Friday, May 20, 2016

मराठी बोल

दोन मराठी माणसं एकत्र आली की मराठी  सोडून इतर भाषा बोलायला सुरवात करतात.... भले तोड़की मोड़की हिंदी असो वा English ... मराठी बोलायचा आग्रह नसतो मुळी ...  दोघातल्या एकाचा देखील..

इतर राज्यात कशाला महाराष्ट्रात राहणारी पर राज्यातील लोकं एकमेकांना भेटली की स्वत : च्या भाषेत  बोलायला सुरवात करतात .. इथे राहून ही मुलांना न चुकता मातृभाषा शिकण्या साठी class देखील लावतात..  ~  विद्या

#मराठी_बोल

दादा कारखानीस : एक आगळे व्यक्तिमत्व

ह्युस्टन, टेक्सास येथील दादा कारखानीस ह्यांचे नांव मुंबई-पुणे व्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, आणि ऑस्ट्रेलिया येथील जुन्या सी. के. पी. समाजात लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा सर्व थरातील, वयाच्या आणि व्यवसायाच्या व्यक्तींत आपुलकीने मिश्किलपणे वागून मिसळण्याचा आणि मदतीचा हात सदैव पुढे करण्याचा स्वभाव.

ह्युस्टन, टेक्सास येथील दादा कारखानीस ह्यांचे नांव मुंबई-पुणे व्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, आणि ऑस्ट्रेलिया येथील जुन्यासी.के.पी.समाजात माहित नसलेली व्यक्तीविरळाच. तसेच न्यूयॉर्क, आणि ह्युस्टन येथील इतर मंडळीतही ते दादा, भाई, भाईकाकाया नांवाने परिचित आहेत.याचे कारण म्हणजे त्यांचा सर्वथरातील, वयाच्या आणि व्यवसायाच्या व्यक्तींत आपुलकीने मिश्किलपणे वागून मिसळण्याचा आणि मदतीचा हात सदैव पुढे करण्याचा स्वभाव. नुकत्याच शिकागो येथे पार पडलेल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या १५ व्या अधिवेशनांत त्यांना "जीवन गौरवपुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. वास्तविकत: त्यांनी केलेल्या मराठी भाषेची, आणि समाजाची सेवा लक्षात घेऊन त्यांना साहित्य आणि समाजकार्य ह्या दोन्ही वर्गात मिळून बृहन महाराष्ट्र मंडळाने त्यांना केव्हांच सन्मानित करावयास पाहिजे होते. त्याकरता दादांचे समवयस्क आणि जुने स्नेही रमेश तथा दादा प्रधान ह्यांनी पुढाकार घेऊन जवळजवळ १२५ सह्यांचे निवेदन ह्यावर्षीच्या अधिवेशनाच्या कार्यकारिणीला पाठवून दिले. ह्या निवेदनाला दादांच्या सर्व परिचित व्यक्तींनी भरघोसपाठींबा दिला.त्यांत मुंबई-पुण्याचे वंदना गुप्ते, प्रशांत दामले, जयंत सावरकर, विजय केंकरे इत्यादी नामवंतकलावंतांचासमावेश होता. ह्या निवेदनावर चर्चा होऊन त्यांना "जीवन गौरव पुरस्कार" देण्यात आला. बृ. म. मं. च्या इतिहासातील हापहिला उपक्रम.

गेल्या शनिवारीच त्यांना "ह्युस्टन मराठी मंडळाने" त्यांच्यासमाजकार्याबद्दलआणिमराठीभाषेच्या
सेवेबद्दलतेथीलबऱ्याचवर्षांपासूनस्थायिकअसलेल्याव ह्युस्टन मराठीमंडळातप्रारंभापासून
कार्यरत असलेल्या जेष्ठनागरिकडॉ.सिंधुताईहर्डीकरयांच्याअध्यक्षतेखालीगौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हासमारंभ घडवून आणण्यात ह्युस्टन मराठी मंडळात कार्यरत असलेले व या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समीर करंदीकर आणि दादांचे जुने सहकारी प्रमोद मेहता यांचा मोलाचा भाग होता.
आपल्या आभार भाषणात ते म्हणाले....
"माणूस जन्मभर ऋणी असतो, कुणाचा न कुणाचा तरी! प्रथम जन्मदात्यांचा, मग असतो गुरुजनांचा आणि शिषण संस्थेचा, नोकरीत शिरल्यावर वरिष्ठांचा. मग ऋणफेडायचंअसतंते समाजाचं आणि शेवटी जन्मभर ज्या मातीत राहिले त्या मातीचं. हे ऋणफेडतांना जे सुख मिळते, त्याची तुलना कशाशीही करता येणे शक्य नाही.

http://m.maharashtratimes.com/international/global-maharashtra/-/articleshow/10075208.cms

Thursday, May 19, 2016

तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो..

तुझी आठवण ..........


कधी न येई ओठी माझ्या नाव तुझे ............ पण,
डोळ्यांमधील हजारो हाका तुझ्याच साठी
वादळातही खचे ना ज्याचा धीर कधीही ....... पण,
बुडते माझे जहाज तुझ्याच साठी

कुठेतरी मग भरकटलेला वणवनणारा प्रवास होतो...
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
दिसूनही मी दिसलो नाही ,
जवळ तुझ्या मी होतो इतका,
बघुन घे तू नजर फसावी,

असा तुझ्या आसपास होतो,
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो........
कुठेतरी मग भरकटलेला....
धीर समजलो ज्या हाकेला,
केवळ तो आवाज निघाला,
सदैव स्वप्ने बघणारयाचा,
असा कसाच का भ्रमनिरास होतो,
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
कुठेतरी मग भरकटलेला....
रात्र काल एकटीच होती चांद तिला भेटलाच नाही,
हायाय या साध्या विरहाचा त्रास किती पण दवास होतो,
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
कुठेतरी मग भरकटलेला वणवनणारा प्रवास होतो...
तुझी आठवण येते तेव्हा तुझी शपथ मी उदास होतो....
कुठेतरी मग भरकटलेला...


Saturday, May 14, 2016

क्या बात है

पुस्तकाची पाने पलटताना एक विचार
मनात येतो
आयुष्याची पाने अशीच पलटली तर
"क्या बात है" ...!!!

स्वप्नात अनेक गोष्टी पूर्ण होतात पण
खऱ्या आयुष्यात पूर्ण झाल्या तर
"क्या बातहै"..!!!

काही लोक स्वार्था साठी शोधतात
मला पण
निस्वार्थीपणे कोणी शोधत आलं तर
"क्या बात है"...!!!

मन मारून काळीज कोणीही घेऊन जाईल
माझे पण
मन जिंकून काळीज नेणारा कोणी भेटला तर
"क्या बात है" ...!!!

सोबत असेपर्यंत तर सगळ्यांना मी हसवत
ठेवीन पण
मी गेल्यानंतरही ते हसत राहिले तर
"क्या बात है" ...!!!
#अनामिक

Friday, May 13, 2016

नामस्मरण

तरुण वयात नामस्मरण करावे.
नक्की वाचा -
तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तुत्व करेल त्याच कर्तुत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते. कारण ह्या वयात मूले हुशार असतात matured असतात.तरुण रक्त अंगात सलसलते. ह्या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगति करण्यासाठी व आपल्या  देवाची शक्ति प्राप्त होवून ह्या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते.म्हातार पनि नामस्मरण होत नाही कारण त्यानी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करन्यासाठी घालविलेले असते. त्यामुळे त्यांच्या कडून नामस्मरण झाले तरीही ते देवाला पोहचते. पन दैविशक्ति त्यांना मिलत नाही. तर ही शक्ति तरुण वयातच मनुष्याला मिळते. नामस्मरण हे तरुंनांना जीवनात प्रगति करण्यासाठी एक अमृत असते.त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ति मिलते.नामस्मरण का कारायचे असते? कारण तरूण वय हे अल्लड़ असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते मग त्या मनाला व विचारांना स्थिर फक्त नामस्मरणच करते.त्यांना ह्या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधि फसवेल, कधी घात करेल किंवा जीवनात कधी मृतु येईल हे सांगता येत नाही. पण नामस्मरनाने खुप काही समस्या जीवनात सुटु शकतात. हल्लीच्या मुलांना नेट टीवी मोबाइल ह्याचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धि स्थिर नाही. सतत तेच तेच जीवन जगल्या मुले वाइट विचार मनात येतात. बारीक सारिक गोष्टींवरून चिड़तात. लगेच राग येतो काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुसर्यांचा घात करतात. पैशांसाठी व्याभिचार करतात. पैसा श्रेष्ट आहे संस्कार कमी आहेत अशी ह्यांची विचारसरनि असते. त्यात त्या स्पर्धा परीक्षा स्वताच्या आत्महयाला व शरीराला त्या परीक्षेत सतत गुंतवून ठेवले असल्यामुळे त्यांना जीवन हे नीरस वाटते. दुसर्यांच्या पुढे जाने खुप पैसा कमविने हेच ह्यांचे ध्येय असते.पण मन ह्या सुखवस्तु मिळाल्यामुळे विचलित होवून काही वेळेला मुले वाम मार्गाला जातात. कारण वाम मार्गाला जान्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे. ह्या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते. नामस्मरनाने एक वेगळीच दैवीशक्ति प्राप्त होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले सर्व लक्षात राहते. वाइट कर्म करायला मन त्या मुलांचे घाबरते. कारण मनात नामाची माल जपली जाते.तरूण मुले वाइट कर्म करत नाही त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही. म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. नामस्मरणामुळे खुप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जस जसेनामस्मरण वाढते तस तसे दैविक शक्ति वाढते. त्यामुळे त्यांना जीवनात कितीही वाइट प्रसंग आला कि देव त्यांचे रक्षण करते. त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते. देवाचे सरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते. चेहर्यावर makeup ची गरज भासत नाही.तर आपोआप तेज येते. तरुण मुले आनखी सूंदर दिसू लागतात. ईश्वरी अंश त्यांच्यात तयार होते.चिंता भय ह्याची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतलेली असते.देवालाही सूंदर ताजे फुल आवडते म्हणजेच तरुण काळा असो या गोरा पण त्याचे सूंदर निष्पाप मन देवाला आवडते. म्हणून तरुण वयात नामस्मरण करायचे असते. म्हातारपन आता कोणी पाहिले आहे. मृतु कधि येईल सांगू शकत नाही आज मी लेख लिहिते उद्या तुम्हाला दिसेन की नाही सांगू शकत नाही. म्हणून देवाचे दिवसातून एकदातरि नामस्मरण करा कारण जीवनातला खरे  अमृत तेच आहे.
~ संग्रहित लेख