Friday, December 28, 2018

दादा आता आई बाबा माझ्याकडे राहतील

गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावेत मी ही त्यांचा मुलगा आहे.माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली 25 वर्ष सेवा करत आहे.आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या कुटूंबियांना ही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे. व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे.माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्यांने अत्यंत चांगला सांभाळ केला आहे.

पण आता तोच थकला आहे मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत. आई- वडिलांना सांभाळन्यासाठी दोनों भाऊ कोर्टात भांडत आहेत। हा विलक्षण प्रकार आहे. आईवडिलांना न साभांळना-या नालायक अवलादीच्या गालफडात लावलेली जबरदस्त चपरा आहे. जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्ध आश्रमात ठेवनारा जमाना आला आहे. तेथे हे श्रावणबाळ कसे जन्माला आले. जजला निकाल देता येइना. त्यांनी आईवडिलानाच विचारले आपली काय ईच्छा आहे.तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते.

तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले.तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावनार याचे खुप दु:ख झाले. धन्य ते आई वडिल ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले.या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणा-या व आईची मान कापना-या परशुरामांची अवलादी जन्माला आल्या आहेत. आईवडिलांना वृदाश्रमात ठेवनारे आयआयटी पास नालायक आहेत. सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्च भ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवन्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करना-यां न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत.

या देशात शिकून परदेशात नोकरी करनारे महाभाग आहेत. ज्यांनी देशसेवा करायची सोडून परकियांची नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अवस्था निपुत्रिका सारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतील पण आईवडिलांना सांभाळतील. पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत. वरिल कथा आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे. वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतिय संस्कृती ची सर्वात मोठी अधोगती आहे.


एका माझ्या मित्राच्या मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी पुण्यात गेलो असता मुलगी स्पष्ट म्हणाली लग्नानंतर मुलाचे आईवडिलांना आमच्या सोबत राहता येणार नाही ही माझी पहीली अट आहे


धन्य आहे पुणेकरांची हिंदु संस्कृतीचे माहेरघर पुणे असलेल्या परिसरात सर्वात जास्त वृध्दाश्रम आहेत. अशी भावंडं हवीत. सलाम त्यांना. तुम्ही पण तुमच्या आई-बाबा वर प्रेम करत असाल तर नक्की शेअर करा. धन्यवाद..!

http://meemarathi.in


0 comments: