Wednesday, January 29, 2020

Saturday, January 25, 2020

Friday, January 24, 2020

संवाद


तात्याराव: आपल्याला स्वत:चं सैन्य उभं करणं फार गरजेचं आहे.

सुभाषबाबू: हो, ते आहेत. पण सध्या ते अशक्य वाटत आहे. 

तात्याराव: आपल्या तरुणांनी ब्रिटिशांच्या आर्मीत व पोलीसात समावेश करायला हवा.

सुभाषबाबू: का? त्याने काय होईल??

तात्याराव: वेळ आल्यावर त्यांच्या हातातील बंदूकीची नळी कोणाकडे करायची, ते ठरवता येईल. 

या एका वाक्याने खूप मोठा परिणाम झाला.

सुभाषबाबूंचे डोळे विस्फारले गेले. ते चटकन सावरकरांपुढे नतमस्तक होण्यासाठी वाकले. तात्यारावांनी त्यांचे दोन्ही खांदे धरले. डोळ्यात किंचित आनंदाश्रू तरळले. दोन्ही चेहरे प्रसन्न दिसत होते. गळाभेट झाली. दोन सुर्य जणू एक भासत होते.

याच दिवशी देशाच्या दोन्ही राष्ट्रभक्त तेजस्वी सुर्यांनी देशाचे भविष्य ठरविले. त्यांच्या योजनेने ब्रिटिशांची मस्ती तर जिरवलीच, पण आमच्याविना देशाचा तारणहार दूसरा कोण नाही; असे समजणा-या अहिंसावाद्यांचेही गर्वाहरण केले. 
अहिंसेच्या पुजा-यांना सुभाषबाबू आपल्या आझादहिंद सेनेसोबत अंदमानात दाखल होताच 'चले ज्जाव'ची घोषणा करावी लागली.

तात्यारावांची योजना फळास आली. ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलेल्या तुकडीने अखेर बंदूकीच्या नळ्या ब्रिटिशांच्याच दिशेने वळवल्या. आणि न भूतो 'अाझाद' हिंदचा विजय झाला!!

अश्या महान राष्ट्रभक्ताची आज जयंती!

'सुभाषबाबूंच्या पावन स्मृतीस त्रिवार अभिवादन'

"चला तनामनात सुभाषचंद्र जागवू"

©कल्पेश जोशी

Thursday, January 23, 2020