Friday, April 7, 2017

सल्लागार

सल्लागार.... जीवनात बहार
************
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....
हे फार महत्वाचे आहे....
पराक्रमी तर दुर्योधन पण होता
मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता
आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....
************
इतके जरी लक्षात घेतले तरी जीवनातील निम्मे प्रश्न आपोआप सुटतील.
मात्र यासाठी स्वतः जागरूक राहणेही गरजेचे. आपल्याला छान वाटेल असे काहीतरी बोलतोय म्हणून ती व्यक्ती सल्लागार होऊ शकत नाही. तटस्थ पणे त्या व्यक्तीने वागणे आवश्यक !!
***
सुदैवाने मला त्या त्या काळात असेच अनेक श्रीकृष्ण लाभले म्हणूनच तर खेड्यातून पुण्यात आलेला हा "धनंजय" काहीतरी करू शकला !!
**
#DD

0 comments: