Tuesday, February 27, 2024

मराठी भाषा दिन २

कवीचे जगणे आणि लिहिणे ही कधीही वेगळी व स्वतंत्र खाती नसतात. जगण्यातून कवितेला आणि कवितेतून जगण्याला वगळता येत नसते. जेव्हा जगणे आणि लिहिणे एकजीव होतात , तेव्हाच कबीर व तुकाराम जन्माला येतात.कवीच्या भाग्याचा अंतीम फैसला करणारे सर्वोच्च न्यायालय म्हणजे सामान्य जनताच असते. ही जनता कवीहून मोठी असते. कवीमुळे जनता नव्हे , तर जनतेमुळे कवी असतो. ही जनता ज्या कवीचा ह्रदयापासून स्विकार करते , तोच कवी अमर व महान होतो. म्हणून मराठी कविता ही मराठी माणसांची पवित्र ठेव आहे.
     हे जग ह्रदय असलेल्या जिवंत माणसांनी येथे जगायच्या लायकीचे म्हणजे सुंदर व निकोप बनले पाहिजे. कविता जगाला सुंदर बनवते , निदान त्याची कुरुपता तरी कमी करते.
       म्हणूनच कविता म्हणजे माणुसकीचे सौंदर्य सलामत ठेवण्यासाठी म्हणजेच माणुसकीच्या विजयासाठी सुरू असलेल्या सर्वव्यापी सनातन युद्धाचाच एक भाग होय.

            ----- सुरेश भट

0 comments: