Wednesday, January 27, 2010



नाती


जेव्हा एखादं नातं तुटतं
व्यक्ती जेवढी दुरावते
आठवनी तेवढ्याच जवळ येतात.
विसरायचा प्रत्येक प्रयत्न
मनाला दंश करुन जातात.


आपुलकीची जखम
खोल मनात तशीच राहते.
सगळे कही जुने जुने,
पण वेदना नवीन देत जाते.


चुक कोणाची होती
अर्थ याला राहातच नाही,
आठवनींचे ढग दाटुन आले तरी
डोळ्यातले अश्रु गालावर ओघळतच नाही.


त्या व्यक्तीचे “बोलणे” विसरु
पण, हा रोजचा “अबोला” मात्र सलतं.
ओठ हसत असले तरी
दुखतं किती ते मनालाच कळतं.


जेव्हा एखादं नातं तुटतं
दुखतं किती ते फ़क्त मनालाच कळतं

0 comments: