Friday, May 13, 2016

नामस्मरण

तरुण वयात नामस्मरण करावे.
नक्की वाचा -
तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. त्या वयात मनुष्य जे काही करेल म्हणजेच कर्तुत्व करेल त्याच कर्तुत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते. कारण ह्या वयात मूले हुशार असतात matured असतात.तरुण रक्त अंगात सलसलते. ह्या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगति करण्यासाठी व आपल्या  देवाची शक्ति प्राप्त होवून ह्या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते.म्हातार पनि नामस्मरण होत नाही कारण त्यानी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करन्यासाठी घालविलेले असते. त्यामुळे त्यांच्या कडून नामस्मरण झाले तरीही ते देवाला पोहचते. पन दैविशक्ति त्यांना मिलत नाही. तर ही शक्ति तरुण वयातच मनुष्याला मिळते. नामस्मरण हे तरुंनांना जीवनात प्रगति करण्यासाठी एक अमृत असते.त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ति मिलते.नामस्मरण का कारायचे असते? कारण तरूण वय हे अल्लड़ असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते मग त्या मनाला व विचारांना स्थिर फक्त नामस्मरणच करते.त्यांना ह्या वयात जगाचा अनुभव नसतो कोण कधि फसवेल, कधी घात करेल किंवा जीवनात कधी मृतु येईल हे सांगता येत नाही. पण नामस्मरनाने खुप काही समस्या जीवनात सुटु शकतात. हल्लीच्या मुलांना नेट टीवी मोबाइल ह्याचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धि स्थिर नाही. सतत तेच तेच जीवन जगल्या मुले वाइट विचार मनात येतात. बारीक सारिक गोष्टींवरून चिड़तात. लगेच राग येतो काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुसर्यांचा घात करतात. पैशांसाठी व्याभिचार करतात. पैसा श्रेष्ट आहे संस्कार कमी आहेत अशी ह्यांची विचारसरनि असते. त्यात त्या स्पर्धा परीक्षा स्वताच्या आत्महयाला व शरीराला त्या परीक्षेत सतत गुंतवून ठेवले असल्यामुळे त्यांना जीवन हे नीरस वाटते. दुसर्यांच्या पुढे जाने खुप पैसा कमविने हेच ह्यांचे ध्येय असते.पण मन ह्या सुखवस्तु मिळाल्यामुळे विचलित होवून काही वेळेला मुले वाम मार्गाला जातात. कारण वाम मार्गाला जान्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे. ह्या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते. नामस्मरनाने एक वेगळीच दैवीशक्ति प्राप्त होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले सर्व लक्षात राहते. वाइट कर्म करायला मन त्या मुलांचे घाबरते. कारण मनात नामाची माल जपली जाते.तरूण मुले वाइट कर्म करत नाही त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही. म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. नामस्मरणामुळे खुप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जस जसेनामस्मरण वाढते तस तसे दैविक शक्ति वाढते. त्यामुळे त्यांना जीवनात कितीही वाइट प्रसंग आला कि देव त्यांचे रक्षण करते. त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते. देवाचे सरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते. चेहर्यावर makeup ची गरज भासत नाही.तर आपोआप तेज येते. तरुण मुले आनखी सूंदर दिसू लागतात. ईश्वरी अंश त्यांच्यात तयार होते.चिंता भय ह्याची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतलेली असते.देवालाही सूंदर ताजे फुल आवडते म्हणजेच तरुण काळा असो या गोरा पण त्याचे सूंदर निष्पाप मन देवाला आवडते. म्हणून तरुण वयात नामस्मरण करायचे असते. म्हातारपन आता कोणी पाहिले आहे. मृतु कधि येईल सांगू शकत नाही आज मी लेख लिहिते उद्या तुम्हाला दिसेन की नाही सांगू शकत नाही. म्हणून देवाचे दिवसातून एकदातरि नामस्मरण करा कारण जीवनातला खरे  अमृत तेच आहे.
~ संग्रहित लेख

0 comments: