Sunday, February 14, 2010

बोल ना रे काही तरी...
शी बाबा......आज काहीच का बोलत नाहीस...
हळूच मी त्या डोळ्यांकड़े पहिल...
चेहरयावर हास्य मग राहिले...
तिला कुठे माहित...
बोलक्या ओठानचा आज अबोलच होता...
आवाजासाठी चक्क आतुर होता...
तीच हसन...ते लाजन...
तीच रुसन..तर कधी भांडन...
तिचे प्रश्न...ती उत्तर...
कधी सवांद... तर कधी वाद...
कोण होती ती....???
नव्हती रक्ताची...
ना नात्याची....
परी होती ती या मनाची...
स्नेहच्या बंधाची....
अंतरीच्या गाभ्याची...
आठवणींनच्या काही गोड क्षणंची...
होती ती श्रावण सर...
वालवंटातही ओले चिम्ब करणारी...
की होती ती काजवा...
अंधारया आयुष्याची...
रेशीम गठिनचा बंध होता...
ह्या दोन खुळ्या मनांचा...
मैत्रीचा की प्रेमाचा...
हा प्रश्न नव्हता मनांचा...
तिझ सोबतचा वेळ क्षणात संपून जाई...
परत भेटीची ओढ़ आता अंतरी राहून जाई...
मी स्वर्ग नाही पहिला...
तिझ सोबतचा प्रतेक क्षण...
स्वर्गाहून सुन्दर राहिला..

0 comments: