सुप्रिया जाधव हे नाव उशिरा येत असले तरीही गजलेतील काव्यगुणांच्या श्रेष्ठताक्रमात त्यांच्या गजलांनी बाजी मारलेली आहे. म्हणूनच संगीता जोशी, क्रांती साडेकर यांच्या नंतरच्या ठळक नामावलीत सुप्रिया जाधव हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
असे सामावले दोघे मिठीमध्ये, जणू की ;
अहंकारास निष्ठेचा दुरावा सोसवेना
सौंदर्यनिर्मिती हा काव्याचा हेतू असला, तरी आनंद हेच त्याचे फळ होय. काव्यातील शब्दांचे वेगळेपण, त्याचे व्यापकपण, ते अनुभविण्याची पध्दत, त्यातील प्रतिमा, प्रतिभा आणि सौंदर्य. त्याला येणारे कलारूप, काव्यानंदाचे स्वरूप आदि काव्यविचार आजच्या साहित्य विचाराचे मुलभूत आणि महत्वाचे चर्चाविषय आहेत. सर्वांना समजण्याजोगे, सुलभ शब्द, साधी सोपी गोष्ट असावी इतकीच काव्याकडून अपेक्षा असते.
टाळता येतात झालेल्या चुका
एवढा निष्कर्ष काढूयात का ?
हा कितीतरी सामंजस्यपूर्ण विचार त्यांनी आपल्या गजलेतून मांडलेला आहे. याच गजलेतील मला आवडलेला एक शेर इथे उद्घृत करतो आहे.
झेप पृथ्वीची... पडावी ‘तोकडी’
अन नभाचा प्रश्न हा की ‘का झुका ?’
कवितेला भावनेचा प्रकट आरसा असेही म्हणतात. हा आरसा सर्वात आधी त्या कवीचे प्रतिबिंब दाखविणारा असतो. त्या त्या वेळच्या कवितेतून त्या वेळचा भाव उलगडत जातो. कविता ही कवीचे अंतरंग असते, आत्मसंवाद किंवा रसिकसंवाद हा त्यालाच जोडून येणारा गुण आहे. तो साधायचा प्रयत्न अनेकांनी अनेक प्रकारानं केलेला दिसतो. मात्र सुप्रिया जाधव यांच्या शैलीत वैविध्यता आहे.
मनाचा आरसा जर मानते आहे तुला
खरे प्रतिबिंब दाखवल्याविना तडकू नको
असा थेट संवाद... आणि
मनाला मागणे सुचण्याअगोदर
उडाला केस माझ्या पापणीचा
अशी अलवारता सुप्रिया जाधव यांच्या गजलेत ठायी ठायी प्रत्ययाला येते.
वाचनात आलेला एक संदर्भ आठवतोय, विष्णुशास्री चिपळूणकर हे पहिले वाड़मयीन समीक्षक. ते बाह्यालंकारापेक्षा कवीच्या अंत:करणाच्या स्वाभाविक उद्गारांनाच काव्यमूल्य मानायचे. (वास्तविक काव्याची खरी ओळख तिथेच तर होत असते.) त्यांची दृष्टी सौंदर्यवादी आणि आस्वादक अशी होती. माणसांच्या मनोधर्मांपैकी संवेदनेशी काव्याचा विशेष संबध असतो.
“विदारक सत्य” रेखाटून जाते
गुन्हा अक्षम्य घडतो लेखणीचा
सजा कोणती अखेर देऊ लेखणीस ह्या ?
मनात ‘जे जे’ येते ‘ते ते’ मांडत नाही
काव्यातील श्रेष्ठता त्यातील जीवनदर्शनाच्या व्यापकतेवर आणि श्रेष्ठतेवर अवलंबून असते हे आगरकरांनीही सांगीतले आहेच. शुध्द काव्याचा हेतू रसिकांना आत्यंतिक आनंद देण्याचा असतो. ह्यात सुप्रिया जाधव यांची गजल आपली काव्यात्मकता आणि त्यातून संप्रेषित होणारा काव्याशय यांच्या जोरावर नक्कीच अग्रेसर आहे.
तुझ्या संगती मार्ग निर्धोक वाटे
दिशांना भ्रमांची चिथवणूक नुसती
काव्याचा आणि गजलेचा मुख्य विषय भावना हाच असतो. भावनेइतका विकारक्षम, वैचित्र्यमय नि मनोरंजक विषय साऱ्या सृष्टीत सापडणार नाही. भावनेची स्वरूपे आणि कारणे जशी अनंत असतात तशीच कार्येही अनंत असतात. कवीने कुणाचेही अनुकरण न करता आपल्या काव्यप्रकृतीस अनुसरूनच कविता करावी. या उक्तीला अनुसरून शैली आणि आशय या दोहोंच्या बाबतीत सुप्रिया जाधव यांची गजल आपले वेगळेपण सिद्ध करते.
सहाही ऋतुंना तुझा गंध येतो
निसटत्या क्षणांचीच जपणूक नुसती
निसर्गासही समर्पणाचे महत्त्व कळते
नवी पालवी फुटण्यासाठी जुनाट झडते
कवितेतला वा गजलेतला भाव म्हणजेच निखळ आनंदरस होय. रसाचा वरचा थर जरी सुख किंवा दु:ख यापैकी एका भानवेचा असला तरी त्याच्या खालील थर नेहमी आनंदाचाच असतो. रस हा काव्याचा आत्मा आहे. सर्व ललित कलांमध्ये काव्य ही सर्वश्रेष्ठ कला होय. कारण काव्याने होणारा परिणाम चिरकाल टिकणारा असतो. हे सारेच गुण ओघाने सुप्रिया जाधव यांच्या गजलेत वाचावयास मिळतात.
चढवत जा तू इमल्यांवरती खुशाल इमले
दगड पायथ्याचा ‘भरभक्कम’ सरकवू नको
आनंद ही ज्ञानाची पुढची पायरी होय. भावनेच्या चिंतनापासून आणि अनुभावापासून होणारा हा दुहेरी आनंद असतो. ह्या आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकाच्या अंगी विवेचनशक्ती, कल्पनाशक्ती आणि सहानुभूतीक्षमता असावी लागते. अशा प्रत्येक रसिकाला दखल घ्यायला भाग पाडणारी सुप्रिया जाधव यांची गजल आहे.
स्वतःची निर्मिली आहे जरी ओळख निराळी
स्वतःला गोवते आहे पुन्हा नावात त्याच्या
फिकासा वाटला त्याच्यापुढे मृदगंधसुध्दा
सुगंधी श्वास विरघळला जसा श्वासात त्याच्या
मध्यंतरी एका लेखात माझ्या माहितीप्रमाणे भूषण कटककर यांनी सुप्रिया जाधव यांच्या गजल आणि कवितांच्या बाबतीत एक सुंदर वाक्य लिहिले होते. “सुप्रिया जाधव यांच्या गजलेवर 'एकांगीपणाचे व प्रेमविषयक गजल' असे शिक्के मारण्यात अक्षम्य घाई झालेली आहे.” आणि त्याच्याच पुढे त्यांनी याहून सुंदर एक वाक्य लिहिलेले आहे... “त्यांचा 'विषयांचा आवाका' बघा.” हा आवाकाच आज संग्रहरुपाने आपल्या भेटीला येतो आहे. कटककर यांच्या विधानाला जोडून मी पुढे असे म्हणेन की, तत्पूर्वी नात्यांची बदलती परिभाषा सांगणारा त्यांचा एक शेर... सोबतच त्यांनी एका नव्या प्रतीकाचा वापर आपल्या गजलेत किती सहजगत्त्या केलाय याचीही प्रचिती वाचकांना येईल.
फेविकोलचा जोड देउया का नात्यांना ?
सख्खा-सख्ख्याशीही नाते टिकवत नाही
प्रेम, प्रीती यावर लिहिणारी कवयित्री पण त्रयस्थाच्या भूमिकेतून विचारपूर्वक, भावनेत ओंथबणारी ऋजुता पण भावनेत वाहून न जाणारा विचार त्यांच्या गजलेत प्रामुख्याने दिसून येतो. मनाच्या पाण्यात उठणारे तरंग त्यात आहेत. काव्याच्या आणि गजलेच्या सौंदर्य मांडणीइतकेच गंभीर विचार व त्यातील गंभीर सौंदर्य गजलेला पोषकता प्रदान करत असते. ही पोषकता सुप्रिया जाधव यांच्या गजलेत अनुभवायला मिळते.
आजकाल सर्रास असे का अतर्क्य घडते ?
भल्या पहाटे मनातली इच्छा मावळते
मनातल्या आशयाला स्पष्ट रूप देणारी कवयित्री म्हणूनच त्यांची गजल ही काव्यप्रवाही आणि त्यातील आशय आत्मनिष्ठ आहेत. आंतरबाह्य ते सुंदर आहेत. काव्यातील सूक्ष्म विचार, त्यांच्या सुहृद आविष्कार आणि समरसून मांडलेला विषय, जपलेला वेगळा बाज, वेगळी शैली ह्या साऱ्याच बाबतीत सुप्रिया जाधव यांची गजल वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी आहे.
बहरला बहावा जणू सांगतो
समस्या निवळतील ध्यानस्थ बस
ह्या आणि यांसारख्या असंख्य शेरांचा एक सुंदर कोष बनून आपल्या हाती येते आहे. एकूणच साहित्य प्रांतातला सर्वात हळूवार, संवेदनशील प्रकार म्हणजे कविता. कविता तुमच्या दु:खाला शब्द देते. तर गजल ही त्यातील वेदनेलाही लय देते आणि सुखाला झळाळी देते. आशयघन गजलांचा हा सुंदर कोष “कोषांतर”च्या रूपाने आपल्या भेटीला येतोय. प्रत्येक गजलरसिकाने आवर्जून संग्रही ठेवावा, असा हा गजलसंग्रह असणार आहे, याविषयी मी अत्यंत आशावादी आहे.
- जनार्दन केशव म्हात्रे

Monday, December 25, 2017

Friday, December 22, 2017

शाम से आँख में नमीं सी है


शाम से आँख में नमीं सी है






शाम से आँख में नमीं सी है
आज फिर आप की कमी सी है
दफ़्न कर दो हमें के साँस मिले 
नब्ज़ कुछ देर से थमी सी है
आज फिर … 

वक़्त रहता नही कहीं टिककर 
इसकी आदत भी आदमी सी है
आज फिर … 

कोई रिश्ता नही रहा फिर भी
एक तसलीम लाजमी सी है
आज फिर …

Wednesday, December 13, 2017

स्फूर्तिदायी लक्षाधीश


‘कौन बनेगा करोडपती’चा नववा सीझन नुकताच संपला. हे पर्व गाजवले महिलांनी. करोडपती तर एक महिला झालीच, पण घरसंसार सांभाळणाऱ्या, फारसं न शिकलेल्या आणि २५/५० लाख रुपये मिळवणाऱ्या इतर दोघींची कहाणीही स्फूर्तिदायक आहे.












‘कौ न बनेगा करोडपती’चा नवव्या सीझनमधील एकमेव करोडपती ठरलेली व्यक्ती एक महिला होती, जमशेदपूरची अनामिका मुजुमदार. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही कोट्यधीश होऊ शकलं नाही. मात्र, अन्य दोन महिला स्पर्धकांनी अवघ्या देशवासीयांची मने जिंकून घेतली.
त्यांनी देशातील महिलांपुढे आत्मविश्वास, स्वाभिमानाचा वस्तुपाठच ठेवला. या दोघी म्हणजे मुंबईच्या मीनाक्षी जैन आणि बिहारच्या नेहा कुमारी! दोघींतील समान धागा म्हणजे त्या अगदी सर्वसामान्य गृहिणी आहेत; पण तरी त्या केबीसीच्या हॉट सीटवर बसल्या अन् अनुक्रमे २५ व ५० लाख रुपयांची घसघशीत रक्कमही जिंकल्या! ज्या आत्मविश्वासाने अन् जिद्दीने त्या हा खेळ खेळल्या, त्याने खुद्द अमिताभ बच्चनही अचंब्यात पडले. प्रेक्षक अर्थात अवाक् झालेच. या दोघींनी देशभरातल्या महिलावर्गाला संदेश देऊ केलाय - गृहिणी म्हणून स्वत:ला कधीही कमी लेखूू नका. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास नेहमी जागृत ठेवा. त्यांचं भावविश्व, त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीची पार्श्वभूमी त्यांनी जेव्हा या खेळादरम्यान जगासमोर मांडली, ते ऐकून साऱ्यांच्याच ओठांवर शब्द उमटले - तुस्सी ग्रेट हो!
मीनाक्षी जैन मुंबईत राहतात. भारतातल्या लाखो महिलांप्रमाणे पती, दोन मुलं, सासरे असा संसार सांभाळतात. त्यांचा जन्म राजस्थानमधील कुंडा या लहानशा गावातला. माहेरी सहा बहिणी आणि एक भाऊ असा मोठा परिवार. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची. परिणामी, मीनाक्षी यांचं लग्न लवकर, वयाच्या १६-१७व्या वर्षीच झालं. साहजिकच त्या फक्त दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करू शकल्या. लग्न झाल्यावर पुढे शिकण्याचा प्रश्नच नव्हता. पण शिक्षणाविषयीची कमालीची ऊर्मी, जिद्द त्या मनात खोलवर बाळगून होत्या. शिक्षण पूर्ण करू न देता लवकर लग्न लावून देणाऱ्या आपल्या वडिलांना अन् दिगंबर जैन समाजालाही त्यांना एकदा तरी सांगायचे होते की, मुलांपेक्षा मुली तसूभरही कमी नाहीत! पण त्यांना तशी संधी मिळत नव्हती. आपल्या परिस्थितीचा बाऊ करत मीनाक्षी हातावर हात ठेवून बसल्या नाहीत.
काळाबरोबर कसे चालत राहता येईल, याची चाचपणी त्या घरातूनच का होईना, सतत करत राहिल्या. त्यासाठी त्यांनी एकमेव पर्याय निवडला, तो म्हणजे वाचन! मीनाक्षी भरघोस वाचत राहिल्या. पुस्तकं, वर्तमानपत्रं, इंटरनेट. हाती येणाऱ्या प्रत्येक साधनाचा त्या अक्षरश: फडशा पाडत राहिल्या. इतिहास, वर्तमानकालीन संदर्भ असोत की आणखी काही, त्या शब्दन् शब्द टिपत राहिल्या. त्यांचा हा धडाका पाहून त्यांच्या बहिणींनी त्यांचे नाव ठेवले ‘गुगल’! त्या वाचनाची टिपणंही काढत राहिल्या. या अफाट वाचनाने जगभरातील सर्व विषयांच्या ज्ञानाचे दरवाजे त्यांना खुले करून दिले. अत्यंत कठीण प्रश्नांची उत्तरंही सेकंदाचा विलंब न लावता जेव्हा त्यांनी दिली, तेव्हा त्यांचे सामान्यज्ञान पाहून अमिताभनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला! निरीक्षण, वाचन अन् आकलन या गोष्टींचे महत्त्व मीनाक्षी यांनी समजून घेतले. म्हणूनच दहावी पास असलेली ही महिला ५० लाखांची मानकरी होऊ शकली. मीनाक्षी यांचं वेगळेपण एवढ्यावरच संपत नाही. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करताना त्यांना कधी शिकवणी लावली नाही. त्या दोघांचा अभ्यास त्या स्वत:च घेत असत. तोसुद्धा इंग्रजीत.
मुलांना शिकवता-शिकवता आपण स्वत:देखील इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले, असे त्या अभिमानानं सांगतात. केबीसीत मीनाक्षी म्हणाल्या, ‘डिग्री बडी नहीं होती, ज्ञान बडा होता है...’ हे वाक्य त्यांनी शब्दश: सिद्ध करून दाखवलं. केबीसीच्या मंचावरून त्यांनी आपल्या वडिलांकडे आगळी मागणी केली. त्या म्हणाल्या, ‘तुमच्या अंत्यविधीवेळी मुलींना मुखाग्नी देण्याची परवानगी द्या!’ केवढे हे धाडस. जैन समाजातील बहुतांश कुटुंबांत आजही महिलांचं स्वातंत्र्य, शिक्षण, स्वावलंबन याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित आहे.
मीनाक्षी यांच्या बहिणीचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्या वडिलांना वाळीत टाकण्यात आले होते. घटस्फोट हे आजही या समाजात पाप समजले जाते. या घटनेचा मीनाक्षी यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. वडिलांची मानहानी सहन झाली नाही. जैन आणि अन्य समाजांतही मुलांना मिळणारा मानसन्मान मुलींना का लाभत नाही, या प्रश्नाने त्या अस्वस्थ झाल्या. काहीही होवो, एक दिवस केबीसीमध्ये सहभागी होऊन वडिलांना मी त्यांची मुलगी असल्याचा अभिमान मिळवून देईन, असा चंगच त्यांनी बांधला. तो त्यांनी पूर्ण केला अन् पित्याच्या अंत्यविधीवेळी मुखाग्नी देण्याची परवानगी साऱ्या जगासमोर मागितली. मीनाक्षी हे करू शकल्या, कारण वाचनाने त्यांना जगाचा आरसा दाखवला होता. रूढी, परंपरा, परिस्थिती यांपैकी काहीही त्यांना रोखू शकले नाही. वाचनाच्या भक्कम पायावर त्या ठामपणे उभ्या राहू शकल्या. मीनाक्षी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. केबीसीत जिंकलेल्या रकमेची गुंतवणूक करून त्यातून त्या ज्यांचे शिक्षण अडचणीत सापडले आहे, अशा मुलींना मदत करणार आहेत. निव्वळ स्व-सन्मानातूनच एवढा व्यापक दृष्टिकोन त्यांच्यात रुजू शकला असेल.
बिहारमधील नालंदा येथील नेहा कुमारी अशाच गृहिणी स्पर्धक म्हणून केबीसीच्या हॉट सीटवर विराजमान झाल्या. अत्यंत प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्वाच्या त्या दिसत असल्या, तरी त्या हास्यामागे बिहारसारख्या प्रदेशातील सामाजिक बंधनं, महिला म्हणून मिळत असलेली दुय्यम आणि अस्वस्थ करणारी वागणूक त्यांनी दडवून ठेवली होती, हे यथावकाश समोर आले. अन् तरीही त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असलेला कमालीचा आत्मविश्वास अनेकांना आश्चर्यात टाकून गेला. नेहा कुमारी पदवीधर आहेत, त्यांचे पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. तरी नेहा यांना काही सामाजिक, कौटुंबिक बंधनांशी दोन हात करावे लागताहेत. त्या म्हणाल्या, मी हसतमुख राहणारी व्यक्ती आहे. मला नेहमी खूप हसू येते. पण जाहीर कार्यक्रमात मला दिलखुलास, मनमोकळं हसताना माझ्या सासूने पाहिल्यास खैर नाही. घरी गेल्यावर त्या माझ्याकडे डोळे वटारून पाहतात. मी इथे आत्ताही हसते आहे खरी; पण घरी गेल्यावर ऐकावे लागेल - ‘काय फिदीफिदी हसत होतीस!’ म्हणजे फक्त एखाद्या मुलीचे लग्न झाले आहे म्हणून हा समाज तिला मनमोकळे हसूही देत नाही. त्यापुढे जाऊन नेहा कुमारी यांनी सांगितले, त्यांच्या परिवारात सुनेने दिराचे नाव घेतलेले चालत नाही. तसे केल्यास संस्कारहीन मुलगी म्हणून कायम हिणवले जाते! अमिताभ यांच्याशी चाललेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या दिराचा विषय निघाला, तेव्हा नेहा यांनी ही व्यथा मांडली. विवाहावेळी नेहा यांना त्यांच्या सासऱ्यांनी पसंत केले.
नेहा यांच्या भावी पतीशी त्यांची भेटही घालून देण्यात आली नाही. केबीसीत निवड होऊनही त्याचा फारसा आनंदही पतीच्या चेहऱ्यावर दिसू शकला नव्हता. याउलट ‘तिथे जाऊन ही काय करणार?’ अशीच भावना उमटली होती! या मानसिकतेमुळेच पदवीधर असूनही त्यांना नोकरी करता आली नाही. नेहा घरकामात तरबेज आहेत. कथित आदर्श सुनेप्रमाणे त्या स्वयंपाकात तसेच कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यात कोठेही कमी पडत नाहीत. टिपिकल गृहिणीचे जगणे त्या जगत असल्या तरी शिक्षणामुळे त्यांच्यातील स्व-सन्मानाबद्दलची जागरूकता टिकून आहे.
सभोवताली काय घडते आहे, याची दखल त्या घेत असतात. सोशल मीडिया, इंटरनेट या सध्याच्या काळातल्या ज्ञानसाधनांशी त्यांनी मैत्री केली आहे. त्यामुळेच त्या केबीसीत पोहोचू शकल्या. अन् तेथेही ‘परिस्थिती काहीही असो, दिलखुलास जगा, स्वत:वर विश्वास ठेवा,’ असे सांगणाऱ्या त्यांच्या बाण्याने साऱ्यांना जिंकून घेतले. या पर्वातील २५ लाख रुपये जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धकही ठरल्या. या महिलांनी जिंकलेली रक्कम महत्त्वाची नाही. त्यापेक्षा बिकट परिस्थितीतून वाट काढत बेधडकपणे जगासमोर येऊन अवघ्या महिलांच्या व्यथांना वाचा फोडण्याची त्यांची जिगर लाखमोलाची आहे. अन् त्यांना पाहून सामान्य गृहिणींनी स्वत:तल्या मीनाक्षी वा नेहाला शोधण्याचा प्रयत्न केल्यास हे परिवर्तन कोट्यवधीच्या रकमेपेक्षा अधिक मोलाचे ठरणार आहे!

- सारिका पूरकर-गुजराथी, नाशिक
queen625@gmail.com
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sarika-gujarathi-writes-about-inspiring-winners-of-kbc-5756163-PHO.html?ref=ltrec

रसिकांच्या प्रतिक्रिया 

तुस्सी ग्रेट हो !!
या दोघींनी देशभरातल्या महिलावर्गाला संदेश देऊ केलाय - गृहिणी म्हणून स्वत:ला कधीही कमी लेखूू नका. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास नेहमी जागृत ठेवा. त्यांचं भावविश्व, त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीची पार्श्वभूमी त्यांनी जेव्हा या खेळादरम्यान जगासमोर मांडली, ते ऐकून साऱ्यांच्याच ओठांवर शब्द उमटले - तुस्सी ग्रेट हो!

#Shiv Pachade
FB~ https://www.facebook.com/shiv.pachade