Monday, February 1, 2021

राऊळ महाराज

॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
II श्री परमपूज्य सद्‌गुरू समर्थ राऊळमहाराज II
कोकण ही संतरत्नांची खाण म्हटले जाते.वैविध्यपुर्ण सौंदर्य संपन्न कोकणात बरेच संतमहात्मे होऊन गेले. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव तसे कळसुत्री बाहुल्या, आणि ठाकर समाजाने जतन केलेल्या बर्याच लोककला मुळे प्रसिद्ध आहे.हेच गाव पिंगुळीतील थोर अवलिया संत राऊळ महाराजांमुळे प्रकाशझोतात आले.

सिंधुदूर्ग जिल्हातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या लहानशा खेडेगावात जन्माला आलेले हे पिंगुळीचे ब्रम्हयोगी असा हा दत्ताचा अवतार म्हणजे परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराज. लहानपणापासून परमार्थाकडे ओढा असलेले हे सद्‌गुरू नामस्मरणात रंगून जात. ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्‌गत होती. ते १९४५ ते १९७२ अशी २७ वर्ष कठोर ध्यानसाधना एका छोट्‌याशा खोलीत, एकावेळी २ ते ३ महिने काहीही प्राशन न करता करत असत. त्या काळात जगात ‘आई श्रेष्ठ’ याचेच प्रबोधन ते जास्त करत आणि तीच शिकवण परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराज आज भक्तजनांना देतात.

पिंगुळी क्षेत्री परमपूज्य श्री समर्थ महाराजांनी जांनी ज्या छोटया खोलीत ध्यानधारणा केली, तेथेच परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज समाधिस्त झाले आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांनी राऊळबाबांचे समाधीमंदिर तेथेच उभारले आहे. या समाधीमंदिर व श्रीदेवी माउली मंदिर या दोघांच्या मध्ये उभा असलेला औदुंबर वॄक्ष परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांच्या ध्यानसाधनेचा आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांच्या आजपपर्यंतच्या ५८ वर्षांचा आध्यात्मिक प्रवासाचा साक्षी आहे.

सर्वसामान्य माणसासारखे एका गरिब शेतकरी कुटुंबात जन्म झालेले कृष्णा उर्फ आबा राऊळ पिंगुळी ग्रामदेवता रवळनाथ देवस्थानचे मानकरी होते.घरच्या गरबीमुळे ते नोकरीसाठी मुंबईला आले.त्याना भजन गाण्याचा छंद होता.ज्ञानेश्वर तुकारामादी संताचे अभंग मुखोद्गत होते.काम करताना आपल्या पहाडी आवाजात सतत मुखांने  अभंग गात असत.संसारात विरक्ती आली आणि ते विश्वात्मक वृत्तीतुन संसारी लोकांना भक्तीमार्गाकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन करु लागले. शिक्षण कमी असले तरी त्यांचे पाठांतर चांगले असे.त्यानां ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती.त्यांनी भक्तांसाठी बरेच चमत्कार केले.भक्तांची संकटे दुर केली.

भक्तासाठी पंढरीच्या विठ्ठलाचे आपल्यात दर्शन घडवले.कित्येक भक्तांना ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन त्यांचे करवी पारायणे करवुन घेतली.त्या़नी लावलेले औंदुबर वृक्षाचे रोप आज मोठ्या वृक्षात रुपांतरीत झाले.त्यांचा भक्त संप्रदाय खुप मोठा आहे.मुंबई महाराष्ट्र,गोवा कर्नाटक या राज्यातुन आजही पिंगुळी गावी समाधी स्थानी भक्त मंडळी येतात.समाधीस्थानी नतमस्तक होतात.अशा या सद्गुरू राऊळ महाराजांनी इंचगिरीच्या गिरीमल्लेश्वर संप्रदायाच्या बाळकृष्ण महाराजांकडून शिष्यत्व पत्करले होते.

भजन त्यांच्या आवडीचे असल्याने ते स्वत:भजन गात आणि इतरांकडुनही भजन करवुन घेत.ते तपसाधनेसाठी कुठेही गेले नाही घरातच तासन् तास ध्यानाला बसत.असे हे सिद्ध अवलिया जरी आज आपल्यात नसले तरी पिंगुळी गावी समाधी स्थानी नतमस्तक झाल्यावर त्यांचे चिरंतन अस्तित्व जाणवते.त्यांच्या पश्र्चात त्यांचे पुतणे अण्णा महाराज त्यांचे कार्य सांभाळतात.

॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
@गणेश उर्फ ​​अभिजित कदम

0 comments: