Showing posts with label मराठी सण व उत्सव. Show all posts
Showing posts with label मराठी सण व उत्सव. Show all posts

Friday, March 2, 2018

धुलिवंदन

आज धुलिवंदन
*****
आपल्या महाराष्ट्रात तरी हा सण साजरा करत असतील का कधी ऐकलेलं नाही।

धुलिवंदनाच्या दिवशी काही ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते ।
******

१. धूलिवंदन
होली ब्रह्मांडका एक तेजोत्सव है । होलीके दिन ब्रह्मांडमें विविध तेजोमय तरंगोंका भ्रमण बढता है । इसके कारण अनेक रंग आवश्यकताके अनुसार साकार होते हैं । तथा संबंधित घटकके कार्यके लिए पूरक एवं पोषक वातावरणकी निर्मिति करते हैं । इन रंगोंका स्वागत हेतु होलीके दूसरे दिन ‘धूलिवंदन’ का उत्सव मनाया जाता है ।

२. धूलिवंदन का महत्त्व
२ अ. त्रेतायुग के आरंभ में श्रीविष्णुद्वारा अवतार कार्य के आरंभ की स्मृति मनाना
त्रेतायुग के आरंभ में पृथ्वीपर किए गए पहले यज्ञ के दूसरे दिन श्रीविष्णु ने यज्ञस्थल की भूमि को वंदन किया एवं वहां की मिट्टी दोनों हाथोंमें उठाकर उसे हवा में उडाया अर्थात श्रीविष्णुने विभिन्न तेजोमय रंगोंद्वारा अवतार कार्य का आरंभ किया । उस समय ऋषि-मुनियोंने यज्ञ की राख अर्थात विभूति शरीरपर लगाई । तब उन्हें अनुभव हुआ कि यज्ञ की विभूति पावन होती है । उसमें सभी प्रकार के रोग दूर करने का सामर्थ्य होता है । इसकी स्मृति के लिए धूलिवंदन मनाया जाता है । इसे शिमगा भी कहते हैं ।
२ आ. अग्नितत्त्व का लाभ प्राप्त करना
होली के दिन प्रज्वलित की गई होली में प्रत्यक्ष अग्निदेवता उपस्थित रहते हैं । उनका तत्त्व दूसरे दिन भी कार्यरत रहता है । इस तत्त्व का लाभ प्राप्त करने हेतु तथा अग्निदेवता के प्रति कृतज्ञता व्यक्त करने हेतु होली के दूसरे दिन अर्थात फाल्गुन कृष्ण प्रतिपदा को सुबह होली के राख की पूजा करते है । उसके उपरांत उस राख को शरीरपर लगाकर स्नान करते हैं । इसे धूलिवंदन कहते है ।

३. धूलिवंदन कैसे मनाए ?
अ. सूर्योदय के समय होली के स्थानपर पहुंचे ।
आ. होलीपर, दूध एवं पानी छिडककर उसे शांत करें ।
इ. होलीकी विभूति को वंदन कर प्रार्थना करें …
वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ।।
अर्थ : हे धूलि, तुम ब्रह्मा-विष्णु-महेशद्वारा वंदित हो, इसलिए भूते देवी, तुम हमें ऐश्वर्य देनेवाली बनो एवं हमारी रक्षा करो ।’
ई. पश्चात् नीचे बैठकर होलीकी विभूतिको अंगूठा तथा अनामिकाकी चुटकीमें लेकर अनामिकासे अपने माथेपर अर्थात आज्ञाचक्रपर लगाएं ।
उ. उसके उपरांत वह विभूति पूरे शरीरपर लगाएं ।

Thursday, October 6, 2011

दसरा

दसरा



’दश-हरा’ म्हणजे वाईटाचा अंत…….अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी नवरात्रीनंतर येणारा हा दहावा दिवस………याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून याला ’विजयादशमी’ असेही म्हणतात.संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात हा सण विविध प्रकारे साजरा होतो. केवळ भारतातच नव्हे तर भारताबरोबरच हा सण जावा, सुमात्रा व जपानमधेही साजरा केला जातो. नेपाळचा तर हा राष्ट्रीय सण आहे.

या दिवशीचे आणखी एक विशेष असे की याच दिवशी द...ुर्गामातेने महिषासुराचा वध केला.सलग नउ दिवस चाललेले हे युद्ध दहाव्या दिवशी संपले….तोच हा दसरा. साडेतीन मुहूर्तापैकी एक. आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणुन द्यायचे आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करायची. मनातले राग, दु:ख सगळ काही दहन होणाऱ्या रावणाच्या पुतळ्याबरोबर तिथेच सोडायचे आणि एक नवी प्रसन्न सुरुवात करायची. अज्ञातवास संपवून निघालेल्या पांडवांनी याच दिवशी शमीवृक्षाच्या ढोलीत लपवलेली हत्यार बाहेर काढून त्यांची पुजा केली होती. ह्यादिवशी सिमोल्लंघन केले जाते…….पुर्वी राजे याच दिवशी नवे प्रदेश काबिज करण्यासाठी निघत असत.

सौजन्य: Talyatil Ganpati (सारसबाग पुणे)

Monday, July 11, 2011

आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास

आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास


पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करा...वा लागला.... त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्यदैत्याला मारले. ही जी शक्तीदेवीतीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.
व्रताचा शास्त्रोक्त विधी :
आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहावे. एकादशीला प्रातःकाळी स्नान करावे, उपोषण करावे, तुलसी वाहून श्रीविष्णूपूजन करावे व रात्री हरिभजनात जागरण करावे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे.

आषाढी एकादशी
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' म्हणण्याचे कारण : मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात.
आषाढी एकादशीचे महत्त्व : देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.
पूजाविधी : या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर' या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
पंढरपूरची वारी : वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.

श्री विठ्ठलाला तुळस आणि मंजिरींचा हार का वहातात ? तुळस :
तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो. तुळशीची मंजिरी मंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णुतत्त्वाला जागृत करणारी आहे. तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणार्‍या चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल, तसे त्याचे विष्णुतत्त्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्गुणस्वरूप चैतन्याची अनुभूती येते. मंजिरींचा हार :
श्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरींचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रिया-शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.
सौजन्य : https://www.facebook.com/ayushyawar.bolu.kahi.vny.cmyk

Sunday, July 10, 2011

आषाढी एकादशी

आषाढी एकादशी सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!


हाक वारीची आली, पावलं निघाली
वरसाची ताटातूट, जिवाला लागली

सोबती झाले गोळा, गळाभेट झाली
भारावली मनं, पालखी घेतली.

जनाई मुक्ताई, सोबत माऊली,
नामा तुकोबाची जोड, डोई तुळस ठेवली,

भाळी चंदनाचा टिळा, माळ गळ्यात घातली
केला विठूचा कल्लोळ, दिंडी पंढरी चालली.

टाळ मृदुंगाचा दंगा, हरी नामाचा गजर.
झुले पालखीची झूल, उते प्रेमाचा बहर.

अबिर गुलालाचा रंग, अभंगाचा जोर.
पाहाया पांडुरंग, मन जाहले अधिर.

चालू पंढरीची वाट, खेळू फुगडी रिंगण.
शेवट विसावा, चंद्रभागेचे अंगण.

नाम्याच्या पायरी, भक्तीचं लिंपण.
सावळ्या पाऊली, कैवल्य शिंपण.

हात जोडूनि मागतो, देवा विसर न व्हावा.
जन्म घडो पुन्हा पुन्हा, व्हावी वारीची सेवा.

पुढे परतुनी येऊ, आता निरोप असावा.
जनी विठ्ठल दिसावा, मनी विठ्ठल रुजावा.

- अनामिक

Friday, May 6, 2011

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया
अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया आहे. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य’(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे.

अर्थ अक्षय तृतीयेचा!



आज अक्षय तृतीया. संवत्सरातील साडेतीन मुहूर्तांपैकी अखेरचा पण अर्धा. या मुहूर्ताचे भारतीय संस्कृतीमधील महत्त्व आणि पारमाथिर्क अर्थ उलगडणारा हा विशेष लेख..

'जशी उसात हो साखर। तसा देहात हो ईश्वर' अशी एक गीतपंक्ती आहे. 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा' असं संतश्रेष्ठ चोखामहाराज म्हणतात. तसंच अध्यात्माचं आहे. ते आपल्या सगळ्या आयुष्याला व्यापून आहे. साऱ्याच व्यवहारात, सणवारात, रूढी-परंपरांमध्ये ते मिसळून गेलं आहे. 'अध्यात्मविद्या विधानां' असं भगवंत स्वत: भगवद्गीतेत विभूतियोग सांगताना म्हणतात. 'जसे दुधामध्ये लोणी। तसे देही चक्रपाणि.' तो सर्वगत असला तर गुप्त आहे. विरजण, मंथन या प्रक्रिया जशा लोण्यासाठी आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे सारासारविवेक हाच अध्यात्माप्रत नेतो.

पूर्ण संवत्सरांत साडेतीन मुहूर्त मानले जातात. त्यातूनही अध्यात्माची प्रक्रिया लपलेली दिसेल. नवरात्रात नवविधा भक्तीचं जागरण घडतं. मग दश इंदियांना जिंकून येतो तो दशहरा. हे चित्तवृत्तींचं सीमोल्लंघन. विषयवासनांवर विजय मिळवणारी ही विजयादशमी. 'अंतरीचा ज्ञानदिवा' चेतवणारा हा पहिला शुभमुहूर्त. मग कातिर्क शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा. या शुभदिनी 'अंतर्बाह्य जग आणि मन' सारेच उजळून निघते. दिव्यांच्या आवली म्हणजे पंक्तीच पंक्ती प्रकाशमान होतात. मेरूदंडाचं प्रतीक असणारी गुढी आणि चैत्रांतल्या लखलखीत सूर्याचा प्रकाश आणि तेज प्राशन करणारे गुढीवरचे रजताचे चकचकीत पात्र. ज्ञानग्रहणाचा संकेत देणारा गुढीपाडवा हा तिसरा मंगमलय मुहूर्त. अक्षयतृतीया हा शेवटचा मुहूर्त. पण हा अर्धा असला तरी पूर्णत्व देणारा बिंदू आहे.

आपल्या संस्कृतीत असे शुभमुहूर्त साडेतीन. नादब्रह्माचे मंत्राक्षररूप म्हणजे प्रणव. त्या ओंकाराच्या मात्रा साडेतीन (अ, ऊ, म आणि चंदबिंदू). मूलाधार चक्रात वेटोळे घालून बसलेल्या त्या कुंडलिनी शक्तीचे वेढेही साडेतीन. मानवी कुडीचे मापही ज्याच्या त्याच्या हाताने साडेतीन आणि आदिशक्तीची प्रसिद्ध पीठेही साडेतीनच.

'ऋतूंना कुसुमाकर' हा वसंत ऋतू. नव्या नवतीचा ऋतू. नव्या निर्मितीचा, सृजनाचा ऋतू. चित्रविचित्र अशा सृष्टी सौंदर्याने नटलेला चैत्र. 'शिव-गौरी-दोलोत्सव या चैत्रात केला जातो. त्याच्या सांगतेचा दिवस म्हणजे अक्षयतृतीया. 'वेदानां सामवेदोस्मि' असं भगवंत श्रीकृष्ण गीतेत सांगतात. ईशतत्त्वाची गायनाच्या आधाराने आळवणी हे सामवेदाचे स्वरूप. ऋग्वेद, यजुवेर्द, सामवेद आणि अथर्ववेद अशा चार वेदांमध्ये तो तृ़तीय आहे, अक्षय आहे. त्रिवेणी संगमातल्या गंगा, यमुना, सरस्वती. त्यातली सरस्वती ही गुप्त आहे, गुह्य आहे. ईश्वरही खोल आहे, गूढ आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्गही आपल्या आत आहे. तशीच सरस्वती ही गुप्तगंगा. ती तृतीय आहे.. अक्षय आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे मुख्य तीन देव. महेश ही अंतिम सत्ता आहे. शिव हा विश्वाचा आदिगुरू आहे. शिव ज्ञानरूप आहे. त्याचा तिसरा नेत्र मायेचे निरसन करतो. त्रिदेवांत शिव तृतीय आहे. तसेच तो अक्षय आहे. आपल्या संगीतात सप्तस्वरांमध्ये गंधार तिसरा आहे. नाभिकमल हे त्याचे उगमस्थान आहे. गळ्यात हुकमी 'गंधार' असणे ही नादब्रह्माची कृपा आहे. गंधारावर विजय म्हणजे 'गंधर्व'. 'गंधार' तृतीय आहे, अक्षय आहे. 'ग'कार हे तिसरे व्यंजन. विद्यादेवता गजाननाचे हे स्वरूप. १४ विद्या, ६४ कलांच्या ज्ञानाचे स्वरूप. 'ग' कार हे तिसरे व्यंजन विद्यादेवता गजाननाचे हे स्वरूप. 'गं' हे गणरायाचे आदिबीज. त्याचे स्थान तृतीय आहे, अक्षय आहे. रज, तम, सत्त्व हे त्रिगुण. त्यातला शुद्ध सत्त्वगुण हा परमार्थपोषक. 'तुका म्हणे येथे सत्त्वाचे सार्मथ्य। करावा परमार्थ अहनिर्शी' तो हा सत्त्वगुण. तो तृतीय आहे, तसाच अक्षय आहे. इडा, पिंगळा. सुषुम्ना या तीन नाड्या. सुषुम्ना नाडी हा कुडीतला आधारवड आहे. सहस्त्रार चक्राच्या 'अमृततळ्या'पर्यंत पोहोचविणारी ही वाट आहे. सुषुम्ना नाडी तृ़तीय आहे, अक्षय आहे. प्रणवाच्या साडेतीन मात्रांतली 'म' बाराची मात्रा तिसरी. प्रणवरूप गणेशाचे 'मकार महामंडळ' हे मस्तकस्थान आहे. आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र हे कुंडलिनी जागृतीचे महत्त्वाचे अंतिम टप्पे हे 'म'कारांत त्यामुळे येतात. 'म'कार उच्चारताना होणारे दोन्ही ओठांचे एकत्र येणे हे अद्वैताचे सूचक आहे. ओंकाराची 'म' मात्रा तृतीय आहे. अक्षय आहे. 'दया, क्षमा, शांति। तेथे देवाची वस्ती' असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात. सहा विकारांचा अपशम आणि अहंकाराचा समूळ उच्छेद यांची परिणती 'शांती'त होते. शांती ही अत्यंत दुर्लभ आहे. ती विरक्तांच्या गळ्यांत माळ घालते. देवाच्या निवासस्थानांत 'शनि' तृतीय आहे, अक्षय आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही आदिशक्तीची तीन प्रमुख रूपे. नीरक्षीरविवेक करणाऱ्या 'सोहं, अहं स: 'या हंसावर (परमहंस स्थितीवर) आरुढ असणारी, सार देणारी सारदा, सरस्वती, तृतीय आहे, अक्षय आहे.

'अक्षय-तृतीय' ची ही यादीही अक्षय आहे. परमार्थाच्या अत्युच्य अवस्थेला 'तुरीय' किंवा 'तुर्या' असे नाव आहे. जिवा-शिवाचे पूर्ण ऐक्य झाल्यावर ती दिव्य अनुभूती कथन करायला कुणीच उरत नाही. ज्ञान, ज्ञाता, झेय ही त्रिपुटीच विलयाला जाते. मग असा विचार येतो की अक्षयतृतीयाचे मूळ रूप 'अक्षय-तुरीया' वर नसेल! परमार्थाच्या साधकांसाठी 'अक्षय-तुरीया' साधावी, याशिवाय दुसरे आशीर्वचन कोणते?

Sunday, May 1, 2011

मी मराठी तर्फ़े महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!
माय मराठी पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही
शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही |
असतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही
संपातील सारे पण स्वराज, महाराष्ट्र कधी ही संपणार नाही ||


जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा॥।
महाराष्ट्र ही पराक्रमी व शुर लोकांची, संतांची भुमी आहे...
आणि आम्हाला महाराष्ट्रच्या भुमीत जन्मल्याचा सार्थ अभिमान आहे..



महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०५ हुतात्म्यांच्या बलिदानास मानाचा मुजरा.
१ मे महाराष्ट्र दिन आणि हुतात्मा दिन चिरायू होवो .


 

महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले , महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले.... 
उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा
जयजयकार तयाचा आसमंती गर्जावा
सांडीले रुधीर जयानी महाराष्ट्रासाठी
जन्म तयाचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा...
जय  हिंद !!  जयमहाराष्ट्र !!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....



महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले .. मराठा तितुका मेळवावा ..महाराष्ट्र धर्म वाढवावा.बेळगाव , भालकी निपाणी हे भाग अजून महाराष्ट्रात सामील होणे अजून बाकी आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून अपूर्ण आहे.





Friday, April 8, 2011

Monday, April 4, 2011

गुढीपाडवा

गुढीपाडवा 


गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.

* ब्रह्माने विश्व निर्मिती या दिवशी केली.
* विजयी श्रीराम अयोध्येला परत आले.
प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा वध करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.

* शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्षप्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.

* शालिवाहन राजाच्या नावाने नविन कालगणना शालिवाहन शक चालू केले.

गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासुन तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते. गुढी नंतर पाटावर उभी केली जाते.

सौजन्य: 

Wednesday, March 2, 2011

महाशिवरात्र

                                                                                 महाशिवरात्र !!
                    || श्री जटाशंकर प्रसन्न ||



'महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गून महिन्याच्या कृष्‍ण त्रयोदशीला हे पर्व असते. महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतुचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे.

'शिव' म्हणजे कल्याण. म्हणून भेदभाव न करता शिवशंकर भाविकांवर चटकन प्रसन्न होतो. त्यांच्या जीवनातील दु:ख दूर करतो.

गौरी अर्थात पार्वतीच्या या पतीचे वास्तव्य नेहमी स्मशानात असते. स्मशानातील प्रेताची राख ते सर्वांगाला भस्म म्हणून लावतात. गळ्यामध्ये सर्पहार असतो. विष पिऊन कंठ निळा झाल्याने त्याला 'नीलकंठ' म्हणूनही संबो‍धले जाते.

महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्‍याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात.

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.

महाशिवरात्रीचे व्रत कुमारीका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो.

शिवरात्री वर्षभरात प्रत्येक महिन्यात येत असते. मास महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.

सौजन्य:महाशिवरात्र 
 मराठी शुभेच्छापत्रे 

Sunday, February 27, 2011

मराठी दिन

 मराठी दिन!!!



आज सोनियाचा दिन, आज मराठीयाचा  दिन ॥
सर्वाना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली.

शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
- सुरेश भट

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.

सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ. स. ७३९) येथे आहे. श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.

श्री चामुंडराये करवियले ।
श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।

या प्रकारे त्या शिलालेखात उल्लेख आढळतो.

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा केला जातो.

source:FOR MORE

Saturday, September 11, 2010

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी 


आपल्या भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. गणरायाची जन्म कथा अशी आहे. एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आत मध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.

काही वेळाने भगवान शंकर तिथे आले. व आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले.


पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेंव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नांव ठेवले. हा दिवस चतुर्थी चा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्व आहे.

या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्या महाराष्ट्नत फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. ह्या गणेश उत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली

Tuesday, August 24, 2010

रक्षाबंधन


रक्षाबंधन 

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.


स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.


रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.


बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.


भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते.


बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते.


देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सां‍गितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती.


रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते.


''स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील.


समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.

SOURCE:RAKSHA BANDHAN

Monday, July 26, 2010

आषाढी एकादशी




आषाढी एकादशी

हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.

पौराणिक काळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून ''तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल'' असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला.
परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.

सर्वेपि सुखिन: सन्तु ।
सर्वे सन्तु निरामया ।
सर्वे म्रदाणि पश्यन्तु ।
मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।


Sunday, July 25, 2010

Friday, February 19, 2010

शिवाजी महाराज जयंती



शिवाजी   महाराज  जयंती 


सिंहाच्या जबड्यात,घालुनी हात,मोजीन दात..ही जात मराठ्यांची!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..