Tuesday, May 19, 2020

देशभक्त नथुराम गोडसे जयंती

आज देशभक्त  #नथुराम_गोडसे यांची जयंती...

 नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे १९१०
ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे
झाला होता. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट
ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती.
त्यांची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने
फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती.
आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे
प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याचे नाक
टोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे
लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध
झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता.
 धार्मिक आणि अलौकिक आवडी
नथुराम गोडसे लहानपणी ध्यानावस्थेत जाऊन जे श्लोक
म्हणत ते त्यांनी कधीच वाचले नव्हते, असे म्हणतात.
या अवस्थेमध्ये ते आपले कुटुंब
आणि कुलदेवता यांच्या दरम्यान माध्यमाचे काम करीत
असेही सांगितले जाते. पण हे सगळे वयाच्या १६
व्या वर्षापासून संपून गेले .
यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. भारतीय
स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग
घेण्यासाठी त्यांनी यांनी हायस्कूलचे शिक्षण मध्येच
सोड्ले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक
पुस्तकांत मन रमवले. त्यांनी रामायण, महाभारत, गीता,
पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर
टिळक, मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर
अभ्यास केला होता .

 ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे दिल्ली येथील
बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींच्या ४०
मिनिटे आधी पोहचले. गांधी सभेसाठी जात असताना नथुराम
यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहनदास करमचंद
गांधी यांचा खून केला. खुनानंतर पळून जाण्याचा गोडसे
यांनी अजिबात प्रयत्न केला नाही.  (वाद सुरू आहे फक्त दोन गोळ्या नथुराम जींच्या पिस्तूल च्या होत्या तिसरी नाही)
गांधींच्या खुनाचा खटला
नथुराम गोडसेंवर मोहनदास
गांधी यांचा हत्येचा खटला पंजाब उच्च न्यायालयात
चालविण्यात आला. याव्यतिरिक्त त्यांच्यावर अवैध
शस्त्र बाळगणे यांसारखे अजून १७ आरोप ठेवून खटले
चालविण्यात आले होते .
गांधीहत्येचे कारण
खून खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम
गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे
यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम गोडसेंचे ते निवेदन
भारत सरकारने प्रतिबंध घालून प्रसिद्ध करण्यास मनाई
केली होती. या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ
आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे यांनी ६० वर्षे
न्यायालयीन लढाई केली. परिणामस्वरूप सर्वोच्च
न्यायालयाने हा प्रतिबंध
काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला परवानगी दिली .

न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५०
कारणे सांगितली होती. त्यांतली प्रमुख अशी --

1. अमृतसरच्या सन १९१९च्या जालियनवाला बाग
हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर
यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात
यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास
गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला .
2. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव
यांना दिलेल्या फाशी मुळे संतापलेली जनता गांधींकडे
आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण
देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण
गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक
कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .
3. ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनात
संबोधित करताना गांधीने मुस्लीम लीगच्या हिंसेसमोर
जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.
4. महंमद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुस्लीम
यांच्या विरोधाला न जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत
आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण केरळमध्ये
मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण केली, आणि जवळ
जवळ १५०० हिंदू ठार मारले गेले आणि २०००
हिंदूना बाटवून मुसलमान केले. गांधीनी याचा निषेध न
करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो की बहादुरी असे केले.
5. सन १९२६ मध्ये आर्यसमाजाच्या शुद्धीकरण
आंदोलनाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल
रशीद नावाच्याएका मुसलमान युवकाने केली. यावर
प्रतिक्रिया देताना गांधीनी, या अब्दुल रशीदला आपला भाऊ
म्हटले, त्याचे कृत्य बरोबर आणि आर्य
समाजाची शुद्धीकरण चळवळ ही राष्ट्रविरोधी आणि हिंदू
मुसलमान एकतेसाठी घातक आहे असे जाहीर केले.
6. गांधींनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज,
महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट
राष्ट्रभक्त म्हटले होते.
7. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर
मुस्लिमबहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन
प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट
हैदराबादच्या निझामाला हैदराबाद हिंदुबहुल
असूनही समर्थन दिले होते.
8. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच दिली होती.
9. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१ मध्ये
चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय
घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज
तिरंगी केला गेला.
10. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष
निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन
पट्टाभिसीतारामय्या यांना असल्यामुळे आणि सुभाष
बाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे
आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.
11. लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई पटेल हे
बहुमताने निवडूनआले असूनही केवळ गांधींच्या हट्टामुळे
हे पद जवाहरलाल नेहरू यांना दिले गेले.
12. १४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये आझालेल्या अखिल
भारतीय काँग्रेस समितीमध्ये भारताच्या फाळणीचा निर्णय
अस्वीकृत होणार होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस
विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले. या आधी त्यांनीच
म्हंटले होते की विभाजन हे माझ्या प्रेतावरच होईल.
13. जवाहरलाल
नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर
पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित
केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसतानादेखील
त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले, आणि त्याच
वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने
व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण करून सरकारवर
दबाव आणला.
14. पाकिस्तानातून आलेले हिंदू
निर्वासितांनी जेव्हा मशिदीत
तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला,
वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर
राहण्यास भाग पाडले.
15. ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर
अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न
देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे
हे दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून
ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास
सरकारला बाध्य केले.

