Wednesday, April 29, 2020

आदि शंकराचार्य जयंती

आदि शंकराचार्य जिन्हें भगवान शिव का अवतार भी माना जाता है उनकी जयंती 28 अप्रैल को देशभर में मनाई जाती है
 हिंदू धर्म की महान शख्सियत को उनके जन्म दिवस के अवसर पर सादर नमन. 
देश के चारों कौनों में अद्वैत वेदांत मत का प्रचार करने के साथ ही आपने पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारों दिशाओं में मठों की स्थापना की इन्हें पीठ भी कहा जाता है।

वेदांत मठ – दक्षिण भारत में आपने वेदांत मठ की स्थापना श्रंगेरी (रामेश्वरम) में की। यह आप द्वारा स्थापित प्रथम मठ था इसे ज्ञानमठ भी कहा जाता है।

गोवर्धन मठ – इसे आपने पूर्वी भारत (जगन्नाथपुरी) में स्थापित किया। यह आदि शंकराचार्य जी द्वारा स्थापित दूसरा मठ था।

शारदा मठ – पश्चिम भारत (द्वारकापुरी) में आपने तीसरे मठ की स्थापना की इसे कलिका मठ भी कहा जाता है।

बद्रीकाश्रम – इसे ज्योतिपीठ मठ कहा जाता है। यह आप द्वारा उत्तर भारत में स्थापित किया गया।
Source fb


Sunday, April 26, 2020

उपक्रम

हाय एव्हरीबडी..

'बिइंग वुमन'ची नवीन आणि आकर्षक वेबसाईट..

या नवीन वेबसाईटमुळे आता आपण एकमेकांशी फास्ट कनेक्ट होणार आहोत..!!
करोनामुळे या वेळचा अंक आम्ही तुमच्यापर्यंत ई-पेपरच्या स्वरुपात पाठवला आहे...
आपल्या वेबसाईटवर जाऊन बिइंग वुमनचे यापूर्वीचे अंकपण तुम्ही वाचू शकाल....

वाचा आणि अभिप्राय द्या... वाट बघतोय....
घरीच राहा....सुरक्षित राहा...

ई-पेपर, वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, नवनवीन सदरं वाचा या नव्या वेबसाईटवर!

Going Digital With Keeping Our Roots with The Print!!

Saturday, April 25, 2020

परशुराम कथा

वंशज हूँ परशुराम का,शास्त्र मेरी गाथा है🚩🚩🚩
हिन्दू धर्म में जन्मा हूँ, भारत मेरी माता है🚩🚩🚩

भगवान विष्णु जी के छठवें अवतार भगवान श्री #परशुराम जी की जयंती पर समस्त देश एवं प्रदेशवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं 🙏🏻🙏🏻🙏🏻

पौराणिक मान्यता अनुसार अक्षय तृतीया के दिन किए गए शुभ एवं पुण्य कार्य अनंत और अक्षय फल देने वाले होते हैं। इसी मान्यता ने संपूर्ण जनमानस को आज के दिन अधिकाधिक स्थिर वैभव, शांति और पुण्य अर्जित करने हेतु प्रेरित किया है। आज के दिन स्वर्ण आभूषण आदि का क्रय शुभ एवं स्थाई माना जाता है। आज का दिन बिना किसी लग्न और मुहूर्त के विचार के समस्त शुभ और मांगलिक कार्य करने हेतु सर्वश्रेष्ठ समझा जाता है।  इसीलिए बिना किसी शुभाशुभ के विचार के विवाह आदि मांगलिक कार्य बहुतायत से संपन्न किए जाते हैं। 

आज का दिन भगवान परशुराम के जन्मोत्सव के रुप में भी मनाया जाता है। पौराणिक मान्यता अनुसार भगवान परशुराम विष्णु के छठे अवतार हैं। उन्हें भगवान विष्णु का "आवेशावतार" भी माना जाता है। परसुराम का उल्लेख कई पुराणों, महाभारत और रामायण आदि ग्रंथों में प्रचुरता और प्रमुखता से पाया जाता है।

परशुराम एकमात्र अवतार हैं जो सतयुग, त्रेता और द्वापर तीनों युगों में महत्वपूर्ण रूप से उल्लिखित है। परशुराम का अवतरण तत्कालीन समाज में व्याप्त अराजकता, अत्याचार,अनाचार, दुराचार को समाप्त करने के लिए हुआ माना जाता है जिसे उन्होंने भगवान शंकर द्वारा, इसी उद्देश्य के लिए प्रदत्त "परशु"नामक अस्त्र से समाप्त किया। ऐसी मान्यता है कि उन्होंने 21 बार अनाचारी  शासकों का संहार किया।

त्रेता युग में सीता स्वयंवर हेतु खंडित हुए "पिनाक" शिव धनुष के कारण भगवान परशुराम का मिलन राम से हुआ। अपने क्रोध अतिरेक के कारण वे राम को नहीं पहचान पाए,परंतु श्रीराम द्वारा अत्यंत विनम्र भाव से उन्हें वस्तु स्थित समझाई गई और उन्हें स्मरण कराया गया कि वह ब्राह्मण हैं "नव गुण परम पुनीत तुम्हारे" कहकर श्रीराम द्वारा स्मरण कराए जाने पर उन्होंने राम को पहचाना, और अपनी संशय समाप्ति भगवान विष्णु द्वारा प्रदत्त "सारंग" नामक धनुष की प्रत्यंचा चढ़ाने का अनुरोध किया और संशय मिट जाने के पश्चात वह जनक की सभा से शालीनता पूर्वक,युग-संरक्षण का दायित्व प्रतीकात्मक रूप से, "सारंग" नामक दैवी धनुष के साथ श्रीराम को सौपकर, तपश्चर्या हेतु वन प्रस्थान कर गए।

यह घटना शास्त्रों में इस रूप में वर्णित है कि धर्म रक्षा का दायित्व जो अब तक परशुराम को दिया गया था उसे अब आगे त्रेता युग में श्री राम संभालेंगे।इस घटना के बाद ही "आवेशावतार" परशुराम "तेजो हरण" के उपरांत कल्पांत पर्यंत भूलोक पर तपस्यारत रहने हेतु वन गमन कर गए। ऐसी मान्यता है की परशुराम पृथ्वी के सात चिरंजीवियों में एक हैं जिनकी मृत्यु अब तक नहीं हुई है और वह कलयुग के अंत तक इस पृथ्वी पर अपने दायित्व का निर्वहन करते रहेंगे।

भगवान राम ने परशुराम जी से जिन नव गुणों की चर्चा की थी वह मनुष्यता के लिए अत्यंत आवश्यक हैं।यह सभी नव गुण ब्राह्मणों में होना अनिवार्य बताया गया है।इन्हें ही "नव-निधि" के नाम से भी जाना जाता है। यह निधियां आत्मिक, बौद्धिक और सांसारिक हैं। आत्मिक निधि के अंतर्गत 1-विवेक 2-पवित्रता 3-शांति को गिना जाता है बौद्धिक निधि के अंतर्गत 4-साहस 5- स्थिरता और 6-कर्तव्यनिष्ठा तथा सांसारिक निधि के अंतर्गत 7-उत्तम स्वास्थ्य 8-समृद्धि और 9-परस्पर सहयोग को माना जाता है। इन्हीं का स्मरण भगवान राम ने "नव गुण परम पुनीत तुम्हारे" कहकर कराया था। ब्राह्मणों द्वारा धारण किए जाने वाले जनेऊ के तीन सूत्र इन्ही आत्मिक,बौद्धिक और सांसारिक निधियों का प्रतिनिधित्व करते हैं। प्रत्येक सूत्र में तीन तीन सूत्र और होते हैं जो पुनः ऊपर बताई गई निधियों को इंगित करती हैं।इस प्रकार प्रत्येक जनेऊ में 9 धागे होते हैं जो उसे निरंतर इन नव निधियों की प्राप्ति का अभ्यास करने हेतु प्रेरित करते हैं।

पौराणिक आख्यान के अनुसार भगवान विष्णु ने त्रेता युग में अपना "सुदर्शन चक्र" भगवान परशुराम को सौंप दिया था। जो द्वापर युग में भगवान परशुराम ने श्री कृष्ण को ऋषि संदीपनी के आश्रम में प्रदान कर त्रेता युग में अनीति, अधर्म, अन्याय आदि की समाप्ति में उनकी भूमिका को रेखांकित कर दिया था।

अक्षय तृतीया के इस पुनीत अवसर को ब्राह्मण समाज अपने पुनर्जागरण, पुनर्संगठन और पुनरुत्थान के अवसर के रूप में अपनी पुरातन- प्रतिष्ठा एवं सामाजिक श्रेष्ठता की पुनर्प्राप्ति की आकांक्षा से मनाता है।भगवान परशुराम से ज्ञान और शक्ति दोनों दृष्टियों से अपने को सामर्थ्यवान बनाने का अभिलाषा करता है। परंतु यह अभिलाषा चिरकाल से अपूर्ण ही है। इसकी पूर्ति के लिए आवश्यक है कि ब्राह्मण समाज अपने में आई विकृतियों,अहंकार, लोभ, दंभ, नशा, आहार-विचार भ्रष्टता, अज्ञानता आदि को दूर करने हेतु त्याग और तपश्चर्या पूर्ण जीवन को अपनाए।ऊपर लिखित नौ निधि या सद्गुणों का निरंतर अभ्यास करे। समाज के सब भांति उत्थान हेतु अपने को समर्पित करें,तभी सामूहिक रूप से ब्राह्मण समाज अपने पूर्व गौरव को प्राप्त करने में समर्थ हो पाएगा। 

                   🚩🙏🏻जय श्री महाकाल🙏🏻🚩

#fbshare

जात

#परशुराम श्रावण संवाद !
जातीचा संबध कर्माशी असतो ! ब्राम्हण चा मुलगा ब्राह्मण ..वैश्य चा मुलगा वैश्य नसतो!
https://youtu.be/Mo2f6iElKWY

परशुराम जन्माने ब्राह्मण आणि कर्माने क्षत्रिय होते !
विद्या

Tuesday, April 21, 2020

लेख २

 "#एका_संन्यासाची_खरी_गोष्ट ".......!!!!
(योगी आदित्यनाथ महाराज) 
😪😪😪😪😪😪

आई !!! मला खरंच संन्यासी बनण्याची इच्छा आहे.
माझ्या जीवनाची सुरवात येथे होणार नाही......... मला माझा समाज मला आर्तभावातुन बोलवत आहे!
मला जायला लागेल आई!
कोणाला तरी अग्नीकुंडाची आहुती बनले पहिजे!

आई!!! तर तू कधीच माघारी येणार नाहीस का.......???

 दोघांत वडील आनंद रडत योगीना एक प्रश्न विचारतात - " जेव्हा मी मरत असेल तेव्हा, पण तू येणार नाहीस का "........??? 

बाबा, मी माझ्या कर्माने तुम्हाला तर्पण (संतूृष्ट)करेल. 

आज सरकारी वार्ताफलमध्ये(मिटिंग)असताना  वडिलांचे निधन झाल्याची बातमी  फोनवरून समजली तरीही पडक्या चेहरा घेऊन रडक्या  आवाजात मिटींगमध्ये कोरोना सबंधीत विषयावर सरकारी यंत्रेला आदेश देत होते....... आपल्या वडिलांच्या अंतिमसंस्कार पेक्षा आपल्या कर्तव्यास प्रथम प्रधान्य देत आपल्या जनतेचे हित लक्षात ठेवत आपल्या राज्याची सेवा 'दिवस-रात्र' योगी आदित्यनाथ करत आहेत........लॉकडाउननंतरच आपल्या घरातील सदस्याना ते भेटण्यास जाणार आहेत व त्याचबरोबर अंतिमदर्शनास जास्त गर्दी करु नये म्हणून ही आदेश दिला आहे........एकदा श्रीराम प्रभू सहज बोलले होते संतापेक्षा कोणताच राजा मोठा नसतो......... त्याचबरोबर एका राजाचे गुणवर्णन करताना सांगितले होते एका राजासाठी आपल्या घरातील सदस्यांपेक्षा प्रजाच (जनता)सर्वस्व असते......... आपल्या जनतेसाठी जो राजा आपले सर्वस्व त्यागण्याची क्षमता ठेवतो तोच सर्वश्रेष्ठ राजा असतो !

" #योगी_आदित्यनाथ_यांचे_वडिल_ आनंद_सिह_बिश्त_यांना_भावपुर्ण_श्रद्धांजली ".
            🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

   

✍️ लेखक :- रितेश राजाराम काळोखे.

लेख १

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला साष्टांग नमस्कार ! ! 
नमस्कार बंधूंनो,
आज एक खूप सुंदर अनुभव आला. संघ कार्याचा हा महिमा असेच म्हणावे लागेल.

विलेपार्ले ला एक ८५+ वयाचं मुजुमदार नावाचं जोडपं रहातं . त्यांच्या मुलीने त्यांना जेवणाचा डबा लावून दिला  आहे .डबा आणि इतर सहायता म्हणून एक नर्स लावून दिली आहे. इथे त्यांचं दुसर कोणी नाही. ५२ वर्षाचा मुलगा आहे पण तो अधू आहे.  मुलगी अमेरिकेत आहे.

कोरोना प्रकरणात डबा पोचला नाही, नर्स पोचली नाही म्हणून मुलगी काळजीत. तिने तिथल्या संघाच्या कार्यकर्त्याला काही मदत करता येईल का ते पाहावे असे सांगितले. ज्याला सांगितले तो अमेरिकेतील कार्यकर्ता माझ्या नागपूरच्या आदित्य नावाच्या एका स्वयंसेवक बंधूचा मित्र आहे. आदित्य त्याला म्हणाला," बघतो". आदित्य ने मला फोन केला की असं असं आहे काय करता येईल. त्याला सांगितले की मी बघतो. काल उशीर झाला होता, रात्री पावणे बारा वाजले होते, म्हणून पार्ल्या च्या कार्यकर्त्याचा नंबर कसा मिळवायचा ह्या विचारात असताना, तिकडे जर्मनी मध्ये फ्रॅंकफर्ट चा मुख्यशिक्षक, आदित्य नावाचाच  संघाचा एक कार्यकर्ता आहे जो की मूळ चा विलेपार्लेचा आहे त्याची आठवण झाली. शिवाय जर्मनी वेळेनुसार तीकडले संध्याकाळचे सव्वासातच झाले होते म्हणून त्याला व्हॉटसअप कॉल वर सांगितल की मला पार्ले च्या कार्यकर्त्याचा नंबर देऊन ठेव, अशी अशी मदत हवीये. त्याने नंबर दिला, श्री जयेश शाह पार्ले सहकार्यवाह. मी म्हंटलं," मी उद्या त्यांच्याशी बोलतो तू तूर्तास मेसेज पाठवून ठेव त्यांना".

आता आज त्यांना फोन करणारच होतो, तर त्यांचाच मला मेसेज आला की *काम फत्ते*. श्री दिलीप सोनी नावाचे पार्ल्याचेच स्वयंसेवक त्यांच्या घरा जवळच्याच सोसायटी मध्ये  राहतात. त्यांनी त्यांची जाऊन चौकशी केली आणि त्यांना आश्वस्त केलं. त्यांनी व्हिडिओ पण बनवून पाठवला.

विलेपार्ले...अमेरिका...नागपूर...दादर... फ्रॅंकफर्ट...विलेपार्ले अस वर्तुळ पूर्ण झालं.

मस्त वाटल. संघ स्वयंसेवकांचं जाळं किती मजबूत विणलं गेलंय ते पाहून धन्य वाटलं.

प्रद्युम्न गाडगीळ.

Saturday, April 18, 2020

"वरती" गेल्यावरही उत्तर देता यायला हवं !

"वरती" गेल्यावरही उत्तर देता यायला हवं !

**

सुश्री निर्मलाताई पुरंदरे 

उच्चस्तरीय पुरस्कारांकित व आयुष्यभर समाजभान जपणारे हे नाव. 

डोंगराइतकं काम उभं करूनही आयुष्यात त्यांनी कधीच कुणाला मुलाखत दिली नव्हती. प्रसिद्धीपेक्षा सिद्धी महत्वाची. असं त्यांच मत. 

मात्र जीवनात त्यांनी एकमेव मुलाखत दिली ती मला. "कर्तृत्वाला सलाम" या पुस्तकात मी काही उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा परिचय करून देण्याचं मिशन घेतलेलं. त्यासाठी मला ताईंची मुलाखत हवी होती. मलाही सुरुवातीला नकारच मिळाला. पण जवळपास पंधरा दिवस पाठपुरावा केल्यावर शेवटी त्या हसत हसत म्हणाल्या, "किती चिवट रे तू पण" 

आणि तब्ब्ल दोन अडीच तास मस्त मुलाखत दिली.  

यथावकाश त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी त्यांनाच निमंत्रित केलं. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात देखील माझ्या त्या एकूणच "चिवटपणाचा" उल्लेख पॉजिटिव्हली करून "ध्येय गाठायचे असेल तर असा चिवटपणा अंगी असावा" हे सर्वाना सांगितलं. 

तर त्यांच्या त्या मुलाखतीत त्यांनी इतके सुंदर विचार दिले की त्याचीच एक मोठी सिरीज होईल. पण एक विचार फारच आवडला. 

मी त्यांना विचारलं होत की, "घरी सगळं उत्तम, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेसारखे पती, माधुरी सारखी गुणवान गायिका / लेखिका मुलगी,. प्रसाद अमृत सारखी ध्येयवादी मुलं, हे सगळं करत करत किंवा याना प्रसंगी थोडं बाजूला ठेवून तुम्ही बाकी सामाजिक काम इतकं कसं करू शकला?"

तर त्या म्हणाल्या होत्या, "कसे आहे न की, देवाने आपल्याला इतके चांगले आयुष्य दिले, इतकी चांगली बुद्धी दिली. मग ती वापरली नाही तर काय उपयोग? इथलं सगळं आटोपून "वर" गेल्यावर त्याने जर विचारलं की, बाई ग, इतकं सगळं चांगलं आयुष्य दिल होत, काय केलं तू त्याच? तर मला त्या देवाला किमान एक तरी काम सांगता आलं पाहिजे."

समाजसेवेची हि अनोखी व्याख्या ऐकून मी निशब्द !

अजून एक असाच सुंदर विचार त्यांनी दिलेला (जो पुस्तकात पण मी लिहिला आहे)

मी विचारलं होत, "बाबासाहेब इतिहासात मग्न, तुम्ही वर्तमान व भविष्यकाळ घडवण्यात दंग. पण मग दोघेही जाहीर ठिकाणी कधीच पती पत्नी असा परिचय / उल्लेख करत नाही. असं का ?" 

त्या म्हणाल्या, "हे बघ धनंजय, रेल्वेचे दोन रूळ समांतर असतील तरच त्यावरून रेल्वे नीट धावेल न. रूळ एकमेकांना चिकटत बसले तर अपघात होईल. तसेच दोघेही आपापल्या कार्यात, विश्वात मग्न असतील तर उगीच एकमेकांच्या जगण्यात, कामात लुडबुड करू नये. जन्माला आलेला प्रत्येकजण तसाही स्वतंत्र येतो व जातो. मग उगीच पायात पाय कशाला?"

आजकाल अनेक घरात पती पत्नी दोघेही करियर करत असतील तर त्यापैकी ९०% घरात विसंवाद आणि काही ठिकाणी पराकोटीचा वाद झडत असतो. त्यांच्यासाठी निर्मलाताई किती छान संदेश देऊन गेल्या न ?

अंगणवाडीच्या माध्यमातून हजारो महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या "वनस्थळी" संस्थेच्या संस्थापक व जिथे मी घडलो वाढलो त्या विद्यार्थी सहायक समितीच्या ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय निर्मलाताई पुरंदरे, यांचे नुकतेच "वरती" प्रयाण झाले. त्यावरून मला त्यांचे हे विचार आठवले तेच तुमच्यासोबत शेयर केले. 

"पोरकं होणं म्हणजे काय?" हे मला पुन्हा एकदा जाणवलं. दोन वर्षांपूर्वी मातृछत्र हरवलं तेव्हा आणि आता निर्मलाताई गेल्यावर एकदा! कारण माझ्या हॉस्टेल जीवनात कायमच ताईंनी जणू आईची भूमिका घेतली. प्रसंगी कठोर तर प्रसंगी हळव्या होऊन जपलं. माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी असेच जपले. 

शेवटी शेवटी त्या आजारी असताना आम्ही भेटायला गेलेलो. थोडा विकनेस वाढल्याने विश्रांती घेत होत्या तरी स्मरणशक्ती तल्लख होती. समोर पाहताच म्हणाल्या, "आलास का रे बाबा, कसा आहेस? आता खोड्या कमी केल्यास न"?

अशा या निर्मलाताई. 

त्यांच्या कार्याला हि शब्दांची सुमनांजली !!

- धनंजय देशपांडे (dd)

*

फोटो : हाच तो पुस्तक प्रकाशन समारंभ (सर्वात डावीकडे आदरणीय निर्मलाताई)

(पोस्टमधील विचार आवडले असतील तर प्लिज शेयर करा, जेणेकरून त्यातून इतर अनेक घरातील विसंवाद कमी होऊन सुसंवाद सुरु होतील)

Monday, April 13, 2020

लेख

पाहिलात ना हा पोलीस अधिकारी... 
निःशब्द होऊन जातो आपण असं काही दिसलं की .. 

वाटतं याच्या तुलनेत आपण किती सुखात आहोत. आपल्याला घरातच तर राहायचं फक्त. 
इथे पहा.. दारात बसून जेवावं लागतंय कारण कर्तव्य साद घालतंय.. 

हक्काचं घर असून तो आत बसून जेऊ शकत नाही.. आपल्यामुळे घर संकटात टाकायचं नाही त्याला. 
ताटाखाली प्लास्टिकचा डबा घेतलाय आणि दोन घास पोटात टाकतोय कसेबसे.. 
नजर मात्र खिळलीये दारात उभ्या असलेल्या आपल्या चिमुरडीवर...
दारात उभं राहून चिमुकलीसुद्धा पाहतेय बापाला ! 
पण मोकळेपणाने उचलून सुद्धा घेऊ शकत नाही तो. 
जातील हेही दिवस असा दिलासा देतोय स्वतःला... 
घासासोबत गिळतोय एक आवंढाही !

हे त्याचं रोजचं जगणं झालंय आता. 
असाच जेवतोय फुटपाथवर, झाडाच्या सावलीत नाहीतर असा आपल्याच दाराशी निर्वासितांसारखा !
त्याची कशाविषयी तक्रार सुद्धा नाही कारण त्याला माहितीये माझ्यासारखे अनेकजण रोज यातूनच जातायत

कारण कोरोना नावाच्या महाराक्षसाशी दोन हात करायला तो उतरलाय मैदानात. 
 छातीचा कोट करून रोज तो उभा राहतोय रस्ते निर्मनुष्य करण्यासाठी !
आपल्याला पिटाळतोय घरी आपण सुरक्षित राहण्यासाठी !
स्वतः मात्र उभा राहतोय रस्त्यांवर तुमच्या आणि कोरोनाच्यामध्ये भिंत बनून !

आपले दोन अश्रू त्याच्यासाठी देऊया.. 
त्याची ही मेहनत वाया जाणार नाही हे पाहूया.. 

लेखन :© पराग पोतदार


Sunday, April 5, 2020

पर्वणी २

तुम्ही दोन मित्र एकमेकांना भेटला, तर तुम्हांला किती आनंद होतो ! आणि पुष्कळ वर्षांनी भेटलात तर हा आनंद आणखी शतपट असतो. दोन मित्रांच्या भेटीत गोडी असते. कारण तेथे निर्मळ प्रेम असते. परंतु दोन थोर पुरुष परस्परांस भेटतात तेव्हा तर अपूर्व गोडी असते. ती चंद्रसूर्यांची भेट असते. हरिहरांची ती भेट असते. समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांची अशीच एकदा भेट झाली होती. एका नदीकिनारी या दोन साधूंचे काय बोलणे होणार म्हणून हजारो लोक जमले होते. परंतु एकाने पाण्यात दगड टाकला. दुसऱ्याने आकाशाकडे बोट केले. दोघे निघून गेले. त्याचा अर्थ काय? एकजण म्हणाला : ‘पाण्यात दगड बुडतो त्याप्रमाणे हे लोक संसारात बुडत आहेत.’ दुसरा म्हणाला : काय करणार? प्रभूची इच्छा.’

~ साने गुरुजी

पर्वणी १

धीरूभाई अंबानींचे व्यवसाय चातुर्य

धीरूभाई अंबानी यांचे व्यवहार आणि व्यवसाय चातुर्य आपणा सर्वाना माहित आहेच. दडून बसलेली संधी शोधणे आणि त्या संधीचा योग्य उपयोग करून त्यातून नफा मिळवण्याची धीरुभाईंची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी होती. धीरुभाईंच्या या हुशारीचे एक उदाहरण नुकताच वाचनात आले. ते असे...

गोष्ट आहे १९५० सालची. तेव्हा धीरूभाई येमेन या देशात नोकरी करत होते. त्या काळात येमेन सरकारच्या अर्थ खात्यातील काही अधिकाऱ्याना एक विचीत्र गोष्ट लक्षात आली. येमेनचे चलन असलेल्या रियालची (Rial) नाणी झपाट्याने लुप्त होत होती. ही नाणी अचानक कुठे जाऊ लागली याचा त्यांनी शोध सुरु केला. काही दिवसांनंतर त्यांचा लक्षात आले की सर्व नाणी येमेन मधील आदेन या शहरातून अदृश्य होत आहेत. आणखी चौकशी केली असता त्यांना कळले की धीरूभाई नावाचा एक भारतीय कारकून बाजारातून ही नाणी चलनाच्या किमतीपेक्षा जास्त भाव देऊन विकत घेत होता.

धीरूभाई तेव्हा जेमतेम २० वर्षांचे होते. त्यांच्या लक्षात आले होते की येमेनचे चलन असलेले रियाल हे नाणे चांदीचे होते. आणि चलनी बाजारात असलेल्या या नाण्याच्या ब्रीटीश पौंडामधील किमतीपेक्षा, तेवढयाच वजनाच्या चांदीची किमत अधिक होती. धीरुभाईंनी नाणी बाजारातून जास्त भावाने खरेदी केली आणि नंतर ती नाणी वितळवून धातूच्या बाजारात जास्त भावाने विकली.

केवळ तीन महिन्यात या सर्व व्यापातून धीरुभाईंनी त्याकाळी काही लाखांचा फायदा कमावला होता. पुढे सरकारच्या लक्षात आल्यावर धीरुभाईंनी हा उपद्व्याप थांबवला पण आपल्या व्यवहार चातुर्याची चुणूक मात्र त्यांनी दाखवून दिली होती...

जो सपने देखने की हिम्मत रखते है
वो पुरी दुनिया जीत सकते है...

पुढील लिंकवर क्लिक करून आगामी सर्व पोस्ट्स थेट व्हाट्सएपच्या माध्यमातून मिळवता येतील