 फाशीची कार्यवाहि होण्यापुर्वि काहि मिनिटे
आधि नथुराम गोडसे यांनी आपले बंधु श्री दत्तात्रय
यांच्या कडे आपली अंतिम
ईछ्चा प्रकट केली..
" जो पर्यंत सिंधू नदी अखंड
हिंदुस्तानातून प्रवाहित होत नाही ..भले
त्या साठी कितिहि वर्षे लागोत..
कितिहि पिढ्या येवो जाओ तो पर्यंत
माझ्या अस्थिचे विसर्जन करु नये..
श्री नथुराम गोडसे व श्री नारायण आपटे
यांच्या वर अंतिमसंस्कार झाल्या नंतर
अस्थि कुंभ त्यांच्या नातेवाईकां कडॆ
सोपवण्यात आला नव्हता..
...जेल प्रशासनाच्या लोकांनी तो अस्थि व
रक्षा कुंभ रेल्वे पुलावरुन खाली वहाणा~या नदित
फेकुन दिला...
परंतु जेल कर्मचा~या पैकी एकाने
हि घटना एका दुकादारास सांगीतली...
व त्या दुकानदाराने तत्परतेने
हि बातमी हिन्दू महासभा कार्यकर्ता इन्द्रसेन
शर्मा यांच्या पर्यंत पोहोचवली..
शर्मा आपल्या कार्यकर्त्यांना घेवुन
नदिवर गेले.. व तो अस्थि व रक्षा कुंभ
सुरक्षित पणे बाहेर काढला व स्थानीय
कॉलेज चे एक प्रोफ़ेसर ओमप्रकाश कोहल
यांच्या कडे सुपुर्द केला जो त्यांनी नंतर डॉ एल
व्ही परांजपे यांचे कडे नाशिकला जावुन सुपुर्द
केला...
पुढे हा अस्थि-कलश १९६५ मधे नाथूराम
गोड़से याचे छोटे भाऊ गोपाळ गोड़से
यांचे कडे पोहोचता केला गेला ज्या वेळी ते
शिक्षा भोगुन जेल च्या बाहेर आले..
१५ नोव्हेंबर १९५० ते आज पर्यंत
प्रत्येक १५ नोव्हेंबर ला गोड़से
यांचा "#हुतात्मा_दिवस" साजरा केला जातो...
सर्वात प्रथम गोड़से व आपटे
यांच्या फोटोस व अखंड भारताच्या फोटोस
पुष्पहार घातला जातो व
त्यांच्या मृत्यस जितके वर्षे झालीत
तितके दिप प्रज्वलीत केले जातात व भारत
मातेची आरति केली जाते..व नंतर उपस्थित
सर्वलोक गोडसे यांच्या अखंड
भारताच्या स्वप्ना साठी काम करित राहु
अशी शपथ घेतात....
आजहि नथुराम गोडसेंच्या अस्थींचे
अद्याप विसर्जन झालेले नाही आहे.
त्यांची अंतिम इच्छा अशी होती
" जो पर्यंत #सिंधू_नदी_अखंड_हिंदुस्तानातून_प्रवाहित_होत_नाही_तो_पर्यंत_माझ्या_अस्थी_विसर्जित_करण्यात_येवू_नये, भले
त्याला कितीही वर्षे लागली तरी चालतील
तो पर्यंत त्या पिढी दर पिढी हस्तांतरित
करण्यात याव्यात".
दरवर्षी १५ नोव्हेंबरला (नारायण आपटे
व नथुराम गोडसे उत्सर्ग दिवस)
इच्छापत्र पुनरुच्चार समारोह पूर्वक
केला जातो.

नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५
नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये
फाशी देण्यात आले. त्यांचे अंतिम शब्द असे होते, 

" जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप
केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर
मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो". 

 नथुरामजी यांना विनम्र अभिवादन..!!
#जय_हिन्दूराष्ट्र!🚩

0 comments: